राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, November 8, 2024

राजकारणाचा वापर आपणकेवळ समाजसेवेसाठी केला !म्हणून काही षडयंत्रकाऱ्यांच्या पोटात अचानक गोळा आला !!

विकासकामांच्या बळावरच आपण निवडणूकीला सामोरे आ. कानडे 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 गेल्या पाच वर्षात मतदार संघातील विकास कामांसाठी बाराशे ते तेराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दर्जेदार कामे होण्यासाठी आपण लक्ष दिले. या विकास कामांमुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला उमेदवारी दिली. या कामांच्या बळावरच आपण पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.
श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचार दौऱ्यानिमित्त आयोजित कडीत बु., कडीत खुर्द, मांडवे, फत्याबाद, कुरणपूर, उक्कलगाव व एकलहरे या गावात झालेल्या सभांमध्ये आ. कानडे बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुकाध्यक्ष देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ पाटील थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, नानासाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, अँड जयंत चौधरी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, सरपंच सागर मुठे, सरपंच गणेश कोतकर, सरपंच किशोर बकाल, आबा पवार, संदीप चोरगे, सुरेश पवार, अक्षय नाईक, किशोर कांबळे, आकाश क्षीरसागर आदीं उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले की, महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय यापूर्वी कोणत्या सरकारने घेतले नाहीत. साडेसात हॉर्स पावरची वीजबिले माफ करणे, मागची बिले शून्य करणे, प्रत्येक घरातील महिलांना लाडकी बहीण समजून महिन्याला पंधराशे रुपये देऊन योजना राबविणे, गरीब महिलांना मोफत तीन सिलेंडर देणे, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देणे, अशा अनेक योजना या सरकारने राबविल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी दिला श्रीरामपूर तालुक्याच्या दृष्टीने पालकमंत्री विखे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये शंभर वर्षांपासूनचा आकारिपडीत जमिनीचा प्रश्न त्यांनी सोडविला. गावठाण नसलेल्या सर्व गावांना शेती महामंडळाच्या जमिनी दिल्या. श्रीरामपूरसाठी २२ एकर जमीन दिली. शहरातील सर्व झोपडपट्ट्याचे नवीन इमारती बांधून पुनर्वसन होईल एवढी जागा त्यांनी दिली.
राजकारणातील बदल हे केवळ सेवेसाठी, समाजाच्या कल्याणासाठी असतात. राजकारण हे सर्व समाज गुण्यागोविंदाने एकत्र नांदेल, त्यांच्यात तेढ निर्माण होणार नाही, यासाठी असते. राजकारण आपला धंदा नाही. समाजसेवेसाठी आपण काम करीत आहोत. ज्यांनी मला धोका दिला, दगाफटका केला, त्यांचे मी आभार मानतो. कारण त्यामुळेच मी विकासाची परंपरा असणाऱ्या आणि विकास प्रशासनात मी ज्यांच्यासोबत काम केले त्या मंडळींमध्ये मी पुन्हा एकदा आलो आहे. ज्यांनी कट कारस्थान केले, त्यांच्याशी माझा काय वाद होता, बांधाला बांध होता का, त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. माझ्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला त्रास दिला, अन्याय केला, असे तुम्हाला वाटत असेल तर 20 तारखेला मला न्याय देण्याची भूमिका तुम्हाला घ्यायची आहे, असे आवाहन आ. कानडे यांनी केले. 
अविनाश आदिक म्हणाले, आ. कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यात विकासाची कामे केली. स्व. गोविंदराव आदिक यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम ते करत आहेत. मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून विकास कामे झाली आहेत. श्रीरामपूर बेलापूर रस्ता, बाबळेश्वर नेवासा रस्ता, याशिवाय ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची कामे झाली आहेत. काम करणारा आमदार असल्याने पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे. या संधीचे मतदानाच्या माध्यमातून सोने करावे. 
यावेळी साहेबराव होन, रंगनाथ तमनर, काशिनाथ वडीतके, रामदास वडीतके, लक्ष्मण मेंनगर, शिवाजी होन, ऍड. बनसोडे, रावसाहेब वडीतके, सतीश कानडे, ज्ञानेश्वर वडीतके, बाळकृष्ण वडितके, जालिंदर हिरवळ, भागवत बनसोडे, आबासाहेब वडीतके, संपत चितळकर, शंकर चितळकर, मुक्ताजी पटांगरे, अण्णासाहेब देठे, बाळासाहेब जांभुळकर, राधाकृष्ण तांबे, अण्णासाहेब ढोणे, अण्णासाहेब वडीतके, प्रा. एकनाथ ढोणे, तुकाराम चिंधे, सुभाष हळनोर, संग्राम आठरे, दगडू पावले, बाबासाहेब आठरे, रमेश बेलकर, शिवाजी आठरे, भाऊसाहेब शिंदे, कबीर पटेल, हसन पटेल, चांद पटेल, रामदास देठे, सखाहरी देठे, शामराव चिंधे, लक्ष्मण चींधें, मच्छिंद्र पारखे, प्रमोद लोंढे, राजेंद्र चींधे, हनुमान चींधे, अण्णासाहेब शिंदे, संजय कुदनर, जिजाबा वडीतके, सरपंच शिवाजी चींधे, उपसरपंच दत्तू माळी, सोहम चींधे, वसंत थोरात, दिलीप थोरात, प्रकाश जगधने, कारभारी सोन्याबापू थोरात, बबन निवृत्ती थोरात, विनोद थोरात, अन्सार शेख, लाल मोहम्मद जहागीरदार, ताज मोहम्मद शेख, सुदाम बर्डे, सुनील पवार, बाळासाहेब खैरे, अनिस शेख, विलास ठोंबरे, संजय अग्रवाल, मन्सूर जहागीरदार आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️🇮🇳✅...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐🇮🇳✅...
समता मिडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

राजकारणातुन सत्ता सत्तेतुन संपत्ती निर्णायक मुस्लिम मतदार...


महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुक समीकरण बदलत आहेत सुरवात झाली असुन आरोप प्रत्यारोप होतील होताहेत पण यात सामान्य जनता कोरोना महामारी काळानंतर समस्यांना समोर जात आहे अशातच मुस्लिम लोकसंख्या व मुस्लिम मतदार यावर महाराष्ट्र राज्यातील निवडणूकीत निकाल ब-यापैकी अवलंबून आहे कारण महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक विभागात बरेचसे पक्षाने एका विरुद्ध एक उमेदवार दिलेले आहेत तेव्हा उमेदवार यांची दमछाक होत आहे मुस्लिम उमेदवारांना इतर समाजाचे मत मिळत नाहीत पण मुस्लिम समाज ज्यांना ठरवतो तो विजयी ठरतो कारण मुस्लिम राजकीय दबाव गट नसल्याने किंवा नेतृत्वाची दशा आणी दिशा पाहता दगड नको विट बरी म्हणून आपल्या भागातील उमेदवार निवडून आला पाहिजे हि निती अवलंबत आहे तसे पाहता  
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणुका आहेत. काळ वेगाने निघून जात आहे. कधी आकाशगंगेवर पाय ठेवून. कधी पर्वत ओलांडत.
कधी ब्रह्मांड ओलांडत. झारखंडमधील परिस्थिती महाराष्ट्राइतकी गुंतागुंतीची नाही. महाराष्ट्रातील अनेक लोकांना लक्षात येत नाहीये की, मतदान कोणाच्या बाजूने करावयाचे कारण कौन गद्दार व कौन खुद्दार हे कळणे कठीण आहे महायुती- महाविकास आघाडी अशी महाराष्ट्र राज्यात लढत होत आहे तिसरी व चौथी आघाडी मतदार वर प्रभाव पाडू शकली नाही अखेर जागा वाटत व बंडोबा ला थंड करण्यातच भाजपा, शिवसेना , राष्ट्रवादी, मनसे, तर कांग्रेस पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे अशी लढत होत आहे निवडणूकीच्या निकालानंतर कौन कौना सोबत सत्तेत राहील हे आज तरी सांगणे कठिन आहे कारण राजकारण व सत्ता दोन्ही जमेच्या बाजू असल्याने सत्ताधारी सत्ता टिकवण्यासाठी तर विरोधक सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करताहेत  
मतदार को ढूंढते रह जाओगे, अशा शैलीत, कुठे जावे, कोणाला स्वीकारावे, हे उमेदवार यांना आज तरी समजेनासे झाले आहे 
अखेर मराठा आरक्षणसाठी मराठा योद्धा जरांगे पाटिल यांनी लोकसभा निवडणुकीत आपली मूक उपस्थिती नोंदवणाऱ्या जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा गनिमी कावा धोरण अवलंबले आहे. मराठा आंदोलनातून उदय झालेल्या जरांगे यांनी याआधी स्वतःचे उमेदवार उभे करून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. मराठा ,मुस्लिम, दलीत ,यांना घेऊन मौलाना सज्जाद नोमानी , आनंदराज आंबेडकर सोबत घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगीतले व मौलाना सज्जाद नोमानी , आनंदराज आंबेडकर यांनी यादी न दिल्याने मागे फिरले. आता ते म्हणत आहेत - लढणार नाही, हरवणार आहे. मराठा प्राबल्य असलेल्या जागांवर ते कोणाचे नुकसान करणार आहेत, याचे संकेत स्पष्ट आहेत ! लोकसभा निवडणुकीत त्यांनी थेट भाजपला धक्का दिला होता. या वेळी त्यांचा धक्का कोणाला असेल आणि किती दमदार असेल, हे सांगता येत नाही. तथापि, तेव्हापासून आतापर्यंत मराठवाड्याच्या गोदावरी व सिंदफनातून बरेच पाणी वाहून गेले भाजपने जरांगेंवरील उपाय शोधला आहे. 'लाडकी बहीण'च्या रूपात.
महाराष्ट्रात लाडकी बहीण, झारखंडमध्ये झामुमोच्या मैयाच्या मुकाबल्यात दीदी. मात्र, अर्ज माघारीची तारीख उलटून गेली असून निवडणूक जिंकवण्यासाठी व हरवण्यासाठी जरांगे व्यतिरिक्त अनेक रिंगणात उतरले आहेत.निवडणुकीच्या भाषेत त्यांना बंडखोर म्हणतात. हे बंडखोर निवडणुका जिंकवतात आणि हरवतातही. ते उभेही राहतात आणि उभे केलेही जातात. मतांचे विभाजन
करणे किंवा ती कापणे हे त्यांचे मुख्य काम असते. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी नेतेमंडळी ओरडत आहेत. बंडखोर शड्डू ठोकत आहेत. जशी लोहाराच्या भट्टीत आग पेटते! जसा कुंभारांचा आवा पेटू लागतो ! घोषणा जोरात गर्जू लागल्या आहेत. ढोल-ताशांच्या तालावर घोषणा दिल्या जात आहेत.
मतदाता संभ्रमात आहे कुठे जावे, कोणाला स्वीकारावे ?
कोणता उमेदवार पक्ष कोणता यावर विश्वास बसेना कारण स्वातंत्र्या नंतर प्रथमच अशा निवडणूका होताहेत राज्यातील जनतेला समजत नाहीये. 
कारण बंडोबांचा लढा थांबणार नाही. ज्यांच्या शब्दांच्या खंजिराला धारदार धार असायची ते मतदारांसमोर लोटांगण घालू लागले आहेत. रबराच्या झाडांवर सूळ टांगले आहेत. कोणीही कोणापेक्षा कमी नाही. कोणाला कोणाची भीती नाही.
प्रत्येकाला सत्ता हवी आहे. सर्वांना खुर्ची हवी आहे. ती कोणाला मिळणार आणि कोणाला नाही, हे सामान्य माणसाला ठरवायचे आहे. मतदारांनी ठरवायचे आहे. मात्र, मतदार गप्प आहेत. नेहमीच. स्वतःच्या उशाशी बसून स्वतःला गाढ झोपलेले पाहणे ही त्याची सवय आहे. तो काहीच बोलत नाही. जणू त्याचं तोंड म्हणजे बंद तळघर आहे!
सोनेरी दिवस खुंटीला टांगून हँगरला लटकवलेली रात्र पांघरण्याची त्याला आवड आहे. तो स्वतःच्या हातांनी आपल्या नशिबात अंधार लिहितो. त्याला तोंड उघडू शकतो की नाही, काही बोलू शकतो का, हे निवडणूक निकालाच्या दिवशी कळेल, बोलण्यावरून आठवले निवडणूक निकालापूर्वी सांगितले जाणारे म्हणजे एक्झिट पोल, त्यांच्या विश्वासार्हतेला आग लागली आहे. आता तर सामान्य माणूसही या एक्झिट पोलला कानठळ्या बसवणारा भोंगा मानू लागला आहे. लोकसभा निवडणुकीत ते तोंडावर आपटले होते पण यात मात्र मुस्लिम मतदार यांचा सन्मान तर नाही उलट निवडणूकीत जवळ करायाचे व निवडणूक संपली की बोला कौन असा उलट सवाल करायचा या पलीकडे काहीच नाही कारण मुख्य प्रवाहात येऊच द्यायचे नाही उलट आरोपीच्या पिंज-यात उभे करायचं व मुस्लिमांना व त्यांच्या पाल्यांना नागरी समस्या पासुन अलीप्त ठेवण्याचे पाप राजकीय पक्ष व नेते करताहेत कारण राजकारणात मुस्लिम आपसातील मतभेद हे जगजाहीर करतात कारण आज मुस्लिम शिक्षणासह राजकारणात मागे असल्याने समस्या आहेत जर लोकप्रतिनिधी म्हणून जर मुस्लिम नेतृत्व विधानसभेत प्रश्न मांडले तर त्या ठिकाणी तो समाजावरील 
अन्यायाचा आवा़ज बनू शकतो किमान तो शिक्षीत असावा उठोबा ,बसोबा, नसावा असो 
 आज विधानसभा निवडणूकीत राजकीय पक्षाचे उमेदवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले शपथपत्र हि सादर केले शपथपत्रातील संपत्ती मध्ये वाढ झाली घटली नाही मात्र सामान्य मतदार आपली तुटपुंज्य उपजिवीका भागवुन जिवन जगत आहे लोकसभेला मुस्लिम समाजाने भाजप युतीला नाकारल्याने नकारात्मक उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आ. रामदास कदमांनी मुस्लिम समाजाला "लुंगी उठाव पुंगी बजाव" चा नारा देऊन चेतावनी दिली . केद्रं शासनाने वक्फ बोर्डाच्या विरोधात कायदा आणला ,मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरूद्ध रामगीरी महाराजने केलेली अपमानास्पद टीका ,टिपण्णी त्यावर गुन्हे दाखल होत असताना मुख्यमंत्री शिंदेंनी रामगीरीच्या समर्थनार्थ केलेले विधान, आ.नितेश राणेंनी मज्जिद मध्ये घुसून मारण्याची दिलेली धमकी तसेच केलेली शिवीगाळ व त्यावर गुन्हे दाखल होत असताना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली पाठराखण. अद्याप रामगिरी व नितेश राणेंवर कारवाई नाही. बिल्कीस बानु बलात्कार प्रकरणातील आरोपींचा सत्कार. मोबलिंचींग मध्ये मारले गेलेले निरपराध मुस्लिम तरुण. गजापूर गावाचं विशालगडाशी काही संबंध नसताना मुस्लिम मोहल्ल्यातील नागरिकांना महीलांना मारहाण, मशिदीची तोडफोड, मालमत्तेची जाळपोळ. हे सगळं भाजप युतीच्या सरकार मध्ये झाले आहे. विधानसभा निवडणुक तोंडावर येवून ठेपली आहे. आता ही लोकं मुस्लिम समाजाला पैशाचे आमिष दाखवतील. व महिलांसाठी बुरखे वाटलेत व परत वाटतील ही तेव्हा येणा-या परिस्थितिला समोरे जातांना शहराचे नामकरण व होत असलेली अहवेलना व अपमानजनक वक्तव्य होत असलेली दिशा भूल याचा विचार करणे गरजेचे आहे कोणी दगडा पैक्षा विट मऊ हे धोरण स्विकारने गरजेचे आहे एकढे मात्र नक्की राजकारणातुन सत्ता सत्तेतुन संपत्ती हि निर्णायक मुस्लिम मतदार वर वाढत आहे पाहुया येणा-या काळात कळेलच. ...

=================================
-----------------------------------------------

डॉ, सलीम सिकंदर शेख 💐✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================

Thursday, November 7, 2024

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘कौमी एकता सप्ताहात’ व्याख्यानमाला व विविध स्पर्धांचे आयोजन


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी व मराठा सेवा संघाच्यावतीने स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहाचे दि. ९ ते १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान व मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ यांनी दिली.
या सप्ताहाचा शुभारंभ शनिवार दि.९ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता डॉ. अल्लामा इकबाल यांच्या जयंती राष्ट्रीय उर्दु दिनी अलकलम अकॅडमी लखनौ च्या संयुक्त विद्यमाने महफिले मुशायरा ने होणार आहे. 
सोमवार ११ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता अहमदनगर च्या भुईकोट किल्यात नेताकक्ष मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत स्वतंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना अभिवादन केले जाणार आहे. मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मुकुंदनगर येथील मौलाना आझाद हायस्कुल मध्ये प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांचे पहिले व्याख्यान होईल. तर दुसरे पुष्प प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर हे बुधवार १३ नोव्हेंबर रोजी आलमगीर येथील मातोश्री उर्दू हायस्कूल येथे सकाळी दहा वाजता गुंफतील. शेवटचे व्याख्यान गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता माणिक चौक येथील चॉद सुलताना हायस्कूल येथे प्रा.डॉ.महेबुब सय्यद यांच्या व्याख्यानाने होणार आहे. 
तसेच या सप्ताहा मध्ये चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा व वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून,या सर्व स्पर्धा शहरातील विविध शाळेत घेण्यात येणार आहेत. या स्पर्धा ४ थी ते ६ वी, ७ वी ते ९ वी व १० वी ते १२ वी या तीन गटात होणार आहे.
या व्यतिरिक्त अलकरम हॉस्पिटल तर्फे विविध आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती मख़दुम सोसायटीच्या सचिव डॉ कमर सुरुर यांनी दिली. 
तरी या सप्ताहातील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी व व्याख्यानमालेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील व सचिव निसार बागवान यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Wednesday, November 6, 2024

आमदार लहू कानडे यांच्याप्रचार कार्यालयाचे उद्घाटन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) व महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. लहू कानडे यांचे,येथील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ते अविनाश आदिक,आमदार लहू कानडे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अरुण पाटील नाईक व डॉ. सुरेश ग्यानचंदानी यांच्या हस्ते करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील निर्मल कॉम्प्लेक्स येथे आ. कानडे यांच्या प्रचार कार्यालयाचा आज शुभारंभ करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मुख्तार शहा, कुरेशी समाजाचे नेते मेहबूब कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, मल्लू शिंदे, तालुका युवक अध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, शहराध्यक्ष माजी नगरसेविका अर्चना पानसरे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण तसेच वळदगांवचे सरपंच अशोक भोसले, मूठेवडगावचे सरपंच सागर मुठे, ॲड. मधुकर भोसले, ॲड. जयंत चौधरी, जयकर मगर, दीपक कदम, सागर कुऱ्हाडे, गोपाल वायनदेशकर, गुरुचरणसिंग भाटियानी, योगेश जाधव, विलास ठोंबरे, अनिरुद्ध भिंगारवाला, नयन गांधी, सुमित मुथा, दीपक निंबाळकर, प्रशांत खंडागळे, सोहेल शेख, अक्षय नाईक, सल्लाउद्दीन शेख, निरंजन भोसले, राजू साळवे, विलास ठोंबरे, राहुरी विभागाचे राजेंद्र लोंढे, अनिकेत आसने, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी अरुण पाटील नाईक यांची नियुक्ती


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता `
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी अरुण पाटील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ही नियुक्ती केली आहे.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा प्रवक्ते अविनाश आदिक यांच्या हस्ते तसेच आमदार लहू कानडे व माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत अरुण पाटील नाईक यांना 
 नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक मुख्तार शहा, कुरेशी समाजाचे नेते मेहबूब कुरेशी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, मल्लू शिंदे, तालुका युवक अध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, महिला तालुकाध्यक्षा मंदाताई गवारे, शहराध्यक्षा माजी नगरसेविका अर्चना पानसरे, युवती जिल्हाध्यक्षा प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण तसेच वळदगांवचे सरपंच अशोक भोसले, मूठेवडगांवचे सरपंच सागर मुठे, अँड. मधुकर भोसले, अँड. जयंत चौधरी, जयकर मगर, दीपक कदम, सागर कुऱ्हाडे, गोपाल वायनदेशकर, गुरुचरणसिंग भाटियानी, योगेश जाधव, विलास ठोंबरे, अनिरुद्ध भिंगारवाला, नयन गांधी, सुमित मुथा, दीपक निंबाळकर, प्रशांत खंडागळे, सोहेल शेख, अक्षय नाईक, सल्लाउद्दीन शेख, निरंजन भोसले, राजू साळवे, विलास ठोंबरे, राहुरी विभागाचे राजेंद्र लोंढे, अनिकेत आसने, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूरात कॅांग्रेस पक्षाला मोठे खिंडारकॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

श्रीरामपूरात कॅांग्रेस पक्षाला मोठे खिंडार
कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
आमदार लहू कानडे यांची कामाची शैली व विकासाभिमुख राजकारणाला प्रभावित होऊन, श्रीरामपूरातील अनेक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर श्रीरामपूर कॉंग्रेस ला मोठे खिंडार पडले आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, महंमद शेख, सलीम शेख यांच्यासह, अशोक बँकेचे मा.संचालक महाराज कंत्रोड, जय मातादी पतसंस्थाचे संचालक अनिल (बंटी) गुप्ता, कमालपूर गुरुद्वाराचे ट्रस्टी भगवंतसिंग बत्रा, प्रशांत अलग, सचिन गुलाटी, नीरज त्रिपाठी, गणेश वर्मा, राकेश सहानी, बंटी थापर, चेतन जग्गी, प्रदीप गुप्ता नामदेव अस्वर,नासिर शेख, गणेश गायकवाड, मदन कणघरे, सुनील परदेशी, रोहित गुलदगड, प्रशांत यादव, अशोक गायकवाड आदिंसह असंख्य कार्यकर्ते आणी प्रमुख पदाधिकारी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्या उपस्थित आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे.
याप्रसंगी अंकुश कानडे, अमृत धुमाळ पाटील,जयंत चौधरी आदि उपस्थित होते. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
 पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस,
 श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयासाठी पाठपुरावा करणार - आ. कानडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व श्रीरामपूर 
विधानसभेच्या घोषणापत्राचे प्रकाशन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. या जिल्ह्याचे विभाजन व्हावे, यासाठी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणारा मी पहिला आमदार आहे. श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे मुख्यालय असावे, यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच श्रीरामपूर विधानसभेच्या घोषणापत्राचे प्रकाशन ऑडिओ- व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आले. याचवेळी काँग्रेस भवन येथे श्रीरामपूर विधानसभा घोषणा पत्राचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत आ. कानडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, आदिवासी भिल्ल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, सरपंच सागर मुठे, विश्वनाथ आवटी, मल्लू शिंदे, पी. एस. निकम, उत्तमराव पवार, भागचंद औताडे, महिला तालुकाध्यक्ष मंदा गवारे, प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे हे आपले स्वप्न आहे. भौगोलिक दृष्ट्या जिल्हा विस्तीर्ण असल्याने विभाजन अटळ आहे. त्यामुळे विधिमंडळात श्रीरामपूर जिल्हा व्हावा, अशी मागणी करणारा मी पहिला आमदार आहे. याशिवाय शहरात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे व्हावेत, अशी आपली मागणी आहे. प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने त्याचा उपयोग मतदार संघातील विकास कामे करण्यासाठी केला. यापूर्वी केवळ उद्घाटन होत होती. परंतु आपण कार्यारंभ आदेश आल्याशिवाय तसेच विकास कामांचे फलक लावल्याशिवाय उद्घाटने केली नाही. स्व. आदिकांनी तालुक्याला विकासाचे पर्व सुरू करण्याचा वारसा दिला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मतदार संघातील मायबाप जनतेने माझ्यासारख्या गरिबाच्या मुलाला विधानसभेत पाठविले. त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता मतदार संघात बाराशे ते तेराशे कोटी रुपयांची विकास कामे केली. या कामांमध्ये पारदर्शकता हवी हे धोरण ठेवले. विकास कामांमुळे सर्व सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर होतो. परंतु काहींनी कटकारस्थान करून आपली उमेदवारी कापली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली. पुढील काळात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे ध्येय घेऊन वाटचाल करणार असल्याचे आ. कानडे यावेळी म्हणाले.
           यावेळी अविनाश आदीक म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा राज्यात एकाच वेळी प्रसिद्ध केला. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून जाहीरनाम्यातील सर्व कामे पूर्ण होतील. आ. कानडे यांच्या रूपाने चांगला आमदार मिळणार आहे. त्यांना पुन्हा संधी दिली जाणे हे आपले भाग्य राहील. त्यामुळे निवडणुकीत त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अशोक कारखान्याचे माजी संचालक प्रा. कार्लस साठे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, वळदगांवचे सरपंच अशोक भोसले, सचिन जगताप, राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे, विजय शेलार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रईस जागीरदार, शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव फारुख पटेल, हंसराज आदिक, सुनील थोरात, आदित्य अदिक, बाळासाहेब उंडे, संदीप चोरगे, श्रीकांत दळे, अविनाश नागरे, सुधाकर बोंबले, राहुल बोंबले, अक्षय नाईक, बाबासाहेब कोळसे, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, आबा पवार, मदन हाडके, रमेश आव्हाड, अमोल आदीक, ज्ञानदेव आदीक, दीपक कदम, अजिंक्य उंडे, इमरान शेख, भैय्या शहा, सागर कुऱ्हाडे, बाबासाहेब ढोकचौळे, अण्णासाहेब गवारे, सुदाम पटारे, प्रताप पटारे रवींद्र मुरकुटे, रवी अण्णा गायकवाड, सचिन ब्राह्मणे, संदीप दांगट, तुकाराम चीधें, राधाकृष्ण तांबे, डॉ. सर्जेराव सोळुंके, अनिल बिडे, नानासाहेब बडाख, विष्णुपंत बडाख, विजय दवंगे, जमीर पिंजारी, कदीर पटेल, हरिश्चंद्र साळुंके, रवी राजुळे, सचिन कोळसे, प्रकाश चौधरी, दत्तात्रय जाधव, जुगल गोसावी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================