राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, November 29, 2024

नाशिकमध्ये सिरत - ए - मुस्तफा स्पर्धेत ८०० हुन अधिक परिक्षार्थींनी घेतला सहभाग*


नाशिक प्रतिनिधी : माजिद खान 
ऑल इंडिया तहेरीक फरोगे इस्लाम, भिवंडी तर्फे राज्यस्तरीय सिरत - ए - मुस्तफा परिक्षा ११ शहरांमध्ये तीन हजाराहून अधिक स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती. नाशिकमध्ये जेएमसीटी कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित सदर परीक्षेसाठी वय वर्ष १२ ते ७५ पर्यंत मुले मुली, महिला पुरुष अशा ८०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकूण १०० गुणांच्या या परीक्षेत ८० गुणांची बहुपर्यायी प्रश्न तर २० गुणांसाठी दीर्घोत्तरी प्रश्न होते. बहूपर्यायी उत्तरासाठी ओ.एम.आर. शीट देण्यात आले होते. 
नाशिक परिक्षा केंद्रावर नाशिक जिल्हा व जिल्ह्याबाहेरील परिक्षार्थी उपस्थित होते. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या इमारतीमध्ये आसन व्यवस्था करण्यात आली होती. जेएमसीटी संस्थेचे अध्यक्ष हाफिज हिसामुद्दीन खतीब यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेली परिक्षा अतिशय पारदर्शी पद्धतीने संपन्न झाली. मुंबईचे मुफ्ती मोहम्मद अख्तर रजा मिस्बाही व कारी मोहम्मद आसिफ रजा बरकाती यांचे हस्ते प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिकांचे पाकीट उघडून उदघाटन करण्यात आले. करिअर काउंसलर व मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख सर यांनी परिक्षा अधीक्षकाची मुख्य जबाबदारी पार पाडली व आवश्यक मार्गदर्शन केले. नाज़ीम शेख यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. 
जेएमसीटी संस्थेचे विश्वस्त हाजी जाहिद खतीब, हाजी रऊफ पटेल, हाजी साबीर खतीब, शेखन खतीब, अहसान खतीब, आरिफ मन्सुरी, जेएमसीटी पॉलिटेक्निकचे प्राचार्य हमीद अन्सारी, जेएमसीटी इंटरनेशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका चित्रा घस्ते व शबाना शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जेएमसीटी च्या एकूण ५० शिक्षकांनी पर्यवेक्षकाचे काम पहिले. तर शिक्षकेतर कर्मचारी देखील कार्यरत होते. तहरीकतर्फे मुफ्ती साजिद पटेल, हुसेन अन्सारी, परवेझ अन्सारी यांनी परिश्रम घेतले. सदर परीक्षेत प्रथम क्रमांकासाठी उमराह, बगदाद व बैतुल मुकद्दस पॅकेज, द्वितीय पारितोषिक उमराह व बगदाद पॅकेज तर तृतीय पारितोषिक उमराह पॅकेज दिले जाणार आहे. तसेच अन्य १०० पारितोषिके देखील दिले जाणार आहेत. परीक्षेचा निकाल व पारितोषिक वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

काय म्हणावे याला*देखणे ते चेहरेप्रांजळांचे आरसे ! गोरटे की सावळे या मोल नाही फारसे !!



*काय म्हणावे याला*

देखणे ते चेहरे
प्रांजळांचे आरसे !
 गोरटे की सावळे 
या मोल नाही फारसे !!

बा. भ. बोरकरांची ही आपल्या बालपणी शिकलेली कविता सहजच निवांत बसल्यावर आठवली आणि मग डोळ्यासमोर तरळून गेले कित्येक असे चेहरे की ज्यांचे वर्णन करायला शब्द कुठून आणावेत हाच प्रश्न पडावा. कारण की मनाला प्रश्न पडतो की प्रांजळपणाचे रुपडे धारण केलेली माणसे सुद्धा आतून किती भयंकर असतात याचे अनुभव प्रत्येकाने कधी न कधी घेतलेल्या असतात तर याउलट खाष्ट वाटणारी माणसे सुद्धा आतून मनाने किती निरागस असतात हाही अनुभव आलेलाच असतो. वय वाढेल तसे माणसाने म्हातारे होण्याऐवजी जेष्ठ व्हावे आणि हे जेष्ठत्व माणसाच्या वागण्यातून दिसावे बोलण्यातून कळावे. पण नेहमीच असे होते असे नाही आणि मग बोलण्यात आणि वागण्यात विरोधाभास दिसला की त्या माणसा बाबतीत कशावरच विश्वास ठेवावा वाटत नाही. म्हणूनच आपल्या मराठी भाषेत एक म्हण रुढ झालेली आहे ती म्हणजे 
*पांघरून खुळ आणि आत्माराम शहाणा*
माणूस कोणताही असो त्याला स्वतःच्या फायद्याचं अगदी एखाद्या येड्या गबाळ्याल्या ही सांगावे लागत नाही. पण त्यातल्या त्यात माणसांमध्ये काही अंशी खरेपणा असतो. काहींची तत्त्व ठरलेली असतात आणि तत्त्वाने वागणारी माणसे, स्वार्थी माणसांसाठी नेहमीच अडचणीची ठरतात. काही फुकट मिळते म्हटल्यावर अथवा दुसऱ्यांकडून मिळते म्हटल्यावर मुक्तहस्ताने घेणारी माणसे स्वतः द्यायची वेळ आली की रडतात कुडतात आणि झापेपणाचा आव आणतात. अशा माणसांशी जवळीक नसलेलीच बरी. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही म्हण खरी असली तरी सुद्धा माणसानं स्वतः थोडं शहाणं व्हावं, जाणतं व्हावं. आपला मुखवटा इतरांच्या केव्हाच लक्षात आलेला आहे याची जाणीव ठेवून वागावं.असे म्हणतात की
 *ज्याची बुद्धी क्षीण*
*आणि ज्याची वृत्ती हीन*
अशा माणसाचा राग मनात ठेऊ नये. पण मी तर म्हणेल की अशा माणसाविषयी लोभ ही मनात ठेवू नये.
*तेच डोळे देखणे जे*
 *कोंडीती साऱ्या नभा !* 
*ओळीती दुःखे जनांच्या*
 *सांडीती नेत्रप्रभा !!*
बोलण्यातून आपण किती सहृदयी आहोत हे दाखवायचे आणि प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की मग मात्र कसलाही विचार न करता काहीही ठोस मदत करायची नाही,अशी सवय बऱ्याच जणांना असते.. आपण जी मदत करतोय त्याने एक चांगले कार्य पार पडणार आहे आणि पुण्य आपल्यालाच लागणार आहे, याचे भान ठेवले तर असा स्वार्थीपणा थोडा कमी होईल. अशी माणसे सडेतोडपणे बोलत नाहीत की समोरच्यावर रागावत नाहीत कारण त्यांना त्यांच्या कद्रूपणाची चांगली ओळख झालेली असते. काटकसर आणि कंजूसपणा यात जमीन आसमानचा फरक आहे.. बरं आपलं द्यायचं नाही तर आपणही लोकांचं घेऊ नये हा साधा नियम ही ते आपल्या स्वार्थीपणाबाई डावलतात. समूहाच्या विरोधी जाण्यात काहीच गैर नाही जर आपण काही चांगले करत असू तर. पण चांगल्या कामातही आपण मोडता घालत असू तर आत्म परीक्षण करायलाच हवं. सगळी च माणसं सारखी नसतात. बहुतांश लोक ही मोठ्या मनाची आणि दिलदार ही असतात.पण अशा तऱ्हेवाईक माणसांना धडा शिकवायला वेळ आली तर मागे पुढे पाहू नये. त्यांना वेळोवेळी जाणीव करून देणे गरजेचे आहे की 
*माणूस म्हणून जगताना*
 *काही पथ्य पाळायला हवीत*
*माणूस म्हणवून घेताना* *काही कुपथ्य टाळायला हवीत*
जीवननितांत सुंदर आहे फक्त कुणासाठी कधीतरी निस्वार्थी भावनेने काही तरी करून पाहा.म्हणूनच शैलेंद्र आपल्या एका कवितेत असे म्हणतात की

*कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे*?
*कृष्ण व्हावे की कर्ण व्हावे*?
*जे आपले असते तेच द्यावे !*
*की द्यावे तेही आपले रहावे!!*.

*कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे*?
*कृष्ण व्हावे, हो, कृष्णच व्हावे*
*कधी कुणाचे कवच व्हावे* !
*कधी कुणाचे कुंडल व्हावे*!!

=================================
-----------------------------------------------
*लेखन*✍️✅🇮🇳...
सुजाता नवनाथ पुरी 
अहील्यानगर - 8421426337
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, November 28, 2024

आपली मुलं - आपली जबाबदारी


आजकाल लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे व्यसन लागल्याचे आढळते. प्रत्येक वयातील व्यक्तींचे मोबाईल वेड हे वाढतच असल्याचे दिसून येत आहे .हल्ली लहान मुलांना तर मोबाईल फोन सोडवतच नाही. मोबाईल मुळे जरी ज्ञानात भर पडत असली तरी ती कशाप्रकारे योग्य आहे हे पालकांनी अभ्यासणे महत्त्वाचे आहे .
         सध्या विभक्त कुटुंब असल्याचे आढळते. त्यामुळे घरात मोजून चार-पाच माणसे आणि तेही आपापल्या कामात गुंतलेले. काहीवेळा असेही आढळून येते की; मुलांना अभ्यासात काही प्रश्न निर्माण झाले किंवा काही समस्या आल्या तर पालक स्वतःहूनच मुलांकडे मोबाईल देतात आणि मोबाईलवर गुगल वरून शोधण्यास सांगतात आणि स्वतः टीव्ही पाहण्यात दंग राहतात. अशा वेळी मुले बरोबर संधीचा फायदा उठवतात.त्यांना अभ्यासातील एखादीच गोष्ट पाहिजे असते मात्र त्यानंतर मुले मोबाईलवर रिल्स पाहत बसतात किंवा एखादी गेम खेळत बसतात .अशावेळी पालकांनी आवर्जून लक्ष दिले पाहिजे.मोबाईलचे वाढते व्यसन व त्यामुळे होणारे परिणाम हे आपल्या मुलांसाठी किती धोकादायक आहेत हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
            बऱ्याच वेळा असं होतं की मुलांच्या हातात सतत मोबाईल पाहिला की पालक त्यांना ओरडतात, प्रसंगी एखादी गालात देखील देतात. परंतु; हे योग्य आहे का?
        काही ठिकाणी तर असे पहावयास मिळते की मुलांनी मोबाईल वरील रिल्स पाहून त्यातील काही डायलॉग म्हणून दाखवले तर पालकांना कौतुक वाटते.काही शब्द असे असतात की ते लज्जास्पद,अर्वाच्च असे असतात.परंतु ; लहान मुले अगदी मोठ्या दिमाखात ते शब्द उच्चारतात आणि पालक त्यावर एन्जॉय करतात. हे कितपत योग्य आहे ?
         काही पालक सुशिक्षित व सुसंस्कृत असले तरी दोघेही जॉब करत असल्यामुळे पाल्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि म्हणून ऑनलाइन संस्कार वर्ग वगैरे चे क्लासेस लावतात.पण ; या पद्धतीने आपले मूल वागते का? संस्कारक्षम गोष्टी आत्मसात करते की नाही? हे पाहिले पाहिजे. जॉब वरून आल्यानंतर स्वतः मोबाईल कामाव्यतिरिक्त न पाहता मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. 
       त्यांना संस्कारक्षम गोष्टी शिकविल्या पाहिजेत .मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत. त्यांच्या शाळेतील दिवसभरातील घडामोडींविषयी विचारपूस करायला हवी .त्यांच्या मित्र-मैत्रिणींविषयी चर्चा करावी. तसेच शाळेतील शिक्षक, आपल्या कुटुंबातील सदस्य ,नातेवाईक,आपला परिसर इत्यादी सारख्यांविषयी हितगुज केले पाहिजे.म्हणजे मुले देखील विचारांची देवाण-घेवाण करण्यास सज्ज होतील.
        तसेच त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. मित्र - मैत्रिणींबरोबर खेळायला पाठवले पाहिजे. त्यांचे नवनवीन छंद जोपासता आले पाहिजेत. नवनवीन गोष्टी सांगायला हव्यात. तसेच आपल्या मुलांनी इतरांशी बोलताना नम्रपणा, सहनशीलता पाळून आदरातिथ्याने बोलले पाहिजे, याची काळजी घ्यावी. वागण्याबरोबरच खाण्याच्या सवयी याविषयी देखील काळजी घेतली पाहिजे.
           सध्या पिझ्झा,बर्गर, सँडविच आणि हॉटेलचे इतर पदार्थ खाणे म्हणजे एक प्रकारची फॅशन झाली आहे. आणि असे खाणे म्हणजे चांगले खाणे होय असा एक गैरसमज झाला आहे. बेकरी फूड व जंक फूड याकडे सर्वांचाच कल वाढलेला आहे .त्यामुळे सर्वांनाच आरोग्य समस्या भेडसावू लागल्या आहेत. परंतु; लहान मुलांसाठी हे अतिशय घातक आहे .कोवळ्या वयातच जर आरोग्य समस्या वाढू लागल्या तर मोठेपणीच्या आरोग्य समस्यांचे काय? अनेक समस्या उभ्या राहतील.
            या सर्व समस्यांमधून वेळीच सुटका हवी असेल तर; प्रत्येक पालकाने आपल्या मुलाकडे स्वतः जातीने लक्ष दिले पाहिजे .त्यांना लहान मुलांच्या गोष्टी मोबाईलवर न दाखवता गोष्टींची पुस्तके आणून प्रसंगी स्वतः वाचून दाखवली पाहिजेत. वर्गातील गृहपाठ करत असताना मोबाईलवर उत्तर न शोधता पुस्तक वाचन करून चर्चेतून उत्तर शोधण्यास मदत केली पाहिजे. त्यांचा कल पाहून त्यांना मदत केली पाहिजे. त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत. प्रत्येक वेळी आपलेच खरे असे व्हायला नको.त्यांना समजून घेतले पाहिजे. तसेच स्वतः काही वेळा लहान होऊन त्यांच्याबरोबर काही वेळ खेळले पाहिजे. स्वतः घरातील थोर व्यक्तींना आदर द्या, लहान मुले आपोआपच आदर देतील.त्यांना वेगळे सांगण्याची गरजच पडणार नाही कारण; लहान मुले अनुकरणप्रिय असतात.
          या सर्व गोष्टी जुळवून आणायच्या असतील तर;फक्त आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यासाठी आपल्या व्यापातून थोडा तरी वेळ काढलाच पाहिजे. मग बघा नावाजलेल्या व्यक्तींमध्ये आपला पाल्य आणि त्याबरोबर आपण असणार हे नक्की.

=================================
-----------------------------------------------

*लेखन*✍️✅🇮🇳...
सौ.मिनल अमोल उनउने
(सुकन्या) सातारा
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, November 27, 2024

मख़दुम सोसायटी तर्फे संविधान* *दिनानिमित्त मोफत पुस्तके वाटप




समाजातील सर्वात गरीब आणि असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी संविधान हे एक शक्तिशाली साधन आहे - आबीद खान

- नगर - प्रतिनिधी - / वार्ता -
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने केडगांव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा याठिकाणी २६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व विधार्थांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली. 
यावेळी मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी संविधान तयार करण्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले परिश्रम आणि संविधानातील समानतेचा संदेश सुंदर व सोप्या शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडला.
आस्मा शेख यांनी विद्यार्थ्यां समोर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी शाळेच्या आयेशा सुलताना यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
समाजातील सर्वात गरीब आणि असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी संविधान हे एक शक्तिशाली साधन आहे.तो जितका मजबूत असेल तितका आपला देश मजबूत होईल असे आबीद दुलेखान यांनी सांगितले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शिक्षा के मंदिर मे चलता कालेधन का कारोबार,यह शिक्षा है या व्यापार


आजकल जहा देखो वहा शिक्षा का स्तर बहुत गिर रहा है। और लाखों रुपए खर्च करने के बाद भी जैसी शिक्षा आज से 20 या 30 साल पहले सरकारी स्कूलों में मिलती थी वैसी नहीं मिल रही है। उसका सीधा अर्थ यही हे कि कही न कही सभी चीजों का निजीकरण के नुकसान अब दिखने का चालू हो गया हे।

अब सही तरह से सोचे तो डिग्री और शिक्षा एक पैसे का खेल बन गया हे। और हद तो तब हो जाती हे की जिसने पीएचडी की हो उसने किस विषय पे और किस थीसीश में पीएचडी की डिग्री ली हे वह तक पता नहीं। और उससे भी आगे जाए तो एक सीए की हुई लड़की ने सादी होने तक 7500 में जॉब की और वो जॉब न चली जाए इसके लिए माफी भी मांगी। यह सब आंखों देखी और मेरे सहपाठी के साथ घटी हुई सच्ची बाते हे और वह भी गुजरात में ।तो आए जानते हे कि इसकी नींव कहा हे और क्यों ऐसा हो रहा हे।

पहले तो यह शिक्षा का कारोबार कैसे चलता हे वह जानना पड़ेगा। ज्यादातर शहरों में अभी प्राइवेट स्कूलों के चलन बढ़ गए हे सामने सरकार ने भी सरकारी स्कूलों पे ध्यान नहीं दिया अब यह एक शिक्षण माफिया में परिवर्तित हो गया हे। जहां पैसे और बड़ी बड़ी बाते और बहुत सारे मार्क के अलावा कोई चीज नहीं होती हे।

पहले यह जानिए के 20 साल पहले बोर्ड में अव्वल नबर में 1 से 10 होते तो उसमें ज्यादा से ज्यादा 12 से 18 विद्यार्थी होते लेकिन अब वही संख्या 70 से 80 हो गई हे। यह भी इस खेल की ही एक कड़ी हे। ऐसे बहुत सारे खेल और तालमेल हे जो पैसे और बड़े बड़े नेताओं और शिक्षण माफिया लोगों और सिस्टम के साथ खेलता रहता हे।

अब जानते हे की ज्यादातर प्राइवेट स्कूलों में एक ट्रस्ट के अंतर्गत आती हे। और वही ट्रस्ट से सारा संचालन होता हे। बस जब आप फीस जमा कराते हो तब ही यह सब कारोबार आपके सामने आ जाएगा। आप घोर से देखना की वहां स्कूल फि लिखा हे , डोनेशन लिखा हे या ट्यूशन फि, ऐसे अलग अलग कितने क्लॉज आने को चालू हो गए हे। जैसे की खेल , टूर, आउट डोर वगैरा। तो यह साफ हो गया हे कि कोई नियम हे जिसको ताक ताक करके इसको पैसे ऐंठने की पूरी छूट मिली हे। और वह बस दिन प्रतिदिन इसी कार्य में लगे रहते हे।

इससे आगे जाए तो कितनी शाला ए एसी भी हे जो अपने शिक्षकों को बैंक में पगार देके वापिस रोकड़ रूप में ले लेती हे। वह एक शिक्षक की मजबूरी हे और यह शिक्षण माफियाओं का डर।! अब इन सब में जो रह जाता हे जो छूट जाता हे वह हे शिक्षण।?!

इन सभी शिक्षण माफिया गैंग रोज रोज नए तौर तरीको से पैसे ऐंठने के रास्ते ढूंढते हे। और सोची समझी साजिश की तहत लोग इसके शिकार बन गए हे। इसमें जो मूल भाव का शिक्षण हे वही गायब हो गया हे। और बस मार्क्स और स्कूलों की छवि चमकाने के लिए ही शिक्षण रह जाता हे। अब सोचो जिस शिक्षण की नींव हि काले धन और उसका सेटलमेंट करने के लिए बनी हे वहा पढ़ रहे बच्चो को क्या शिक्षण मिलता होगा?! क्या यह संभव हे कि जहां शिक्षण संस्थानों खुद ही की नींव गलत हो वहा से कोई सही शिक्षा पा सके।! क्या यह भी संभव हे के अगर आगे बढ़ भी गया तो यह नींव जानने के बाद वो आदमी अपने आपको एक सुरक्षित और भ्रष्टाचार मुक्त भारत दे सके। शिक्षण संस्थान में होते शिष्टाचार से भ्रष्टाचार को अगर नहीं रोका गया तो अब नीचे लिखी लाइन ही सब बोलेंगे और कोई भी संस्थानों का कुछ भी महत्व नहीं रहेगा यह पक्का हे।

सोच समझ के ना की पढ़ाई जिसने, उसने जीवन बिगाड़ दिया।
और सोच समझके की पढ़ाई जिसने, उसने भी क्या उखाड़ लिया।।

बस यही वाक्य अभी 10% केसों में लागू होते दिख रहे हे अगर यही व्यवस्था से शिक्षण प्रणाली चली तो वह 90% हो जाएगी।। 
जय हिंद ।।

=================================-----------------------------------------------
*लेखन*✍️✅🇮🇳...
  प्रतिक संघवी 
राजकोट (गुजरात) 
-----------------------------------------------
=================================


=================================-----------------------------------------------
*लेख विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार चंद्रकांत सी पूजारी 
(अ.भा.स्वाभिमानी संपादक सेवा
संघ - गुजरात प्रदेश प्रभारी) 
-----------------------------------------------
=================================

=================================-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

नासिक महानगरपालिकेने घरपट्टीत 
५०%सूट द्यावी - चंदन पवार

नाशिक प्रतिनिधी : माजिद खान 
नासिक महानगरपालिकेने घरपट्टीवरील दंडात ९५% सूट तर दिलीच आहे, परंतु मूळ रकमेतही ५०% सूट द्यावी कारण अनेक महिन्यांपासून ज्या नाशिककरांची घरपट्टी थकलेली आहे व त्यावर नाशिक महानगर पालिकेकडून अनेक पटीने दंड लावण्यात आला होता त्या दंडावर महानगर पालिकेने सूचना काढून दिलेल्या वेळेत जर घरपट्टी भरली तर दंडात ९५% सूट देऊन रक्कम भरण्यासाठी आवाहन केले होते.
आज नाशिकमध्ये अनेक असे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत ज्यांची मूळ रक्कमच खूप मोठी आहे, अशा दुर्बल घटकातील आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी महानगरपालिकेने मूळ घरपट्टीच्या रकमेत ५०% सवलत देऊन गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना पूर्ण घरपट्टी भरण्यास प्रोत्साहित करावे असे जर केले तर जवळपास ९९% लोक घरपट्टी तात्काळ भरतील जेणेकरून महानगर पालिकेची संपूर्ण वसुली होईल आणि महानगर पालिकेचे उत्पन्न सुद्धा वाढेल, तसेच पाणी पट्टीमध्ये सुद्धा महानगरपालिकेने भरघोस सूट देऊन लोकांना आर्थिक विवेचनेतून बाहेर काढावे अशी विनंती वजा मागणी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांना पत्राद्वारे भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांनी केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Tuesday, November 26, 2024

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेचा राष्ट्रीय गौरव म्हणजे संविधान दिन


विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांच्या अलौकिक आणि अद्वितीय प्रकांड पांडित्यातून उदयास आलेला भारत देशासह देशातील तमाम जनतेचा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय. भारतीय संविधान लिहण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तब्बल दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी लागला. 
     या प्रदीर्घ कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता अहोरात्र निरंतर अभ्यास, चिंतन,मनन करत जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांच्या संविधानांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या संविधानांपेक्षा भारतीय संविधान हे जास्तीत जास्त कसे लोककल्याणकारी निर्माण करता येईल या करिता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कायम राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून निरंतर प्रामाणिक प्रयत्न केला. आणि जगातील सर्व श्रेष्ठ आणि जगातील प्रगत राष्ट्रांच्या अस्तित्वात असलेल्या सर्व संविधानांच्या तुलनेत सर्वात मोठ्या लिखित भारतीय संविधानाची निर्मिती केली. हे राष्ट्रहिताचे महान लेखन कार्य अविश्रांतपणे परिपूर्ण करून सदर संविधान घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते देशाला अर्पण केले तो ऐतिहासिक दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी हे भारतीय संविधान राष्ट्रहितासाठी सर्वानुमते अंगिकृत करून अधिनियमित केले. या नंतर घटना समितीने एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करून त्या जाहीर कार्यक्रमात घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे पहिले प्रधान मंत्री पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य आणि अलौकिक संविधान निर्माण कार्याची प्रशंसा करून त्यांच्या प्रखर राष्ट्र प्रेम आणि जाज्वल्य देशभकीचा गौरव केला आणि २६ जानेवारी १९५० पासून हे संविधान भारतीय शासन प्रशासनात प्रत्यक्षपणे अंमलात आले. 
      न्याय, समता, स्वातंत्र आणि विश्व बंधुत्व या चतुः सुत्रीवर आधारित भारतीय संविधानाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुता प्रवर्धीत होण्यासाठी देशातील सर्व सामान्य जनतेत, विद्यार्थी व शिक्षक वर्गात, लोकप्रतिनिधी आणि सरकारी निमसरकारी प्रशासकीय अधिकारी, लोकसेवक यांच्या मध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरावर संविधान साक्षरता व जाणिव जागृती होणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा अंतर्भाव केला पाहिजे. 
       या संविधान गौरव दिनानिमित्ताने भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, संविधानिक हक्क, अधिकार आणि कर्तव्य स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणार आहेत. हीच संविधानिक तत्वे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनात आणि विद्यार्थी मनावर बिंबवून त्यांना देशाचे सुजाण व जागरूक नागरिक भडवणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आपल्या भारतीय संविधानाच्या अधीन राहून भारताचा प्रशासकीय कारभार चालतो याची जाणीव, जागृती विद्यार्थ्यांना आणि भारतीय नागरिकांना झाली पाहिजे. आपल्या देशाच्या या घटपात्मक संसदीय लोकशाहीच्या आधारे कार्य पालिका, न्याय पालिका, संसद, मंत्रीमंडळ, निवडणूक आयोग, प्रसार माध्यमे यांच्या दैनंदिन कारभाराचे समग्र ज्ञान विद्याथ्यांना आणि नागरिकांना व्हाने या करिता शासनाने सन २००८ ला अध्यादेश काढून २६
नोव्हेंबर रोजी देशासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालम, विद्यापीठ अनुदान आयोग तथा युजीशी, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, ग्राम पंचायत कार्यालयात संविधान गौरव दिन आगोजित करून या दिनाचे महत्व विशद करण्यासाठी वकृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन आणि भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचे सामुहिक वाचन करने सर्वांना बंधनकारक केले आहे. या संबंधीचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांव्याकडे पाच डिसेंबराच्या आत सविस्तर सादर करावयाचे आहे. संबंधित जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या जिल्यात प्रत्यक्ष किती ठिकाणी शासकीय आदेशाची अंमलबजावणी केली आहे, हे गांभीर्याने पहायचे आहे. अशा सुचना आहेत. 
       भारतीय संविधान हा आपल्या राष्ट्राचा तथा भारतीयांचा एकमेव राष्ट्रीय ग्रंथ आहे. या संविधानाच्या माध्यमातून आपण जगातील सर्वश्रेष्ठ संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. त्यामुळे ती अत्यंत निस्वार्थी वृत्तीने व पारदर्शकपणे राबविणे आणि तिचे पालन करणे जसे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी वर्गाची जबाबदारी आहे, तशीच ती सर्व भारतीम नागरिकांची सुद्धा तितकीच नैतिक जबाबदारी आणि आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे.


=================================
-----------------------------------------------
*शब्दांकन:*✍️✅🇮🇳...
पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड
बोरघर- माणगाव,रायगड. 
भ्रमणध्वनी - ९८२२५८०२३२ / ८००७२५००१२
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================