राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, June 30, 2023

अस्लम इनामदार ची अशोक महाविद्यालयाच्या आशियाई कब्बडी स्पर्धेत चमकदार कामगिरी

श्रीरामपूर- प्रतिनिधि - विशेष - वार्ता

माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी अस्लम इनामदार सहभागी असलेल्या भारतीय कब्बडी संघाने आशियाई कबड्डी स्पर्धेत विजय संपादन केला. या विजया
 मध्ये अस्लम इनामदार याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.अस्लम इनामदार याने मिळविलेल्या यशाबद्दल अशोक कारखान्याचे चेअरमन आणि संस्थेचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे, संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर, सहसचिव भास्कर खंडागळे कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे तसेच संस्थेच सर्व पदाधिकारी यांनी अस्लमचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सुनीता गायकवाड यांनीही अस्लम इनामदार याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी प्रा. दिलीप खंडागळे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका तसेच कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी अस्लमचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

((( संकलन )))
समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

जलसाठा वाढवण्यासाठी ( क्रेडाई ) ची धडपड गंगापूर धरणातील 37 दिवसांत 'इतका'गाळ उपसा...

नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -
विविध धरणांनी व नद्यांनी संपन्न असलेल्या नाशिक शहर परिसरावर पाऊस लांबल्याने पाणी कपातीचे संकट येण्याची चित्र दिसून येत आहेत. नवीन धरण बांधण्यापेक्षा असलेल्या धरणाची क्षमता वाढवण्याचा संकल्प 'क्रेडाई नाशिक मेट्रो'ने सोडला होता. सामाजिक दायित्वातून हाती घेतलेल्या उपक्रमाद्वारे भविष्यातील पाण्याचा संभाव्य तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न 'क्रेडाई नाशिक मेट्रो'ने केला आहे.
बांधकाम व्यवसायाला गती देताना त्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे हे देखील आपलेच कर्तव्य असल्याची भावना क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी मांडली. त्याला सर्वच बांधकाम व्यवसायीकांनी होकार दिल्याने कामाला प्रारंभ करण्यात आला.पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मनपाची असली तरी त्यांच्या हाताला बळकटी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतल्याचे कृणाल पाटील यांनी सांगितले. पहिल्या दोन दिवसात 47 हायवा ट्रक, 25 ट्रॅक्टरमधून शेतकऱ्यांनी गाळ शेतात दिला आहे. गाळ काढण्याच्या कामात सातत्य ठेवत त्या कामाची गती वाढवत 20 ते 27 जून दरम्यानच्या काळात 1,100 ट्रक फेऱ्यांतून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात यश मिळाले आहे. जोरदार पाऊस सुरू होई पर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा क्रेडाईचा संकल्प आहे. धरणक्षमता जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
एका सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून दरमाणसी लागणारे पाणी गृहीत धरता 4 जणांच्या कुटुंबाला दिवसाला 200 लिटर पाण्याची गरज पडू शकते. 8 कुटुंबांच्या गृहनिर्माण प्रकल्पात त्या प्रमाणात 1,600 लिटर पाणी लागणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रती प्रकल्प 2 ट्रक गाळ काढणे गरजेचे आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प साकारले जात असल्याने आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेत 1,100 ट्रक गाळ काढून क्रेडाईने आपल्या प्रकल्पातील नागरिकांची गरज भागवण्याच्या उद्देशाने जलसाठ्यात वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे
धरणाची मूळ पाणी साठवणक्षमता १ टीएमसी एवढी आहे. मात्र गेल्या काही वर्षात पाण्यासोबत धरणात वाढत गेलेल्या गाळामुळे धरणाची क्षमता 6.5 एवढी राहिली आहे. त्यामुळे 2.5 टीएमसी पाणी गाळामुळे कमी साठवण केले जाते. ते परिपूर्ण करण्यासाठी धरणात साठलेला गाळ काढणे महत्वाचे झाले आहे. शेती उत्पादनासाठी सुपीक असलेला धरणातून निघालेला गाळ नितीन पाटील (32 ट्रक), सचिन पाटील (69 ट्रक), विठ्ठल थेट (259ट्रक), संपत थेटे (182 ट्रक), रघुनाथ फडोळ (335 पीन पाटील (131 तक) संदिप थेटे (90 तक) यांनीधरणसाठ्यात वाढ करण्यासाठी एक टीएमसी पाणी वाढवण्याकरता 13 लाख ट्रक गाळ काढावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे 32 लाख ट्रक गाळ काढल्यास धरण पूर्णक्षमतेने भरुन जाईल. त्यावेळी पाणीकपात करण्याची गरज राहणार नाही. यादृष्टीने क्रेडाईने पहिले पाऊल उचलले आहे.क्रेडाईने हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून हाती घेतला आहे. नवीन धरण बांधण्यापेक्षा पावसाच्या पाण्याच्या साठवणीतून धरणाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न आहे. क्रेडाईने आतापर्यंत 1,100 ट्रक गाळ काढला आहे. मुसळधार पाऊस येऊन कामात व्यत्यय येत नाही तोपर्यंत काम सुरू ठेवण्याचा मनोदय आहे. सर्वसामान्यांनी पुढे येऊन खारीचा वाटा उचलावा.


अध्येक्ष
कुणाल पाटील
क्रेडाई नाशिक मेट्रो.


.

Thursday, June 29, 2023

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 104 उद्योगांना मंजुरी....


मुंबई - प्रतिनिधि - समाचार -
होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. युवक-युवतींना या माध्यमातून आत्मनिर्भर करण्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आग्रही आहेत.
त्यांच्याच प्रयत्नातून चालू वर्षात 104 उद्योगांना मंजुरी मिळाली असून 700 बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा अव्वल असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येऊन त्यामध्ये अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन जिल्हयातील सर्व बँकांच्या तसेच सर्व संबंधित विभाग प्रमुखाच्या बैठका घेत बँकांना उद्योगासाठी अधिक प्रमाणात कर्ज मंजूर करण्याच्या सूचना दिल्या.
याबाबत सातत्याने पाठपुरावाही करण्यात आल्याने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या महत्वाकांक्षी योजनेला जिल्ह्यात गती मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील युवक,युवतींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगांचे प्रस्ताव बँकेकडे पाठविण्यात येऊन बँकेच्या मंजुरीनंतर लाभार्थ्यांना प्रशिक्षण देत कर्ज वितरण करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सन 2023-24 या वर्षात मंजुरी देण्यात आलेल्या 104 उद्योगांना 4.73 कोटी इतके अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर जिल्हयात सुमारे 25 कोटी इतकी औद्यो गिक गुंतवणुक होत आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवून जिल्हयासाठी असणारे एक हजार उद्योगांचे उद्दिष्ट साध्य होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातुन जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवती आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी सर्व यंत्रणा व बँकांनी अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे.

---------------------------------------------------
===================================
सह : - संपादक रंजित बतरा शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
===================================
---------------------------------------------------

गावठी दारू लिटर 250 जप्तराज्य उत्पादन शुल्क 'अ' विभागाच्या पथकाची कामगिरी नाशिक

नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -

आषाढी एकादशी व बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर ड्राय डे असतांना व बंदी असलेली अवैध हातभट्टी गावठी दारु विक्रीच्या अवैध धंद्याविरोधात राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, नाशिक या पथकाने कारवाई करत तब्बल ५२० लिटर हातभट्टी गावठी दारु व इतर साहित्य जप्त केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, राज्य उत्पादन शुल्क अ विभाग, नाशिक या पथकाला मिळालेल्या झिरो पोलीस माहिती नुसार वाल्मिक नगर, पंचवटी, नाशिक याठिकाणी पंचवटी पोलिसांच्या मदतीने छापा टाकून ५२० लिटर हातभट्टी गावठी दारु, ०२ प्लॅस्टीक ड्रम, ०४ प्लॅस्टीक कॅन, १९ रबरी ट्युब आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यावेळी मात्र सदरहू अवैध धंदा चालवणारा चेतन रवि पाटील हा फरार झाल्याने त्याला फरार घोषित करण्यात आले.
ही कामगिरी राज्य उत्पादन शुल्क, अ विभाग, नाशिक निरीक्षक योगेश सावखेडकर, दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील, दुय्यम निरीक्षक भावना भिरड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मायकल पंडीत, जवान विरेंद्र वाघ, राहुल जगताप, विजय पवार व गणेश वाघ- यांनी यशस्वीरित्या पार पाडली. सदरील कारवाई करिता व विभागाचे निरीक्षक सुनिल देशमुख व त्यांचा स्टाफ, क विभागाचे निरीक्षक जी. पी. साबळे व त्यांचा स्टाफ, नाशिक भरारी पथकाचे निरीक्षक जयराम जाखेरे व त्यांचा स्टाफ, तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रोहीत केदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार कुलकर्णी, पोलीस नाईक नाईक, पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई महाले, यांनी मदत केली.

------------------------------------------------------------------------
=====================================
उप : - संपादक एस व्ही वाघ शब्द...✍️✅️🇮🇳... रचना संकलन वार्ता...
=====================================
------------------------------------------------------------------------


'दप्तर 'कथासंग्रहप् स्व.प्रा.रायभान दवंगे यांचा 'दप्यांच्या 'ग्रासत्य आणि प्रबोधनाची संस्कारशिदोरी = राहूल पटारेपाटील

श्रीरामपूर - प्रतिनिधि - समाचार

रयत शिक्षण संस्थेत दीर्घकाळ मराठी विषयातील विद्यार्थीप्रिय प्रा.रायभान दवंगे यांचा 'दप्तर'हा ग्रामीण कथासंग्रह समाजातील सामाजिक,शैक्षणिक जीवनातील सत्य परिस्थितीचे चित्रण करणारा आहे,ह्या कथा समाजप्रबोधनाची संस्कारशिदोरी असल्याचे मत टाकळीभान येथील साहित्यप्रेमी, टाकळीभान विकास सोसायटीचे मा.चेअरमन राहूल अप्पासाहेब पटारे पाटील यांनी व्यक्त केले.
  टाकळीभान येथील साहित्य परिवारातर्फे आषाढी एकादशीनिमित्त प्रा. रायभान दवंगे यांच्या 'दप्तर 'ग्रामीण कथासंग्रहाचे परिसंवादात्मक पुस्तक प्रकाशन साहित्य परिवार दालनात संपन्न झाले, त्याप्रसंगी राहूल पटारे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील ॲड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. संयोजक व साहित्य परिवाराचे संस्थापक, अध्यक्ष कवी प्रा. पोपटराव पटारे पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक करून कमालपूर येथील स्व.प्रा.रायभान दवंगे यांचे साहित्यिक, शैक्षणिक योगदान सांगून एक प्रभावी ग्रामीण साहित्यिक असलेले प्रा. दवंगे यांचे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आणि साहित्य दुर्लक्षित राहिले आहे. त्यांच्या कथेवर चित्रपटआणि नाट्यप्रयोग नियोजन करण्यात आले होते.पुणे येथील टिळक सभागृहात महाराष्ट्रातील ज्या बारा प्रतिभासंपन्न साहित्यिकांचा सन्मान सोहळा झाला, त्यात प्रा. दवंगे यांना सर्वात मानाचा पुरस्कार लाभला,
त्यांचे निधन झाले पण त्यांच्या साहित्यकार्याचे महत्व लक्षात घ्यावे अशी अपेक्षा प्रा.पटारे यांनी व्यक्त केली.यावेळी प्रस्तावना लिहिणारे प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कथासंग्रहाचे सामाजिक व वाड्.मयीन मूल्यमापन केले. प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी कोपरगांव येथील नोकरी करतानाचे प्रा.दवंगेविषयक अनुभव सांगितले.यावेळी सौ. सुनीताताई पटारेपाटील, सौ.अंजली पटारेपाटील, हेमंत पटारेपाटील, पंकज पटारेपाटील, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन लहू कोल्हे पाटील आदी उपस्थित होते.प्रमुख पाहुणे राहूल पटारेपाटील यांनी प्रा. दवंगे यांचे साहित्यिक कार्य व प्रेमळ, संवेदनशील स्वभाव अनुभव सांगितले.टाकळीभान ज्ञानज्योती बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी साहित्य परिवाराने आयोजित केलेला साहित्य उपक्रम हा साहित्यनिर्मितीला, ग्रामीण नवोदित साहित्यिकांना प्रेरणादायी, स्तुत्य असा कार्यक्रम असून प्रा. रायभान दवंगे यांच्यासारख्या गुणशील प्रभावी, ग्रामीण साहित्यकांची दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला.प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्ष भाषणातून या उपक्रमाचे कौतुक केले.ते म्हणाले, टाकळीभान नाव उच्चारताच पटारेपाटील परिवार समोर येतो, या परिवाराने कौटुंबिक, सामाजिक,राजकीय, कृषी, व्यवसाय क्षेत्रात आदरणीय अशी प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. प्रा.रायभान दवंगे यांचे ग्रामीण साहित्यात मोठे योगदान आहे. 'दप्तर 'या नावातच शिक्षणाचे महत्व लक्षात येते.ज्याने दप्तर पाहिले नाही, त्याला शिक्षण मिळतं नाही, दप्तर म्हणजे ज्ञानाची शिदोरी आहे,अशी ज्ञानशिदोरी देण्यासाठी, घेण्यासाठी अनेकांचे कष्ट, योगदान आहे. प्रा.पोपटराव पटारे, प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये यांनी नगरजिल्ह्यात सतत दुर्लक्षित लेखक, कवींची दखल घेतली.स्वखर्चातून ते असे कार्यक्रम घेतात,ही खरी साहित्यसेवा म्हटली पाहिजे,असे उपक्रम प्रसिद्धसाठी, वृत्तपत्रात नाव येण्यासाठी नाहीत तर नि:स्वार्थ भावाने केलेली ही साहित्यभक्ती आहे. असे उपक्रम घेण्यासाठी तशी विचारधारा असावी लागते.वेळ, पैसा, नियोजन, लोकसंग्रह आणि निरपेक्षदृष्टी असावी लागते, साहित्य ही अमृतवाणी आहे.ती समाजपर्यत पोच करणे ही संवेदनशीलता पाहिजे.सगळेजण साहित्य उपक्रमाला प्रसिद्ध देतात असे नव्हे पण एखाद्या सेतूकार्यातील खारुताईसारखे हॆ कार्य छोटे असले तरी ते प्रामाणिक आहे, हॆ काम साहित्य परिवार, वाचन संस्कृती प्रतिष्ठान करीत आहे, असे सांगून प्राचार्य शेळके यांनी कथासंग्रहाचे महत्व सांगितले.प्रा. डॉ बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर हेमंत पटारे पाटील यांनी आभार मानले.

    ((( संकलन )))
 समता न्यूज नेटवर्क,
श्रीरामपूर - 9561174111

विठू माऊली तू माऊली जगाची,माऊली त मुर्ती विठ्ठलाची...

श्रीरामपूर : -
*आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा* !!

- *अनुराधा गोविंदराव आदिक*
मा.विश्वस्त - श्री साईबाबा संस्थान,शिर्डी.
मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा - श्रीरामपूर नगरपरिषद.
अध्यक्षा - महाराष्ट्र कृषक समाज.

आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिनी मंदिर,टाकळीभान यथे अनुराधा ताई आदिक यांनी व इतर त्यांच्या सोबत असल्याले सहकार्याने घेतलं दर्शन...

श्रीरामपूर : -
आज आषाढी एकादशीनिमित्त *विठ्ठल रुख्मिनी मंदिर,टाकळीभान*येथे*विठु माऊलीचे*मनोभावे दर्शन घेतले.याप्रसंगी बापूसाहेब पटारे,शहराध्यक्षा सौ.अर्चनाताई पानसरे,मगर सर,अनिरुद्ध भिंगारवाला व अर्जून आदिक उपस्थित होते.

- *कु.अनुराधा गोविंदराव आदिक*
मा.विश्वस्त - श्री साईबाबा संस्थान,शिर्डी.
मा.लोकनियुक्त नगराध्यक्षा - श्रीरामपूर नगरपरिषद.
अध्यक्षा - महाराष्ट्र कृषक समाज.