राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, June 27, 2023

पाटबंधारेच्या दुर्लक्षपणामुळे भोकरला पुन्हा पाणी टंचाई*दिवसाआड पाणी,महिलांचे ठिय्या अंदोलन

अंदोलक महिलांच्या साक्षीने तोडले ५ अनाधिकृत मुख्यवाहीनीचे कनेक्शन

भोकर - प्रतिनिधि - वार्ता - 
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे पाटबंधारेच्या हेकेखोरपणामुळे एक महिन्यात दुसर्‍यांदा पाणी टंचाई सुरू झाली असून आमदार कानडेंच्या आदेशाला डावलत पाटबंधारे विभागाच्या सुरू असलेल्या दुर्लक्षीतपणामुळे गावातील नळपाणी पुरवठा योजना पुन्हा दिवसाआड झाल्याने गावात तीव्र पाणी टंचाई भासु लागली आहे. तर दुसरीकडे मुख्यवाहीनीला असलेल्या अनाधिकृत जोडणीमुळे या पाणी टंचाईत आणखी भर पडल्याने संतप्त महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर पुकारलेल्या ठिय्या अंदोलनानंतर ग्रामविकास अधिकारी सक्रीय होत संतप्त महिलांच्या साक्षीने अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्यास आरंभ करत सक्रीय झाल्याने आता सर्वसामान्यांच्या नळाला पाणी येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. या महिला मुख्य वाहीनेच अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्यासाठी दिड कीमी ग्रामविकास अधिकार्‍यांसमवेत होत्या.
भोकर गावास नळपाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गावालगत असलेल्या गावतळ्याजवळील बारवेतून गावास पाणी पुरवठा केला जातो परंतू येथील बारव अचनक नादुरूस्त झाल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून येथील माजी उपसरपंच महेश पटारे व सोसायटीचे संचालक संजय पटारे या पटारे बंधूच्या विहीरीतून गावास पाणी पुरवठा सुरू आहे व या पटारे बंधुंना पर्यायी पाणी व्यवस्था म्हणून गावच्या चौकोणी बारवेतील बदली पाणी देण्यात आले आहे, अशा पद्धतीने येथील नळपाणी पुरवठा योजना सुरू आहे. हि योजना पुर्णत: गावालगत असलेल्या गावतळ्याच्या पाणी उद्भवावर अवलंबून आहे तर गावतळ्यात पाटबंधारेच्या वितरीकेद्वारे पाणी सोडले जाते.
गेल्या मे महिण्यात पाटबंधारे विभागाच्या वितरीका क्र.15 मधून गावास तीव्र पाणी टंचाई असताना व कालवा नियोजन समीतीचे सल्लागार असलेले आमदार लहु कानडे यांनी समक्ष गावात भेट देवून संबधीत कालवा निरीक्षकास सुचना करून ही सुमारे आठवड्यानंतर गावतळ्यात पाणी सोडले ते ही अपुर्‍या प्रमाणात दिल्याने एक महिण्यात गावतळ्याची पातळी खालवली अन् गेल्या सहा दिवसांपासून गावातील नळपाणी पुरवठा योजनेद्वारे दिवसाआड पाणी सोडले जात आहे.
आमदार लहु कानडे यांनी परीसरात पाऊस लांबल्यामुळे मे महिन्याच्या आवर्तनाला जोडूनच शेवटचे आवर्तन घेण्याचा आग्रह धरला त्यास मान्यता मिळत या परीसरातील कालवे पुन्हा वाहते झाले, त्याप्रमाणे गेल्या सहा दिवसांपासून येथील वितरीका क्र. १५' ही वाहती झाली, ग्रामपंचायतीने तातडीने पाटबंधारे विभागास गावतळ्यात पाण्याची नितांत गरज असल्याचे लेखी कळविले. त्याच बरोबर आमदार कानडे यांनी ही शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तातडीने भरून घेण्याच्या सुचना दिलेल्या असतानाही हेकेखोर पाटबंधारे विभागाने यावेळी ही या मागणीकडे व आमदारांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करत केवळ शेतीला प्राधान्य दिले जात असल्याने ग्रामस्थात नाराजीचा सुरू दिसत आहे.
तर दुसरीकडे याच पाणी टंचाईला सामोरे जात असलेल्या येथील इंंदिरानगर परीसरात टेलटँकहुन येणार्‍या पाण्याच्या मुख्यवाहीनीला अनेकांचे अनाधिकृत कनेक्शन असल्याने येथील माध्यमिक विद्यालय प्रांगणातील पाण्याची टाकीत पुरेसा पाणी साठा होत नसल्याने येथे ही तीव्र टंचाई भासत असल्यामुळे येथील महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर मोर्चाने येत ठिय्या अंदोलन पुकारत मुख्या वाहीनीचे अनाधिकृत नळकनेक्शन तोडण्याचा हट्ट धरला. अर्थात या विषयावर अनेकदा ग्रामसभा गाजलेल्या असतानाही संबधीतांच्या दुर्लक्षीतपणामुळे अशा प्रकारे मुख्या वाहीनीला व इतरत्र अनाधिकृत कनेक्शनची संख्या मोठी असताना या विषयाकडे सर्वांचे दुर्लक्षच होते.
परंतू या महिलांचा हट्ट बघता येथील ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी प्रसंगावधान ओळखत तातडीने कारवाई सुरू केली. संवेदनशिल विषय असल्याने या महिलांनी दुपारी उशीरापर्यंत ग्रामविकास अधिकारी यांचा पिच्छा सोडलाच नाही. गावातील काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांचे कनेक्शन तोडल्यानंतर या महिलांचा मोर्चा व ग्रामपंचायतीचा लवाजमा टेलटँककडे राजेंद्र वाकडे यांचे वस्तीपर्यंतची पाहणी करत अनाधिकृत कनेक्शन तोडणी केली. यात काही माजी पदाधिकारी व काही संघटनांचे पदाधिकार्‍याच्या कनेक्शनचा समावेश असल्याचे समजते.
आता आज उर्वरीत मुख्यवाहीनीचे अनाधिकगत तसेच गावातील इतर अनाधिकृत कनेक्शन तोडणीची कारवाई करत अधिकृत नळकेनक्शन धारकांना पुरेश्या दाबाने पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ज्यांचे कनेक्शन अनाधिकृत व मुख्य वाहीणीला होते त्यांना सक्त सुचना करत त्यांचेकडून नियमानुसार अनामत भरणा घेवून त्यांना उपवाहीनीला कनेक्शन दिले जाणार आहे. दरम्यानच्या काळात जर पुन्हा अशाच प्रकारे अनाधिकृत कनेक्शन जोडणी झाल्यास प्रसंगी पंचनामा करून संबधीतांविरूद्ध सार्वजनीक मालमत्तेच नुकसान केल्याची तक्रार पोलीसांत करण्यात येवून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे या वेळी ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे यांनी सांगीतले.
दरम्यान या कारवाई दरम्यान अनेकांनी काही पदाधिकार्‍यांना संपर्क करत नळतोडणीस विरोध केला परंतू त्यास ग्रामविकास अधिकार्‍यांनी दाद न देता सर्वांप्रमाणे उपवाहीनीला प्राधान्याने कनेक्शन देण्याचे आश्वासन देत कारवाई सुरूच ठेवली. त्यातच येथे सध्या प्रशासकीय सरपंच राज असल्याने आता कुणाचा वशीला लावायचा हा मोठा प्रश्न काहींना पडलेला दिसला तर दुसरीकडे पाणी टंचाईने त्रस्त नागरीकांनी ग्रामविकास अधिकार्‍यांच्या या कारवाईचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
या ठिय्या अंदोलनात येथील माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष डूकरे यांच्या पत्नी सौ. ज्योती डूकरे, अलका डूकरे, पुजा डूकरे, सरीता डूकरे, अर्चना डूकरे, कमल डूकरे, हिराबाई डूकरे, सोनाली डूकरे, बेबी डूकरे, सुनिता डूकरे, दिपाली शिंदे, अलका शिंदे आदि महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, सतीष पवार, सुनिल साळवे, नामदेव वाकडे, गोरख डूकरे, अशोक डूकरे, किरण डूकरे, सुकदेव गायकवाड, सुदाम शिंदे, संतोष गायकवाड, संजय डूकरे, बाळू डूकरे, बबन डूकरे आदि उपस्थीत होते.

((( वृत्तसंकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

सुगम्‍य भारत अभियानाच्‍या माध्‍यमातून विकासाची प्रक्रीया अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले....

 अहमदनगर जिमाका वृत्तसेवा

सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक न्‍याय देण्‍याची केंद्र शासनाच्या भूमिका असून सुगम्‍य भारत अभियानाच्‍या माध्‍यमातून विकासाची प्रक्रीया अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्‍याय व सबलीकरण राज्‍यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
केंद्रीय आधिकारीता मंत्रालय आणि सामाजिक न्‍याय विभागाच्‍या माध्‍यमातून दिव्‍यांग व्‍यक्तिंना साधन साहित्‍याचे मोफत वितरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.
यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, सहायक आयुक्त राधाकिसन देवडे, डॉ.अभिजित दिवटे, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, प्रकाश लोंढे, पप्‍पू बनसोडे आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्‍हणाले की, सामाजिक न्‍याय विभागाच्‍या माध्‍यमातून सुगम्‍य भारत अभियान सुरु करण्‍यात आले आहे. यामध्‍ये आता 21 श्रेणी निर्माण करण्‍यात आल्‍या असून याद्वारे दिव्‍यांगांना न्‍याय मिळवून देताना देशातील 1 हजार 314 सरकारी भवन हे सुगम्‍य बनविण्‍यासाठी पुढाकार घेण्‍यात आला आहे. 35 आंतरराष्ट्रीय विमानतळ, 709 रेल्वेस्‍टेशन, 614 संकेतस्थळ, 19 समाचार चॅनल तसेच 8 लाख शाळा यासर्व सुविधांनी परिपुर्ण करण्‍यासाठी पुढाकार घेण्‍यात आला आहे.
 राज्‍यातही विभागामार्फत समाज घटकांच्‍या उन्‍नतीसाठी 2 लाख 44 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्‍ध करुन देण्‍यात आला असून आतापर्यंत राज्‍यातील 5 हजार 993 विद्यार्थ्‍यांना शिष्यवृत्‍तीसाठी सहकार्य केले असल्‍याचे राज्यमंत्री श्री आठवले यांनी सांगितले.
राज्‍यातील जिल्‍हा पुर्नवसन केंद्र तसेच कौशल्‍य विकास योजनेकरीताही केंद्र सरकारने निधी उपलब्‍ध करुन दिला असून यु.डी.आय.ए योजनेच्‍या माध्‍यमातून 17 लाख दिव्‍यांग व्‍यक्तिंना कार्डचे वितरण करण्‍यात आले आहे. समाजातील प्रत्‍येक घटकाला न्‍याय मिळावा हीच भूमिका केंद्र सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्‍यांग व्यक्तींसाठी सातत्‍याने सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्‍यांचे सक्षम नेतृत्‍व देशाला पुढे घेवून जात असून केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्‍यायाचे काम होत आहे. भविष्‍यात दिव्‍यांगाच्‍या आरक्षणाच्‍या बाबतीतही सरकार संवेदनशिल असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. 
खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, यापुर्वी जेष्‍ठ नागरीकांसाठी वयोश्री आणि आता दिव्‍यांग व्‍यक्तिंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली पालकत्‍वाची भूमिका अत्‍यंत महत्‍वाची आहे. आजपर्यंत समाजातील या घटकांचा कोणीही विचार केला नव्‍हता. जिल्‍ह्यातही या योजनेची अंमलबजावणी प्राधान्‍याने केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या माध्‍यमातून वंचितांना न्‍याय मिळवून देण्‍याचे काम होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. कार्यक्रमात जिल्‍ह्यातील 720 दिव्‍यांग व्‍यक्‍तींना सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्‍यात आले. कार्यक्रमाला लाभार्थी व्‍यक्‍ती, त्‍यांचे कुटुंबिय, परिसरातील नागरीक उपस्थित होते.

((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव *मा.संजयजी जोशी* यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी : अनुराधा ताई आदिक श्रीरामपूर...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर :- हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव *मा.संजयजी जोशी* यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी सौ.वैशालीताई जोशी,सौ.सायली जोशी,सौ.शिल्पाताई आव्हाड - भारद्वाज व आदित्य आदिक उपस्थित होते.

*- कु.अनुराधा गोविंदराव आदिक*
मा.विश्वस्त - श्री.साईबाबा संस्थान,शिर्डी.
मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा - श्रीरामपूर नगरपरिषद.
अध्यक्षा - महाराष्ट्र कृषक समाज.

Monday, June 26, 2023

भोकरला चोरीच्या प्रयत्नातील एकास पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले

भोकर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे वणीकरण म्हणून प्रसिद्ध असलेल्या भोकर-कमालपूर रोडलगत राहत असलेल्या एका कुटूंबाच्या घरी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या एकास पकडून पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.
भोकर- कमालपूर रोडलगत सामाजीक वणीकरणाच्या क्षेत्रात सध्या राहत असलेले रविंद्र नवनाथ बर्डे हे कुटूंबियासमवेत घरात झोपलेले असताना रवीवार दि.२५ जूनच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरात कसलातरी आवाज आला म्हणून जागे झाल्यानंतर घरात चोरी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घराच्या बाहेर एकाच्या पाठीमागे पळून एका खड्ड्यात येथील आकाश दत्तू परदेशी यास पाठलाग करून पकडल्याचे रविंद्र पवार हे सांगत आहेत. त्याच्याकडून माझा व पत्नी मोबाईल मिळाला परंतू रोकड मिळाली नाही. सदरच्या व्यक्ती पकडून पहाटेच पोलीसांच्या ताब्यात दिले, यावेळी त्याच्या बरोबर आणखी दोघे किंवा तीघे होते परंतू ते पळूण जाण्यात यशस्वी झाल्याचे बर्डे यांनी सांगीतले.
या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गु र नं. १३२८/२०२३ भादंवि कलम ३८०,५११ प्रमाणे रविंद्र नवनाथ बर्डे यांचे फिर्यादीनुसार येथील आकाश दत्तू परदेशी यांचे विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. मोहन शिंदे हे करत आहे. दरम्यान पोलीसांत देण्यात आलेला आकाश परदेशी हा अल्पवयीन असल्याने त्याची जामीणवर मुक्तता करण्यात आली असल्याचे पोलीसांकडून समजले.
((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

Sunday, June 25, 2023

टेम्पोसह ७३ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल गुटखा पोलिसांनी पकडला ?

पुणे - प्रतिनिधि - समाचार -
नसरापूर  राजगड पोलिसांच्या हद्दीत गुटखा
पकडण्याची मालिकाच सुरु असून मामा-भाच्यांनी विक्री करणेसाठी आणलेला ५६ लाखाचा गुटखा टेम्पोसह स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एकूण ७३ लाख ८५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. आडबाजूला लपवलेला टेम्पो क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. कारवाईतील मुद्देमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने राजगड पोलीस मात्र हैराण झाले आहे.
सुधाकर कल्याण पानसरे, दिनेश कल्याण पानसरे दोघेही (रा. शिवरे, ता. भोर) आणि ऋत्विक दशरथ मोरे (वय २४, रा. मोरवाडी, ता. भोर) अशी मामा-भाच्यांची नावे असून मुख्य सूत्रधार नजीम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋत्विक मोरे याला जागेवरच ताब्यात घेण्यात आले असून इतर फरारी आरोपींचे शोध सुरु आहे.
शनिवारी (दि. २४) मोरवाडी (ता. भोर) वनविभागाच्या हद्दीत गुटख्याने भरलेला टेम्पो (एमएच ०७ एजे २९४३) हा आडजागेत लपवलेल्या ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करीत पकडला आहे. शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मोरवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत टेम्पोमध्ये गुटखा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता ताडपत्रीने झाकलेला आयशर कंपनीचा टेम्पोजवळ ऋत्विक मोरे हा संशयित हालचाल करत उभा असताना मिळून आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता उग्र गुटख्याचा वास आला. गुटख्याचा माल हा सुधाकर पानसरे व दिनेश पानसरे यांचा असून माल हा पुढे नजीम नावाचे व्यक्तीला पुणे येथे विक्री करणेसाठी घेवून जाणार असल्याची कबुली ऋत्विकने दिली. टेम्पो, १२० सुतळी पोती, १५ मोठे बॉक्स, दोन बनावट नंबर प्लेट, मोबाईल असा एकूण ७३ लाख ८५ हजार ४०० मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक हनुमंत पासलकर, प्रमोद नवले पोलीस हवालदार महेश बनकर, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, अजय घुले, राजगड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ, सहायक उपनिरीक्षक कृष्णा कदम, नाईक नाना मदने, मयुर निंबाळकर, गणेश लडकत, योगेश राजीवडे यांनी यशस्वी कारवाई केली. सहायक उपनिरीक्षक हनुमंत पासलकर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ करीत आहे.

====================================
-----------------------------------------------------
सह,संपादक भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
-----------------------------------------------------
====================================


Saturday, June 24, 2023

शिक्षण पद्धतीतील बदलाव काळाची गरज

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 ( राहता ) - प्रतिनिधि - वार्ता -
शिक्षणामध्ये प्रामुख्याने शिक्षक, विद्यार्थी याचबरोबर समाजाचाही प्रामुख्याने सहभाग असतो. कुटुंब, मित्रमंडळी, परिसर यावर शिक्षण अवलंबून असते. समाज परिवर्तन काळानुरूप बदलत असते त्यानुसार शिक्षण पद्धती ही बदलणे आवश्यक आहे. समाज नवनवीन संकल्पना, विविध प्रकारांचे परिवर्तन व त्यांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम याचा स्वीकार समाज करत असतो. थोडक्यात जुन्याचा विसर व नव्याचा स्वीकार समाज करत असतो. त्यानुसारच शिक्षण बदलणे आवश्यक आहे.
फार पूर्वीच्या शिक्षणाचा विचार केला तर भारतात प्रामुख्याने दोनच संस्था कार्यरत होत्या एक म्हणजे संस्कृत पाठशाला आणि मदरसा.याद्वारे शिक्षण दिले जात असे त्यामध्ये मुलींनी शक्यतो शिक्षण दिले जात नव्हते. कालांतराने त्यात अनेक प्रकारचे बदल घडत गेले. अनेक भाषांचा उपयोग होऊन ज्ञानार्जन होऊ लागले. प्रांतनिहाय शिक्षण पद्धती निर्माण झाली. त्यानंतर इंग्रज भारतात आले त्यांनीही त्याच पद्धतीने व त्यांच्या साम्राज्यास पूरक होईल अशी शिक्षण पद्धती निर्माण केली. त्यानुसारच अध्ययन व अध्यापन होऊ लागले. इंग्रजांच्या काळातही अनेक शिक्षण तज्ज्ञ होऊन गेले, परंतु इंग्रजांनी त्यांच्या साम्राज्यास पूरक होईल अशाच शिक्षण तज्ज्ञांच्या मताचा स्वीकार केला व इतर मात्र दुर्लक्षित केले त्यामुळे शिक्षण तज्ज्ञाचे मत कितीही दर्जेदार असले तरी त्यास ते मान्यता देत नसत.
  स्वातंत्रोत्तर काळात मात्र त्यात अनेक बदल झाले. त्यामध्ये प्रामुख्याने देशास पूरक स्वातंत्र्योत्तर उदयन्मुख भारतीय समाजाला ज्या शिक्षण पद्धतीचा उपयोग होईल अशा शिक्षण पद्धतीचा विचार प्रामुख्याने करण्यात आला.अशाच शिक्षण तज्ज्ञांच्या विचारांना प्राधान्य देण्यात आला. दर दहा वर्षांनी शिक्षण पद्धतीत बदल करण्यात आले. दिवसेंदिवस समाजाच्या गरजा वाढत चालल्या, सामाजिक गरजांचा विचार करता पूर्वीच्या शिक्षण तज्ज्ञांनी शिक्षणातील बदल कुच कामी ठरले. त्यांची शिक्षण पद्धती व सामाजिक गरजा यात तफावत होऊ लागली. अशा वेळेस शिक्षण पद्धतीत बदल होण्याची आवश्यकता भासू लागली.
    जशी जशी समाजाची गरज वाढत चालली त्याप्रमाणे नवीनविन शिक्षणतज्ज्ञांनी नवनवीन शिक्षण पद्धतीचा शोध लावला व त्यांच्या मताचा स्वीकार समाजांनी केला. 1997 पासून अमलात आणलेली क्षमताधिष्टीत अध्ययन अध्यापन पद्धतीचा विचार शिक्षणास प्रामुख्याने करण्यात आला. अशा प्रकारे या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांच्या भविष्याकालीन शिक्षणाचा विचार करण्यात आला.सध्याच्या विचार करता वाढती लोकसंख्या , स्त्री- पुरुष असमानता, बेरोजगारी, दुष्काळ व इतर समस्या यावर उपाय योजना करणाऱ्या व त्यादृष्टीने भविष्यकालीन भारतीय नागरिक घडविणाऱ्या शिक्षण पद्धतीचा विचार प्रामुख्याने केलेला दिसतो.अशा प्रकारे बदलत्या सामाजिक गरजानुसार शिक्षणात बदल होणे ही काळाची गरज होऊन बसली.


श्रीमती देशमुख भारती दिगंबर
 प्राथमिक शिक्षक,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खर्डे पाटोळे, क्लास भगवतीपुर
 ता. राहता जि.अहमदनगर
मोबा : 9423462015
-------------------------------

((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

बैंकिंग अर्थसहाय्यातून व्यावसायिक वृद्धीसाठीयोग्य कागदपत्रे आवश्यक - इंजि.मोहसिन शेखमुस्लिम कॉ.ऑफ बैंकेच्यावतीने काकर समाज बांधवांना बैंकिंग मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - समाचार -

येथील मुस्लिम काॅ.ऑप. बैंक च्या वतीने मुस्लिम काकर समाज बांधवांना निमंत्रित करून बैंकिंग क्षेत्राविषयी मार्गदर्शनपर एका छोटेखानी कार्यक्रमा चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या वेळी बँकेचे मॅनेजर शकील कुरेशी यांनी बँकेच्या सर्व कार्यशैली विषयक सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक इब्राहिम शेख होते. समता कॉम्प्युटर इंस्टीटयूट चे संचालक इंजि.मोहसीन शौकत शेख यांनी सांगितले की,काकर समाज हा पुर्वीपासूनच सुयोग्य पद्धतीचा व्यावसायिक समाज आहे, आपल्या परिश्रमाद्वारे
विविध व्यावसायातून या समाजाने स्वतःला प्रगत केले आहे, सुव्यावसायिक समाज असल्याकारणाने बैंकिंग क्षेत्राकडे वळल्यास अधिक सक्षमपणाने प्रगती शक्य आहे,याकरीता लागणारे आवश्यक कागदपत्रे शॉप एक्ट वैगरे असे सर्व उपयोगी कागदपत्रांविषयी त्यांनी यावेळी अचुक माहिती दिली. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकर समाजाचे जिल्हाध्यक्ष इकबाल ईस्माईल काकर सर यांनी यशस्विरित्या केले. 
यावेळी ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनाइजेशन अहमदनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष अन्वर तांबोळी यांचा सत्कार मुस्लिम बैंक व काकर समाजाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मुश्ताक तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,काकर समाज हा व्यापार व शिक्षणावर लक्ष्य केंद्रित करणारा असा समाज आहे,या समाजाने बैंकिंग क्षेत्रात देखील पुढे आले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी युवक नेतृत्व कार्याध्यक्ष जावेद काकर, खजिनदार शरीफ काकर,हाफिज इरफ़ान काकर, करीम काकर,युनूस काकर,जुनेद काकर, रशीद काकर, अफसर काकर, खलील काकर, रहीम काकर, नजिर काकर, फारूक काकर सर, साबीर काकर, हुसैन काकर, जाफर काकर, रऊफ काकर, फिरोज काकर,अयाज काकर, शकील काकर, शाहरुख काकर, गुलाम साहब आदी उपस्थित होते.

((( वृत्तसंकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर -9561174111