राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, November 30, 2024

पत्रकारांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवणार – आमदार डॉ. किरण लहामटे


पत्रकारांच्या मागण्यांना नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांचा पाठिंबा !

- अकोले - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांना अकोले येथे सादर करण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार डॉ. लहामटे यांनी दैनिक समर्थ गांवकरी कार्यालयाला भेट दिली. या भेटीच्या वेळी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पेढे देऊन स्वागत केले आणि पत्रकारांच्या समस्यांबाबतचे निवेदन त्यांना सादर केले.

*पत्रकारांच्या मागण्या आणि महामंडळ स्थापना:*
पत्रकार संघाने सादर केलेल्या निवेदनात पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापणा लवकरात लवकर करण्याची मागणी केली ती पूर्ण झाली वृत्तपत्र विक्रेत्यांचे महामंडळ झाले तरी अजून २२ मागण्या प्रलंबित असून त्या तातडीने सभागृहात आवाज उठवावा या महामंडळाद्वारे पत्रकारांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह आहे. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना, आर्थिक सहकार्य, विमा संरक्षण, तसेच त्यांच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा समावेश आहे.

यावेळी पत्रकार संवाद यात्रेचे माहिती पुस्तकही डॉ. लहामटे यांना सुपूर्त करण्यात आले. पत्रकार संघाच्या या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. लहामटे म्हणाले, “पत्रकार समाजाचा महत्त्वाचा घटक आहेत. ते समाजाला योग्य माहिती देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत.” यावेळी डॉक्टर लहाने यांनी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्याशी मोबाईल द्वारे संपर्क करून राज्यातील सर्व प्रश्न पत्रकारांचे सभागृहात मांडणार असा विश्वास दिला

*ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी विशेष योजना:*
या संदर्भात बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पत्रकारांच्या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवण्याचा आश्वासक शब्द दिला.
राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन आणि विधानसभेत पत्रकारांचे हक्क, सुरक्षा आणि कल्याणाच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्याचा निर्धार केला आहे, असे लहामटे म्हणाले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर यशस्वीपणे राबवलेल्या अभियानाचे त्यांनी कौतुक केले. डॉ. लहामटे यांनी पत्रकारांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शविताना, विशेषत: ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी नवीन योजना तयार करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी “लाडका पत्रकार” नावाची योजना राबविण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्याची ग्वाही दिली. याशिवाय, प्रत्येक ग्रामपंचायत आणि शाळेत वर्तमानपत्र खरेदीसाठी दरमहा दहा हजार रुपयांची तरतूद करण्याची मागणीही त्यांनी मान्य केली.

*पत्रकार सुरक्षेसाठी प्रयत्न:*
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांच्या सुरक्षेबाबतच्या अडचणी मांडल्या. त्यांनी पत्रकारांसाठी आर्थिक सहाय्य, जीवन आणि आरोग्य विमा, तसेच पेन्शन योजना लागू करण्याची आवश्यकता स्पष्ट केली. डॉ. लहामटे यांनी या विषयांवर लक्ष केंद्रित करत विधानसभेत पत्रकारांच्या समस्यांसाठी आवाज उठवण्याचे आश्वासन दिले.

*प्रतिनिधींचे समाधान:*
या भेटीवेळी अकोले ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार मैड, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सचिव हरिभाऊ फापाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे, तसेच रेडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत बंदावणे एलआयसीचे सल्लागार जीवन पाडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी आमदार डॉ. लहामटे यांच्या पाठिंब्याबद्दल समाधान व्यक्त केले.

*पत्रकारांच्या हितासाठी पुढील वाटचाल:*
या चर्चेत पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षा आणि त्यांच्या समस्यांवर सखोल चर्चा झाली. पत्रकार संघाच्या मागण्यांना राजकीय स्तरावर पाठिंबा मिळाल्याने भविष्यात पत्रकारांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

अकोले येथे झालेल्या या महत्वपूर्ण चर्चेमुळे पत्रकारांच्या समस्या ऐरणीवर आल्या असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी राजकीय स्तरावर हालचाली होणार आहेत. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पाठिंब्यामुळे पत्रकारांच्या मागण्यांना शासनाकडून लवकरात लवकर प्रतिसाद मिळेल, अशी आशा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने व्यक्त केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

सदैव विद्यार्थीहित पाहणारा प्राध्यापक डॉ. विलास महाले


३० नोव्हेंबर - सेवानिवृत्तीच्या निमित्ताने

मैत्रीच्या दुनियतेला एक राजा माणूस, कायम विद्यार्थीहित पाहणारा प्राध्यापक आणि सहृदयी मित्र आणि अशी ओळख असलेले माझे परममित्र प्रा. डॉ. विलास महाले सर आज दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या नियत वयोमानानुसार रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे उरण (रायगड) येथून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा !

शहरात जन्मलेली माणसं शहराइतकीच मनाने मोठी आणि अंतःकरणाने दिलदार असतात याचा प्रत्यय मला महाले सरांच्या रूपाने आला. उरणच्या फुंडे महाविद्यालयात त्यांनी उपप्राचार्य व ग्रामीण विकास या विषयाचे विभागप्रमुख म्हणून आपली जबाबदारी अतिशय यशस्वीपणे व प्रामाणिकपणे पार पाडली आहे. महाले सरांच्याबरोबर दहा वर्ष एक सहकारी म्हणून काम करण्याचा योग आला. एक प्राध्यापक म्हणून, एक सहकारी म्हणून, एक मित्र म्हणून त्यांचा स्वभाव नेहमीच दिलदार राहिला आहे.
सहा फूट दोन इंच उंची लाभलेले हे व्यक्तिमत्व कायम हसतमुख असे. आनंदीवृत्ती आणि सदैव सहकार्याची भूमिका हे त्यांचे लोभस गुण आम्हा सर्व सहकाऱ्यांना आजही तितकेच भावतात. कॉलेजमध्ये सर्वात अगोदर येणारा प्राध्यापक म्हणजे महाले सर. कॉलेजच्या स्थापनेपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना एकाच कॉलेजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. अशी संधी अनेकांना लाभत नाही. पण महाले सरांना ती लाभली आणि त्यांनी या संधीचे सोनं केलं.आपल्या संपूर्ण ३५ वर्षांच्या सेवेत त्यांनी अध्यापनाचे व संशोधनाचे काम एक कर्तव्यदक्ष प्राध्यापक म्हणून आनंदाने केलेच. पण त्याहीपेक्षा संपूर्ण महालण विभागात त्यांची जिमखानाप्रमुख म्हणून असलेली ओळख फार मोठी आणि सन्मानाची आहे. कॉलेजच्या स्थापनेपासून ते सेवानिवृत्तीपर्यंत त्यांनी जिमखानाप्रमुख ही जबाबदारी अतिशय अभिमानाने सांभाळली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी, खोखो, मॅरेथॉन, ॲथेलेटिक्स, कराटे, फूटबॉल अशा विविध क्रीडा प्रकारात १२५ हून अधिक सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावर प्राप्त केली आहेत. राष्ट्रीय व राज्यस्तरावर क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवलेली अनेक मुले आज रेल्वे पोलिस व लष्करी सेवेत नोकरीला आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात नेहमीच वीर वाजेकर महाविद्यालयाचा दबदबा व नावलौकिक त्यांनी खेळाच्या माध्यमातून वाढवलेला आहे.
महाले सर विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन ठेवून त्यांनी काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे व कल्याणाचे निर्णय त्यांनी कायम घेतले आहेत. कधी कधी गरज भासल्यास पदरमोड करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरही सरांनी अनेक वर्ष काम केले आहे. तसेच अनेक पुस्तकांचे लेखन व संपादनही केले आहे. आज रायगड विभागातला अख्खा महालण विभाग त्यांना ओळखतो आहे. त्यांनी शिकवलेल्या पहिल्या बॅचच्या मुलांमुलींची मुले आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रॅज्युवेट करतात. याचा त्यांना भारी आनंद वाटतो.
शेवरीसारखा उंच असलेला हा माणूस शेवरीसारखाच सरळ आहे. मनाने निर्मळ आणि प्रेमळ आहे. मैत्रीचा बंध जोपासणारी आणि ती अतुट ठेवणारी त्यांची वृत्ती कायम मनाला भावते. कायम आनंदीस्वभाव असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ना कधी ताण दिसतो ना कधी तणाव दिसतो. आमच्यासारख्या नव्या पिढीतल्या तरूणांना ते नेहमी धीर आणि आधार द्यायचे. कितीही आर्थिक मदत लागली तर त्यांचा हात नेहमी पुढे असायचा. कायम शहरी पोशाखात आणि रूबाबात राहणारा हा प्राध्यापक मित्र सर्वांच्या सुखदुःखात, कार्यक्रमात व समारंभात त्याच जाणिवेने सहभागी होत असे. जाणिवेची खोल जाणीव असलेला हा प्राध्यापक मित्र अजातशत्रू आहे.

महाले सर आपल्या कामाशी नेहमी प्रामाणिक असत. जे योग्य, नैतिक आहे त्यांच्या सोबत ते असत. अतिरेकी, अन्यायीवृत्ती त्यांना आवडत नसे. पण एखाद्याचा उपमर्द करून ते कधीच कोणाला बोलत नसत. म्हणूनच ते एक प्राध्यापक म्हणून, माणूस म्हणून दिलदार आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक विनोदाची किनारही आहे. एकमेकांच्यावर कोट्या करण्यात ते माहेर आहेत. पण ते तेवढ्यापुरतेच. मधल्या ब्रेकमध्ये चहाच्या वेळेस ते हमखास कोणावर तरी कोटी करायचे आणि मग आम्ही सगळेजण त्या हास्यरसात बुडून जायचो. मागील दहा वर्षातले असे अनेक प्रसंग आज डोळ्यासमोर उभे राहतात आणि मनाला स्तब्ध करून जातात.

महाले सर एक मित्र म्हणून माझ्या आयुष्यात फार महत्त्वाचे राहिले आहेत. कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेमुळे मला रायगड विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच महाले सरांसारखे अनेक चांगले मित्र जोडता आले. महाले सरांच्या बरोबरच्या अनेक आठवणी आहेत. त्यातील काही ठळक सांगता येतील. माझ्या लग्नाच्या वेळेस सूट घेताना, टु व्हीलर गाडी घेताना ते प्रत्यक्ष माझ्या सोबत होते. त्यांच्या ओळखीमुळे गाडी घेताना माझी खूप आर्थिक बचत झाली आहे. कॉलेजची सहल घेऊन ते कुठेही गेले तर माझ्या मुलीला ते हमखास खाऊ घेऊन येत असे.२०२१ साली मी वाशी कॉलेजला आल्यानंतर त्यांची रोज होणारी भेट थांबली पण मैत्रीत आमच्या खंड पडला नाही. कधी फोनवरून तर कधी प्रत्यक्ष भेटून आजही त्यांच्या बरोबर मैत्रीचा बंध अतुट आहे. तो असाच पुढे दीर्घकाळ राहावा ही आशा. 

असा हा दिलदार मनाचा एक प्राध्यापक मित्र आज आपल्या सेवेतून निवृत्त होत आहे. महाले सरांच्या पुढील आनंददायी वाटचालीसाठी मी अंतःकरणापासून त्यांना शुभेच्छा देतो. आपणांस चांगले आरोग्य लाभो, आपल्या अपूर्ण राहिलेल्या अनेक इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.

=================================
-----------------------------------------------
*डॉ.आबासाहेब सरवदे*✍️✅🇮🇳...
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज
वाशी,नवी मुंबई
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

महिलांसह हिंदू धर्मावर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे उपकार मिलिंदकुमार साळवे यांचे प्रतिपादन


श्रीरामपूर संघ कार्यालयात डॉ. आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्रांचे अनावरण

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून
 हिंदू समाजावर व महिलांवर प्रचंड असे उपकार केले आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य, भाजपचे शहर उपाध्यक्ष मिलिंद कुमार साळवे यांनी केले. 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीरामपूर येथील दामू अण्णा दाते भवनात लोकहित मंडळाच्या वतीने ७५ वा अमृत महोत्सवी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीरामपूर येथील दामू अण्णा दाते भवनात लोकहित मंडळाच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, महामानव, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर, साहित्यरत्न, साहित्यसम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे व प्रा. शिवाजीराव पंडित यांच्या हस्ते या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले. लोकहित मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर नगर जिल्हा संघचालक किशोर निर्मळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंडळाचे कार्यवाह केशव आवटी यांनी प्रास्ताविक केले. मंडळाचे उपक्रम प्रमुख गणेश नवले यांनी स्वागत केले. प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे याप्रसंगी सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्या शहीद जवान व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मिलिंदकुमार साळवे म्हणाले, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या प्रमुख चार स्तंभांवर, चतुःसूत्रीवर आधारित जगातील सर्वात मोठी, लिखित, आदर्श राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेली आहे. आतापर्यंत राज्यघटनेविषयी समाजात न होणारी चर्चा आता गेल्या काही वर्षांपासून होत आहे, ही चांगली बाब आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांनी हिंदू समाजावर प्रचंड असे उपकार केले आहेत. सर्वच जाती, धर्मांचा राज्य घटनेद्वारे सन्मान ठेवण्यात आला आहे. पण डॉ. बाबासाहेबांनी केलेले विशाल कार्य आजही समाजाच्या तळागाळापर्यंत न पोहचल्यामुळे उपेक्षित आहे, अशी खंतही साळवे यांनी व्यक्त
 केली.

=================================
-----------------------------------------------
श्रीरामपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दामू अण्णा दाते भवनात लोकहित मंडळाच्या वतीने अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्रांचे अनावरण ज्येष्ठ पत्रकार मिलिंदकुमार साळवे व प्रा. शिवाजीराव पंडित यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उत्तर नगर जिल्हा संघचालक किशोर निर्मळ, केशव आवटी, भूषण साठये, गणेश नवले आदी मान्यवर.
-----------------------------------------------
=================================
भारतात विविध जाती, धर्म, पंथ, भाषा असतानाही फक्त भारतीय राज्यघटनेमुळेच देशात एकता, अखंडता आहे, असे प्रा. शिवाजीराव पंडित यांनी सांगितले. किशोर निर्मळ म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सर्व जाती, धर्माचे स्वयंसेवक विविध गतीविधींमध्ये सहभागी होत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निस्सीम राष्ट्रवादी होते. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्तीसोबतच त्यांनी प्रत्येक व्यक्तीच्या आत्मसन्मानास महत्त्व दिले.
प्रमुख वक्ते समरसता मंचाचे उत्तर नगर जिल्हा गतीविधी संयोजक वसंतराव कदम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, समरसता मंच यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. तसेच डॉ. आंबेडकर व लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उत्तुंग कार्याचा जीवनपट समोर मांडला.
समाजाच्या विविध घटकांमध्ये, विविध पातळीवर आजही मोठ्या प्रमाणात विषमता दिसत आहे. ही विषमता दूर करून समाजात समरसता निर्माण करण्याची ताकद फक्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या भारतीय राज्य घटनेमध्येच आहे. या राज्य घटनेमुळेच खरी समरसता निर्माण होऊ शकेल, असा विश्वासही समरसता कदम यांनी व्यक्त केला.
 विजय ढोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संघाचे श्रीरामपूर तालुका कार्यवाह प्रमोद शेजूळ, देवीदास चव्हाण, महेश देशपांडे, श्रीरामपूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, रिपाइंचे सुभाष त्रिभुवन, समरसता मंचाचे रामचंद्र भवर, भूषण साठये आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================


अनधिकृत पार्किंगने घेतला श्रीरामपूर शहरातील रस्त्यांचा ताबासर्वच रस्त्यांवर होते वाहतुकीची कोंडी; पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

- श्रीरामपूर शहरात वाहनांची पार्कीग रस्त्यावर आल्याने नेहमीच अशी वाहतूक कोंडी निर्माण होते. - (छाया अमोल कदम) -

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शहरातील रस्त्याचा ताबा अनधिकृत पार्कीगने घेतला आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या अबालवृध्द, विद्यार्थी आदींसह प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. मेनरोड, छत्रपती शिवाजी रोड, संगमनेर रोड, बेलापूर. रोड आदी रस्त्यांवर रोजच मोठी वर्दळ असते. परंतु पार्कंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच पार्किंग केली जात असल्याने शहरात वाहतूक कोंडींची समस्या नित्याची झाली आहे. याकडे पोलीस व नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील ठिकठिकाणी व्यापारी संकुलाबरोबरच इमारतीमधील पार्किंगची व्यवस्था आजही कागदावरच आहे. वर्षानुवर्षांपासून वाहनांची मोठी

गर्दी होत असताना, पार्किंगचाही प्रश्न अधिकाधिक बिकट होत आहे. शहरात खरेदीसाठी कुटुंबासह आलेल्यांना वाहन लावायचे कोठे? असा प्रश्न दररोज पडत आहे. हा महत्वाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. पार्किंगची सुविधा मिळत नसल्याची स्थिती वर्षानुवर्षे प्रत्येकाला अनुभवायला मिळत आहे.

ठिक ठिकाणची व्यापारी संकुले आणि इमारतींमधील पार्किंगच्या जागा गायब झाल्याने नागरिक रस्त्यालगत वाहने लावतात. त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शहराचा = विस्तार वाढत असतानाच - वाहनांची संख्याही वाढत आहे.  शहरातील बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, - संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज

आणि इन्शुरन्स कंपनीचे कार्यालय असल्याने अनेक ग्राहक कामानिमित्त येतात. येथे पार्किंगची व्यवस्था तोकडी व - कूचकामी आहे. या रस्त्यावरून शासनाचा प्रत्येक अधिकारी- कर्मचारी, पोलीस व अधिकारी, बहुसंख्य नगरसेवक, आजी- माजी लोकप्रतिनिधी दररोज प्रवास करीत असून, त्यांना ही हा त्रास होत असताना त्यावर मात्र अद्याप कोणताच तोडगा निघाला नाही.

प्रत्येक व्यापारी संकुलात पार्किंगचा मोठा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. छत्रपती शिवाजी मेनरोड, महाराज रोड, नगरपालिका चौक, बस स्थानक परिसर, संगमनेर रस्ता, मौलाना आझाद चौक, नेहरू फळ आणि भाजी मंडई, सिंधी मंदिरासमोरचा भाग, दशमेशनगर चौक तसेच इतर अनेक शासकीय कार्यालये, कर्मवीर चौकातील

मिनी स्टेडियम समोरचा भाग प्रशासकीय इमारतीसमोरचा भाग अशा अनेक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी वर्दळ असते, परंतु याठिकाणी पार्किंगची कसलीही व्यवस्था नाही.

अनेक इमारतींची पार्कीग स्थळे तळघरात आहेत. तर काही ग्राउंड फ्लोरवर आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून परवाना मिळेपर्यंत ही जागा पार्किंगसाठी दाखविली जाते. यानंतर मात्र त्याठिकाणी दुसरेच उद्योग, व्यवसाय सुरू केले जातात. परिणामी त्या ठिकाणची वाहने इमारती संकुलास समोरील सार्वजनिक रस्त्यावर लावावी लागत आहेत. याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना तसेच नागरिकांना दुचाकी-चारचाकी वाहने कुठे लावावी, असा प्रश्न सातत्याने . पडत आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Friday, November 29, 2024

नाशिकमध्ये सिरत - ए - मुस्तफा स्पर्धेत ८०० हुन अधिक परिक्षार्थींनी घेतला सहभाग*


नाशिक प्रतिनिधी : माजिद खान 
ऑल इंडिया तहेरीक फरोगे इस्लाम, भिवंडी तर्फे राज्यस्तरीय सिरत - ए - मुस्तफा परिक्षा ११ शहरांमध्ये तीन हजाराहून अधिक स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती. नाशिकमध्ये जेएमसीटी कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित सदर परीक्षेसाठी वय वर्ष १२ ते ७५ पर्यंत मुले मुली, महिला पुरुष अशा ८०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकूण १०० गुणांच्या या परीक्षेत ८० गुणांची बहुपर्यायी प्रश्न तर २० गुणांसाठी दीर्घोत्तरी प्रश्न होते. बहूपर्यायी उत्तरासाठी ओ.एम.आर. शीट देण्यात आले होते. 
नाशिक परिक्षा केंद्रावर नाशिक जिल्हा व जिल्ह्याबाहेरील परिक्षार्थी उपस्थित होते. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या इमारतीमध्ये आसन व्यवस्था करण्यात आली होती. जेएमसीटी संस्थेचे अध्यक्ष हाफिज हिसामुद्दीन खतीब यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेली परिक्षा अतिशय पारदर्शी पद्धतीने संपन्न झाली. मुंबईचे मुफ्ती मोहम्मद अख्तर रजा मिस्बाही व कारी मोहम्मद आसिफ रजा बरकाती यांचे हस्ते प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिकांचे पाकीट उघडून उदघाटन करण्यात आले. करिअर काउंसलर व मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख सर यांनी परिक्षा अधीक्षकाची मुख्य जबाबदारी पार पाडली व आवश्यक मार्गदर्शन केले. नाज़ीम शेख यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. 
जेएमसीटी संस्थेचे विश्वस्त हाजी जाहिद खतीब, हाजी रऊफ पटेल, हाजी साबीर खतीब, शेखन खतीब, अहसान खतीब, आरिफ मन्सुरी, जेएमसीटी पॉलिटेक्निकचे प्राचार्य हमीद अन्सारी, जेएमसीटी इंटरनेशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका चित्रा घस्ते व शबाना शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जेएमसीटी च्या एकूण ५० शिक्षकांनी पर्यवेक्षकाचे काम पहिले. तर शिक्षकेतर कर्मचारी देखील कार्यरत होते. तहरीकतर्फे मुफ्ती साजिद पटेल, हुसेन अन्सारी, परवेझ अन्सारी यांनी परिश्रम घेतले. सदर परीक्षेत प्रथम क्रमांकासाठी उमराह, बगदाद व बैतुल मुकद्दस पॅकेज, द्वितीय पारितोषिक उमराह व बगदाद पॅकेज तर तृतीय पारितोषिक उमराह पॅकेज दिले जाणार आहे. तसेच अन्य १०० पारितोषिके देखील दिले जाणार आहेत. परीक्षेचा निकाल व पारितोषिक वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

काय म्हणावे याला*देखणे ते चेहरेप्रांजळांचे आरसे ! गोरटे की सावळे या मोल नाही फारसे !!



*काय म्हणावे याला*

देखणे ते चेहरे
प्रांजळांचे आरसे !
 गोरटे की सावळे 
या मोल नाही फारसे !!

बा. भ. बोरकरांची ही आपल्या बालपणी शिकलेली कविता सहजच निवांत बसल्यावर आठवली आणि मग डोळ्यासमोर तरळून गेले कित्येक असे चेहरे की ज्यांचे वर्णन करायला शब्द कुठून आणावेत हाच प्रश्न पडावा. कारण की मनाला प्रश्न पडतो की प्रांजळपणाचे रुपडे धारण केलेली माणसे सुद्धा आतून किती भयंकर असतात याचे अनुभव प्रत्येकाने कधी न कधी घेतलेल्या असतात तर याउलट खाष्ट वाटणारी माणसे सुद्धा आतून मनाने किती निरागस असतात हाही अनुभव आलेलाच असतो. वय वाढेल तसे माणसाने म्हातारे होण्याऐवजी जेष्ठ व्हावे आणि हे जेष्ठत्व माणसाच्या वागण्यातून दिसावे बोलण्यातून कळावे. पण नेहमीच असे होते असे नाही आणि मग बोलण्यात आणि वागण्यात विरोधाभास दिसला की त्या माणसा बाबतीत कशावरच विश्वास ठेवावा वाटत नाही. म्हणूनच आपल्या मराठी भाषेत एक म्हण रुढ झालेली आहे ती म्हणजे 
*पांघरून खुळ आणि आत्माराम शहाणा*
माणूस कोणताही असो त्याला स्वतःच्या फायद्याचं अगदी एखाद्या येड्या गबाळ्याल्या ही सांगावे लागत नाही. पण त्यातल्या त्यात माणसांमध्ये काही अंशी खरेपणा असतो. काहींची तत्त्व ठरलेली असतात आणि तत्त्वाने वागणारी माणसे, स्वार्थी माणसांसाठी नेहमीच अडचणीची ठरतात. काही फुकट मिळते म्हटल्यावर अथवा दुसऱ्यांकडून मिळते म्हटल्यावर मुक्तहस्ताने घेणारी माणसे स्वतः द्यायची वेळ आली की रडतात कुडतात आणि झापेपणाचा आव आणतात. अशा माणसांशी जवळीक नसलेलीच बरी. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही म्हण खरी असली तरी सुद्धा माणसानं स्वतः थोडं शहाणं व्हावं, जाणतं व्हावं. आपला मुखवटा इतरांच्या केव्हाच लक्षात आलेला आहे याची जाणीव ठेवून वागावं.असे म्हणतात की
 *ज्याची बुद्धी क्षीण*
*आणि ज्याची वृत्ती हीन*
अशा माणसाचा राग मनात ठेऊ नये. पण मी तर म्हणेल की अशा माणसाविषयी लोभ ही मनात ठेवू नये.
*तेच डोळे देखणे जे*
 *कोंडीती साऱ्या नभा !* 
*ओळीती दुःखे जनांच्या*
 *सांडीती नेत्रप्रभा !!*
बोलण्यातून आपण किती सहृदयी आहोत हे दाखवायचे आणि प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की मग मात्र कसलाही विचार न करता काहीही ठोस मदत करायची नाही,अशी सवय बऱ्याच जणांना असते.. आपण जी मदत करतोय त्याने एक चांगले कार्य पार पडणार आहे आणि पुण्य आपल्यालाच लागणार आहे, याचे भान ठेवले तर असा स्वार्थीपणा थोडा कमी होईल. अशी माणसे सडेतोडपणे बोलत नाहीत की समोरच्यावर रागावत नाहीत कारण त्यांना त्यांच्या कद्रूपणाची चांगली ओळख झालेली असते. काटकसर आणि कंजूसपणा यात जमीन आसमानचा फरक आहे.. बरं आपलं द्यायचं नाही तर आपणही लोकांचं घेऊ नये हा साधा नियम ही ते आपल्या स्वार्थीपणाबाई डावलतात. समूहाच्या विरोधी जाण्यात काहीच गैर नाही जर आपण काही चांगले करत असू तर. पण चांगल्या कामातही आपण मोडता घालत असू तर आत्म परीक्षण करायलाच हवं. सगळी च माणसं सारखी नसतात. बहुतांश लोक ही मोठ्या मनाची आणि दिलदार ही असतात.पण अशा तऱ्हेवाईक माणसांना धडा शिकवायला वेळ आली तर मागे पुढे पाहू नये. त्यांना वेळोवेळी जाणीव करून देणे गरजेचे आहे की 
*माणूस म्हणून जगताना*
 *काही पथ्य पाळायला हवीत*
*माणूस म्हणवून घेताना* *काही कुपथ्य टाळायला हवीत*
जीवननितांत सुंदर आहे फक्त कुणासाठी कधीतरी निस्वार्थी भावनेने काही तरी करून पाहा.म्हणूनच शैलेंद्र आपल्या एका कवितेत असे म्हणतात की

*कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे*?
*कृष्ण व्हावे की कर्ण व्हावे*?
*जे आपले असते तेच द्यावे !*
*की द्यावे तेही आपले रहावे!!*.

*कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे*?
*कृष्ण व्हावे, हो, कृष्णच व्हावे*
*कधी कुणाचे कवच व्हावे* !
*कधी कुणाचे कुंडल व्हावे*!!

=================================
-----------------------------------------------
*लेखन*✍️✅🇮🇳...
सुजाता नवनाथ पुरी 
अहील्यानगर - 8421426337
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, November 28, 2024

आपली मुलं - आपली जबाबदारी


आजकाल लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे व्यसन लागल्याचे आढळते. प्रत्येक वयातील व्यक्तींचे मोबाईल वेड हे वाढतच असल्याचे दिसून येत आहे .हल्ली लहान मुलांना तर मोबाईल फोन सोडवतच नाही. मोबाईल मुळे जरी ज्ञानात भर पडत असली तरी ती कशाप्रकारे योग्य आहे हे पालकांनी अभ्यासणे महत्त्वाचे आहे .
         सध्या विभक्त कुटुंब असल्याचे आढळते. त्यामुळे घरात मोजून चार-पाच माणसे आणि तेही आपापल्या कामात गुंतलेले. काहीवेळा असेही आढळून येते की; मुलांना अभ्यासात काही प्रश्न निर्माण झाले किंवा काही समस्या आल्या तर पालक स्वतःहूनच मुलांकडे मोबाईल देतात आणि मोबाईलवर गुगल वरून शोधण्यास सांगतात आणि स्वतः टीव्ही पाहण्यात दंग राहतात. अशा वेळी मुले बरोबर संधीचा फायदा उठवतात.त्यांना अभ्यासातील एखादीच गोष्ट पाहिजे असते मात्र त्यानंतर मुले मोबाईलवर रिल्स पाहत बसतात किंवा एखादी गेम खेळत बसतात .अशावेळी पालकांनी आवर्जून लक्ष दिले पाहिजे.मोबाईलचे वाढते व्यसन व त्यामुळे होणारे परिणाम हे आपल्या मुलांसाठी किती धोकादायक आहेत हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
            बऱ्याच वेळा असं होतं की मुलांच्या हातात सतत मोबाईल पाहिला की पालक त्यांना ओरडतात, प्रसंगी एखादी गालात देखील देतात. परंतु; हे योग्य आहे का?
        काही ठिकाणी तर असे पहावयास मिळते की मुलांनी मोबाईल वरील रिल्स पाहून त्यातील काही डायलॉग म्हणून दाखवले तर पालकांना कौतुक वाटते.काही शब्द असे असतात की ते लज्जास्पद,अर्वाच्च असे असतात.परंतु ; लहान मुले अगदी मोठ्या दिमाखात ते शब्द उच्चारतात आणि पालक त्यावर एन्जॉय करतात. हे कितपत योग्य आहे ?
         काही पालक सुशिक्षित व सुसंस्कृत असले तरी दोघेही जॉब करत असल्यामुळे पाल्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि म्हणून ऑनलाइन संस्कार वर्ग वगैरे चे क्लासेस लावतात.पण ; या पद्धतीने आपले मूल वागते का? संस्कारक्षम गोष्टी आत्मसात करते की नाही? हे पाहिले पाहिजे. जॉब वरून आल्यानंतर स्वतः मोबाईल कामाव्यतिरिक्त न पाहता मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. 
       त्यांना संस्कारक्षम गोष्टी शिकविल्या पाहिजेत .मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत. त्यांच्या शाळेतील दिवसभरातील घडामोडींविषयी विचारपूस करायला हवी .त्यांच्या मित्र-मैत्रिणींविषयी चर्चा करावी. तसेच शाळेतील शिक्षक, आपल्या कुटुंबातील सदस्य ,नातेवाईक,आपला परिसर इत्यादी सारख्यांविषयी हितगुज केले पाहिजे.म्हणजे मुले देखील विचारांची देवाण-घेवाण करण्यास सज्ज होतील.
        तसेच त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. मित्र - मैत्रिणींबरोबर खेळायला पाठवले पाहिजे. त्यांचे नवनवीन छंद जोपासता आले पाहिजेत. नवनवीन गोष्टी सांगायला हव्यात. तसेच आपल्या मुलांनी इतरांशी बोलताना नम्रपणा, सहनशीलता पाळून आदरातिथ्याने बोलले पाहिजे, याची काळजी घ्यावी. वागण्याबरोबरच खाण्याच्या सवयी याविषयी देखील काळजी घेतली पाहिजे.
           सध्या पिझ्झा,बर्गर, सँडविच आणि हॉटेलचे इतर पदार्थ खाणे म्हणजे एक प्रकारची फॅशन झाली आहे. आणि असे खाणे म्हणजे चांगले खाणे होय असा एक गैरसमज झाला आहे. बेकरी फूड व जंक फूड याकडे सर्वांचाच कल वाढलेला आहे .त्यामुळे सर्वांनाच आरोग्य समस्या भेडसावू लागल्या आहेत. परंतु; लहान मुलांसाठी हे अतिशय घातक आहे .कोवळ्या वयातच जर आरोग्य समस्या वाढू लागल्या तर मोठेपणीच्या आरोग्य समस्यांचे काय? अनेक समस्या उभ्या राहतील.
            या सर्व समस्यांमधून वेळीच सुटका हवी असेल तर; प्रत्येक पालकाने आपल्या मुलाकडे स्वतः जातीने लक्ष दिले पाहिजे .त्यांना लहान मुलांच्या गोष्टी मोबाईलवर न दाखवता गोष्टींची पुस्तके आणून प्रसंगी स्वतः वाचून दाखवली पाहिजेत. वर्गातील गृहपाठ करत असताना मोबाईलवर उत्तर न शोधता पुस्तक वाचन करून चर्चेतून उत्तर शोधण्यास मदत केली पाहिजे. त्यांचा कल पाहून त्यांना मदत केली पाहिजे. त्यांचे विचार जाणून घेतले पाहिजेत. प्रत्येक वेळी आपलेच खरे असे व्हायला नको.त्यांना समजून घेतले पाहिजे. तसेच स्वतः काही वेळा लहान होऊन त्यांच्याबरोबर काही वेळ खेळले पाहिजे. स्वतः घरातील थोर व्यक्तींना आदर द्या, लहान मुले आपोआपच आदर देतील.त्यांना वेगळे सांगण्याची गरजच पडणार नाही कारण; लहान मुले अनुकरणप्रिय असतात.
          या सर्व गोष्टी जुळवून आणायच्या असतील तर;फक्त आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यासाठी आपल्या व्यापातून थोडा तरी वेळ काढलाच पाहिजे. मग बघा नावाजलेल्या व्यक्तींमध्ये आपला पाल्य आणि त्याबरोबर आपण असणार हे नक्की.

=================================
-----------------------------------------------

*लेखन*✍️✅🇮🇳...
सौ.मिनल अमोल उनउने
(सुकन्या) सातारा
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, November 27, 2024

मख़दुम सोसायटी तर्फे संविधान* *दिनानिमित्त मोफत पुस्तके वाटप




समाजातील सर्वात गरीब आणि असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी संविधान हे एक शक्तिशाली साधन आहे - आबीद खान

- नगर - प्रतिनिधी - / वार्ता -
मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्यावतीने केडगांव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा याठिकाणी २६ नोव्हेंबर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व विधार्थांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली. 
यावेळी मख़दुम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान यांनी संविधान तयार करण्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले परिश्रम आणि संविधानातील समानतेचा संदेश सुंदर व सोप्या शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडला.
आस्मा शेख यांनी विद्यार्थ्यां समोर संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. यावेळी शाळेच्या आयेशा सुलताना यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
समाजातील सर्वात गरीब आणि असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी संविधान हे एक शक्तिशाली साधन आहे.तो जितका मजबूत असेल तितका आपला देश मजबूत होईल असे आबीद दुलेखान यांनी सांगितले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शिक्षा के मंदिर मे चलता कालेधन का कारोबार,यह शिक्षा है या व्यापार


आजकल जहा देखो वहा शिक्षा का स्तर बहुत गिर रहा है। और लाखों रुपए खर्च करने के बाद भी जैसी शिक्षा आज से 20 या 30 साल पहले सरकारी स्कूलों में मिलती थी वैसी नहीं मिल रही है। उसका सीधा अर्थ यही हे कि कही न कही सभी चीजों का निजीकरण के नुकसान अब दिखने का चालू हो गया हे।

अब सही तरह से सोचे तो डिग्री और शिक्षा एक पैसे का खेल बन गया हे। और हद तो तब हो जाती हे की जिसने पीएचडी की हो उसने किस विषय पे और किस थीसीश में पीएचडी की डिग्री ली हे वह तक पता नहीं। और उससे भी आगे जाए तो एक सीए की हुई लड़की ने सादी होने तक 7500 में जॉब की और वो जॉब न चली जाए इसके लिए माफी भी मांगी। यह सब आंखों देखी और मेरे सहपाठी के साथ घटी हुई सच्ची बाते हे और वह भी गुजरात में ।तो आए जानते हे कि इसकी नींव कहा हे और क्यों ऐसा हो रहा हे।

पहले तो यह शिक्षा का कारोबार कैसे चलता हे वह जानना पड़ेगा। ज्यादातर शहरों में अभी प्राइवेट स्कूलों के चलन बढ़ गए हे सामने सरकार ने भी सरकारी स्कूलों पे ध्यान नहीं दिया अब यह एक शिक्षण माफिया में परिवर्तित हो गया हे। जहां पैसे और बड़ी बड़ी बाते और बहुत सारे मार्क के अलावा कोई चीज नहीं होती हे।

पहले यह जानिए के 20 साल पहले बोर्ड में अव्वल नबर में 1 से 10 होते तो उसमें ज्यादा से ज्यादा 12 से 18 विद्यार्थी होते लेकिन अब वही संख्या 70 से 80 हो गई हे। यह भी इस खेल की ही एक कड़ी हे। ऐसे बहुत सारे खेल और तालमेल हे जो पैसे और बड़े बड़े नेताओं और शिक्षण माफिया लोगों और सिस्टम के साथ खेलता रहता हे।

अब जानते हे की ज्यादातर प्राइवेट स्कूलों में एक ट्रस्ट के अंतर्गत आती हे। और वही ट्रस्ट से सारा संचालन होता हे। बस जब आप फीस जमा कराते हो तब ही यह सब कारोबार आपके सामने आ जाएगा। आप घोर से देखना की वहां स्कूल फि लिखा हे , डोनेशन लिखा हे या ट्यूशन फि, ऐसे अलग अलग कितने क्लॉज आने को चालू हो गए हे। जैसे की खेल , टूर, आउट डोर वगैरा। तो यह साफ हो गया हे कि कोई नियम हे जिसको ताक ताक करके इसको पैसे ऐंठने की पूरी छूट मिली हे। और वह बस दिन प्रतिदिन इसी कार्य में लगे रहते हे।

इससे आगे जाए तो कितनी शाला ए एसी भी हे जो अपने शिक्षकों को बैंक में पगार देके वापिस रोकड़ रूप में ले लेती हे। वह एक शिक्षक की मजबूरी हे और यह शिक्षण माफियाओं का डर।! अब इन सब में जो रह जाता हे जो छूट जाता हे वह हे शिक्षण।?!

इन सभी शिक्षण माफिया गैंग रोज रोज नए तौर तरीको से पैसे ऐंठने के रास्ते ढूंढते हे। और सोची समझी साजिश की तहत लोग इसके शिकार बन गए हे। इसमें जो मूल भाव का शिक्षण हे वही गायब हो गया हे। और बस मार्क्स और स्कूलों की छवि चमकाने के लिए ही शिक्षण रह जाता हे। अब सोचो जिस शिक्षण की नींव हि काले धन और उसका सेटलमेंट करने के लिए बनी हे वहा पढ़ रहे बच्चो को क्या शिक्षण मिलता होगा?! क्या यह संभव हे कि जहां शिक्षण संस्थानों खुद ही की नींव गलत हो वहा से कोई सही शिक्षा पा सके।! क्या यह भी संभव हे के अगर आगे बढ़ भी गया तो यह नींव जानने के बाद वो आदमी अपने आपको एक सुरक्षित और भ्रष्टाचार मुक्त भारत दे सके। शिक्षण संस्थान में होते शिष्टाचार से भ्रष्टाचार को अगर नहीं रोका गया तो अब नीचे लिखी लाइन ही सब बोलेंगे और कोई भी संस्थानों का कुछ भी महत्व नहीं रहेगा यह पक्का हे।

सोच समझ के ना की पढ़ाई जिसने, उसने जीवन बिगाड़ दिया।
और सोच समझके की पढ़ाई जिसने, उसने भी क्या उखाड़ लिया।।

बस यही वाक्य अभी 10% केसों में लागू होते दिख रहे हे अगर यही व्यवस्था से शिक्षण प्रणाली चली तो वह 90% हो जाएगी।। 
जय हिंद ।।

=================================-----------------------------------------------
*लेखन*✍️✅🇮🇳...
  प्रतिक संघवी 
राजकोट (गुजरात) 
-----------------------------------------------
=================================


=================================-----------------------------------------------
*लेख विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार चंद्रकांत सी पूजारी 
(अ.भा.स्वाभिमानी संपादक सेवा
संघ - गुजरात प्रदेश प्रभारी) 
-----------------------------------------------
=================================

=================================-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

नासिक महानगरपालिकेने घरपट्टीत 
५०%सूट द्यावी - चंदन पवार

नाशिक प्रतिनिधी : माजिद खान 
नासिक महानगरपालिकेने घरपट्टीवरील दंडात ९५% सूट तर दिलीच आहे, परंतु मूळ रकमेतही ५०% सूट द्यावी कारण अनेक महिन्यांपासून ज्या नाशिककरांची घरपट्टी थकलेली आहे व त्यावर नाशिक महानगर पालिकेकडून अनेक पटीने दंड लावण्यात आला होता त्या दंडावर महानगर पालिकेने सूचना काढून दिलेल्या वेळेत जर घरपट्टी भरली तर दंडात ९५% सूट देऊन रक्कम भरण्यासाठी आवाहन केले होते.
आज नाशिकमध्ये अनेक असे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत ज्यांची मूळ रक्कमच खूप मोठी आहे, अशा दुर्बल घटकातील आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी महानगरपालिकेने मूळ घरपट्टीच्या रकमेत ५०% सवलत देऊन गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना पूर्ण घरपट्टी भरण्यास प्रोत्साहित करावे असे जर केले तर जवळपास ९९% लोक घरपट्टी तात्काळ भरतील जेणेकरून महानगर पालिकेची संपूर्ण वसुली होईल आणि महानगर पालिकेचे उत्पन्न सुद्धा वाढेल, तसेच पाणी पट्टीमध्ये सुद्धा महानगरपालिकेने भरघोस सूट देऊन लोकांना आर्थिक विवेचनेतून बाहेर काढावे अशी विनंती वजा मागणी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांना पत्राद्वारे भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष चंदन पवार यांनी केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Tuesday, November 26, 2024

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेचा राष्ट्रीय गौरव म्हणजे संविधान दिन


विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर गांच्या अलौकिक आणि अद्वितीय प्रकांड पांडित्यातून उदयास आलेला भारत देशासह देशातील तमाम जनतेचा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान होय. भारतीय संविधान लिहण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तब्बल दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा कालावधी लागला. 
     या प्रदीर्घ कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता अहोरात्र निरंतर अभ्यास, चिंतन,मनन करत जगातील सर्व लोकशाही राष्ट्रांच्या संविधानांचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या संविधानांपेक्षा भारतीय संविधान हे जास्तीत जास्त कसे लोककल्याणकारी निर्माण करता येईल या करिता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कायम राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून निरंतर प्रामाणिक प्रयत्न केला. आणि जगातील सर्व श्रेष्ठ आणि जगातील प्रगत राष्ट्रांच्या अस्तित्वात असलेल्या सर्व संविधानांच्या तुलनेत सर्वात मोठ्या लिखित भारतीय संविधानाची निर्मिती केली. हे राष्ट्रहिताचे महान लेखन कार्य अविश्रांतपणे परिपूर्ण करून सदर संविधान घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते देशाला अर्पण केले तो ऐतिहासिक दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी हे भारतीय संविधान राष्ट्रहितासाठी सर्वानुमते अंगिकृत करून अधिनियमित केले. या नंतर घटना समितीने एका जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करून त्या जाहीर कार्यक्रमात घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे पहिले प्रधान मंत्री पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या असामान्य आणि अलौकिक संविधान निर्माण कार्याची प्रशंसा करून त्यांच्या प्रखर राष्ट्र प्रेम आणि जाज्वल्य देशभकीचा गौरव केला आणि २६ जानेवारी १९५० पासून हे संविधान भारतीय शासन प्रशासनात प्रत्यक्षपणे अंमलात आले. 
      न्याय, समता, स्वातंत्र आणि विश्व बंधुत्व या चतुः सुत्रीवर आधारित भारतीय संविधानाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुता प्रवर्धीत होण्यासाठी देशातील सर्व सामान्य जनतेत, विद्यार्थी व शिक्षक वर्गात, लोकप्रतिनिधी आणि सरकारी निमसरकारी प्रशासकीय अधिकारी, लोकसेवक यांच्या मध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरावर संविधान साक्षरता व जाणिव जागृती होणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमात भारतीय संविधानाचा अंतर्भाव केला पाहिजे. 
       या संविधान गौरव दिनानिमित्ताने भारतीय संविधानातील मौलिक तत्वे, संविधानिक हक्क, अधिकार आणि कर्तव्य स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणार आहेत. हीच संविधानिक तत्वे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या जीवनात आणि विद्यार्थी मनावर बिंबवून त्यांना देशाचे सुजाण व जागरूक नागरिक भडवणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आपल्या भारतीय संविधानाच्या अधीन राहून भारताचा प्रशासकीय कारभार चालतो याची जाणीव, जागृती विद्यार्थ्यांना आणि भारतीय नागरिकांना झाली पाहिजे. आपल्या देशाच्या या घटपात्मक संसदीय लोकशाहीच्या आधारे कार्य पालिका, न्याय पालिका, संसद, मंत्रीमंडळ, निवडणूक आयोग, प्रसार माध्यमे यांच्या दैनंदिन कारभाराचे समग्र ज्ञान विद्याथ्यांना आणि नागरिकांना व्हाने या करिता शासनाने सन २००८ ला अध्यादेश काढून २६
नोव्हेंबर रोजी देशासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालम, विद्यापीठ अनुदान आयोग तथा युजीशी, मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली सर्व महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समित्या, ग्राम पंचायत कार्यालयात संविधान गौरव दिन आगोजित करून या दिनाचे महत्व विशद करण्यासाठी वकृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन आणि भारतीय संविधानाच्या प्रास्तविकेचे सामुहिक वाचन करने सर्वांना बंधनकारक केले आहे. या संबंधीचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांव्याकडे पाच डिसेंबराच्या आत सविस्तर सादर करावयाचे आहे. संबंधित जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या जिल्यात प्रत्यक्ष किती ठिकाणी शासकीय आदेशाची अंमलबजावणी केली आहे, हे गांभीर्याने पहायचे आहे. अशा सुचना आहेत. 
       भारतीय संविधान हा आपल्या राष्ट्राचा तथा भारतीयांचा एकमेव राष्ट्रीय ग्रंथ आहे. या संविधानाच्या माध्यमातून आपण जगातील सर्वश्रेष्ठ संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. त्यामुळे ती अत्यंत निस्वार्थी वृत्तीने व पारदर्शकपणे राबविणे आणि तिचे पालन करणे जसे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी वर्गाची जबाबदारी आहे, तशीच ती सर्व भारतीम नागरिकांची सुद्धा तितकीच नैतिक जबाबदारी आणि आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे.


=================================
-----------------------------------------------
*शब्दांकन:*✍️✅🇮🇳...
पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड
बोरघर- माणगाव,रायगड. 
भ्रमणध्वनी - ९८२२५८०२३२ / ८००७२५००१२
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Monday, November 25, 2024

श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत हिवाळी क्रीडा महोत्सवास उत्साहात प्रारंभ


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामशेठ टेकावडे यांच्या प्रेरणेने एज्युकेशन सोसायटी संस्थे अंतर्गत सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ दरम्यान सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन दैनिक राष्ट्र सह्याद्री संपादक करण नवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे खजिनदार जन्मजय टेकावडे,पुरुषोत्तम बुब,ॲड. दादासाहेब औताडे,सुरेश ओझा,माजी प्राचार्य सुभाष गोरे ,सौ उषाताई मुंदडा ,सौ. संगीता कासलीवाल,सौ. रेखा घाटे,प्रा. दत्तात्रय घोगरे, प्रा. पोडघन,प्रा. करंदीकर यांच्यासह पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धा बरोबरच मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट,व्हॉलीबॉल खो-खो,कबड्डी,रस्सीखेच या सांघिक खेळांसह १०० मीटर धावणे,२०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे,लांब उडी,उंच उडी गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक यांच्यासह चित्रकला स्पर्धा,वकृत्व स्पर्धा,संगीत स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज,श्रीराम अकॅडमी, एज्युकेशन सोसायटी प्राथमिक आणि माध्यमिक स्कूल या चार शाळा सहभागी होणार आहेत. ३० नोव्हेंबर रोजी या हिवाळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा न्यू इंग्लिश स्कूल येथे संपन्न होणार आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, November 24, 2024

अजमत इक्बाल यांच्या "अधुरी तखलिक" या पौराणिक कथासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 जागतिक उर्दू दिवस डॉ. अल्लामा इक्बाल जयंती दिनानिमित्त मखदूम एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय कौमी एकता सप्ताह मध्ये अजमत इक्बाल यांच्या " अधुरी तखलिक"(अपूर्ण निर्मिती) या कथासंग्रहाचे तांबोली हज टूर्सचे संचालक हाजी शौकतभाई तांबोली , आयटीआय चे प्राचार्य खालीद जहागिरदार, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, प्रा.डॉ. महबूब सय्यद सर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ. कमर सुरुर, सल्लागार शरफुद्दीन शेख यांच्या हस्ते पुन: प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मालेगावचे प्रसिध्द शायर डॉ.नईम अख्तर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, मौलाना आझाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील, सचिव निसार बागवान आदी उपस्थित होते. 
शहरातील रेहमत सुलतान हॉलमध्ये झालेल्या या दिमाखदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मालेगावहून आलेले कवी डॉ.नईम अख्तर होते. या सोहळ्यात अहमदनगर शहरातील सामाजिक,राजकीय, शैक्षणिक उपक्रम आणि संस्थांशी निगडित अनेक दिग्गजांनी सहभाग घेऊन सोहळ्याची प्रतिष्ठा वाढवली. शहर आणि राज्याबाहेरील कवींनी श्रोत्यांसमोर आपली शायरी सादर करून दाद आणि वाह वाही मिळवली.डाँ.कमर सुरुर यांनी लेखक अजमत इक्बाल यांचा सविस्तर परिचय करून दिला. अहमदनगर शहरात प्रथमच उर्दू कथासंग्रहचे प्रकाशन होत असल्याचे स्पष्ट केले. अहमदनगर शहरातील साहित्य वर्तुळ आणि श्रोत्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे की या शहरातून या संग्रहाची पहिली आवृत्ती शेजारच्या देशात प्रेस फॉर पीस पब्लिकेशनने प्रकाशित केली होती.
पुस्तकाचे लेखक अजमत इक्बाल यांनी आपली कहाणी अनोख्या पद्धतीने रसिकांसमोर मांडली. सभागृहात मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. अजमत इक्बाल यांनी सादर केलेली कथा श्रोत्यांनी केवळ उत्साहाने ऐकली नाही तर कथेबद्दल कौतुकही व्यक्त केले. अजमत इकबाल यांनी मान्य केलेल्या किमतीत पौराणिक संग्रह मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आला. अजमत इकबाल यांनी मखदूम एज्युकेशनल सोसायटी आणि विशेषत: आबिद खान आणि कमर सुरूर यांचे आभार मानले. कविते सारख्या शैलीतील उर्दू साहित्याच्या पुनर्प्राप्तीसाठी कल्पित लेखनाच्या कलेकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. अहमदनगर शहरातील अत्याधुनिक वाचक काल्पनिक कथांना आपल्या अभ्यासाचा भाग बनवतील अशी आशा व्यक्त केली. मालेगाव शहरातील चित्रकार अली इम्रान यांनी या कार्यक्रमात केवळ सहभाग घेतला नाही तर स्वत:च्या हाताने तयार केलेले कमर सुरूर यांचे चित्रही सादर केले. अली इम्रानच्या पेंटिंगला स्टेजवरील पाहुणे आणि प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. सोहळ्याच्या दुसऱ्या भागात निमंत्रित कवींनी आपली शायरी सादर केली. 
अध्यक्षीय भाषणात डॉ.नईम अख्तर यांनी अजमत इक्बाल यांच्या कथालेखनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमात प्रेक्षक रात्री उशिरापर्यंत आपापल्या जागेवर खिळून राहिले. या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अहमदनगरच्या नागरिकांच्या वतीने आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले .

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

पराभवाने खचून न जाता अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार अविनाश आदिक यांना विधान परिषदेवर घेण्याची एकमुखी मागणी




महायुतीच्यावतीने आभार सभेत
कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे यांना मत विभागणीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले. असे असले तरी पराभवाने खचून न जाता आगामी निवडणुकांमध्ये एकजुटीने व अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक यांना विधानसभेवर घेण्यात यावे, अशी एकमुखी मागणी अनेक वक्त्यांनी यावेळी केली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी आज काँग्रेस भवन येथील बॅरिस्टर रामराव आदिक सभागृहात महायुतीच्यावतीने विचारविनिमय करण्यासाठी तसेच आभार व्यक्त करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, ज्येष्ठ नेते अजित कदम, अमृत काका धुमाळ, जि. प.चे माजी सभापती शरद नवले, बाळासाहेब तोरणे, आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, मुक्तार शहा, राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, बाबासाहेब खोसरे, सलीम शेख, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, अनिता ढोकणे, वेनुनाथ कोतकर आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४१ जागा मिळाल्या आहेत. अजून आपली जागा मिळाली असती तर श्रीरामपूरचे चित्र बदलले असते. आता पुन्हा ५ वर्ष तालुका बाजूला पडणार आहे. आमदार लहू कानडे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली. काम करूनही त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. असे असले तरी श्रीरामपूरचे प्रश्न चौथ्या क्रमांकावर असणारेच सोडविणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीरामपूरसाठी ३ हजार कोटी रुपये निधी देण्याचे शब्द दिला आहे. आगामी काळात तो निधी आणून विकासकामे करू, नवीन आमदाराने मागणी केल्यास त्यांनाही मदत करू, पराभवाने खचून न जाता संघटना वाढीसाठी प्रयत्न करू असे अविनाश आदिक यावेळी म्हणाले.

अशोक कानडे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार आले ही आपली जमेची बाजू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रश्नासाठी हतबल होण्याचे कारण नाही. सहकाऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या सुखदुःखात, त्यांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहू, संघटना ही आपली मोठी ताकद आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उभे राहून आपली ताकद दाखवून देऊ. अविनाश आदिक यांना विधान परिषदेवर घेवून अजित पवार निश्चितपणे न्याय देतील, त्यामुळे कोणीही खचून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीत `गड आला पण सिंह गेला` अशी स्थिती निर्माण झाली असली तरी राज्यात महायुतीचे सरकार आल्याने कोणतीही अडचण येणार नाही. स्व. गोविंदराव आदिक यांनी तालुक्याचे विकासाचे स्वप्न पाहिले तीच दूरदृष्टी ठेवून आ. कानडे यांनी मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे केली. परंतु काहींनी महायुतीचा धर्म पाळला नाही. निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अविनाश आदिक यांनी तसेच कार्यकर्त्यांनी मोठे कष्ट घेतले. आगामी निवडणुकीतही एकत्रपणे काम करून पराभवाचा वचपा काढू, असे अरुण नाईक यावेळी म्हणाले.

दहा वर्षानंतर आ. कानडे यांच्या रूपाने मतदारसंघासाठी प्रतिभासंपन्न उमेदवार मिळाला होता. प्रशासकीय कामाच्या अनुभवामुळे अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली. वातावरण चांगले होते. विजयाची खात्री होती. मात्र शेवटच्या दोन दिवसात वातावरण बिघडून आत्मघात झाला. असे असले तरी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४१ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे विकासात कुठलाही खंड पडणार नाही. आगामी काळात पक्ष संघटना वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करावा, असे आवाहन अजित कदम यांनी केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, शरद नवले, अमृत काका धुमाळ, कैलास बोर्डे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे, विष्णुपंत खंडागळे, बाबासाहेब कोळसे, रिपब्लिकन पक्षाचे सुभाष त्रिभुवन, निलेश भालेराव, प्रा. कार्लस साठे, भागचंद औताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, देवा कोकणे यांची यावेळी भाषणे झाली. तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे यांनी आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, युवक प्रदेश सरचिटणीस फारुक पटेल, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण, सतीश बोर्डे, सचिन जगताप, सरपंच अशोक भोसले, सागर मुठे, शिवाजी पवार, रमेश आव्हाड, राजेंद्र ओताडे, मदन हाडके, अमोल आदिक, हरिभाऊ बनसोडे, युनुस पटेल, चंद्रसेन लांडे, प्रा. एकनाथ ढोणे, तुकाराम चिंधे, राजेंद्र कोकणे, आबा पवार, नानासाहेब रेवाळे, सुरेश पवार, अजिंक्य उंडे, दिपक कदम, राधाकृष्ण तांबे, अण्णासाहेब ढोणे, अण्णासाहेब वडीतके, सुमित मुथ्था, सारंगधर पवार, अक्षय नाईक, रवी राजुळे, मधुकर ठोंबरे, भाजपचे प्रफुल्ल डावरे, मुश्ताक शेख, दादासाहेब कुताळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



*चौकट*

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे यांनी यावेळी अविनाश आदिक यांना विधानपरिषदेवर घ्यावे, या मागणीचा ठराव मांडला. त्याला उपस्थितांनी टाळ्याच्या गजरात साथ दिली. त्यानंतर अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून अविनाश आदिक यांना विधानपरिषदेवर घेण्यात यावे, अशी मागणी केली. अरुण नाईक यांनी, राज्यात महायुतीचे सरकार आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला, उपस्थितांनी टाळ्या वाजवून या ठरावास संमती दिली. विधिमंडळ पक्षनेते पदाच्या निवडीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावून घेतल्याने माजी आमदार लहू कानडे मुंबईला गेले असल्याची माहिती श्री. आदिक यांनी यावेळी दिली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, November 22, 2024

राष्ट्रवादीच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला यांची निवड


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अल्पसंख्यांक विभागाच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी अल्तमश जरीवाला यांची निवड प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांनी केली आहे. 
श्री.जरीवाला यांचा पक्ष बांधणी मध्ये महत्वाचा वाटा आहे. सदर कामाची पावती म्हणून शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर व जिल्हा अध्यक्ष अतहर खान यांनी श्री.जरीवाला यांच्या निवडीसाठी पक्षाकडे पाठपुरावा केला होता. सदर निवडीत खा. निलेश लंके यांनी सकारात्मक भूमिका घेत निवडी साठी सकारात्मक प्रतिसाद दिला.
अल्तमश जरीवाला यांनी समाजातील विविध प्रश्नांसाठी खास करून पीरशाह खुंट भागात त्यांनी पाण्याचे, रस्त्याचे,ड्रेनेज लाईनच्या कामासंदर्भात नेहमीच अग्रेसिव भूमिका घेत प्रशासनाकडे धरणे आंदोलन करून समस्यांचे निवारण केले आहे तसेच इतर ठिकाणी सर्व समाजाच्या सामाजिक प्रश्नांसाठी नेहमी पुढाकार घेत ते सोडविण्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. 
सदर निवडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,माजी आमदार दादाभाऊ कळमकर, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अथर खान, उपाध्यक्ष समीर पठाण, युवक अध्यक्ष रोहन शेलार, शहर उपाध्यक्ष बाबू कुरेशी, भाऊ खंडागळे, नूर कुरेशी, सोहेल खान,असीर शेख आदींनी स्वागत केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, November 20, 2024

विद्यानिकेतनमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता 
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त नुकताच बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. 
         दरम्यान चि.रक्षित सोळंकी (इ.पाचवी) याने आपले मनोगत व्यक्त केले, तर संगीत शिक्षक दिपक वाघ यांनी उपस्थितांसमोर बालपणातील भावविश्व उलगडणारे गीत सादर केले. तसेच इ.पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांचे मनोरंजनपर शाब्दिक खेळ घेण्यात आले. व इ.पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक चित्रपट दाखविण्यात आला.
 यावेळी सहशिक्षिका ज्योती खंडागळे,गायत्री तांबे, नम्रता फोपसे,साक्षी भणगे,विजेता व्यवहारे,अजय आव्हाड यांनी विनोदी गीतगायन सादर करून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. दरम्यान विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
         यावेळी कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके, व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन सुनंदा थोरात यांनी केले,तर आभार नम्रता फोपसे यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकर बाहूले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Tuesday, November 19, 2024

प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु (गुटखा) विक्री करणारा आरोपी जेरबंद



प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु (गुटखा) विक्री करणारा आरोपी जेरबंद

०६,२९,०१२/- रू. किं. मुद्देमाल जप्त

- नाशिक - प्रतिनिधी -/ माजिद खान -
दि. १६/११/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या व पो.नि. सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली कि, प्लॉट नं. १६, रो-हाऊस मस्जिद ए हसन, श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी, अशोका मार्ग, खोडेनगर, नाशिक येथे इसम नामे इम्तीयाज जाफर तांबोळी, वय- ३८ वर्षे, रा- प्लॉट नं. १६, रो-हाऊस मस्जिद ए हसन, श्रीकृष्ण अपार्टमेंट शेजारी, अशोका मार्ग, खोडेनगर, नाशिक हा त्याचे ताब्यातील वाहन क्रमांक एम. एच. ०५ बी. एल. २०४० हिच्या मध्ये व त्याचे रहाते घराचे पार्किंगमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री, साठा, वितरण, उत्पादन व वाहतूक करणेसाठी प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला सुंगधित पान मसाला याची विक्री करत असल्याचे माहिती मिळाल्याने, सदर आरोपी यास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्वत:चे कौशल्य वापरून शिताफिने पकडुन त्याचे ताब्यात ०२,२९,०१२ /- रूपये किंमतीचा प्रतिबंधित व मानवी सेवनास अपायकारक असलेला सुंगधित पानमसाला विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने सदरचा प्रतिबंधित असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखु असा व वाहन असे एकुण ०६,२९,०१२/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमाविरूद्ध भा.न्या.सं.२०२३ चे कलम २२३, २७४, २७५, १२३, ३ (५) सह अन्न व सुरक्षा अधिनियम कलम २६ (२) (iv) कलम २७ (३) (९) सहवाचन कलम ३(१)(zz)(iv) शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो, मा. श्री. प्रशांत बच्छाव, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.श्री. संदीप मिटके, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वपोनि. सुशिला कोल्हे, स.पो.नि. सचिन चौधरी, स.पो.नि. विशाल पाटील, स.पो.उ.नि. रंजन बेंडाळे, स.पो.उ.नि. देवकिसन गायकर, स.पो.उ.नि. संजय ताजणे, पो. हवा. १७४९ भारत डंबाळे, पो. हवा. १७३१ बळवंत कोल्हे, पो. अं. ८६९ अनिरुध्द येवले, पो. अं.२३३० अविनाश फुलपगारे, पो. अं/ २४२५ योगेश सानप, पो. अं. २४३२ बाळासाहेब नांद्रे, पो. अं. २४३३ चंद्रकांत बागडे, म. पो. शि.२३६६ अर्चना भड यांनी कामगिरी केलेली आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, November 18, 2024

वरचढ होईल मुख्यमंत्री केलं तर म्हणून अजित पवारांना पण...भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट


- मुंबई - प्रतिनिधी - / वार्ता - 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, 
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं आहे. २००४ साली महाराष्ट्राचे नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे दिले असते तर राज्याची अवस्था चिंताजनक झाली असती असं विधान शरद पवार यांनी केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री केल्यावर वरचढ होतात म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री केले नसल्याचा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे. तर शिवसेना फोडण्याचे चांगले कामसुद्धा शरद पवार यांनी केल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
२००४ मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा दावा शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं, असेही शरद पवारांनी म्हटलं. शरद पवारांनी केलेल्या दाव्यावरछगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेदरम्यान छगन भुजबळ यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 

"सुधाकर नाईक आणि शरद पवारांचे मतभेद झाले. त्यांच्या टोकाचे मतभेद झाले होते. त्यावेळी नरसिंहराव यांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. त्यांना असं वाटत असावं की आपण कोणालाही मुख्यमंत्री केलं तर ते आपल्या वरचढ होतात. म्हणून कोणालाच मुख्यमंत्री न केलेलं बरं‌. त्यांनी ना अजित पवारांना ना आर आर पाटलांना किंवा छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं नाही. शरद पवार कधीपासून ज्योतिष्य पाहायला लागले कधीपासून भविष्यात भुजबळांचे काय होणार आहे हे तुम्हाला कळायला लागले," छगन भुजबळांनी म्हटलं.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Sunday, November 17, 2024

वरचढ होईल मुख्यमंत्री केलं तर म्हणून अजित पवारांना पण...भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट


- मुंबई - प्रतिनिधी - / वार्ता - 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, 
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं आहे. २००४ साली महाराष्ट्राचे नेतृत्व छगन भुजबळ यांच्याकडे दिले असते तर राज्याची अवस्था चिंताजनक झाली असती असं विधान शरद पवार यांनी केला आहे. त्यावर आता मुख्यमंत्री केल्यावर वरचढ होतात म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री केले नसल्याचा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे. तर शिवसेना फोडण्याचे चांगले कामसुद्धा शरद पवार यांनी केल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
२००४ मध्ये भुजबळांकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असा दावा शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. छगन भुजबळांना नंतर तुरुंगात जावं लागलं, असेही शरद पवारांनी म्हटलं. शरद पवारांनी केलेल्या दाव्यावरछगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पत्रकार परिषदेदरम्यान छगन भुजबळ यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. 

"सुधाकर नाईक आणि शरद पवारांचे मतभेद झाले. त्यांच्या टोकाचे मतभेद झाले होते. त्यावेळी नरसिंहराव यांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. त्यांना असं वाटत असावं की आपण कोणालाही मुख्यमंत्री केलं तर ते आपल्या वरचढ होतात. म्हणून कोणालाच मुख्यमंत्री न केलेलं बरं‌. त्यांनी ना अजित पवारांना ना आर आर पाटलांना किंवा छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं नाही. शरद पवार कधीपासून ज्योतिष्य पाहायला लागले कधीपासून भविष्यात भुजबळांचे काय होणार आहे हे तुम्हाला कळायला लागले," छगन भुजबळांनी म्हटलं.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================