राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, January 19, 2024

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चा शुभारंभ


-  अहमदनगर - प्रतिनिधि - / वार्ता -
रस्ता सुरक्षा अभियान 2024 चा शुभारंभ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपायुक्त प्रज्ञा बडे मिसाळ,अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार, अधीक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, रस्ते
 अपघात हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. रस्ते अपघातामध्ये मृत्यू पावणाऱ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक असुन अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. अपघातामध्ये तरुणांच्या होणाऱ्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटूंबियांवर मोठे संकट कोसळते. रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्ह्यात ब्लॅकस्पॉट असणाऱ्या ठिकाणी दीर्घ तसेच अल्प मुदतीच्या उपाययोजना राबविण्यात याव्यात. अनेक ठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने स्पीडब्रेकरची उभारणी केल्यामुळेही अपघात घडतात. त्यामुळे अशा स्पीडब्रेकरची उभारणी करताना विशेष दक्षता घ्यावी. अपघातग्रस्ताला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे आवश्यक असते. वैद्यकीय यंत्रणांनानीही गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना उपचार मिळतील यादृष्टीने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

    जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, रस्ता सुरक्षा अभियान २०२४ मध्ये सर्वांचा सहभाग घेऊन हे अभियान यशस्वी करावे. वाहतुक नियमांचे पालन केल्याने अपघातापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याची मनोवृत्ती समाजातील प्रत्येकात दृढ व्हावी. लोकजागृतीमधून जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी रस्ता सुरक्षा अभियान माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले.
 कार्यक्रमास विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विभागांच्या कार्याचा आढावा*
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विविध विभागांसह महसुल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला.
   सर्वसामान्यांच्या हितसाठी विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा अधिक गती देण्यात यावी. प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यात यावा. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने तसेच अधिक दक्षपणे काम करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी दिले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================




समाजात विघातक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार ; पो.नि. नितीन देशमुख


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
पोलीस खात्याचे ब्रिदवाक्य सद्रक्षणाय खलनिग्रहणाय असुन या ब्रिदवाक्याप्रमाणे चांगल्याला चांगली वागणुक व वाईटाला वाईटच वागणुक दिली जाईल, समाजासाठी विघातक असणारे कृत्य करणारावर निश्चितच कारवाई केली जाईल असा इशारा श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचा नव्यानेच पदभार स्विकारलेले पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिला.

तालुक्यातील बेलापुर येथील बेलापूर ग्रामपंचायत,बेलापुर पत्रकार व बेलापूर ग्रामस्थांच्यावतीने नवीन पोलिस अधिकाऱ्यांचे स्वागत व बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा निरोप समारंभाचे आयोजन बेलापुर पोलीस स्टेशन याठिकाणी करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक श्री.देशमुख पुढे म्हणाले की, मी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली त्या निमित्ताने अनेकांशी संपर्क आला, परंतु श्रीरामपुर तालुक्यातील बेलापुर गावातील नागरीक सकारात्मक दृष्टिकोन ठेवुन काम करतात याचा आनंद वाटला. हिंदु मुस्लिम ऐक्याचे आदर्श
 उदाहरण या गावात पहायला मिळते अशाच प्रकारे सर्वत्र सर्व समाजाने सामंजस्य दाखविले तर
 पोलीसांचेही काम कमी होईल असेही ते म्हणाले.
या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे

 म्हणाले की, या ठिकाणी काम करताना वेगळाच अनुभव आला, या गावातील सर्व नागरीक पुढाकार घेवुन आपल्या समस्या स्वतःच सोडवितात, ऐकमेकांचे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात, नेहमी दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतात, अशा गावात काम करण्याची संधी मिळाली.आपणाकडून मिळालेल्या चांगल्या कामाची शिदोरी मी जाताना बरोबर घेवुन जात आहे, बदली हा नोकरीचा भाग आहे परंतु येथे भरपुर काही शिकण्यास मिळाले त्याचा उपयोग भविष्यात काम करताना निश्चितच होईल, गावाने सुरु केलेल्या चांगल्या परंपरा अशाच सुरु ठेवाव्यात असा आग्रह त्यांनी व्यक्त केला.

 या वेळी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, बाजार समितीचे उपसभापती तथा उपसरपंच अभिषेक खंडागळे, टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार सुनिल मुथा,भाजपा सरचिटणीस प्रफुल्ल डावरे,

 भाजपा अल्पसंंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी इस्माईल शेख, प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले, तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात, बेलापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
  या वेळी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मांसाहार विक्रीची दुकाने स्वंयम्स्फूर्तीने बंद ठेवणारे व्यापारी रसीद कुरेशी, फिरोज कुरेशी, फरहान कुरेशी, जुबेर कुरेशी, यासीन कुरेशी, शाहीद कुरेशी,इरफान कुरेशी, यासीर कुरेशी, तसेच रामु गुडे, अजीजभाई शेख, राज्जाक पटेल, दाऊद आतार,श्रीलाल गुडे, अबेद पठाण, कय्युम कुरेशी आदिंचा नुतन पोलीस निरीक्षक श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला .

या वेळी ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,बाळासाहेब दाणी, पत्रकार दिलीप दायमा, सुहास शेलार,प्रसाद खरात,अजीज शेख, मोहसीन सय्यद,जाकीर शेख,रत्नेश गुलदगड, नितीन शर्मा, जीना शेख,बाबुलाल पठाण, हवालदार दिपक कदम , हवालदार बाळासाहेब कोळपे, बेलापुर पोलीस स्टेशनचे गौतम लगड, भारत तमनर, संपत बडे, नंदु लोखंडे, ज्ञानेश्वर वाघमोडे, धनंजय वाघमारे, महेश थोरात, समीर शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले तर ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलीक यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर*
===========
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

Wednesday, January 17, 2024

उर्स ख़्वाजा ग़रीब नवाज़ रहमतुल्ला अलैह मुबारक हो💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

-तन्वीर रजा - श्रीरामपूर -/ वार्ता -
बेरादराने इस्लाम अस्सलामो अलयकुम व रहमतुल्लाहे व बरकातहू
तमामी साहीबे इमान हज़रात को । उर्स ख़्वाजा ग़रीब नवाज़ बहुत-बहुत मुबारक हो
आज बतारिख़ 17/01/2024 बरोज़ बुध बाद
 नमाज़े मग़रिब जमे मस्जिद श्रीरामपुर में उर्स ख़्वाजा ग़रीब नवाज़ मनाया जा रहा है

 *प्रोग्राम की तफसिल*
बाद नमाजे मग़रिब जमे मस्जिद में क़ुरआन ख़ानी का ऐहतेमाम किया गया है । उसके बाद एक मन्क़बत ख़्वाजा ग़रीब नवाज़ पेश की जाऐगी । फिर उसके बाद ख़्वाजा ग़रीब नवाज़ रहमतुल्ला अलैह की शान-ए-अक़दस में
 *ख़लीफऐ होज़ुर ताजुश्शरिया हज़रत अल्लामा मुफ्ती मोहम्मद अतहर हसन ज़ियाई साहब क़िब्ला* की तक़रीर होगी

सलातो सलाम फातिहा और दोआ के बाद जलसे का ऐख़तेताम होगा।
लिहाज़ा तमामि खुश अक़िदा साहीबे ईमान हज़रात से गुज़ारिश की जाती है के मग़रिब की नमाज़ में कसिर तादाद में शिरकत फरमाऐं
और ख़्वाजा ग़रीब नवाज़ रहमतुल्ला अलैह के फैजान से मुस्तफिज़ हों
 *ज़ेरे सदारत*

=================================
-----------------------------------------------
हज़रत अल्लामा मौलाना अलहाज मोहम्मद इमदाद अली साहब ज़ियाई रिज़वी क़ादरी ख़तिबो इमाम जामा मस्जिद श्रीरामपुर

 *मीन जानिब*✍️✅🇮🇳
 *जामे मस्जिद ट्रस्ट अहले सुन्नत वल जमाअत
 श्रीरामपुर जिला अहमदनगर*
-----------------------------------------------
=================================


बाल संगोपन योजने अंतर्गत ८२३ गरजूंपर्यंत लाभ पोहचविला - ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या हेतूने निराधार, अपंग किंवा एकलपालक मुलांच्या पुढील शिक्षणासाठी परदेशी दाम्पत्यांनी बाल संगोपन योजना प्रभावीपणे राबवून हजारो निराधार बालकांना मदतीचा हात दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस, हेमंत ओगले मित्र मंडळ, साई सोशल फाउंडेशन व तुळजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या बालसंगोपन योजने अनंर्गत मागील ५३९ व नव्याने २८४ बालके व त्यांचे पालक असे ४०० जणांची अहमदनगर येथील बाल संगोपन कार्यालय येथे जाण्यासाठी मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली त्याप्रसंगी ससाणे बोलत होते. अपंग, एकलपालक किंवा निराधार मुलांना महाराष्ट्र शासनाकडून बालसंगोपन योजनेअंतर्गत दरमहा २२५० रु. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत मिळतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देऊन आवश्यक ती कागदपत्रे परदेशी दाम्पत्याने घरोघर जाऊन जमा केली व प्रस्ताव पूर्ण करून पाठपुरावा करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला. ससाणे पुढे म्हणाले निराधार मुलांच्या शिक्षणासाठी शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत व कोणत्याही परिस्थितीत मुलांचे शिक्षण थांबता कामा नये. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले सर्वसामान्यांना मदत करून त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याची स्व. ससाणे साहेबांची परंपरा ससाणे कुटुंबीयांनी जपली असून परदेशी दांपत्यांचं कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले. या कार्यक्रम प्रसंगी जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, बाजार समितीचे संचालक खंडेराव सदाफळ, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, मा. नगरसेवक रमेश कोठारी ,के. सी. शेळके,दिलीप नागरे, रितेश रोटे,आशिष धनवटे, प्रमोद भोसले, मुरली राऊत, मीनानाथ खडके, द्वारकानाथ बडधे, संतोष परदेशी, सौ आशाताई परदेशी,विलास लबडे, भगवान उपाध्ये, प्रविण नवले, सुरेश ठुबे, अमोल शेटे, रितेश एडके, सिद्धार्थ फंड, गोपाल लिंगायत, सनी मंडलिक, रियाजखान पठाण, अशोक जगधने, बाळासाहेब इंगळे, सुभाषराव गायकवाड, सुनील साबळे, बाबा वायदंडे, रणजीत जामकर, नवाज भाई शेख, भैय्याभाई अत्तार,अतिशभाई शेख, अमोल नाईक, ॲड.प्रशांत राऊत, जाफर शहा, अंबादास निकाळजे, संजय गोसावी, कसबे सर, कुणाल पाटील,शुभम पाटील, अजय धाकतोडे, राजेश जोंधळे, विशाल साळवे, सोनू जामकर, प्रशांत कांबळे, कैलास छल्लारे, सागर दुपाटी, श्रेयस रोटे, कल्पेश पाटणी, तीर्थराज नवले, सिद्धार्थ जगताप, प्रणव जाधव आदी मान्यवर, बालसंगोपणाचे शेकडो लाभार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
======
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

गुरुमुळे प्रत्येक व्यक्ती घडत असतो - सुनील गोसावी

*ज्ञानसरिता विद्यालयाचे*
 *स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*

अहमदनगर प्रतिनिधी
 प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंना अनन्य साधारण महत्व आहे, गुरुमुळे प्रत्येक व्यक्ती घडत असतो. त्यामुळे आपण शिक्षकांचा आदर केला पाहिजे. आई - वडिलांना आपल्याकडून अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे सचिव सुनील गोसावी यांनी केले.  

   ज्ञानसरिता विद्यालय व उच्य माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
  पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्ञानसरिता विद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवले. विविध क्षेत्रात या विद्यालयाचे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. या वरून विद्यालयाचे शिक्षकांनी घेतलेली मेहनत दिसून येते. देशाचे भवितव्य हे खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या हाती असून विद्यार्थ्यांनी नेहमी ज्ञानार्थी राहायला हवे.

याप्रसंगी उद्योजिका अपूर्वा तोरडमल, स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच विजय शेवाळे,प्रा.शिवाजी घाडगे, संस्थेचे अध्यक्ष जालिंदर डोंगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण शिंदे, रघुनाथ शेजवळ, बाळासाहेब डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य उमेश डोंगरे व दिलीप गव्हाणे, संचालक अशोक शेवाळे,मा.ग्रा. स. दीपक शिंदे, सुनील शेवाळे, मा. ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य हुसेन सय्यद, नामदेव चांदणे, ओंकार शिर्के, डॉ. बापू पवार, सोसायटीचे व्हा.चेअरमन बाळासाहेब डोंगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी इशस्तवन सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राचार्य बाळकृष्ण सानप यांनी केले. सुरेखा घोलप व संजय कानडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कनिष्ठ महावद्यालय विभाग प्रमुख प्रा.आयनुल शेख यांनी आभार मानले.
वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


शिर्डी येथे राष्ट्रीय पशुपालन न्याय हक्क परिषद संपन्न

*शिर्डी येथे राष्ट्रीय पशुपालन*
 *न्याय हक्क परिषद संपन्न*

- राजेंद्र बनकर - / शिर्डी -
या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी गोसेवा आयोगाचे अध्यक्ष ना. शेखर मुंदडा होते.
विचारपिठावर भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश प्रभारी संजय केनेकर , प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी,गोसेवा आयोगाचे सदस्य सनतकुमार गुप्ता ,
 विश्व हिंदू परिषदेचे प्रांतीक कार्यवाह भाऊराव कुदळे,भटके विमुक्त आघाडी चे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे , सरचिटणीस , राजेंद्र साळुंके , युवराज मोहिते ,रवी शिंदे,, , रघुभाई भरवाड, रामभाई जोगराना,ॲड. भाग्यश्री ढाकणे, साजनभाई रबारी, मशरूभाई मालधारी, विभाभाई भरवाड, भलाभाई भरवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पशुपालन संदर्भात येणाऱ्या अडचणी , गायरान जमिनीवरील अतिक्रमणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करताना पोलिस, वनविभाग आणि काही तथाकथीत संघटनच्या लोकांकडुन होणारी आर्थिक पिळवणूक,देशी गायीचे संगोपन आणि संवर्धन, शासकीय योजना आदी विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली.येणाऱ्या समस्या शासन दरबारी मांडून त्यावर उपाययोजना करता येतील असे मान्यवरांनी यावेळी आश्वासन दिले.
गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा, भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी अध्यक्ष राहुल केंद्रे यांची निवड झाल्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
या परिषदेचे आयोजन भारतीय जनता पार्टी भटके
विमुक्त आघाडी संयोजक तथा भारतीय धनगर समाज विकास परिषद चे राष्ट्रीय अध्यक्ष सिध्देश्वर बापु शिंदे

यांनी केले होते.
या कार्यक्रमाला छत्तीसगड , राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय धनगर समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी केले तर आभार रघुभाई मिर यांनी मानले.
यावेळी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजेंद्र बनकर - शिर्डी*
=====================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================





Tuesday, January 16, 2024

गुरु गोबिंद सिंह जयंती और महत्व - 2024: तिथि, समय, इतिहास...

🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎🕎

/ - श्रीरामपूर -प्रतिनिधि- वार्ता -\
==================

गुरु गोबिंद सिंह जयंती 2024: गुरु गोबिंद सिंह सिख धर्म के दसवें गुरु थे। सिख समुदाय के भीतर, गुरु गोबिंद सिंह जी की जयंती को एक महत्वपूर्ण दिन माना जाता है। इस साल लोग उनकी 357 वीं जयंती मनाएंगे. हिंदू कैलेंडर के अनुसार गुरु गोबिंद सिंह जी का जन्म संवत 1723 पौष माह के शुक्ल पक्ष की सप्तमी तिथि को हुआ था। गुरु गोबिंद सिंह की जयंती 17 जनवरी 2024 है

गुरु गोबिंद सिंह जयंती 2024: तिथि और समय
सप्तमी तिथि आरंभ - 16 जनवरी,
 अपराह्न
सप्तमी तिथि समाप्त - 17 जनवरी 2024 रात 10:06
 बजे
20:48 हमारे पर का पालन करें
गुरु गोबिंद सिंह जयंती 2024: गुरु गोबिंद सिंह
 सिख
धर्म के दसवें गुरु थे। सिख समुदाय के भीतर, गुरु
 गोबिंद सिंह जी की जयंती को एक महत्वपूर्ण दिन


माना जाता
=========

 है। इस साल लोग उनकी 357वीं जयंती मनाएंगे. हिंदू
कैलेंडर के अनुसार गुरु गोबिंद सिंह जी का जन्म संवत
1723 पौष माह के शुक्ल पक्ष की सप्तमी तिथि को
हुआ था। गुरु गोबिंद सिंह की जयंती 17 जनवरी
 2024 है.
गुरु गोबिंद सिंह जयंती 2024: तिथि और समय
सप्तमी तिथि आरंभ - 16 जनवरी, 2024-11:57 अपराह्नसप्तमी तिथि समाप्त - 17 जनवरी 2024
 रात 10:06 बजे
गुरु गोबिंद सिंह जयंती 2024: महत्व
जूलियन कैलेंडर के अनुसार, गुरु गोबिंद सिंह जी
 का जन्म 22 दिसंबर, 1666 को पटना, बिहार में हुआ था। जूलियन कैलेंडर... और पढ़ें

{<^>}{<^>}{<^>}{<^>}{<^>}{<^>}{<^>}{<^>}{<^>}
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
जूलियन कैलेंडर अब उपयोग में नहीं है और इसे पुराना माना जाता है। औरंगजेब ने गुरु गोबिंद सिंह के पिता गुरु तेग बहादुर की हत्या कर दी। गुरु गोबिंद सिंह की माता का नाम माता गुजरी था। 1675 में औरंगजेब ने इस्लाम में शामिल होने से इनकार करने पर अपने पिता गुरु तेग बहादुर की हत्या कर दी। नौ साल की उम्र में, गोबिंद सिंह को 1676 में बैसाखी के दिन सिखों का दसवां गुरु घोषित किया गया था।
गुरु गोबिंद सिंह जयंती इतिहास तख्त श्री हरिमंदर जी पटना साहिब गुरु गोबिंद सिंह के जन्म का वर्तमान स्थान है। उनका परिवार 1670 में एक बार फिर पंजाब में स्थानांतरित हो गया। उनका परिवार मार्च 1672 में हिमालय की शिवालिक पहाड़ियों में चक नानकी में स्थानांतरित हो गया। वर्तमान में आनंदपुर साहिब के रूप में जाना जाता है, चक नानकी ने अपनी शिक्षा वहीं प्राप्त की। योद्धा बनने के लिए उन्होंने सैन्य कला, संस्कृत और फ़ारसी का अध्ययन किया।
✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️

((( गुरु गोबिंद सिंह जयंती हिस्ट्री )))
................................................................
=================================
तख्त श्री हरिमंदर जी पटना साहिब गुरु गोबिंद सिंह का वर्तमान जन्म स्थान है। उनका परिवार 1670 में एक बार फिर पंजाब में स्थानांतरित हो गया। उनका परिवार मार्च 1672 में हिमालय की शिवालिक पहाड़ियों में चक नानकी में स्थानांतरित हो गया। वर्तमान में आनंदपुर साहिब के रूप में जाना जाता है, चक नानकी ने अपनी शिक्षा वहीं प्राप्त की। योद्धा बनने के लिए उन्होंने सैन्य कला, संस्कृत और

  फ़ारसी का अध्ययन किया। =

बाद में गुरु गोबिंद सिंह जी ने खालसा पंथ का गठन
 किया। गुरु गोबिंद सिंह की निगरानी में खालसा ने कठोर आध्यात्मिक अनुशासन का पालन किया। व्यक्तियों ने बहादुरी से मुगल सम्राटों के खिलाफ लड़ाई लड़ी। गुरु गोबिंद सिंह जी एक प्रतिभाशाली कवि और लेखक थे जिन्होंने विभिन्न प्रकार की साहित्यिक रचनाएँ कीं। 1708 में अपनी मृत्यु से पहले, उन्होंने गुरु ग्रंथ साहिब को स्थायी सिख गुरु घोषित किया; गुरु ग्रंथ साहिब जी को सिखों के लिए एक पवित्र ग्रंथ माना जाता है
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
🏵️🏵️🏵️
गुरु गोबिंद सिंह जयंती 2024: उत्सव
{<^>}{<^>}{<^>}{<^>}{<^>}{<^>}{<^>}{<^>}{<^>}
गुरु गोबिंद सिंह जयंती हर जगह मनाई जाती है जहां सिख समुदाय है। इस दिन को केवल सिख ही नहीं बल्कि सभी लोग गुरुद्वारों में जाकर और उनकी शिक्षाओं को दूसरों के साथ साझा करके मनाते हैं। लोग एक-दूसरे को बधाई देकर बधाई देते हैं। सभी को लंगर खिलाएं. हर गुरुद्वारे को मोमबत्तियों और रोशनी से सजाया गया है। कुछ स्थान गुरु नानक वाणी के बारे में कहानियाँ भी बताते हैं।

💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
गुरु गोबिंद सिंह, वाणी खालसा "वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फ़तेह
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢

<^><^><<^><^><^><^><^><^><^><^><^><^>
<^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
^^^:- टीप -:^^^
गुरु गोविंद सिंग जी जयंती नि मित के उप लक्ष मे गुरुद्वारा गुरु सभा श्रीरामपूर मे भव्य रक्त दान शिबीर और शाम चार बजे भजन कीर्तन गुरु चरण प्रार्थना का आयोजन किया गया हैं
<^><^><<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
☮️☮️☮️☮️☮️☮️☮️☮️☮️☮️☮️☮️☮️


================================
-----------------------------------------------
:- भगवंत सिंग प्रितम सिंग बतरा - विशेष - लेख वार्ता...✍️✅🇮🇳 +918806490555
-----------------------------------------------
=================================