राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, June 10, 2023

विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान ( स्व.रावसाहेब ॲड, शिंदे ) यांची विचारज्योत जागती ठेवत आहे प्रा. डॉ. सदाशिव कदम ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - समाचार -
श्रीरामपूर हॆ विवेकशीलता आणि श्रमसाधनेतून आकाराला आलेले आधुनिक शहर आहे, या शहराच्या जडणघडणीत अनेकांचे योगदान आहे, याच जाणिवेतून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान शिक्षणतपस्वी,समाजसेवक स्व.ॲड.रावसाहेब शिंदे यांची विचारज्योत विविध उपक्रमातून विचारज्योत जागती ठेवत आहे, हॆ भूषणावह असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कॉन्सिल सदस्य प्रा. डॉ. सदाशिव कदम यांनी व्यक्त केले.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
तालुक्यातील शिरसगांव येथील महादेव मळ्यात स्व.ॲड, रावसाहेब शिंदे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार वितरणसोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ. सदाशिव कदम बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.राजीव रावसाहेब शिंदे होते.प्रारंभी ॲड, रावसाहेब शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्व.डॉ. वा. ग. तथा बाबासाहेब कल्याणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले.विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव यांनी स्वागत करून २०१८ पासूनच्या कार्याचा अहवाल सादर केला. कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी पुरस्कार्थींचा परिचय करून दिला.कवयित्री संगीता फासाटे, कटारे यांनी मानपत्रांचे वाचन केले.अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रा. विठ्ठलराव पाचारणे यांना स्व.ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार तर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ यांना स्व.डॉ. वा. ग. तथा बाबासाहेब कल्याणकर स्मृती धन्वनतरी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रा.विठ्ठलराव पाचारणे, सौ. नलिनीताई पाचारणे, डॉ. दिलीप शिरसाठ, डॉ. सौ. वर्षाताई शिरसाठ यांचासह सत्कार करण्यात आला. पुरस्कार्थीनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे डॉ. सदाशिव कदम आपल्या भाषणात पुढे म्हणाले, महादेव मळा म्हणजे समाजसेवेचे आणि ॲड, रावसाहेब शिंदे यांच्या कार्य, विचारांचे अमृतवैभव आहे. श्रीमती शशिकलाताई यांनी त्यांना खंबीर साथ दिली.शिंदे साहेबांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याला वाहून घेतले. महादेव मळा हे अनुभवी जीवनाची पवित्रभूमी आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मता ही लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी ॲड. शिंदे यांनी जीवनभर स्वतः ला वाहून घेतले, ही कार्य, विचारांची ऊर्जाज्योत सुखदेव सुकळे व त्यांचा परिवार करीत आहेत, हे प्रेरणादायी आहे, असे डॉ. कदम यांनी सांगून योग्य व्यक्तींना पुरस्कार दिले त्याबद्दल कौतुक केले.डॉ. राजीव शिंदे यांनी शिक्षण आणि समाज यांच्याविषयी मनोगत व्यक्त करून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे वेगळेपण सांगितले.सिंगापूर येथून आलेले काकासाहेब हुंबे, सुजाता हुंबे, सुरेश कल्याणकर, माजी प्राचार्य विश्वासराव काळे, प्रकाश पाटील निकम,माजी पो. पा. वसंतराव मुठे, रामराव पडघन,ॲड.भागचंद चुडिवाल, माजी प्राचार्य शंकरराव अनारसे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे,सौ. नंदाताई गागरे,माऊली वृद्धाश्रमाच्या प्रमुख सौ कल्पनाताई वाघुंडे,श्रीमती मंगलाताई आढाव,माजी प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, माजी मुख्याध्यापक भागचंद औताडे, भाऊसाहेब पा.औताडे, संजय गायकवाड, रामराव पा. औताडे, लक्ष्मणराव निकम,माजी तहसीलदार गुलाबराव पादिर, आशिष बोरावके, भीमराज बागुल, सुभाष गायकवाड, रंगनाथ माने,डॉ. प्रकाश मेहकरकर,प्राचार्य डॉ. प्रवीण बडधे, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर,प्रा. डॉ. विठ्ठल लंगोटे,सतिश थोरात, कुंडलिक खैरनार,दत्तात्रय तांबे, दळवी,पवार,बाळासाहेब बुरकुले, सौ.उज्ज्वला बुरकुले,संजय साळवे, संजय बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले,संकेत बुरकुले, सुरेश बुरकुले,बाबासाहेब चेडे,बादशाह इनामदार, कल्याणकर परिवार, सुकले परिवार, विद्यानिकेतन शिक्षक, शिक्षकेतर सेवक आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी प्रा. पाचारणे व डॉ. शिरसाठ यांचे सत्कार केले. सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी केले तर सुदामराव पा. औताडे यांनी आभार मानले.

🌹🥀🌺🌷🌸🙏♥️ 🇮🇳

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

समाजासाठी आपणं देणं लागतो' या भावनेतून सुरु केलेला उपक्रम ?

''समाजासाठी आपणं देणं लागतो' या भावनेतून सुरु केलेला उपक्रम 

रविवार ११ जून २०२३ रोजी प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिर येथे सकाळी १० वाजता *माननीय राजसाहेब ठाकरे* यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे आपत्कालीन विभागाच्या माध्यमातून 'मनसे आपदा मित्र ' व 'आपत्कालीन रक्तदाता सूची ' लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आपण व आपल्या सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना विभाग
मनसे आपात्कालीन व्यवस्थापन पथक

वर्धापन दिन समारंभ रविवार दि. ११ जून २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता स्थळ : रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई - २५

'मनसे आपदा मित्र' 'आपात्कालीन रक्तदाता', लोकार्पण सोहळा. • आपत्ती व्यवस्थापनात भरीव कामगिरी केलेल्या मान्यवरांचा व संस्थांचा

सन्मान सोहळा.

प्रमुख मार्गदर्शक

सन्मा. श्री. राजसाहेब ठाकरे

'समाजाचं आपण देणं लागतो' या भावनेतून सुरु केलेला एक छोटासा उपक्रम
----------------------------------------------------===================================
   *समीर काशीनाथ राऊत* 
   *प्रभाग संघटक- जी दक्षिण*
*रस्ते साधन सुविधा व आस्थापना*
🌹🥀🌺🌷🌸🙏♥️ 
===================================
---------------------------------------------------

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कराने सौ.वाकडे, तागड व न्हावले सन्मानित ?

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल ग्रामपंचायत स्तरिय पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार २०२३ सौ. वाकडे, सौ.तागड व सौ.न्हावले यांना देण्यात आला.
              भोकर येथील राजमाता मित्र मंडळ व भोकर मित्र मंडळाने जि.प. शाळेच्या प्रांगणात राजमाता पुण्याश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त ह.भ.प. बाल किर्तनकार अनिष्ठाताई गुंड यांचे किर्तनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम मान्यनराच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करणेत आले. सदर कार्यक्रमा प्रसंगी अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष किशोर छल्लारे, उपाध्यक्ष पंढरीनाथ मते, ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक महेश पटारे, कामगार तलाठी अशोक चितळकर, ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, सोसायटीचे माजी चेअरमन सागर शिंदे, धनगर समाज संघर्ष समितीचे राजु तागड, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, अशोक कामगार पतपेढीचे संचालक अण्णासाहेब वाकडे, संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत झुरंगे, प्रहारचे नानासाहेब तागड, पोलिस पाटील बाबासाहेब साळवे, पत्रकार हरीभाऊ बिडवे, राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
        पुरस्कारार्थीं यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती ग्रामपंचायत हद्दीतील गरजवंत महिलांना देवून त्याबाबत जागृती घडवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. परिसरातील महिलांना शिवणकाम, भरत काम याबाबत मार्गदर्शन करुन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करुन महिलांचा सक्षमीकरण केले आहे. परिसरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने भोकर येथील आशांकूर केंद्रांतर्गत महिला बचत गटाची स्थापणा करुन स्वतः अध्यक्ष म्हणून महिलांना बचतीची सवय निर्माण केलेली आहे. या माध्यमातून अनेक महिलांना कर्ज वाटप करुन त्यांची आर्थिक गरज भागवून त्यांना त्यांच्या जिवनात आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम केले आहे. स्वामी समर्थ केंद्र, भोकर अंतर्गत बाल संस्कार केंद्र चालवून बालकांना ज्ञानार्जन केले. पुरस्कारार्थीचे अशोक कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, माजी व्हा.चेअरमन माणिकराव शिंदे, उपसरपंच महेश पटारे आदींनी अभिनंदन केले.
यावेळी येथील सुरेश बहीरु वाकडे, सुरेश कारभारी वाकडे, जालिंदर पंडीत, रावसाहेब खंडागळे, सुधाकर खंडागळे यांनी शाबुदाना खिचडीच्या स्वरुपात अन्नदान केले. यावेळी ठकसेन खंडागळे, मच्छिंद्र खंडागळे, मच्छिंद्र काळे, सुकदेव वाकडे, ज्ञानेश्वर काळे, सुदाम मते, सोमनाथ पंडीत, राजेंद्र वाकडे, सुनिल वाकडे, राजेंद्र राहिंज, राहुल अभंग, अशोक काळे, रमेश भालके, सतिश वाकडे, योगेश वाकडे, शिवा खंडागळे, रावसाहेब लोखंडे, सखाराम आबुज, भाऊसाहेब खंडागळे आदींसह राजमाता मित्र मंडळ व भोकर मित्र मंडळाचे सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

जरी असे कर्तव्याने कठोर मात्र प्रेमाचा झिरा शिवाजीराव साळवे समाजकार्यातील हिरा ?


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सर्व समाजाला बरोबर घेऊन चालणारे,सामाजिक बांधिलकी जपणारे, निर्पेक्ष, निस्वार्थी मोठ्या मनाचे धनी असलेले आदर्श व्यक्तीमत्व शिवाजीराव साळवे

(शौकत भाई शेख)

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष, मा. शिवाजीराव साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष
आलेख...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
 जीवन जितके खडतर तितकेच ते सुंदरही असते.प्रयत्न न करता मिळालेली कोणतीही गोष्ट कायम स्वरुपी टिकून राहत नाही,आणि कष्टाने, प्रामाणिकपणे,कुणावरही अन्याय न करता, स्वतःच्या हिंमतीने केलेली यशस्वी वाटचाल हिच आपल्या जीवनाची खरी ओळख.आणि ही ओळख निर्माण करणारे एक आगळे - वेगळे आदर्शवत असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच मा.शिवाजीराव साळवे साहेब.मा.शिवाजीराव साळवे साहेब होय,
त्यांचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत व गरिबीत गेले. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना आई-वडिलांनी त्यांना चांगले संस्कार दिले.खरे खोटे याचे उत्तम धडे तथा ज्ञान त्यांना आपल्या आईवडीलांकडून मिळाले. तथा मित्र परिवार व आई-वडील यांच्या चांगल्या संस्कारामुळे बालपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होऊ लागली. साधे राहणीमान,उच्च विचार, निस्वार्थी मन यामुळे त्यांनी समाजात आपले एक आगळे वेगळे स्थान प्राप्त केले. सर्वांसाठी अडचणीच्या वेळेस खंबीरपणे साथ देणारे व्यक्तिमत्व. आपले काम व कुटुंबाची जबाबदारी सांभाळून, समाजाला पूर्ण वेळ देणारे निरपेक्ष व्यक्तिमत्व खरेतर असे व्यक्तिमत्व समाजाला मिळणे म्हणजे समाजासाठी भाग्याच असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, श्री.साळवे साहेबांनी जवळपास तीस वर्षाहून अधिक काळ राजकारण आणि समाजकारण यांची सांगड घालत त्यांनी सामाजिक कार्यातून उत्कृष्ट असा जनमानसात आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्यात आपणही समाजाचे काही देणे लागतो या उदात भावनेने समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. समाजाचा आपण देणं लागतो. छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले , कर्मवीर भाऊराव पाटील , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, शिक्षणाची गंगोत्री क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले,फातेमाबी शेख, राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम अशा महापुरुषांच्या विचाराचा पगडा, त्यांचा अभ्यास, त्यांचे कार्य याचा मोठा प्रभाव श्री.साळवे साहेबांच्या जीवनावर झाला.या महापुरुषांच्या विचाराने त्यांनी स्वतःच्या जीवनात अमुलाग्र बदल करत फक्त समाज आणि समाज यांच्या साठीच आपले जीवन अर्पण करायचे असे त्यांनी निश्चयच केला.त्यांच्या या कार्यालाही कुटूंबातील सर्वांनी साथ दिली. त्यांना समाजात वावरताना असे आढळून आले की आपला देश स्वतंत्र होऊनही, समाजातील लोकांना अनेक अडचणी ,अनेक समस्या ,या जन्मापासूनच भेडसावत आहे. आणि त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे .शिक्षण ,व्यवसाय, नोकरी ,रोजगार ,दोन वेळेचे जेवण ,अंगभर कपडे ,अन्न ,वस्त्र, निवारा या सर्व गोष्टींसाठी आज समाज दररोज संकटाचा सामना करत आहे.हे पाहुन त्यांचे मन विचलित होऊन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी सर्वत्र हिंडून फिरून समाजातील तळागाळापर्यंत जाऊन खुप अभ्यास केला.आणि मग त्या उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या व्याथा ऐकून सामाजिक कार्यात स्वतःला पुर्णपणे झोकुन दिले. आज या समाजसेवेच्या कामात साहेबांना जवळपास ३० ते ३५ वर्ष झालेली आहेत ते सदैव निर्पेक्षतेने समाजाच्या सेवेत आहेत.चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या रुपाने त्यांनी राज्यभर समाजासाठी कोणत्याही अडचणी, समस्या याकरिता पूर्ण वेळ देत आहेत.त्यांनी अनेक ठिकाणी शाळेमध्ये गोरगरिबांच्या मुलांना शूज वाटप केले . निराधार गरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले,त्यांनी सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भागात अभ्यास दौरे आयोजित करून त्या भागातील सखोल अभ्यास केला .समाजात येणाऱ्या अनेक प्रश्न/आडचणीची त्यांनी नेहमीच अग्रक्रमाने सोडवणूक करण्याचा कसोसीने प्रयत्न करत ते सोडविले, आज समाजाला चर्मकार संघर्ष समिती च्या रुपाने एक आदर्शवत निर्पेक्ष तथा निस्वार्थी नेता मिळालेला आहे. त्यांनी केवळ चर्मकार समाजच बरोबर न घेता त्यापलिकडे जाऊन त्यांनी मातंग,बौद्ध, धनगर, नाभिक, कटई , कहार, मुस्लिम,मराठा तसेच इतर सर्व समाजाला बरोबर घेऊन चर्मकार संघर्ष समितीच्या रूपाने राज्यभर काम करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी शैक्षणिक, व्यावसायिक, आर्थिक याबाबत वेळोवेळी मेळावे घेऊन मार्गदर्शन केले. महिलांना उद्योजक बनवण्यासाठी त्यांनी आपल्या मेळाव्यातून उत्कृष्ट अशी प्रबोधन करून व्यवसाय प्रवृत्त केले. सर्व समाज बांधवांना आपल्या कृतीतून निस्वार्थी जीवन कसे जगावे, एकमेकाला सहकार्य कसे करावे, आपण सर्व एकाच आईचे लेकरे आहोत. आपण सर्व भारतीय आहोत,आपण सर्वांनी एकमेकांना मदत करावी. अडचणी काळात आपण एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे. अशा पद्धतीने सामाजिक बांधिलकीतून त्यांनी उत्कृष्ट असा समाज घडवण्याचा प्रयत्न केला. आज महाराष्ट्रामध्ये चर्मकार संघर्ष समितीच्या रूपाने एक समाजाला दिशादर्शक, विद्वान, निस्वार्थी ,समाजासाठी अहोरात्र झटणारा ,एक हिरा या रूपाने नेता मिळालेला आहे . शिवाजीराव साळवे यांनी जीवनात स्वतः चटके सोसलेले आहेत.त्यामुळे समाजाला, समाजाच्या सुखासाठी, समाजाच्या न्यायासाठी, समाजासाठी लढताना दिसत आहेत. राज्यात त्यांनी आपल्या कार्याच्या रूपाने अनेक मित्र बनवले. राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक अनेक ठिकाणी त्यांनी आपला आपले वर्चस्व कामाच्या रूपाने निर्माण केले .आजही आपले कुटुंब सांभाळून कोठेही समाजावर अन्याय झाल्यास त्या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आज समाजामध्ये समस्यांचा पूर्ण अभ्यास माननीय साहेबांनी करून त्या सोडवून, समाज योग्य दिशेने ,योग्य वाटेने, संस्कारक्षमरित्या कसा चालेल, त्याचा प्रयत्न आजही ते आपल्या कार्यक्रमातून समाजाला सांगतात.स्वतःला किती त्रास झाला तरीही आपल्या चेहऱ्यावर ते जाणून न देता आनंदाने सामाजिक कार्यात समाजाबरोबर सहभागी होतात .ज्या समाजात आपण लहान चे मोठे झालो .ज्या समाजाने आपल्याला काहीतरी दिलंय त्या समाजाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत आणि त्या उपकाराची जाणीव म्हणून मी माझे आयुष्य सामाजिक कामासाठीच खर्च करणार, अशी शपथच त्यांनी घेतली. आज राज्यभर साहेबांचा मोठा बोलबाला आहे .कामाच्या रूपाने साहेबांचा स्वभाव स्पष्ट ,बोलका आणि निर्भीड आहे .त्यामुळे जीवनात खोटं ,लबाड ,ढोंगीपणा याला कधीच त्यांनी साथ दिली नाही. आज ते एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून समाजामध्ये प्रसिद्ध आहेत .समाजासाठी झगडणारा ,समाजासाठी लढणारा, समाजासाठी वेळ देणारा आणि समाजासाठी सर्व काही निस्वार्थी भावनेने कार्य करणारा एकमेव नेता म्हणजेच शिवाजीराव साळवे साहेब होय,
आज त्यांच्या या वाढदिवसादिनी त्यांना वाढदिवसाच्या सर्व समाज बांधवांच्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

🌹🥀🌺🌷🌸🙏♥️ 🇮🇳...

शब्दांकन: - श्री.दिलीप कारभारी शेंडे
जिल्हा संघटक : चर्मकार संघर्ष समिती,अहमदनगर जिल्हा *

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*

होणारआणखी त्रिव या राज्यातील बिपरजॉय चक्रीवादळ भागात मुसळधार पावसाची शक्यता ?

मुंबई - प्रतिनिधि - समाचार -

आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून देशासह अनेक राज्यांमधील हवामानात बदल होत आहेत. यात काही राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या  सरी कोसळत आहेत. तर काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे
तर दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) अधिकाधिक प्रभावी होताना दिसत असून ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे (Wind) वाहत आहे. त्यामुळे हे चक्रीवादळ पुढील २४ तासांत अत्यंत तीव्र होणार आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टीला अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून ६३० किलोमीटर अंतरावर आहे.
याबाबत हवामान विभागाने (Meteorological
Department) दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय
चक्रीवादळाचा फटका चार जिल्ह्यांना बसणार आहे. तसेच या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि केरळच्या समुद्रकिनारी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून मच्छिमारांना (Fisherman) इशारा देण्यात आला आहे.
तर बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमान वाढण्याचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. यामधील मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.


----------------------------------------------------
===================================
: - राजु मिर्जा... शब्द.🖊️✅️🇮🇳...रचना.संकलन. वार्ता...+919730595775
===================================
----------------------------------------------------

Friday, June 9, 2023

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड काढून घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन; जिल्ह्यातील ११ लाखांपैकी ३ लाख लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड ?

अहमदनगर -प्रतिनिधि - वार्ता -

 आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्ह्यात ११ लाख ९९५ लाभार्थी आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी ह्या लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आज अखेर ३ लाख १८ हजार ५०० लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढलेले आहेत‌. उर्वरित लाभार्थ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, खासगी आपले सरकार सेवा केंद्र तसेच अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांकडून आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे. असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी केले आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. ह्या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत होतात. ह्या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यामध्ये ४४ अंगीकृत रुग्णालये आहेत. ह्या योजनेंतर्गत १२०९ प्रकारच्या आजारावर मोफत उपचार केले जातात. ह्या आजारामध्ये हृदय विकार, मेंदू विकार, किडनी विकार, अपघात, कर्करोग इत्यादी प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.
या योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना दिला जातो. योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ही
www.apkedwarayushman.pmjay.gov.in ह्या संकेतस्थळावर तसेच ग्रामसेवक व आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र येथील केंद्र चालक, खासगी आपले सरकार सेवा केंद्र (common service centre) येथील केंद्र चालक तसेच अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांना याबाबत सूचना दिलेल्या आहेत. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पात्र
लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड काढून घेण्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे.
महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे‌. या मोहीमेचे संनियंत्रण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय घोगरे हे करत आहेत.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंड्यातीलवारकऱ्यांना सर्व मुलभूत सोयी-सुविधा उपलब्धकरून द्या - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ?

अहमदनगर - प्रतिनिधि - समाचार

 पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील अनेक दिंड्यासह परजिल्ह्यातील दिंड्या आपल्या जिल्ह्यातून पंढरपुर येथे जातात.या दिंड्यातील वारकऱ्यांना पाणी, वीज,राहण्याची व्यवस्था, फिरते स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांचा मास्टर प्लॅन तातडीने तयार करून तो सर्व पालखी प्रमुखापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
आषाढी वारीच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी पालकमंत्री श्री विखे-पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, मानाच्या पालख्यांचे प्रमुख अशोक सावंत, रघुनाथ गोसावी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून २६० दिंड्या जातात. तसेच परजिल्ह्यातील अनेक दिंड्या आपल्या जिल्ह्यातून जातात. या दिंड्यामधील वारकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत.  दिंड्यांच्या मुक्कामाची ठिकाणे ठरलेली आहेत. ज्या गावात अथवा शहरामध्ये या दिंड्या मुक्कामी थांबणार आहेत त्या ठिकाणच्या शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालयामध्ये वारकऱ्यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात यावी. त्याठिकाणी शुद्ध पिण्याचे, पाणी, अखंडितपणे वीज, आरोग्य व्यवस्था तसेच  शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून वारकऱ्यांच्या व्यवस्थेमध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिले.
वारकऱ्यांना आरोग्याच्या सेवा द्या*

 दिंड्यामधून हजारो वारकरी पायी चालत असतात. अश्या वेळी वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहील यादृष्टीने अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी तसेच जागोजागी आरोग्य पथके तैनात ठेवण्यात यावीत. या पथकामध्ये पुरेश्या प्रमाणात मनुष्यबळ तसेच औषधीसाठा उपलब्ध ठेवण्यात यावा. आवश्यकतेनुसार रुग्णास तातडीने उपचार मिळावेत यासाठी अधिक प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात याव्यात.  प्रथमोपचार किट तयार करून ती प्रत्येक दिंड्यामध्ये देण्यात यावी.आरोग्य सुविधेमध्ये कुठलीही उणीव भासणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिल्या.
सुरक्षेसाठी पोलीस बंदोबत ठेवा*

वारकरी पायी चालत असलेल्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्याबरोबरच वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी दिंड्यासोबत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा. तसेच दिंड्या ज्या ठिकाणी मुक्कामी राहतील तेथेही पोलीस कर्मचारी उपस्थित राहतील दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
अनेकवेळा मुक्कामाच्या ठिकाणी अशुद्ध पाणी पिल्याने अनेक वारकरी आजारी पडतात. त्यामुळे प्रत्येक दिंड्यातील वारकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. ज्या दिंड्याकडे स्वतःचे पाणी टँकर आहेत, त्यांच्या टँकरमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून देण्याची व्यवस्था करण्यात यावी. जिल्ह्यातील दिंड्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गाची आवश्यकतेनुसार डागडुजी, खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध दिंड्यातील वारकऱ्यांचा विमा काढण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्नशील असून यासाठी वारकऱ्यांनी त्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे  जमा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिंड्यातील वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाबाबत प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली. विविध पालख्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या समस्या पालकमंत्र्यासमोर मांडल्या. वारकऱ्यांच्या सोयी-सुविधेमध्ये कुठलीही उणीव भासणार नसल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
षाढी वारीच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे विमोचन तसेच पालकमंत्री वॉर रूमच्या व्हाट्सअप्प क्र. 9420919077 चा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
बैठकीस संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच विविध पालख्यांचे प्रमुख उपस्थित होते.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))