राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, March 18, 2025

रमजान मुबारक 2025,रमजान रोजा नं. 17 वा, मंगळवार दिनांक 18-03-2025,


रमजान मुबारक 2025,
रमजान रोजा नं. 17 वा, मंगळवार दिनांक 18-03-2025,

रोजा :- इस्लाम :आत्महत्या पाप आहेत : संयम समस्याचं समाधान.. अल्लाह वर विश्वास बाळगा!!
हजरत इब्राहिम अलै. हें म्हणतात कीं, " आपल्या पालनकर्त्या ( अल्लाह - परमेश्वर ) च्या कृपेपासून निराश,तर, तेच लोकं होत असतात, कीं, जें पदभ्रस्ट झालेले आहेत. (दिव्य कुरआन पारा नं. 14 वा, सुरह नं. 15,आ. नं. 56 वी ).
हजरत हसन बसरी रहमातुल्लाह( संत, वली), सांगतात कीं, मी पवित्र कुरआन मध्ये नऊ (9) वेळेपेक्षा जास्त ठिकाणी वाचलेले आहेत कीं, अल्लाह नें जगातील प्रत्येक श्रद्धावान मनुष्याचं ताकदीर ( नसीब ) नशिबात रोजचा झोपेपर्यंतचा शेअर -रोजी- रोटी किती प्रमाणात देणार आहेत हें लिहिलेले आहेत, एका ठिकाणी तर अल्लाह ( परमेश्वर ) राणे शपथ घेऊन सांगितलं आहेत,!
                 परंतु इबलीस, शैतान तुम्हाला कायम भ्रमित करीत असतोस कीं तुम्हाला गरिबी येईल, तुम्हीं कंगाल होतान अशी वेगवेगळ्या प्रकारची भीती घालत असतो.!!!"
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सध्याला अतिक्रमण काढण्याची मोहीम चालू आहेत, सरकारच्या नियमानुसार च चालू आहेत, काहीकाही ठिकाणी अतिरेक ही चालू आहेत, म्हणून प्रत्येक तालुक्यात हजारो कुटुंब हें विस्थापित झालेले आहेत. त्यामध्ये 20-25% कुटुंब हें अन्न पाण्यावाचून हळहळ करीत आहेत. तर त्यातील हवालदिल झालेल्या कोवळ्या मनाच्या काही लोकांनी आत्महत्या करण्याचा मार्ग पत्कारला आहेत. तर काही लोकं मनानं खचून हृदय विकार झालेलं आहेत..
तसेच, 16-मार्च 2025 रविवार च्या दैनिक दिव्य मराठी वृत्त पत्रात मराठवाडा विदर्भात या वर्षी 2706 शेतकाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, व त्यामध्ये असेही म्हटले आहेत कीं, गेल्या 24 वर्षात 9961 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यापैकी सरकार नें 9832 प्रकरनात मदत केली आहेस, 
तसेच,मागील काही वर्षात काही स्टार व्यक्तींनी आपल्या विविध परिस्थिती ला घाबरून आत्महत्या केलेल्या आहेत.
अल्लाह (परमेश्वर ) नें तुम्हाला रोजच्या दाना पाण्याची भाकरी ची शपथें वर हमी दिलेली आहेत, खरोखर तोच आपला पालन्हार आहेत यात शंकाच नाही म्हणून रब हाच आपल्या सर्व गोष्टीची काळजी घेणारा असतोस म्हणून आपलं एक कर्तव्य असतं कीं आपण जेथे जेथे मजुरी करतो, नौकरी करतो, काम ध्यानंदा करतो, व्यवसाय, व्यापारी व्यापार करतात त्या प्रत्येक ठिकाणी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, प्रत्येक कामाच्या ठिकाणी शांततेत आपल्याला कामाची गरज आहेत म्हणून मन लावून प्रामाणिक राहून काम करणे गरजेचं आहेत.
 पवित्र कुरआन मध्ये म्हटले आहेत कीं, " आम्ही जेंव्हा अजान(हाक मारून )देवून बोलावलं जाईल त्यावेळी सर्व काम आटोपून लवकर या व नमाज अदा करून नंतर आप आपल्या रोजी रोटी साठी इतर ठिकाणी जाऊन तलाश ( शोधा )करा " 
या साठी प्रामाणिक पण आपल्या रोजी रोटी साठी ठीक ठिकाणी रोजी साठी फिरणं हें आपलं कार्य च आहेत. प्रत्येकांच्या नसीबात जेवढा शेर लिहिले आहेत ते तुम्हाला जगातील कोणत्याही कोपऱ्यात भेटणारंच आहेत.. हा परमेश्व(अल्लाह ) चा वादा आहेत.. म्हणून परमेश्वर अल्लाह जगात कोणालाही उपाशी झोपवणार नाहीं..
एक प्रसिद्ध म्हण प्रचिलीत आहेत कीं, " खुदा भुका उठाता है..! मगर भुका सूलाता नाहीं ".
काही ठिकाणी लोकं या परिस्थितीत प्रतिष्ठतेचा अर्थात इंग्रजी मध्ये स्टेटस म्हणतात किंवा "इगो "किंवा "मी " चा प्रश्न उपस्थित करतात..
              पवित्र कुरआन मध्ये अल्लाह म्हणतात कीं " तु इजज्जू मनातशः - तु जिलल्लू मनातशः.. बे.. दिल खैर "
आरे बाबांनो.. तुम्हीं काय हा ना हाक विचार करतात कीं. आमची प्रतिशष्ठा - पत - लायकी - लयास जाईल किंवा कमी कमी पणा येतील लोकं काय म्हणतील? वगैरे वगैरे.. आरे बाबांनो समाजात जगात मान मार्तंब आम्ही विचार केला तर कोणालाही मोठं करू शकतो किंवा मान मार्तंब सन्मान वाढवू शकतो किंवा कोणालाही आम्ही दरिद्री करू शकतो किंवा इज्जत घालवू शकतो...!
म्हणून शैतानी वृत्तीच्या नेगेटिव्ह मानसिकता असलेल्या लोकांच्या नादी लागू नका.
संकट आलेलं आहेत, परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहेत..अडचणीत सापडला आहात, कधी कधी या परिस्थिती ही आपल्या परीक्षाचा काळ ही समजावून स्वतःला च लागते, अडचणीतुन कधी ना कधी मार्ग सापडत असतो, तो पण मार्ग अल्लाह एखाद्या फॅरिसत्या रूपी माणसांना पाठवून मार्गदर्शन करण्यासाठी पाठ्वतच असतात.
परमेश्वर अल्लाह नें कुठेतरी आपल्या दाण्या पाण्याची व्यवस्था तर जरूर नक्कीच केली असेलच. म्हणून जरा धीराने घेऊन, स्वतःला सावरून संयम बाळगून वैफलै ग्रस्त न होता, धीर न सोडता, संयम ठेवणं गरजेचं असतं. सहन करा सहनशीलते मुळे कितीही डोंगरा एवढ्या संकटाना मोठया कौशल्याने यशस्वी होतो. कधी कधी या समस्या मध्ये घरात लहान मुलं, म्हातारे वा कोणी कर्ता पुरुष किंवा स्त्री ही जास्त आजारी पडण्याची शक्यता असतं, म्हणून या सर्व समस्या, अडचणी, संकताट विचलित किंवा गंगारून जातोय, त्या वेळी काय करावं व काय नाहीं, समजत च नाहीं. अशा वेळा हें सर्व सहनशीलते पलीकडे जातं म्हणून काही काही लोकं चूकीच्या मार्गाने जातात, कोणी गुन्हेगारी कडे तर कोणी चोरी वेगवेगळ्या वळणावर जातात तर कोणी सहन करून सन्मार्ग वर राहून च त्या परिस्थितीला तोंड देत असतात.तेच लोकं सदाचारी आहेत असतात.
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह जवळ जवळ सत्तर ( 70) पेक्षा जास्त ठिकाणी वारंवार सांगतात कीं, " इन नल लाह महा सबेरीन " अर्थातच :- अल्लाह ( परमेश्वर ) संयम ( सहनशीलता ) बाळगणाऱ्या लोकांन बरोबर कायमच असतो ".
   कुठल्याही बिकट- आणीबाणीच्या - अडचणीच्या - संकटाच्या - युद्ध जन्य परिस्थितीत - अशा वेळी संयम, धीर ठेवून सहशील राहून थंड विचार करून अल्लाह वर पूर्ण श्रद्धां ठेवून काम करतात हेच लोकं खरंच सत्वशील व अल्लाह चे भय बाळगनारे आहेत. ( पवित्र कुरआन सुरह 02, सुरह अल - बकराह आ. नं 0177).
सध्या रमजानुल मुबारक चे रोजे चालू आहेत रोजे हें खरोखर च संयम शिकवते.. 
अल्लाह जवळ वारंवार याचना दुवा करून, कारण समस्या, अडचणी, परस्थिती, संकट, आर्थिक परिस्थिती, रोजी कमी जास्त करणारा सर्व तोच आहेत कारण आपल्या परीक्षा बघण्यासाठी..परुंतु आपल्या सर्व परिस्थिती सुव्यस्थीत चांगलीच करणारा ही तोच परमेश्वर अल्लाह असतो ...
कारण जगातील सर्व मानव जिवजंतू ची काळजी करणारा पालनहार, पालनपोषण करणारे अल्लाह च आहेत...
     🌷त्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी कृपया आपला स्वतःला कमी लेखू नका व स्वतःच भलं बुर करून घेऊ नका.. शेवटी तुमच्या घरात खूप लहान लहान मुलं, म्हातारं आई वडील, चुलते, अजून बरेच तुमच्या वर अवलंबून राहणारे आहेत... शेवटी अल्लाह वर श्रद्धा ठेवा... अल्लाह ला आत्महत्या करणारे पसंत नाहीं म्हणजेच नाहीं...
आत्महत्या हें पाप आहेत.. संयम राखा.. थोडयाच दिवसांत परस्थिती बदलणार आहेत...
(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, त्यांना ही फायदा होईल... प्रतिक्रिया जरूर नोंदवा )

=================================
-----------------------------------------------
लेखक डॉक्टर :- सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल :- 🌹🙏9271640014🙏🌹
-----------------------------------------------
=================================

कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचेविविध मागण्यांसाठी आंदोलन



कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे
विविध मागण्यांसाठी आंदोलन

- अजीजभाई शेख - राहाता -/वार्ता -
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध समस्या आणि आश्वासित मागण्यांवर शासनाकडून कोणताही निर्णय होत नसल्याने राज्यभरासह राहाता तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेकडून राहाता तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
 राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन संघाकडून शासनाकडे वारंवार मागण्या मांडूनही त्या प्रलंबित आहेत. या धर्तीवर राज्यभरातील सर्व तहसीलदार यांना निवेदने देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सोपानराव कदम, सचिव सुनील गोरे व महासंघाच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुकाध्यक्ष डॉ. शरद दुधाट, सचिव श्याम जगताप, संजय ठाकरे, जवाहरलाल पांडे, अरुण कुळसुंदर, रणजीत पाटील आदींसह इतर शिक्षकांनी राहाता नायब तहसीलदार एच.जी. पाटील यांना निवेदन दिले. या मागण्यांमध्ये आयटी शिक्षकांचे समायोजन, अनुदान प्राप्त शिक्षकांना वाढीव टप्पा देणे, सेवातंर्गत आश्वासित प्रगती योजना, शाळा संहितेनुसार विद्यार्थी संख्येचे निकष पाळणे, सन २००५ पूर्वी अर्धवेळ व नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, वाढीव पदांचे समायोजन करणे, शिक्षकांच्या निवृत्तीचे वय ६० करणे, तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मानधनात वाढ करणे, उपप्राचार्यांना पदोन्नती वेतन वाढ देणे, अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ होताना अर्धवेळ सेवेची वेतनवाढ देणे, अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया बंद करणे, शिक्षकांची रिक्त पदे भरणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यात यावा, एम.फील, पीएच.डी. धारक शिक्षकांना वेतनवाढ मिळावी, डीसीपीएस व एनपीएस धारक शिक्षकांना हिशेब व देय रक्कम देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी ही निवेदने देण्यात आली आहेत.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, March 17, 2025

श्रीरामपूर - येथील, अखिल भारतीय बहुभाषीक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ श्रीरामपूर चे अध्यक्ष, प्रसिद्ध वैदयकीय डॉक्टर व जेष्ठ साहित्यिक डॉ सलिम सिकंदर शेख


श्रीरामपूर - येथील, अखिल भारतीय बहुभाषीक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ श्रीरामपूर चे अध्यक्ष, प्रसिद्ध वैदयकीय डॉक्टर व जेष्ठ साहित्यिक डॉ सलिम सिकंदर शेख यांची विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्याच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष कैलास खंदारे, परिवर्तन फाउंडेशन व शंभुक विद्यार्थी वसतिगृहाचे अशोकराव दिवे,ह.भ.प.व गायनाचार्य अरूणराव कुर्हे, विद्यार्थी संघटनेचे अमोल सोनवणे,बहूजन वंचितंचे संतोष त्रिभुवन, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय जगताप,भाजपा अल्पसंख्याक चे असिफभाई पोपटिया , साजिदभाई शेख, रविभाऊ पंडित सर, मातृ पितृ छाया प्रतिष्ठान चे उत्तमराव शेलार, साहित्यिक व पत्रकार सलिमखान पठाण सर ,वाघ सर,गायक व फार्मासिस्ट राजेश अंभोरे आदिनी सत्कार केला.
याप्रसंगी हे.भ.प.अरणराव कुर्हे, साहित्यिक सलिमखान पठाण, नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष कैलास खंदारे,व भाजपा अल्पसंख्याकचे असिफभाई पोपटिया आदिंनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करुन डॉ.सलिम शेख यांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोकराव दिवे(सर) यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
डॉ, सलीम सिकंदर शेख 💐✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================



Sunday, March 16, 2025

माधुरी वडघुले व स्मिता चाबुकस्वार यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार


माधुरी वडघुले व स्मिता चाबुकस्वार 
यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

- अजीजभाई शेख -  राहाता -/ वार्ता -
 राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शैक्षणिक संकुलातील कन्या विद्यालयाच्या शिक्षिका माधुरी यादवराव वडघुले आणि स्मिता उत्तमराव चाबुकस्वार यांना संगमनेर येथील विद्या विद्यापीठ संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. 
संगमनेर येथील विद्या विद्यापीठ संस्थेच्या वतीने शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय कार्याची दखल घेऊन विद्यार्थी ज्ञानदानाप्रती घेतलेल्या अथक परिश्रमामुळे आदर्श शिक्षिका म्हणून ही निवड करण्यात आली आहे. नुकताच महिला दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध उद्योजिका व समाजसेविका पद्मश्री कल्पनाताई सरोज यांच्या शुभहस्ते सौ.दुर्गाताई तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शरयू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित या आदर्श शिक्षिका पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

त्यांच्या या निवडीबद्दल रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, एकनाथराव घोगरे, प्राचार्य संजय ठाकरे, मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, उपप्राचार्य अलका आहेर यांच्यासह तिन्ही विभागातील शिक्षक बंधू-भगिनी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

लोकं मानसिकता निरनिराळे स्वभाव पद्धती......


*लोकं* 

बरं बोललं की 
भाळतात लोकं !

खरं बोललं की
टाळतात लोकं !!

जाणून घेतलं की 
कळतात लोकं !

प्रामाणिकपणे वागल की
 छळतात लोकं !!

ओल्यालाही सुक्या 
बरोबर जाळतात लोकं !

माणुसकीतही कंजूशी
 पाळतात लोकं !!

नशिबानेच चांगली 
मिळतात लोकं !

चांगल्या नशिबावरही
 जळतात लोकं !!

दुःखाचे कढ आतल्या 
आत गिळतात लोकं !

अनोळखी असूनही प्रेमाने
 जुळतात लोकं !!

आपल्याच माणसांची 
चर्चा चघळतात लोकं !

अरिष्ट येता परके बनवून
 न्याहाळतात लोकं !!

वास्तव विसरून दिखाव्याला
 भाळतात लोकं !

खोटीच सहानुभूती अन् 
खोटे आसू गाळतात लोक !!
 
प्रलोभानापुढे कित्येक
 पघळतात लोकं !

सज्जनाला चंदनाप्रमाणे
 उगाळतात लोकं !!

मदतीची गरज असली की
 दूर पळतात लोकं !

सगळं चांगलं झालं की
येऊन मिळतात लोकं !!

=================================
-----------------------------------------------
*लेखन: सुजाता पुरी*✍️✅🇮🇳...
 अहिल्यानागर - 8421426337
-----------------------------------------------
=================================


=================================
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शेख सिदरा फातेमा हिचा पहिला रोजा


शेख सिदरा फातेमा 
हिचा पहिला रोजा

नगर - बाबा बंगाली येथील प्रसिद्ध इलेक्ट्रीशियन शेख शेरअली यांची मुलगी शेख सिदरा फातेमा वय वर्षे सात याने रमजान चा पहिला रोजा पुर्ण केला.
सिदरा फातेमा ही मुकुंदनगर येथे मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हायस्कुल मध्ये पहिलीत शिकत आहे. त्याने एवढया कडक उन्हात व एवढे कमी वयात रोजा केल्याबद्दल त्याचे सर्व शिक्षक नातेवाईक अल करम सोसायटी तर्फे कौतुक होत आहे.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

रमजान मुबारक 2025,रोजा नं. 16 वा , सोमवार दिनांक, 17-03-2025

रमजान मुबारक 2025,
रोजा नं. 16 वा , सोमवार दिनांक, 17-03-2025
रोजा :!! फुकटात असंख्य आरोग्यदायी फायदे उचला!!"

आज रमजान मुबारक अनिवार्य चा 15 वा रोजा. उन्हाळा चालू होण्याच्या काहीच दिवस अगोदर व आज तर उन्हामध्ये रोजे शारीरिक व मानसिक दृष्टीने खडतर परीक्षा घेत 15 पूर्णतवास जात आहेत , कुठेतरी माध्यन्य झाले म्हणून हायसे वाटत असणार, काही बांधूनी विचार केला असेल कीं आपण विविध आजारांनी अगदी पोकळ होऊन गेलेलो आहेत आपल्याच्यान होनार का नाहीं? लोकांचं विविध प्रश्न - समस्या पण शेवटी तर अनिवार्य!! करणे ही करणं आहेत. काहीं काही बांधूनी चंद्र कोर बघून च स्वतः बरोबर मित्रांचे, बायकोच weight वजन बघतील असतील - काहींनी आपली शारीरिक चाचणी, शुगर रेकॉर्ड, ब्लड प्रेशर तपासून, थायरॉईड रिपोर्ट, केले असतील, आज बाजारात वजन कमी करण्यासाठी विविध नाना प्रकारच्या जाहिराती, विविध मल्टिनेशन कंपनीचे वजन weight reducing कमी करण्याचं आमिष दाखवणारे व 100%गॅरंटीड प्रॉडक्ट, सांगतांना हमखास वजन कमी करण्याची हमी. हो हमी नंतर त्यातूनच आपलं व्यवहार इस्पित सध्य करणारे हुशार बुद्धी मान व्यवसायिक व तीन मेंबर्स च्या चैन सिस्टिम च्या अनेक स्किम्स... यातून काय साध्य होतं.. माझ्या सह अनेकानेक लोकांना पडलेलं एक कोडं.. हो कोडं च..
परंतु उत्तम उत्तर तर, रमजान महिनातील रोजे अगदी प्रामाणिक पने केलं तर, ज्यांना ज्यांना वजन कमी करण्याची ओढ लागलेली आहेत किंवा healthy हेल्दी conscious लोकं, किंवा गले लठ्ठ माणसांनी पंधराह दिवसात थोडया फार फरकाने कमीत कमी 3 किलो वजन कमी झालं असेलच, फार चांगलीच बाब म्हणावी लागेल. 
 दिवसभर शारीराला पुरेल व उत्साह वाटेल इतकं संतुलित आहार घेणं गरजेचं असतं. आजचा जमाना फास्टफूड चा, इन्स्टंट सह चविष्ट खाण्याचा, परुंतु त्याचं नुकसान तर कायिक पटीनें, त्यामध्ये फॅट्स, चरबी अति प्रमाण, स्वादिष्ट मिठाचं जास्त प्रमाण, त्यात पुन्हा शिजवण्याची पद्धती वेगळ्याच,त्यामध्ये सिनथेंटीक केमिकॅल चे प्रमाण ही जास्त, काही म्हणतात कीं चवी साठी घातलेल डुकराच्या चरबी व हाडानी बनवलेले अगदी आरोग्यासाठी घातक अझीनो मोटो, म्हणून त्याचा परिणाम अर्थात आपल्याच शरीरावर हृदय रोग, मधुमेह (डायबेटिस,) पुन्हा वजन वाढत, वजन वाढल्या मुळे गुढग्यावर दवाब येऊन संधिवातचा त्रास, कमरेचा त्रास व मनके, हाडंचा त्रास, वजन वाढलं मुळे पुन्हा मधुमेह आलाच ब्लड प्रेशर आलं,अशा बऱ्याच आजरांना स्वतः हुन आमंत्रण निमंत्रण देण्याच.
सध्याच्या काळातीलइंटरनेट जमाना, I आय T टी सेक्टर मधील करियर करणाऱ्या IT इंजिनीरचं राहणीमान हें 14 तास कॉम्प्युटर समोर सतत काम चालू असतं -सतत मिटींगा सतत, कोणी बॉस तुकडून वारंवार मीटिंग साठी कॉल करतोय, काहीतरी नवीनच खूळपत काढून काहींना काही प्रॉब्लेमस उकरून काढतोय, असे अनेक प्रॉबलेम, काही जण work from Home घरात राहून काम करतात,घरामध्ये काम करणाऱ्या IT इंजिनीर घरी असून देखील पारखे असतात, आपल्या घरातील एका बंदिस्त खोलीत आडवं -तिडवं -खुर्चीवर काम करतात,त्यांना सतत काहींना काही इन्स्टंट चटपटीत खायची सवय असते, ती त्यांची गरज ही असतं नाईलाज असतो म्हणून ते जरा जास्तच फास्टफूड खातात..त्यामुळे बहुतेक IT इंजिनीर हें आपल्या कामाच्या व्यस्तते मुळे जास्तच लठ्ठ झालेले असतात कारण फास्टफूड व शारीरिक हालचाल ही होतं च नाहीं. म्हणून त्यांचा पोटाचे घेर जास्तच वाढलेला असतोस, विविध आजार होण्याचे प्रमाण जास्तअसतात.
अशा काम करणाऱ्या मित्र बांधूनी कायमच आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी आरोग्य दायी ठेवणं गरजेचं असतं. 
रोजीदरांनी फास्टफूड खाण्याचे प्रमाण कमीत कमीच ठेवलं तर उत्तम आरोग्य राहील, उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक अन्न जस फळ,टरबूज, काकडी, खरबूज, केळी, पेरू पपई, द्राक्षे, नारळ पाणी लिंबू पाणी सरबत, कड धन्य, शिजवलेलं पदार्थ, कमी मिठाचं प्रमाण अर्थात तुम्हाला उत्साही वाटेल असा संतुलित, पोषक तत्वाणी युक्त आहार जे नं करून दिवस भर तुम्हाला दिवस भर उत्साही व थकवा जाणवणार नाहीं व पच न संस्था चांगलीच राहिली पाहिजेत नाहीतर पोट दुःखी, ऍसिडिटी, दिवस भर ढेकर देत बसतात काही काही, तुमच्या किडनी वर, पोटावर, हृदयावर जादा लोड येणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचे आहेत. व तळलेलं पदार्थ जास्त प्रमाणात कधीच घेऊ नयेत..Healthy फूड चा वापर जास्त करून आपलं आरोग्य व आपलं वजन कमीत कमी करण्याचं ध्येय ही पूर्ण करण्यासाठी एवढ्या आटापिटा करण्याची गरजच आहेत.
सतत एक महिना नियमितपने 13-14 तास उपाशी राहिल्या मुळे नैसर्गिक रित्या वजन कमी होते हें अमेरिकेतील टेक्सास युनिव्हर्सिटी च्या संशोधकानी केलेल्या "रोज़े व त्या रोजेचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम "यावर संशोधनावर शोधून काढलं आहेत.. बऱ्याच काळ किंवा सतत उपाशीपोटी राहिल्यानें किंवा कमी खाल्याने शरीरातील पेशीवर तान येऊन त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
आपल्या दैनंदिन कामाच्या व्यस्तते मुळे आपण कायम अपयकारक पद्धतीने तयार केलेले अन्न खातोय, काहीतरी खुरमुरीत -चटपटीट -सटरबटर - जंक फूड खायची सवय लागलेली असते समजत असतं पण उमजत नाहीं हाच प्रकार सर्वत्र बघवयास मिळतो फक्त्त आत्ताची भूक कशी घालवायची एवढंच डोक्यात असतं, म्हणून कसलेही पदार्थ खाऊन स्वतःच स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून विविध आजार लावून घेत असतो. येवढया सगळ्या गोष्टीचा दुष्परिणाम म्हणजे पचन संस्था बघडलेली असते वारंवार बिघलेली असते म्हणून, bad cholesterol चे प्रमाण ही वाढल्या मुळे हृदय रोग वाचण्याची शक्यता वाढलेली असते..
हें सर्व व्यवस्थित करण्यासाठी वर्षातील एक महिना रमजान चे रोजे ठेवून bad cholesterol चे प्रमाण कमी होऊन हृदयाची क्षमता वाढून स्ट्रोक्र, कार्डीयस्क diases कमी होतात, व पचन संस्था ( digestive system ) व्यवस्थित होण्यास मदत होते, बहुतेक संशोधकानी विविध प्रयोग करून बघितलं तर त्यांच्या लक्षात आले कीं, 12-14 तासाचे काही देशात 16-18 तासाचे रोजे आहेत म्हणून सतत रोजे ठेवल्यास पचन संस्थेला काही प्रमाणात अराम भेटून Adiponectin Hormone चे प्रमाण जास्त होते, आणि हेच Hormones अन्नातील पौष्टिक घटक पाचवीण्यास मदत करते.
सध्याच्या काळातील एक नवीनच संशोधन जपान च्या शरीर शास्त्र चे संशोधक योशिनोरो ओसुनी "AUTO FEGO" चा सिद्धांत मांडला, " ऑटो फॅगो "हा ग्रीक शब्द म्हणजेच "स्वतः ला खाऊन टाकणं " सतत उपाशी पोटी राहिल्याने शरीरातील नॉर्मल पेशी ह्या शरीरातील अतिरिक्त वाढलेल्या चरबी ( fats )ना खाऊन टाकून नष्ट करतात, यालाच ऑटो फेगो म्हणतात. आपल्या शरीरातील घातक अपाय कारक पेशी cell ज्यामध्ये कॅन्सर सारख्या कदाचित असू शकतात तर अशा पेशी ही नष्ट होतात. ही प्रक्रिया रामजानुल मुबारक रोज्या मध्ये घडून येत असते. संशोधन तर आजच्या युगात झालं परुंतु याचे फायदे अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व. यांनी 1450 वर्षांपूर्वीच सांगितलं होतं, असो.
एवढ्या मोठया मानवी कल्याण कारी संशोधन करणाऱ्या जपान च्या योशिनोरी ओसुनी यांना 2016 मध्ये नोबेल पारितोषिक देवून गौरव करण्यात आलं.
म्हणून श्रद्धावंतानी आपल्या कामाचं योग्य नियोजन करून सतत रोजे ठेवून आपलं इस्पित वजन व आरोग्याचे फायदे उचला.. आज महिना भर तर करणारच आहोत परंतु हेच नियोजन कदाचित वर्षे भर आठवड्यात फक्त्त एकच किंवा आपल्या कुवतीप्रमाणे रोजे उपवास ठेवून, व्यवस्थित नियोजन करून आपल्या वजन कमी करून पुन्हा वाढणार नाहीत याची वर्षभर काळजी घेतली तर वजना बरोबर असंख्य आरोग्यदायी फायदे होतील .
    दहा पाच वर्षा पासून राज्यात काही लोकांचे diet plan डाएट प्लॅन चालू आहेत, कोणी म्हणतं दोन वेळा जेवा, तर कोणी म्हणतं दिवसात दोन दोन तासाला थोडं थोडं जेवा, कोणाचं डाएट प्लॅन फोल्लोवेर्स करायचं, त्याला राग्गड पैसे लागतात तरी गॅरंटी तर नाहीच, देव भरोसे, परुंतु आत्ता सध्या फुकटात चालू असलेल्या नैसर्गिक अल्लाह च डाएट प्लॅन कधी ही सर्वोत्तम च राहील. अल्लाच्या फुकटात मिळालेल्या संधीचा फायदा उचलून असंख्य आरोग्यदायी लाभ मिळवा ऑफर चालू आहेत..
(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा, ते ही फायदा उचलतील, कृपया प्रतिक्रिया अवश्य कळवा )

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(<^>)(<^>(<π>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)
लेखक डॉक्टर,:- सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लत नगर.
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
9271640014
👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)(<^>)