राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, October 16, 2024

वडाळागाव मध्ये जुलुस - ए - गौसिया मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न


- माजिद खान - नाशिक -/ वार्ता -
नाशिक शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ग्यारवी शरीफ निमित्ताने
वडाळागाव मध्ये जुलुस - ए - गौसीया मिरवणुक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सदरील जुलुस ए गौसिया मिरवणूकीची मौलाना जुनेद आलम साहेब यांच्या मार्गदर्शनाने सकाळी गौसिया मस्जिद पाठीमागील बाजुने सुरुवात करण्यात येवून पुढे,आलीशान सोसायटी, मदार नगर, तैबा नगर, सल्ली पाॅईंट, सादिक नगर, महेबुब नगर या मार्गाने शेवटी ह.चांद शहा वली दर्गाह येथे सांगता झाली.
या वेळी मौलाना जुनेद आलम साहेब, मौलाना असजद रजा, मौलाना अब्दुल रहेमान यासीन, असजद रजा, अमजद मौलाना, इंदिरा नगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके, सहा.पो.निरीक्षक अंकोलिकर, पोलिस उपनिरीक्षक धनराज पाटील, संतोष फुंदे,वाल्मीक चौधरी, गोपनीय अमोल मानकर, जाधव साहेब, फरीद शेख, शेरू शाह, असद सय्यद, असिफ शेख, अल्ताफ सय्यद, इक्बाल पटेल, रईस शेख, रफिक शेख,असिफ शेख आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Tuesday, October 15, 2024

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद (फोटो-संग्रहित छायाचित्र)


Maharashtra Vidhan Sabha Election Date 2024 Live : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेणार निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी महाराष्ट्राबरोबरच आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आता निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर करताच यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
-----------------------------------------------
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dates : महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान – राजीव कुमार
-----------------------------------------------
=================================
महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान

२२ ऑक्टोबर रोजी नोटिफिकेशन

२९ ऑक्टोबर अर्ज भरण्याची तारीख

३० ऑक्टोबर अर्ज छाननी

४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख

२० नोव्हेंबर रोजी मतदान

२३ नोव्हेंबर रोजी निकाल 

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


वाचन प्रेरणा दिवस ग्रंथप्रदर्शन व परिसंवादाने साजरा


परिसंवाद कार्यक्रमात सहभागी झालेले प्राध्यापक .: डायसजवळ समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, बसलेले डावीकडून.डॉ.केशव पवार ,प्रा.किशोर सुतार , डॉ.प्रदीप शिंदे ,प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे ,डॉ.विद्या नावडकर ,डॉ.संजयकुमार सरगडे , डॉ.मनोहर निकम मागे प्रा.श्रीकांत भोकरे व ग्रंथपाल प्रा. एकनाथ झावरे 


वाचन प्रेरणा दिवस दिनी ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन हस्ते .प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे ,प्राध्यापक व विद्यार्थी
छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये सर्वांगीण विकासासाठी ‘वाचन’ दिग्दर्शन

- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषामंडळ व घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग,समान संधी केंद्र , विवेक वाहिनी ,ग्रंथालय विभाग यांचे संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी कोलेजच्या डॉ.एन.डी .पाटील सभागृहात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुलकलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम व ग्रंथ प्रदर्शन करून साजरी करण्यात आली. वाचन प्रेरणा दिन निमित्ताने ‘वाचन : सर्वांगीण विकासासाठी दिग्दर्शन ‘या विषयावर परिसंवाद घेण्यात आला.यात महाविद्यालयातील भाषा व सामाजिक शास्त्र विभागातील प्राध्यापकांनी परिसंवादात आपली विषय मांडणी केली,या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे हे उपस्थित होते. तर कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे व आंतरविद्याशाखा विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.आर. आर. साळुंखे या मान्यवरांची उपस्थिती होती. या परिसंवाद कार्यक्रमाचे समन्वयक ,विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
              वाचन हे सर्वागीण विकासाचे दिग्दर्शन आहे या विषयावर बोलताना प्रथम प्रा.श्रीकांत भोकरे यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले हा दिवस केवळ वाचन प्रेरणा दिवस असत नाही.वाचनाची प्रेरणा कधीही मिळत असते. वाचणे महत्वाचे असते. श्रवण,भाषण ,वाचन ,लेखन ही कौशल्ये आत्मसात करावीत. वाचनाचे कुतूहल का कमी होते हा संशोधनाचा विषय आहे. का वाचायचे ,कसे वाचायचे आणि किती वाचायचे हे प्रश्न स्वतः समजून घ्यावे. वाचन हे व्यक्ती सापेक्ष आहे. कुठूनही वाचायला सुरुवात केलीच पाहिजे. अलीकडच्या काळात कोण कोण लेखक. लिहितात ही जिज्ञासा सतत असली पाहिजे. साहित्य माणसाला संवेदनशील बनविते. पुस्तकात आयुष्य ओतलेले असते. पुस्तक वाचल्याने शब्द संपत्ती वाढते .वाचन निरंतर करावे.त्यातून आपण शहाणे आणि समृद्ध होत जातो. केरळमध्ये अत्यावश्यक सेवेत ग्रंथालय येते. आत्महत्या कमी व्हायच्या असतील तर वाचले पाहिजे. आपण आतून शांत व्हावे तरच वाचलेले लक्षात राहते. आजचा रीडर हा उद्याचा लीडर आहे असे ते म्हणाले. प्रा. किशोर सुतार म्हणाले अर्थशास्त्राला समाजशास्त्राची राणी म्हणतात. पुस्तकाचा संग करावा. संत रामदास यांनी दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे असे म्हटले आहे. बुद्धांचे चरित्र वाचून भीमराव रामजी आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारताचे स्वप्न पाहिले. ते घटनाकार झाले. संविधानामुळे गुलामगिरीत राहिलेला देश आज विकसित राष्ट्र होण्याची आकांक्षा बाळगत आहे. ९ वर्षाच्या तुरुंग वासात ‘नेहरूंनी डस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला . मिसाईल मन असलेल्या अब्दुल कलामांनी खूप मोठे योगदान दिले. न्यूटन ने अभ्यास करून गुरुत्वाकरशन शक्तीचा शोध लावला. पेपर टाकणारे अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय संशोधक झाले आणि जगातल्या सर्व पेपरनी त्यांची दखल घेतली. साने गुरुजी यांची सुंदर पत्रे वाचा , शिवाजीराव भोसले यांचे ग्रंथ वाचावेत. ४७ महापुरुषाची चरित्रे लिहिले.गांधीजीनी वाचूनच सत्याचे प्रयोग लिहिले.त्यातूनच स्वातंत्र्याचा मार्ग त्यांना दिसला. विश्वास पाटलांनी नेताजी सुभाष चंद्र बोस हे पुस्तक लिहिले . छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचून सुचली. पुस्तकांनी घडलेले मस्तक हे समाजाचे ,संस्कृतीचे व येणाऱ्या भविष्याचे दिग्दर्शन करेल. 
.डॉ.मनोहर निकम म्हणाले ‘भगतसिंग यांनी कार्ल मार्क्सच्या साहित्याचे वाचन केले त्यातून ते नास्तिक झाले. ते देवाला कधी शरण गेले नाहीत. चित्रपट ,वेब सिरीज पेक्षा पुस्तक वाचणे अधिक चांगले. उपरा, उचल्या वाचल्यावर आपण आपल्या पद्धतीने व्यक्तीचित्रे उभी करत असतो. मी कोसला दरवर्षी वाचला,भुरा वाचला ,पुस्तकामुळे मुलांच्यात समरस व्हायला मला समाधान मिळते. पुस्तक वाचल्यावर आपल्या चांगल्या आशा वाढत असतात. कुसुमाग्रजाचे विशाखा,लेनिन,गौतम बुद्ध,संत कबीर,इत्यादी वाचनाने भक्ती रसापासून आम्ही बाहेर पडलो. तुम्हाला वाचनाने दिशा मिळते. बालकवी ,ना.धो.महानोर,नारायण सुर्वे,भालचंद नेमाडे, डॉ.आंबेडकर,कॉम्रेड शरद पाटील,जैन,बौद्ध तत्वज्ञान, कमलेश्वर अब्राहम लिंकन हे वाचले पाहिजे असे ते म्हणाले. 
        प्रा.डॉ.प्रदीप शिंदे म्हणाले की ‘आपण वाचतो आहोत ,त्याचा उद्देश माणूस बनणे आहे. जे ग्रंथात चांगले आहे त्याचा स्वीकार करावा,निरर्थक आहे ते टाकून द्यावे. कोणतीही क्रांती विद्वानांच्या मुले झाली. महात्मा गांधी हे देखील अनुभवातून लिहिते झाले. विनोबा भावे, इदगाह, प्रेमचंद साहित्य, विविध कथामधून विविध संघर्ष आपल्याला कळून येतात. साहित्य जीवनाचे दर्शन असते. संयम,समय सूचकता,वाचनातून मिळते. वाचनातून सद्सदविवेक बुद्धी जागृत होते. त्यांनी कपाट ही ग्रंथप्रेमी असले पाहिजे. हजारो रुपयाचा मोबाईल घेतात पण आपल्या घरात ग्रंथ घेत नाहीत. कसलेही पुस्तक न वाचता मुले पदवीधर होतात , पुस्तकाबद्दल उदासीन असता कामा नये. स्वयंप्रकाशित होण्यासाठी वाचन आवश्यक आहे. आपल्या कॉलेजचे नियतकालिक वाचले पाहिजे. कोणत्याही कार्यक्रमात पुस्तक भेट द्यावेत. पुस्तक भेट दिल्याने आठवणी कायम राहतात. ज्ञानकक्षा विस्तार करण्यासाठी ग्रंथ हेच उपयुक्त ठरतील असे ते म्हणाले. डॉ.केशव पवार यांनी आपल्या देशात कोणी वाचावे ,कोणी वाचू नये असे नियम होते. इंग्रज आल्यानंतर आपल्याला वाचण्याची संधी मिळाली. शेक्सपियर कोणत्या शाळेत शिकला नाही पण पुढे त्याने लिहिलेली पुस्तके जगातल्या सर्व ग्रंथालयात दिसतात. इग्लंड मध्ये १४-१५ व्या शतकात ज्ञान उत्सव साजरा केला .अनेक शोध इंग्लंड मध्ये लागले. कलकत्ता , मद्रास ,मुंबई येथे इंग्रजांनी विद्यापीठे सुरु केली. या देशातल्या मुलांनी इंग्रजी शिकून पुढे स्वातंत्र्य मिळवून दिले. महान लेखांच्या ग्रंथातून त्यांनी वाचन केले होते. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील दोन लाख ग्रंथाचा उपयोग करावा. बाबासाहेबांनी पुस्तकासाठी घर बांधले असे ते म्हणाले. अन्न हे शरीराचे पेट्रोल आहे तसे पुस्तक हे मनाचे तेल आहे. डॉ.सुधामूर्ती यांनी ज्यांच्याकडे पुस्तक नाहीत त्यांना गरीब म्हटले आहे. पुस्तकांना वाळवी लागणे हे चांगल्या माणसांचे लक्षण नाही. ग्रंथालयातील अनेक नवी पुस्तक वाचकांची वाट पाहत आहेत. समाजच वाचणार नसेल तर तो काय होईल ? नवनवी पुस्तके वाचण्याचा संकल्प करावा, पुस्तके जवळ असतील तर वाचायला दिली पाहिजेत. आमचे विद्यार्थी वाचतील तेंव्हा आपल्याला समाधान होईल. असे त्या म्हणाल्या राजेंद्र केसकर यांनी मराठी व्याकरणाची मी तीन पुस्तके लिहिल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा सबंधीची पुस्तके देखील वाचली पाहिजेत असे ते म्हणाले. 
    
      डॉ.अनिलकुमार वावरे म्हणाले की अब्दुल कलाम यांना भारत ही महासत्ता व्हावी व विकसित भारताचे स्वप्न पाहिले. देशातील युवाशक्तीवर त्यांचा मोठा विश्वास होता असे ते म्हणाले. अब्दुल कलाम यांना प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे असे ते म्हणाले. प्रारंभी प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन केले. समन्वयक प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले व ग्रंथपाल प्रा.एकनाथ झावरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विवेक वाहिनी, समानसंधी केंद्र ,भाषा व सामाजिक शास्त्र विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



महात्मा गांधी संकुलात वाचन प्रेरणा दिन साजरा


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने नुकतेच वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. वैशाली म्हस्के तर अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य अलका आहेर या उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी शाहिस्ता शेख यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या काही संस्मरणीय आठवणी सांगून जीवनाचे जीवनातील वाचनाचे महत्त्व विशद केले.
 तसेच सखी सावित्री समितीच्या माध्यमातून स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैशाली म्हस्के यांनी विद्यार्थिनींना आरोग्य व सामाजिक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रियंका लोंढे, सुवर्णा भोर, प्रतिभा ठोकळ यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार हिरा चौधरी यांनी मांडले. माध्यमिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्राचार्य अंगद काकडे, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुस्तकातून खरे जीवनमूल्यांचे संस्कार होतात. विद्यार्थ्यांनी अशा संस्काराचे पाईक व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी प्र.पर्यवेक्षक सुभाष भुसाळ, जवाहरलाल पांडे, शेजुळ सर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अश्विनी सोहोनी, रेणुका वर्पे आदींनी वाचन प्रेरणातून यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

विद्यानिकेतन स्टेट बोर्डमध्येवाचन प्रेरणा दिन उत्साहात


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, स्टेट बोर्डमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 
        प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून 'वाचाल तर वाचाल' या उक्तीची यथार्थता पटवून दिली. यावेळी ते म्हणाले, की मनुष्य वाचनाच्या मदतीने सर्वच क्षेत्रांची माहिती घेऊन ज्ञानी होऊ शकतो. तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याने किमान रोज एक तरी पुस्तक वाचलेच पाहिजे, त्यानेच आपल्याला नवीन आशा नवीन दिशा व प्रेरणा मिळू शकते.
दरम्यान विद्यार्थ्यांनी
वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन सार्वभाषिक अवांतर पुस्तके वाचण्याचा व जन्मदिन प्रसंगी इतरांना भेट म्हणून पुस्तके देण्याचा संकल्प केला.
             यावेळी विद्यालयाचे चेअरमन मा. प्राचार्य टी.ई.शेळके, व्हा. चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, सहसचिव डॉ. अर्चना शेळके, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे, राजश्री तासकर, सुनंदा थोरात, शंकर बाहुले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

अशोक महाविद्यालयात भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. डॉ.कलाम यांचा भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये खूप मोठा सहभाग होता. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९८ मध्ये भारताच्या पोखरण-अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली, असे मत प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी व्यक्त केले.
           अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.संदीप सांगळे यांनी पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. प्रारंभी प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
        कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दिलीप खंडागळे, ग्रंथपाल डॉ.संदीप सांगळे, परीक्षा अधिकारी प्रा.शरद आवारी, प्रा.भिमा शिंदे, डॉ.विवेक साळवे, प्रा.सुनील म्हकांळे, प्रा.सुधीर शेरकर, प्रा.स्वप्नील लांडगे, प्रा. ज्ञानेश्वर खिलारी, प्रा.राणी पटारे, प्रा.संगीता खंडिझोड, प्रा.मंदा तांबे, प्रा.हिना शेख, कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब पटारे आदींसह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Monday, October 14, 2024

अकोले शहरात फटाके वाजून महायुती सरकारचे राज्य पत्रकार संघाकडुन अभिनंदन



अकोले शहरात फटाक्यांची आतषबाजी, महायुती सरकारच्या निर्णयाचे पत्रकार संघाकडून उत्साहात अभिनंदन!

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय: पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना

- अकोले - प्रतिनिधी -/ वार्ता - महायुती सरकार ने ऐतिहासिक निर्णय घेत पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामंडळाच्या स्थापनेमुळे पत्रकारांना त्यांच्या रोजच्या कामकाजात आर्थिक मदत मिळणार आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांनाही याचा फायदा होणार असून त्यांच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल.
पत्रकारांना अधिकृत कर्ज सुविधा, विमा योजनांचा लाभ, तसेच विविध सरकारी योजनांचा आधार मिळवून देण्यासाठी या महामंडळाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. या महामंडळामुळे पत्रकारांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आता शासनाकडे मदत मागावी लागणार नाही. पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने त्यांच्या कामात सुसूत्रता आणि स्थैर्य येईल. असा विश्वास महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केला.

पत्रकारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना महायुती सरकारने केल्याचा आनंद पत्रकारांच्या वतीने फटाके फोडून व पेढे भरवून अकोले बसस्थानका समोर साजरा करण्यात आला. 
   महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, हेमंत आवारी, विद्याचंद्र सातपुते, गणेश आवारी, भाऊसाहेब साळवे, संदीप दाताखीले, सचिन खरात, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ फापाळे, दत्ता जाधव, आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे हक्क आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने आयोजित केलेली पत्रकार संवाद यात्रा अखेर यशस्वी ठरली. या यात्रेची सांगता नुकतीच मुंबई येथील मंत्रालयात झाली, ज्यामध्ये पत्रकारांच्या हितासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य सरकारने पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली, ज्यामुळे या क्षेत्रातील लोकांना आर्थिक स्थैर्य लाभेल.

संवाद यात्रेची पार्श्वभूमी:
ही पत्रकार संवाद यात्रा नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथून सुरू झाली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली, संपूर्ण महाराष्ट्रभर पत्रकार बांधवांनी ही यात्रा केली. विविध जिल्ह्यांमधून प्रवास करताना, त्यांनी पत्रकारांच्या समस्या आणि मागण्या मांडण्यासाठी सर्व आमदार, खासदार आणि विरोधी पक्ष नेत्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी सुरक्षा, आर्थिक मदत, आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या मुद्द्यांवर या यात्रेदरम्यान ठोस चर्चा झाली.
या संवाद यात्रेत, पत्रकार बांधवांनी प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय नेत्यांना निवेदने सादर केली. त्यांनी पत्रकारांवरील हल्ले, कामाच्या कठीण परिस्थितीतील अडचणी आणि आर्थिक समस्यांबद्दल शासनाला सविस्तर माहिती दिली. यासोबतच, पत्रकार संवाद यात्रेच्या विविध पोस्टर्सचे अनावरण देखील करण्यात आले, ज्यात या मुद्द्यांवर अधिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नेत्यांची भूमिका आणि स्वागत:
या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी मोठे योगदान दिले. चंद्रकांतदादा पाटील, मंगल प्रभात लोढा आणि पंकजा मुंडे यांसारख्या नेत्यांनी या संवाद यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला.

पत्रकार संघाच्या या महत्वपूर्ण यशस्वी संवाद यात्रेमुळे राज्यातील पत्रकार वर्गात आनंदाची लहर पसरली आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. हा निर्णय पत्रकारांच्या हक्कांसाठी उभे राहण्यासाठी एक नवीन आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने सर्व आमदार, खासदार, सर्वपक्षीय नेते, विरोधी पक्ष नेते तसेच सरकारमधील सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले जात आहे. महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पत्रकार वर्गात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. यशस्वी संवाद आणि समन्वयाच्या दृष्टीने हे पाऊल स्वागतार्ह आहे, ज्यामुळे पत्रकारिता क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्रेने पत्रकारांचे हक्क आणि समस्या सोडवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेमुळे पत्रकारांना आता अधिक सुरक्षित आणि आर्थिक स्थिर जीवन मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पत्रकार संघाच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील पत्रकारिता क्षेत्राच्या भविष्याला नवीन दिशा मिळाली आहे, ज्यामुळे पत्रकारांच्या हक्कांच्या लढ्यात हा एक मोठा विजय मानला जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.विश्वासराव आरोटे
राज्य सरचिटणीस:
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================