राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, May 30, 2023

कष्टकरी श्रमिकांचा ज्येष्ठ सहकारी: कॉ. मार्शलभाऊ संसारे ?



( क्रांतिकारी ) विचारांचा कोणताही वारसा नसतांना स्वतःच्या हिमतीवर आणि भि. र. बावके यांच्या सहकार्याने शेतकरी, कष्टकरी आणि तमाम नाही रे वर्गाचा आधारवड बनलेला आमचा कॉम्रेड २२ वर्षांपूर्वी शांत झाला.
 या बावीस वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या नंतर चळवळीतील एकही दिवस असा गेला नसेल की त्यांची आठवण कोणी काढली नसेल. कष्टकरी श्रमिक आणि शेतमजूर यांच्यासाठी उभे आयुष्यपणाला लावून लढणारा क्रांतिकारी कॉम्रेड म्हणजे कॉ. मार्शल भाऊ संसारे.... मार्शल भाऊ चा आवाज ऐकला की तमाम शेतकरी, कष्टकरी एकजुटीने त्यांच्या हाकेला ओ देत, पाहिजे त्या ठिकाणी हजर राहात आणि त्यांच्या लढ्याला बळ देत.
हा लढा मुळातच कष्टकरी,श्रमिक आणि शेतमजुरांसाठी असल्याने त्यासाठी वेगळ्या अवतनांची गरज त्यांना पडत नसे. आणि म्हणूनच त्यांनी उभे केलेले अनेक लढे,चळवळी,आंदोलने यशस्वी झालेले दिसून येतात. आज सुखा समाधानने शेती कसत असलेल्या शेतमजुरांना त्यांची आठवण निश्चितच येतं असेल. ज्या शेतामध्ये पूर्वीची पिढी मजूर म्हणून राबली,त्या शेतात आज त्यांच्या कुटुंबातील मुलं स्वतःची म्हणून शेती करत आहेत. हा लढा यशस्वी होण्यासाठी कॉम्रेड भि.र. बावके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलन या सर्वांनी केलें.त्यांचेच फळ म्हणुन किमान कसण्यासाठी तरी जमीन त्यांना अधिग्रहित झाली आहे.
          कॉम्रेड मार्शल संसारे म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व. चळवळीतील अनेकांना घरी बोलावून आहे ती चटणी भाकर खाऊ घालुन विचारांचे चार शब्द पेरीत राहाणारा हा माणूस....तसा लवकरच गेला. त्यामुळे चळवळी सोबतच कुटुंबीयांचा आधारवड संपला.
        रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आता फारच कमी लोक राहिलेले असुन अशावेळी कॉ मार्शल भाऊ संसारे यांची आठवण कार्यकर्ते नेहमीच काढत असतात. काहीं दिवसापूर्वी ॲड. सुभाष लांडे पाटील, ॲड. बंशी सातपुते आणि ॲड. सुधीर टोकेकर नगर वरून येऊन गळनिंब ता. श्रीरामपूर येथील आजारी असणाऱ्या राष्ट्रपती पदक प्राप्त कॉ. पांडुरंग शिंदे यांना भेटायला निघाले होतें. सायंकाळ पाच नंतरची वेळ असल्याने त्यांनी मला संपर्क केला आणि मी पण त्यांच्यात सामिल झालो. प्रवास सुरू झाला.आम्हीं सर्व एकत्रपणे या भागात मा.श्री.अरुण कडू पाटील हे जेव्हां खासदारकी साठी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार होतें त्यावेळीं फिरलेलो होतो. तेंव्हा मुक्कामी श्रीरामपूर येथील चटई च्या असणाऱ्या लाल बावटा कामगार युनियन च्या कार्यालयांत असत. त्या ठिकाणी कॉ.मार्शल भाऊ संसारे असत.आणि नियोजनाचा महत्वाचा भाग ते सांभाळत असत. कोणत्या गावात कोणत्या कार्यकर्त्याला भेटायचं याची यादीच ते तयार करून देत. त्यावेळचे त्यांचें सहकारी कोल्हार येथील कॉ. एल. पी. दातिर, कॉ. भीमाशंकर पानसरे, कॉ पांडुरंग शिंदे, कॉ. श्रीधर आदिक सर्वच माणसं आपला विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असत. स्वत:चा कोणताही विचार न करता केवळ संघटना, पक्ष, विचार प्रणाली याचाच विचार ती मंडळी करत असत.प्रचाराच्या फेरीत अनेकदा सायंकाळच्या वेळी देवळाली प्रवरा येथील संसारे वस्तीवर आंबी स्टोअर वर जात असत. कॉ मार्शल भाऊ संसारे घरी आल्यावर सर्वांची जेवणाची व्यवस्था करायला सांगत. ऐनवेळी घरच्यांची विशेषता: बाईंची धावपळ होई. पण कधी त्यांनी कुरकुर केली नाहीं. त्यांचं घर म्हणजेच शेतकरी,कष्टकरी चळवळीच केंद्रच जणु. कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या या आठवणी जागृत झाल्या आणि येताना त्या वस्तीवर भेट द्यायचं ठरलं पण उशीर झाल्याने ते शक्य झालं नाही. असो.
          आता त्यांचे चिरंजीव कॉम्रेड शरद संसारे शेतमजूर, कष्टकरी,श्रमिकांच्या चळवळीमध्ये कार्यरत आहेत. या नाही रे वर्गाला आधार देण्याचं काम ते आता करत आहेत. 
 आज धावपळीच्या युगामध्ये
दुसऱ्यांना देण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही आणि दुसऱ्याचे अश्रू पुसण्याचेही कष्ट कोणी घेत नाही, अशावेळी कॉ. मार्शल भाऊ संसारे यांच्या विचाराची ज्योत पेटती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. कॉ. मार्शल भाऊ संसारे यांना लाल सलाम!
*सुनील गोसावी,*
संस्थापक, सचिव,
*शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य*

[[[समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर]]]

कान्हेगाव सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश खरात, तर व्हा.चेअरमनपदी सौ.विमल खरात यांची एकमताने निवड ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाच्या ताब्यातील कान्हेगाव विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी गणेश खरात यांची तर व्हा.चेअरमन पदी सौ.विमल खरात यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी आर.के. जाधव यांचे अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडीसाठी बैठक बोलविण्यात आली होती.
चेअरमनपदाची सूचना बाबा चौधरी यांनी मांडली त्यास अनुमोदक म्हणून सर्जेराव खरात यांनी अनुमोदन दिले. तर व्हा.चेअरमन पदाची सूचना सुनिल गिरी यांनी मांडली त्यास सौ.जयश्री सुनिल खरात यांनी अनुमोदन दिले. सदर मिटींग खेळीमेळीत पार पडली. निवडणूक अधिकारी यांनी वरील निवड जाहिर केल्यानंतर गुलालाची उधळण करण्यात आली.
           नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे व अशोक कारखाना संचालक मंडळाने अभिनंदन केले. सदर निवडीकरीता रावसाहेब खरात, गिताराम खरात, सुनील खरात, सुनिल गिरी, विशाल खरात, बाबा चौधरी, सर्जेराव खरात, वसंत अप्पा खरात, सोन्याबापु खरात, प्रकाश चौधरी, भिमराज खरात, उत्तमराव खरात, शिवाजी थोरात, जनार्दन खरात, विकास खरात, अशोक गि. खरात, प्रदिप खरात, अनिल खरात, ऋषी खरात, सुधाकर खरात, अशोक नाना खरात, ज्ञानदेव पावसे, विलास तुपे, संदीप खरात, भरत खरात, मनोज खरात, शिवाजी खरात, महेश खरात, राजेंद्र खरात यांनी विशेष परिश्रम घेतले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

शिव तिर्थात राज ठाकरें सोबत तेंच्या भेटीवर फडणवीसांच काही विनोदी गप्पा रंगले / जेणे करुन स्पष्टीकरण ?

मुंबई - प्रतिनिधि - विशेष - वार्ता - राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
यांनी सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली. काल रात्री अचानक उशीरा ही भेट झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
गेल्या काही दिवसांत राज ठाकरे यांनी भाजपने घेतलेल्या काही भूमिकांवर टीका केली होती. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकी कुठल्या मुद्द्यांवर चर्चा होते याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.राजकीय काही विनोद गप्पा होत राहिल्याने हशा चा पिक उभरला 
मात्र "अराजकीय गप्पा मारण्यासाठी काल शिवतीर्थावर गेलो होतो," अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'बऱ्याच दिवसांपासून आमचे ठरले होते, एक दिवस गप्पा मारायला बसु आणि त्याचा मुहूर्त काल लागला. आम्ही गप्पा मारल्या. या भेटीत राजकीय गोष्टी सोडुन गप्पा मारायच्या असेही फडणवीस यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे वेगळी भुमिक घेताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात आगामी मुंबई महानगरपलिकेची निवडणूक तसेच मनसे आणि भाजप-शिवसेना युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. पण गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, राज ठाकरेंनी भाजपच्या काही भूमिकांना विरोध दर्शवला आहे.
तसेच, नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरे यांनी भाजपवरही टीका केली होती. ज्यांना वाटतं कोणीही आपला पराभव करु शकत नाही, त्यांन या निकालातून धडा घ्यावा, असे राज ठाकरे म्हणाले होते. आता दोन्ही नेत्यांच्या भेटीवरुन अनेक अर्थ काढले जात असून, या पार्श्वभूमीवर फडणवीस राज ठाकरे यांच्यातील भेटीला महत्त्व कक्षा च आहे.

-------------------------------------------------------------------
==================================
: - राजु मिर्जा...शब्द...🖊️✅️🇮🇳...रचना...संकलन वार्ता...
==================================
-------------------------------------------------------------------






















शेतीची कामे लवकर उरका, या वर्षी भरपूर पाऊस येणार- पंजाबराव डखकांद्याचे भाव वाढणार, उष्णता वाढणार तीतका पाऊस व गारपिट वाढणार, झाडे लावून पृथ्वीचे तापमान कमी करण्याचे आवाहन ?

  भोकर - प्रतिनिधि - उत्त -
 यावर्षी भरपूर पाऊस होणार त्या बरोबर कांद्याचे भाव हि वाढणार आहे, तुमच्याकडे शेतीची कामे उरकण्यासाठी केवळ आठ दिवस बाकी आहेत, कामाचा उरक करा. दि.८ जून रोजी राज्यात मान्सून दाखल होणार आहे, दि.२७ व २८ जूनच्या दरम्यान खरीपाची पेरणी सुरू होणार, जास्त पावसामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी शेतात चर खोदावे लागणार आहेत, तर दि. २६ आक्टेाबरला थंडीचे आगमण होणार आहे. जेव्हढी उष्णता व तापमान वाढेल तीतका पाऊस वाढणार आहे त्याच बरोबर गारपीट ही वाढत आहे. जोराचा पाऊस व गारपिट टाळायची असेल तर झाडे लावा, जीतके झाडे जास्त तीतका रिमझिम पाऊस येणार, ऊन तापल्यामुळे पाऊस जास्त येतोय, पृथ्वीचे तापमान कमी करण्यासाठी झाडे लावा म्हणजे तापमान कमी होईल असे आवाहन प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे.  
श्रीरामपूर तालुक्यातील खोकरफाटा येथील लक्ष्मी लॉन्स येथे आयोजीत शेतकरी सुखी तर जग सुखी या हे या घोष वाक्याचा आधार घेत ‘समृद्ध शेतकरी सन्मान सोहळा’ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कृषी अधक्षिक तथा जिल्हा कृषीअधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय तंत्र अधिकारी पांडूरंग साळवे, नेवासा येथील कृषी अधिकारी बाळासाहेब कासार, श्रीरामपूरचे गुण नियंत्रण निरीक्षक अजीतानंद पावसे, संभाजी बिग्रेडचे शिवाजी पवार आदिंसह मान्यवर व्यासपिठावर उपस्थीत होते.
कुणी काहीही सांगत असेल की यावर्षी भरपूर पाऊस पडणार नाही असे काही जण म्हणत आहेत पण ते योग्य नाही कारण मी सांगतो यावर्षी भरपूर पाऊस पडणार आहे . दि. २८ मे ते दि.१ जून पाऊस होणार आहे त्याच बरोबर दि. ४ जून ते दि.७ जून मान्सुनपुर्व पाऊस होवून सर्वत्र पाणीच पाणी होणार आहे. तर दि. ८ जूनला मान्सून दाखल होणार आहे. गेल्या वर्षी पावसाने दिशा बदलल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला. शक्यतो पुर्वेकडून येणारा म्हणजेच परतीच्या पावसाचा अहमदनगर जिल्ह्याला जास्त फायदा होतो. येत्या दि.२० सप्टेबर रोजी विशाखापट्टनम मध्ये वादळ तयार होवून कमी दाबाचा पट्टा निर्माण होवून तो पाऊस संगमनेर पर्यंत चांगला होईल. जुलै, ऑगष्ट, सप्टेबर व आक्टोबर मध्ये चांगला पाऊस होईल तर दि. २६ आक्टेबरपासून थंडी सुरू होईल. 
या भागात झाडांची संख्या कमी असल्यामुळे त्याच बरोबर सर्वत्र सुरू असलेले प्रदुषण यामुळे उष्णतेत व तापमानात वाढ होत असल्याने त्या प्रमाणात पावसाची वाढ होणार आहे. त्यामुळे बर्‍याचदा पिकांचे नुकसान होत आहे. ते थांबवायचे असेल तर झाडे लावावे लागणार आहेत. या वाढत्या तापमानामुळे गारपीटीचे ही प्रमाणा वाढते आहे. गारपीट थांबवायची असेल तर तापमान कमी करावे लागेल. दर वर्षी दि.२२ फेब्रुवारी ते दि.१० मार्च च्या दरम्यान गारपिट होते. हि गारपिट शक्यतो खडक, डोंगर व खडकाळ जमीन असलेल्या भागात जास्त प्रमाणात गारपीट होते. तसेच कालवा, नदीच्या परीसरातील एक कीमीच्या परीघात जास्त गारपिट होते. काळ्या जमीनीत शक्यतो गारपिट होत नाही, झाली तर प्रमाण कमी असते. वाढत्या तापमानामुळे भविष्यात जास्त प्रमाणात पाऊस होईल पण त्यामुळे शेतीचे गणीत बदलत आहे. त्यासाठी य जमीनीचा निचरा करण्यासाठी आता आपल्याला शेतात चर काढावे लागणार आहे. त्यद्वारे शेतीत जास्त झालेले पाणी बाहेर काढून द्यावे लागणार आहे. चर व नाल काढल्या नाही तर पिके खराब होतील. 
निसर्ग आपल्याला पावसाचे संकेत देत असतो, झाडे, प्राणी, पक्षी आपल्याला पाऊसाचे प्रमाण सांगत असतात त्यासाठी निसर्गाचे निरीक्षण करावे लागते. दिवस मावळतीला जात असताना पश्चीमेकडे आभाळ लाल झाले तर तीन दिवसात पाऊस येतो. लाईटजवळ जासत प्रमाणात पाकुळ्या जमा झाल्यावर तीन दिवसात पाऊस होतोच. लींबाच्या झाडाला लीबोळ्या लागल्या की पाऊ होतो. गावरान आंबा एक वर्षाचा पाऊस सांगतो. ज्या वर्षी गावरान आंबे भरपूर पिकतील त्यावर्षी दुष्काळ पडतो तर ज्या वर्षी गावरान आंब्यांना फुलोरा येणार नाही, आंबे पिकणार नाही त्यावर्षी पाऊस भरपूर होतो. दर वर्षी दि.१५ मे ते दि.३० मेच्या दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस होतो.
तांब्याच्या धातुकडे विज जास्त प्रमाणात आकर्षीत होते म्हणून शक्यतो तांब्याचे कडे हातात घालू नये, विजेेच्या कडकडाट सुरू झाला की झाडाखाली उभे राहु नका, लींब, नारळ व आंबा या झाडांवर तसेच हिरव्या झाडांवर विज पडण्याचे प्रमाण जास्त असते. डोंगर, नदीकाठ, ओढे, नाले, तलाव व स्वीमींग टँक परीसरात विजेचा धोका जास्त प्रमाणात असतो. स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पायात चप्पल, बुट पायात असणे गरजेचे आहे. अशा वेळी मोबाईलचे इंटरनेट बंद करून ठेवावे.त्याच बरोबर अशा वेळी शक्यतो, खड्ड्यात बसावे व बसताना खाली वाळलेले गवत कींवा लाकुड असावे म्हणजे जमीनीशी आपला संपर्क तुटलेला असावा.
बदलत्या वातावरणानुसार शेतकर्‍यांनी आता हवामानावर आधारीत शेती करावी, निसर्गाच्या विरोधात जावून शेती करू नये. तसेच यावर्षी कांद्याचे भावात वाढ होणार असल्याचा अंदाज ही यावेळी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सांगीतले. या वेळी आयोजकांचे वतीने कृषी व कृषीशी संलग्ण असलेल्या उद्योग व्यावसायात यशस्वी झालेल्या अनेक शेतकर्‍यांना, व्यावसायीकांना व समुहांना सन्मानचिन्ह देवून सन्माणीत करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे व गटविककास अधिकारी प्रविण सिनारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शासनाच्या विविध योजनांची माहीती दिली. 
यावेळी भोकर येथे सोसायटीचे माजी अध्यक्ष सागर शिंदे व रेणुका हर्बलचे मच्छींद्र पटारे मित्र मंडळाचे वतीने व खोकर सोसायटी येथे अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे, सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव कोल्हे आदिंनी ठिकठिकाणी पंजाबराव डख यांचा सत्कार केला. यावेळी लक्ष्मीमाता मिल्कचे बाबासाहेब चिडे, अशोकचे संचालक ज्ञानेश्वर काळे, अशोक बँकेचे संचालक बाबासाहेब काळे, मोहनराव काळे, ज्ञानेश्वर उंडे, गणेशखिंड देवस्थानचे सचीव बजरंग दरंदले, संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार आदिंसह फर्टीलायझर संघटनेचे पदाधिकारी, शहर व तालुक्यातील फर्टीलायझर व्यावसायीकांसह नेवासा व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर उंडे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले.

*फोटो ओळी*
खोकरफाटा येथे आयोजीत समृद्ध शेतकरी सन्मान सोहळ्याप्रसंगी उपस्थीतांना मार्गदर्शन करत हवामान अंदाज वर्तविताना पंजाबराव डख हे दिसत आहेत.
*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*

Monday, May 29, 2023

नागरीकांनी शासन आपल्या दारी संकल्पनेचालाभ घ्यावा - तेजल सोनवणे ?

*नागरीकांनी शासन आपल्या दारी संकल्पनेचा लाभ घ्यावा - तेजल सोनवणे*

भोकरला ‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत केवळ ११ अर्ज दाखल, ४५ अभा कार्डची नोंदणी

भोकर - प्रतिनिधी - समाचार -
सरकारने सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ योजनेत सरकारकडून नागरीकांचे सरकारी कामे गावीच पुर्ण व्हावेत यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. याच करीता सरकारने ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’ अंतर्गत शासन आपल्या दारी हि संकल्पना राबवत आहे. या माध्यमातून जनतेच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरीकांनी यात सहभाग नोंदवत लाभ घ्यावा असे आवाहन कामगार तलाठी तेजल सोनवणे यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील जिल्हा परीषद शाळा प्रांगणात आयोजीत ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, पशु वैद्यकीय अधिकारी दिलीप कोकणे, आारोग्य विभागााचे डॉ.अभिजीत ढाकणे, कृषी सहाय्यक रूपाली काळे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक सेतू कार्यालयाचे विजय जाजू व सुजीत मोटकर, माजी उपसरपंच महेश पटारे, भागवतराव पटारे, सेनेचे दत्तात्रय पटारे, नामदेव चव्हाण, पत्रकार चंद्रकांत झुरंगे आदि प्रमुख उपस्थीत होते.
यावेळी आरोग्य विभाग, कृषी विभाग, महसुली विभाग, ग्रामपंचायत संदर्भातील विविध योजनांची माहीती संबधीत विभाग प्रमुख यांनी नागरीकांना दिली. या वेळी येथील नागरीकांकडून केवळ ११ अर्ज दाखल झाले, त्यात उत्पन्न दाखले ५, नॉनक्रीमीलेयर १, दुबार रेशनकार्ड १, रेशनकार्डमध्ये नाव समावेश करणे १, नवीन रेशनकार्ड करीता १, अन्नधान्य सुरू करण्यासाठी १, फळबाग मागणी अर्ज १ या प्रमाणे ११ अर्ज दाखल झाले तर आरोग्य विभागाचेवतीने ४५ हेल्थ कार्ड (अभा कार्ड) साठीची नोंदणी करण्यात आली.
यावेळी मनिष शिंदे, सोमनाथ पंडीत, बाबुराव अमोलीक, शैलेश दंडवते, कचरू वाकडे, दिपक गायकवाड, सखाराम आबुज, बनिचंद आहीरे, सुभाष सुरूसे, सोमनाथ पंडीत, कैलास लोखंडे, कल्पना बेरड, चंद्रकला चव्हाण, सुमन व्यावहारे, अलका ढाले, निर्मला चांदेकर, सुनिता कांगुणे, मिना बर्डे, शोभा लोखंडे, निर्मला अमोलीक, मिरा वाघुंबरे, भारती शेळके, मोहीनीबाई कपाटे, मंगलबाई पाचरव, सिमाबाई पंजाबी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
*फोटो ओळी*
भोकर येथे शासन आपल्या दारी अंतर्गत अर्ज दाखल करताना महिला नागरीक समवेत उपस्थीत सेवकवृंद दिसत आहे.

[[[ समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर ]]]

*जग सुंदर आहे पण भारत सत्यम*,*शिवम,सुंदरम आहे = हरिश्चन्द्र करडे ?

श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
विदेश प्रवास म्हणजे जगाची जवळून ओळख करून घेणे होय.आम्ही युरोपचा प्रवास केला, अनेक देश पाहिले जगाची सुंदरता मनात भरली तरीही आपला भारतदेश हाच जीवन समाधान देणारा सत्यम, शिवम, सुंदरमचा प्रत्यय देतो,असे विचार अहमदनगर येथील हरिश्चन्द्र करडे यांनी व्यक्त केले. 
 येथील शेळके परिवार, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान यांच्यातर्फे नुकताच युरोप प्रवास करून आलेल्या हरिश्चन्द्र करडे व सौ. शकुंतला करडे यांचा सत्कार आणि प्रवास अनुभवकथन कार्यक्रमात श्री करडे बोलत होते. यावेळी माजी प्राचार्य टी. ई. शेळके, जेष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये,सुखदेव सुकळे, डॉ. अमित करडे, डॉ. सौ. मीनाक्षी करडे, श्रीमती सुशीला नाचण आदी उपस्थित होते. युरोपमधील विविध देश पाहणारे श्री व सौ. करडे यांचा शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
श्री करडे म्हणाले,
महाराष्ट्रातील मराठी बोलणारे, पंजाबमधील काही ओळखीच्या प्रवाशामुळे १३ दिवसाचा प्रवासदौरा मनाला समाधान देणारा वाटला. मायभूमीची ओढ कायम मनात असते,आपल्या भूमीचा प्रेमजिव्हाळा उत्कटच वाटतो. इंग्लड, बेल्जीयम, ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड, स्वीझर्लन्ड, इटली, नेदरलँड, व्हॅटिकेनसीटी, ब्रुसेल आदी ठिकाणी भेट देताना जगाने खूप भौतिक प्रगती केल्याचे जाणवले. विज्ञान आणि मानवी बुद्धीचा आविष्कार दिसला तरीही भारतीय संस्कृती आणि जीवनमूल्ये मनात उंचच आहेत. व्याही प्राचार्य शेळके,डॉ. उपाध्ये, सुखदेव सुकळे यांनी केलेले सत्कार म्हणजे पुन्हा आनंदप्रवास घडला असे गौरवोद्गार श्री करडे यांनी काढले.डॉ. अमित करडे, डॉ. सौ. मीनाक्षी करडे यांनीही आनंद व्यक्त केला. प्राचार्य शेळके, डॉ. उपाध्ये, सुकळेसर यांनी करडे परिवाराच्या विदेश प्रवासाचे अभिनंदन केले. सौ. शकुंतला करडे यांनी आभार मानले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

काम प्रलंबित ठेऊन रखड पट्टी करणारे ठेकेदाराला ब्लॅक लीस्ट मध्ये टाकणार नामदार विखे ?

संगमनेर - प्रतिनिधि - वार्ता -
निळवंडे पाठ बंधारे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची कामे ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच काम वेळेत न राखड पट्टी करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे सुतोवाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता आणि संगमनेर तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांची पाहणी केली. संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, मनोली, घुलेवाडी, कुरण, खांजापूर, निळवंडे, कौठे कमळेश्वर, गोगलगाव, आडगाव, मापारवाडी, लोणी खुर्द, बाभळेश्वर, पिंप्री निर्मळ, वाकडी आदी गावात कालव्यांच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अडचणी समजून घेतल्या. महसूल जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.
बहुतांशी गावात कालव्यांची कामे घेतलेल्या ठेकेदारांनी अर्धवट केली आहेत. अनेक ठिकाणी कामे अद्यापही सुरू नाहीत. या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने मुदतवाढ घेतली तरीही कामाची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून आले. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवून प्रलंबित काम वेळेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने निर्णय करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
अनेक ठेकेदारांनी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून घेतलेली कामे पूर्ण करत नसल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याबाबत मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करून अशा ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांना कामाकरिता मुदतवाढ का देता? असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.
या प्रकल्पात ठेकेदार अडथळे निर्माण करणार असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याबाबत निर्णय करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी विभागाने नियोजन करावे, कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होणार असल्याने कालव्यांची कामे वेगाने
पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.निमगावजाळी येथील कालव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात झालेला विलंब आणि दिसून आलेल्या निष्काळजीपणाची मंत्री विखे पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

----------------------------------------------------
===================================
: - सह संपादक रंजित बतरा...शब्द...रचना...संकलन वार्ता...✍️ ✅️ 🇮🇳...
===================================
----------------------------------------------------