राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, August 11, 2023

बहुजन आघाडीचे अ‍ॅड,प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीत भाजपा बॅकफुटवर वंचित यांचे प्रतिपादन


श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

राजकारणात देशाच्या व राज्याच्याही बदल हा अटळ आहे. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लाट तयार झाली आहे. तीन राज्यांच्या निवडणुका अगोदर लोकसभेची निवडणूक होणार असून त्यात भाजपा बॅक फुटवर येणार असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

 वैजापूरहुन श्रीरामपूर येथे आले असता येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील वादाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारणात अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांच्या तुलनेत पाच टक्केही राजकीय प्रगल्भता नाही. आम्ही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच होतो आणि यापुढेही राहणार आहोत. भविष्यात तेलंगणातील बीआरएस व शिवसेना एकत्र येणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. देशात भाजपा विरोधात तयार झालेल्या इंडिया आघाडीकडे कोणत्याही प्रकारचा आरोप नसलेला प्रवक्ता म्हणून नवीन चेहरा आला पाहिजे असे ते म्हणाले. नाबार्डमध्ये 48 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला असून त्याची चौकशी पुर्ण झाली आहे. यानंतर येणार्‍या कोणत्याही सरकारला त्यांच्याविरोधात कारवाई करावी लागणार आहे.

भारतीय जनता पक्षाचा ग्रामीण भागाचा खरा बेस हा शिवसेना आहे. शिवसेनेमुळेच त्यांना मतदारावर प्रभाव टाकणे सोपे होते ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच सेना-बीजेपी विजयी होत असल्याचा दावा त्यांनी केला. बाळासाहेबांची शिवसेना व नामदेव धसाळ यांचे दलित पँथर दोघांचा ढाचा एकच होता तो म्हणजे सामूहिक जमाविकरण व प्रभाव आणि सामान्य माणसावरती प्रचंड पगडा परंतू संघटना बांधणे व खालपर्यंत उभे करणे दोघांनाही जमले नाही. नंतरच्या चळवळी उभ्या राहिल्या त्या त्याच व्यक्ती चित्रणामुळे उभ्या राहिल्या. भाजपाचे बांधलेले नेटवर्क सक्षम असल्यामुळे त्यांना हा सर्व बदल करता आला. परंतु नजीकच्या काळामध्ये जेव्हा निवडणुका होतील मग त्या विधानसभा असो किंवा लोकसभा यामध्ये सर्वात जास्त मार खाणारा पक्ष हा भाजपच असेल त्यांच टेबल नेटवर्क जरी असले तरी प्रभाव पाडणारे नेतृत्व त्यांच्याकडे नाही, असेही ते म्हणाले.

===================================
---------------------------------------------------
: - सह,संपादक - रंजित बतरा - शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================


Tuesday, August 8, 2023

पोलिसांनी पकडले पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या चोरट्याना


वैजापूर - प्रतिनिधि - वार्ता -

शिऊर वैजापूर तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि.6 रोजी रात्री दोन चोरटयांनी एका महीलेच्या गळ्यातील पोथ हीसकावण्याचा तसेच शिऊर गावात जबरी चोरीचा प्रयत्न केला होता. पोलीसांना सुचना मिळताच पोनी संदीप पाटील यांनी तात्काळ ग्राम सुरक्षा दलातील लोकांना तात्काळ अलर्ट करून स्वतः पोलीसांचा सह शिऊर बंगला येथे राञी साडे नऊ वाजता नाकाबंदी लावली.
त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की MH 41 Y 8505 डीस्कव्हर मोटरसायकल ही शिऊर गावाकडून शिऊर बंगल्याकडे भरधाव येत असल्याचे कळल्याने पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार यांच्या मोटरसायकल आडव्या लाऊन रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला. भरधाव येत असलेल्या दोन भामट्यांनी पोलीसांच्या गाड्या उडवल्या, मात्र त्यानंतर चोरटे खाली पडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

सपोनी संदीप पाटील यांनी तात्काळ आजुबाजुला असलेल्या मक्याच्या तसेच कपाशीच्या शेतात सर्च ऑपरेशन करून दोन आरोपींना पहाटे सहा वाजेच्या दरम्यान शिताफीने पकडले त्याच्या कडून मोठ्या प्रमाणात गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवलेली आहे. शिऊर गावात महीनाभरात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या त्यामध्येही याच आरोपींचा हात होता. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. अधिक तपास करावयाचा असल्यामुळे आरोपींचे नावे गुप्त ठेवण्यात आल्याचे पोलीसांनी सांगीतले. अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप पाटील, फौजदार आर.आर. जाधव, सुभाष ठोके, पो.कॉ. विशाल पैठणकर, भारत कमोदकर यांनी केली.

===================================
---------------------------------------------------
: - उप संपादक - विजेंद्र कुमार - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================


Sunday, August 6, 2023

मनसेचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा मुंबई-गोवा महामार्गावरुन व्हिडिओ ट्विट करत म्हणाले...

मुंबई - प्रतिनिधि - वार्ता -

गेल्या अनेक वर्षंपासून महाराष्ट्रातल्या मुंबई-गोवा
महामार्गाचे काम रखडले आहे. या महामार्गाचे
आतापर्यंत जे काम झालेय त्याची परिस्थितीही
भीषण आहे. त्यामुळे खाचखळग्यातून मार्गक्रमण करत वाहनचालक आणि कोकणवासियांचा
 खडतर प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.
संसदेत मंत्री नितीन गडकरी (Central Minister Nitin Gadkari) आणि राज्याच्या विधिमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत दिलेल्या उत्तरामुळे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार अशी स्थिती या हायवेच्या कामात निर्माण झालीय का असा प्रश्न मनसेने (MNS Twitt's Video) उपस्थित केला आहे.
राज्यात आतापर्यंत ज्या-ज्या पक्षाचे सरकार स्थापन झाले, त्या प्रत्येक सरकारला मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून विरोधकांनी अनेकदा धारेवर धरले आहे. सध्या राज्यात भाजपा-शिंदे गटाचे सरकार आहे. तर गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे या सरकारमधील मंत्र्याना यावरून अनेकदा प्रश्न विचारले गेले. परंतु कोणताही नेता यावर तोडगा काढू शकला नाही.
मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गडकरी आणि फडणवीस या दोघांच्या भाषणाची क्लिप टाकली आहे. त्यावर मनसेने म्हटले की, अखेर मुंबई-गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले. सर्व सत्ताधीश नेत्यांची उत्तरे ऐका..असे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार असतील तर कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर 'राज'कीय इच्छाशक्ती हवी असं त्यांनी सांगितले. काय म्हणाले नितीन गडकरी-देवेंद्र फडणवीस? मुंबई-गोवा महामार्गावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
मुंबई - गोवा मार्गावर खड्ड्यांसोबत तळ्याची मोफत सोय वडखळ ते कोलाडमध्ये गडब, आमटेम, कोलेटी, पळस, नागोठणे, वाकण, ऐनघर, सुकेळी खिंड, खांब, वरसगाव येथून पुढे इंदापूरपर्यंत रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून मार्ग काढताना लहान-मोठ्या वाहनांसह, अवजड वाहनांच्या चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. चार ते सहा फूट रुंदीचे व सुमारे एक ते दीड फूट खोलीचे हे खड्डे आहेत. त्यात पावसाचे पाणी भरल्याने वाहने खड्ड्यात आदळून कित्येकदा त्यांचा तोल जाऊन अपघात होतो. रात्रीच्या वेळी तर वाहनचालकांची कसोटी लागते.
दरम्यान, हे व्हिडीओ शेअर करत मनसेने म्हटले आहे की, अखेर मुंबई-गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले... सर्वसत्ताधीश नेत्यांची उत्तरे ऐका... असे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार असतील तर कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर 'राज'कीय इच्छाशक्ती हवी.
अखेर मुंबई-गोवा हायवेसाठी राज्यकर्त्यांनीही हात टेकले... सर्वसत्ताधीश नेत्यांची उत्तरं ऐका... असे हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार असतील तर कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची? हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रखर 'राज'कीय इच्छाशक्ती हवी खड्डे_भ्रष्टाचाराचे_अड्डे

===================================
---------------------------------------------------
: - उप संपदाक - विकास कुडाळकर - शब्द...शब्द✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================










Saturday, August 5, 2023

सामाजिक सलोखा नष्ट करणाऱ्या समाज कंटकांवर प्रतिबंध घालण्याची मागणी

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता

वैयक्तिक वादांना धार्मिक स्वरूप देऊन सामाजिक सलोखा नष्ट करण्याच्या प्रयत्नांना प्रतिबंध घालण्यात यावेत अशी मागणी समाजहित जोपासणाऱ्या जागरुक नागरिकांनी मा. तहसिलदार साहेब यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे कळविले आहे की, महाराष्ट्राच्या मातीत वर्षानुवर्षे अत्यंत सलोख्याने राहणारे विविध जाती धर्माचे लोक आपआपसातील ऋणानुबंध टिकवून आहेत, गुण्यागोविंदाने एकमेकांचा आदर करून रहात आहेत. परंतू अलीकडच्या कालावधीत काही राजाश्रय संघटनांकडून हिंदु- मुस्लिम एकोपा बिघडवून त्यांच्यात वाद निर्माण करण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
प्रेम ही प्रत्येकाची वैयक्तिक खाजगी बाब आहे. १८ वर्षे वय पूर्ण केलेल्या व्यक्तीने कुणावर प्रेम करावे हा त्याचा / तिचा वैयक्तिक अधिकार आहे. यात कधी मुलगी हिंदू व मुलगा मुस्लिम राहु शकतो. तर कधी मुलगी मुस्लिम व मुलगा हिंदु असू शकतो. अशा प्रकरणांना धामिक रंग देऊन एकाच धर्माच्या लोकांवर दोष मढण्याचे षडयंत्र सुरु आहे. विशेषतः प्रेमप्रकरणात मुलगा मुस्लिम असेल तर अस्तित्वात नसलेल्या 'लव जिहाद' वगैरे काल्पनिक नाव देऊन संपूर्ण मुस्लिम समाजाला उघड उघड शिव्याशाप, दुषणे देण्याचे काम सुरु आहे. समाजातील तरुणांची माथी भडकावून त्यांना संपूर्ण मुस्लिम समाजा विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुस्लिमां विरुध्द हिंसाचार करणे, त्यांच्या धार्मिकस्थळांचे नुकसान करणे, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे अशी कृत्ये केली जात आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना भुषणावह नक्कीच नाहीत. सामाजिक सलोखा, सामाजिक सौहार्द टिकणे आणि त्यात वाढ होणे हाच त्यावरील उपाय आहे. वैयक्तिक प्रेमप्रकरणाचे राजकारण करुन विष पेरणाऱ्या लोकांना प्रतिबंध करावा हे ही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
घटना घडलेल्या ठिकाणी दोन्हीकडील लोकांना विश्वासात घेऊन, गुन्हेगारांवर योग्य कार्यवाही करुन सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्याकामी प्रयत्न व्हावेत. दोषी व्यक्तींवर योग्य ती कारवाई होत असतानाच ज्यांचा काही संबंध नाही अशा संपूर्ण अल्पसंख्य समाजाला वेठीस धरण्याचे हेतुपुरस्सर होणारे प्रयत्न हाणून पाडण्यात यावेत या संदर्भात शासनाकडून प्रयत्न व्हावेत असे मा. तहसिलदार साहेबांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.
निवेदनावर सर्वश्री नजीरभाई शेख, हाजी रफिक पोपटिया, जैनुद्दीन जहागिरदार, तन्वीर गुलाम हुसेन, अन्वरभाई फिटर, वासुदेव सैंदाणे, चाँदखान पठाण, बुऱ्हान जमादार, खलीलभाई मोमीन, समीर शेख, फहिमखान, डॉ. जब्बार पटेल, डॉ. इशान शेख, अश्पाकभाई आदिंच्या सह्या आहेत.


===================================
---------------------------------------------------
: - सुविचार - संकलन - लेख...✍️✅️🇮🇳
---------------------------------------------------
===================================

Friday, August 4, 2023

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशकात....

नाशिक-प्रतिनिधि-वार्ता-
प्रभोधिनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कॉम्प्लेक्स, मोटार परिवहन विभाग इमारत व अकॅडमी मुख्य प्रवेशद्वार आणि संरक्षक भिंतीचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य छगन भुजबळ, मंत्री सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादा भुसे, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ संदीप बिष्णोई उपस्थित राहणार आहेत.
सदरहू कार्यक्रम आज (दि.5) सकाळी 09:45 वाजता शताब्दी हॉल समोर महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक येथे संपन्न होत आहे.

===================================
---------------------------------------------------
: - अवकाश - दराडे - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
---------------------------------------------------
===================================




Wednesday, August 2, 2023

महात्मा गांधीजीं सारखा त्यांची बरोबरी करणारा दुसराकोणी होऊ शकत नाही - राज ठाकरे

मुंबई - विशेष - वार्ता - प्रतिनिधि -

मुंबई महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असे नेतृत्व असेल की जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले, गांधीजींचे तत्त्वज्ञान व्यापक होते. त्यांच्यासारखा दुसरा कोणी होणे नाही, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गौरव शनिवारी मनसेतर्फे पुनः प्रसारित करण्यात आला. गांधीजींविषयी संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यात वादळ उठले असून, त्या विधानाचा राज ठाकरे यांनी या टिपण्णीद्वारे अप्रत्यक्ष समाचार घेतला.

राज ठाकरे यांनी गतवर्षीच्या गांधी
जयंतीनिमित्ताने ट्विटरवरून ही अभिवादनपर पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, 'महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असे नेतृत्व असेल की, जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला.
जे गांधीजींना जमले ते जवळ जवळ कोणालाच जमले नाही, असे मत व्यक्त

करून राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, "विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षांतच मागे पडलेले दिसले आहेत. गांधीजींचे तत्त्वज्ञान व्यापक होते, हे त्याचे कारण असल्याचे राज यांनी स्पष्ट केले आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाविषयी ते म्हणाले की, 'शृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही, कारण सगळी माणसे ही मुळात समान आहेत, इतके सोपे तत्त्व त्यांनी स्वीकारले आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे, म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरे कोणी होणे नाही.

=================================
------------------------------------------------
: - सुयोग प्रजापती - मुबंई - शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
=================================
------------------------------------------------



















दरोड्यातीलक कानडगाव सहा दरोडेखोर एल सी बी पथकाच्या ताब्यात गुन्ह्याची कबुली

राहुरी - प्रतिनिधि - वार्ता -

राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे अडीच महिन्यांपूर्वी पडलेल्या सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या शाखेच्या(एलसीबी) पथकाने सहा दरोडेखोरांना अटक केली असून, इतर तीन आरोपींचा शोध सुरूआहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या क्राईम मिटिंगमध्ये या दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांच्याकडे सोपविला होता. शोएब दाऊद शेख (वय 25,रा. कानडगाव, ता. राहरी), गॅसउद्दीन ऊर्फ गॅस रजा उल्लावारसी (वय 21), नफीस रफीक सय्यद (वय 23, दोघेरा. सिडको, जि. नाशिक), अश्पाक ऊर्फ मुन्ना रफीक पटेल (वय 21), शेखर राजेंद्र शिंदे (वय 24, दोघे रा. कोल्हार ता. राहाता), मंगेश बबनराव पवार (वय 32, रा. इंदिरानगर,श्रीरामपूर) अशी अटक केलेल्य दरोडेखोरांची नावे आहेत.

कानडगाव येथील विक्रम संजय मोताळे यांच्या घरावर 18 मे रोजी सशस्त्र दरोडा पडला होता. मोताळे कुटुंबीयांसह घरात झोपलेले असताना चेहर्‍यावर रुमाल बांधून आलेल्या सहा ते सात दरोडेखोरांनी गावठी पिस्तूल व तलवारीचा धाक दाखवून मारहाण करत सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल असा 65 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. एलसीबी पथकाने आरोपींचा पेहराव, बोलण्याची पद्धत या बाबींची माहिती घेतली. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या कारचा, आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून शोएब दाऊद शेख या संशयिताला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांबद्दल माहिती दिली. नंतर पाच आरोपींना एलसीबीनेअटक केली.

या घटनेचा राहुरी पोलिस पुढील तपास करीत आहेत. उपनिरीक्षक सोपान गोरे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, सचिन आडबल, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, शिपाई शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, संभाजी कोतकर, अरुण मोरे यांनी ही कामगिरी केली. अटक केलेले पाच आरोपीपोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईतगुन्हेगार आहेत. शोहेब दाऊद शेख याच्यावर नगर जिल्ह्यात विनयभंगाचा गुन्हा, मंगेश पवारवर नगर व बीड जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी अपहरण असे तीन गुन्हे दाखल आहेत. सद्दाम शेखवर नगरजिल्ह्यात विनयभंगाचा गुन्हा, गॅसुद्दीन वारसीवर नगर जिल्ह्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

===================================
---------------------------------------------------
: - वार्ता - अरविंद अरकडी -शब्द...✍️✅️🇮🇳...रचनासंकलन वार्ता संकलन...
---------------------------------------------------
===================================