राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, December 14, 2025

मानवी कल्यानासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रामाणिक प्रयत्न करणं प्रत्येकाचे कर्तव्य आहेत "

''' डॉ सलीम सिकंदर शेख
06 डिसेंबर 2025 रोजी पुणे, गुरुकुल सेवा भूषण पुरस्कार सोहळा गुरुकुल विश्वपीठ वडगांव शेरी पुणे येथील गुरुकुल विश्वपिठाचे कुलगुरू ईश्वरप्रिय डॉक्टर अजयचंद्र भागवत गुरुजी यांनी आयोजित केलेल्या गुरुकुल सेवा भूषण पुरस्कार ला विविध स्थरातील सामाजिक काम करणार्यांना विविध पुरस्काराणे सन्मानीत करण्यात आलं होतं..श्रीरामपूर चे प्रसिद्ध समाजसेवक डॉ सलीम सिकंदर शेख, डॉ. नितीन वाघमारे, श्री मनोहर कोलते, विजय शिवले, मिस पूर्णिमा गदीया जी, सौं लता शिंदे, सौं. निर्मला अय्यर, प्रशांत कदम व्यक्तींना सन्मान व पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले.. त्याच प्रमाणे गुरुकुल विश्व पिठाचे कुलगुरू डॉ भागवत गुरुजी चा वाढदिवस ही होता, त्यांना तेथे जमलेल्या गुरुजींच्या विविध स्थरातील भक्त व विद्यार्थी नीं गुरुजींना उदंड आयुष्य च्या निरोगी शुभेच्छा ही दिल्या. तेथील वातावरण गुरुकुल मय अध्यात्मिक वातावरणात हा अविस्मरणीय सोहळा संपन्न झाला, त्या सोहळ्यात श्रीरामपूर व पुणे शहरातील असंख्य बंधू बघीनी हजर होतें श्रीरामपूर हुन इंजिनीर राजू पठाण, राजू सिकंदर शेख, ताज भाई पठाण, पुणे येथील जमात चे फरझाना बाजी, रेहाना शेख, समाजसेवक फरहान शेख, मोंटू खान, सुफियान शेख व असंख्य प्रामुख्याने उपस्थिती होतें..सत्काराला उत्तर देतांना आपल्या भाषणात डॉक्टर सलीम शेख यांनी सांगितले की.... "मनाव कल्यानासाठी सर्वांनी आप आपल्या परीने कमीत कमी काहीतरी आपल्या कडून प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहेत.."

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

लेखक डॉक्टर सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर.
, मोबाईल नं. 9271640014👍
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Thursday, December 11, 2025

महायुती सरकारच्या मागील कार्यकाळात खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत घेतलेला निर्णय अत्यंत ऐतिहासिक


- नागपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव मळ्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शेतकरी शिष्टमंडळासह राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेतली. महायुती सरकारच्या मागील कार्यकाळात खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत घेतलेला निर्णय अत्यंत ऐतिहासिक ठरला असून दीर्घकाळ चाललेल्या संघर्षानंतर या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्या, ज्यामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला.

तथापि, काही मुद्दे अद्याप प्रलंबित असल्याने ते यावेळी सविस्तर मांडले. यावेळी श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत या प्रश्नांवर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयासाठी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणार ! महत्त्वपूर्ण बैठक ना, राधाकृष्ण विखे पाटील


- नागपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाच्या सिंचन सुविधांसाठी आवश्यक असलेल्या उपसा सिंचन योजनेबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष लक्षात घेऊन चौंडी येथे आयोजित मंत्रीमंडळ बैठकीत महायुती सरकारने कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व भौतिक सुविधा आणि पायाभूत संरचना निर्धारित कालावधीत उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्नांची गती वाढविण्यात आली आहे. निर्णय प्रक्रियेची अंमलबजावणी वेगाने आणि परिणामकारक पद्धतीने होऊन कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पुढील कार्यवाही करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. या बैठकीस कृषी मंत्री श्री. दत्तात्रय भरणे तसेच जलसंपदा विभागाच्या कुकडी लाभक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत कयाधूशाखा कालवा आणि तळनी शाखा कालव्यांच्या दुरुस्तीसाठीदुरुस्तीकरिता तयार करण्यात आलेल्या आराखड्याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.मंत्री, ना. राधाकृष्ण विखे पाटील


- नागपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत कयाधू शाखा कालवा आणि तळनी शाखा कालव्यांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात विधानभवनातील दालनात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी वितरीका व कालव्यांच्या दुरुस्तीकरिता तयार करण्यात आलेल्या आराखड्याची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.


यासोबतच आवश्यक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बैठकीदरम्यान दिले. या बैठकीस आमदार श्री. बाबुराव कदम कोहळीकर, जलसंपदा विभागाचे डॉ. संजय बेलसरे, तसेच गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संतोष तिरयनवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




Tuesday, December 9, 2025

मंत्री ना, राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृष्णा खोरे पूर नियंत्रण प्रकल्पांतर्गत कामांचा आढावा !


कृष्णा खोरे पूर नियंत्रण प्रकल्पाच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, यापूर्वी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, आतापर्यंत झालेली प्रगती आणि पुढील टप्प्यात करावयाची कामे यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

यासोबतच नाबार्डच्या सहकार्याने राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रक्रियेचेही परीक्षण करण्यात आले. जलसंपत्तीचा योग्य वापर, प्रलंबित कामांची गती आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. दीपक कपूर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


शेडगाव येथील लहानगा श्रीराज फड याच्यावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून तो गंभीर जखमी झाला होता. खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्वरित प्रतिकारामुळे श्रीराजचा जीव वाचला

शेडगाव येथील लहानगा श्रीराज फड याच्यावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून तो गंभीर जखमी झाला होता. या भीषण प्रसंगात श्रीराजच्या आईने आणि आजीने दाखवलेले अद्भुत धैर्य खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्वरित प्रतिकारामुळे श्रीराजचा जीव वाचला, हा त्यांच्या साहसाचा मोठा पुरावा आहे.


दवाखान्यातील उपचारानंतर श्रीराज आता सुखरूप घरी परतला असून, आज त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. तसेच, श्रीराजच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पुढील काळात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वन विभागाकडून मदतीचा धनादेश सुपूर्त केला. यावेळी श्रीराज लवकर पूर्णपणे ठणठणीत बरा व्हावा, ही सदिच्छा व्यक्त केली. तसेच, याप्रसंगी वनविभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


श्री म्हसोबा महाराजांच्या पारंपरिक यात्रोत्सवाचा प्रारंभ लोणी बुद्रुक


- लोणी - प्रतिनिधी -/ वार्ता -
आपल्या लोणी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांचा पारंपरिक यात्रोत्सव आजपासून मोठ्या भक्तिभावाने सुरू झाला. या पवित्र उत्सवाच्या प्रारंभी सपत्निक उपस्थित राहून श्री म्हसोबा महाराजांची महाआरती केली तसेच, श्रींचे मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेतले. यासोबतच लोणी बुद्रुकसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

श्री महाभिषेकाने यात्रेची सुरुवात करण्यात आली असून, लोणीतील ग्रामस्थ एकजुटीने हा उत्सव दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा करतात. संपूर्ण राज्यातून येणारे भाविक येथे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबासाठी श्रींच्या चरणी मंगलकामना व्यक्त करतात.



=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================