राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, August 28, 2024

मिल्लतनगर च्या नागरी समस्या तातडीने मार्गी लावू - मुख्याधिकारी जाधव


- श्रीरामपूर - (प्रतिनिधी) - वार्ता -
शहरातील मिल्लत नगर या उपनगरातील फेल झालेली ड्रेनेज सिस्टीम व रस्त्यावर साचणारे पाणी तसेच गतिरोधक,मिल्लत नगर ट्रॅकची सफाई ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी या भागातील पाहणीनंतर पालिकेच्या विविध विभागांना दिले.भुयारी गटारीचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याने त्यात मला पडायचे नाही असे सांगून या भागातील ड्रेनेजची सफाई करून तुंबलेले पाणी तातडीने काढून देण्याबाबत आरोग्य खात्यामार्फत लगेच कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
मागील दोन-तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे मिळत नगर मधील सेक्टर तीन चार पाच मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी लोकांच्या घरात शिरले होते तसेच या भागातील भुयारी गटार चोकअप झाल्याने तेथील महिला मिश्रित पाणी हे नागरिकांच्या घरात आले होते. याबाबत या भागातील नागरिकांनी सोमवारी आमदार लहुजी कानडे व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडली.
आमदार कानडे यांनी सुद्धा फोन करून या प्रश्नात लक्ष घालण्याचे मुख्याधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यावर मी स्वतः त्या भागात येऊन पाहणी करतो व हे प्रश्न सोडवतो असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले होते. त्याप्रमाणे काल दुपारी मुख्याधिकारी जाधव, नगर अभियंता गवळी, आरोग्यनिरीक्षक संजय आरणे, संजय शेळके व त्यांचे इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या टीमने मिल्लत नगर भागात भेट देऊन दोन तास पाहणी केली.यावेळी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चर्च रोडवर गतिरोधक बसविणे तसेच या रोडवरील भुयारी गटारीचे सर्व चेंबर स्वच्छ करून नागरिकांच्या घरात जाणारे पाणी काढून देण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागास दिले. त्याचबरोबर पाण्याचा तलाव,तेथील सांडपाण्याचा नाला,मिल्लत मशिदी समोरील रस्ता,वैदू वाडा पुलावर कॅनलला पडलेला भगदाड याची ही त्यांनी पाहणी केली.या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी नगरपालिकेच्या यंत्रणेला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले.
यावेळी या भागातील नागरिक सर्वश्री.जेष्ठ पत्रकार सलीमखान पठाण,सय्यद जाकीर हुसेन,शौकत शेख, युसूफ लाखानी,सलीम रसूल पटेल,समीरखान पठाण,हाजी युसुफभाई सय्यद,सज्जाद नवाब,अफरोज शाह,रुकसाना शाह,फिरोज पठाण साबुन वाले,अमीर मिर्झा,असलम बिनसाद, गनी पिंजारी,इम्रान शेख आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भागातील नागरी समस्यांकडे आत्तापर्यंत सातत्याने नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे.गेले तीन दिवस पावसाचे पाणी लोकांच्या घरात आहे.परंतु पालिकेने त्याची दखल घेतली नाही याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी मुख्याधिकार्‍याजवळ व्यक्त केली.परिस्थितीचे गांभीर्य पाहून या भागात तातडीने स्वच्छता करण्यात येईल तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासनही मुख्याधिकारी जाधव यांनी दिले.


मिल्लतनगरला भेट देणारे पहिले मुख्याधिकारी
मिल्लत नगर परिसरातील नागरी वसाहतीला आता तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या भागातील प्रश्नांसंदर्भात नागरिक वेळोवेळी नगरपालिकेकडे तक्रारी करतात.मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.परंतु परवा नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना नागरी समस्यांचे गांभीर्य लक्षात आणून दिल्याने मुख्याधिकारी जाधव यांनी तातडीने या भागास भेट देण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे काल त्यांनी नगरपालिकेच्या यंत्रणेसह या भागाची पाहणी केली. त्यामुळे मिल्लत नगर भागाला भेट देणारे पहिले मुख्याधिकारी म्हणून सोमनाथ जाधव यांची नोंद झाल्याचे म्हणत नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले.


=================================
-----------------------------------------------
जनाब सलीम भाई पठाण जेष्ठ पत्रकार- ✍️✅🇮🇳... श्रीरामपूर  +919226408086
-----------------------------------------------
=================================

चार वर्षाच्या चिमुकलीवर आणी डॉक्टर महीलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करा - विजयराव खाजेकर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथे नव स्वराज्य सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.यानिवेदनात असे म्हटले आहे की,
दिनांक १५/०८/२०२४ रोजी पश्चिम बंगाल येथे झालेल्या डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व दिनांक १९/०८/२०२४ रोजी बदलापूर जिल्हा ठाणे येथे चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केलेल्या दोन्ही घटनेच्या आरोपीला कठोर शासन होऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नव स्वराज्य सेनेच्या वतीने करण्यात आली व संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. ही घटना अतिशय निंदनीय अमानुष असून मानव जातीला काळीमा फासणारी आहे. देशांमध्ये व राज्यात लहान मुली व महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत हे आता थांबले पाहिजे, आरोपीला कायद्याची दहशत असावी म्हणून या आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी तसेच भविष्यात अशा घटना होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे यावेळी नव स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव खाजेकर, प्रदेश कार्याध्यक्ष सय्यद मीर असगर अली, प्रदेश महासचिव दशरथ भोंगळे ,राज्य अध्यक्ष एकलव्य संघटना शिवाजीराव गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष एकलव्य संघटना सुदाम मोरे ,तालुका संघटक सचिव विठ्ठल विघावे, तालुका सौरक्षण प्रमुख रंगनाथ पितळे , शाखाध्यक्ष बिस्मिल्ला सय्यद, शाखा उपाध्यक्ष संपत मोरे, शाखा अध्यक्ष किरण मिसाळ, जिल्हा अध्यक्ष महिला पूनम जाधव, प्रदेशाध्यक्ष महिला रमाताई भालेराव, शाखा अध्यक्ष परविन शहा शहराध्यक्ष महिला शितलताई गोरे, करीना गायकवाड, हेमंत मुसमाडे, प्रदेश अध्यक्ष शीख मोर्चा अमर प्रीत सिंग सेठी, शाखा अध्यक्ष सविता रणदिवे, संघटक सचिव समीना शेख, आकाश कांबळे, शोभाताई पातारे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- ✍️✅🇮🇳...शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

संत मदर तेरेसा अनाथांना मायेचा आधार देणाऱ्या थोर समाज सेविका - करण ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
संत मदर तेरेसा या अनाथांना मायेचा आधार देणाऱ्या थोर समाजसेविका होत्या असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले.
श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित संत मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की मदर तेरेसा यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन मानवसेवेसाठी समर्पित केले. मदर तेरेसा या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांसाठी खरोखर प्रेरणास्थान असून अनेक अनाथालय, आश्रम व रुग्णालयांच्या माध्यमातून त्यांनी लोकांची सेवा केली. संत मदर तेरेसा यांनी बेघर, गरीब आणि गरजवंतांना आपलंसं करून त्यांना आधार दिला. संत मदर तेरेसा यांनी भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये देखील मिशनरी ऑफ चॅरिटी या संस्थेचा विस्तार केला. त्यांनी अनाथ मुले, गरीब,पीडित व असाह्य वृद्धांची सेवा करत लोकांना खऱ्या अर्थाने निस्वार्थी भावनेने जगण्याची नवी प्रेरणा दिली. संत मदर तेरेसा यांच्या महान कार्याची दखल घेत त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक रितेश रोटे, दत्तात्रय सानप, नागेशभाई सावंत, प्रवीण नवले, डॉ. राजेंद्र लोंढे, सुरेश ठुबे, जावेद शेख, रियाजखान पठाण, नवाज जहागीरदार, निलेश भालेराव, जगताप साहेब, बाबा वायदंडे, लेविन भोसले, संजय गोसावी, रितेश गिरमे, राजेश जोंधळे, अक्षय जोंधळे, कुंदनसिंग जुनी, लोयला सदन चर्च चे प्रमुख धर्मगुरू प्रकाश भालेराव, ललित गायकवाड, विजय त्रिभुवन, संत लुक हॉस्पिटलच्या सिस्टर रिटा, सिस्टर जॅकलीन,सिस्टर ज्योती, माधुरी शिनगारे, तेरीजा तेलोरे, हर्षदा फुलपगार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* 
पत्रकार अफजल मेमन - ✍️✅🇮🇳...श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================


Tuesday, August 27, 2024

मिल्लतनगर रहिवाश्यांच्या समस्यांची मुख्याधिकाऱ्यांनी घेतली तात्काळ दखल


समस्या जाणून घेण्यासाठी तीस वर्षांत प्रथमच मुख्याधिकारी मिल्लतनगर मध्ये

विविध नागरी समस्यांनी त्रस्त मिल्लतनगर वासियांच्या आगामी मोर्चा निवेदनचा इफेक्ट

विविध प्रसार माध्यमांच्या
रोखठोक बातम्यांची दखल

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
येथील मिल्लतनगर सेक्टर ३ मध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात नेहमीच पावसाचे पाणी येथील नागरीकांच्या घरात शिरण्याची तशी ही जुणी समस्या आहे, याबाबत येथील त्रस्त नागरीकांनी अनेकवेळा श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली, मात्र त्या मोबदल्यात मिळाली ती फक्त केवळ आश्वासने या वितरित कामे काही झाली नाही,अशा परिस्थितीत येथील रहिवाशांसाठी ही समस्या नित्याचीच म्हणून होईल कधी तरी कामे असे तब्बल तीस वर्ष उलटली गेली तरी नगर पालिका प्रशासनाने याकडे ढुंकूनही पाहीले नाही,
मात्र मागील आठवड्यात शहरात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी मिल्लतनगर सेक्टर ३ मधीन नागरीकांच्या घरात शिरल्याने मिल्लतनगरच्या काही त्रस्त नागरीकांनी नगर पालिका प्रशासनास निवेदन देवून सदरील समस्या ह्या येत्या चार/ पाच दिवसात सोडवल्या गेल्या नाही तर दि. ०३ सप्टेंबर रोजी नगर पालिकेवर त्रस्त नागरीकांचा मोर्चा आणू असे निवेदन दिल्याने तात्काळ नगर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणी आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे डायरेक्ट मिल्लतनगरमध्ये दाखल होत त्यांनी सदरील समस्यांबाबी तात्काळ आदेश देवून पावसाचे पाणी वाहून जाण्याकरीता तसेच मिल्लतनगरच्या विविध नागरी समस्यांचे निवारण करण्याकामी आदेश दिल्याने त्रस्त मिल्लतनगरवासियांच्या आशा पल्लवीत होवून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिल्लतनगरची निर्मिती होवून तब्बल तीस वर्ष उलटली आहे, तशी याठिकाणची समस्याही तीस वर्षांची झाली आहे,मात्र अद्याप कोणत्याही मुख्याधिकाऱ्यांनी मिल्लतनगरवासियांच्या समस्यांची स्वतः पाहणी केली नव्हती वा कधी फिरकले देखील नव्हते,मात्र श्रीरामपूर नगर पालिकेचे सी ओ सोमनाथ जाधव हे खरोखरच एक कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आहेत ज्यांनी प्रत्येक्ष पाहणीसाठी स्वतः वेळ काढून सदरील समस्यांची पाहणी केली आणी सदरील समस्यांबाबी तात्काळ आदेश देवून समस्या दुर करण्याकामी पुढाकार घेतला याबाबत मिल्लतनगरवासियांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
परंतु यावेळी देखील आश्वासने देवून बोळवण केली गेल्यास मिल्लतनगरवासी नक्कीच येत्या ३ सप्टेंबर च्या नगर पालिकेवरील मोर्च्यावर ठाम असल्याने मिल्लतनगरवासियांच्या नेहमीच्या या समस्यांचे निराकरण करणे भाग पडणार असल्याने सदरील समस्यांचे खरच निराकरण होते का हे पाहणे देखील मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

शिरसगाव - मुख्यमंत्री वयोश्री योजना शिबीर गौरवास्पद - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठशिरसगांव येथे मुख्यमंत्री वयोश्री योजना शिबिरात ३१२ वृद्धांची नोंदणी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील शिरसगांव येथे रविवारी मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अभियान प्रसंगी अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रतिपादन केले की, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे हा आजचा उद्देश आहे.या वयोश्री योजनेत काही वयोवृद्ध आजारी असतात अपंग असतात,काहीना गुडघ्याचा त्रास असतो. डोळ्याचा त्रास असतो.अशा अनेक व्याधी असतात त्यासाठी त्यांना चष्मा, वॉकर,कंबर बेल्ट,कम्मोड खुर्ची,श्रवणयंत्र,व्हील चेअर आदी आवश्यक साहित्य घेण्यासाठी पैशाची कमतरता असते म्हणून शासनाची मदत म्हणून रु ३०००/-चे आर्थिक सहाय्य दिले जाते.त्यातून आवश्यक साहित्य घेता येईल.फोर्म भरताना नागरिकांनी ज्या बँकेला आधार लिंक केले आहे त्यांनी ते नमूद करावे.जे साहित्य घेतले त्याची पावती तलाठी यांचेकडे जमा करावी लागेल.तसेच दुसरी योजना आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आहे त्यात वय ६० वर्षावरील महिला,पुरुष नागरिकांनी लाभ घायचा आहे.ज्यांना तीर्थ दर्शनासाठी जाणे शक्य नाही त्यांचेसाठी राज्य शासनाने ही योजना आणली आहे.त्याचा सुद्धा लाभ घेता येईल व तीर्थ दर्शन होईल.त्यासाठी रु ३००००/- ची तरतूद करण्यात आली आहे.आज शिबिरात ज्यांनी फॉर्म भरले आहेत. व ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांनी लवकर कामगार तलाठी, ग्रामपंचायत मध्ये जमा करावेत.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत ८ लाखापेक्षा जास्त फॉर्म भरण्यात आले आहेत.त्यांना पैसे खात्यावर जमा झाले आहेत.या योजनेसाठी ३१ ऑगस्ट मुदत आहे. नागरीकांनी सरकारी यंत्रणेकडूनच लाभ घ्यावा. शासनाच्या सर्व योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले.
यावेळी कामगार तलाठी शिरसगाव बाबासाहेब कदम यांनी ह्या योजनांची सविस्तर माहिती मार्गदर्शन केले.संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गणेशराव मुद्गुले यानीही सांगितले की ग्रामपंचायत मार्फत शासनाच्या सर्व योजनाची माहिती वेळोवेळी देत असून त्याचा लाभ वेळेवर त्यांना मिळत आहे.आजच्या कॅम्पमध्ये ३१२ मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे व मुख्यमंत्री तीर्थ योजनचे १० फॉर्म सर्व कागदपत्रासह जमा झाले आहेत.त्यासाठी सेतूचालक संदीप जाधव,सह अनेक टेबलवर वैद्यकीय पथकासह जलद फोरम भरले गेले.
यावेळी शिरसगाव येथे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवरे, प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,नायब तहसीलदार गोसावी,सहा.गट विकास अधिकारी रमजान शेख, विस्तार अधिकारी चराटे, ठाकरे, कामगार तलाठी बाबासाहेब कदम,राजेंद्र घोरपडे, ग्रामविकास अधिकारी पी.पी. दर्शने, सरपंच राणीताई वाघमारे, उपसरपंच संजय यादव, ग्रा.प.सदस्य सुरेश मुद्गुले, शुभम ताके,महेश ताके,,सर्व ग्रा.प.सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रसन्ना धुमाळ यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
 ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - ✍️✅🇮🇳...शिरसगांव
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================




आप्पाचा लय थाट आहे


 सध्या आप्पाचा लय थाट आहे, आप्पाकडे क्रेडिट कार्ड आहे या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे गाणे लोकांना आवडलेला आहे या गाण्याबद्दल मला काही म्हणायचं नाही गाणे चांगले आहे , संगीत पण सुंदर आहे परंतु गाण्यातले जे बोल आहे ते आपल्याला काहीतरी सांगून जातात . आपल्या दैनंदिन जीवनात आपण सुद्धा कृत्रिम व दिखाऊ तर जगत नाही ना ही आपल्याला दाखवून जाते .आज जर आपण पाहिलं तर आपली नवीन पिढी , विशेषता तरुण वर्ग व त्याबरोबर वयस्क सुद्धा बॅनरबाजी व दिखाऊपणा याकडे कल वाढलेला आहे. आपण पाहतो की नवीन पिढीचे वाढदिवसाचे बॅनर लावले जातात या वाढदिवसाच्या बॅनर मध्ये भावी सरपंच , भावी नगरसेवक, भावी आमदार, भावी खासदार, भावी नेते अशा उपाधी दिल्या जातात व खाली सगळ्यांना आप्पा, दादा, अण्णा, तात्या, भाऊ , नेते, आधारस्तंभ, आशावादी नेतृत्व अशा उपाधी दिल्या जातात . या बॅनर बाजीवर आपण किती मोठे आहोत व आपल्यावर किती लोकं प्रेम करतात हे नवीन पिढी दाखवण्याचा प्रयत्न करते . आपल्या पाठीमागे केवढा मोठा जनसमुदाय आहेत हे सर्वजण दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि वास्तविक जीवनापासून लांब जात आहे, सत्य व वास्तविक जीवन नाकारून नवीन कल्पना विश्वात जगण्यात अरमान झालेली आहे मित्राचे बॅनर लागले म्हणून माझे बॅनर लागायला पाहिजे माझे वाढदिवसानिमित्त कॉलनीतल्या गावाच्या लोकांना माझा बर्थडे कळायला पाहिजे ही प्रत्येकाची इच्छा असते व त्यासाठी ते खर्च सुद्धा करत असतात भावी सरपंच भावी नेते या उपाधी लागल्यानंतर ती मुलं सत्यापासून लांब जातात व कल्पना विश्वात आपण असेच काहीतरी आहोत , फार मोठे आहोत , फार प्रसिद्ध आहोत, जीवनात सेटल झालेलो आहोत आता मला काही कमी नाही असे समजतात, याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होतो, शिक्षणावर होतो व त्यापासून ते लांब जातात. कष्ट करण्याची मानसिकता या गोष्टीमुळे तरुणांची राहत नाही, जीवनात अभ्यास कष्ट व व्यवसायावर लक्ष देण्याऐवजी हे तरुण फक्त आपण किती प्रसिद्ध आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात व त्यात आनंद मानतात. बॅनर वर आपला फोटो आला म्हणजे आपण काहीतरी फार मोठे आहोत असे ते मानायला लागतात या सगळ्या उपाधी व बॅनरवर लागलेले फोटो आपल्याला काही फायदा देतात का ,? आपल्याला आर्थिक फायदा होतो का? आपले जीवन याने सेटल होईल का? आपल्या भविष्यकाळात याचा फायदा होईल का ? याचा विचार निश्चितच तरुणांनी करायला हवा. आपल्या आई वडिलांच्या आपल्याकडंन ज्या अपेक्षा आहेत , आपल्यासाठी ते दिवस-रात्र कष्ट करत आहेत व आपण फार मोठे होऊ असे आपल्या आई वडिलांना वाटते परंतु आपण आपल्या आई वडिलांच्या आशा आकांक्षा आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत आहोत का ? त्यासाठी प्रयत्न करत आहोत का ? आपले ध्यैय व आपले भविष्य स्थिर करण्यासाठी आपण कोणता प्रयत्न करत आहोत व किती कष्ट घेत आहोत याचा विचार तरुणांनी करायला पाहिजे. आपल्या कडे आर्थिक स्थिरता यावी यासाठी प्रयत्न करायला हवा . आपल्याकडं ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पूर्ण करू का याचा विचार तरुणांनी करायला हवा फक्त कल्पना विश्वात न जगता तरुणांनी वास्तव जीवनात जगले पाहिजे आज जर आपण पाहिलं तर आपला आयुष्य तरुण पिढी सोशल मीडियावरती जास्त व्यस्त असते व आपले भविष्य आपला आनंद तिथेच शोधत असते व शोधत आहे. माझे स्टेटस किती लोकांनी पाहिले , मला किती लाईक आले , किती कॉमेंट्स आले यावर मी किती लोकप्रिय झालो, किती मोठा झालो हे ते लोकांना सांगत असतात परंतु त्याबरोबर या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनात काही उपयोग आहे का ? याचा विचार करायला हवा . सोशल मीडिया वरती आपल्याला किती मित्र आहेत यापेक्षा आपल्यावरती संकट आल्यावर , दुःख आल्यावर किंवा आपला अपघात झाल्यावर किंवा आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यावर आपल्याला आपल्यासाठी मदतीला किती मित्र धावून येतील याचा वास्तविक विचार करायला हवा . सोशल मीडिया , समाज माध्यमात हे आज जरी जीवनाचा एक भाग असले तरी मर्यादेच्या पलीकडे त्यांचा उपयोग व्हायला नको मर्यादा सांभाळून त्यांचा उपयोग करायला पाहिजे व त्यावरच आपले सर्व विश्व पाहायला नको सत्य जीवनात , वास्तव जीवनात काय परिस्थिती आहे याची जाणीव सगळ्यांनी करून घ्यायला पाहिजे . ही जाणीव वास्तविकता खरी परिस्थिती जीवनाला जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी जर सगळ्यांनी समजून घेतल्या तर आपल्याला वास्तव जीवनात जगण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे ते लक्षात येईल . आपल्याला मिळालेले लाईक , व्ह्यूज , कॉमेंट्स आपले पालन पोषण व भरण करू शकत नाही आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही त्यामुळे या गोष्टींवर ती लक्ष देण्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबाचा व आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू कसा करू शकू याचा विचार जरूर तरुणांनी करावा. समाज माध्यम व सोशल मीडिया यांचा उपयोग मर्यादेच्या पलीकडे करू नये . स्टेटस ने आज लोक आपल्या भावना व्यक्त करत असतात की माझे स्टेटस म्हणजे माझ्या भावना व्यक्त करण्याचे साधन आहे असे त्यांना वाटत असते पण त्याबरोबर सत्य जीवनामध्ये आपल्याबरोबर जे लोक राहतात ते आपले स्टेटस काय समजतात व आपल्याला काय ओळखतात ते समजणे गरजेचे आहे कारण की फक्त आणि फक्त समाज माध्यमात आपल्या भावना व्यक्त करण्याची साधन नाही आपण एकमेकांशी संपर्क केला पाहिजे आपले नातेवाईक, मित्रपरिवार , कुटुंब यांच्याशी आपण बातचीत केली पाहिजे, यांना भेटलो पाहिजे, यांच्यासोबत वेळ व्यक्त करायला पाहिजे तेव्हा आपल्याला त्यांच्या भावना समजतात व त्यांना आपल्या भावना कळतात. आज आपण पाहतो की पालक घरी आल्यानंतर मोबाईल वरती जास्तीत जास्त वेळ राहतात मोबाईल वरती इतका वेळ राहतात की त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो तेव्हा आपल्या मुलांसोबत पालकांनी सुद्धा वेळ व्यतीत करायला पाहिजे. त्यांच्यासोबत बोलायला पाहिजे , त्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे , त्यांचे मित्र बनून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे जर सगळ्या पालकांनी केले व आपल्या मुलांना जर समजून घेतलं तर निश्चितच आपल्या मुलं वाम मार्गाला किंवा वाईट मार्गाला जाणार नाहीत हे खरं आहे .जेवढा वेळ आपण ऑनलाईन असतो त्याबरोबर जर आपण ऑफलाइन इतरांबरोबर जर वेळ व्यतीत केला तर निश्चितच परिवारामध्ये सामंजस्य व प्रेमाच्या भावना निर्माण होतील . पती-पत्नीमध्ये जर पाहिलं तर फक्त फेसबुक, इंस्टाग्राम , व्हाट्सअप यावरती शुभेच्छा देऊन थांबतात त्यावरती न थांबता आपल्या मनात काय चाललेला आहे आपल्या परिवाराच्या आपल्या पत्नीचे , आपल्या पतीच्या मनात काय चालू आहे , त्यांना काही त्रास नाही ना ? ते परेशान नाही ना ? त्यांना कुठल्याही प्रकारचे आर्थिक परेशानी नाही ना ? शारीरिक वेदना नाही ना ? कुठल्या प्रकारचे मानसिक टेन्शन नाही ना? हे आपण समजून घेतले पाहिजे पती-पत्नींनी एकमेकांसोबत जास्तीत जास्त बोलून वेळ घालवायला पाहिजे असे केल्यास निश्चितच फारकत / तलाख घेण्याचे प्रमाण कमी होईल व लोकांमध्ये , पती-पत्नीमध्ये व कुटुंबामध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल. आपण आपल्या कुटुंबाचे स्टेटस फोटो फेसबुक इंस्टावर तर टाकाच ती आजची गरज आहे परंतु त्याबरोबर आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जा, आपल्या मुलांसोबत, पत्नीसोबत , आपल्या पतीसोबत, आपल्या आई वडिलांसोबत, मित्रपरिवार व नातेवाईकांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जा . फिरायला गेल्यानंतर त्यांचे काय चालले हे समजून घ्या त्यांच्याबरोबर गप्पा करा, गप्पा केल्यानंतर तुम्हाला कळेल की त्यांच्या मनात काय चाललेले आहे त्यांच्या भावना तुम्हाला समजतील त्याबरोबर आपली जे म्हातारे आई-वडील आहेत किंवा आपल्या घराचे जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा निदान तुम्हाला ज्या वेळेस सुट्टी असेल किंवा ज्या वेळेस तुम्हाला वेळ असेल त्यांच्यासोबत बोला त्यांच्या त्यांच्या अनुभव त्यांच्या जीवनातील व्यथा आणि वेदना त्यांनी केलेले कष्ट त्यांच्या जीवनातील कथा ऐका त्यातून तुम्हाला निश्चितच जीवन चांगल्या जगण्याचा मार्ग मिळेल व त्या समोरच्या वयस्क व्यक्तींना सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत राहिलात त्यांच्यासोबत वेळ घालवला म्हणून आनंद होईल . आजचे जग ऑनलाईन चे असले समाज माध्यम हे आपला अविभाज्य भाग असले समाज माध्यम जरी वाईट नसले किंवा सोशल मीडियाचे असंख्य उपयोग असले तरी सोशल मीडियाचा मर्यादित वापर केला तर निश्चितच आनंदी जीवन जगता येईल सोशल मीडियामुळे आपण सगळेजण एकमेकाला सहजासहजी जरी भेटत असलो तरी प्रत्यक्ष भेटून सुद्धा आनंद व्यक्त करता येईल. एकंदरीत सर्वच विश्व ऑनलाईन न पाहता आपण ऑफलाईन आपल्या जीवनात जगले पाहिजे व ऑफलाईन जर जीवनात जगलो तर सगळ्यांना आनंद व आनंददायी जीवन जगता येईल त्याबरोबर आजकालचे जीवन जर आपण पाहिलं तर त्या गाण्यात सुद्धा म्हटलेलं आहे की आप्पाकडे क्रेडिट कार्ड आहे म्हणजे आजकाल लोक दिखाऊ गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष देतात . माझ्याकडे गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, क्रेडिट कार्ड पाहिजे, मी श्रीमंत दिसलो पाहिजे, माझ्याकडे चांगले कपडे पाहिजे, लोकांनी मला चांगले म्हटले पाहिजे याच गोष्टीकडे लक्ष देतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा. गाडी घोडी त्याबरोबर आपले कपडे यात दिखाऊ गोष्टी काही क्षणार्धासाठी असतात परंतु लोक आपल्याकडे काही क्षणासाठी तात्पुरत्या वेळेसाठी आकर्षित होतात लोक किंवा समाज आपल्या विचाराने आपल्या ज्ञानाने व आपल्याकडे असलेल्या ज्ञान भंडाराने म्हणजेच आपल्याकडे असलेल्या ज्ञानामुळे आपल्याकडे कायमस्वरूपी आकर्षित होतात व आपल्याला समाजात मान मिळतो. त्याच्यामुळे आपले ज्ञान भंडार कसे जास्तीत जास्त वाढवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे यासाठी वाचन केले पाहिजे यासाठी ज्ञान मिळविले पाहिजे जेवढे तुमच्याकडे ज्ञान अधिक असेल तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त मान अधिक मिळेल ही गोष्ट तरुणांनी विसरता कामा नये. त्यामुळे आपण ऑनलाईन बरोबर ऑफलाईन सुद्धा रहा . आपल्या कुटुंबाला मित्राला आपल्या आई-वडिलांना सर्वांना वेळ द्या व आपल्या मुलांना सुद्धा वेळ द्या आपण असे केल्यास निश्चितच आपण चांगले आयुष्य जगू शकू हे मात्र नक्की.


=================================
-----------------------------------------------
व्याख्याते,लेखक, समुपदेशक 
डॉक्टर संतोष पाटील गोराडखेडेकर - ✍️✅🇮🇳...
पाचोरा - ९३०७६३२६३६
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================



मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभाच्या उद्दिष्टपुर्तीसाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकजुटीने व गतीने काम करा - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ


येत्या शनिवार व रविवारी
 विशेष कँपचे आयोजन करा

तालुकास्तरीय कार्यालयात
योजना कक्ष सुरु करा

- अहमदनगर - जिमाका - / वृत्तसेवा -
मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोनही योजनांचा जिल्ह्यातील ज्येष्ठांना लाभ देण्यासाठी ६ लक्ष लाभार्थ्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्तीसाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकजुटीने व गतीने काम करावे. तसेच योजनेचे फॉर्म भरुन घेण्यासाठी येत्या शनिवारी व रविवारी जिल्ह्यात विशेष कँपचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

            मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या आढाव्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री सालीमठ म्हणाले की, क्षेत्रफळाने व लोकसंख्येच्यादृष्टीने आपला जिल्हा मोठा आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यासाठी मोठा वाव आहे. या दोनही योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी ६ लक्ष लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असुन या योजनेचा शहरी व ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका कार्यालयामध्ये योजना कक्ष सुरु करण्यात यावा. या कक्षातुन लाभार्थ्यांना योजनेची माहिती देण्याबरोबरच त्यांचे लाभासाठीचे फॉर्म भरुन घेण्यात यावेत.

            मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची माहिती जिल्ह्यातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी या दोनही योजनांची शहरी व ग्रामीण पातळीवर व्यापक स्वरुपात जागृती करा. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये योजनेची माहिती असलेले बॅनर, पोस्टर लावण्यात यावेत. गत शनिवार व रविवारी झालेल्या विशेष कँपमध्ये सर्वच अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये आजपर्यंत १ लक्ष ३२ हजार ३४२ लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले असुन मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये २ हजार ८०६ अर्ज भरुन घेण्यात आले आहेत. परंतू यापेक्षाही अधिक चांगले व अधिक गतीने काम करण्याची गरज असुन अधिकाधिक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी आशावर्कर, अंगणवाडीसेविका, कृषी सहायक या तालुका व ग्रामीण पातळीवर काम करणाऱ्या घटकांची मदत घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केल्या.

            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर म्हणाले की, जिल्ह्यात दोन दिवसीय शिबीरामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे चांगले काम झाले आहे. परंतू एवढ्यावर समाधानी न राहता आपला जिल्हा या योजनांच्या अंमबजावणीमध्ये राज्यात अग्रेसर राहील यादृष्टीने काम करा. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित व समन्वयाने काम करत या योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात यावा, असेही ते यावेळी म्हणाले.बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार रमेश जेठे (सर) ✍️✅🇮🇳...अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================