राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, August 10, 2024

श्रीरामपूरातील ग्रामपंचायतींनी नविन पाणीपुरवठा योजना भंडारदराच्या पाण्यावर कराव्यात - मा. आ. भानुदास मुरकुटे


- श्रीरामपूर  - प्रतिनिधी - /प्रतिनिधी - वार्ता -
भविष्यात ज्या ज्या ग्रामपंचायती नविन पाणीपुरवठा योजना करतील त्यांनी त्या योजना भंडारदरा कालव्याच्या पाण्यावर कराव्यात तरच भंडारदरातुन सुटणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनचा तालुक्याला फायदा होईल अन्यथा या पाण्यावर फक्त संगमनेर व राहाता तालुकाच हिरवेगार राहील असे प्रतिपादन मा.आ.भानुदास मुरकुटे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त केले.
खोकर येथे विविध विकास कामाचे उद्घाटन व लोकार्पण साहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत पाटील, जिल्हा बैंकेचे संचालक तथा श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, खासदार भाऊसाहेब वाक्चौरे यांचे चिरंजीव रोहीत वाकचौरे, काँग्रेसचे प्रदेश सरचीटणीस हेमंत ओगले, जिल्हा परीषदेचे बांधकाम समीतीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समीतीचे संचालक राजू चक्रनारायण, उबाठाचे सदाशिव पटारे, सरपंच आशाबाई चक्रणारायण, उपसरपंच दिपक काळे, जयंत पाटील, गणेश छल्लारे आदि प्रमुख उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत नुतन ईमारत लोकार्पण, ग्रामपंचायत कार्यालय दुसरा मजला बांधकाम भुमिपुजन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नुतन ३ वर्गखोल्यांचे उद्घाटन व नविन पथदिव्यांचे उद्घाटन आदि कार्यक्रम उपस्थितांच्या हस्ते पार पडले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित सोहळ्यात प्रस्तावना व सुत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजु चक्रणारायण यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. दुर्गावती पटारे, श्री. सदाशिव पटारे, तसेच सौ. सिंधुबाई दळवी व श्री तानाजी दळवी या दाम्पत्यांचे हस्ते विधीवत पुजन करण्यात आले.
यावेळी करण ससाणे,रोहीत वाकचौरे, हेमंत ओगले आदिंनी मनोगत व्यक्त करत विकासकामांचे कौतुक करत शुभेच्छा व्यक्त केल्या तर मा.आ.भानुदास मुरकुटे यांनी विविध विकासकामांबद्दल खोकर ग्रामपंचायतचे कौतुक केले व बोलताना म्हणाले की, सध्या सर्वत्र केंद्र सरकाच्या जलजीवन योजना सुरु आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी नविन पाणीपुरवठा योजना स्थानिक गावातील विहीरीवर अथवा गावतळ्यावर न करता भंडारदरा कालव्याच्या पाण्यावर केल्यास उन्हाळ्यात सुटणाऱ्या पिण्याच्या रोटेशनमधुन योजनेला पाणी उपलब्ध होईल.सध्या सुरु असलेली निपाणी वाडगाव - खोकर ६१ कोटी रुपयांची जलजीवन योजना भंडारदरा कालव्यावर घेतल्याने त्या योजनेसाठी प्रत्येक रोटेशनमधुन त्यात पाणी सोडले जाणार आहे. श्रीरामपूरच्या पुर्वभागात ग्रामपंचायतच्या कुठल्याही पाणीपुरवठा योजना कालव्यावर नसल्याने पिण्याचे पाणी श्रीरामपूर च्या पुढे येत नाही. त्यामुळे त्या परीसरातील पाणीपातळी लवकर खाली जाते. तर संगमनेर, राहाता तालुक्यात अनेक पाणीपुरवठा योजना कालव्यालगत असल्याने हक्काने त्यांना पाणी दिले जाते, बंधारे भरले जातात. त्यासाठी श्रीरामपूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना तशी विनंती असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर सध्या भंडारदरा धरण तर भरले परंतु जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरावे व आपले पाणी आपल्याच शेतीला मिळो अशी प्रार्थना सर्वांनी करावी असे ते म्हणाले.
यावेळी राजेंद्र सलालकर, लक्ष्मण चव्हाण, संजय काळे, प्रकाश पवार, रविंद्र पटारे, दत्तात्रय चव्हाण, जयवंता चव्हाण, शिवाजी दोंड, संजय पटारे, हरीभाऊ पवार, निवृत्त सैनिक नवनाथ पटारे, यशवंत पाटील, प्रकाश पवार, दत्तात्रय चव्हाण, निसार शेख, रावसाहेब चक्रणारायण, नंदकुमार सलालकर, रविंद्र पटारे, ज्ञानदेव पवार, शिवाजी सिन्नरकर, तानाजी दळवी, जयवंत चव्हाण, सुरेश गव्हाणे, फयाज सय्यद, अनिकेत सलालकर, रमेश पवार, मुन्ना सय्यद, रामनाथ गायकवाड, गोपीनाथ चक्रनारायण, ईंंजिनिअर राजू पठाण व विलास शिंदे, पोलीस पाटील अनिकेत चव्हाण आदि उपस्थित होते

श्रीरामपूरातील ग्रामपंचायतींनी नविन पाणीपुरवठा योजना भंडारदराच्या पाण्यावर कराव्यात - मा. आ. भानुदास मुरकुटे*


*खोकर ग्रामपंयतीचा कामाचा आदर्श इतर ग्रामपंचायतींनी घ्यावा मुरकुटे*

खोकर ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची यादी बघीतली असता ही यादी मी इतर गावातील कार्यकर्त्यांना दाखवणार असुन इतर ग्रामपंचायतींनी खोकर ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा असे मुरकुटे म्हणाले.

*दानशुरांनी ग्रामपंचायती साठी केली विनामोबदला भुमीदान*

खोकर येथे नुतन ग्रामपंचायत कार्यालय इमारतीसाठी गावातील पाटिल परीवाराने स्व.दिगंबर पाटील यांच्या स्मरणार्थ २ गुंठे जागा विनामोबदला भुमीदान केली तर जलजीवन योजनेच्या पाण्याच्या टाकीसाठी गावातील माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी आपली २ गुंठे जागा ग्रामपंचायतीस विनामोबदला दान करत आदर्श उभा केला.याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने पाटील परीवार व चव्हाण परीवाराचा सन्मान करण्यात आला.

विरोधी सदस्यांची कार्यक्रमाकडे पाठ 
दरम्यान ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत या आधीच झालेला उद्घाटन सोहळा पुन्हा करत असल्याचा आरोप करत कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.तसेच कार्यक्रमस्थळी फ्लेक्स बोर्ड लावत या उदघाटन सोहळ्याचा निषेध केला. त्यावर भानुदास मुरकुटे यांनी प्रत्येक गावात असे डोक्यात उलटा खटका असलेले विरोधक असतातच असा टोमणा मारताच उपस्थितात एकच

=================================
-----------------------------------------------
 हशा झाला.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार चंद्रकांत झुरंगे - ✍️✅🇮🇳..भोकर 
-----------------------------------------------
=================================

छत्रपती शिवाजी महाराज!


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
==================================

- सातारा...
 वीरांच्या भूमीत शांती स्थापून स्वराज्य शुद्ध केले!
राजांनी माता-भगिनींचे पुत्र बंधु नात्याने रक्षण केले,
पिकांच्या देठाची काळजी घेणारे राजे जगात पहिले,
शत्रुची ही मित्रत्वाने कबर बांधताना रयतेने पाहिले!

कवि भूषणने पराक्रमी शिवाजी राजे काव्यात साकारले,
फुलेंनी इतिहासावरची धुळ झटकली तेथे राजे प्रकटले, 
करूणा सागर कनवाळू शिवाजी रयतेस कळू लागले !

भीमरायांच्या घटनेत न्यायप्रिय शिवराय राजे दिसले,
भारतीय संविधान बहुजनांच्या उत्कर्षाचे तत्व बनले,
शिवनेरीच्या लेण्यातून समतेचे शीतल वारे वाहू लागले !

जनसागरात दीपस्तंभ, स्वयंभू राजे मार्गदर्शक ठरले,
शूर शिवरायांचे वैचारिक वारस स्वराज्याला लाभले,
शिवाजी कोण होता? पानसरे यांनी पुस्तक लिहिले ! 

तरुण इथले आपला मार्ग भटकले भगिनीवर धाऊन गेले,
जहरीले किडे शिवरायांच्या भूमित वळवळ करू लागले,
आज सच्चे मावळे दुष्ट प्रवृत्तीशी न्याय विचारांनी लढले !

महाराज सत्यवादी सदैव सत्यानेच यश प्राप्त केले,
स्वकिय जरी उच्चकुलीन तरी धुर्त गद्दारांचे गळे चिरले,
राजांनी सारे इमानदार अस्पृश्य मावळे छातीशी धरले!

थोर पराक्रमी राजां बरोबर मावळे शत्रूशी थेट भिडले,
राजेंनी स्वकियांच्या अन्यायी व्यवस्थेविरुद्ध युद्ध केले ,
राज्याभिषेकाने छत्रपती शिवाजी महाराज धन्य झाले!

बुध्द,शिवाजी,फुले,शाहु,आंबेडकर विचार स्थिरावले,
स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता फुलांनी बगीचे फुलले, 
मानवतावादी विचारांचे मार्ग भारतात प्रशस्त झाले !

डॉ.प्रदीप शिंदे ✍️✅🇮🇳...
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================










Friday, August 9, 2024

विद्यमान लोकप्रतिनिधींची आवर्तन काळातील गैरहजेरीच तालुक्यातील पाटपाण्यासाठी ठरली कर्दनकाळ -हेमंत ओगले


 - श्रीरामपूर  - प्रतिनिधी - / वार्ता - 
श्रीरामपूर विधानसभेच्या विद्यमान लोकप्रतिनिधींची आवर्तन काळातील गैरहजेरी तालुक्यातील पाटपाण्यासाठी कर्दनकाळ ठरली आहे. ऐन पाटपाण्याचे आर्वतन येण्याच्या वेळी विद्यमान लोकप्रतिनिधी तालुक्याबाहेर असल्याने या विभागाच्या अधिकाऱ्यांवर यांचा वचक राहीला नाही. त्यामुळे तालुक्यात शेतीसाठी आवश्यक पाण्यासाठी मोठा संघर्ष करण्याची वेळ नागरीकांवर आली. असे परखड मत शेतकरी युवक संवाद यात्रेदरम्यान शेतकरी युवक आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना हेमंत ओगले यांनी मांडले.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष सौ. दिपाली ससाणे यांच्या उपस्थितीत शेतकरी युवक संवाद यात्रा काढण्यात आली. 
यात्रेच्या नवव्या दिवशी हेमंत ओगले यांनी सकाळच्या सत्रात श्रीरामपूर तालुक्यातील दिघी, दत्तनगर, खंडाळा येथील ग्रामस्थांसमवेत त्यांनी संवाद साधला. येथे कॉर्नर सभेत मनोगत व्यक्त करताना हेमंत ओगले म्हणाले की, तालुक्यातील शेती ही पाटपाण्यावरील शेती असुन विद्यमान लोकप्रतिनिधींनी योग्य नियोजन न केल्यामुळे मागील पाच वर्षाच्या काळात शेतीच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली याउलट स्व. जयंतराव ससाणे यांनी दिघी चारीचे पाणी टेलपर्यंत पोहचवीले होते. स्व. ससाणे हे त्यांच्या कामकाजाच्या काळात ते केवळ आमदार निधी वापरत नव्हते तर विकास कामांसाठी अनेक खासदारांचा निधी त्यांनी वापरला. तालुक्यात अनेक गावात झालेले शिरपूर पॅटर्न हे त्याचेच द्योतक आहे. प्रत्येक गावातील शेतकरी, युवक आणि ग्रामस्तांच्या समस्या जाणून घेऊन आगामी काळात करण ससाणे आणि हेमंत ओगले यांच्या तसेच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी पर्यंत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, आतापर्यंत या गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्व. जयंतराव ससाणे यांनी भरघोस निधी दिला. तालुक्यात त्यांचा एक वेगळा ऋणानुबंध होता. आपल्या आशिर्वादाची आम्हाला गरज असल्याचे ते म्हणाले
 यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब दिघे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नसल्याने कामांना अडथळा आला असून.स्व. जयंतराव ससाणे आमदार असताना आणि मि जिल्हा परिषदेवर असताना तालुक्यातील पाटपाण्याचा प्रश्न मार्गी लावता आला. त्याबरोबरच शहरातील पाण्याचा मोठा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागला. भविष्यात विकासकामांना वेग देण्यासाठी हेमंत ओगले हेच योग्य असुन श्रीरामपूर विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तसेच येथील मतदारांना हेमंत ओगले यांच्या रूपाने चांगला पर्याय मिळाला आहे. 
यावेळी स्व. जयंतराव ससाणे यांच्यावर प्रेम करणारे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




लोकसेवा विकास आघाडीचा पाटबंधारे कार्यालयावरील मोर्चा मागण्या मान्य झाल्याने स्थगित - हिम्मतराव धुमाळ


- श्रीरामपूर -  प्रतिनिधी - / वार्ता -
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील आज शुक्रवार (ता.९) रोजीचा वडाळा पाटबंधारे कार्यालयावर आयोजित शेतकऱ्यांचा मोर्चा मागण्या मान्य झाल्याने स्थगित करण्यात आल्याची माहिती अशोक कारखान्याचे व्हा. चेअरमन व लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
             याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रवरा नदीपात्रात ओव्हरफ्लोचे सोडण्यात आलेले पाणी भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील प्रवरा डावा व उजव्या कालव्यांना सोडून शेतीसाठी आवर्तन घ्यावे तसेच गावोगावच्या पिण्याच्या पाण्याचे गावतळी ओव्हरफ्लोच्या पाण्याने भरून घेण्यात यावी, या मागणीसाठी लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने वडाळा पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता यांना निवेदन देऊन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 
             वडाळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता संजय कल्हापुरे यांचेशी समक्ष झालेल्या चर्चेत त्यांनी ओव्हरफ्लोच्या पाण्याने गावतळी भरून देण्यात येतील व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीसाठी पाणी देण्यात येईल, असे मान्य केले. तसेच आवर्तन घेण्याबाबतचा विषय हा कालवा सल्लागार समितीच्या अखत्यारीत असल्याने आवर्तन घेणेबाबत कालवा सल्लागार समितीकडे शिफारस करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. निवेदनातील सर्व मागण्या मान्य झाल्याने आजचा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती श्री.धुमाळ यांनी दिली.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================





सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत अधिकाधिक मंडळांना सहभागी करुन घ्या - जिल्हाधिकारी सालिमठ


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा
सन २०२४ या वर्षात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडुन पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेमध्ये सहभागी करुन घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधण्यासाठी शासन निर्देशाप्रमाणे समितीचे गठन करण्यात यावे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना या स्पर्धेविषयी माहिती देण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Thursday, August 8, 2024

जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान 🇮🇳🇮🇳🇮🇳...


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
उत्साहवर्धकतेने व सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागातून घरोघरी तिरंगा अभियान यशस्वीरीत्या राबवा - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>

- अहमदनगर - जिमाका -/ वृत्तसेवा -
केंद्र शासनाने सन २०२२ पासून हर घर तिरंगा (घरोघऱी तिरंगा) अभियान सुरु केले असुन यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात घरोघरी तिरंगा हे अभियान ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबवुन अत्यंत उत्साहवर्धकतेने व सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाने यशस्वीरीत्या राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिले.
      जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेच मुख्य कार्यकारी अधिकारी आषिश येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार, नगरपालिकांचे सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यात घरोघरी तिरंगा अभियान संपूर्ण उत्साहात व्यापक प्रमाणात आपणा सर्वांना साजरे करायचे आहे. सर्व जिल्हा, तालुका आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनासह राबवायचे आहे. त्यासाठी ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान लोकाभिमुख करण्यासाठी यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावे. या अभियानानिमित्त तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रब्युट व तिरंगा रॅली अशा विविध उपक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात गावपातळीपासून ते जिल्हापातळीपर्यंत करावे, जेणेकरून या अभियानात सक्रिय सहभागी होण्याची प्रेरणा नागरिकांना मिळेल.
        सर्व संबंधित यंत्रणांनी ध्वजाची मागणी आणि त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात ध्वजाची उपलब्धता ठेवावी. त्याचसोबत सर्वत्र ध्वजाचा सन्मान ठेवला जाईल, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी. सर्व नागरिकांना आपल्या घरांवर, शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय या सर्वांना या अभियानात सक्रिय सहभागी होत दि. १३ ते १५ या कालावधीत तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. नागरिकांनी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजासोबतची सेल्फी घेऊन harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केले. 


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



श्रीरामपूर. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षपदी डॉ सलीम सिकंदर शेख व सचिव पदी अशोकराव दिवे सरांची निवड झाली आहे...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर.
 विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षपदी डॉ सलीम सिकंदर शेख व सचिव पदी अशोकराव दिवे सरांची निवड झाली आहे...  श्रीरामपूर :- महाराष्ट्र राज्य पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या विद्रोही

 सांस्कृतिक चळवळीच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्ष पदी
 प्रसिद्ध वैद्यकीय व झाडे लावा व झाडे जगवा पर्यावरणाचा समतोल राखा या चळवळीचे प्रणेते -पुरस्कर्ते व कोणत्याही चळवळीमधे सतत भाग घेणारं व्यक्तीमत्व समाजसेवक डॉ सलीम सिकंदर शेख व
 सचिव पदी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव दिवे सरांची

 एकमताने निवड करण्यात आली..
बैठकीच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष माननीय प्रा. डॉ.बापुसाहेब चंदनशिवे सर होते. या बैठकीत डॉ सलीम शेख यांच्या अधिपत्याखाली श्रीरामपूर तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आलीत ..
अध्यक्ष पदी :-डॉ सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा दवाखाना श्रीरामपूर ,
कार्याध्यक्षपदी :- ॲड.मिलींदकुमार गायकवाड ,
उपाध्यक्ष,:- कवी. आनंदा साळवे , प्रसिद्ध कवी रज्जाक शेख सर,
सचिवपदी:- अशोकराव दिवे सर,
सहसचिव:- विजय जगताप,
खजिनदार:- संतोष त्रिभुवन 
सह खजिनदार:- अकबरभाई शेख सर 
संघटक पदी :- अमोल सोनवणे, किरण नरवडे ..
प्रसिद्धी प्रमुख:- पत्रकार शौकतभाई शेख, राजेंद्र हिवाळे सर ,
सल्लागार:- ॲड.अण्णासाहेब मोहन व समता फौंडेशनचे ॲड.मोहसीन शौकत शेख. 
कार्यकारिणी सदस्य:- राहुरी पब्लिक स्कूल चे एम आर तांबोळी सर , हाजी फिरोज ( पापा) दस्तगीर शेख , समाजसेवक तन्वीर शेख, खालीद मोमीन,जमात ए इस्लामी चे इम्तियाज शेख , उर्दू शिक्षका शाहीन बाजी , पत्रकार इम्रान पटेल, इंजिनिअर राजू पठाण, सिराज शेख बैतुशशिफा, सलीम अली भाई ड्रायव्हर राजू मेहबूब शहा , ई.
या बैठकीला सतिश लोंढे, कुमार भिंगारदिवे , जिल्हा कार्यकारिणीचे डॉ.जालिंदर घिगे , प्रा.सुनिता गायकवाड, शाहीन बाजी, उपस्थित होते..
या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आमदार श्री लहुजी कानडे साहेब , विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे जिल्हा अध्यक्ष प्रा डॉ.बापूसाहेब चंदनशिवे सर, इक्बाल काकर सर, बामसेफ चे रमेश मकासरे, कॉंमरेड जीवन भाउ सुरुडे , प्राचार्य डॉ सौ सुनिताताई गायकवाड, डॉ.जालिंदर घिगे , कुमार भिंगारदिवे, व आरिफ बागवान साहेब व सलीमखान पठाण सर, अशा विविध स्थरातील सामाजिक व राजकीय व्यक्तींनी अभिनंदन केले.


=================================
-----------------------------------------------
  आपला स्नेहांकित 
डॉ सलीम सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...बैतुशशिफा 
अध्यक्ष विद्रोही सांस्कृतिक चळवळ 
श्रीरामपूर +९१९२७१६४००१४.
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================