राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, July 3, 2025

पटेल स्पेशालिटी क्लिनिक तर्फे डॉक्टर डे निमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न


डॉक्टर म्हणजे केवळ फक्त वैद्य नाहीत
तर ते समाजाचे खरे आधारस्तंभ - शेख 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
डॉक्टर म्हणजे केवळ फक्त वैद्य नाहीत, तर ते समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत, त्यांच्या सेवेचे आपण ऋणी आहोत, थायरॉईड, लिपिड प्रोफाईल, शुगर व चरबी अशा अनेक महत्वाच्या आरोग्य तपासण्या वीना मुल्य मोफत करून देणे हा खरोखरच पटेल स्पेशालिटी क्लिनिक चा एक स्तूत्य असा समाजोपयोगी आणि आदर्श उपक्रम आहे.
आज अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि आपल्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवली हीच खऱ्या अर्थाने या उपक्रमाची यशोगाथा आहे.अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन पुढेही सुरू राहो ही अपेक्षा अल करम हॉस्पिटलचे इमरान शेख (भाईजान) यांनी व्यक्त केली.
नगर शहरातील किंग्जगेटरोड रामचंद्र खुंट येथील पटेल स्पेशालिटी क्लिनिकच्या वतीने डॉक्टर डे निमित्त मोफत रक्तातील थायराईड,चरबी, लिपीड प्रोफाईल, शुगर व इतर रक्त तपासण्या व निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डायबेटोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट डॉ. अशपाक पटेल, अल करम हॉस्पिटलचे तौफिक तांबोली,इमरान शेख भाईजान, मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सचिव डॉ. कमर सुरुर आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी डॉ. अशपाक पटेल यांनी रुग्णांची तपासणी केली. रक्त तपासण्या तुषार वर्पे, किरण वर्पे, अजीज पठाण, वसीम शेख यांनी केले. या शिबीरात अनेक रुग्णांनी याचा लाभ घेतला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
==================================

शनीसेवा सोशल फाउंडेशनने घेतले निस्पृह समाजसेवेचे व्रत


-:अहिल्यानगर - प्रतिनिधी - वार्ता -
सामाजसेवेस अधिक बळकटी मिळून अधिकाधिक समाजसेवा करता यावी याकरिता अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील चांदा येथील ३५ युवकांनी मिळून शनीसेवा सोशल फाउंडेशन ची स्थापना केली आहे. आणि याच माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक देवस्थान मधे मोफत सेवा देत आहेत तसेच सध्या आषाढी एकादशी च्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक गावातून पंढरपूर येथे जाण्यासाठी दिंडी निघत आहे याचे औचित्य साधून शनीसेवा सोशल फाउंडेशन चे संपर्कप्रमुख व मार्गदर्शक डॉ. सुधाकर निकाळजे यांना एक कल्पना सुचली ती अशी की, दैनंदिन कामांचा व्याप आणी महत्त्वाची जबाबदारी मुळे आपण जरी दिंडी ला जावू शकत नसलो तरी कमीतकमी आपण दिंडीतील प्रत्येक वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देवू असे मत व्यक्त केले. त्यानंतर लगेचच फाऊंडेशनचे खजिनदार वृषभ गांधी व जय माता दी मेडिकल चे संचालक निरज मनोचा यांनी आम्ही दोघे मोफत औषधे पुरवठा करु असे जाहीर केले आणि यानंतर जो काही प्रवास सुरू झाला तो कालपर्यंत येवून पोहचला. आतापर्यंत शनीसेवा सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून डॉ. सुधाकर निकाळजे यांनी पंढरपूर येथे जाण्यासाठी निघालेल्या वारीतील २८ जुन ते २ जुलै पर्यंत अनेक दिंड्यातील ३४६ वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली आहे. आणि याच सेवेसाठी शनी सेवा सोशल फाउंडेशन चे डॉ. सुधाकर निकाळजे यांचा सत्कार स्वराज्य पोलीस मित्र तथा पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. सौ.ज्योती शेटे व पंढरपूर तालुकाध्यक्षा सौ. शोभाताई बडवे यांनी पंढरपूर येथे केला. तसेच टेंभुर्णी परते येथे खासदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने देखील त्यांचा सत्कार करण्यात आला. 
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शिवाजी मोतीराम दहातोंडे, चंद्रकांत जावळे, बंडू साहेबराव दहातोंडे, संजय वैरागर, भाऊसाहेब दहातोंडे, बाळासाहेब जावळे, शशिकांत कर्डिले, नंदकुमार दहातोंडे, विजय भोपे, शिवा दहातोंडे, शहाजी धुमाळ, योगेश जावळे यांनी अथक परिश्रम घेतले.
सेवेकरीता महाराष्ट्रातील अनेक देवस्थानात संपर्क झालेला आहे तसेच संपर्क न झालेल्या देवस्थान मध्ये संपर्क साधून निशुल्क सेवा देण्यात येईल व कार्तिकी एकादशी साठी नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान येथे सेवेसाठी जाणार आहोत असे शनीसेवा सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष कमलेश शेवाळे यांनी सांगितले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

महात्मा गांधी संकुलात ग्रंथदिंडी उत्साहात


अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी संकुलात आषाढी एकादशीनिमित्त नुकतेच दिंडी आणि ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, डॉ. शरद दुधाट आदी उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. दुधाट यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, वारी हे सामाजिक एकतेचे प्रतिक असून या सोहळ्यातून अंत:करणाच्या शुद्धीसोबत शुद्ध निरपेक्षपणे जीवन जगण्याची उर्मी मिळते. दिंडी हे मनुष्य जीवनाची आत्मशुद्धी, सेवा, त्याग आणि परमार्थ आहे. याप्रसंगी प्राचार्य विनायक मेथवडे यांनी आषाढी दिंडीचे महात्म्य विशद केले. विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आषाढी दिंडीमध्ये व ग्रंथदिंडीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी संजय ठाकरे, नरेंद्र ठाकरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिंडी सोहळा आयोजनामध्ये अश्विनी सोहोनी, संगीता उगले यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
=================================
-----------------------------------------------

Tuesday, July 1, 2025

शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा १६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न


विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणाऱ्या मान्यवरांचा महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मान 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / प्रतिनिधी -
सजग पत्रकारितेचा अमीट ठसा उमटवणाऱ्या शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा चा १६ वा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५ चा भव्य सोहळा अत्यंत प्रेरणादायी व ऐतिहासिक स्वरूपात अहिल्यानगर येथील हॉटेल संजोग च्या प्रशस्त ए.सी. हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे नेतृत्व संपादक मा.रमेश जेठे (सर) यांनी कुशलतेने केले. सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून मान्यवर, साहित्यिक, समाजसेवक, पत्रकार, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

मुख्य आकर्षण होते आदर्श गांव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रेरणादायी उपस्थिती. त्यांच्यासह मान्यवरांमध्ये दैनिक जयबाबा चे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे, डॉ. बबन जोगदंड, टी.एस. चव्हाण, नगरसेवक नितीन वाघमारे, रवि शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात २९ समाजहितैषी मान्यवरांना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” ने गौरवण्यात आले. या मान्यवरांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून ते समाजासाठी दीपस्तंभ ठरले आहेत त्यात सर्वश्री भरत विटकर, सदाशिव जाधव, कर्नल ऋषिकेश धोत्रे, राजेश ननवरे, कीर्ती पवार, संदीप कुसळकर, भोरू मस्के, शाम विटकरी, सुरेश विटकर, चंद्रकांत शहासने, ललित गुंदेचा, धर्मात्मा मिश्रीमल मुथ्था, रवि शिंदे,अप्पासाहेब ढूस, राजकुमार आघाव, रामचंद्र मंजुळे, विष्णू पवार, कृष्णा पवार, सचिन शिंदे, राजू ननवरे, दीपक मेढे, किरण तागडकर, सागर धनवटे, मोहन गायकवाड, नितीन शेलार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीवेतेसाठी समता फाऊंडेशन चे संस्थापक / अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, शिवाजी ननवरे, विशाल जेठे, हरिष बंडीवडार, मयूर मिरे, बबलू विटेकर,डॉ. सुहास पाखरे, निरज जेठे व शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सोहळ्याचे आयोजन हुबेहूब सिनेमासोहळ्याच्या तोडीचे ठरले. अहिल्यानगरच्या धर्तीवर असा भव्य सोहळा प्रथमच पार पडला.
सामाजिक एकतेचा, प्रेरणेचा आणि योगदानाचा उज्ज्वल दीप म्हणून शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा ही जनतेच्या मनात अधिक खोलवर अधोरेखित झाली.अलंकार हा वृत्तपत्राला असतो त्याच्या सत्यवचन, निर्भीडतेच्या तेजात...” याची प्रचिती या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात बघावयास मिळाली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणी सिने क्षेत्रास लाजवेल असे सुयोग्य सुत्र संचालन सुप्रसिद्ध निवेदक उध्दव काळापहाड व प्रियांका मॅडम यांनी केले.शेवटी संपादक रमेश जेठे (सर) यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------

*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
विशाल व निरज जेठे (देहरे)
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, June 28, 2025

श्रीरामपूर येथील वार्ड नंबर दोन मध्ये कुठल्यातरी भागात येथे डीपी फिट करण्याचे कामावर गैरप्रकार

- राजु मिर्जा - श्रीरामपूर -/ वार्ता - 
श्रीरामपूर येथे वार्ड नंबर दोन मध्ये काहीच कारण नसताना लाईटीचा गैरप्रकार होत आहे डीपी बसण्याच्या प्रकारांमध्ये हा प्रकार चालू असून सदरील एम एस ई बी चे कामगारांना माहिती विचारली असताना ते सरळपणे उत्तर देतात की निरनिराळे भागामध्ये काम चालू असून काम पूर्ण होऊन गेल्यास वीज पुरवठा  चालू व सुरळीत करण्यात येईल तसेच नागरिकाकडून असाही अंदाज लावण्यात येत आहे की कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या सांगण्यावरून एम एस सी बी चा कर्मचारी सुभाष हा लाईट फिरवण्याचे कामात एक्सपर्ट असून यालाही विचारणी केली असताना याच्याकडून असे स्पष्ट सांगण्यात येत आहे की काही टेक्निकल दोष कामांमध्ये झाला असून सुधारण्या कामे आम्ही व्यस्त आहोत ते पूर्ण करण्यात येत आहे तसेच सप्ताह शेवटचा दिवस असून हा पूर्ण कामकाज म्हणजेच वर्क डे असून काही बोलण्याचे नागरिकांना अधिकार ठेवले नसून मुद्दामून त्रास चालवलेला आहे तरी वीज मुख्य केंद्र मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या आदेशानुसार दक्षता व गुण नियंत्रण मंडळ चे समिती नेमून सदर चालू असलेले गैरप्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी दायित्व दोष  आढळतात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी व यांच्या जागेवर प्रामाणिक होतकरू कामगारांची नेमणूक करण्यात यावी  अशीच अपेक्षा बाळगण्यात येते नागरिकांनी दूरध्वनीद्वारे लाईटी संदर्भ विचारणा केली असताना असे सांगण्यात येते की इथे आम्ही डीपी बसवत आहे त्याचा अनुषंगाने आता लाईट  सकाळ ते संध्याकाळपर्यंत येऊ शकत नाही अशी स्पष्ट प्रश्नाचे उत्तर देतात तरी सकाळपासून  संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा ठप्प  गैरसोय करून  नागरिक ह्या संदर्भ संताप व्यक्त करत आहे अशाच  गैरप्रकार होत असून लाईट बंद करण्याचे काहीच कारण नसून वीज पुरवठा खंडित करून हा वीज पुरवठा बहुतेक  एमआयडीसी तील कारखान्या ना औद्योगिक  विभाग कॉर्पोरेशन भागामध्ये वर्ग करण्यात येत असावेत त्यामागील असे कारण असू शकतात की धोरणात्मक सप्ताहाचे शेवटच्या दिवशी एमआयडीसी कारखानदारी व औद्योगिक कार्यक्षेत्र नियमित विज पुरवठा  शासकीय धोरण व नियमानुसार पूर्वीला जात नसून काहीतरी भ्रष्टाचाराच्या मार्गानेच मोठी रक्कम वरील कंपन्याकडून घेऊन लाईटचा प्रश्न उद्भवत आहे अशी दाट शक्यता वाटते  असा नागरिकांना संभ्रम असून ह्या संदर्भ सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी ही नागरिका करून मागणी होत आहे 

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूर येथील वार्ड नंबर दोन मध्ये कुठल्यातरी भागात येथे डीपी फिट करण्याचे कामावर गैरप्रकार

- राजु मिर्जा - श्रीरामपूर -/ वार्ता - 
श्रीरामपूर येथे वार्ड नंबर दोन मध्ये काहीच कारण नसताना लाईटीचा गैरप्रकार होत आहे डीपी बसण्याच्या प्रकारांमध्ये हा प्रकार चालू असून सदरील एम एस ई बी चे कामगारांना माहिती विचारली असताना ते सरळपणे उत्तर देतात की निरनिराळे भागामध्ये काम चालू असून काम पूर्ण होऊन गेल्यास वीज पुरवठा  चालू व सुरळीत करण्यात येईल तसेच नागरिकाकडून असाही अंदाज लावण्यात येत आहे की कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंता यांच्या सांगण्यावरून एम एस सी बी चा कर्मचारी सुभाष हा लाईट फिरवण्याचे कामात एक्सपर्ट असून यालाही विचारणी केली असताना याच्याकडून असे स्पष्ट सांगण्यात येत आहे की काही टेक्निकल दोष कामांमध्ये झाला असून सुधारण्या कामे आम्ही व्यस्त आहोत ते पूर्ण करण्यात येत आहे तसेच सप्ताह शेवटचा दिवस असून हा पूर्ण कामकाज म्हणजेच वर्क डे असून काही बोलण्याचे नागरिकांना अधिकार ठेवले नसून मुद्दामून त्रास चालवलेला आहे तरी वीज मुख्य केंद्र मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या आदेशानुसार दक्षता व गुण नियंत्रण मंडळ चे समिती नेमून सदर चालू असलेले गैरप्रकाराची सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी दायित्व दोष  आढळतात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्यात यावी व यांच्या जागेवर प्रामाणिक होतकरू कामगारांची नेमणूक करण्यात यावी  अशीच अपेक्षा बाळगण्यात येते नागरिकांनी दूरध्वनीद्वारे लाईटी संदर्भ विचारणा केली असताना असे सांगण्यात येते की इथे आम्ही डीपी बसवत आहे त्याचा अनुषंगाने आता लाईट  सकाळ ते संध्याकाळपर्यंत येऊ शकत नाही अशी स्पष्ट प्रश्नाचे उत्तर देतात तरी सकाळपासून  संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा ठप्प  गैरसोय करून  नागरिक ह्या संदर्भ संताप व्यक्त करत आहे अशाच  गैरप्रकार होत असून लाईट बंद करण्याचे काहीच कारण नसून वीज पुरवठा खंडित करून हा वीज पुरवठा बहुतेक  एमआयडीसी तील कारखान्या ना औद्योगिक  विभाग कॉर्पोरेशन भागामध्ये वर्ग करण्यात येत असावेत त्यामागील असे कारण असू शकतात की धोरणात्मक सप्ताहाचे शेवटच्या दिवशी एमआयडीसी कारखानदारी व औद्योगिक कार्यक्षेत्र नियमित विज पुरवठा  शासकीय धोरण व नियमानुसार पूर्वीला जात नसून काहीतरी भ्रष्टाचाराच्या मार्गानेच मोठी रक्कम वरील कंपन्याकडून घेऊन लाईटचा प्रश्न उद्भवत आहे अशी दाट शक्यता वाटते  असा नागरिकांना संभ्रम असून ह्या संदर्भ सखोल चौकशी होऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी ही नागरिका करून मागणी होत आहे 

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Friday, June 27, 2025

शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तविद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप


कर्तव्य समजून गरजूंना मदत
करायला हवी- फिरोज तांबोली 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 समाजामध्ये गरजूंना मदत करणाऱ्यांची संख्या वाढली आहे परंतु मदत करणे म्हणजे लोकं उपकार समजून करायला लागले आह, ही मानसिकता बदलून कोणतेही मदत कार्य हे कर्तव्य समजून करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राईम कन्स्ट्रक्शनचे संचालक फिरोज तांबोली यांनी केले.
नगर येथील मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी आणी रहेमत सुलतान फाऊंडेशन च्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील कुष्ठधामरोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैदुवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना शफी हज उमरा टुर्स, राजकुमार गुरनानी, मुस्कान वेल्फेअर असोसिएशन, ऍड.अमीन धाराणी, निशांत दातीर, किरण उजागरे, सुनील वाघमारे, दिनेश मंजरतकर, प्रा. महबूब सय्यद, नंदकिशोर आढाव आदी दानशूरांच्या विशेष सहकार्याने फिरोज तांबोली यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मखदुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, शाळेच्या शिक्षिका मिनाक्षी धामणे, जाधव आदि उपस्थित होते.

 पुढे बोलतांना फिरोज तांबोली म्हणाले की, समाजामध्ये स्वार्थीपणा फार वाढत चाललेला आहे. कोणतेही समाजकार्य करतांना बहुतांश संघटनांचा त्यामागे काही ना काही हेतू असतो,असे समाजकार्य किंवा पुण्यकार्य परमेश्‍वरालाही नकोय. नि:स्वार्थीपणाने आज कार्य करण्याची खरी गरज असून, त्यासाठी बौद्धीक प्रबोधन होण्याचीही आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. तर आभार मिनाक्षी जाधव यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================