राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, September 18, 2025

आजी - माजी सैनिकांच्या वतीने विंग कमांडर देवेंद्र अवताडे यांचा सन्मान


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र आणि माळेवाडी अशा एका छोट्याशा गावात जन्मलेले सुपुत्र,झेडपी शाळेत शिक्षण घेऊन आपल्या भारत मातेच्या सुरक्षेसाठी हवाई दलात भरती होऊन राष्ट्राच्या रक्षणासाठी अत्यंत हिंमत व धैर्याने ऑपरेशन सिंदूर मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले अधिकारी एअर फोर्सचे फायटर पायलेट विंग कमांडर मा.देवेंद्र औताडे यांनी आपल्या मातृभूमीसाठी आणि राष्ट्रासाठी जीवाची बाजी लावून ऑपरेशन सिंदूर मध्ये प्रचंड धैर्य ,कौशल्य आणि जबाबदारीने कामगिरी बजावली आहे.याप्रसंगी अशा धैर्यवान आणि जांबाज अधिकाऱ्यांनी व जवानांनी आपल्या जीवाची व परिवाराची पर्वा न करता खऱ्या निष्ठेने देशसेवेचा उच्च आदर्श प्रस्थापित केल्याने भारत सरकारने त्यांना शौर्यपदक देऊन गौरविले आहे.
त्यांच्या या उतुंग कामगीरी बद्दल तालुक्यातील सर्व माजी सैनिक आणी माजी सैनिक संघर्ष समितीच्या वतीने येथील शहीद स्मारकास त्यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून भारत मातेचा जयघोष करून त्यांचे अभिनंदन व स्वागत करण्यात आले.
त्यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये दाखवलेले धैर्य आणि निष्ठा आम्हा सर्व देशवासीयांना प्रेरणादायी आहे, त्यांच्या या अथक परिश्रमामुळे भारत देशाच्या सुरक्षेत अनमोल योगदान दिल्याने आपल्या माता - पितांचे तसेच माळेवाडी या गावाबरोबरच श्रीरामपूर तालुक्याचे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे नांव देशाच्या पटलावर नेण्याचे मोठे कार्य वींग कामांडर देवेंद्र औताडे यांनी केले आहे. याचा आम्हा सर्व माजी सैनिकांना, श्रीरामपूरकरांना सार्थ अभिमान आहे व त्यांनी आपल्या क्षेत्रात ज्या प्रकारे फायटर उडवले आहे त्याच प्रकारे उंच भरारी घेऊन भविष्यात सेवेत फक्त विंग कमांडर न राहता एअर फोर्स चे एअर चिफ मार्शल होऊन आपल्या भारत देशाचे नाव उंच शिखरावर पोहोचवण्याचे काम करावे अशी सदिच्छा तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या व सर्व नागरिकांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. श्रीरामपूर तालुक्यात आणि माळेवाडी मध्ये विंग कमांडर देवेंद्र औताडे यांचा न भुतो ना भविष्य झालेला हा सत्कार होता, सत्कार समारंभामध्ये आपल्या केलेल्या कार्याचा थरार आपल्या शैलीत विशद करत असतांना काही काळासाठी सर्व उपस्थित जनसमुदाय स्तब्ध झाला, याप्रसंगी अनेकांचे डोळे पाणावले होते. विंग कमांडर देवेंद्र औताडे आणि माळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व माजी सैनिकांचा, वीर पत्नींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
 या कार्यक्रमास मेजर कृष्णा सरदार, बाळासाहेब भागडे, बाळासाहेब बनकर, संग्रामजीत यादव, संजय बनकर, अशोक कायगुडे, अशोक साबळे,सुधाकर हरदास, भगिरथ पवार, चांगदेव धाकतोडे,माधव ढवळे, बाळासाहेब लांडे,, मिनिनाथ गुलदगड, राजेंद्र कांदे, विजय तोडमल, आर. एन. माळी, सतीश सांडभोर, असलम शेख ,रामदास वाणी,मच्छिंद्र शेळके, विजय शिंदे, घनश्याम निसळ, राजेंद्र शिंदे ,जी. बी. बनकर , अनील लगड,वीर पत्नी वैशालीताई देशमुख , पार्वताबाई देसाई, रविंद्र सुलताने,राजेंद्र देसाई, विलास खर्डे, माजी पोलीस संघटना पदाधिकारी सदस्य तसेच माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न धुमाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन केतन औताडे यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, September 17, 2025

संपूर्ण हिंदुस्थानातील आदर्श ठरणारा गुजरातमधील अत्याधुनिक वृद्धाश्रम – नानजीभाई ठक्कर यांचे मनोगत


*“गुजरातच्या गोंडल तालुक्यातील तिरंगा जय भगवान वृद्धाश्रम – सेवेतून साकारलेले आदर्श उदाहरण”*

*“आई-वडिलांची खरी सेवा म्हणजेच ईश्वरभक्ती – नानजीभाई ठक्कर”*
*“१५ एकर क्षेत्रावर उभारलेला अत्याधुनिक वृद्धाश्रम ठरत आहे संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी”*

*“घरापेक्षा अधिक मायेचा अनुभव देणारा गोंडलमधील वृद्धाश्रम”*

*“असा आदर्श वृद्धाश्रम महाराष्ट्रातही साकारणार – नानजीभाई ठक्कर यांचे आश्वासन”*

राजकोट (गुजरात) प्रतिनिधी:
“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली, तोच साधू ओळखावा; देव तेथंच जाणावा” या संतवचनाप्रमाणे आई- वडिलांचा सन्मान करणे, त्यांचे संगोपन करणे व त्यांना आयुष्याच्या संध्याकाळी प्रेमाने जपणे हे खरे पुण्य मानले जाते. 
हे पुण्य कार्य देशातील गुजरात राज्याच्या राजकोट जिल्ह्यातील गोंडल तालुक्याच्या चेरखडी या गावात उभारलेल्या तिरंगा जय भगवान वृद्धाश्रमात होत असल्याचे प्रतिपादन एन.के.टी. ग्रुपचे अध्यक्ष, नामवंत उद्योगपती व ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला) यांनी केले.

*कार्यक्रमाचे वैशिष्ट्य:*
या सोहळ्यात माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे, एन.के.टी. ग्रुपचे सचिव नटवरलाल ठक्कर,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

*अत्याधुनिक सुविधांनी सज्ज:*
हा वृद्धाश्रम केवळ आश्रयस्थान नसून आधुनिक जीवनशैलीचा अनुभव देणारे आदर्श केंद्र ठरले आहे. येथे प्रत्येक खोलीत एअर कंडिशन, गरम पाण्याची सोय, वॉटर प्युरिफायर, एलईडी टीव्ही, वाचनालय, मनोरंजनासाठी विविध खेळ, स्विमिंग पूल यांसह व्हीआयपी दर्जाचे जेवणाची व्यवस्था आहे.
उजाड रानावर तब्बल १५ एकर जागेत उभारलेला हा आश्रम आज गावकुसापासून शहरापर्यंत आदर्श मानला जात आहे.

*वृद्धांचे अनुभव – घराची* 
*ऊब आणि मायेची सावली:*

या आश्रमात राहणाऱ्या अनेक वृद्धांनी आपापल्या भावना व्यक्त करताना डोळ्यांतून अश्रू दाटून आले. त्यांनी अत्यंत हळुवार पण हृदयस्पर्शी शब्दांत आपले अनुभव मांडले.

एक वृद्ध आई म्हणाली –
“आम्ही जन्म दिलेल्या मुलांनी आमची कदर केली नाही. आयुष्यभर त्यांच्यासाठी घाम गाळला, कष्ट केले, पण वृद्धापकाळी त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली. आयुष्याच्या या टप्प्यावर मुलांकडून जी साथ, आधार आणि माया मिळायला हवी होती, ती न मिळाल्याने मनात खूप वेदना आहेत. मात्र, या आश्रमात आल्यापासून आम्हाला आपुलकीची खरी माया मिळाली आहे. या वृद्धाश्रमाचे सेवक आम्हाला लेकरांसारखे जपतात. रोजच्या व्यवहारात, जेवणखाण्यात, औषधोपचारात इतकी काळजी घेतात की, आम्हालाही वाटतं – ही आपली खरी लेकरं आहेत.”

दुसरे एक वयोवृद्ध गृहस्थ म्हणाले –
“घरात आम्हाला कधी मिळाल्या नाहीत अशा सुविधा व सोयी येथे उपलब्ध आहेत. खोलीत एअर कंडिशन आहे, गरम पाण्याची सोय आहे, रोज स्वच्छ आणि पौष्टिक जेवण मिळतं, वाचनालय आहे, खेळ आहेत. एवढंच नाही तर एखाद्या सणासुदीच्या दिवशी इथल्या उत्सवांत मिळणारी आपुलकी आणि आनंद आम्हाला घरापेक्षा अधिक सुखावणारा असतो.”

तर आणखी एक वृद्ध आजी डोळ्यांत आनंदाश्रू आणून म्हणाल्या –
“या आश्रमाने आम्हाला फक्त राहण्याची सोय दिली नाही, तर घराची ऊब आणि मायेचे वातावरण दिलं आहे. येथे राहून आमच्या आयुष्याला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाल्यासारखं वाटतं. जे मूल दुरावले, त्याची उणीव या सेवकांनी त्यांच्या प्रेमळ वागणुकीने भरून काढली.”

वृद्धांचे हे अनुभव ऐकताना संपूर्ण सभागृहातील वातावरण भारावून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि डोळ्यांत चमकणारे आनंदाश्रू पाहून, हा आश्रम खरंच त्यांच्यासाठी मायेचा संसार ठरतो आहे हे स्पष्ट झाले.

*नानजीभाई ठक्कर यांचे हृदयस्पर्शी मनोगत:*
या प्रसंगी आपल्या भावनिक शब्दांत नानजीभाई ठक्कर म्हणाले –
“या ठिकाणी येताना मला जीवनाचा खरा आनंद मिळतो. इथे आलेल्या मायमाऊलींच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहिले की, आपल्याला खरं तर कुठे सेवा करावी याचं भान येतं. जेव्हा वृद्ध मातांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचा आणि आनंदाचा अश्रू चमकतो, तेव्हा मला वाटतं की हीच खरी पूजा, हा खरा धर्म.

माझ्यासाठी प्रत्येक भेट ही विशेष असते. आश्रमाच्या दारात पाऊल टाकताच मला माहेरवाशीण मुलीच्या स्वागतासारखी उबदार मिठी मिळते. इथल्या मातांच्या मनातली माया, त्यांचे शब्द, त्यांचे आशिर्वाद हे माझ्यासाठी अनमोल आहेत.

आयुष्याच्या उत्तरार्धात अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांपासून, कुटुंबापासून दुरावं लागतं. त्यांच्या डोळ्यांत एकटेपणाचे सावट दिसते. पण या वृद्धाश्रमात त्यांना सुख, आदर आणि आधार मिळतो. त्यांच्यासाठी इथली प्रत्येक सोय केवळ भौतिक नाही, तर त्यात एक आत्मीयता आहे.

मला वाटतं की आपण किती मोठं घर, व्यवसाय किंवा संपत्ती कमावली यापेक्षा, आपल्या मातापित्यांना आणि वृद्धांना दिलेला सन्मान, त्यांच्यावर केलेली सेवा हाच आपल्या आयुष्याचा खरा ठेवा आहे. त्यांचा हसू, त्यांचा आनंद आणि त्यांचे आशीर्वाद हेच माझ्या आयुष्याचे धन आहे.

वृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की माझं जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं. ही सेवा हीच खरी उपासना आहे, आणि हाच माझ्यासाठी खरा समाधानाचा क्षण आहे.”

*डॉ. विश्वासराव आरोटे यांचे मनोगत:*

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या हृदयस्पर्शी भाषणातून मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. आरोटे म्हणाले की,“आज या तिरंगा जय भगवान वृद्धाश्रमात आल्यानंतर मला जाणवले की ही सेवा म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवा आहे. समाजात अनेक विकासकामे घडतात, प्रकल्प उभे राहतात, पण जर आपल्या वृद्ध मातापित्यांना सन्मान मिळाला नाही तर त्या समाजाचा विकास अपूर्ण राहतो.

येथील आश्रमात आल्यावर प्रत्येक वृद्धाच्या डोळ्यांत मला समाधान आणि कृतज्ञतेची झलक दिसली. आपल्याच लेकरांकडून न मिळालेली माया त्यांना येथे सेवकांकडून मिळते. सेवकांचे प्रेम,आपुलकी, निष्ठा आणि त्यागभाव पाहून माझं मन भारावलं आहे. हा आश्रम केवळ निवासस्थान नाही, तर ‘मायेचे माहेरघर’ आहे.

वृद्धांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य हेच इथल्या कार्यकर्त्यांच्या सेवाभावाचं खरं पारितोषिक आहे. या आश्रमात केवळ भौतिक सुविधा नाहीत तर आदर, सन्मान आणि जगण्याची नवी उमेद आहे. त्यामुळे हा आश्रम संपूर्ण हिंदुस्थानात आदर्श ठरू शकतो, याची मला खात्री आहे.”

*नानजीभाई ठक्कर यांचे कौतुक:*
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठ समाजसेवक नानजीभाई खिमजीभाई ठक्कर यांच्याही कार्याचे मनापासून कौतुक केले.
ते म्हणाले –
“नानजीभाई ठक्कर हे केवळ उद्योजक नाहीत, तर समाजसेवेचे खरे शिल्पकार आहेत. त्यांनी स्वतःचा व्यवसाय यशस्वी केला असला तरी त्यांनी समाजाकडे पाठ फिरवली नाही. आई-वडिलांचा सन्मान, वयोवृद्धांची काळजी आणि सेवाभाव याला त्यांनी जीवनध्येय मानले.

त्यांच्या प्रयत्नांमुळे हा अत्याधुनिक वृद्धाश्रम साकार झाला आणि शेकडो वृद्धांना पुन्हा एकदा नवे जीवन, मायेची सावली व घराची ऊब मिळाली. असा समाजसेवक आपल्या काळात लाभणे हे आपलं भाग्य आहे.

आज मी त्यांच्या कार्याला आणि सेवाभावाला सलाम करतो. समाजाने नानजीभाईंच्या या कार्यातून शिकायला हवे. महाराष्ट्रातही असे उपक्रम राबवले गेले, तर आपल्या राज्यातील वृद्धांना देखील सन्मानाने जगता येईल.”

यामुळे डॉ. विश्वासराव आरोटे यांचे मनोगत केवळ वृद्धाश्रमाच्या महत्त्वावरच नाही, तर नानजीभाई ठक्कर यांच्या कार्याबद्दलचा गौरवभावही अधोरेखित करतो.

*ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे यांचे मनोगत* – “आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा”
या कार्यक्रमात आपल्या संतपरंपरेच्या ओजस्वी वाणीने ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे यांनी आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले की, “आपल्या संत परंपरेत नेहमी सांगितले गेले आहे – ‘मातेच्या चरणी स्वर्ग आहे’ आणि ‘पित्याच्या चरणी ईश्वर आहे’. आई- वडिलांची सेवा हीच खरी देवपूजा, खरी उपासना आणि खरी धर्मकार्यता आहे. आपण देवाला हजारो वेळा नमन केलं तरी त्याची खरी फलश्रुती तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपल्या आई-वडिलांची निष्ठेने सेवा करतो.

आजच्या पिढीने हे विसरले आहे की, आपण जे काही आहोत ते आपल्या आई-वडिलांमुळेच. त्यांनी आयुष्यभर कष्ट करून आपल्याला घडवलं. पण वयोमानानं जेव्हा ते दुर्बल होतात, तेव्हा अनेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे पाहून मनाला वेदना होतात.

या वृद्धाश्रमाने मात्र आपल्या संस्कृतीला न्याय दिला आहे. इथे आई-वडिलांना फक्त आसरा नाही, तर मायेची ऊब, सन्मान आणि आदर मिळतो. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य पाहिलं की जाणवतं – हीच खरी समाजसेवा आहे.

आई-वडिलांच्या सेवेमुळे घराचं सुख वाढतं, कुटुंब एकत्र राहतं, आणि समाजात एक आदर्श निर्माण होतो. ज्यांच्या घरी वृद्धांचे आशीर्वाद आहेत, त्या घराला कधीही दुःख स्पर्श करू शकत नाही. म्हणून मी प्रत्येक युवकाला, प्रत्येक मुलाला आवाहन करतो की – आपल्या पालकांना कधीही विसरू नका. त्यांच्या सेवेतच ईश्वर आहे.

गुजरातमध्ये उभारलेला हा आश्रम म्हणजे आदर्श उपक्रम आहे. नानजीभाई ठक्कर यांच्यासारखे समाजसेवक या उपक्रमाच्या मागे आहेत, हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रातही अशा संस्थांची गरज आहे, जेणेकरून आपल्या मातापित्यांना संध्याकाळच्या दिवसांत सुरक्षित, सन्माननीय आणि आनंदी जीवन मिळेल.”

ह.भ.प. चंद्रकांत महाराजांचे हे शब्द ऐकून संपूर्ण वातावरण भारावून गेले. उपस्थितांपैकी अनेकांच्या डोळ्यांतून पाणी आले आणि ‘आई-वडिलांची सेवा हीच खरी सेवा’ हा संदेश सर्वांच्या मनात घर करून गेला.

*सामाजिक उपक्रम:*
या कार्यक्रमात वारकरी भजन मंडळांना साहित्य, वह्या, पेन व तबला यांचे वाटप करण्यात आले. हे वितरण डुंबरे महाराज, डॉ. विश्वासराव आरोटे व नटवरलाल ठक्कर यांच्या हस्ते झाले.

*संचालकांचा सत्कार:*
कार्यक्रमाच्या शेवटी आश्रमाचे संचालक रसिकभाई पटेल यांनी सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

“गुजरातमध्ये उभारलेल्या या आश्रमाचे मॉडेल महाराष्ट्रातही साकारावे, ज्यामुळे आपल्या वयोवृद्ध पालकांना आधुनिक व सन्मानजनक जीवन मिळेल. त्यासाठी मी व्यक्तिगत प्रयत्न करणार,” असे आश्वासन नानजीभाई ठक्कर यांनी दिले.

हा वृद्धाश्रम केवळ भौतिक सोयी-सुविधांनी सज्जच नसून, वृद्धांच्या मनाला खरी शांती, आनंद आणि मायेची ऊब देणारे केंद्र ठरत आहे. संपूर्ण हिंदुस्थानासाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण बनले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार डॉ.विश्वासराव
 आरोटे - प्रदेश सरचिटणीस, ✍️✅🇮🇳
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूर बाजार समिती वसंतदादा पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित


श्रीरामपूर बाजार समिती वसंतदादा 
पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित 

श्रीरामपूर बाजार समितीच्या पारदर्शक कारभारानेच राज्यात नवलौकिक - बाळासाहेब नाहाटा 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बाजार समित्यांना वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात नाशिक विभागातून अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर कृषि उत्पन्न बाजार समितीने उत्कृष्ट कामगिरीचा मान पटकावत नाशिक विभागातून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार मिळवून आपल्या कार्याचा राज्यभर ठसा उमटविला असून बाजार समितीच्या पारदर्शक कारभारानेच बाजार समितीचा नावलौकिक झाला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी केले.
         उत्कृष्ट कामगिरी, पारदर्शक कारभार आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारी योजना यांचा सखोल आढावा घेऊन हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, उपाध्यक्ष सुर्यवंशी, संचालक ॲड. सुधीर कोठारी, मानकर तसेच महिला संचालिका यांच्या शुभहस्ते हा सन्मान श्रीरामपूर बाजार समितीला प्रदान करण्यात आला.
     या वेळी श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सुधीर वेणुनाथ नवले, समितीचे संचालक सचिन गुजर, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, राजेंद्र पाऊलबुद्धे, मयुर पटारे , राजूभाऊ चक्रनारायण, विलासभाऊ दाभाडे यांच्यासह सचिव साहेबराव वाबळे आदि उपस्थित होते.
     पुरस्कारानंतर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले बोलताना म्हणाले की, माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार हेमंत ओगले आणि जिल्हा बँकेचे संचालक करणदादा ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर बाजार समितीने मागील काही वर्षांत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, शेतमालाची आधुनिक बाजारपेठ उभारणी, डिजिटल बोली प्रणाली, शेतकऱ्यांना त्वरित देयकांची हमी, स्वच्छ आणि सुव्यवस्थित बाजार परिसर अशा अनेक उपक्रमांद्वारे आदर्श कामगिरी बजावली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांमध्ये श्रीरामपूर समितीने आपले वेगळेपण सिद्ध करून नाशिक विभागात अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा हा मानाचा बहुमान मिळवला असून हा पुरस्कार मिळविण्यात बाजार समितीचे हमाल मापाडी व्यापारी व कर्मचारी यांचे देखील योगदान असल्याचे यावेळी सभापती सुधीर नवले व सचिव साहेबराव वाबळे म्हणाले.

हा पुरस्कार श्रीरामपूर बाजार समितीच्या कार्यक्षम नेतृत्वाची आणि शेतकरी कल्याणासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची राज्यस्तरावर दखल घेणारा ठरला असून यामुळे बाजार समिती अधिकृत जोमाने काम करणाऱ्या पुढील काळात देखील शेतकऱ्यांना विविध योजना शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सभापती सुधीर नवले व सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
 पत्रकार संदीप आसने, श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, September 16, 2025

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठे नुकसान स्थायी आदेशा प्रमाणे नूकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे पालकमंत्री ना.विखे पाटील यांचे प्रशासनास आदेश


मदत व पुनर्वसन खाते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून, जिल्ह्यातील नूकसानग्रस्तांसाठी अधिकची मदत उपलब्ध करून देण्याची विनंती करणार - पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

- पाथर्डी - प्रतिनिधी -/ वार्ता -
यापुर्वी मागे कधीही नाही झाला असा पाऊस मागील दोन दिवसांत झाल्याने मोठ्या स्वरूपात नूकसान झाले आहे. झालेल्या नूकसानीचा नेमका आकडा समोर येण्यास वेळ लागेल.स्थायी आदेशा प्रमाणे तातडीची मदत देण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.परंतू मदतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून अधिकची मदत मिळावी म्हणून विनंती करणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

  पाथर्डी तालुक्यात एकूण ४९ हजार हेक्टर क्षेत्रावरील ६९ हजार शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नूकसान झाले असून, ३४ गाय २५० कोंबड्या, शेळी ५० करडू २५ आणि २६ घरांची पडझड झाली असल्याचे सांगून राजू शिवाजी सोळंके हा ३९ वर्षाचा इसम देवळाली नदीत व गणपत हरीभाऊ बर्डे हे ६५ वर्षाचे गृहस्थ टाकळी मानूर तलावात वाहून गेल्याची घटना घडली असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. ढगफुटीचाच प्रकार म्हणावा लागेल.ज्या ठिकाणी भेटी दिल्या त्या गावातील प्रत्येक जुन्या ज्येष्ठ लोकांनी असा पाऊस कधी पाहीलाच नव्हता.सुदैवाने यामध्ये मनुष्यहानी झाली नाही.
असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, नदी ओढे, नाले यांचे प्रवाह बदल्यामुळेच पाण्याचे प्रवाह नागरी वस्तीत आले.
या भागात झालेली अतिक्रमणे ही सुध्दा झालेल्या नूकसानीची कारण आहेत भविष्यात असे प्रसंग पुन्हा निर्माण होवू नयेत म्हणून अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यानंतर तातडीने सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आणि त्यांच्या प्रशासनातील सर्व विभागांनी वेळीच योग्य निर्णय घेवून केलेल्या उपाय योजनामुळे नागरीकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात मोठे यश आले. पूर परीस्थिती ओसरल्यानंतर झालेल्या नूकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल.पण परीस्थीती पाहाता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नूकसान झालेल्या घरांना मदत किंवा घरकुल योजनेत घराची उपलब्धता करून देता येईल का याबाबत अधिकाऱ्यांनी विचार करावा. स्थलांतरीत नागरीकांना फुड पॅकेटचे नियोजन करण्यात आले आहे. यापुर्वी आशा आपतीत शासनाने मदत केली आहे. आताही मदतीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

झालेल्या नूकसानीचा अंदाज पाहाता मोठ्या प्रमाणात अर्थिक मदत लागणार आहे.मदत व पुनर्वसन विभागाकडे याबाबत प्रयत्न होतीलच परंतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून अधिकची मदत जिल्ह्यातील नूकसानीसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

पाथर्डी तालुक्यातील करंजी, तिसगांव, कासार पिंपळगाव या गावात झालेल्या नूकसानीची पाहाणी करून नागरीकांना दिलासा दिला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, जलसंपदा विभागाचे स्वप्निल काळे, सायली पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
पत्रकार राहुल फुंदे - शिर्डी 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

पटेल स्पेशालिटी क्लिनिकतर्फे पैगंबर जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर संपन्न


नियमित आरोग्य तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात - डॉ. अशफाक पटेल 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य हेच खरे धन आहे. मधुमेह, हृदयविकार, थायरॉईड अशा अनेक आजारांची वेळेत तपासणी न झाल्यास त्यांचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.आमचे ध्येय केवळ उपचार देणे नाही, तर समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हे देखील आहे. पैगंबरांच्या शिकवणीनुसार इतरांची सेवा करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच खरी प्रार्थना (इबादत) आहे.आजच्या शिबिराला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करत राहू असे प्रतिपादन डायबेटोलॉजिस्ट व हृदयरोग विकार तज्ञ डॉ.अशफाक पटेल यांनी केले.
पैगंबर जयंतीच्या औचित्याने नगर शहरात पटेल स्पेशालिटी क्लिनिक यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात रुग्णांना विविध आजारांवरील तपासण्या मोफत करून देण्यात आल्या. विशेषतः रक्तातील थायरॉईड, तीन महिन्यातील साखर (एचडी वन सी), कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर इत्यादी महत्त्वपूर्ण तपासण्या रुग्णांना विनामूल्य करून देण्यात आल्या.
या प्रसंगी डायबेटोलॉजिस्ट व हृदयरोग तज्ञ डॉ. अशफाक पटेल यांच्यासह प्रकाश मुनोत, तुषार वर्पे, आकाश हिवाळे, विक्रम मार्कंड, हर्षल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने रुग्णांनी घेतला. नियमित आरोग्य तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात, याबाबत जनजागृतीही करण्यात आली. वारंवार अशा उपक्रमांचे आयोजन केल्यामुळे रुग्णांनी समाधान व्यक्त करून डॉ. अशफाक पटेल व पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे आभार मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, September 15, 2025

सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड गरजेचे - सौ.स्नेहल खोरे

सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड गरजेचे - सौ.स्नेहल खोरे 

- श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर भाजप व मोरया फाउंडेशन आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करून सुरू केलेल्या आयुष्यमान भारत कार्ड कॅम्पचा प्रभाग १७ मधील कॅम्पचा शुभारंभ माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना सौ. स्नेहल खोरे म्हणाल्या की, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरात पहिल्यांदाच भाजपच्या वतीने आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प घेण्यात आला. यामध्ये तब्बल २८५ नागरिकांनी लाभ घेतला असून केंद्र व राज्य सरकारच्या योजना सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी मोरया फाउंडेशन कटिबद्ध आहे. 
आयुष्यमान कार्डच्या माध्यमातून एका कुटुंबाला ५ लाखांपर्यंत वैद्यकीय मदत मिळणार आहे. आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प पुढील काही आठवडे राबविण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही सौ.खोरे यांनी यावेळी केले. 
यावेळी अशोक कोरडे, सीमा पटारे, अण्णासाहेब पंडित, राजकुमार काले, बाबुराव घोडेकर, रोहिणी लाड, द्रौपदी कल्याणकर, दिपाली ज-हाड, अंजली राजूळे, संदीप लचके, अमोल माळवे, अनिल कल्याणकर, इंदुमती शेलार, प्रवीण खरे, विजय जगताप, गणेश मगरे, सुनील नागरे, कुणाल दहिटे, संस्कृती जगताप आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

अभियंता दिन : - राष्ट्रनिर्माणातील अभियंत्यांचा मोठ्या मोलाचा वाटा



१५ सप्टेंबर हा दिवस भारताच्या अभियांत्रिकी क्षेत्रासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भारताचे थोर अभियंता व दूरदृष्टीचे शिल्पकार सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ हा दिवस संपूर्ण देशभर अभियंता दिन म्हणून पाळला जातो.

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे व्यक्तिमत्त्व

सर विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी मैसूर राज्यातील मुदेनहळ्ळी या गावात झाला. अल्पशा साधनसंपत्तीवर वाढलेले हे व्यक्तिमत्त्व पुढे शिक्षण, परिश्रम व प्रतिभेच्या जोरावर भारताचे अग्रगण्य अभियंता ठरले. त्यांनी पुण्यातील सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजमधून अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. त्यानंतर मुंबई प्रांतात सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीस सुरुवात केली आणि तेथूनच त्यांच्या कर्तृत्वाची उज्ज्वल गाथा सुरू झाली.
सर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे उभारले.
मैसूरमधील कृष्णराज सागर धरण हे त्यांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य मानले जाते. या धरणामुळे शेतीला सिंचन व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली.

हैदराबादमधील मुसि नदीवरील पूर नियंत्रण योजना त्यांनी राबवली. या योजनेमुळे पूरप्रसंगावर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
त्यांनी लोखंड व पोलाद उद्योग, जलविद्युत प्रकल्प, जलसंधारण योजना आदींवर भर देत औद्योगिक विकासाला चालना दिली.
त्यांच्या कार्यामुळे त्यांना "मॉडर्न इंडियाचे शिल्पकार" व "अभियांत्रिकीचे महामनीषी" अशी बिरुदे लाभली. १९५५ साली भारत सरकारने त्यांना ‘भारत रत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवले.
अभियंता दिन केवळ एका महान अभियंत्याच्या स्मरणार्थ नसून तो अभियंत्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. देशाच्या विकासात अभियंते जी भूमिका बजावतात ती मोलाची आणि अनिवार्य आहे. रस्ते, पूल, धरणे, इमारती, रेल्वे, विमानतळ, औद्योगिक प्रकल्प, माहिती-तंत्रज्ञान व्यवस्था अशा असंख्य क्षेत्रांत अभियंते आपले कौशल्य झोकून देतात. उन,वारा, पाऊस, थंडी, उकाडा या साऱ्या आव्हानांचा सामना करीत, अनेकदा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अभियंत्यांशिवाय विकासाचे चित्र पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच हा दिवस अभियंता बांधवांना प्रेरणा व सन्मान देणारा दिवस मानला जातो.
आजच्या काळातील अभियंते आणि नवे आव्हान
आजच्या २१ व्या शतकात अभियंत्यांसमोर तंत्रज्ञानाचा झपाट्याने होणारा विकास हे मोठे आव्हान आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), रोबोटिक्स, हरित ऊर्जा, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी योजना, अवकाश संशोधन, डिजिटल क्रांती यांसारख्या नव्या क्षेत्रात अभियंत्यांना सातत्याने आपली कौशल्ये विकसित करावी लागत आहेत.
शाश्वत विकास, पर्यावरणाचे संतुलन, पाण्याचे व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था यांसारख्या समस्या सोडविण्यासाठी अभियंत्यांची तळमळ व बुद्धिमत्ता यापेक्षा महत्त्वाची भूमिका कोणाचीच असू शकत नाही.
अभियंता दिन म्हणजे एका महामनीषीचे स्मरण आणि अभियंता बंधू-भगिनींच्या कार्याला दिलेला मान आहे. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या आदर्शांचा वारसा जपत आजचे अभियंते देशाच्या प्रगतीसाठी अविरत परिश्रम घेत आहेत.
या अभियंता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी अभियंत्यांचा सन्मान करावा, त्यांच्या कार्याची दखल घ्यावी आणि “विकासाच्या नव्या वाटा” शोधण्याचा संकल्प करावा, हेच योग्य ठरेल.
देशाच्या विकासात महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या आमच्या असंख्य अभियंता बंधू- भगीनींना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


=================================
-----------------------------------------------
     शब्दांकन:-
*शौकतभाई शेख*
संस्थापक / अध्यक्ष  ✍️✅🇮🇳...
समता फाऊंडेशन
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================