राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, April 27, 2025

जागतिक पुस्तक दिन निमित्त मख़दुम सोसायटी तर्फे मोफत पुस्तके वाटप


पालक व शिक्षकांनी विधार्थयांना पुस्तकाशी जवळीक निर्माण करावी - आबीद खान 

- अ,नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने सावित्रीबाई फुले उर्दू प्राथमिक कन्या शाळेत जागतिक पुस्तक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबिद दुल्हे खान यांनी उद्घाटनपर भाषण केले. आणि शालेय विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटली आणि विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व, पुस्तके वाचण्याची उपयुक्तता आणि सध्याच्या युगात विद्यार्थ्यांचे पुस्तकांपासूनचे अंतर या विषयांवर मार्गदर्शन केले. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पण पुस्तकांना महत्त्व आहे. त्यामुळे पालक व शिक्षकांनी विद्यार्थयां मध्ये पुस्तकांशी जवळीक निर्माण केली पाहिजे असे सांगितले.या वेळी स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक नौशाद सय्यद, असलम पटेल,यास्मिन शेख, फरजाना शेख, शाहीन शेख, काझी मुमताज, शेख सुलताना, शेख हीना यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असलम पटेल यांनी केले. तर आभार नौशाद सैय्यद यांनी मांनले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान अ.नगर
----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
----------------------------------------------
=================================

बालसंगोपन योजनेचा आढावा घ्या,आयुक्तांना निवेदन - मिलिंदकुमार साळवे यांची मागणी


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी कोट्यवधींचा निधी असूनही लाभार्थी वंचित

पुणे - श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 पन्नास वर्षे पूर्ण करून सुवर्ण महोत्सव साजरा करीत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची हजारो प्रकरणे व लाखभर बालकांचे अनुदान कोट्यवधींचा निधी उपलब्ध असूनही रखडले आहे. त्यामुळे या योजनेचा राज्य पातळीवर जिल्हानिहाय आढावा घेऊन गती दयावी, अशी मागणी मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी राज्याच्या महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे केली आहे.
 साळवे यांनी पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयात आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निवेदन देऊन योजनेच्या अंमलबजावणीतील समस्यांकडे लक्ष वेधले.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयामार्फत गेल्या पन्नास वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत आहे. कोरोनामध्ये तसेच विविध आजार व दुर्घटनांमध्ये आई, वडील अथवा दोन्ही पालक गमावलेल्या एकल, अनाथ बालकांच्या शिक्षण व संगोपनासाठी ही योजना राबविली जाते. त्यानुसार अशा पात्र लाभार्थी बालकांना दरमहा २ हजार २५० रू. अनुदान दिले जात आहे. तर कोरोनामध्ये पालक गमावलेल्या बालकांना केंद्र सरकारच्या प्रायोजित योजनेंतर्गत दरमहा ४ हजार रू. लाभ दिला जात आहे. केंद्र व राज्य सरकारकडून दोन्ही योजनांसाठी दरवर्षी तीनशे ते चारशे कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला जात आहे. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तत्परतेने राबविणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयांतर्गत बालसंगोपन योजनेच्या प्रस्ताव मंजुरी व निधी वाटपात मोठा गोंधळ आहे. प्रस्ताव मंजूर असूनही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एक, दोन वर्षे अनुदान जमा होत नाही. प्रस्ताव दाखल केले तर दीड, दोन वर्षे लाभार्थ्यांना आपण दाखल केलेल्या प्रस्तावाचे काय झाले?हेच कळत नाही. त्यामुळे या सर्व गोंधळाची चौकशी करून योजनेचा जिल्हा निहाय आढावा घ्यावा, तातडीने प्रलंबित प्रस्ताव निकाली काढून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात देय संपूर्ण कालावधीचे अनुदान डी.बी.टी.द्वारे वर्ग करावे, अशी मागणी मिलिंदकुमार साळवे यांनी महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांची आयुक्तालयात समक्ष भेट घेऊन केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -✍️✅🇮🇳... 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, April 25, 2025

देखो देखो भाई, बहनों, माताओं,स्नेहीजनों देखो राम राज्य आ गया मगर क्या सचमुच रामराज्य आ गया


देखो देखो भाई बहनों माताओं, स्नेहीजनों देखो राम राज्य आ गया ! देखो-देखो परिवार के साथ परिवार के प्रत्येक मनुष्य जीव आत्मा सुखी है और आनंद ही आनंद उनके मुंह पर दिखाई दे रहा है , "जलाओ दीप आंगन में मेरे प्रभु राम आए हैं बजाओ ढोल नगाड़े आंगन में मेरे प्रभु राम आए हैं? "
क्या वास्तव में राम आए हैं, या राम राज्य आया है तो देश में इतना ऊथल‌पुथल क्यों है? क्यों अब कोई नेता भ्रष्टाचार का विरोध नहीं करता, क्यों अब जनता थक-हार कर चुपचाप टेबल के नीचे से रूपया देकर अपना काम कराना बेहतर समझती है? अब तो जैसे जनता भी मान चुकी है कि, नेता हैं तो भ्रष्टाचार करेंगा ही क्योंकि अब कोई भी नेता शरीफ नहीं हो सकता है ?
इसलिए जनता चुप रहना बेहतर समझती है, और अपना काम टेबल के नीचे रूपया देकर करवाना बेहतर समझती है या दुसरे शब्दों में नेताओं के साथ साथ जनता भी भ्रष्टाचार में भागीदार बनी हुई है इसलिए आजकल दोनों मिलकर गा रहें हैं "राम आएंगे तो अंगना सजाऊंगी"क्योंकि विरोध करने से कोई लाभ नहीं। चोर के मामले में पहले यह कहावत मशहूर थी चोर चोर मौसेरे भाई जबकि अब यह कहावत उल्टी हो गई है "चोर हपाही भाई -भाई"
आजकल जो भारत में राजनीतिक परिदृश्य दिख रहा है,कहीं से नहीं लगता है राम आएंगे?
वो रामराज्य का दौर ही अलग था एक आदर्श शासन प्रणाली का प्रतीक थी, जिसकी कल्पना हिंदू धर्मग्रंथों और रामायण में की गई है। यह वह समय था जब भगवान राम अयोध्या के राजा थे। राम राज्य को न्याय, धर्म, समानता, समृद्धि और शांति से परिपूर्ण माना जाता है। 
1. न्याय और धर्म का पालन – राजा राम ने हमेशा धर्म और सत्य के मार्ग पर चलकर शासन किया।
2. जनता की भलाई – सभी नागरिक सुखी, संतुष्ट और सुरक्षित थे। कोई दुखी, गरीब या शोषित नहीं था।
3. प्राकृतिक संतुलन – वर्षा समय पर होती थी, फसलें अच्छी होती थीं, और कोई अकाल या विपत्ति नहीं आती थी।
4. नैतिक शासन – राजा राम खुद को जनता का सेवक मानते थे, और कोई भी कानून सब पर समान रूप से लागू होता था।
5. शासन में पारदर्शिता – हर निर्णय में जनहित को सर्वोपरि रखा जाता था।
6.धर्म आधारित शासन – राजा राम ने धर्म और नैतिकता के अनुसार शासन किया।
7. न्याय और समानता – सबको समान अधिकार और न्याय मिला।
8. जनता की भलाई – हर व्यक्ति सुखी और सुरक्षित था।
9. शांति और समृद्धि – कोई युद्ध, अकाल या बीमारी नहीं थी।
10. प्राकृतिक संतुलन – मौसम सही रहता था और फसलें अच्छी होती थीं।
राम राज्य वह आदर्श शासन था जो भगवान श्रीराम के द्वारा स्थापित किया गया था। यह एक ऐसा राज्य था जहाँ जनता खुशहाल, सुरक्षित और संतुष्ट थी। रामायण के अनुसार, राम राज्य में कोई दुखी, गरीब, बीमार या अन्याय का शिकार नहीं था। वहाँ धर्म, सत्य, न्याय और शांति का पालन होता था।
जबकि आज का समाज बिल्कुल विपरीत है?
हर क्षेत्र में पतन हुआ है चाहे नेता हो या जनता सभी इस पतन में बराबर के भागीदार बने हुए हैं ?ऐसी परिस्थिति में राम राज्य की कल्पना कैसे पुरी हो सकती है??ये ऐसा युग है जहां चोर सिपाही आपस में भाई भाई है और जनता दोनों को रुपए देकर दूर से राम सलाम करती है? आपस में मिलकर राम नाम का जयकारा लगाती हैं?यह कलयुग है द्वापरयुग नहीं यहां चोर उचक्के, सिपाही पुलिस मिलकर राम नाम का जयकारा लगाती है भला राम राज्य आए तो आए कैसे ?

=================================
-----------------------------------------------

*चंद्रकांत सी.पूजारी*✍️✅🇮🇳...
महुवा - सुरत (गुजरात) 
+91 79847 50817
-----------------------------------------------
=================================


विद्यार्थ्यांनो वाहतुकीचे नियम आत्मसाद करा !हल्लीच्या वाढत्या रस्तेअपघातांवर मात करा !!




विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाल्याने गुणवत्ता वाढते- समोनि.राणी सोनवणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध वेगवेगळ्या स्पर्धामधील यशाबद्दल तालुक्यातील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल माळेवाडी या शाळेत नुकताच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहायक मोटार वाहन निरीक्षक राणी सोनवणे या प्रामुख्याने उपस्थित होत्या तर या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक भागचंद औताडे, श्रीरामपूर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार पोलीस नाईक किरण टेकाळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, माजी सरपंच सोपानराव औताडे, उपसरपंच भागुबाई मगन घोडके, आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी पवन आत्राम,असिस्टंट मॅनेजर मिथिलेश कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना सुयोग्य मार्गदर्शन करताना सहायक मोटार वाहन निरीक्षक राणी सोनवणे यांनी वाढत्या रस्ते अपघातांवरील नियंत्रण म्हणजेच वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांनी देखील रस्त्याने चालताना घ्यावयाची काळजी तसेच विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम आणि रस्त्यावर चालताना तथा वाहन चालविताना घ्यावयाची खबरदारी याविषयी उपयुक्त माहिती विषद केली. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना जर चांगल्या प्रकारचे प्रोत्साहन मिळाले तर निश्चितपणे त्यांची गुणवत्ता वाढते आणि शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावतो करीता "विद्यार्थ्यांनो वाहतुकीचे नियम आत्मसाद करा !, हल्लीच्या वाढत्या रस्ते अपघातांवर मात करा !!" असेही त्या म्हणाल्या.
 शाळेत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला संस्कार स्पर्धा परीक्षा मुंबई तसेच साई कलाविष्कार संस्था पुणे यांच्या चित्ररंगभरण परीक्षेत विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, मेडल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुकास्तरीय गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
जिल्हास्तरावर निवड झालेल्या आणि तालुका स्तरावर प्रथम आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेतील बालकलाकारांचाही यावेळी गुणगौरव करण्यात आला. केंद्रस्तरीय लांब उडी,उंच उडी,धावणे, कथाकथन, आणि वकृत्वस्पर्धेत केंद्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष भाऊसाहेब ठाकरे,एकनाथ ठाकरे, सराल्याचे सरपंच शंकर विटेकर, किरण बनसोडे, बबन तात्या औताडे,रवींद्र मोहन,प्रकाश मोहन, आशाबाई फुलारे,ताहेर शेख, रामभाऊ वमने, देविदास वमने, वैभव नेद्रे,गणेश लबडे, विजय मोहन, अविनाश उमाप,अंकुश मोहन, सोनल औताडे, मनोज घोडके,सचिन वमने, विलास औताडे, राहुल औताडे, जाकीर शहा, कालिंदी घोडके,रूपाली घोडके, रेश्मा शेख,शीतल ठाकरे, आसाराम लबडे सुवर्ण वमने, सुनीता ठाकरे, शांता मोहन आदी शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक उपक्रमशील शिक्षक श्री. शेख यांनी केले व शेवटी आभार मुख्याध्यापक राजू भालेराव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सारिका लोखंडे, मीरा ससाणे, मीनाक्षी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------

 *वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई
वडाळा महादेव ✍️✅🇮🇳...

-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111

-----------------------------------------------
=================================

नाईंटीस् च्या गोल्डन इरा मधुर गीतांच्या महफिलचे रविवारी नगरमध्ये आयोजन


वाद्य वाजवणाऱ्या ४० कलावंताबरोबर नगर मध्ये प्रथमच मोठी संगीत मेजवानी 

अह,नगर - प्रतिनिधी - प्रतिनिधी -/ वार्ता -
नगर मधील संगीतप्रेमीं रसिकश्रोत्यांसाठी सुमधुर गाण्यांची महफिल डॉ. दमन काशीद (पाटील), महेश घावटे व निलेश महाजन प्रस्तुत "९० गोल्डन इरा" मध्ये कुमार सानू, उदित नारायण, अलका याग्निक, सोनू निगम, अनुराधा पौडवाल यांच्या नवाजलेल्या रोमांटिक गीतांची मैफिलीचे रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता शहरातील स्टेशन रोड येथील सहकार सभागृहात आयोजित करण्यात आली असल्याचे नगरचे सुप्रसिद्ध सर्जन डॉ.दमन काशीद यांनी सांगितले.
या कार्यक्रमात डॉ. दमण काशीद, डॉ. गायत्री कुलकर्णी, निलेश महाजन, महेश घावटे, प्रतिभा साबळे, पूजा गडकरी, सारिका रघुवंशी, सुशील देठे, सचिन चंदनशिवे आदि गीते सादर करणार असून दहा प्रोफेशनल गायक कोरस देणार आहे. सहा डांसर असून उत्तम सूत्रसंचालन असणार आहे. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी असल्याकारणाने श्रोत्यांसाठी चहा नाश्त्याची देखील मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे डॉ. दमण काशीद यांनी सांगितले.
प्रथमच नगरमध्ये असा शो होत आहे ज्यामध्ये गीतांना संगीत देण्यासाठी ४० संगीत वाजविणारे कलावंत असणार आहे. ज्यामध्ये ऑक्टोपॅड, रिदम, तबला, साईड रिदम, पर्शियानिस्ट, कीबोर्ड, सेक्सोफोन, फ्लूट, सितार, गिटार, लीड गिटार, बेस गिटार, ब्रास सेक्शन, ट्रम्प पॅड, व्हायलंस साठी आठ कलाकार, गिटार कॉर्डिनेशन ग्रुप मध्ये आठ महिला कलाकार आदी वाजंत्रीचे या शोमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. हा शो सर्वांसाठी मोफत आहे. पण प्रवेशिका अनिवार्य आहे. त्यासाठी ज्ञानेश्वर माने यांच्या ८९५६३६३६६८ या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहनही डॉ. दमण काशीद यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर

-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111

-----------------------------------------------
=================================


Wednesday, April 23, 2025

क.जे.सोमय्या हायस्कूलमध्ये 'जागतिक पुस्तक दिन ' मोठ्या उत्साहात साजरा


क.जे.सोमय्या हायस्कूलमध्ये 'जागतिक पुस्तक दिन ' मोठ्या उत्साहात साजरा

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आज बुधवार दिनांक २३ एप्रिल २०२५ जागतिक पुस्तक दिन क जे सोमय्या हायस्कूल व जुनिअर कॉलेज मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाचन संस्कृती जपणे व वाचनाची चळवळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. पुस्तके आपले आयुष्य समृद्ध करतात आपल्याला अनेक अनुभव देतात तसेच जीवन जगण्याचे सूत्र हे पुस्तकातच लपलेले असते ते शोधण्यासाठी प्रत्येकाने पुस्तकांचे नियमित वाचन करावे असे आवाहन विद्यालयाचे चेअरमन रणजीत श्रीगोड यांनी केले . तर पुस्तके जेथे असतील तेथे स्वर्ग निर्माण होतो म्हणून पुस्तकांचे नेहमी स्वागत करा पुस्तकांना जपा असे विचार ज्युनिअर कॉलेज विभागाचे चेअरमन जितेंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश धोंडलकर यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.गोपाळे सर, पर्यवेक्षक श्री.लकडे सर, स्कूल कमिटी सदस्य किशोर फुणगे, उमेश तांबडे, प्रशासन अधिकारी श्री. कांबळे सर्व शिक्षक, शिक्षिका सेवकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
-----------------------------------------------

नाजेमा बेगम नवाब शेख यांना"संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार" प्रदान


नाजेमा बेगम नवाब शेख यांना
"संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार" प्रदान

- अह,नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सोनई नंबर चार च्या शिक्षिका ज्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे नाजेमा बेगम नवाब शेख यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे हा सोहळा पार पडला. याप्रसंगी रावसाहेब रोहकले, आबासाहेब जगताप, रावसाहेब सुंबे, सुरेश निवडुंगे, प्रवीण ठुबे, शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जयश्रीताई झरेकर, संगीता कुरकुटे, उज्वला वासाल, स्वाती गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नाजेमा शेख म्हणाल्या की कामाचे कौतुक झाल्यावर अजून जोमाने काम करायला बळ मिळते. काम करताना समाजातून सहकार्य मिळाल्यास भविष्यात पण विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. नाजेमा शेख यांना नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद, मखदूम सोसायटी व समाजातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

बेलापूर बु - ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिनाताई साळवी यांची बिनविरोध निवड


बेलापूर बु ll ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मिनाताई साळवी यांची बिनविरोध निवड

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बेलापूर बु ll ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा. व माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.यांचे नेतृत्वाखालील तसेच जि.परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखालील गावकरी मंडळाच्या मिनाताई अरविंद साळवी यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच स्वाती अमोलिक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणुक अधिकारी व्हि.एस.गवारी (मंडलाधिकारी) यांचे अध्यक्षतेखाली,तलाठी व्हि.एच.खेमनर व ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक संपन्न झाली.सरपंच पदासाठी गावकरी मंडळाच्या मिनाताई साळवी यांचा एकमेव अर्ज आला.विरोधी सुधीर नवले,रविन्द्र खटोड व भरत साळुंके यांचे नेतृत्वाखालील जनता विकास आघाडीने निवडणुकीतून माघार घेतली. बैठकीस गावकरी मंडळाच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंंच प्रियंका कु-हे, सदस्य अभिषेक खंडागळे, मुश्ताक शेख, तबसुम बागवान, चंद्रकांत नवले, वैभव कु-हे, उज्वला कुताळ, सुशिलाबाई पवार उपस्थित होते.
तर सुधीर नवले, भरत साळुंके, रविंद्र खटोड यांचे नेतृत्वाखालील जनता विकास आघाडीचे सदस्य अनुपस्थित राहिले. त्यामुळे मिनाताई साळवी यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. निवडीनंतर झालेल्या आभार सभेत जि.परिषद सदस्य शरद नवले म्हणाले की, गावकरी मंडळाने सरपंच पदाबाबत जो शब्द दिला आहे तो पाळला आहे. यापुढील काळात प्रवरा घाट विकास पर्यटन केन्द्र, गाव अंतर्गत रस्ते, सेंन्द्रिय खत प्रकल्प, बाराशे घरकुलांचे संकुल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केन्द्र आदी प्रश्न मार्गी लावायचे आहेत. आजच्या बिनविरोध निवडीने विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत.गावकरी मंडळात फूट पडावी यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या विरोधकांना गावकरी मंडळाने ऐक्यातून चपराक दिल्याचे श्री.नवले म्हणाले. बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की, विरोधकांनी बेताल आरोप केले त्याला आम्ही कामातून उत्तर दिले. विरोधकांच्या वीस वर्षात झाली नाहित इतकी विकास कामे गावकरी मंडळाने चार वर्षात करुन दाखविली. १२६ कोटीची ऐतिहासिक पाणीपुरवठा योजना, भुयारी गटारे, साठवण तलाव, घरकुल, क्रिडा संकुल, सर्वधर्मिय स्मशानभुमी, सेंद्रिय खत प्रकल्पासाठी ४३ एकर मोफत जमिन आदि ठळक कामे झालित. या वाटचालीत पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा. माजी खा. डाॕ.सुजय विखे पा., जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा. यांचे बहुमुल्य सहकार्य लाभल्याबद्दल श्री. खंडागळे यांनी धन्यवाद व्यक्त केले. याप्रसंगी रणजीत श्रीगोड , जालिंदर कु-हे, माजी सरपंच स्वाती अमोलिक , भाऊसाहेब कुताळ, प्रफुल्ल डावरे, रावसाहेब अमोलिक , मोहसीन सय्यद आदिंनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी गावकरी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, April 22, 2025

महात्मा गांधी विद्यालयात सायकलचे वाटप


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयात बाभळेश्वर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे सहाय्यक विभागीय अधिकारी यशपाल भिकनराव पाटील यांच्या वतीने विद्यालयातील इयत्ता पाचवी या वर्गातील विद्यार्थी सुजल देवेंद्र दळे यास सायकल भेट देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले तर प्राचार्य विनायकराव मेथवडे यांनी आपल्या मनोगतातून पाटील यांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, अनिल जाधव, नरेंद्र ठाकरे, वर्गशिक्षिका कुदळ, रमेश निकाळे, राजू गावित, बाबासाहेब अंत्रे, अनिल गोलवड, सविता दळे आदी जण उपस्थित होते. शेवटी संजय ठाकरे यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, April 20, 2025

सर्व धर्म समभाव अशा विचाराने काम करणाऱ्या सेवकाचा सन्मान - विशेष पोलीस महानिरीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ


- नागपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील उरुळी कांचन अशा छोट्याशा गावात राहुन देखील राज्यभर रांजले गांजले उपेक्षित आणी दुर्लक्षितांचे ज्वलंत प्रश्नांसाठी आहोरात परिश्रम घेत असलेले तथा आपल्या जीवन संघर्षातून पुढे येऊन हजारो कुटुंबांना कंलकीत जीवनातून मुक्त करणारे ज्येष्ठ आदिवासी समाजसेवक नामदेवराव भोसले यांचे त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल डॉ. दिलीप पाटील - भुजबळ विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र तथा सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकडून प्रशंसा पत्र देत त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप पाटील - भुजबळ म्हणाले की,संर्घश मय जिवनातून काम करणा-या समाजसेवकाचा सन्मान करताना अत्यंत आनंद होत आहेत,कोणी जन्मजात गुन्हेगार नस्तो या विचाराने काम करणारे व 
दुसऱ्याचे दुःख आपले दुःख समजून अत्यंत दैनिय परिस्थितीतून काम करणारे नामदेव हे भारत देशातील विविध राज्यांमध्ये जावून वंचित घटकांचे प्रश्न सोडवतात या कामामुळे लाखो पिढीतांच्या चेहेऱ्यावर हासू आनणारे व त्यांनी आजवर हजारो कुटुबांना गुन्हेगारी जीवनातुन बाहेर काढले आहे,त्यांचे कार्याची दखल राज्य शासनाने घेतली तर वागवे ठरणार नाही.तसे समाजसेवक नामदेव भोसले यांना सन्मानित करताना मनी अत्यंत आनंद होत आहे,सर्व धर्म समभाव अशा विचाराने काम करणाऱ्या सेवकाचा हा सन्मान असल्याचे पोलीस महानिरीक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ म्हणाले.
नामदेव हे आदिवासी व पारधी समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना गुन्हेगारीच्या कलंकित जीवनातून मुक्त करुन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहर्निश सेवा करत उल्लेखनीय योगदान देत आहेत, यास्तव नागपूर परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी व आमंलदार यांच्या वतीने आपले मनपुर्वक अभिनंदन.तसेच आपल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने देखील आपल्याला आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. आपण भविष्यातही अशा प्रकारे उच्चश्रेणीचे सामाजिक कामकाज कराल, पिढीतांची सेवा करत दिन दुबळ्यांची सेवा कराल आणि आपल्या समाजसेवेप्रती सदैव कटिबद्ध रहाल अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी प्रशंसा पत्र बहाल करताना नामदेवराव भोसले यांच्या भावी कार्यास सदिच्छा व्यक्त केल्या.
तसेच महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र पोलीस सदैव आपल्यासारख्या निर्पेक्ष समाजसेवकाच्या पाठीशी आहे असे नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डाॅ. दिलीप पाटील - भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले. समाजसुधारक नामदेव ज्ञानदेव भोसले यांची परिस्थिती मी अत्यंत जवळून पाहिली आहे, ते अत्यंत अवस्थेत देखील, निरपेक्ष आणी निस्वार्थपणे कामे करत आहेत,या कामांमुळे हजारो गरीब कुटुंबांना गुन्हेगारीच्या जीवनातून मुक्त करण्यात त्यांना यश आले आहे व त्यांनी त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे म्हणून नामदेव भोसले यांचा सन्मान पोलीस महानिरीक्षक कार्यालय नागपूर परीक्षेत्र यांच्या वतीन पोलीस महानिरीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते शाल श्रीफल व सन्मान पत्र देऊन करण्यात आला.या वेळी नामदेव भोसले, बाबा भोसले,सुनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Saturday, April 19, 2025

नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गत वैभव प्राप्त होणार - निरीक्षक ऍड.संदीप पाटील


निरीक्षक ऍड.संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार येथे काँग्रेसची जिल्हा आढावा बैठक संपन्न 

- नंदुरबार - प्रतिनिधी -/ वार्ता -
विधानसभा व लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच काँग्रेसची जिल्हा आढावा बैठक नंदुरबार येथे काँग्रेस जिल्हा निरीक्षक ऍड. संदीप पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
    यावेळी बोलताना ते म्हणाले की, मरगळ झटकत सामंजस्य ठेवले तर नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा गत वैभव प्राप्त होण्यासाठी अधिक वेळ लागणार नाही , कारण कॉंग्रेस हा १४० वर्षांची परंपरा असलेला पक्ष आहे,नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसची सध्या झालेली अवस्था आणी आलेली काहीशी मरगळ दुरुस्त करुन कॉंग्रेस पक्षाला अधीक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी पक्ष बांधणीसाठी व संघटनासाठी वेळ दिला पाहिजे तसेच जनसंपर्क अजून वाढवला तर पुन्हा एकदा जिल्हा काँग्रेसमय होण्यासाठी मोठा मदतगार ठरेल.याकरीता आपापसातील मतभेद बाजूला ठेवा आणि पक्षकार्य हेच डोळ्यासमोर ध्येय ठेवून कामे करा असाही कानमंत्र श्री.पाटील यांनी यावेळी दिला.
    नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचे भरपूर मतदार आहेत हे लोकसभेच्या निकालाने दाखवून दिले आहे, फक्त एक सक्षम नेतृत्वाची गरज नंदुरबारला आहे , ग्रामीण,शहरी भागात बुत रचना मजबूत करणे, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे,आणि विरोधी पक्षातील मातब्बरांना धक्का देऊन स्वतःची जागा निर्माण करत विजयाचा आत्मविश्वास ठेवा असे मत राजेंद्र गावित यांनी मांडले.
    काँग्रेस पक्षात असूनही इतर पक्षांच्या कार्यक्रमाला काही कार्यकर्ते,नेते हजेरी लावतात मग ते काँग्रेसचे एकनिष्ठ कसे ?, जो पक्षासाठी काम करेल अशाच लोकांना यापुढे जबाबदारीची पदे दिली जावीत असे मत कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी व्यक्त केले.
    जे काँग्रेसला सोडून गेलेत त्यांचा विचार सोडा व पक्ष मजबुतीसाठी संघटित व्हा आजच्या आढावा बैठकीचे कार्यकर्त्यांची संख्या पाहून नवचैतन्य निर्माण झाले असे मत सुहास नाईक यांनी व्यक्त केले.
 काँग्रेसच्या या आढावा बैठकीत ऍड. सदिप पाटील निरिक्षक नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी, राजेंद्रकुमार गावित, दिलीप नाईक,,
सुहास नाईक, देवाजी चौधरी, पंडित मरोठ,एजाज बागवान, खान मॅडम,राजेंद्र पाटील. विविध सेलचे पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
हाजी एजाजभाई बागवान - नंदुरबार 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

माऊली वृद्धाश्रमात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर परिसरातील नेवासा रोड रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २० रविवार ते २७ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.   
  सदगुरू योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलिन सदगुरु नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज, महंत ह भ प रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह भ प आचार्य डॉ शुभम महाराज कांडेकर यांच्या अधिपत्याखाली ह भ प शरद महाराज राजवाळ, ह भ प सुधाकर महाराज लोंढे, ह भ प तुकाराम महाराज कदम, ह भ प प्रभाकर महाराज कावले, ह भ प योगेश महाराज होन, ह भ प महंत सेवानाथ महाराज, ह भ प प्रा. आदिनाथ जोशी तसेच दिनांक २७ रोजी सकाळी १० ते १२ वा काल्याचे किर्तन ह भ प डॉ. शुभम महाराज कांडेकर यांचे होणार आहे या कार्यक्रमासाठी गोरक्षनाथ भजनी मंडळ, चौंडेश्वरी भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ, कुलस्वामिनी संगीत विद्यालय, गीता स्वाध्याय परिवार मार्केट यार्ड, त्रिमूर्ती भजनी मंडळ, श्रीराम महिला भजनी मंडळ, नामदेव भजनी मंडळ, पाताळ हनुमान भजनी मंडळ अशोकनगर निपाणी वडगाव मातापुर शिरजगांव तुळजाभवानी मंडळ साई भजनी मंडळ आदी सदर कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत या कालावधीत पहाटे काकडा आरती व आठ ते अकरा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी भजन व चार ते सहा जाहीर हरी किर्तन सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम या कालावधीत संपन्न होणार आहेत तरी पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमाचा दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली आश्रम अध्यक्ष सुभाष वाघुंडे श्री अरुण विसपुते सौ कल्पना वाघुंडे सौ वंदना विसपुते नितीन शेरकर वाघुंडे गौरी वाघुंडे तसेच भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, April 18, 2025

उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी भाषा - युनूस तांबटकर


उर्दू ही प्रेम वृद्धिंगत करणारी
 भाषा - युनूस तांबटकर

नगर / प्रतिनिधी:
उर्दू ही आपल्या मनाचं प्रतिबिंब व्यक्त करणारी भाषा आहे. मने जोडून प्रेम वृद्धिंगत करणारी ही भाषा सर्व भारतीयांचा मानबिंदू आहे.भाषेच्या प्रगतीसाठी सर्वांनी झटून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. विशेषता उर्दू भाषिक शिक्षण संस्था मधून उर्दू भाषा प्रगतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे कार्य प्रशंसनिय आहे. सलग १९ वर्षे उर्दू सप्ताह साजरा करणे सोपी गोष्ट नाही. जिल्हा उर्दू साहित्य परिषद सातत्याने भाषेच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे ही अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व रहेमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले. अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित उर्दू सप्ताह समारंभात ते अध्यक्षिय भाषणात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, उपाध्यक्ष के.के. खान, इमाम सय्यद,सचिव आबिद दूल्हे खान, सहसचिव डॉ.कमर सुरूर, सदस्या नर्गिस इनामदार, अनीस शेख, मुन्नवर हुसेन आदि उपस्थित होते.
तांबटकर पुढे म्हणाले की उर्दू भाषेने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. आज आपल्या देशात ही भाषा परकिय म्हणून गणली जात आहे ही दुर्दैवी बाब आहे. उर्दू माध्यमातून शिक्षणाच्या उच्च सुविधा उपलब्ध आहेत. त्याचा समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक भाषणात उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी उर्दू सप्ताह मागची भूमिका विशद केली. गेली १९ वर्षे देशांमध्ये उर्दू सप्ताह साजरा करणारा अहमदनगर हा एकमेव जिल्हा आहे असे सांगून या उर्दू सप्ताह मध्ये जिल्ह्यातील साडेचार हजार विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला,त्या सर्वांना प्रशस्तीपत्रे उर्दू साहित्य परिषदे मार्फत देण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील सप्ताहात सहभागी सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना सन्मानचिन्ह देखील देण्यात आले आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी डॉ.कमर सुरूर,प्र. मुख्याध्यापक मुनव्वर हुसेन यांनीही मनोगत व्यक्त केले.
उर्दू साहित्य परिषदे तर्फे जिल्ह्यातील सर्व शाळांना उर्दू भाषेतील बोर्ड यावेळी प्रदान करण्यात आले. यासाठी उपाध्यक्ष के. के. खान यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद इमाम व फैयाज शेख यांनी केले. आभार आबिद खान यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बदर शेख आणि शेख साजिद कुरेशी, जुनेद, हनीफ शेख, नर्गीस इनामदार, समीना शेख, शाकीर शेख, सलीम शेख आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व शिक्षकांना सन्मानचिन्ह,विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र तसेच शाळांना बोर्ड वाटप करण्यात आले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ .नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, April 17, 2025

ख्रिस्त - नाकारलेलादगड कोनशिला झाला


एखादी गोष्ट सत्य आहे, शाश्वत आहे हे माहीत असताना सुद्धा ती जाणीवपूर्वक न स्वीकारणे म्हणजे नाकारणे होय. शीर्षकातील जो दुसरा शब्द आपल्याला खुणावतो तो म्हणजे "कोनशिला".
प्रत्येक दगडाच्या नशिबी कोनशिला होण्याचं भाग्य नसतं. मग असा कोणता दगड असतो की, ज्याला कोनशिला असे संबोधले जाते. पूर्वीच्या काळी दगडी बांधकाम जास्त प्रमाणात केले जायचे. बांधकामासाठी भरीव आणि आकारबद्ध दगड वापरला जात असे. एखाद्या इमारतीचे बांधकाम करीत असताना हजारो दगडं लागत असली तरी, बांधकामाच्या सुरुवातीला जो दगड प्रथम ठेवला जायचा त्याला मानाचे स्थान असायचे. हा तोच दगड जो बांधकामाची संरचना निश्चित करतो म्हणून त्याला कोनशिला असे संबोधले जाते.
कोनशिला हा शब्द इतरही काही संदर्भांसाठी वापरला जातो. पूर्वी ऐतिहासिक बांधकाम पूर्ण झाल्यावर ते काम कोणाच्या राजवटीत व केव्हा पूर्ण झाले त्याची संक्षिप्त माहिती एका भरीव दगडावरती कोरीत असत त्याला कोनशिला म्हणून ओळखले जाई. तो शब्द आजही प्रचलित आहे. आजही घर वजा शासकीय व इतर बांधकाम पूर्ण झाल्यावर त्याची तारीख, वास्तूविशारद, उद्घाटक यांसह इतर माहिती ज्या दगडावरती कोरली जाते त्याला कोनशिला अथवा बहुधा चर्चिला जाणारा शब्द "शिलालेख" या नावाने ओळखले जाते.
बांधणाऱ्या गवंड्याने जर एखादा दगड नाकारला असेल आणि तोच दगड जर वास्तुविशारदाने प्राधान्य क्रमाने निवडला असेल तर हा नाकारलेला दगडच कोनशिला ठरतो. नाकारलेल्या दगडाने कोनशिला ठरावं यासारखी अद्वितीय गोष्ट नाही.
अगदी या उदाहरणाप्रमाणेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत घडल्याचे आपल्याला पवित्र शास्त्रात पहावयास मिळते.
शास्त्रात (१ पेत्र - ०२:०४) मध्ये सांगितल्याप्रमाणे मानव मुक्तीसाठी स्वर्गीय पित्याने त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवरती पाठविला ज्याला जिवंत धोंडा असे संबोधले आहे. देवाची ही यथार्थ व बहुमोल निवड मात्र जगाला समजली नाही आणि कळत नकळत ख्रिस्त या जगाकडून नाकारला गेला. 
ख्रिस्ताच्या बाबतीत लोक अनभिज्ञ होते असे नाही कारण ; त्याच्या जन्मावेळी रानातील मेंढपाळ आणि मार्गस्थ तीन राजांना (ज्ञानी लोकांना) "तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे" ही शुभवार्ता कळविण्यात आली होती. याच ज्ञानी लोकांकडून हेरोद राजाला देखील ही माहिती मिळाली होती. 
मत्तयकृत शुभवर्तमान (०३:१७) नुसार आकाशातून वाणी झाली होती की, “हा माझा पुत्र आहे, ज्याच्यावर मी प्रेम करतो; त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सुद्धा (मत्तय - ०३:११) अन्वये सांगितले होते की, "मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्‍चात्तापासाठी करतो खरा ; परंतु माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहणा उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही ; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे." ख्रिस्त आगमनाचे असे एक ना अनेक दाखले आपणांस नव्या व जुन्या करारात सुद्धा पहावयास मिळतात.
ख्रिस्ताचे मानवरूप धारण करून येणे केवळ एक प्रक्रिया नव्हती, तर ती दैवी योजना होती. त्याचे येणे म्हणजे एक मिशन होते. मानव मुक्तीचे उद्दिष्ट उरी बाळगून तो आला होता. 
ख्रिस्त जन्माच्या अगोदरचा शास्त्रभाग म्हणजे जुना करार अभ्यासल्यास आपल्या लक्षात येते की, परमेश्वर पित्याने निर्मिलेल्या प्रथम स्त्री आणि पुरुष अर्थात आदाम व हवा यांनी केलेल्या पापामुळे मूळ पापाचा डाग मानवाला मिळाला आणि मानवजात मृत्यूची धनी झाली होती.
अशातच ख्रिस्त येण्याअगोदर स्वैराचार, कर्मकांड, धर्मपंडिताद्वारे समाजाची दिशाभूल तसेच देवाचे अस्तित्व नाकारून तत्कालीन राजांद्वारे स्वामीत्व प्रस्थापित करणारी भूमिका अशी एकूण सामाजिक परिस्थिती होती. या देवराज्याच्या संकल्पनेत न बसणाऱ्या गोष्टी होत्या. यापासून मानवाला दूर करणे आवश्यक होते. सन्मार्ग सन्मती व सत्संगाचा अवलंब होणे गरजेचे होते. प्रेम, दया, क्षमा, शांती या मनुष्य जन्मास स्थैर्य प्राप्त करून देणाऱ्या गोष्टींची मानवाच्या अंत:करणात पेरणी करणे महत्त्वाचे होते. 
यासाठीच की काय, स्वतःच्या पापांचे स्मरण करणे, पश्चातापी अंत:करणाने देवापुढे ती पापे कबूल करून, पापमुक्तीची याचना करणे व पुन्हा तेच ते पाप न करण्याचा निर्धार करणे, हा सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखविण्यासाठी मानवाच्या अंधकारमय आयुष्यात ख्रिस्त नावाचा तेजस्वी तारा अवतरला. आपल्या साडे तेहतीस वर्षाच्या आयुष्यात तो लोककल्याणासाठी झटला. त्याने जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेले. तो उत्तम गुरु असल्याने त्याने लोकांना दाखले देऊन सत्य समजावून सांगितले. देवराज्याची घोषणा केली. लोक माझ्याकडे येतील ही आशा न बाळगता तो लोकांपर्यंत पोहोचला. लोक भेटतील तिथे अगदी नदीच्या किनाऱ्यावर, डोंगराच्या माथ्यावर, बाजारात, मंदिराच्या ओट्यावर जमेल तिथे त्याने लोकांना उपदेश केला. पित्याचा अचूक संदेश या माध्यमातून त्याने जगापर्यंत पोहचवला. त्याच्या येण्यापूर्वी लोक मोशेच्या नियमशास्त्रानुसार जीवन जगत होते. यहूदी लोकांना आणि धर्मपंडितांना असे वाटले की, हा मोशेचे नियमशास्त्र बदलायला आला आहे. पण ख्रिस्त म्हणतो " मी मोशेचे नियमशास्त्र बदलण्यास नव्हे तर ते पूर्ण करण्यास आलो आहे." परंतू हे लोकांच्या ध्यानी आले नाही. त्यांनी सोयीस्करपणे ख्रिस्त नाकारला. 
तत्कालीन राज व्यवस्थेला, धर्मपंडितांना, शास्त्री-पुरुषींना देखील ख्रिस्ताची ही गोष्ट खटकली. ख्रिस्ताच्या सत्य सांगण्याने आपले अस्तित्व धोक्यात येईल ही भीती त्यांना वाटू लागली. त्यांनी त्याच्यावर दोषारोपपत्र ठेवून कपटाने त्याला पकडले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालविण्यात आला. ज्या राजाच्या दरबारात हा खटला सुरू होता त्या पिलात राजाला ख्रिस्तात काहीच दोष दिसेना.
मग तो हात धुवून मोकळा झाला आणि ख्रिस्ताला त्याने लोकांच्या हवाली केले. जनसमुदायाने त्याला क्रूसावर खिळा ही मागणी लावून धरली. वाढत्या जनसमुदायाच्या दबावाने जी शिक्षा चोर लुटारूंना दिली जायची ती वधस्तंभाची शिक्षा त्याला देण्यात आली. त्याच्या शिरावर काट्यांचा मुकुट घालण्यात आला. तो रक्तबंबाळ झाला. त्याला चाबकाचे फटके मारण्यात आले. लोक त्याच्या तोंडावर थुंकले. शक्तीहीन झालेला ख्रिस्त खांद्यावरती क्रूस घेऊन कालवारी टेकडीचा मार्ग चालला. तो कन्हला, विव्हळला पण कुणाला त्याची दया आली नाही. हातीपायी खिळे ठोकून त्याला क्रुसावर टांगण्यात आले.
त्याचे येणे होईपर्यंत लोक पापमुक्तीसाठी परंपरेनुसार कोंकराचा बळी देत असत मात्र ; स्वर्गीय पित्याचे निष्पाप कोंकरू मानवाचे तारण व्हावे म्हणून कर्तव्याची जाणीव ठेवून, पित्याच्या आदेशान्वये वधस्तंभी निपचित पडले होते. 
थोड्यावेळासाठी असत्य सत्यावर हसलेही असेल पण ; असत्याचा हा असुरी आनंद फार काळ टिकणारा नव्हता. कारण तिसऱ्या दिवशी मृत्युंजयी ख्रिस्त मरणातून उठणार होता नव्हे; तो पुनरुत्थित प्रभू उठला. पुनरुत्थानानंतर ४० दिवसांच्या जगीक यात्रेदरम्यान तो मारिया मग्दालिन व आपल्या १२ शिष्यांसह अनेकांना भेटला. चाळीसाव्या दिवशी तो सर्वांसमक्ष स्वर्गात घेतला गेला. 
त्याच्या पुनरुत्थानाने मृत्यूनंतरही जीवन आहे हे जगाला कळाले. ख्रिस्त सांगत आलेल्या सार्वकालिक जीवनाची प्रचिती आली. त्याच्या निष्पाप रक्ताने आपली पापातून मुक्तता झाली हे जगाला समजले. त्याच्या निरपराध रक्ताचे मोल कळाले. चोर - दरोडेखोरांना शिक्षा देण्यासाठी वापरला जाणारा शापित क्रूस (वधस्तंभ) ख्रिस्ताच्या स्पर्शाने पावन झाला. क्रूस विजयाचे निशाण ठरले.
दरम्यान त्या निरपराध कोंकराला आरोप प्रत्यारोप, न्याय निवाडा, अवहेलना व निर्दोष मरण यातून जाणे भाग पडले. जगाने त्याला नाकारले परंतू स्वर्गीय पित्याचा हा प्रिय पुत्र स्वर्गात त्याच्या उजवीकडे बसला आहे. तो न्यायाच्या दिनी मेघारूढ होऊन पुन्हा येईल. त्याने दिलेल्या पुनरुत्थनाच्या आशेने उभ्या जगाने ख्रिस्त स्वीकारला.
 अशा तऱ्हेने जगाने नाकारलेला पण देवाने निवडलेला तारणदुर्गाचा दगड (ख्रिस्त) कोनशिला झाला.
प्रसंगानुरूप या गीताच्या
 ओळी मला प्रकर्षाने आठवतात...
"हरेक धोंडा घडवू ऐसा,
 कोनशिला तो व्हावा !
बांधणारा हा जरी नाकारी, 
मान्य प्रभुला व्हावा !
विश्वासाचा घालून पाया,
 करू मंदिर महान !
धोंडे शोधू चला रे, छान छान छान !!!

=================================
-----------------------------------------------
*लेखन*
रवि त्रिभूवन (सर) ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9623280978 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
  *प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

अल करम हाॅस्पिटल तर्फे महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंती निमित्त मोफत सर्वरोग आरोग्य शिबीर संपन्न


आधुनिक उपचारपद्धतीमुळे रोग निवारण मोठ्याप्रमाणात होत आहे - डॉ.अशपाक पटेल 

अ,नगर - प्रतिनिधी - वार्ता -
बदलती जीवनशैली आणि वातावरणातील बदलांमुळे मनुष्याची प्रतिकार शक्ती कमी होत आहे. विशेषत लहान मुलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. दुषित पाणी, फास्ट फूड, अस्वच्छता यामुळे आजारांची उत्पत्ती होतांना दिसते. या वेगवेगळ्या आजारांचे निदानही अत्याधुनिक मशिनरीद्वारे करता येत असल्याने उपचार करणेही आता सोपे होत आहे. उपचार वेळेत न झाल्याने आजार बळावतात. त्यासाठी अशा मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून आजारांचे निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करणे सोपे होणार आहे. त्यामुळे अशा शिबीरांची गरज आहे, असे प्रतिपादन डायबॅटोलाॅजिस्ट व कार्डीयोलाॅजिस्ट डॉ. अशपाक पटेल यांनी केले. 
अल करम हॉस्पिटलच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त तीन दिवस मोफत सर्वरोग आरोग्य शिबीर निदान व उपचार करुन रुग्णांना औषधे ही देण्यात आली.
 या शिबीरात प्रत्येक दिवशी ४० ते ५० रुग्णांनी याचा लाभ घेतला. रुगणांची तपासणी डॉ. अशपाक पटेल यांनी केली. रक्त व शुगर तपासणी महेश सानप, शिफा शेख, विशाल काळे, दानिश खान, मुस्कान शेख यांनी केले. यावेळी डॉ. जहीर मुजावर, डॉ सय्यद खुसरो, डॉ के. व्यंकटेश, शेरअली शेख आदी उपस्थित होते. 
प्रास्तविकात हॉस्पिटलचे डॉ. जहीर मुजावर म्हणाले, आज विविध आजारांची उत्पत्ती ही हवा, पाणी, खाण्यातून होतांना दिसते.धकाधकीचे जीवन, वेळेवर न जेवणे, दुषित अन्न-पाणी, कोड्रिंक, फास्टफूड यामुळे बर्‍याच जणांना पोटाचे विकार होतात. यासाठी नियमित व्यायाम, संतुलीत आहार महत्वाचा आहे. प्रत्येकाने आपली प्रतिकार शक्ती वाढविण्याची गरज आहे. तसेच छोट-छोट्या व्याधींकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी केल्यास भविष्यात उदभवणारे आजारांवर वेळीच निदान होऊ शकते. यासाठीच मोफत तपासणी शिबीराच्या माध्यमातून रुग्णांना दिलसा देण्याचे काम अल करम हॉस्पिटलच्यावतीने करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.या शिबीरात हॉस्पिटलच्या नर्सिंग स्टाफ, टेक्निशियन, कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेरअली शेख यांनी केले. तर आभार एजाज तांबोली यांनी मानले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रयत हा एकसंघ परिवार :- सुधीर म्हस्के


रयत हा एकसंघ परिवार : सुधीर म्हस्के

- अजीजभाई शेख -  राहाता -/ वार्ता -
रयत सेवक हा समाजात जिव्हाळ्याने आणि सह्रदयतेने सेवा देणारा सेवक असून रयत हा एकसंघ परिवार आहे असे प्रतिपादन श्रीरामपूर दूध संघाचे चेअरमन सुधीर म्हस्के यांनी केले.
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील सेविका ममताज शेख यांचा सेवापूर्ती समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरामपूर दूध संघाचे चेअरमन सुधीर म्हस्के हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य विनायक मेथवडे यांनी केले. यावेळी सत्कारमूर्ती मुमताज शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संजय ठाकरे, भारती भुसारी, गोरक्षनाथ बनकर, शिवाजी बेंद्रे, माजी प्राचार्य मधुकर अनाप, माजी प्राचार्य अंगद काकडे, माजी प्राचार्य अण्णासाहेब साबळे, तौसिक शेख, सत्कारमूर्ती मुमताज शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रमुख तोरणे यांनी रयत सेवकांची एकनिष्ठा आणि त्यागाविषयी विचार मांडून रयत सेवकांची अण्णांवरील श्रद्धा हा खरा भक्तिभाव आहे, असे मत व्यक्त केले. सुधीर म्हस्के यांनी सामाजिक, शैक्षणिक कार्यप्रती रयत सेवकांची जबाबदारी महत्त्वाची आहे. रयत सेवक हा एकसंघ परिवार असून रयत सेवक निष्ठेने आणि ध्येयाने एकरूप असल्याचे मत व्यक्त त्यांनी व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी शिवाजी बेंद्रे यांनी ॲग्री विषययात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीसासाठी पन्नास हजार रुपयांचा ठेवीचा चेक प्राचार्य विनायक मेथवडे यांच्याकडे सुपूर्द केला. तर कन्या विद्यालयासाठी पन्नास हजार रुपये देणगी व मुमताज शेख यांनी मुले विभागासाठी अकरा हजार रुपये देणगी जाहीर केली. याप्रसंगी रतिलाल भंडारी. चंदूभाई तांबोळी, भाऊसाहेब पेटकर, समशेर पठाण, माजी प्राचार्य जी. टी. गमे, मुख्याध्यापक देवराम वडीतके, गणीभाई शेख, राजूभाई शेख, सलीम शेख, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, पर्यवेक्षिका शोभा कडू, पर्यवेक्षिका संजीवनी आंधळे, शोभा चौधरी, शरद शिंदे, जावेद शेख, गफार तांबोळी, मुस्ताक पटेल, यासीन शेख, समीर पटेल, जावेद तासगावकर, सादिक शेख, सलीम शेख, बानू शेख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट, अश्विनी सोहोनी व रेणुका वरपे यांनी केले. तर शेवटी उपमुख्याध्यापक दिलीपराव डहाळे यांनी आभार मानले.- 

=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग डॉ.शरद दुधाट (सर) 
✍️✅🇮🇳...श्रीरामपूर, वृत्त प्रसिद्धी सहयोग,समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर.•
-----------------------------------------------
=================================

Tuesday, April 15, 2025

श्रीरामपूरच्या राजकारणात मोठा भूकंपकाँग्रेसच्या १२ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश ; शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल


श्रीरामपूरच्या राजकारणात मोठा भूकंप
काँग्रेसच्या १२ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश ; शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल

- श्रीरामपूर - प्रतिनीधी -/ वार्ता -
श्रीरामपूर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे तब्बल १० ते १२ माजी नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत थेट भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. दिवंगत आमदार जयंत ससाणे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी असलेल्या या नेत्यांनी मंगळवारी मुंबई येथे भाजपच्या प्रदेश कार्यालयात पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, अहिल्यानगर चे प्रभारी विजय चौधरी, अहिल्यानगर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.  
या घडामोडींमुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजप प्रवेश केलेल्या नेत्यांमध्ये माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी, तसेच माजी नगरसेवक अशिष धनवटे, शशांक रासकर, शामलिंग शिंदे, कैलास दुबय्या, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, संजय गांगड, आणि वळद उंबरगांव येथील सरपंच विराज भोसले यांचा समावेश आहे. हे सर्व नेते जयंत ससाणे यांच्या राजकीय वारशाचे समर्थक आणि काँग्रेसमध्ये प्रभावी स्थान राखून होते.
संजय फंड यांनी स्पष्ट केले की, शहरातील रस्ते, पाणी, घरकुल योजना तसेच अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे. सत्तेच्या बाहेर राहून या समस्या सोडवता येणार नाहीत, असा दावा त्यांनी केला. फंड यांच्या निवासस्थानी गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात सलग बैठका सुरू होत्या. अखेर या बैठकीतून भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला. या प्रवेश सोहळ्यामुळे श्रीरामपूरमध्ये भाजपचा झेंडा आता अधिक बळकट होणार आहे. प्रत्येक प्रभागात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होणार असून, पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळणार आहे. 

याबाबत माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहाणी यांनी स्पष्ट केले की, हा पक्षप्रवेश सध्या केवळ शहर आणि नगरपालिका हद्दीत मर्यादित असून, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा यात समावेश नाही. विशेष म्हणजे, भाजपच्या शहराध्यक्ष पदासाठी काँग्रेसमधून आलेल्या या गटातील एखाद्या माजी नगरसेवकाची निवड होण्याची शक्यता आहे. नुकतीच शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक झाली असून, लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

पक्षांतराबाबत करण ससाणे यांच्याशी कोणताही विरोध नाही असे स्पष्ट करत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “शहराच्या विकासासाठीच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत.” या राजकीय उलथापालथीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला लागलेला हा मोठा फटका त्यांच्या संघटनेवर आणि गटबाजीत परिणाम करणारा ठरू शकतो. श्रीरामपूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी या प्रवेशामुळे झालेली आहे, हे निश्चित. 
या पक्ष प्रवेशावेळी , सोमनाथ गांगड, श्रीरामपुर पंचायत समिती उपसभापती सुनील क्षीरसागर,भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन दिगंबर फरगडे, शिरसगांवचे उपसरपंच वैभव लोढ़ा , दत्तात्रय धालपे, पराग शाह, राकेश न्याती, संदीप अग्रवाल, योगेश डंबीर, चिरायू नगरकर, सिद्धार्थ फंड, अमोल शेटे, सागर बर्वे यांच्यासह श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील शेकडो पदाधिकारी- कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

'"श्रीरामपूर शहर आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधा पूर्ण करणाऱ्या योजनांमुळे – जसे की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, १७८ कोटींची जलयोजना, जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी, सर्वसामान्यांसाठी घरकुल योजना व टपरी धारकांचे पुनर्वसन या विकासगंगेचा भाग होण्यासाठी आणि श्रीरामपुर शहराच्या उज्वल भविष्यासाठी आज अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे मन:पूर्वक स्वागत!" – जिल्हाध्यक्ष नितीन
 दिनकर

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई 
वडाळा महादेव ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

सदगुरू कुंभार काका यांची १९ वी पुण्यतिथी साजरी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर फाटा परिसरातील ओम शिव गोरक्षनाथ मंदिर या ठिकाणी सदगुरु कुंभार काका यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, यावेळी सकाळी विधीवत पूजन अभिषेक होम हवन दुपारी १२ वा वारकरी सांप्रदायिक भजन सेवा संपन्न झाली यानंतर महाआरती महाप्रसाद वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी संतोष भालेराव,नाना दळवी, गौरव पवार, सुनील पवार, श्याम उफाड, श्रीराम शिंदे, आप्पासाहेब मोरे, ग्रामपुरोहित वेदाचार्य रंगनाथ मेगदे, साजन भोंडगे, युवराज साळवे, दीपक पवार
 अनिल देवगिरे, नागेश सुगुर, पोपर परदेशी,  
 हभप तुकाराम महाराज कदम तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष परदेशी, पो. कॉ. वसीम इनामदार, प्रविण कांबळे, गृहरक्षक दलाचे राजेन्द्र देसाई, चंद्रकात मोरकर, महेश भालके आदि यावेळी उपस्थित होते.
उफाड परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिरसगांव भजनी मंडळ, गोरक्षनाथ मंडळ आदींनी सहकार्य केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे अध्यक्ष श्री बाबासाहेब उफाड यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई 
वडाळा महादेव ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, April 14, 2025

शिवसेनेच्या (उबाठा) वतीनेडॉ.आंबेडकर जयंती साजरी

श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने श्रीरामपूर येथील महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना तालुका प्रमुख लखन भगत, तालुका प्रमुख राधाकिसन बोरकर,शहर प्रमुख संजय छल्लारे,ज्येष्ठ शिवसैनिक अशोक थोरे मामा,भगवान उपाध्ये,तेजस बोरावके, संजय साळवे, कल्याणकर मामा,सुहास परदेशी,युवा सेना सुरेश थोरे, रोहित नाईक , बापु बुधेकर , विशाल पापडीवाल, विशाल दुपाठी आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तू जतन कराव्या - संध्या मेढे


जिल्हा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करण्याची इतिहास प्रेमी मंडळाची मागणी

- अ,नगर - प्रतिनिधी - / प्रतिनिधी - वार्ता -
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला अहमदनगरच्या जनतेने मोठे सहकार्य केले होते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून येथील जनता त्यांच्यासोबत होती. डॉ. बाबासाहेब अनेकदा अहमदनगर परिसरात आले होते. त्यांनी प्रत्यक्ष भेटून येथील जनतेला न्याय दिला. त्यांनी आपला थॉटस ऑन पाकिस्तान हा ग्रंथ सावेडी- भिस्तबाग परिसरातील पटवर्धन बंगला येथे लिहला होता. माळीवाडा महालक्ष्मी मंदिर येथे त्यांनी व्यापक बैठक घेतली होती. त्यांनी येथील आयुर्वेदिक डॉक्टर गुणे यांच्याकडून मधुमेहावर औषध घेतले होते. आजच्या सिध्दार्थनगर येथील सोमवंशी बोर्डींग येथे भेट देवून कामकाजाची माहिती घेतली तसेच येथील शेरेबुकात नोंद केली होती. या व अशा अनेक आठवणी जुनी जाणती मंडळी सांगत असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी या सर्व ठिकाणांचे स्मृतीफलक येथे लावून त्यांच्या स्मृती जतन कराव्यात तसेच जिल्हा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या संध्या मेढे यांनी केली. 
अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्या बोलत होत्या. यावेळी इंजि.अभिजीत एकनाथ वाघ, ॲड.संतोष गायकवाड, आबीद दुल्हेखान, पंकज गुंदेचा, भैरवनाथ वाकळे, ऍड. विद्या जाधव आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक माणसाला सामाजिक न्याय देणारे महामानव आहेत - डॉ.विठ्ठल सदाफुले


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येक माणसाला सामाजिक न्याय देणारे महामानव आहेत असे उद्गार अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल सदाफुले यांनी काढले. तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, इतिहास विभाग व जयंती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, भारताची राज्यघटना ही देशातील सर्वोत्कृष्ट घटना आहे. देशातील सर्व घटनांचा अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संविधान लिहिले.या संविधानामधील न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजे आणि प्रत्येकाने कलमांनुसार आपले अधिकार व कर्तव्याला जागले पाहिजे असेही ते म्हणाले.इंग्रजी विभागाचे प्रा.गोरख साळवे यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी भुषविले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सतिश पावसे,प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, April 12, 2025

महात्मा फुलेंमुळेच स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम- केतन खोरे पाटील

महात्मा फुलेंमुळेच स्त्री शिक्षणाचा 
पाया भक्कम- केतन खोरे पाटील 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्मलेल्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुळे आपल्या संपूर्ण भारत देशात स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम बनला असून आज सर्व क्षेत्रात महिलांची आघाडी महात्मा फुले यांच्या पुण्याईमुळे असल्याचे प्रतिपादन मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील यांनी महात्मा फुलेंच्या १९८ व्या जयंतीनिमित्त केले.
      गुलमोहर कॉलनी येथे महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना खोरे म्हणाले की, थोर समाजसेवक, स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम रोवणारे महात्मा फुले यांच्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिलांना काम करण्याची संधी मिळाली असून देशाला क्रांतिकारी दिशा देणारे समाजसुधारक महाराष्ट्राच्या मातीत घडल्याचा अभिमान वाटतो. यावेळी माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे, निवृत्त नायब तहसीलदार अनिल उनवणे, सोपान शिंदे, विलास भगत, विवेक भोईर, राहुल सागडे, तृप्ती भगत, सविता घोडेकर, मनीषा बर्डे, अनिता गोरे, रेखा होते, अनिता पाटील, वर्षा भोईर, प्रज्ञा उनवणे, समीक्षा भगत, शौर्यजा खोरे आदी उपस्थित होते. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, April 8, 2025

भुईकोट किल्ल्याच्या विकासकामांत शिवछत्रपतींच्या वंशजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांचा समावेश करावा - आसिफ खान


- नगर -  प्रतिनिधी - वार्ता -
 गेल्या काही दिवस शहरातील वर्तमानपत्रात अहमदनगरच्या भुईकोट किल्ला विकासासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला, असे वाचण्यात आले. त्यात नेताकक्ष व इतर काही विकासाची कामे करणार असे समजले.
अहमदनगरच्या भुईकोट किल्यात स्वराज्य महाराणी येसुबाई, छत्रपती संभाजी महाराजपुत्र छत्रपती शाहू हे, तर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांचे वडील चौथे छत्रपती शिवाजी महाराज हे ब्रिटीशांनी कैदेत ठेवले होते. याच ठिकाणी चौथे शिवाजी महाराजांची हत्या झालेली आहे. या वास्तूंचासुध्दा विकासकामात समावेश झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान यांनी केली आहे. 
शिवछत्रपतींच्या पाऊलखुणा पुसून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यामुळे संपूर्ण देशभरातून पर्यटक अहमदनगरला येतील. शिवरायांच्या वंशजांचा इतिहास जाज्वल्य आहे. आपण अहमदनगरकरांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचा विचार करून विकासात्मक कामात या गोष्टींचा समावेश करावा, अशी मागणी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे केली आहे. यावेळी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफखान दुलेखान, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे आदि उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Saturday, April 5, 2025

समर्थ कृषी महाविद्यालयातदंत तपासणी शिबिर संपन्न

समर्थ कृषी महाविद्यालयात
दंत तपासणी शिबिर संपन्न

- सौ.किरणताई वाघ - देऊळगाव राजा -/ वार्ता -
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना एकक, देऊळगाव राजा व माई डेंटल क्लिनिक देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
    या शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे दंत तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी दात कसे घासावे, दाताची काळजी कशी घ्यावी,तरुण पिढी गुटखा - तंबाखू सारख्या सेवनांना बळी पडते त्यामुळे मुखाचा कर्करोग होऊ शकतो वेळीच दंतचिकित्सा केल्यामुळे लक्षात येऊन होणारे आजार टाळू शकतो तसेच व्यसन घातक ठरून जीवावर बेतू शकते याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य हाच खरा दागिना असून आपल्या शरीराची वेळोवेळी तपासणी करून घेतली पाहिजे, चांगल्या निरोगी सवयी आत्मसात केल्या पाहिजे याबद्दल डॉ. आशुतोष सोळंकी, माई डेंटल क्लिनिक, देऊळगाव राजा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
 या शिबिराला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, रासेयो सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी जाधव, प्रा किशोर कवर व इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग* 
पत्रकार अजीजभाई शेख
 राहाता 

=================================
-----------------------------------------------
*वृत प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

वार्ड 35 में सड़कों का निर्माण कार्य आप नेता लक्की ओबराय करवाएंगे




मेयर वनीत धीर ने दी लक्की ओबराय को इजाजत

- सवेरा न्यूज - रविंदर शर्मा -/ वार्ता -
जालंधर, 4 अप्रैल : आम आदमी पार्टी के सीनियर नेता व वार्ड 35 के प्रभारी लक्की ओबराय की हलके में विकास काम करवाने की जिम्मेदारी संभालेंगे। इंप्रूवमैंट ट्रस्ट चेयरमैन राजविंदर कौर थियाड़ा के नेतृत्व में लक्की ओबराय व ब्लाक अध्यक्ष हरजीत सिंह ने शुक्रवार को मेयर वनीत धीर से मुलाकात की थी और इलाके में बनने वाली नई सड़कों की सूची सौंपी थी। मेयर वनीत धीर ने इसकी अनुमति देते हुए कहा कि वार्ड 35 में बनने वाली सभी सड़कों

व अन्य विकास कामों की जिम्मेदारी लक्की ओबराय की होगी। मेयर वनीत धीर ने वार्ड नंबर 35 के प्रभारी लक्की ओबराय क्षेत्र को शमशानघाट से संघा चौक, जीटीबी नगर मार्केट से इनोसेंट स्कूल, न्यू जीटीबी नगर, मम्ब्रो चौक से टी प्वाइंट तक की सड़क व विकास कार्य करवाने की अनुमति दी।

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Friday, April 4, 2025

भुमी फौडेशनच्यावतीने डॉ.अनिल मासुरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित


                 - श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर येथील संत लुक हॉस्पिटल चे माजी चिफ मेडिकल ऑफीसर डॉ. अनिल मासुरकर यांना भुमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
 डॉ मासुरकर यांनी संत लुक हॉस्पीटल या माध्यमातुन गेली चार दशके गोरगरीब जनतेची अविरत आरोग्य सेवा केली, त्यांच्या या सेवा कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ.कैलास पवार यांनी वरील पुरस्कार देऊन सन्मानीत केले.
या प्रसंगी संस्थेचे समन्वयक भीमराज बागुल, सेवा निवृत्त कर्नल विजय खारकर, जयश्री खारकर, श्रीमती शैलेजा वैद्य, डॉ. सितल मासूरकर, सुभासोनी मोटलोरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
वरील पुरस्काराबद्दल श्रीमती सरोज नाईक,माजी प्रा. टि. ई. शेळ्के, साहित्यीक डॉ. बाबुराव उपाध्ये, माजी तहसिलदार गुलाबराव पादीर, माधवराव देशपांडे, के. एस. काळे, एल. बी. आढाव, आरोग्य मित्र भीमराज बागुल आदींनी अभिनंदन केले.
 कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. कैलास पवार यांनी केले.कु. तनया हिने कार्यक्रमाचे नियोजन केले व शेवटी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई ✍️✅🇮🇳...
वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, April 3, 2025

हिंदूजननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढ़ीपाडव्याला शिवतीर्थावर आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषाच चालणार अन्य भाषा चालणार नाही असे ठणकावून सांगितले आहे

- रत्नागिरी - प्रतिनिधी - वार्ता -
हिंदूजननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढ़ीपाडव्याला शिवतीर्थावर आपल्या भाषणात महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषाच चालणार अन्य भाषा चालणार नाही असे ठणकावून सांगितले आहे . माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्येक आस्थापनेमध्ये मराठी भाषा सक्तीने
 वापरलीच पाहिजे असे सक्त आदेश काढले आहेत . याच प्रमाणे महाराष्ट्रातील विविध आस्थापनेमध्ये देखील मराठीचा वापर होताना दिसत नाही, याच अनुषंगाने हिंदूजननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व खेड नगरपरिषदेचे 


मा नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस मा. श्री. वैभवजी खेडेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली , खेड मधील सर्व बँक (आस्थापनांमध्ये) सर्व कर्मचारी यांनी मराठी बोलता आलेच पाहिजेत , बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत या साठी शांतता पूर्वक निवेदन देण्यात आले, त्याच बरोबर लाकडी दांडा सुद्धा भेट देण्यात आला. आपल्या रोजच्या व्यवहारात आणि बोलण्यात मराठी चा वापर झाला चं पाहिजे.🔥🚂🚩


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Wednesday, April 2, 2025

श्रीरामपूर - नगरपरिषद समोरील होत असलेलं बे मुद्दत आंदोलन स्थागित...


श्रीरामपूर नगरपालिका समोर सुरू असलेले धरणे आंदोलन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर व मुख्याधिकारी गणेश घोलप यांच्या मध्यस्थीने स्थगित...

श्रीरामपूर - नगरपरिषद समोरील होत असलेलं बे मुद्दत आंदोलन स्थागित...

श्रीरामपूर नगरपालिका समोर सुरू असलेले धरणे आंदोलन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर व मुख्याधिकारी गणेश घोलप यांच्या मध्यस्थीने स्थगित...