राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, June 4, 2023

.......युपी योद्धा कबड्डी संघात मराठमोळा बचाव पट्टू अजित पवार यांची निवड ?

श्रीरामपूर - प्रतिनिधि -वार्ता -
मराठमोळ्या मातीतील खेळ म्हणजे कबड्डी.भारतासह पाकिस्तान,बांगलादेश,श्रीलंका, इराण,जपान,थायलंड,दक्षिण कोरिया या आशियाई देशांमध्येही आता कबड्डी हा खेळ लोकप्रिय झाला आहे. कबड्डी खेळाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देण्याचं काम प्रो कबड्डीनं (PKL) केलं आहे. पीकेएलचा दहावा सिझन सुरू होणार आहे. दहाव्या सिझनसाठी युपी योद्धा संघाची बचाव फळीची भिस्त ही मराठमोळ्या कबड्डीपटू अजित पवारवर याच्यावर असणार आहे.
अजित पवार हा श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव गावचा आहे.
सुरुवातीला गावामध्ये यात्रेत कुस्ती हा खेळ खेळला जायचा. यात्रेमध्ये कुस्ती बघत बघत कुस्ती खेळणं सुरू केले.७ वीला असताना शाळेमध्ये कबड्डी खेळाचा सराव मुले करत असत. पवारने देखील कबड्डीचा सराव
करायला सुरुवात केली. सुरुवातीला खेळत असताना अनेक प्रकारच्या इजा देखील झाल्या.टी-शर्ट व शॉट घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे देखील नव्हते. मित्रांकडून पैसे घेऊन कबड्डी खेळण्यासाठी किट घेतले.त्याचे कबड्डी खेळणे त्याच्या आई- वडिलांना आवडत नसे,यासाठी त्याला लहानपणी कधी कधी मार खावा लागला.१० वी असताना त्याचा शाळेचे शिक्षकाने सांगितलं की टाकळीभान येथे आझाद क्रीडा मंडळ क्लब आहे,त्या क्लब मध्ये तू सरावासाठी जात जा.सन २०१४-१५ साली कबड्डी प्रशिक्षक श्री रवि गाढे यांचा आजाद क्रीडा मंडळ या क्लब कडून त्याने खेळायला सुरुवात केली व त्याच्या कबड्डी करिअरमध्ये यशाचा आलेख उंचावत गेला.
अजित पांडुरंग पवार यांची कारकीर्द
अजित पवारने २०१३-१४ पासून कबड्डी खेळायला सुरुवात केली. आझाद क्रीडा मंडळ या क्लब कडून खेळायला सुरुवात केल्यानंतर पवारने शालेय स्पर्धेत सहभाग घ्यायला सुरुवात केली.१६ वर्षे वयोगट व १९ वर्ष वयोगट या वयोगटात त्यांनी तालुका,जिल्हा,विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.सन २०१९ मध्ये प्रथमच तो राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी पात्र ठरला.यानंतर त्याने मागे वळून बघितलंच नाही. व्यावसायिक,खाजगी स्पर्धेमध्ये सहभाग घेत अनेक स्पर्धेमध्ये त्याचा उत्कृष्ट बचाव पट्टू म्हणून सन्मान करण्यात आला.सन २०२२-२३ मध्ये ७० व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना दुसरा क्रमांक मिळाला.सन २०२२-२३ मध्ये पुन्हा त्याला महाराष्ट्र ऑलिंपिक कबड्डी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.सन २०२२-२३ जबलपूर येथे झालेल्या विद्यापीठ स्पर्धेमध्ये भारतीय विद्यापीठाचे त्यांने नेतृत्व केले.महाराष्ट्रात नव्हे तर देशातील विविध भागांमध्ये व्यवसायिक तसेच शासकीय स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला.या सुरेख कामगिरीवर महिंद्रा व महिंद्रा कंपनीने त्याला करारबद्ध केले आहे.शिर्डी,जळगांव,नाशिक,पुणे,मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध भागातील स्पर्धेमध्ये त्याला स्पर्धेचा उत्कृष्ट बचाव पट्टू म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सन २०२२-२३ मध्ये आयोजित झालेल्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा सिरीज कबड्डी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. अहमदनगर जिल्ह्याचे कर्णधारपद त्यांनी भूषवले आहे.६४ टाकल पॉईंट घेऊन तो स्पर्धेतील उत्कृष्ट बचावटू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.
आझाद क्रीडा मंडळामुळे यश
ग्रामीण भागामध्ये टाकळीभान गावी आझाद क्रीडा मंडळ हा कबड्डीचा एक नामांकित क्लब आहे.तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक भागांमधून मुले या ठिकाणी कबड्डीच्या सरावासाठी येतात.पवारने देखील याच क्लब मध्ये सराव करण्यास १० वर्षांपूर्वी सुरुवात केली. अनेक राष्ट्रीय,राज्य खेळाडून सोबत सराव करत त्याने आपला खेळ उंचावला.क्लबचे प्रशिक्षक रवी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक भागांमध्ये कबड्डी स्पर्धेत सहभागी झाला. जास्त स्पर्धा सहभागामुळे व्यावसायिक खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू,राष्ट्रीय खेळाडू यांच्याबरोबर खेळत असताना त्याचा खेळ उंचावला व सीजन १० साठी त्याची युपी योद्धा संघात प्रो कबड्डी लीग साठी निवड झाली.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

कोरोन मंडळ रेल्वे भयंकर अपघात विषय : दोषींवर कठोर कारवाई करणार- पंतप्रधान मोदी ?

(नवी दिल्ली) - न्यूज - एजन्सी -

ओडिशामधील (Odisha) बालासोर (Balasore) येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेत झालेल्या विचित्र अपघातात (Train Accident) २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या रेल्वे अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत बचावकार्याचा आढावा घेतला.....
यावेळी पंतप्रधान मोदींनी  रुग्णालयात जाऊन जखमींची  विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ही दुर्दैवी घटनाअसून मनाला विचलित करणारा अपघातआहे.जखमींच्या उपचारासाठी सरकार कोणतीही कसरसोडणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यूझाला, त्यांना परत आणू शकत नाही. पण, सरकार कुटुंबीयांच्या दुखा:त सहभागी आहे." असेमोदींनी म्हटले.
मोदी पुढे म्हणाले की, सरकारसाठी ही घटना अत्यंत गंभीर असूनप्रत्येक कोनातून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असून त्यांना सोडणार नाही. या घटनेनंतर ओडिशा सरकार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या माध्यमातून लोकांची मदत केली. तसेच येथील नागरिकांनाही देखील संकटकाळात रक्तदान आणि बचावकार्याचे काम केल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
------------------------------------------------------------------------
=====================================
सह...संपादक...रंजित...बतरा...शब्द रचना संकलन...✍️✅️🇮🇳...
=====================================
------------------------------------------------------------------------








































रोप्ट लावा सेल्फी काढा बक्षीस जिका ?

रोपटं लावा, सेल्फी
 काढा, बक्षीस जिंका

(शौकतभाई शेख) 
नाशिक - शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका" या अनोख्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे.
कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो नेहमीच काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो - सेल्फी काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला बक्षीस मिळेल. अशी ही भन्नाट कल्पना आहे.
पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, दिवसेंदिवस ग्लोबल वाॅर्मिंगमुळे वाढत असलेलं तापमान, कमी होणारं
पर्जन्यमान, रुसलेला वरुणराजा आणि आग ओकणारा सूर्य.. या सर्व समस्यांवर वृक्षारोपण हाच एकमेव उपाय आहे. लोकांना झाडं लावण्यासाठी उद्युक्त करणे हाच या स्पर्धेचा उद्देश आहे.
 'एक रोपटं लावा' त्या रोपट्यासोबत सेल्फी किंवा फोटो काढून खालील ईमेलवर पाठवावा.. shikshak.dhyey@gmail.com किंवा 7499868046 या क्रमांकावर व्हाट्सऍप करावा.
(वरील पैकी सेल्फी एकाच ठिकाणी पाठवावा.)
ही स्पर्धा निःशुल्क असून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेचे नियम व अटीं वाचण्यासाठी https://www.shikshakdhyey.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी.
या मोहिमेचा उद्देश झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणून प्रत्येक माणसाच्या मनात झाडं लावण्याचा विचार रुजवण्याचा असल्यामुळे या स्पर्धेत 
राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांनी उत्फुर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन शिक्षक ध्येयचे मुख्य संपादक मधुकर घायदार,
कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, मिलिंद दीक्षित, वर्धा, डी.जी. पाटील, संदीप बेलदार, विजय अहिरे,  पुरुषोत्तम पटेल नंदुरबार, कविता चौधरी, भाग्यश्री पवार, जळगाव, अशरफ आंजर्लेकर, रत्नागिरी, कैलास बडगुजर, ठाणे, मंजू वानखडे, अमरावती, डॉ. माधव गावीत, सतीश बनसोडे, राजेंद्र लोखंडे, नाशिक, प्रवीण घाडगे, सातारा, कांबळे एस.जी. पाटोडेकर, लातूर, खुशाल डोंगरवार, भंडारा, संगीता पवार, मुंबई, संजय पवार, रायगड, महेन्द्र सोनवाने, गोंदिया, किरण काळे, पुणे, आनंद जाधव, बिदर, कर्नाटक यांनी तसेच सर्व  राज्यस्तरीय संपादकीय मंडळाने केले आहे.

Saturday, June 3, 2023

जो नागरीक राष्ट्राला सावरतो तोच खरास्वातंत्रविर सावरकर - पार्थ बावस्कर ?


अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड चे आयोजन

तिनही कार्यक्रमास ब्रह्मवृंदांसह हिंदू प्रेमींचा उदंड प्रतिसाद

भारतमातेला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी जिवनाचा त्याग केला - ब्राह्मनाथकर

( शौकतभाई शेख ) - वरिष्ठ - पत्रकार -
गंगाखेड - सर्व शाखीय ब्राह्मण समाज प्रतिष्ठान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड आयोजीत स्वातंत्रविर सावरकर सप्ताहात गंगाखेड शहरवासियांना तिन कार्यक्रमाची परवनी देवुन शहरवासियांनी कार्यक्रम यशस्वी केला. तिनही कार्यक्रमात संत महंतांसह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावुन अनेकांचा गौरव कारण्यात आला. प्रख्यात व्याख्यातांनी थरारक असे व्याख्यान सांगुन प्रेक्षकांना मंत्रमुद्ध केले. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड च्या ५१ पदाधिकाऱ्यांची संघटना वाढीसाठी व ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीन कार्यासाठी विस्तारीकरण करून त्यांचाही याच कार्यक्रमात पदग्रहण सोहळा घेण्यात आला.
सर्व शाखीय ब्राह्मण समाज प्रतिष्ठाण संचलित अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड च्या वतिने स्वातंत्रविर विनायक दामोदर सावरकर यांच्या सप्ताह निमीत्य तिन भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या तिनही कार्यक्रमास शहर व परीसरातील ब्रह्मवृंद, संत महंत, हिंदुप्रेमींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावुन गंगाखेड च्या श्री संत जनाबाई नगरीत एक आगळा वेगळा उपक्रम राबवुन देश स्वातंत्रासाठी ज्यांनी स्वताहाच्या प्राणाची आहुती दिली. आशा स्वातंत्रविराव थरारक अशे व्याख्यान झाले.या वेळी व्यासपिठावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते पार्थ बावस्कर मुंबई, कार्यक्रमाचे अध्यक्ष यज्ञ महर्षी वे.शा.स.प.पू. यज्ञेश्वर महाराज सेलुकर वे.शा.स रामचेद्र महाराज टाकाळकर, ह. भ. प. माणिक महाराज शास्त्री, वे.शा.स. आशोकराव पाठक, अखिल भारतीय ब्राह्मण महासं घाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष निखीलभाऊ लातुरकर, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय कुलकर्णी (सुपेकर) मराठवाडा संपर्क प्रमुख प्रविन मुदगलकर, नांदेड जिल्हा प्रमुख विजय जोशी, परभणी जिल्हा प्रमुख शंकरराव आजेगाव कर सामाजिक पदाधिकारी विजयराव पिंगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या पहिल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसि द्ध साहित्य नाट्य चित्रपट क्षेत्रातील लेखक सावरकर आभ्यासक युवा इतिहासकार पार्थ बावस्कर मुंबई यांनी स्वातंत्रविर सावरकरांकडुन आम्ही काय शिकावे? या विषयावर तब्बल दिड ते दोन तास शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे २६ मे रोजी स्वातंत्रविर विनायक दामोदर सावरकर यांच्या जिवनावरचे थरारक अशे व्याख्यान देवुन प्रत्येकांच्या घरात स्वातंत्रविरांचे फोटो लावायलाच पाहिजे त्यामुळे लहान मुलांवर संस्कार घडतात पुढच्या पिढीला जो पर्यंत क्रांतीकार कळणार नाही तोपर्यंत त्यांना देश कोणी स्वातंत्र करून दिला ते काय कळनार. वि. दा. सावरकरांनी त्यावेळी असंख्य मराठी शब्दांचा कोश निर्मान केला होता त्याच सर्व मराठी शब्दांची आता कुठ शासनाकडुन अंमल बजावनी करण्यात येत आहे. आपन आपल्या मुलांवर संस्कार करायला कमी पडतो त्यामुळेच अनर्थ घडत असतात.प्रत्येक पालकांनी सावरकरांच विचा वाचुन आपल्या पाल्यांना सांगीतले तर निश्चित चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता यांनी गंगाखेड शहरात २१ वर्षाच्या कार्यकाळात असंख्य सामाजिक धार्मिक सांस्कृतीक उपक्रम घेवुन शासन दरबारीही कसा संघर्ष करावा लागला याचा परखड शब्दात श्रोत्यांसमोर एक प्रकारे सविस्तर आवाहालच सादर केला. यापुढेही समाज उपयोगी मोठ मोठया कार्यक्रमांसह विविध उपक्रम राबविण्याचेही यावेळी राबविण्यासठी देखील त्यांनी यावेळी संकल्प केला त्यासाठी समाजाकडुन कृपारूपी अशिर्वाद व एकजुटीसाठी साथ हवी असल्याचेही सुपेकर यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकातुन स्पष्ट केले. अध्यक्षकिय समारो पात यज्ञमहर्षी प. पू. यज्ञेश्वर महाराज सेलुकर योनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड चे काम गेल्या अनेक वर्षापासुन यशस्वी रीत्या सुरू असुन त्यांच्या विविध उपक्रमातुन समाजाला एकत्री येण्याची वेळोवेळी संधी मिळत असते. अशी समाजाची सार्वजनिक कामे करणाऱ्यांच्या पाठीशी खंबिरतेन उभे राहिले पाहीजे असे मार्मिक शब्दात बोलुन सर्व श्रोत्यांना व्यासपिठावरून शुभअर्शिवाद दिले. दुसऱ्या कार्यक्रमात रविवार २८ मे रोजी सकाळी ९ वाजता भगवती मातेची महाआरती करून संपुर्ण गंगाखेड शहरवासी यांना स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर यांच्या जयंती निमीत्य दिवसभर अभिवादन करण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा गंगाखेड ने भव्य असा सेल्फी पॉईंट केला होता तर तिसऱ्या कार्यक्रमात सायंकाळी ४ वाजता स्वातंत्रविर वि.दा. सावरकर बहुदेशिय सेवाभावी संस्था व अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या सयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रीतील सुप्रसिद्ध व्याख्याते भास्करराव ब्रह्मनाथकर यांनी स्वातंत्रविर सावरकर एक धगधगते यज्ञकुंड या विषयावर अत्यंत परखड पणे थरारक असे व्याख्यान देवुन प्रेक्षकांना मंत्रमुद्ध केले.या कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक रंगराव सुपेकर, अॅड. स्मिताताई देशमुख यांनी सुत्रसंचालन केले. तर तिनीही कार्य क्रमाचे आभार राष्ट्रगीताने करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष चंद्रकांत खारकर, शहराध्यक्ष डॉ. समिर गळाकाटु, उपाध्यक्ष अॅड. महेश साळापुरीकर, महासचिव देवानंद जोशी, प्रसिद्धी प्रमुख नागेश केरकर, ग्रुप प्रमुख राम कासांडे, नियोजन प्रमुख राम कुलकर्णी, यांच्यासह अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

----------------------------------------------------===================================
टीप : - प्रभाव शैली पाहण्यासाठी झूम 🔎🔍 चा वापर करा
===================================----------------------------------------------------




Friday, June 2, 2023

निर्णयातअनेक त्रुटीमहाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे आ. तांबे यांना निवेदन नाशिक ?

( नाशिक ) - प्रतिनिधि -वार्ता -
महाराष्ट्र,राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या त्रुटी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी तफावत असून त्यामध्ये सुधारणा कराई, यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून शासन निर्णयात बदल करावा, अशी मागणी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन,नाशिकतर्फे आमदार सत्यजित तांबे याच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभुमिवर ग्रामविकास विभागाने १५० लक्षचे नोदंणीकरण दयावे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या नोंदणी कालावधीत विनास्पर्धा देण्यांत येणा-या एकुण कामांची मर्यादा ही १० वर्षासाठी प्रतिवर्ष १०० लक्षपर्यंत करण्यात यावी.ज्या सु.बे. अभियंत्यांना १० वर्षाच्या कालावधीत १० कोटी रकमेची कामे विनास्पर्धा मिळालेली नसतील अशा सु.बे.अभियंत्यांना त्यांची मूळ १० वर्ष पर्यंतची नोदंणी मर्यादा त्यांच्या १० कोटी रकमेचा कोटा पुर्ण होईपर्यंत विना अट नोंदणी देण्यांत यावी.सु.बे.अभियंता यांची नोदंणीची मुदत संपल्यानंतर त्यांना सु.बे.अभियंता संघटनेचा पदाधिकारी / सदस्य राहता येणार नाही या अटीमध्ये बदल करून संघटनेचा उपविधीप्रमाणे करण्यांत यावी.वरील सर्व मुद्दयांवर बारकाईने विचार करून आपण त्याचा शासन स्तरावर पाठपुरावा करून सु.बे. अभियंत्यावरील अन्याय दूर करून न्याय मिळवून दयावा, असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी अध्यक्ष निसर्गराज सोनवणे, सरचिटणीस विनायक माळेकर, माजी अध्यक्ष आर. टी. शिंदे, उपाध्यक्ष चंद्रशेखर डांगे, सचिव अजित सकाळे, शशी आव्हाड, पवन पवार, अमोल पगारे, रोहीत डांगे, ओमकार काटकर, अमित वाघ, करण आहेर आदी उपस्थित होते.

------------------------------------------------------------------------=====================================
सह : - संपादक रंजित बतरा...शब्द...रचना...संकलनवार्ता...✍️✅️🇮🇳...
=====================================------------------------------------------------------------------------








लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर जयंती साजरी ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचेकडे दुरदृष्टी होती. त्यांनी "शेतकरी सुखी तर जग सुखी" या संकल्पनेतून शेतकर्‍यांना जाचक करामधून मुक्त केले होते. भारतातील तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे, धर्मशाळा, तलाव, विहिरी, पाणपोई, घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे त्यांनी केली. त्याकाळात त्यांनी पाण्याचे महत्व जाणून "पाणी अडवा, पाणी जिरवा" ही संकल्पना राबविली. आजच्या आपत्तीच्या काळामध्येही अहिल्यादेवींनी केलेल्या पाणी व्यवस्थापनाचा व त्यांच्या उपाययोजनांची अंमलबजावणी होत असल्याचे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
     लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त माजी आ.श्री.मुरकुटे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब मुळे, रोहन डावखर, अ‍ॅड्.उमेश लटमाळे, कारेगाव भाग कंपनीचे संचालक भगवान सोनवणे, शेतकरी सेवा केंद्राचे अमोल कोलते, अनिल कुलकर्णी, संदीप डावखर, बाळासाहेब शिंदे, वैभव सुरडकर, पंकज देवकर आदींसह लोकसेवा विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच अशोक कारखाना कार्यस्थळावरही पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी संचालक हिम्मतराव धुमाळ, नारायणराव बडाख, पर्सोनेल मॅनेजर लव शिंदे, कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, बाळासाहेब तागड, अनिल खरात, संदीप बनकर, विलास लबडे, भारत वैरागर, बाळासाहेब मेकडे आदी उपस्थित होते.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

बेलापूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी 'विनामुल्य' जमिन मिळवून दिल्याबद्दल नाम. विखे पा. यांचा सत्कार ?

श्रीरामपूर - प्रतिनिधधि - वार्ता -

तालुक्यातील बेलापूर बु - ऐनतपूर गावच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रगतीपथावर असलेल्या १२६ कोटी खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी शेती महामंडळाची साडे आठ एकर जमीन 'विनामुल्य' देण्याचा फेरनिर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत झाला.सदरची जमीन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल राज्याचे महसूलमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बेलापूर बु- ऐनतपूर ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.बेलापूर-ऐनतपूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावासाठी मंञीमंडळाच्या बैठकीत शेती महामंडळाची साडे आठ एकर जमिन देण्याचा निर्णय झाला होता.यासाठी जमीनीच्या  किमतीच्या दहा टक्के म्हणजे ३० लाख रुपये इतके जमिनीचे मुल्यांकन ठरविण्यात आले होते. तथापि महसूल मंञी नामदार राधाकृष्ण विखे पा.यांनी सदरची जमीन गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी द्यायची असून लोकहिताच्या कामासाठी देणार असल्याने सदरची जमीन विनामुल्य देणेबाबत आग्रही मागणी मुख्यमंञी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्रिमंडळ बैठकीत केली. सदरची विनंती मान्य करुन सदर जमीन विनामुल्य देण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.यामुळे ग्रापंचायतीला भरावे लागणारे ३० लाख रुपये वाचणार आहेत.सदर जमीन विनामुल्य मिळवून दिल्याबद्दल महसूल मंञी नाम. राधाकृष्ण विखे पा.यांचा ग्रामस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, अशोक कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जालिंदर कुऱ्हे, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,भाजपा  सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, हाजी इस्माईल शेख,तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे,तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ उर्फ लहानू नागले,अँड.अरविंद साळवी, पत्रकार दिलीप दायमा,प्रभात कुऱ्हे,शफिक बागवान,मोहसीन सय्यद,भाऊसाहेब तेलोरे,महेश कुऱ्हे,प्रशांत मुंडलिक,बाबुलाल पठाण,गोपी दाणी,दादासाहेब कुताळ,शशिकांत तेलोरे,सुनिल शहाणे,मास्तर हुडे,टिंकू राकेचा, राम कुऱ्हे,प्रभाकर लोखंडे आदी उपस्थित होते.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))