राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, July 7, 2025

शासनाने तात्काळ अनुदानटप्पा मंजूर करावा - मागणी


अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेची अनुदान करिता मागणी

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अंशतः अनुदान शाळा टप्पा वाढीसाठी पुरवणी माँगनी मध्ये आर्थिक तरतूद न झाल्याने ८ व ९ जुलै रोजी राज्यातील अंशतः अनुदानित माध्यमिक शाळा बंद ठेवुन निषेधार्थ व आजाद मैदान मुंबई येथे आंदोलनात सहभागी होण्याकरिता पंचायत समिती च्या गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षक समन्वय संघ व अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. पावसाळी अधिवेशनात निधी साठी आर्थिक तरतूद करण्यात येईल असे शब्द देण्यात आले होते तरी शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार आर्थिक तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. त्रिभुवन व केंद्रप्रमुख श्री. पिलगर यांनी निवेदन स्विकारले. या वेळी शिक्षक समन्वय समिती चे श्री. मुनतोड़े, श्री. काळे, श्री. पवार, श्री. त्रिभुवन, श्री. रूपटक्के व अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष इकबाल काकर, सचिव आरिफ शेख , उपाध्यक्ष इब्राहिम बागबान, उपाध्यक्ष साबीर शाह व अजीज शेख आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Sunday, July 6, 2025

आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना नाही, पण देवेंद्र फडणवीसांना जमलं' राज ठाकरे...


- मुंबई - प्रतिनिधी -/ वार्ता - 
राज्य सरकारने हिंदी सक्ती भाषेचा जीआर
मागे घेतल्यावर वरळी डोम येथील विजयी सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेलं आहे. या भाषणामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गळाभेट घेतली. त्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदा भाषण सुरू केलं. ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ज्याच्यातून या गोष्टी सुरू झाल्या. कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्रा मोठा आहे. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसांना जमलं. आता संध्याकाळी सर्व सुरू होईल आता, बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं, कोणी बोलतायेत का ? आपल्याकडे मूळ विषय सोडून बाकी विषयात रस असतो. खरं तर आजचा हा मेळावा, कोणताही झेंडा नाही. मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे महाराष्ट्राकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहायचं नाही. खरंतर हा प्रश्नाच अनाठायी होता. हिंदीचं कुठून आलं समजलं नाही, कशासाठी, कोणासाठी हिंदी?, लहान मुलांवर जबरदस्ती करता आहात तुम्ही, कोणाला विचारायचं नाही काही, आमच्याकडे सत्ता आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल विधानभवनात आमच्या हातात सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली दादा भुसे आले म्हणाले. आम्ही काय
बोलतोय ते एकून घ्या त्यांना एक सांगितलं, दादा ऐकून घेईन पण ऐकणार नाही,असं राज ठाकरे म्हणाले.

सन्माननीय उद्धव ठाकरे, म्हणाले जमलेल्या माझी मराठी बंधू भगिणी आणि मातांनो, खरं तर आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणून सर्व बाजूने कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभं राहिलं असतं. पण मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली. आजचा मेळावा शिवतीर्थावर व्हायला पाहिजे होता, पाऊस आहे त्यामुळे मुंबईत जागा मिळत नाहीत.

त्यामुळे इथे यावं लागलं, बाहेर जे उभे आहेत त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================








श्रीगोंद्यात मोहरम उत्सव साजरा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 मोहरम पर्वात ताजिया स्थापनेची परंपरा आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे गुरू सुफी संत शेख महंमद बाबा दर्गाह येथे पारंपारीक रुढी परंपरेने चालत आलेल्या ताजिया स्थापनेची परंपरा शेख महंमद बाबा यांच्या वंशजांनी जतन करत कायम ठेवत सालाबाद प्रमाणे चालु वर्षी दि. २७ जुन २०२५ रोजी शेख महंमद बाबा दर्गाह मध्ये पारंपारिक पद्धती नुसार ताबुत (ताजीया) ची स्थापना करण्यात आली होती.
तसेच श्रीगोदा शहरात जावेद 
फकीर, राजु मनियार, बाळासाहेब गोरे, बादशहा मालजप्ते, महंमद शेख, डॉ. बन्सीभाई मनियार आदिंसह श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी ताजिया व सवारी, पंजाची स्थापना करण्यात आली होती.
            शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष, वंशज, दैनिक सिटीझन चे संपादक अमीनभाई शेख, बंडूभाई शेख, अली शेख, अजीज शेख, राजू शेख, चांद शेख, फारूख शेख, सोहेल शेख, तौसीब शेख, रेहान शेख, शाहरुख शेख, शाहिद शेख,फरहान शेख यांच्या हस्ते सायंकाळी विधीवत धार्मिक पूजा करून.६ जुलै रोजी भाविक भक्तांच्या उपस्थितीत शहरातून वाद्य वाजवत मिरवणुकीने शहरातील पंचायत समिती वसाहतीतील विहिरीत ताबुताचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी पो.नि.किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
        मंगळवार दि.०८ जुलै रोजी (तिजायत) दिवशी शेख महंमद बाबा दरबारात खिचाड्याचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा भावीक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार राजूभाई शेख - श्रीगोंदा 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

चि.फजल पठाण च्या थैलेसीमिया ऑपरेशनसाठी मदतीचे अवाहन



आपला एक एक रुपया या बालकाच्या भावी आयुष्यासाठी मोठ्या मोलाचा ठरेल

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
छ.संभाजीनगर (औरंगाबाद) 
येथील गारखेडा परिसरातील चि.फजल फेरोज खान पठाण हा १२ वर्षीय बालक (चार महिन्याचा असताना) गेल्या साडे आकरा वर्षांपासून थैलेसीमिया आजाराने ग्रस्त आहे, दर पंधरा,वीस दिवसांनी त्यास बाहेरुन रक्त द्यावे लागत आहे.
मात्र आता डॉक्टरांनी त्याच्या ऑपरेशनसाठी जवळपास चाळीस लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. सदरील कुटुंब हे अत्यंत गरीब असून त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम येणे शक्य नाही, करीता सामाजातील दानशुरांनी यासोबतच ज्यांना शक्य आहे अशा मान्यवरांनी सोबत दिलेल्या क्युआरकोड स्कॅनरवर अथवा रुग्णाच्या खात्यावर यथाशक्ती जी काही मदत करता येईल ती जरुर करावी, आपला एक एक रुपया या बालकाच्या आयुष्यासाठी मोठ्या मोलाचा ठरु शकेल अशी विनंती या बालकाच्या पालकांनी केली आहे.
तथा अधिक संपर्कासाठी बालकाचे पालक फेरोज खान जावेद खान पठाण यांनी आपला भ्रमणध्वनी क्रमांक 9284064278 देखील दिलेला आहे,
करीता यथाशक्ती जे काही शक्य आहे ती आवश्यक मदत करावी अशी नम्रतेची विनंती आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, July 5, 2025

शहिद अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम सोसायटी तर्फे मोफत वहया वाटप


÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
शहिद अब्दुल हमीद यांचं बलिदान आपल्याला कर्तव्यात प्रामाणिक आणि देशासाठी सकारात्मक योगदान देण्याची प्रेरणा देते - हाजी आलम खान 
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शहीद अब्दुल हमीद यांचं जीवन आपल्याला शिकवते की, देशप्रेम ही फक्त भावना नाही ती कृती आहे.आज आपण जरी शस्त्र हातात घेत नाही, पण आपलं शस्त्र म्हणजे शिक्षण, प्रामाणिकपणा, आणि कर्तव्यभावना आहे. अब्दुल हमीद यांचं बलिदान हेच आपल्याला प्रेरणा देतं की आपणही आपल्या कर्तव्यात प्रामाणिक राहावं आणि देशासाठी काहीतरी सकारात्मक योगदान द्यावं. शहीद अब्दुल हमीद यांना त्यांच्या शौर्याबद्दल भारताच्या सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. हे भारतातील सर्वात प्रतिष्ठेचे वीरता पदक आहे. हे पदक मिळवणारे ते पहिले मुस्लिम जवान होते.त्यांचे नाव आजही भारतीय लष्करात, आणि प्रत्येक देशभक्ताच्या मनात,अत्यंत सन्मानाने घेतले जाते असे प्रतिपादन शफी हज उमरा टुर्सचे संस्थापक हाजी आलम खान यांनी केले. 
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी व रहमत सुलतान फाउंडेशनच्यावतीने स्वतंत्रता सेनानी शहीद अब्दुल हमीद यांच्या जयंतीनिमित्त नगर शहरातील जिल्हा परिषद शाळा फकीरवाडा येथे मोफत वहया वाटप मरहुमा हज्जन शमीम सैफअली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबीयांच्या सहकार्याने करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शफी हज उमरा टुर्स चे संस्थापक हाजी आलम खान, मुस्कान वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शफकत सय्यद, अलनुर आय केयर सेंटर चे तनवीर चष्मावाला, मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, शेख दिलशाद मुसा, पठाण सुमय्या मोहसीन, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी बुशरा बाजी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आलम खान म्हणाले की वह्यावाटप केवळ शिक्षणसाहित्याचे वाटप नाही तर हा एक संदेश आहे. शिक्षण, समता आणि सामाजिक जबाबदारीचा, या लहानशा कृतीतून आपण आपल्या पुढच्या पिढीला शिकण्याची प्रेरणा देत आहोत. शिकणे हीच खरी शक्ती आहे, तुम्ही शिकाल, घडाल आणि समाजाचे उज्वल भविष्य घडवाल अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार तनवीर चष्मावाला यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

आषाढी एकादशी निमित्त क.जे. सोमैयाची वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न


  - श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
 येथील हिंद सेवा मंडळाच्या क.जे. सोमैया हायस्कूलची बाल वारक-यांची दिंडी मोठ्या भक्तीमय वातावरण संपन्न झाली . हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, विद्यालयाचे चेअरमन रणजित श्रीगोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल, जेष्ठ मार्गदर्शक संजय छल्लारे, सहसचिव अशोक उपाध्ये, शालेय समिती सदस्य प्रकाश कुलथे, किशोर फुणगे, सुर्यकांत कर्नावट, अरुण धर्माधिकारी, मुख्याध्यापक भूषण गोपाळे, पर्यवेक्षक कल्याण लकडे आदि मान्यवरांच्या हस्ते वृक्षदिंडी, ग्रंथ दिंडी पालखीचे पुजन करण्यात आले . प्रमुख मान्यवरांच्या समवेत विद्यालयातुन दिंडी शहारात प्रस्थान झाली . दिंडीचे श्रीराम मंदिर चौक, आझाद मैदान या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न झाला . दिंडीचे दैनिक सार्वमतचे उपसंपादक अशोक गाडेकर, नविन मराठी शाळेचे चेअरमन ऋषिकेश जोशी, बालवाडी विभागाचे चेअरमन सुशील गांधी, विजय सेवक,वैशाली जोशी, प्रशासनाधिकारी बी . एस . कांबळे आदि नागरिकांनी स्वागत पालखीचे पुजन केले . श्री विठ्ठल रक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, विविध संत व वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. पर्यावरण रक्षण व वाचनाचे महत्व याविषयीचा संदेश विविध घोषणांच्या द्वारे विद्यार्थ्यांनी दिला. विद्यार्थी व पालकांचा दिंडीत मोठा सहभाग व उत्साह होता . दिंडीची सांगता विद्यालयात आरती होऊन झाली . त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले . दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख उर्मिला कसार, स्मिता पुजारी, शरयु यरगटीकर, सुरेंद्र पाटील, बाबा वाघ, संकेत गंधे, रमेश धोंडलकर,विनायक चितळकर, राजेंद्र क्षीरसागर यांसह सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आदी प्रयत्नशील होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
अशोकराव खैरे (सर) श्रीरामपूर ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

काचोळे विद्यालयाने काढली गुणवत्तेची दिंडीसजवलेल्या रथात गुणवंतांची मिरवणूक


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे डी. डी. काचोळे माध्यमिक विद्यालय श्रीरामपूर येथे आषाढी एकादशी निमित्त शिक्षणाची गुणवत्ता दिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आषाढी एकादशी निमित्त विद्यालयाने झांज पथक, ढोल पथक यांच्या गजरात स्पर्धा परीक्षांमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढली.
रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप साठे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक सूर्यकांत सराटे आदि या प्रसंगी उपस्थितीत होते.
           या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी झाडाचे व ग्रंथांचे महत्त्व ओळखून त्यांना पालखीत पांडुरंगाबरोबर स्थान देत वृक्षदिंडी व ग्रंथदिंडी काढली. विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा, वारकऱ्यांच्या वेशभूषा, करून वारीमध्ये सहभाग नोंदवला.
         विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना मीनाताई जगधने म्हणाल्या की काचोळे विद्यालयाने श्रीरामपूर शहरामध्ये आगळा वेगळा उपक्रम राबवला असून आषाढी एकादशी निमित्त गुणवंतांचा गुण गौरव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहील. गुणवत्ता शिस्त व संस्कार ही काचोळे विद्यालयाची ओळख आहे. याच बरोबर विद्यालय महाराष्ट्राची लोकधारा, संस्कृती व परंपरा जोपासत आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या संत लोकांची वेशभूषा, वारकऱ्यांची वेशभूषा, विठ्ठल रखुमाई बघून पांडुरंगाच्या वारीमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांनाच मिळाला.ही रॅली शहराच्या मोरगे वस्ती परिसरात काढण्यात आली.
         या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सुमारे सोळाशे विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यालयाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत विद्यालयाची शिस्त व संस्कार याचे कौतुक केले. पोलीस विभागाने मोलाचे सहकार्य केल्यामुळे वारी यशस्वी संपन्न झाली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
सुनिल साळवे(सर) श्रीरामपूर ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================