राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, March 2, 2025

रमजान मुबारक 2025रोजा नंबर 02, सोमवार 03-03-2025

रोजा :-नीतिमत्ता व संयमाची परीक्षा घेणारं पर्व...
प्रेषित मुहम्मद स्व. यांचे मित्र ( सहाबा ) अब्दुल्लाह बिन उमर रजि. सांगतात की, आम्हाला प्रेषितानी सांगितलं की, तुम्ही चंद्रदर्शन( चंद्रकोर )बघूनच दुसऱ्या दिवशी रोजा ( उपवास ) ठेवा, ( सहीह बुखारी 1906).
चंद्रकोर बघून सत्य सत्यता पडताळून अतिशय मनोभावे 
दुसऱ्या दिवशी लगेच इस्लामच जे तिसरं अंत्यन्त महत्वाचे स्तम्भ" रोजा ", मराठी बोली भाषेत' उपवास "म्हटलं जाते, खरं तर प्रत्येक धर्मात उपवास ठेवण्याची प्रथा आहेत, फक्त्त पद्धती वेगवेगळ्या आहेत, हिंदूत प्रत्येक महिन्यात येणारे " एकादशी, द्वादशी, चतुर्थी, शिवरात्र यामध्ये हिंदू बंधू- बघीनी उपवास ठेवतात, जैन धर्मात" पर्युषन पर्व " म्हणून फारच कडक उपवास असतात तसेच ख्रिस्थन मध्ये ही चाळीस दिवसाचे उपवास असतात परुंतु उपवास ठेवणे व त्याचीच सांगता करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. जगात एक ही धर्म असा बाकी नाहीं की उपवास नाहींत.असो.
 आपण ज्याला रमजान म्हणतोय रमजानतील '' रम्ज " या शब्दाचा सरळ अर्थ हा " जळणं "होतो. 
या रमजान पर्वात रोज सकाळी भोर पहाटे 5:00 वाजता उठून थोडं अन्न ग्रहण ( सेहरी ) करून दिवस भर अन्न पाण्या शिवाय निरंकार राहून संध्याकाळी 6:41 मिनिटापर्यंत( इफ्तार )उपाशी राहनं म्हणजेच रोजा ठेवणं. 
फक्त्त उपाशीच राहणं नव्व्हे, आपल्या सर्व वाईट सवयी,भावना, विचार, आचार, विकृती, शिवी शाप, शपथ, हो आपल्या व्यसनांना आवर घालणे सुद्धा, या सर्व गोष्टीना आवर घालणे व आपल्या मनातील सर्व वाईट गोष्टीच्या विचारांना जाळून टाकणं, आपल्या मनातील राग, मत्सर, अतिशय क्रोध, लोभ जाळून टाकणे. चोरी करणं, दुसऱ्याला त्रास होईल असे कृत करणं, शिव्या शाप देणे, कोणी लज्जीत होईल अशी कृत्य करणं, 
सिगारेट, दारू, अफू, चरस, गांजा ची व्यसणं रोजा च्या माद्यमातून सोडवणं, आपल्या प्रत्येक वाईट सवयी विकृती, तसेच मनातील सर्व भावना जळमट या रामजानुल मुबारक च्या पवित्र राजा च्या सुवर्ण संधीचा फायदा उचलून चांगल्या सवयी मध्ये संगोपन, संवर्धन करणं याला च रोजा ठेवणं, तरच रोजा ठेवण्याला अर्थ. तसेच रोजा ठेवून दगाबाजी,चोरी करणं, खोटे बोलणं, हें अल्लाह ( परमेश्वर )ला मान्य च नाहीं. 
"फक्त्त उपाशी राहणं अल्लाहला पसंत च नाहीं " पवित्र कुरआन (सुरह नं. 02 अल - बकराह ).
अशा रोजदारांसाठी प्रेषित मुहम्मद स्व. चे मित्र सहाबा अबू हुरेरा रजि. सांगतात, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नीं सांगितलं की, " जो रोजे ठेवून खोटे बोलेल, दगाबाजी करतात,अशा रोजा ठेवणाऱ्यांची आम्हाला अजिबात गरज नाहीं ( सहीह बुखारी 2903).
रोजा ठेवण्यासाठी आपली मनापासून मानसिक तय्यारी करणं की आज आत्ता पासून सर्व वाईट आचार -विचार -प्रवृत्ती मी सोडणारच आहेत. रमजान च्या रोजने फक्त्त धार्मिक कर्मकांड च पूर्ण न होता आपल्या मध्ये आधात्मिक सुदधीकारणच होऊन एक प्रकारे सर्व समावेश नैतिक मानवी मूल्यवर्धन वृद्धिंगत होतं असतं, नैतिक शिक्षण वाढ होते व संयम सद्गुण विकास होतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या अंतर आत्म्यास हृदयापासून शांती मिळते. आणि हेच रोजाच फलीत म्हणावं.
( मित्रांनो लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा )

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=--=-=-

लेखक :- डॉ. सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा दवाखाना ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
Mobile no. 9271640015
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=--=-=-

उपेक्षितांचा अधारवड हरपला अ.भा. लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व्ही.जी.रेड्डी यांचे निधन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अखिल भारतीय लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.व्ही.जी.रेड्डी यांचे आपल्यातून अवेळी निघून जाण्याने सामाजात कधी न भरुन येणारी मोठी पोकळीक निर्माण झाली आहे.
व्ही जी.रेड्डी साहेब हे उपेक्षितांचे आधारवड होते, ते केवळ मातंग समाजाचेच नव्हे तर प्रत्येक सामाजातील रांजले - गांजले, अन्याय पिडीत अशा पुर्णतः उपेक्षित आणी दुर्लक्षितांचे ज्वलंत समस्या,प्रश्न सोडविण्याठी त्यांचा सातत्याने पुढाकार होता,त्यांच्या निर्पेक्ष व परोपकारी मार्गदर्शनामुळे सामाजातील अनेक उपेक्षित, दुर्लक्षित आणी अन्यायग्रस्तांना उचित न्याय मिळाला यामध्ये अ.भा. लहुजी सेने चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण तथा सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांना योग्य पद्धतीने तथा निर्पेक्षवृत्तीने परिश्रम करण्याची त्यांनी मोठी शिदोरीच दिलेली असल्याचे समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या श्रद्धांजलीपर शोक संदेशात म्हटले आहे.
व्ही जी.रेड्डी यांचा अंत्यविधी उद्या सोमवार दि. ३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथील टाकळी येथील हिंदू स्मशानभूमीत होणार असल्याचे अ.भा. लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचीव हानिफभाई पठाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, March 1, 2025

छत्रपती शिवाजी महाराज आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे शहरात ताबडतोब बसविण्यात यावे - डॉ.वंदनाताई मुरकुटे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी




- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे श्रीरामपूर शहरात लवकरात लवकर आणून बसविण्यात यावे , या जागेचे भूमिपूजन होऊनही आद्यपर्यंत पुतळे बसविण्यात आलेले नाही. यासंदर्भात श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सविस्तर चर्चा करत निवेदनाद्वारे सदरील मागणी केली आहे.
   डॉ. वंदना मुरकुटे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, “सदरील दोन्ही महापुरुषांचे पुतळे नाशीक येथे तयार असून नगरपालिका दरमहा भाडे रक्कम भरत असते. 
  या प्रश्नात प्राधान्य क्रमाने उपमुख्यमंत्री महोदय यांनी लक्ष घालून जिल्हाधिकारी यांना आदेश द्यावेत असेही डॉ. मुरकुटे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शिक्षणातून सर्वांगीण विकास साध्य होतो- प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन आहे. महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात. चांगले व्यक्तिमत्व आकाराला येऊन आपला विकास करून घेता येतो. असे विचार श्रीरामपूर येथील स्वामी सहजानंद भारतीय शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे यांनी व्यक्त केले.
         तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी व पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे ह्या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रा. अशोक थोरात, प्रा. डॉक्टर बाबासाहेब पवार, जालिंदर भांड, बापू पुजारी, आशा ओहोळ, मयूर राशिनकर, सुनील कोळसे, गोरख राशिनकर, ओम साई कॉम्प्युटरचे संचालक प्रा. दयानंद शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
      पुढे ते असे म्हणाले की, शिक्षक, पालक आणि समाज या तीनही धुवांच्या सहयोगातून विद्यार्थ्यांची जडणघडण होते. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी कायम महाविद्यालयाच्या संपर्कात राहून सामाजिक विकासात हातभार लावावा. आजी विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा करून देऊन देश विकासास हातभार लावावा. 
  यावेळी दयानंद शेंडगे, बापू पुजारी, सुनील कोळसे, अक्षय पठारे, सुशील राका, प्रा. अमृता गायकवाड या माझी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या संविधान गौरव महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या हरिहर या नियतकालिकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
   सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ओंकार मुळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी मानले. 
सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी व पालक यांचा सत्कार करण्यात आला.या दोन्ही मेळाव्यासाठी सर्व प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

मराठी संपादक पत्रकार न्याय हक्क संरक्षण कृती समितीची स्थापना समितीच्या अध्यक्षपदी संपादक प्रविण सावरकर यांची निवड


- उद्धव - फंगाळ -/ मेहकर -
वरुड (जि.अमरावती) शहरात पत्रकारांच्या विविध समस्या करिता व त्यांच्या संविधानिक अधिकारांसाठी नुकतीच विभागीय मराठी संपादक व पत्रकार न्याय हक्क संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीद्वारे पत्रकारांच्या विविध समस्या, आरोग्य समस्या निवास समस्या, पत्रकारांना शासनाच्या विविध योजना मिळण्याकरीता विभागीय मराठी संपादक व पत्रकार न्याय हक्क संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यासमीतीच्या अध्यक्षपदी संपादक प्रवीण सावरकर, उपाध्यक्ष तुषार अकर्ते, सचिव विलास पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या समितीच्या माध्यमातून शासन स्तरावर पत्रकारांना शासकीय योजनेचा फायदा मिळावा तसेच पत्रकारां करिता नुकतेच स्थापन झालेले आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातुन पत्रकारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा व पत्रकारांना आरोग्य विमा पत्रकारांचा अभ्यास दौरा सह विविध योजनेची माहिती होण्या करिता व समाजोपयोगी उपक्रम राबविणेकरिता पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी विभागीय मराठी संपादक व पत्रकार न्याय हक्क संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून दैनिक लोकम चे वरुड तालुका प्रतिनिधी संजय खासबागे,दैनिक हितवाद चे प्रतिनिधी त्रिलोचन कानुंगो व दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी योगेश ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
 यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार त्रिलोचन कानुगो, संजय खासबागे, योगेश ठाकरे, प्रकाश गळवे, प्रविण सावरकर विनोद मेंढे, निलेश लोणकर, तुषार अकर्ते, रवींद्र इंगोले, निखिल बावणे, तुषार खासबागे, दिपक बोदरकर, विष्णू राऊत, गजानन नानोटकर, श्री. खंडाईतकर, शेषराव कडू, त्रिनयन मालपे,जितेंद्र फुटाणे, राहुल जाधव, अतुल काळे, किशोर चौधरी यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी शहरी आणी ग्रामीण भागतील सर्व वार्ताहर व प्रतिनिधींना या समितीमध्ये सभासद करून घेण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रविण सावरकर यांनी सांगितले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


रमजानुल मुबारक 2025 रोजा नंबर 01रविवार दिनांक 02-03-2025


'" इस्लाम समजून घेताना "'
लेखक :- डॉ. सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा दवाखाना,
9271640014.
विषय :- अल्लाह (परमेश्वर )च्या अदुतीय भक्तिमय  पर्वाला प्रारंभ..
सन 2025, इस्लामी 1446 हिजरी,महिना शव्वाल परुंतु यालाच सर्व जगात"  रमजान  "रोजा (उपवास )",ठेवण्याचा पवित्र रमजानुल मुबारक महिना. कालच अमावस्या होऊन बंधूनी चंद्र कोर पाहण्याची मनात हुरहूर इच्छा असते,  बघितलं तर प्रत्येक महिन्यात चंद्र कोर चंद्र दर्शन हें होतच असते परुंतु मागील आठवा( 8)महिना शबाना संपल्यावर येणारा नववा (9) महिना शव्वाल अर्थात रमजान महिन्यातील चंद्र कोरला काही वेगळं च महत्व अप्रूप असतं. चंद्रकोर पाहण्याची याच देही याच डोळ्यात बघून अल्लाह कडे लगेच दुवा प्रार्थना करून,अल्लाह च्या कृपा दृष्टी लाभावी.
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " शाबान हा माझा आवडता महिना आहेत व रमजान महिना हा अल्लाह( परमेश्वर- ईश्वरा" चा आवडता महिना आहेत " म्हणून,
प्रेषित मुहम्मद स्व. सांगितलं की, " तुम्ही पहिल्या प्रथम चंद्र कोर पाहून लागलीच अल्लाह जवळ दुवा प्रार्थना करून जे शुभ शुभ असेल त्यामध्ये तुमच्या इच्छा आकांशा दया करुणा, कर्ज असेल तर कर्ज मुक्ती साठी, तुम्ही रोजच्या व्यवसाय वाढीव साठी, आरोग्य सुखरूप राहावं व तुमच्या अपत साठी प्रार्थना करा,:, अल्लाह तुमच्या साठी जे जे योग्य राहील ते तेंच तुम्हाला खात्रीने भेटेल ".
तसं हिजरी प्रेषित(पैगंबर )मुहम्मद स्व.सल्लम. 16 जुलै 622 रोजी आपल्या स्वकी्यांनी दिलेल्या अतोनात- हाल- कष्ट -वेदना ना कंटाळून इस्लाम च्या प्रसारासाठी मक्का हुन मदिनेच्या स्थलांतर - प्रवासाला - हिजरत " म्हटलं जातं. त्याचं घटनेला आज 1446 वर्षे झालीत. यालाच अरबीत आत - तकबीम - हिजरी व येथूनच हिजरी वर्ष गणलं गेलं व चंद्र ( लुनार कॅलेंडर ) काल संबोधित करतात.
इस्लामी काल गणना चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील परस्पर संबंधावर आधारित, त्याला चांद्र ( लुनार कॅलेंडर )काल  म्हणतात. चंद्रमासाचा कालावधी 29.53 दिवसाचा असल्यामुळे 12 महिन्यात गुणल्यानं वर्षाचे 354 दिवसच होतात.
   भारतीय हिंदू कालगनणा सौर अर्थात सूर्य व पृथ्वी यांच्या परस्पर संबंधावर असल्यामुळे त्याचे 365 दिवस होतात.सूर्यावर आधारित अर्थात सोलर कॅलेंडर.
   इसवी सन किंवा लॅटिन अंनो डॉमिनी ही ग्रोगेरियन दिनदर्शिका मधील काल गणना सर्व जगात( ग्रोगेरिअन कॅलेंडर )हें येसू ख्रिस्त यांच्या जन्मा पासून चालू आहेत. हिब्रू भाषेत "येशु ख्रिस्त व अरबी भाषेत "इसा "यांना पैगंबर म्हणून पवित्र कुरआन  मध्ये  उल्लेख 0आलेला आहेत, त्यांना " इसा"  'इसाअलैसलाम" म्हणून उल्लेख आहेत, इसा चा अपभ्रमश "इसवी ", हा शब्द तय्यार झाला   व" सन" म्हणजे वर्ष किंवा "साल " म्हणून" इसवी सन " ही कालगना सर्व जगात मान्य करण्यात आली म्हणून एक (1)जानेवारी ही तारीख सर्व जगाला समान म्हणून मान्य  आहे,त्यांचं 365-366 ( लीप वर्षे ) होतात. बघितलं तर 1 जानेवारी हा सार्वत्रिक रित्या वर्ष आरंभ असला तरी जगातील विविध देश व धर्माच्या हिशोबात 365 दिवसात 80 अंशी पेक्षा ही जास्त वर्षे आरंभ येतात परुंतु यापैकी कित्येक तारखा समान असल्या तरी 12 बारा महिन्यात 58 आठ्ठावन्न दिवस असे आहेत की कुठलाणा कुठला वर्षे आरंभ हा येतोच असतो.. असो.
 तर सौर आणि चंद्र वर्ष यांच्या मध्ये जवळ जवळ 10-11 दिवसांचा फरक होत असतो. हिंदू मधील सौर कालगनणे तील जो 10-11 दिवसाचा फरक होत असतो ती तफावत भरून काढण्यासाठी भारतीय पंचांग तज्ञान्नी त्यामध्ये संशोधन करून प्रत्येक तीन (3) वर्षात "अधिक " मासाची योजना केली आहेत : ,त्याला आपल्या खेडुत भाषेत" पित्तरपाठ "महिना म्हणून संबोधित करतात.  हिंदू कालगनणा नुसार नवीन वर्ष हें गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्त वर म्हणजेच चैत्र शुद्ध 1, शालिवहन शके 1947, येत्या 2025 वर्षी गुढीपाडवा रमजान ईद अर्थात ईद उल फितर च्या एक दिवस अगोदर  30 मार्च 2025 रविवारी आहेत अर्थातच योगायोग म्हणावं.
             🌷चंद्र ( लुनार )कालगनणा प्रेषित मुहम्मद स्व.यांनी स्पष्ट केल्याने प्रत्येक वर्षात 10-11:दिवस कमी कमी होत होत गेल्याने जगामध्ये रमजान चे रोझे विविध ऋतूत येतात, वेगवेगळ्या देशात फक्त्त एकाच ऋतूत येत नाहीत व ठराविक एकाच तारखेला किंवा ठराविक एकाच महिन्यात दर वर्षी येतच नाहीत. सध्या काही ठिकाणी पावसाळ्यात तर काही ठिकाणी उन्हाळ्यात तर काही ठिकाणी थंडी मध्ये येतात.काही देशात 12 तास तर काही ठिकाणी 13,14,15,16,17,18,20,22 तासांचे रोझे आहेत.. म्हणून या लुनार कॅलेंडर मुळे,  10-11:दिवस पुढे पुढे जात जगात विविध ऋतुत  विविध महिन्यात पुढे फिरत पुन्हा 32-33 वर्षांनी पुन्हा आज आपण या  2-03-25  मार्च महिन्यात जे रोज़े उपवास किंवा कोणताही उत्सव, सन, दिवस आलेला आहेत  तर 32-33 वर्षांनी 02-03-2057 ला तोच दिवस, तीच तारीख, महिना व उत्सव येतील. कालचक्र हें फिरून पुन्हा पुन्हा त्यांच ठिकाणी येत असतं. म्हणून जगातील प्रत्येक रोजदार व्यक्तींना विविध ऋतुत रोझा अनुभवण्याची संधी भेटत असते.असो.
    म्हणून रामजानुल मुबारक च्या पहिल्या चंद्र कोरीच महत्व  औरंच, पैगंबर मुहम्मद स्व. म्हणतात की, तुम्ही अल्लाह जवळ जितकी प्रार्थना दुवा करतांन तेवढी थोडीच असणार आहेत म्हणून तुम्ही जरूर दुवा करा. "
जगतील मानव कल्याण व एकता व अखंडते साठी, निरोगी आरोग्यासाठी, बहीण बंधू, मित्र, शेजारी, देशासाठी, जगासाठी, शांतता, करुणा, दया, उन्नती साठी, कर्ज फेडण्यासाठी टाकत शक्ती मिळावी म्हणून, सुखी समृद्ध जीवनासाठी, जगामध्ये जे आजारी आहेत व ज्यांना दुर्धर आजार, कॅन्सर इत्यादी आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्या निरोगी आरोग्याची दुवा करावे, इत्यादी दुवा कराव्यात..
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, "अल्लाह परमेश्वराच्या खजिन्यात किंचित ही कमी होणार नाहीं.. कारण तो फक्त्त देणाराच आहेत "..
लहान मुलं, आपल्या आवडत्या आप्त ना शुभेच्छा देतात, मामा मामी, आजोबा आजी, मावशी, बहीण भाऊ, आत्या, भाची भाचा, नात नाती मित्र, आप्त स्वकीय आवडती व्यक्तींना शुभेच्छा, शुभ चिंतन शुभेच्छातात, खरं सर्व घरातील व्यक्ती चा आनंद गगनात मावेनासा होत असतो..एक्दमच आनंदाचाच संपूर्ण महिना भर असतो.
थोडयाच वेळाने नमाज ईशा व तारविह ची वेळ जवळ येते, बंधू नमाज च्या तय्यारी करून आपल्या जवळच्या किंवा आपल्या काम धंध्याच्या सोयीनुसार जात असतात.
महिला भोर पहाटे च्या रोझा ठेवण्या साठी अन्न ग्रहण करतात त्यास " सेहरी " म्हटलं जाते, त्या तय्यारी करतात...
अब्दुल्ला बिन उमर रजि. म्हणतात की, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नीं सांगितले की," तुम्ही चंद्र दर्शन बघून रमजान चे रोझा ( उपवास ) ठेवा व शेवटी चंद्र दर्शन करूनच रोझा ( उपवासाचे सांगता करा ' ( सहीह बुखारी शरीफ 1906).
ही अशीच दिनचर्या संपूर्ण रामजानुल मुबारक महिना भर चालू असते.. महिना भर अल्लाह ( परमेश्वर ) च दया व कृपा अखंड अद्वियपने अलौकिक अदृश्य पने सतत चालूच असते म्हणून या संधीचा प्रत्येक बंधू भगिनींनी फायदा घेऊन आपलं जीवन करणी लावणं आपल्याच हातात आहे...म्हणून उद्या पहिल्या रोझा व इतर सर्व संस्कारांचा जरूर फायदा उचलवा..
सर्वाना रामजानुल मुबारक च्या हार्दिक शुभेच्छा...
(कृपया :- मित्रांनो लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवाव्यात.. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवावे.)

=================================
-----------------------------------------------
लेखक :- डॉक्टर सलीम  सईदा सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना 
श्रीरामपूर,
जिल्हा :- अहमदनगर 
9371640014.
-----------------------------------------------
=================================

( क्रमशः )

23-02-25 रविवार " विस्थापित झालेल्या असंख्य पीडित लोकांच्या उपजिवेकेसाठी पुनर्वसन होणे अंत्यन्त गरजेचे आहेत " विद्रोही अध्यक्ष डॉक्टर सलीम शेख...


श्रीरामपूर शहरात झालेल्या प्रशासनाच्या वतीने झालेल्या अतिक्रमण कारवाई मुळे श्रीरामपूर शहरांत अनेक कुटुंब विस्थापित झाले.. त्यातील दोन व्यापारी यांचे मानसिक धक्याने हृदय विकाराने निधन झाले..
विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबाचे दोन वेळा अन्न चे ही पंचायत झालेली आहेत.. अशा अनेक विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे यासाठी उपोषणास बसलेल्या अनेक कुटुंबानापाठिंबा म्हणून " श्रीरामपूर विद्रोही सांस्कृतिक चळवळ श्रीरामपूर शाखे" च्या वतीने रविवार 23-02-2025 रोजी उपोषण स्तळी भेट दिली.. काही प्रकृती अस्तव्यस्त झालेल्या महिलांना व बंधूना श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात उचलून ऍम्ब्युलन्स मध्ये पाठवण्यात मदत करण्यात आली..
सहभागी शिस्तमंडळात विद्रोही श्रीरामपूर चे अध्यक्ष डॉक्टर सलीम सिकंदर शेख, सचिव अशोकराव दिवे सर, संघटक अमोल सोनवणे, कार्य अध्यक्ष अकबर भाई शेख, व कार्यकर्ते उपस्थित होते, सर्व सहभागी सदस्यांनी शासनाने विस्थापित कुटुंबाना पूर्णवसन करावे यासाठी करण्यासाठी जाहीर पाठिंबा व्यक्त केला 
==================================
-----------------------------------------------

डॉ, सलीम सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================