राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, October 29, 2023

महाराष्ट्र 5-S फाउंडेशन (रजिस्टर्ड) की ओर से--* *+ जाहिर आवाहन+* *+विजयादशमी दशहरा की सभी को शुभकामना+*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

(((- महाराष्ट्र 5-S फाउंडेशन-)))
इस संघटना का
*उद्देश* सिर्फ विद्यार्थियों के प्रगति के लिए संपूर्ण राष्ट्र में कार्य करना यह है। इसके लिए *(1)शिक्षा(2) सुरक्षा(3) सहयोग(4) सेवा (5)संगठन; का विकास वाल्मीकि मेहतर समाज जैसे वंचित समाज में हम करना चाहते हैं। इस पांच तत्वों का विकास यह संघटना करना चाहती है। इस महान कार्य में आपका सहयोग यह संगठन महाराष्ट्र के लिए चाहती है। महाराष्ट्र में राज्य, जिला और तालुका स्तर पर यह संगठन अपनी शाखाएं स्थापित करना चाहती है ।आपका इस महाराष्ट्र संघटना से जुड़ना देश की राज्य की और समाज की स्थिति चंद महिनो में ही बदल सकती है। जो विद्यार्थी, शिक्षण क्षेत्र में पहले से ही व्यक्ति या संगठन के पदाधिकारी के रूप में कार्य कर रहा है उनका भी हमें सहयोग चाहिए। हम सब लोग मिलजुल कर समझदारी के साथ भविष्य में एक अच्छी पीढ़ी का निर्माण करेंगे। जो भी कार्य करनेवाला कार्यकर्ता इस सिर्फ शिक्षण क्षेत्र में कार्य करना चाहता है उसने उसका नाम, पता और मोबाइल नंबर *श्री महेश जाधव(पुणे) महासचिव* मोबाइल नंबर 9834226519 या *श्री कुमार बिड़लन सहसचिव (लोणंद)* मोबाइल नंबर 9922121701इनके पास दे तथा इनसे संपर्क करें यह विनंती है। धन्यवाद!
 विनीत,

===================================
---------------------------------------------------
*नरोत्तम चव्हाण*✍️✅🇮🇳
मो.9850545605
(अध्यक्ष महाराष्ट्र 5-एस फाउंडेशन-रजिस्टर्ड)
---------------------------------------------------
===================================


*कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्र.भाषा संचालकपदी प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांची नियुक्ती; मान्यवरांकडून अभिनंदन*💐✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

सातारा - प्रतिनिधि - / वार्ता -
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.सुभाष वाघमारे यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रभारी भाषा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डी.टी.शिर्के यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलसचिव प्रा.डॉ.विजय कुंभार व विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता उपस्थित होते. नियुक्तीनंतर महाविद्यालयात प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, यशवंत मनोहर, किशोर बेडकिहाळ ,लेखक बाळासाहेब कांबळे ,कुंदा लोखंडे,सतीश मस्के,डॉ.प्रशांत गायकवाड ,निलेश महिगावकर,डॉ.विश्वनाथ शिंदे, डॉ.सुधाकर शेलार,डॉ.बाबुराव उपाध्ये,डॉ. शिवकुमार सोनाळकर,डॉ.दत्ता पाटील,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अनेक सदस्य ,प्रा.चंद्रकांत जडगे, रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक ,शाहीर शाम रोकडे , समता प्रतिष्ठान मळोलीचे सदस्य , तसेच मराठी विभागातील प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले. 
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील,माळशिरस तालुक्यातील मळोली हे असून त्यांचे महाविद्यालयीन ११ वी ते एम.ए.पर्यंतचे शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झालेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल ,फुंडे ,कर्जत ,माढा ,मंचर ,लोणंद ,पाचवड येथील महाविद्यालयात त्यांनी मराठी विषयाचे ३३ वर्षे अध्यापन केलेले आहे. अलीकडेच त्यांचे ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव व मी भारतीय हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून जवळपास २२ पुरस्कार त्यांच्या कवितासंग्रहास मिळालेले आहेत. महाविद्यालयीन वार्षिक नियतकालिकासह रयत शिक्षण संस्थेच्या रयत शिक्षण पत्रिकेच्या संपादनात देखील काम केलेले आहे . विवेक वाहिनी सारख्या विद्यार्थ्यांना स्वयंविकास करणाऱ्या उपक्रमात त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. महाविद्यालयात मराठी विभागात नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करून सतत प्रयोगशील राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. आधुनिक सम्यक विचारांचा पुरस्कार करीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरित केलेले आहे. वक्तृत्वावर त्यांचे प्रेम असून त्यांनी वक्तृत्व कला विकास कार्यशाळेसारखे उपक्रम आयोजित करून भाषा विकासासाठी प्रयत्न केले आहेत. भाषा ,साहित्य ,संशोधन ,उपयोजित लेखन ,संपादन यात त्यांना रस असून सतत कार्यमग्न असतात.मराठी भाषा ,संस्कृती व आदिवासी बोलीभाषा यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठीचे वातावरण तयार करणे ,त्यांची जोपासना करणे या उद्दिष्टासाठी भाषामंडळ काम करते. भाषा मंडळद्वारे विविध भाषा ,संस्कृती ,आदिवासी बोली संदर्भाने पदविका कोर्सेस सुरु करणे,इत्यादी उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. अनेक मान्यवरांनी विद्यापीठातील भाषा संस्कृतीचे अभ्यास कार्य गतिमान करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले आहे.

===================================
---------------------------------------------------
*वृत्तविशेष सहयोग*
प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये (सर) श्रीरामपूर 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================7

Saturday, October 28, 2023

श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे या मागणीसाठी पुन्हा श्रीरामपूर कर एकत्रित ?


श्रीरामपूर - प्रतिनिधि - /वार्ता -
श्रीरामपूर शहर व तालुक्यातील सर्वच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा ‘श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय’ व्हावे, या मागणीसाठी पुन्हा एकदा श्रीरामपूरकर एकत्रित मंगळवारी विजयादशमीच्या दिवशी अनेकांनी श्रीरामपूर जिल्हा व्हावा, असे साकडे श्रीराम प्रभूंच्या चरणी घातले.


क्षेत्रफळाच्यादृष्टीने सर्वात मोठा असणार्‍या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही अनेक दिवसांपासूनची येथील नागरिकांची मागणी नव्हे तर.. हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय होत आहे. जिल्हा मुख्यालय होण्यासाठी सर्वच सोय नुसार परिस्थिती श्रीरामपूरमध्ये अनुकूल असल्याने ही मागणी जोर धरत आहे.

जिल्हा मुख्यालयाच्या बाबत आमदार लहू कानडे म्हणाले, श्रीरामपूर जिल्हा व्हावा, हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. मी आमदार झाल्यानंतर हाऊसमध्ये देखील अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयाचा विषय घेतला होता. श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विविध आंदोलने करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी मी तयार असल्याचे आ. लहू कानडे यांनी सांगितले.

माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, माजी मंत्री खा. स्व. गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे यासाठी खुप प्रयत्न केले. जिल्हा होण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी त्यांनी श्रीरामपूर याठिकाणी आणल्या होत्या. श्रीरामपूर जिल्हा व्हावा, ही आमचीही प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत

माजी उपनगराध्यक्ष रवी गुलाटी म्हणाले, प्रभू श्रीरामाला व सीतामातेला सीता हरण होईल याची कल्पना नव्हती. परंतु श्रीरामपूर जिल्ह्याचे हरण होणार आहे. याची कुणकुण श्रीरामपूरकरांना आधीच लागलेली आहे. म्हणून सावध व्हा.. जोपर्यंत श्रीरामपूर जिल्हा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका, जिल्ह्याचे ठिकाण दुसरीकडे गेल्यास श्रीरामपूरचे वाटोळे निश्चित आहे. सर्वांनी एकत्रित येऊन श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी लढा उभारा, जोपर्यंत श्रीरामपूर जिल्हा होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसू नका त्यामध्ये सातत्य ठेवा, असे ते म्हणाले.

श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी प्रताप नाना भोसले यांनी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीची स्थापना करून जिल्हा मुख्यालय होण्यासाठी शहरात सह्यांची मोहीम राबविली, श्रीरामपूर बंदची हाक देऊन बंदही यशस्वी केला होता. अनेक मंत्र्यांना निवेदनेही दिली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये जिल्हा कृती समितीचा लढा कमी पडला. त्यानंतर राजेंद्र लांडगे यांनी या लढ्यात सातत्य ठेवले. स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, कार्याध्यक्ष बाबा शिंदे व उपाध्यक्ष संदीप मगर यांनी या लढ्यात उडी घेतली.

गेल्या काही दिवसांपासून हा लढा काहीसा थंडावल्याचे वाटत होते परंतु आता श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, या मागणीसाठी श्रीरामपूरकर पुन्हा एकदा सर्व घटक सोबत आल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता श्रीरामपुरातील पुढार्‍यांना तसेच नागरिकांनाही आता रस्त्यावर उतरावे लागणार आहे. विविध मार्गाने आंदोलने करून श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे.

नगर जिल्ह्याचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नवीन जिल्हा होणार! नाहीतर जिल्हा विभाजन होणार नाही व इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हा मुख्यालय होऊ देणार नाही, असा श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचा ठाम निर्धार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांनी सांगितले.

-^--^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^
===================================
श्रीरामपूर जिल्ह्यासाठी लाक्षणिक उपोषण
---------------------------------------------------
===================================

श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्यावतीने श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी शनिवार दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 पासून पुढे दोन तास लाक्षणिक उपोषण गांधी पुतळा येथे करण्यात आले आहे. लोकशाही मार्गाने होणार्‍या या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे व प्रशासनाचे श्रीरामपूर जिल्हा व्हावा या श्रीरामपूरकरांच्या मागणीबाबत लक्ष वेधण्यात आले

===================================
---------------------------------------------------
: - सह,संपादक - रंजित बतरा -संकलन...✍️✅🇮🇳...वार्ता...
---------------------------------------------------
===================================





*आली आली आली श्रीरामपूरात सर्कस आली !**अन् सर्कस बघण्यासाठी मोठी गर्दी झाली !!*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*श्रीरामपूर शहरात पाच वर्षांनंतर*
*उभारला गेला सर्कशीचा तंबू !*

 *१०७ कलाकारांच्या ताफ्यासह बिंगो सर्कस १३ ऑक्टोबर पासून ५ नोव्हेंबर पर्यंत करणार श्रीरामपूरकरांचे मनोरंजन*

*दिपक कदम - श्रीरामपूर*
श्रीरामपूर शहरात व तालुक्यातील जनतेसाठी येत्या १३ ऑक्टोबर पासून श्रीरामपूर शहराच्या पश्चिमेस संगमनेर रोडवरील बुवा मंगल कार्यालय समोरच्या मोकळ्या व प्रशस्त जागेत बिंगो सर्कस आलेली आहे.या सर्कशीत १०७ कलाकार असून ते केवळ मनोरंजन करणार असल्याचे व्यवस्थापक माणिक खांडेकर यांनी सांगितले. 
सर्कस मालक सुनिल चौहान यांनी कोरोना काळात आमच्या सर्व कलाकारांना दोन ते तीन महिने सांभाळले.कोरोना काळात सर्व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती.ती चौहान यांनी त्यांच्या परीने सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला.त्यांच्यावर सर्कस मधील सर्वच प्राणी विकण्याची वेळ त्यांच्यावर आली.त्यानंतर लाॅकडाऊन कालावधी वाढल्यामुळे प्रत्येक कलाकार आपल्या गावी निघून गेले. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश याठिकाणी राहणारे कलाकार गावाकडे रवाना झाले. त्यांनी मिळेल ते काम करत आपला उदरनिर्वाह केला.आणि त्यातूनही वेळ मिळेल तेव्हा सर्कशीतील कसरतीचा सराव देखील केला.सुनिल चौहान यांनी सरकारकडे आर्थिक मदतीची याचना न करता फक्त आम्हाला आमचे काम करून आमच्या कष्टाचे पैसे मिळून द्या.अशी विनंती केली.आणि तत्कालीन सरकारने मनोरंजन कार्यक्रमावरील बंदी हटवली. त्यामुळे मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम सूरु झाले.आणि जवळजवळ पाच वर्षांच्या कालावधीनंतर श्रीरामपूर शहरात सर्कस आली आहे.खुपच आनंदी वातावरणात बिंगो सर्कशीचे आगमन झालेले आहे. ही सर्कस ५ नोव्हेंबर पर्यंत आपल्या श्रीरामपूर शहरात मनोरंजन करून त्यांच्या शुभेच्छा घेऊनच पुढचा मुक्कामाला जाणार असल्याचे व्यवस्थापक माणिक खांडेकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार या‌द्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर*


अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार या‌द्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

*या कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक* 
*खालीलप्रमाणे आहे*

२७ ऑक्टोबर २०२३ एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी, ४,५ नोव्हेंबर व २५, २६ नोव्हेंबर, २०२३ विशेष मोहिमांचा कालावधी (प्रत्येक मतदान केंद्रावर), २६ डिसेंबर २०२३ दावे व हरकती निकाली काढणे १ जानेवारी २०२४ अंतिम प्रसिद्‌धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी या‌द्याची छपाई, ५जानेवारी, २०२३ मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी, सहा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय संबधित मतदान केंद्रावर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करावी. दि.१ जानेवारी, २०२४ दि.१ एप्रिल २०२४ दि.१ जुलै २०२४ व दि.१ ऑक्टोबर, २०२४ रोजी १८ वर्ष पूर्ण करणा-या मतदारांनी नमुना ६ अर्ज भरून द्यावेत व त्या त्या अर्हता दिनांकास त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. दि.२७ ऑक्टोबर २०२३ ते दि. ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. यात नागरिकांनी जास्तीत जास्त मतदार म्हणून नाव नोंदणी करावी व नागरिकांनी नावाची खातरजमा करून नाव समाविष्ट करणे, नाव, पत्ता बदल करणे, नावांची वगळणी करणे इ. बार्बीकरीता नमुना ६,७,८ भरून देण्यासाठी आपले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) अथवा तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. तसेच ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये एका विशेष ग्रामसभेचे आयोजन दि. २७ ऑक्टोबर २०२३ ते दि.०४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहे. या काळात ग्रामसभेमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्या अंतर्गत
नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रिया, गावात कायमस्वरुपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल. या कार्यक्रमामध्ये युवा मतदारांची नौदणी वाढण्यासाठी महाविद्यालयामध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट मतदार मित्र महावि‌द्यालय पुरस्काराचे आयोजन करण्यात येणार आहे. शंभर टक्के मतदार नोंदणी केलेल्या आणि मतदार जागृती उपक्रम राबविणा-या महावि‌द्यालयांना पुरस्कार दिले जाणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:* ✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



*तहसीलदार रविंद्र होळी आणी महेंद्र वाकलकर यांच्या संपत्तीची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी: भा.ऑ.मी.सु.फो.इंडियाची मागणी*


चंद्रपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसीलदार रविंद्र होळी आणी कोरपना तहसीलदार महेंद्र वाकलकर आणी खनिजकर्म अधिकारी .श्री नैताम यांच्या संपत्तीची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी अशा मागणीचे निवेदन भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष अय्यूबभाई कच्छी आणी पदाधिकाऱ्यांमार्फत मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले आहे की,चंद्रपुर जिल्ह्यातील मूल तहसील कार्यालयात कार्यरत तहसीलदार रविंद्र होली आणी कोरपना तहसील कार्यालयात कार्यरत तहसीलदार महेंद्र वाकलकर यांच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी येत असून काही दिवसांपासून प्रसार माध्यमात यांच्या गैरकारभाराच्या बातम्या देखील सातत्याने प्रकाशित होत आहे, 
मात्र वरिष्ठ अधिकारी आणी संबंधीत महसूल प्रशासन यावर उचित कार्यवाही करणेबाबत का टाळाटाळ करत आहे,त्यांचेही सदरील प्रकरणी हात ओले तर होत नाहीना? असा संशय बळावत आहे.
आपल्या कार्यकाळात या दोन्ही अधिकाऱ्यांनी संबंधित रेती (वाळू) घाट ठेकेदारांशी संगनमत करून अनैतिकतेच्या मार्गाने या कोट्यावधींची आडमाफ बेनामी संपत्ती जमा केल्याचे बोलले जात असुन शासनाच्या गौनखनिज संपंतीची ज्यांना रक्षा करण्यासाठी नेमले तेच भक्षक बनल्याचे चित्र दिसून येत आहे.
अशा प्रकारे जेव्हा रक्षकच भक्षक बनतील तर मग शासनाच्या संपंतीचे रक्षण करणार कोण?
याकरीता सामाजिक संघटनांना पुढाकार घेणे क्रमप्राप्त ठरत आहे.
 चंद्रपूर जिल्ह्याच्या मुल आणी कोपरना या दोन्ही तालुक्यातील विद्यमान तहसीलदार यांनी गैरमार्गाने कमावलेल्या आडमाफ संपत्तीची सखोल चौकशी होणे कामी भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष अय्यूबभाई कच्छी यांच्या वतीने दि. २७ ऑक्टोंबर २०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना निवेदन देण्यात आले.
 या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की,नलेश्वर मोकासा आणी चकनलेश्वर रेती घाट या दोन्ही घाटांवरील घाटधारक ठेकेदारांशी मूल चे तहसीलदार रविंद्र होली यांची भागीदार तर नव्हेना? असा आरोपही त्यांनी केला आहे.
याकरीता सदरील प्रकरणी निःपक्षपाती चौकशी होणे आवश्यक असल्याचे देखील म्हटले आहे.
सदरील प्रकरणी २०२१ से २०२३ पर्यंत या तीन्ही अधिकाऱ्यांच्या संपत्ती ची चौकशी झाल्याच दुधाचे दुध आणी पाण्याचे पाणी हे सिद्ध होईल असेही शेवटी म्हटले आहे.

*कान्हुर पठार उपसा सिंचन योजनेबाबत* *प्रशासन सकारात्मत - रघुनाथ आंबेडकर*


अहमदनगर -  प्रतिनिधि -/ वार्ता -
जिल्ह्यातील पारनेर निमा पारनेर तालुका आजही दुष्काळी जिवन जगत आहे म्हणुन " कान्हुर पठार उपसा सिंचन योजना "मंजुर व्हावी या करीता राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभाग - पुणे कार्यालयास दी .२१ / ५ /२०२३ रोजी सदर योजना व्हावी म्हणुन लेखी पत्र दिले होते.
परंतु प्रशासनाने त्या विषयाची गांभिर्याने दखल न घेतल्याने भाजपा कामगार मोर्चा , पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी जलसंपदा विभाग पुणे यांना दि. ९ / ९/ २० २३ रोजी दुसरे स्मरणपत्र दिले व सदर योजनाचा प्रशासनाने विचार न केल्यास दि. ३० / १० / २०२३ रोजी पासुन हनुमंत धुमाळ (मुख्य अभियंता - विप्र ) जल संपदा विभाग पुणे यांचे कार्यालयासमोर "बेमुदत आमरण उपोषण " करील असा तिव्र इशारा दिल्याने प्रशासनाचे अधिकारी विलास हंडे यांनी वेळीच दखल घेऊन "प्रकल्प फेर नियोजनात घेतला आहे याकरीता उपोषण करु नये"असे सखोल चर्चेअंती छोटेखानी बैठकीत समजावून सांगितले.तथा
श्री.आंबेडकर यांना लेखी विनंती पत्र दिल्याने त्यामुळे दि.३० / १० / २० २३ रोजीचे त्यांचे उपोषण तात्पुरते स्वरूपात स्थगित करण्यात आले असून दि .१५/ १२ /२०२३ पर्यंत सर्व्हेक्षण पुर्ण न केल्यास दि.१६ /१२ / २०२३ रोजी पासून 'उपोषण' केले जाईल असे देखील या बैठकीत ठरविण्यात आले. 
याप्रसंगी प्रकल्प अधिकारी विलास हंडे , गणेश सिनलकर,, वसंतराव शिंदे , अब्बास मुजावर शेठ , सुधीर तांबे , बबनराव डावखर , चंद्रकान्त कुलकर्णी,डॉ. सुरेश खणकर आदी मान्यवर उपस्थित होते 
 प्रशासनाने दि. १५ / १२ / २०२३ पर्यन्त प्रकल्प अहवाल शासनास सादर केला नाही तर जल संपदा विभाग , पुणे कार्यालया समोर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही श्री.आंबेडकर यांनी जलसंपदा विभाग , पुणे कार्यालयातील अधिकारी यांना दिला आहे.

===================================
---------------------------------------------------
 पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
====================================