राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, November 10, 2023

*भारताच्या अर्थशास्त्राच्या नोबेलची २५ वर्ष*🌹🥀🌺🌷🌸 ❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
(((भारताच्या अर्थशास्त्राच्या नोबेलची २५ वर्ष)))

 अमर्त्य सेन यांना कल्याणकारी अर्थशास्त्रातील योगदान आणि गरिबी, असमानता आणि सामाजिक निवड सिद्धांतावरील त्यांच्या कार्यासाठी १९९८ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले २०२३ या वर्षी ह्या जागतिक घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली आहेत . अमर्त्य सेन यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. ज्यांना अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जाते १९१३ मध्ये हा पुरस्कार पटकावणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होते. ज्यांनी शांतिनिकेतनमध्ये जन्मलेल्या या भावी अर्थशास्त्रज्ञाचे ‘अमर्त्य’ असे नामकरण त्या वेळी केले होते. अमर्त्य सेन म्हणजे जागतिक कीर्तीचे मानवतावादी बुद्धिप्रामाण्यवादी भारतीय अर्थशास्त्रज्ञ त्यांचा जन्म कलकत्ता येथे सुशिक्षित आणि सधन कुटुंबात झाला. सेन यांचे जीवन आणि त्यांची कामगिरी ही विशेषत: शिक्षणवेत्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांचे शिक्षण ढाका, शांतिनिकेतन, प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले.  प्रत्येक टप्पा त्यांनी सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण केला आणि केंब्रिज विद्यापीठातही ते बीएमध्ये पहिले आले. नंतर तेथेच त्यांनी पीएचडी केली. ते जाधवपूर विद्यापीठात त्यांच्या विभागाचे सर्वात तरुण अध्यक्ष होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी दिल्ली स्कूल, ऑक्सफर्ड, केंब्रिज, हार्वर्ड आणि इतर अनेक ठिकाणी अध्यापन कार्यही केले आहे. ते नेहमीच त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय शिक्षक राहिले आहेत. त्यांचे कार्य विसाव्या शतकातील महान अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांच्या वचनाचे जिवंत उदाहरण घालून देणारे आहे. केन्स म्हणाले होते की, निहित स्वार्थ आणि धडपडींचा नव्हे, तर प्राणपणाने कवटाळलेल्या कल्पना, धारणांचाच शेवटी विजय होतो. सेन यांनी केलेली सामाजिक निवड,भूक आणि दुष्काळ, न्याय आणि स्वातंत्र्य याविषयी त्यांच्या कल्पना दीर्घकाळ प्रचलित राहतील. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांबद्दलही ते स्पष्टपणे बोलत आले आहेत. एकदा तीन हजार विद्यार्थ्यांसमोर एका मोठय़ा सभेत त्यांना उत्सुकतेने एक प्रश्न विचारण्यात आला, ‘‘सर, भारत महासत्ता कधी होणार?’’ ज्यावर त्यांनी उत्तर दिले की, त्यांना या शोधात अजिबात रस नाही त्यांना आर्थिक विषमत भारतातून कमी होऊन शिक्षण आरोग्य सुविधा समाजातील शेवटच्या वर्गाला मिळेल तरच भारताच्या महासत्ता होण्याला अर्थ आहे असे ते म्हणत .
सेन यांचे कल्याणकारी अर्थशास्त्रावरील कार्य विशेषतः प्रभावशाली ठरले आहे आणि त्यांच्या कल्पनांनी आर्थिक कल्याणाचे वितरण आणि गरिबी आणि असमानतेचे मोजमाप याविषयी अर्थशास्त्रज्ञांच्या विचारसरणीला आकार देण्यास मदत केली आहे. सामाजिक निवड सिद्धांतावरील त्यांच्या कार्याद्वारे, सेन यांनी व्यक्तींच्या पसंती समजून घेण्यासाठी आणि त्यांना एकत्रितपणे एकत्रित प्राधान्य कसे बनवता येईल हे समजून घेण्यासाठी बहु-विषय दृष्टिकोन घेण्याचे महत्त्व दाखवून दिले आहे. या कार्याचा अर्थशास्त्राच्या क्षेत्रावर खोलवर परिणाम झाला आहे आणि गरिबी आणि असमानता मोजण्यासाठी नवीन पद्धती विकसित झाल्या आहेत.
सेन यांना दुष्काळ आणि अन्नटंचाईची कारणे यावरील त्यांच्या कार्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते. १९४३ च्या बंगालच्या दुष्काळावरील त्यांच्या कार्यासाठी ते प्रसिद्ध आहेत, ज्याचा त्यांनी तपशीलवार अभ्यास केला आणि दुष्काळ आणि अन्नटंचाईची मूळ कारणे शोधण्यासाठी केस स्टडी म्हणून वापरली. 
बंगालच्या दुष्काळावरील त्यांच्या कार्याद्वारे, सेन यांनी दुष्काळाच्या विकासातील आर्थिक आणि राजकीय घटकांचे महत्त्व अधोरेखित केले आणि समस्या समजून घेण्यासाठी बहु-विषय दृष्टिकोन घेण्याचे महत्त्व दाखवले.
सेन यांनी अनेक सन्माननीय पदे भूषविली : इकॉनॉमिक सोसायटीचे अध्यक्ष (१९८४), द इंटरनॅशनल इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९८६-८९), इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९८९) व अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्ष (१९९४). सेन यांनी कल्याणाच्या अर्थशास्त्राला नवा अर्थ, नवी दिशा दिली त्याला तात्त्विक-नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांच्या कार्याचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या. कल्याणकारी अर्थशास्त्र, सामाजिक निवडीचा सिद्धांत तसेच दारिद्र्याच्या प्रश्नावर केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला (१९९८). नंतर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्राप्त झाला (१९९९). त्याच वर्षी बांगला देशाने त्यांना आपल्या देशाचे सन्माननीय नागरिकत्व दिले. २०१२ मध्ये अमेरिकेने त्यांना नॅशनल ह्यूमॅनिटी मेडल देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार पहिल्यांदाच बिगर अमेरिकन तज्ज्ञाला दिला गेला.
सेन यांनी चीनमधील बीजिंग विद्यापीठातील ‘सेंटर फॉर ह्यूमन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्टडीज’चे संचालक म्हणून उत्कृष्ट काम केले आहेत..१९ जुलै २०१२ रोजी त्यांची नालंदा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली होती 
१९८१ साली सेन यांनी गरिबी आणि दुष्काळ हे पुस्तक प्रकाशित केले ज्यात त्यांनी असा युक्तिवाद केला की दुष्काळ केवळ अन्नाच्या अभावामुळेच नव्हे तर अन्न वितरणासाठी यंत्रणेत बांधलेल्या विषमतेमुळे होतो सेन यांच्या इतर लेखनात डेव्हलपमेंट अॅज फ्रीडम (१९९९); तर्कशुद्धता आणि स्वातंत्र्य (२००२), सामाजिक निवड सिद्धांताची चर्चा; द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन: रायटिंग्ज ऑन इंडियन हिस्ट्री, कल्चर अँड आयडेंटिटी (२००५); एड्स सूत्र: अनटोल्ड स्टोरीज फ्रॉम इंडिया (२००८) अश्या प्रसिध्द ग्रंथ पुस्तकांची यादी आहे.
 अशा प्रकारे सेन यांचे जीवन आणि त्यांची कामगिरी योगदान ही विशेषत: शिक्षणवेत्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आजही सेन हे अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आणि महत्त्वाच्या आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चेत आघाडीवर आहेत. त्यांच्या कल्पना आणि योगदानाचा अर्थशास्त्राच्या क्षेत्रावर कायमस्वरूपी प्रभाव पडला आहे आणि इतर अनेक अर्थतज्ञांना या महत्त्वाच्या समस्या हाताळण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.म्हणून तर ते वयाच्या १०० वर्षाच्या जवळपास जाऊन देखील आज अनेक आर्थिक सामाजिक प्रश्नांची उत्तरे देऊन करोडो तरुण युवा वर्गाचे आदर्श आहेत .
-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*शब्दांकन:*✍️
= प्रा. गणेश शेळके 
अर्थशास्त्र विभाग प्रमुख 
कला वाणिज्य विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आश्वी खुर्द,ता. संगमनेर जि. अहमदनगर
===================================
*वृत्तविशेष सहयोग*
*ज्येष्ठ पत्रकार गुलामरसुलभाई जहागीरदार* 
(उर्फ जी.एम.) अहमदनगर 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


Wednesday, November 8, 2023

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ९ वी व ११ वी मध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्यास १५ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ🌹🥀🌺🌷🌸❤️✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववी व अकरावी (सत्र २०२४-२५) मध्ये निवड चाचणीद्वारे प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इयत्ता नववी करिता
https://cbseitms.nic.in/2023/nvsix, 
इयत्ता अकरावीसाठी https://cbseitms.nic.in/2023/nvsxi 11 अथवा https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 या संकेतस्थळाला भेट देऊन विनामूल्य अर्ज करू शकतात, अशी माहिती प्राचार्य,जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

===================================
--------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


श्रीरामपूरात क्रांतिकारक राघोजी**भांगरे जयंती उत्साहात साजरी 💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
शहरातील आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांच्यावतीने दर वर्षाप्रमाणे यावर्षीही बुधवार दिनांक ०८ नोव्हेबर २०२३ रोजी आदिवासी समाज भुषण थोर क्रांन्तीकारक राघोजी भांगरे यांची जयंती मोठ्या उत्साहात सादरी करण्यात आली.
सकाळी ९.३० वाजता त्यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ लगोटे, बाळासाहेब काशिद सुधिर अप्पा वायखिडे राजु साबळे, गोरख दौडे, सोमनाथ पांजरे, भरत शेंगाळसर, बंडु कोरडे सर, रमेश मासरे, राजु गायकवाड सर, भगवान काशिद सर, किशोर जगताप सर, विजय आगलावे सर, बाबा वाघ सर, किशोर लगोटे, सनी लगोटे आदि सर्व समाज बांधव उपस्थित होते. सदरील जयंती कार्यक्रम वार्ड क्रं .४ चाटुफळे मार्ग, पराग प्लाझा बाजार रोड अशोक बेकरी जवळ आदिवासी महादेव कोळी समाज संघटना कार्यालय श्रीरामपुर जि अहमदनगर याठिकाणी साजरा करण्यात आला.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


Tuesday, November 7, 2023

*’वर्ल्ड सामना’ मुळे दिवाळीची मेजवाणी अधिक लज्जतदार झाली - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*🌹🥀🌺🌷🌸❤️✅🇮🇳...

-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*वर्ल्ड सामना दिवाळी अंकाचे प्रकाशन*
{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठया शहरातही दर्जेदार दिवाळी अंक दिसत नाहीत. मात्र श्रीरामपूर येथील सौ.स्नेहलता प्रकाश कुलथे संपादित वर्ल्ड सामना दिवाळी विनोदी विशेषांकामुळे दिवाळीची मेजवाणी अधिक लज्जतदार झाली असून आजच्या मोबाईलमय झालेल्या पिढीने असे दिवाळी अंक जरूर वाचले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 
   नागपूर येथे मंत्री गडकरी यांच्या शुभहस्ते त्यांच्या निवासस्थानी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात वर्ल्ड सामना दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी ना.गडकरी बोलत होते. 
यावेळी राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, मुख्य संपादक प्रकाश कुलथे, कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मंत्री गडकरी यांचा कुलथे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे यांनी प्रास्ताविकात वर्ल्ड सामना दिवाळी अंकाची वाटचाल आणि गुणवत्ता यांची माहिती दिली.
यावेळी मंत्री ना. गडकरी यांनी 'वर्ल्ड सामना 'दिवाळी अंक मनापासून चाळत प्रत्येक विनोदी कथा, संशोधन लेख, कविता, चारोळ्या, व्यंगचित्रे पाहून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले वंचित उपेक्षित कष्टकरी यांच्याविषयी साहित्यिकांनी प्रखर लिखाण केले पाहिजे. साहित्य, संस्कृती व समाज घडवण्याची व जिवंत ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांवर आहे. अश्या अंकामुळे साहित्याची उंची नक्कीच वाढते, या दिवाळी अंकाची मांडणी आणि जाहिरातीची आकर्षकता फारच मनमोहक आहे. त्याबद्दल परिवाराचे तसेच इतर सर्व सहकारी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे सांगून ना. गडकरी यांनी वर्ल्ड सामना सारखे दिवाळी अंक फराळाबरोबर घरोघरी दिसलें पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वातंत्र्याबरोबर ज्या शहराची नगरपालिका सुरु झाली, ग्रामीण जनजीवनाशी जे शहर एकरूप आहे, अशा शहरात साहित्य आणि मनोरंजन गुणवत्तेने दर्जेदार असलेला दिवाळी अंक गेल्या ३२ वर्षांपासून प्रकाशित होतो, हॆ विशेष कौतुकास्पद असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रकाश कुलथे यांनी मानले.

===================================
---------------------------------------------------
*फोटो ओळी*- 
सौ.स्नेहलता प्रकाश कुलथे संपादित वर्ल्ड सामना दिवाळी विनोदी विशेषांक २०२३ चे प्रकाशन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, संपादक प्रकाश कुलथे, कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे.
====== 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*आजी,माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ८ नोव्‍हेंबर रोजी बैठकीचे आयोजन*

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
आजी, माजी सैनिकांचे विविध प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालय, शेवगांव येथे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली ८ नोव्‍हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या आजी, माजी सैनिकांचे जमिनी, अतिक्रमण, निवृत्तीवेतन, कुटुंबियावरील अन्यायाबाबत काही प्रश्न, अडीअडचणी असतील त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे.आपल्या अडीअडचणीबाबत लेखी स्वरूपात दोन प्रतीत अर्ज सादर करावा, असे स्क्वॉड्रन लिडर तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

राहुरी बसस्थानक इमारत कामाविरुद्ध हरकत,**निविदा प्रक्रिया स्थगित करावी मागणी*

अहमदनगर - प्रतिनिधि - वार्ता -

जिल्ह्यातील राहुरी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या इमारतीच्या कामाबाबत प्रसिद्ध झालेल्या निविदेला हरकत घेण्यात आली असून सदरहू बांधकामाची प्रक्रिया त्वरीत थांबविण्यात यावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री तथा परिवहनमंत्री ना. एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील तसेच परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक यांना लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले.
              राहुरी येथील सर्व्हे नं.४११ व ४१२ च्या जागेवर जी जागा आहे ती मिळकत कायद्यानुसार मूळमालकाकडून किंवा मूळ मालकाच्या निधनानंतर त्यांच्या वारसांकडून  हस्तांतरण होणे बंधनकारक होते. मात्र तसे न होता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने १९६९-७० साली या जागेवर ज्यांची नांवे भोगवटेदार किंवा ज्यांचा उल्लेख इतर हक्कात होता त्यांच्या बरोबर व्यवहार केला. तो व्यवहार किंवा झालेले हस्तांतरण बेकायदशीर ठरवून त्या मिळकतीवर मूळमालकांच्या वारसांची नांवे लावण्यात यावी. त्याचबरोबर बसस्थानकाचा कब्जा वारसांना देण्यात यावा. या मागणीकरीता सदरहू मिळकतीच्या वारसांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्या अनुषंगाने संबंधित महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला तीन महिने पुर्वी व त्यानंतर दुसरी नोटीस ३० ऑक्टोबर २०२३ रोजी बजाविण्यात आली आहे. आश्चर्याची व धक्कादायक बाब म्हणजे संबंधितांनी त्या नोटीसी पैकी एकाही नोटीशीची दखल न घेता किंवा कुठलेही उत्तर न देता उलट बसस्थानकाच्या कामाला सुरुवात करण्याचा घाट घातला आहे. ई-निविदेची प्रक्रिया थांबवून सदरहू मिळकतीच्या मूळमालकांच्या वारसांची मागणी व म्हणणे बाबत विचार होणे जरुरीचे आहे.
           बसस्थानकाच्या कामाबाबत घेतलेला निर्णय दुर्दैवी व एकतर्फी व बेकायदेशीर असून मूळमालकांच्या हक्कावर गदा आणणारा आहे. याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार न झाल्यास न्यायालयीन मार्गा बरोबरच लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येईल अशा आशयाचे निवेदन या मिळकतीच्या वारसांनी संबंधितांना पाठविले आहे.
          राहुरी बसस्थानकाची सर्व्हे नं ४११ व ४१२ च्या मिळकतीचे मुळ व खरे मालक कोण आहेत हे सार्‍या राहुरीकरांना माहित आहे. मोइनोद्दीन भिकन जहागिरदार, दादामियॉ भिकन जहागिरदार व हुसेन भिकन जहागिरदार यांचे नावांवरील ही मिळकत त्यांच्या निधनानंतर वारसांच्या अशिक्षितपणाचा व आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन कथित कब्जेदारांनी या मिळकतीची अक्षरशः वाट लावून मूळमालकांवर अन्याय केल्याचे कागदोपत्री दस्तऐवज आणि पुराव्यांवरून दिसून येते. 
         या सर्व घडामोडीत महसूल खात्यातील तत्कालीन कर्मचार्‍यांनी आपल्या पदाचा पुरेपुर गैरवापर केल्याचे दिसुन येते. या सर्व बाबी सखोल चौकशी अंती सिद्ध होतीलच. त्या सर्व घटनाक्रमाचे इतिवृत्त न्यायायलयापुढे मांडणार असल्याचे वंशजांनी सांगितले. या संबंधिचे आवश्यक असणारे उतारे,फेर व इतर दस्ताऐवज अनेक वर्षापासून मागणी करूनही उपलब्ध होत नसे, मात्र माहिती अधिकारी कायदा झालेपासून हे सर्व पुरावे उपलब्ध होऊ शकले.असे अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार शेख रियाज फजलोद्दीन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
*सहयोगी:*स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


Monday, November 6, 2023

*अनुभवातून आलेली कविता ही सकस**कविता असते : कवी प्रकाश घोडके*🌹🥀🌺🌷🌸❤️✅🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शेवगांव - प्रतिनिधि - / वार्ता -
माणसाच्या मनातील भाव संवेदना कमीत कमी शब्दात व्यक्त करून त्या सार्वजनिक केल्यास त्याची कविता बनते, आपल्या अनुभवातून आलेली कविता ही सकस कविता असते,अशीच काहीशी धार्मिक प्रवृत्तीची कविता सौ.शीला जावळे यांच्या जिव्हाळा या काव्यसंग्रहात आलेली आहे” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी,चित्रपट गीतकार प्रकाश घोडके यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने सौ.शीला संजय जावळे यांच्या जिव्हाळा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच पार पडले, यावेळी ते बोलत होते.ज्येष्ठ पत्रकार,दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके,कवयित्री शर्मिला गोसावी,आशा डांगे, हबीब भंडारे,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे,शाहीर भारत गाडेकर,कवी अर्जुन देशमुख, भगवान राऊत व संजय जावळे यावेळी उपस्थित होते.
      पुढे बोलतांना प्रकाश घोडके म्हणाले कि,जिव्हाळा मध्ये एकून ६९ रचनांचा समवेश असून त्यातील अनेक रचना या जीवनाचा सार सांगणा-या आहेत.यावेळी बोलतांना कवयित्री शर्मिला गोसावी म्हणाल्या कि,“कुटुंबात संस्कार,संस्कृती आणि शिक्षणात मुल्यशिक्षणाचे महत्व असून युवाशक्तीला मूल्य शिक्षणाचे धडे मिळणे आपेक्षित आहे. त्याआनुशंगाने ज्ञान आणि असलेली परिस्थिती याची सांगड घालत संस्कृती जपणारी मने तयार करणे आवश्यक आहे. यासाठी साहित्यिक,कलावंत आपापल्या परीने प्रयत्न करत असून यामध्ये गृहिणीही मागे नाहीत हे सौ.शिला जावळे यांनी आपल्या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे.”
सुधीर लंके,राजेंद्र उदागे,आशा डांगे,डॉ.शंकर चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती सावंत व स्वाती ठुबे यांनी केले. प्रास्ताविक प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी केले तर शेवटी राजेंद्र फंड यांनी आभार मानले.यावेळी शब्दगंध च्या शेवगांव शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ नजन, बाप्पुसाहेब भोसले,प्रा.डॉ.शंकर चव्हाण, वैभव रोडी,ज्ञानेश्वर उंडे, विजय हुसळे, सौ.संगीता दारकुंडे,विद्या भडके,शालन देशमुख,स्वाती राजेभोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार वजीरभाई शेख - पाथर्डी*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================