राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, March 27, 2023

पांजरापोळच्या रक्षणासाठी प्रसंगी मनसे स्टाइल आंदोलन!राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून इशारा आंदोलनात नासिक चे तमाम जनतेचा सहमत सहभाग असून आंदोलन करणे योग्य च ?

(नाशिक) - प्रतिनिधि - वार्ता - नवीन उद्योग येण्याला किंवा त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याला मनसेचा विरोध नाही. किंबहुना 'एमआयडीसीतील पडीक भूखंड, बंद कंपन्यांचे भूखंड; तसेच बेळगाव ढगा परिसरातील शेकडो एकर जागांचा पर्याय उपलब्ध असताना ते टाळून पांजरापोळच्या दोन-अडीच लाख वृक्षसंपदेची कत्तल होऊन उद्योग उभारले जाऊ नयेत. पांजरापोळच्या जागेचे औद्योगिकीकरण होऊ देणार नाही. वेळप्रसंगी त्यासाठी मनसे स्टाइल आंदोलन करावे लागले तरी करणार असल्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर आणि सरचिटणीस अशोक मुर्तडक यांनी
पत्रकार परिषदेत दिला.
सातपूर, अंबड उद्योग क्षेत्रानजीक येणाऱ्या पांजरापोळच्या हरीत जमिनीवर औद्योगिक आरक्षण आणण्यासंदर्भात भाजपाकडून प्रयत्न सुरू झाले असून, माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील त्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
राज ठाकरे यांची नाशिकच्या काही पर्यावरणप्रेमी, नाशिक येथिल तमाम जनता ची मागणी पांजर पोळ हलवण्यात येऊ नये व त्या संदर्भ :हालचाली वर नासिक चे तमाम जनतेचा रक्त खवळा असून मनसे च्या आंदोलनास प्रतिसात सहभागी होऊन देण्याच विचार केला असल्याचे समजते तसेज नाशिक चे जुने जेष्ट वय उर्ध नागरिक यांच्या कडून सुद्धा सांगितलं जात पशु वर्धन पांजर पोळ श्री प्रभु राम चंद्र लक्ष्मण सीता माता वणवास भोगण्यास नाशिक च्या पंचवटी दिर्घ काळातील लाखोच्या संख्यातील नैसर्गिक उक्ष लागवड असलेले खुले थंड हवेचे ठिकाण हिरवट वन परिसरात आले असताना तेव्हाच्या प्राचीन काळा पासून पशु वरदान ठरले मुक्ये प्राण्याचे गाई माता गोरक्ष नंदी चे अनेक युगा पासून शांती पुजा प्रेरणाचे हिंदू संस कृतीचे प्रतीक आहे पांजर पोळ हलवने दुसरी कडे स्थालन करणे चुकीचा निर्णय असून निष्पाप प्राण्यांचे जीवाला त्रास देण्याचा व अत्याचार केलं सारखं उद्देश ठरेलं अशी कडीनिंदा होत असल्याचे समोर आले
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
वनप्रेमींनी भेट घेऊन पांजरापोळ वाचविण्यासाठी साकडे घातले. त्यामुळे ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेत भूमिका जाहीर केली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी शहराध्यक्ष दातीर यांनी एमआयडीसी'च्या क्षेत्रांमध्येच सुमारे २५० ते ३०० एकर जागा पडून असून, त्या जागेचा प्रथम
वापर करण्यात यावा, ही आमची भूमिका असल्याचे सांगितले. "एमआयडीसी'च्या जागा कंपन्या बंद पडल्या म्हणून बिल्डरांना विकल्या गेल्या आहेत. त्यासाठी सर्वप्रथम समिती गठित करण्याची मागणी करताना पांजरापोळसाठी गरज पडल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा दातीर यांनी दिला. पांजरापोळची झाडे कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेत असल्याने त्यांची कत्तल कोणत्याही परिस्थितीत होऊ नये, अशीच आमची भूमिका असल्याचे सरचिटणीस मुर्तडक यांनी सांगितले, यावेळी सलीम शेख, पराग शिंत्रे, अंकुश पवार, मनोज घोडके, सुजाता डेरे आदी उपस्थित होते.
बेळगाव ढगामध्ये शेकडो एकर जागेचा पर्याय
उद्योगांना नवीन जमीन हवीच असेल तर बेळगाव ढगामध्ये खासगी स्वरूपाची २०० एकरहून अधिक जागा पडीक आहे. त्या जागेचा शेतीसाठीही वापर नसून तिथे झाडेदेखील नाहीत. त्यामुळे उद्योगासाठी जागा अधिग्रहीत करायचीच झाल्यास बेळगाव बरयाची जागा अधिग्रहीत करण्याची सूचना सलीम शेख यांनी केली. तर औद्योगिक हबसाठी नाशिकचा ऑक्सिजन हब उद्ध्वस्त होऊ देणार नसल्याचे पराग शित्रे यांनी नमूद केले.
============================================================================================================
कार्यकारी संपादक.भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा.शब्द.✍️✅️🇮🇳.रचना.संकलन...वार्ता.
============================================================================================================
































दोघाने PAYTM कर्मचारी आहे असे भासून व्यावसायिकां ला ठगावले फसवणूक करुन खात्यातून परस्पर पैसे काढले ?

(अहमदनगर) - प्रतिनिधि - वार्ता -
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील एका व्यापार्‍याच्या दुकानात दोन अनोळखी तरूण गेले. आम्ही पेटीएमचे कर्मचारी आहे, असे सांगून बोलबाला केले. त्यानंतर व्यापार्‍याच्या खात्यावरून ऑनलाईन 29 हजार रुपये काढून घेतले. अशाच प्रकारे दुसर्‍या एका व्यापार्‍याच्या खात्यामधुन 10 हजार रुपये काढून घेतल्याचे घटना चे प्रकार घडले प्रकाश शिवाजी नगरे, वय 35 वर्षे, हे राहुरी
तालुक्यातील ब्राम्हणी येथे राहत असून त्यांचे ऑटोमोबाईलचे दुकान आहे. प्रकाश नगरे हे त्यांच्या दुकानात पेटीएम स्कॅनर मार्फत पैसे घेतात. दोन महिन्यापुर्वी त्यांनी पेटीएम साउंड बॉक्स वापरण्यास सुरवात केली होती. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजे दरम्यान दोन अनोळखी इसम प्रकाश नगरे यांच्या
दुकानावर गेले.
आम्ही पेटीएमला कामाला आहे. असे त्यांनी सांगीतले. तेव्हा नगरे यांनी त्यांना सांगितले की, मला पेटीएम बंद करावयाचे आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की, तुमचा मोबाईल माझ्याकडे दया व तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड दया, तुमचे पेटीएम बंद करतो. त्या प्रमाणे नगरे यांनी त्यांना मोबाइल दिला व आधार कार्ड, पॅन कार्ड
त्यांना दाखवले.त्यांनी मला सांगितले की, आज नेटवर्क प्रोब्लेम आहे. तुमचे पेटीएम आज बंद होणार नाही. आम्ही उद्या येऊ, असे बोलुन ते दोघे तेथुन निघुन गेले. त्या नंतर दुसर्‍या दिवशी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी तेच पेटीएम चे दोन अनोळखी इसम दुकानावर आले. त्यांनी पुन्हा प्रकाश नगरे यांचा मोबाइल, आधार कार्ड, पॅन कार्ड घेतले. त्या नंतर त्यांनी सांगितले की, आता तुमचे पेटीएम बंद झाले आहे.
दोन दिवसांनी कंपनीचे लोक येतील त्यांना तुम्ही पेटीएम साउंड बॉक्स, चार्जर देवुन टाका. असे सांगुन तेथुन निघुन गेले. दिनांक 13 मार्च रोजी प्रकाश नगरे यांना पेटीएम कंपनीचा फोन आला व त्यांनी मला विचारणा केली की, तुम्ही पेटीएमचे क्रेडीट प्रोस्पेड पेमेंट घेतलेले आहे. ते पैसे भरले का नाही. त्यावेळी आपली फसवणूक करून खात्यामधुन एकूण 29 हजार रुपये काढून घेतल्याचे नगरे यांच्या लक्षात आले.
दुसर्‍या घटनेत गणेश बन्सी रहाणे, राहणार गोटुंबे आखाडा, ता. राहुरी. यांच्या सप्तश्रुंगी जनरल स्टोअर्स या दुकानातही त्याच दोन अनोळखी भामट्यांनी रहाणे यांना बोलबचन करून त्यांच्या खात्यामधुन 10 हजार रूपये काढून घेतले. या दोन्ही घटनेत खात्यामधुन काढलेली रक्कम ही विनोदकुमार बब्रुवान बनसोडे यांच्या पेटीएमचे प्रोस्पेड खातेवर गेली आहे.
फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर प्रकाश शिवाजी नगरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. 321/2023 भादंवि कलम 420, 419, 34, 66(सी) प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.


------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कार्यकारी : संपादक.भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा.शब्द., ✍️✅️ 🇮🇳.रचना.संकलन...वार्ता.
--------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------
























Sunday, March 26, 2023

चार गावठी पिस्टोल आठ जिवंत काडतुसे दोघांना शिताफने पकड ले गुन्हे अन्वेषण Lcb पथकाची विशेष कारवाई ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता 
तालुक्यातील बेलापुर बुद्रुक येथील बाजारतळ थमध्ये विक्री गैर वेव्हार करण्याचे उद्देशाने चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसे अवैधरित्या बाळगणारे दोन आरोपीना नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १,४५,७००/- रु. किंमतीचे मुद्देमालासह कारागृहात जेरबंद केले आहे.
जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, यांना *जिरो*पोलीस*कडून माहिती मिळाली की, दत्तात्रय डहाळे रा. शिर्डी हा त्याचे साथीदारासह गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी बाजारतळ, बेलापुर बुद्रुक ता. श्रीरामपुर येथे येणार आहेत. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश
नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर सिताराम गोसावी, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश माळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदिप घोडके पोलीस नाईक विशाल दळवी, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस नाईक दिलीप शिंदे, पोलीस नाईक संदिप चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, पोलीस कॉन्स्टेबल रोहित येमुल पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव व चापोहेकॉ उमांकात गावडे, चापोहेकॉ अर्जुन बडे अशांनी मिळून वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने बेलापुर बु ता. श्रीरामपुर येथील बाजारतळ येथे जावुन सापळा लावुन थांबले.
दत्तात्रय डहाळे व त्याचे सोबत एक इसम बेलापुर बु बाजार वेशीतून बाजारतळाकडे पायी येतांना दिसल्याने पथकाची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे दत्तात्रय सुरेश डहाळे (वय ३४) रा. श्रीराम नगर, शिर्डी, सुलतान फत्तेमोहमद शेख (वय २९) रा. महलगल्ली, बेलापुर बु. ता. श्रीरामपुर असे असल्याचे सांगितले. त्यांचे अंगझडतीत एकुण १,४५,७००/- रु. किमतीचा मुददेमाल त्यात चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतूसे असा मुद्देमाल मिळून आला आहे.
याप्रकरणी पोहेकॉ मनोहर सिताराम गोसावी यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म ऍक्ट ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कायदेशिर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मार्फत मुद्दे शिर अनेक महत्वाची माहिती घेऊन अधिक तपास होऊन कारवाई करीत आहे.



Saturday, March 25, 2023

बनावट औषधे विक्री करणाऱ्या साकळी टोळक्यावर मोका लावण्याचा विचार,,,संजय राठोड गैर प्रकार रोखण्यास साठी सॉफ्टवेअर विकसित करणार ?

(मुंबई) - प्रतिनिधि - वार्ता - बनावट औषध विक्री रोखण्यासाठी येत्या काळात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक औषधाची माहिती रोवण्यासाठी या उत्पादकक्रेते ग्राहक यांच्यासाठी एक संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. बनावट औषधे विक्री करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का
लावण्यासोबतच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासाठी विचार करू, असे राठोड म्हणाले.
 ४ हजार ५०० बनावट इंजेक्शनची विक्री करण्यात आल्याची बाब तपासात समोर आल्याचा तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. या चर्चेत आमदार अभिजीत वंजारी, अँड. अनिल परब, भाई जगताप, अॅड. मनीषा कायदे आदींनी उपप्रश्न विचारले. याला उत्तर
देताना मंत्री राठोड म्हणाले, संबंधित हॉस्पिटलमधील औषध विक्री (मेडिकल) दुकानातून घेतलेले पेशी वाढवण्यासाठी दिले जाणारे इंजेक्शन बनावट असल्याचे तपासात उघडकीस आले.
तेथून ७ बनावट इंजेक्शन ताब्यात घेतली. पोलिसांनी बनावट औषधे विक्री साखळीचा शोध सुरू केला. यात १२ विक्रेत्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून ५ जणांचे परवाने रद्द केले आहेत. ही औषध विक्री साखळी दिल्ली
परीयंत असल्याचे समोर आले. तीन आरोपींना अटक केल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात एकूण १ लाख १८ हजार परवाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. तपासणी दरम्यान ८९ हजार किरकोळ विक्रेते २८ हजार ८५५ पाऊक विक्रेते आणि ९९६
उत्पादकांची तपासणी करण्यात आली. यात २ हजार ४५० परवाने निलंबित करण्यात आले असून ५५२ परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री संजय राठोड यांनी मांडले असे सांगण्यात आले आहेत.





















Friday, March 24, 2023

जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे नांदेड मध्ये संदेश ?

( नांदेड ) - वार्ता - जुनी पेन्शन योजना (old pension scheme)काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातच बंद करण्यात आली, . शिंदे-फडणवीस सरकार या योजनेबाबत सकारात्मक असून ती लवकर कशी सुरू होईल, यासाठी प्रयत्न करत आहेत, अशी ग्वाही भाजपचे नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नांदेडमध्ये बोलताना दिली.                                                           
तसेच, राज्यातील निवडणुकांमधील प्रचारात सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला, तो म्हणजे जुनी पेन्शन योजना अवघ्या महिन्याभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनाही या योजनेवरुन केलेल्या वक्तव्यावरुन पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि पंजाब या बिगर भाजप राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.           
गिरीश महाजन म्हणाले, जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून लवकरच ही योजना लागू केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.                                                          
                दरम्यान, जुनी पेन्शन योजना रद्द करून नवी योजना लागू करावी, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आता करत आहेत; परंतु जुनी योजना रद्द करण्याचे काम त्यांच्याच सरकारने २००५ या वर्षी केले होते. माझा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ वगळता राज्यात त्यांचेच सरकार होते. मात्र आता चर्चा घडवून लबाडी करत असल्याची टीका फडणवीसांनी केली. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रश्नाबद्दल मी विधान परिषदेत सविस्तर उत्तर दिले, असेदेखील फडणवीस म्हणाले होते.

प्रभु श्री रामनवमी यात्रा उत्सवाची जय्यत तयारी सुरु श्रीरामपूर ?

(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - वार्ता - श्रीरामपूर शहरातील नागरिकांचे आराध्य दैवत व राज्यात प्रसिद्ध असलेल्या श्रीरामपूरची प्रभू श्रीराम नवमी यात्रा गुरुवार दि. 30 मार्च रोजी सुरू होणार आहे. यात्रेचे हे 94 वे वर्ष आहे. तीन दिवस चालणार्‍या या यात्रा उत्सवाची श्रीराम नवमी यात्रा कमिटीच्यावतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या यात्रेकरिता राज्यातील विविध भागातून छोटे-मोठे व्यवसायिक, रहाट पाळणे त्याचबरोबर भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यादृष्टीने यात्रोत्सव मोठ्या आनंदाने व शांततेत पार पडावा याकरिता श्रीराम नवमी यात्रा उत्सव कमिटी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गुरुवार दि. 30 मार्च रोजी दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव तसेच भजन, कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्याचबरोबर सायंकाळी
6 वाजता रथातून प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. तसेच वॉर्ड क्र. 7 मधील पाटाजवळ फटाक्यांची आतिषबाजी व शोभेचे दारूकाम केले जाते. यावर्षी रथाचे नवीन रंगकाम सुरू असून या रथावर पितळी कलश बसविण्यात येणार आहे. तसेच मंदिरावर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. यात्रा उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्रीराम मंदिर येथे शुक्रवार दि. 31 रोजी सकाळी 10 वाजता ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हिंदू मुस्लिम सिख इसाई प्राचीन दीर्घ काळा पासून एकत्रित सह भागी होत असून गुना गोविंदाणे आनंदिय
रामनवमी यात्राचे प्रतीक ओळख ले जातात  तसेज पुर्ण राज्यात नाव लौकिक आहेत सायंकाळी 7 वाजता श्री शनि देवाची यात्रा व प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर यात्रेच्या तिसर्‍या दिवशी शनिवार दि. 1 एप्रिल रोजी दुपारी भारतातील प्रसिद्ध मल्लांचा कुस्त्यांचा फड हगामा होणार असून त्यानिमित्ताने राज्यातील अनेक नामांकित पैलवान येणारया हगाम्यासाठी विविध भागातून सुमारे 400 पेक्षा अधिक मल्ल येत असतात. त्यांच्या लहान मोठ्या कुस्त्या लावल्या जातात आणि बिदागी दिली जाते. तसेच आशिष बोरावके यांच्यावतीने त्यांचे वडील कै. अण्णासाहेब बोरावके यांच्या स्मरणार्थ व श्रीरामपूरचे प्रथम नगराध्यक्ष रामचंद्र बाळाराम महाराज उपाध्ये यांच्या स्मरणार्थ उपाध्ये परिवारातर्फे आणि श्रीरामपूर नगरपरिषदेच्यावतीने मानाच्या कुस्तीच्या पैलवानांना सुवर्णपदक दिले जाते. श्रीरामपूर शहरात गेल्या 93 वर्षापासून सुरू असलेल्या या श्रीराम नवमी यात्रा उत्सवासाठी शहरातील व परिसरातील व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक, विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक संस्था, लोकप्रतिनिधी, श्रीराम मंदिर ट्रस्ट व शहरवासीयांचे मोठे योगदान लाभत असल्याचे श्रीराम यात्रा उत्सव कमिटीच्या पदाधिकार्‍यांनी माहिती दिली आहे.

----------------------------------------------------
===================================
भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...शब्द संकलन रचना
----------------------------------------------------
===================================

























Thursday, March 23, 2023

महाजन व भुजबळ यांचा योगा योग एकत्र सोबत विमान प्रवास?

(नाशिक) - प्रतिनिधि - वार्ता -
भाजप नेते तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक ते नांदेड आणि नांदेड ते नाशिक असा एकत्र विमानप्रवास केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तथापि, हा प्रवास निव्वळ योगायोग असल्याचे महाजन यांनी म्हटले  तसेज भुजबळ यांनी सुद्धा स्पष्ट आपले मत मांडताना म्हणाले हा एक योगा योग प्रवास आहे यात आश्चरया करणे सारखे काही वेगळा स्वर्थच नाही तसेज पक्ष जरी वेगळा असला तर एक प्रकार माणुसकीचा  असतो राज कारण बाजूला ठेऊन काही वळख मैत्रीचे समदं असु शकतात पक्ष दोगांचा वेग वेगळा असलातरी भेट - बोलण्याला माणुसकीचे समदं असण्यास कुठलेच पक्षाची बंददिलकी नसते हें आपण सर्वाना माहितीच आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यातील विविध भागांत गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.मी सत्तेत व पालक मंत्री असताना ध्रेया एवढेच होते जनतेचे विकास व प्रगती पथ काळजी पूर्वक जवाबदारीने लोकांचे कामे करणे तसेज महाजन ही म्हणाले पक्ष जरी वेगळा वेगळा असला तरी जनता जनार्धन चे विकास कामे करून दैईत्व ठेऊन नाव लोकिक करण्याचे आमचे मानस आहे यवड बोलताच आनंद मय वातावरणात उपास्तीत असल्याले सर्वांचा हाशा चा पीक उभारला होता नांदेडमध्येही गारपिटीने
शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी मंत्री महाजन यांना शनिवारी (दि. १८) तातडीने लातूर आणि नांदेड दौऱ्यावर जायचे होते.
दरम्यान, शनिवारी माजी मंत्री छगन भुजबळ विमानाने अन्य एका कार्यक्रमासाठी लातूरला येणार असल्याचे कळल्यानंतर महाजनही त्याच विमानाने आले. विशेष म्हणजे भुजबळ यांनी आपल्या विमानातील एक जागा कमी करून महाजन यांना सोबत आणल्याने एकमेका साह्य करू, अशी चर्चा रंगली आहे.