राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, November 14, 2023

*दीपावली व पाडवा निमित्त शहरात**करण ससाणे यांची शुभेच्छा फेरी*⭐⭐⭐⭐⭐

🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर शहर काँग्रेस व स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दीपावली पाडव्यानिमित्त शहरामध्ये शुभेच्छा फेरी काढली. यावेळी ससाणे यांनी शहरातील व्यापारी बांधवांच्या व नागरिकांच्या भेटीगाठी घेत दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा फेरीप्रसंगी माजी नागराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक के सी शेळके, दिलीप सानप, दिलीप नागरे, रितेश रोटे, आशिष धनवटे, शशांक रासकर, सुहास परदेशी, प्रवीण नवले, अशोक जगधने, सुरेश ठुबे, रितेश एडके, मंगलसिंग साळुंखे, पुंडलिक खरे, सुनील साबळे, अमोल शेटे, युनुस पटेल, सुनील ससाणे, युवराज फंड, गोपाल लिंगायत, सनी मंडलिक, रियाजखान पठाण, सरबजीतसिंग चुग, वैभव पंडित, नजीरभाई शेख, बुरहानभाई शेख, कुंदनसिंग जुनी, रितेश गिरमे, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, गणेश काते, योगेश गायकवाड, गोपाल भोसले, आकाश जावळे, विशाल साळवे, संजय गोसावी, अजय धाकतोडे, राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, श्रेयस रोटे, तीर्थराज नवले, सागर दुपाटी, शिवतेज गोसावी आदी मान्यवर व काँग्रेसचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर*
---------------------
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*"माणुसकीला नसे जात आणि धर्म !**माणसाचे केवळ चांगले असावे कर्म !!*

*"माणुसकीला नसे जात आणि धर्म !**माणसाचे केवळ चांगले असावे कर्म !!*

वेळ सांयकाळची,शेवटची बस निघुन गेलेली. शिरुर एसटी स्टॅण्डवर श्रीगोंद्यास येणारी बस नाही. विचारपुस करुन एक चार चाकी जीप प्रवाशांची वाट पहात उभी होती. ती श्रीगोंद्यास जाणारी होती. मग एक वयाची ३५ वर्षात असणारी महिला एका दिड ते दोन वर्षाच्या मुलाला ओढत जीपकडे धावली. एक तांबड्या रंगाची बॅगेचे ओझे हातात, पोटात पाच सहा महिन्यांच्या बाळाचे ओझे झेलत जीप जवळ आली. ड्रायव्हरला विचारले....त्याने सांगितले श्रीगोंद्यापर्यंत गाडी जाईल...बसा.
        गाडी निघाली. एक एक गावात थांबत अखेर उशीरा श्रीगोंदा स्टॅण्डवर पोहोचली. सर्वजण उतरुन पटापट निघुन गेले. ती माऊली कावऱ्या बावऱ्या नजरेने उतरली. जीपचे पैसे दिले. परंतु त्या जीप ड्रायव्हरने माणुसकीने विचारले ताई तुम्हाला कुठे जायचे आहे ? तिने सांगितले...करमाळ्याजवळचे मेंढापुर गावाला जायचे आहे. ड्रायव्हरला माहित होते..आता कुठेही जायला एसटी नाही. मग आता काय करायचे ? तिने निरागसपणे उत्तर दिले..भाऊ स्टॅण्डवरच झोपते मी लेकराला घेऊन. सकाळी एसटीने पुढे जाईल. इथे माझे कोणीही नाही. कोणाकडे जाऊ ? 
           ड्रायव्हर मध्ये माणुसकी ठासुन भरलेली होती. तो म्हणाला ताई, येथे स्टॅण्डवर झोपण्याइतके सुरक्षित नाही. काही तरी व्यवस्था होते का पहातो. असे म्हणत त्या महिलेला व लहान मुलाला पुन्हा जीपमध्ये बसवत ती जीप परत त्याच रस्त्याने श्रीगोंदा शहरातील जोतपूर मारुती चौकात गाडी थांबवली. तेथे असंख्य सेवानिवृत्त वयोवृध्द गप्पा मारत बसलेले होते. त्यांचे कोणाचेही लक्ष या घटनेकडे नसलेले लक्षात येत होते. मारुतीच्या उघड्या ओट्यावर मी रात्रभर झोपू शकेल असे ती महिला सांगत होती. त्या निष्पाप लहान लेकराला सर्व काही नवीनच होते. ती महिला ही भिरभिरत्या नजरेने आधार शोधत होती. ड्रायव्हरला हे योग्य वाटत नव्हते, अशा उघड्या चौकातील ओट्यावर एकट्या महिलेला झोपू देणे सुरक्षित वाटत नव्हते. त्याने तरी सुध्दा तेथील काही जणांशी चर्चा केली. सर्वच जण बघ्याची भूमिका घेत होते. त्यातील एक सदगृहस्थ सेवानिवृत्त शिक्षक श्री.सुर्यवंशी सर यांनी धीर देत सांगितले येथे उघड्यावर झोपू देणे अयोग्य आहे. आपण श्रीगोंदा शहराचे रहिवासी आहोत. येथे श्री संत शेख महंमद महाराजांची पंढरी आहे. आपण काही तरी करु आणि या भगिनीला सुरक्षित ठिकाणी आश्रय देऊ. 
          त्यावेळेस त्यांना दक्ष ची आठवण झाली. त्यांनी तात्काळ मला फोन केला व म्हणाले, दक्ष कुठे आहे ? काय करताय ? मी सांगितले श्रीगोंद्यामध्येच आहे. काय हूकूम आहे ? सुर्यवंशी सरांना आम्ही प्रेमाने बाबा म्हणतो. मी म्हटले, बाबा बोला ना. त्यांनी थोडक्यात कथा मला सांगितली. काय मदत या महिलेस करता येईल का ? मी म्हटले, बाबा...काळजी करु नका मी आलोच. काय मदत व कशी करता येईल ते चर्चेने ठरवु. मी तात्काळ हातातील काम बाजूला ठेवुन जोतपूर मारुती चौकात पोहोचलो. त्या भगिनीचा परिचय करुन घेतला. तिने माहेर व सासर कुठले ते सांगितले.
         तिने पुढे सांगितले की, तिची एक बहिण कर्जत येथे रहात असल्याने तिथे जाऊन राहण्याची इच्छा तिने प्रगट केली. आमच्याकडे चार चाकी गाडी नसल्याने वहातुक शाखेचे पोलीस प्रदिप देवकाते यांचेशी संवाद झाला. त्यांनी सांगितले की, मी गाडीची व्यवस्था करतो परंतु रात्रीची वेळ आहे, एका महिलेला रात्रीचे घेऊन जाणे योग्य होणार नाही. त्यापेक्षा त्यांची निवासाची सोय करतो. सकाळी पहिल्या एसटीने जाऊ शकेल. मलाही त्यांचे बोलण पटले. मग यश हॉटेलचे मालक व नगरसेवक अशोकभाऊ खेंडके यांचे बरोबर फोनवरुन चर्चा केली. त्यांनी ही होकार भरल्याने मी सुर्यवंशी सर व ड्रायव्हर आणि तिचे लहान बाळ व त्या भगिनी सोबत गाडीत बसुन लॉजवर गेलो. लॉजचे सर्व सोपस्कर पूर्ण केले. त्या भगिनीस रुम दिली. जेवणाचे ताट आणुन दिले. तिचे लहान बाळ झोपले होते. ती जेवण करुन झोपी गेली. अशोकभाऊ व विनोदभाऊ खेंडके यांचे आभार मानले व तेथुन निघालो.
         मी गाडी जवळ आलो. गाडीचे ड्रायव्हर रफिक शेख हे पारगाव सुद्रिक ता.श्रीगोंदा येथील सदगृहस्थ होते. एका सर्वसाधारण मुस्लीम कुटुंबात जन्मात आले. कुटुंबाचे उदरभरण करण्यासाठी शिरुर ते श्रीगोंदा क्रुझर गाडी चालवतात. रफिकभाई मुळे एका भगिनीस मदत करता आली. मुस्लीम असुन सुध्दा हिंदू धर्मातील महिलेस मदत करण्यासाठी पुढे आले. तिला एकटे सोडले नाही. खरे तर गाडीमध्ये बसलेले प्रवासी स्टॉप आल्यावर उतरवुन देणे हेच काम असुन ही एका गरजवंत अबलेस मदत केली.
          या घटनेवरुन लक्षात येते की, माणुसकीला जात धर्म काही ही नसतो. फक्त इच्छा शक्ती असावी लागते. आम्ही तर दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक भावनेने गरजुंना मदत करत असतो. परंतु रफिक शेख सारखे व सुर्यवंशी सरांसारखे सदगृहस्थांमुळे मदत करण्याची सुवर्ण संधी मिळत असते.असे काम केल्यानंतर मनस्वी आनंद आणि समाधान लाभते.
          रात्रभर निवांत आराम करुन ती महिला (मनिषा शिंदे) ही सकाळी कर्जत गाडीने आपल्या सासरी मेंढापूर, पंढरपूर येथे पोहोचली.आपण ही एखाद्या गरजवंतास मदत करत रहा ही विनंती.

===================================
---------------------------------------------------
...शब्दांकन- *दत्ताजी जगताप*
दक्ष नागरिक फाऊंडेशन,श्रीगोंदा
मो.9422235707
--------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================




*नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रदीप गिते**यांचे आपले मानवाधिकारकडून स्वागत*🌹🥀🌺🌷🌸❤️ ✅ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*सौरभ कामडी - पालघर*
मोखाडा पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेले सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांचे आपले मानवाधिकार फाऊंडेशन चे मोखाडा तालुकाध्यक्ष तथा दैनिक स्वराज्यदूत चे मोखाडा प्रतिनिधी भाऊ वैजल यांनी संविधान उद्देशिका व पुष्पगुछ देऊन स्वागत केले,आणि त्यांचा पुढील वाटचालीस शुभेच्छा देत
मोखाडा तालुक्यातील विविध सामाजिक विषयावर प्रामुख्याने चर्चा केली.
 नेहमीच चांगल्या विषयांना सकारात्मक बाबींना आपले मानवाधिकार फाउंडेशन कडून पोलीस स्टेशनला सहकार्य राहील व पोलीस स्टेशनकडून देखील असावे असे भाऊ वैजल यांनी त्यांच्याशी चर्चा करतेवेळी सांगितले.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:* ✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*श्रीरामपूर शहरवासीयांची दीपावली**शुभेच्छा देण्यासाठी प्रभात फेरी*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना दीपावली व पाडव्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी शहरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली.
यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेना नेते तथा तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, शिवसेना नेते अशोक (मामा) थोरे,राधाकिसन मामा बोरकर, देविदास सोनवणे, शेखर दुब्बैय्या, सुधा तावडे, सुधीर आप्पा वायखिंडे, सिद्धांत छल्लारे, भगवान उपाध्ये, तेजस बोरावके, संजय साळवे, संजय परदेशी, विजय बडाख, प्रदीप वाघ, भाऊसाहेब थोरात, प्रतीक यादव, शुभम ताके, प्रमोद गायकवाड, हबीब शेख, माधव टिपरे, लक्ष्मणराव कुमावत, प्रदीप गर्जे, विशाल राहिले, विशाल दुपाटी, शरद गवारे, बापू बुधेकर, उमेश छल्लारे, पवन सूर्यवंशी, राजेंद्र छल्लारे, आशिष कर्नावट, राजेंद्र भंबारे, योगेश ढसाळ पा.,अकील पठाण, मुस्ताक शेख, निलेश मटाले, अक्षय छल्लारे, शिवा छल्लारे, संभा परदेशी, सुनील फुलारे आदि मान्यवर उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर*
---------------------
*सहयोगी* - स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*क्रांतिवीर लहुजी साळवे व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान - ससाणे*💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी वस्ताद लहुजी साळवे यांनी मोलाचे योगदान दिले तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत देशातील जनतेला इंग्रजांविरोधात लढण्याची प्रेरणा दिल्याचे जिल्हा बँकेचे संचालक तथा श्रीरामपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी म्हटले आहे. 
श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित क्रांतिवीर लहुजी साळवे भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. यावेळी वस्ताद लहुजी साळवे व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नागराध्यक्ष संजय फंड, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक के सी शेळके, दिलीप सानप, दिलीप नागरे, रितेश रोटे, आशिष धनवटे, शशांक रासकर, सुहास परदेशी, प्रवीण नवले, अशोक जगधने, सुरेश ठुबे, रितेश एडके, मंगलसिंग साळुंखे, पुंडलिक खरे, सुनील साबळे, युनुस पटेल, सुनील ससाणे, युवराज फंड, गोपाल लिंगायत, सनी मंडलिक, रियाजखान पठाण, सरबजीतसिंग चुग, वैभव पंडित,नजीरभाई शेख, बुरहानभाई शेख, कुंदनसिंग जुनी, रितेश गिरमे, बाबा वायदंडे, लक्ष्मण शिंदे, गणेश काते, योगेश गायकवाड, गोपाल भोसले, आकाश जावळे, विशाल साळवे, संजय गोसावी, अजय धाकतोडे, राजेश जोंधळे, कल्पेश पाटणी, श्रेयस रोटे, तीर्थराज नवले, सागर दुपाटी,शिवतेज गोसावी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
------------------------
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*अगामी पिढीमध्ये लोकशाही मूल्ये रुजली पाहिजेत - माजी आमदार डॉ. सुधीर तांबे*


संगमनेर - प्रतिनिधि - / वार्ता -
समाज कोणताही असो त्या समाजाचे उत्थापन ही काळाची गरज आहे. हे उत्थापन शिक्षण आणि व्यावसायिक दृष्टीकोन यामुळेच टप्प्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक भावना रुजल्यास लोकशाही प्रगल्भ होईल म्हणूनच शालेय जीवनापासून सकारात्मक दृष्टिकोन तयार करुन निखळ लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी सुरुवात करणे हे अगत्याचे असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी संगमनेर येथे महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सर्वपंथीय जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. ख्रिस्ती समाजातील विविध क्षेत्रातील नामवंतांच्या आयोजित बैठकीमध्ये परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, फा. नेल्सन परेरा, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, माध्यम सल्लागार प्रमुख सॉलोमन गायकवाड, पा. सतीश अल्हाट, सुनील उबाळे, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब नेटके आदींनी मनोगत व्यक्त केले 
यावेळी श्री. तांबे पुढे म्हणाले की, जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून लोकांचे, विशेषतः तरुणांचे प्रबोधन, तसेच समाजातील विचारवंतांनी आणि सकारात्मक भावना जपणारांनी लोकांमध्ये जाऊन लोकशाहीची मूल्ये रुजवली पाहिजेत. सद्य स्थितीत याप्रकारे कोणी प्रबोधन करीत नसल्यामुळे नवपीढीत या विषयात समाधानकारक गतीचा अभाव दिसतो. तोच या प्रयत्नातून दूर करायचा आहे. म्हणजे येथून पुढे येणाऱ्या पिढीमध्ये खऱ्या लोकशाहीचे मूळ रुजून भविष्यात सशक्त लोकशाही लोककल्याण करील. सकारात्मक भावनेमुळे निराशाजनक विचारांना मूठमाती मिळेल. एक चांगली पिढी घडल्याचे पुण्य आपल्या पदरी पडेल. हे करत असतानाच शिक्षणाची टक्केवारी वाढवणे, व्यावसायिक दृष्टीकोन विकसीत करणे हे काम केल्यास एक नवचैतन्यही निर्माण होईल. विविध शासकीय योजना आणि लाभ यांचा यथार्थतेने वापर होण्यास मदत होईल. ख्रिस्ती विकास परिषदेच्या कार्याचे ही त्यांनी यावेळी कौतुक केले.
  याप्रसंगी प्रताप देवरे, डॉ. स्वप्नील भांबळ, प्रभाकर चांदेकर, रमेश ओहोळ, विलास शेळके, सुधीर ब्रम्हे, प्रतीक पठारे, प्रमोद संसारे, सचिन मुंतोडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर*
----------------------
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



*भारतिय जनता पार्टी उद्योग आघाडीच्या* *प्रदेश कार्यकारिणीची घोषणा*.............💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी*
 *भिमराज भालेराव यांची नियुक्ती*

*राजेंद्र बनकर / शिर्डी*
भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश संयोजक प्रमोद वाकोडकर यांनी प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. नवीन कार्यकारिणीत १२ विभाग संयोजक ५ , सहसंयोजक ,७ समन्वयक यांचा समावेश आहे.यात उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी शिर्डी येथील सामाजिक कार्येकर्ते भीमराज भालेराव तसेच उत्कर्ष रवंदले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
शिर्डीतील सामाजिक कार्यात नेहमीच सहभाग असणारे भीमराज पुंजाजी भालेराव यांची उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी नियुक्ती होताच शिर्डीसह पंचक्रोशीतुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एक तळागळातील कार्यकर्ता व सर्वसामान्य घटकातील तरुणाला भारतीय जनता पार्टी तसेच राज्याचे महसूलमंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील , खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड झाल्याने या निवडीबद्दल मोठे समाधान व्यक्त होत आहे. तर भीमराज भालेराव यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योग व्यवसायातील प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी एका सामान्य कार्येकर्त्याची निवड होणे हे ही कौतुकाची बाब असुन या संधीतुन भीमराज भालेराव हे नक्कीच यशस्वी कार्य करतील अशा शुभेच्छा देत आपल्या भावना शिर्डीतील सत्कार समारंभात कार्येकर्त्यांनी व्यक्त केल्या.

*शिर्डीसह उत्तर महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायातील अडचणी समजून घेऊन त्यावर योग्य निर्णय घेऊन त्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असुन शिर्डीतील अडचणीत आलेल्या हॉटेल व्यवसायाला तसेच छोट्या-मोठ्या व्यायसायिकांना उभारी मिळण्यासाठी तसेच गती देण्याचे काम करणार आहे, त्यांच्या अडचनी समजून घेऊन त्यावर काम करणार आहे.सामान्य कार्येकर्त्याला मोठे पद देऊन सन्मान केला यामुळे या नियुक्तीच संधीच सोनं करुन धोरणात्मक कार्य करणार. खा.सुजय विखे पा यांनी शिर्डीत एम.आय.डि.सी. ची घोषणा केली असून या मुळे शिर्डीत उद्योग व्यवसायाला चालना मिळणार असून बेरोजगारीचा प्रश्न ही मिटणार असल्याने याबाबत पाठपुरावा करणार आहे.सामान्य कार्येकर्त्याला मोठे पद देऊन सन्मान केला, संधी दिली या संधीच सोनं करुन धोरणात्मक कार्य करणार - भीमराज भालेराव*

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️💐🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================