राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, January 27, 2025

मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मोहंमदिया एज्युकेशन सोसायटी संचलीत सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अण्ड सायन्स् फॉर गर्ल्स, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दू) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, नगर येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कुरान पठणाने झाली. हम्द व नाआत नंतर संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. शेख अब्दुस सलाम अब्दुल अजीज यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी अरुणा आसिफ अली सामाजिक व शैक्षणिक महिला मंडळाच्या अध्यक्षा शेख फरीदा भाभी तसेच मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे सदस्य मिर्झा नवेद गयासबेग, शेख शरफोद्दीन जैनोद्दीन व इतर सभासद तसेच मुख्याध्यापक नौशाद सय्यद व सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका फरहाना सय्यद व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक वृंद, मासुमिया डी.एल.एड्. कॉलेज (उर्दू) व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यायाचे सर्व प्राध्यापक वृंद इत्यादी उपस्थित होते.
यावेळी प्रा.डॉ. शेख अब्दुस सलाम सर यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाबद्दल "धार्मिक एकात्मता व अखंडता" व भारतीय घटनेबद्दल आपले सखोल व सविस्तर विचार व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थीनींनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले.
सुत्रसंचालन बहार सय्यद यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे नियोजन नाजेमा जुल्फेकार यांनी केले व शेवटी शेख अब्दुल हसीब यांनी सर्वांचे आभार मानले..


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

दारुल उलूम रज़ा ए मेहबूबमध्ये प्रजासत्ताक दिवस देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात जल्लोषात साजरा

दारुल उलूम रज़ा ए मेहबूबमध्ये प्रजासत्ताक दिवस देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात जल्लोषात साजरा

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
प्रजासत्ताक दिन हा दारुल उलूम रज़ा ए मेहबूब येथे मुख्य मैदानावर ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
यावेळी मदरसातील विद्यार्थी गणवेशात शिस्तबद्ध रांगा लाऊन मोठ्या संख्येने उत्साहात शामिल झाले होते.
मदरसाच्या मुख्य मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष सय्यद साबीरअली यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी मुफ्ती शाहजहां कादरी रज़वी व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.मदरसातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय देशप्रेमावर आधारित गीत सादर केले.
मदरशामधील विद्यार्थ्यांना मिठाई वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
याप्रसंगी नगरसेवक आसिफ सुल्तान, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज़, मोहम्मद मुबीन वलीयोद्दीन शेख, खत्मे कादरीया ग्रूपचे सर्व सदस्यसह मुकुंदनगर भागातील काही ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त खलिफा ए मन्सूरे मिल्लत हाजी शेख बाबर चाँद कादरी रज़वी मेहबूबी रब्बानी, शेख नदीमभाई कादरी रज़वी, शेख रफिक केडगाव, सय्यद अलीमुद्दीन, शेख तहनूर कादरी, मौलाना शाहीद कादरी रज़वी, मुन्शी मामू, नदीम रज़ा, अदीब शेख, आफताब शेख, अरबाज़ बागबान, सय्यद अबूज़र, रेहान शेख रिक्षावाले इत्यादींनी प्रयत्न केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


डी पॉल पब्लिक स्कूलमध्येप्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा


डी पॉल पब्लिक स्कूलमध्ये
प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी येथील डी पॉल पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तीने भरलेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ञ आणि समाजसेवक ऍडव्होकेट मोहसिन शौकत शेख यांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
भारतीय राष्ट्रध्वज फडकवून 
कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य फादर शिजो यांच्या हस्ते ध्वज पडकवीत ध्वजास मानवंदना देण्यात आली.
तर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसरातील वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती, संविधानाचे महत्त्व आणि सामाजिक प्रश्नांवर आधारित नृत्य, नाटके आणि भाषणे सादर करून उपस्थितांना थक्क केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
ठरला पुरस्कार वितरण सोहळा
मुख्य अतिथी ऍडव्होकेट मोहसिन शेख यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना आणि विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांचे कौतुक करताना त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मुख्य अतिथी 
ऍडव्होकेट मोहसिन शेख यांनी आपल्या भाषणात दोन महत्त्वाच्या विषयांवर विशेष भर दिला त्यात १) भारतीय संविधानाचे महत्त्व आणि, २) सायबर गुन्हेगारीपासून तरुण पिढीचे संरक्षण
ऍड. शेख त्यांनी संविधानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, “आपल्या देशाच्या प्रगतीसाठी संविधानाचे पालन खुपच अत्यावश्यक तीतकेच महत्वाचे आहे. तरुणांनी संविधानाचे अध्ययन करून त्याचा आदर केला पाहिजे.” तसेच सायबर गुन्हेगारीवर बोलताना त्यांनी आधुनिक युगातील धोके आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांवर प्रकाश टाकला.त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक
कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी शाळेचे प्राचार्य फादर शिजो, उपप्राचार्य सिस्टर दीप्ती मॅडम,अशोक
पवार सर आणि संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडली. त्यांच्या अथक मेहनतीमुळेच कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला. व्यवस्थापनाने सर्व लहानसहान गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवत कार्यक्रम अधिक भव्य आणि आकर्षक बनवला.
कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 सर्वांनी शाळेच्या उत्तम आयोजनाची आणि मुख्य अतिथींच्या मार्गदर्शनाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

देशभक्तीची प्रेरणा आणि नवी ऊर्जा
हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा विद्यार्थ्यांना देशप्रेम, संविधानाबद्दल आदर आणि आधुनिक समस्यांवर जागरूकता यासाठी प्रेरणादायी ठरला. डी पॉल इंग्लिश स्कूलने अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या उच्च स्तर गाठण्याचा आदर्श घालून दिला आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे योगदान अमूल्य ठरले. असा प्रेरणादायी आणि रंगतदार कार्यक्रम अनुभवण्यासाठी उपस्थित सर्वांनी उत्सुकतेने सहभाग घेतला.
यावेळी डी पॉल पब्लिक स्कूल मुख्याध्यापक फादर शिजो,सिस्टर दीप्ती, अशोक पवार सर, आशिष अमोलिक, बाबासाहेबाचे मते, संदीप जाधव, सोनम वधवा, स्मिता कांबळे, करुणा पाटील, हेमा कोहाले,जॉन सर तथा समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट चे संगणक प्रशिक्षक तहेसिन पांडे सर इत्यादी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
=================================
-----------------------------------------------

Sunday, January 26, 2025

डी पॉल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय संविधान स्विकारुन आज २६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्ष पूर्ण झाल्याने हे वर्ष देशभरात हिरक महोत्सव म्हणून साजरे होत आहे, यानिमित्त श्रीरामपूर येथील डी.पाॅल इंग्लिश मीडियम स्कूल च्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर श्री.बाबासाहेब दिघे, ॲडमिनीस्टेटर फा.फ्रॅन्को, मुख्याध्यापिका सि.सेलीन यांनी शालेय ध्वज दाखवून रॅलीला सुरुवात केली. सर्वप्रथम भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यानंतर पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी च्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यानंतर रॅली पुढे शाहिद भगतसिंग चौकात पोहोचली येथे शहीद भगतसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तेथे माजी नगरसेवक श्री. रवी (अण्णा) पाटील व दिपक चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिना निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच ठिकाणी अमर जवान स्मारक येथे सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक यांचे मार्गदर्शन लाभले व त्या ठिकाणी देखील अभिवादन करण्यात आले. शेवटी डी पॉल स्कूलच्या प्रांगणात रॅलीचा समारोप झाला.
रॅली यशस्विरित्या पार पाडण्यात फादर फ्रँको, रवींद्र लोंढे सर, संदिप निबे, गणेश पवार, विकास वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच याच दिवशी आगाशेनगर या ठिकाणी देखील प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी सुनील बोरगे मामा यांनी परिश्रम घेतले.याही फेरीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला डी पॉल स्कूलच्या प्रांगणात सौ. मंगल ताई दुशिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यासाठी सौ.अनुराधा कपिले, शिना कुथुर, प्रतिक्षा कोळगे यांनी परिश्रम घेतले. 
या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲडमिनिस्ट्रेटर फा. फ्रॅन्को मॅनेजर फा. शिजो, मुख्याध्यापिका सि. सेलीन यांचे तसेच श्री रवी सर यांचे देखील अनमोल मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, January 23, 2025

श्रीरामपूर बस डेपोला नवीन २० बस द्या आमदार हेमंत ओगले यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी


आमदार हेमंत ओगले यांची परिवहन
मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी

प्रवासी व विद्यार्थ्यांना होणाऱ्या गैरसोईकडे वेधले लक्ष

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर बस आगारातील अनेक बस गाड्याची अवस्था दयनीय झाली असून यामुळे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने श्रीरामपूर बस डेपोला वीस नवीन बस गाड्या उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. 
       सध्या श्रीरामपूर बस आगारात एकूण ५९ बसेस व चार शिवशाही बस आहेत या सर्व बस जवळपास सुमारे १२ लाख किलोमीटरच्या पुढे आहेत त्यामुळे प्रवाशांच्या विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दहा ते बारा वर्षापासून श्रीरामपूर बस आगाराला नव्याने बस आलेल्या नाहीत. भौगोलिक दृष्ट्या श्रीरामपूर तालुका हा मोठा असून दळणवळणाच्या दृष्टीने तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हे श्रीरामपूर शहरात बसने प्रवास करतात त्यामुळे बसची संख्या देखील अपुऱ्या असून असलेल्या बस देखील जुन्या अवस्थेत आहेत त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे आमदार ओगले यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. 
       यावेळी मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना श्रीरामपूर बस डेपोला नवीन बस गाड्या देण्याबाबत सूचना दिल्याची माहिती आमदार ओगले यांनी दिली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


बेलापूर वि.का.से.संस्थेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने पञकारांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अशोक गाडेकर,भास्कर खंडागळे ,रणजीत श्रीगोड, मारुतराव राशिनकर,सुनिल मुथा,विष्णुपंत डावरे,ज्ञानेश गव्हले,देविदास देसाई, नवनाथ कुताळ,सुनिल नवले,दिलिप दायमा,सुहास शेलार,शरद पुजारी,रुपेश सिकची,आतिष देसर्डा यांचेसह अभिजीत राका, गणेश साळुंके यांचे समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, पंचायत समितीचे माजी सभापती दत्ता कु-हे , लहानुभाऊ नागले पंडीतराव बोंबले,प्रकाश पा. नाईक,विश्वनाथ गवते, चंद्रकांत नाईक, तुकाराम मेहेञे, बाळासाहेब दुधाळ, कलेश सातभाई, सुधाकर खंडागळे,प्रकाश कु-हे , बाळासाहेब लगे,बंटी शेलार, सुरेश कु-हे, शफिक आतार, संजय शेलार, रमेश अमोलिक,अशोक प्रधान, अन्तोन अमोलिक,रमेश शेलार, आयजुभाई शेख, आदि उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

अलमीजान मध्ये कॉपी मुक्त अभियानकॉपी न करण्याची विद्यार्थ्यांना शपथ

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील अलमिजान एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित हजरत मौलाना मख्दूम हुसेन साहब उर्दू हायस्कूल व मख्दूमिया कॉलेज ऑफ सायन्स येथे, शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय परिक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना परिक्षेत कापी न करण्याची शपथ देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिक्षेत कॉपी करू नये व कॉपी करून मिळविलेले यश टिकत नाही तसेच कॉपी केल्याने कोण कोणती शिक्षा होऊ शकते व विद्यार्थ्याचे जीवन कसे उद्ध्वस्त होऊ शकते याची माहिती मुख्याध्यापिका व प्राचार्य सय्यद आरिफा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारी करून अभ्यास करून तणाव मुक्त वातावरणात परिक्षा द्यावी. कॉपीमुक्त जनजागृती अभियान हे २० जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत चालणार असून यामुळे विद्यार्थी व पालकात जनजागृती निर्माण होईल तसेच होणाऱ्या बोर्डाच्या परिक्षेत परिक्षेच्या कारभाराच्या भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात परिक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यास मदत होईल. शासनाच्या या नवीन निर्णयाची अंमलबजावणी अलमिजान संस्थेच्या वतीने करण्यात आली व शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका आरिफ सय्यद, नसिमा सय्यद ,आरिफ शेख, रफिक शेख, इब्राहिम बागवान , फैजिन मुस्ताक, नदीम शेख ,शहानवाज गुलाम व सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
इकबाल काकर (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, January 20, 2025

बेलापूर महाविद्यालयाचे उंबरगाव येथे रासेयोचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
युवा अवस्थेत युवकांनी व युवतींनी आपल्या यशाचे तेज कायम वाढते ठेवले पाहिजे. समाजसेवेची सुरुवात करताना ती आपल्यापासून करावी, मात्र आपण आपल्यासाठी नाही, तर गावासाठी झटून खऱ्या अर्थाने सामाजिक विकास साध्य होईल असे प्रतिपादन उंबरगावच्या सरपंच ऍड. सुप्रियाताई भोसले यांनी केले. 
       श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उंबरगांव येथील विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त भरत साळुंके हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त नंदूशेठ खटोड, , महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. हंबीरराव नाईक,अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विराज भोसले, संचालक सचिन काळे, उंबरगाव विकास सोसायटीचे चेअरमन रवींद्र झरेकर, राजेंद्र ओहोळ,ग्रामस्थ दादा पाटील काळे, बाळासाहेब राऊत, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. अशोक थोरात, प्रा. डॉ. संजय नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. 
         यावेळी प्रा. हंबीरराव नाईक मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपलं गाव हेच आपलं राष्ट्र समजून युवकांनी कार्य केले पाहिजे. तर राजेंद्र ओहोळ म्हणाले की, तुम्ही जिथे जाताल तिथे आपल्या कार्याचा ठसा उमटविला पाहिजे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेतून आदर्श युवक घडावेत. समाजासमोर उभ्या असलेल्या ज्वलंत प्रश्नांची जाण त्यांना असावी तरच राष्ट्राचा विकास घडवून येतो. 
         कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय सूचना प्रा. डॉ. संजय नवाळे यांनी मांडली, तर प्रा. अशोक थोरात यांनी अनुमोदन दिले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत कोतकर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अशोक माने यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी मानले. सदर कार्यक्रमास उंबरगाव ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकवृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या समस्त पदाधिकाऱ्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------=================================

महात्मा गांधी विद्यालयासस्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास स्वच्छ शाळा व सुंदर शाळेचे पारितोषिक नुकतेच प्राप्त झाले आहे.
रयत शिक्षण संस्था उत्तर विभागीय कार्यालयाचे वतीने देण्यात येणाऱ्या मातोश्री शांताबाई पुंजाजी कडू पाटील स्मृती परितोषिक प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयास नुकतेच प्राप्त झाले आहे. 
राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे आयोजित कॉम्रेड पी. बी. कडू पाटील व स्वर्गीय शांताबाई कडू पाटील स्मृती पुरस्कार वितरण समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संजय ठाकरे यांचा स्मृतिचिन्ह, रोख रक्कम आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, उपाध्यक्ष अरुण कडू, सचिव विकास देशमुख, मीनाताई जगधने, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, महेंद्र घरत, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, प्रकाश निकम पाटील, डॉ. राजीव शिंदे, प्रमोद तोरणे आदी जण उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी रावसाहेब म्हस्के, एकनाथ घोगरे, उपप्राचार्य अलका आहेर, प्रभारी मुख्याध्यापक सुभाष भुसाळ, डॉ. शरद दुधाट, नरेंद्र ठाकरे, अश्विनी सोहोनी, शाहिस्ता शेख, योगिता निघुते, श्रीमती कुदळ आदी जण उपस्थित होते. विद्यालयास मिळालेल्या या सन्मानाबद्दल ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*💐✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत प्रसिद्ध सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा


पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) आयोजित व्याख्यानमाला आणि संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलन संपन्न 

धुळे - मोहाडी - प्र.डांगरी -/ प्रतिनिधी -
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमीत्ताने संविधान व सामाजिक परिवर्तनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे यांनी अध्यक्षिय भाषणात बोलताना, " गावचा आणि गाव कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे. कोणताही भेदभाव न करता संविधानाने सर्व सामान्य माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर विराज मान झाला आहे. ही किमया भारतीय संविधानाची आहे. आज संविधानाच्या अमृत महोत्सवादिनानिमित्ताने व्याख्यानमाला, कवी संमेलन, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कौतुक सोहळा, संविधान उद्देशिका घराघरात अशा छान उपक्रमा बरोबर संविधानाची जनजागृती प्रसार आणि प्राचार , शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांनी स्वतःच्या मोहाडी प्र. डांगरी या आपल्या गावात राबवला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
मुंबईला गेल्यावर लोकं गाव विसरतात पण शाम बैसाणे गावाला विसरले नाहीत. गावात छान उपक्रम त्यांनी घेतला आहे. सामजिक कार्य ते चांगले करीत आहेत. आज काल लोकं कौतुक करीत नाहीत पण बैसाणे यांनी चांगली भूमिका घेऊन गावात चांगले कार्य करणाऱ्या गावातील मान्यवरांचा आणि विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आयोजित केला आहे." असे प्रतिपादन केले. 
       भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने पांचपीर ट्रस्ट (मोहाडी), कार्यक्षेत्र भारत आयोजित व्याख्यानमाला बारकु काळू खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली आणि संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलन जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे यांच्या अध्यक्षतेखाली व शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.
      व्याख्यानमालिकेत वक्ते ॲड. नाना अहिरे (प्रसिद्ध वकील आणि समाजसेवक) यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन कार्य , वक्ते पिंटू धनगर (माजी सरपंच) यांनी फुले शाहू आंबेडकर आणि मानवतावादी चळवळ, 
आणि वक्ते बाळासाहेब शंकर बैसाणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान, या विषयानुसार मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी केले तर दुसऱ्या सत्रात संविधान व सामाजिक परिवर्तनाचे कवी संमेलनामध्ये अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे (कल्याण) सहभागी निमंत्रित कवी भटू जगदेव (भिवंडी), मास्टर राजरत्न राजगुरू ( बदलापूर ), अजय भामरे (अमळनेर), शरद धनगर (अमळनेर), शाम बैसाणे ( मोहाडी ), डॉ. सुशील बैसाणे ( मोहाडी), साक्षी खैरनार ( धुळे), पल्लवी चौधरी (मोहाडी ) आदी विषयानुरूप कविता सादर करून सामजिक प्रबोधन केले. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अहिराणी बोलीभाषेतील प्रसिध्द कवी शरद धनगर यांनी केले. मराठी भाषेसह अहिराणी बोली भाषेतील कविता , गजल , लोकगीते सादर करून उपस्थित गावकरी समाज बांधवांचे प्रबोधन केले.
      कवी संमेलनाच्या निमंत्रीत कविंच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांच्या बरोबरच दहावी आणि बारावी मध्ये गावात प्रथम, दुतिय आणि तृतीय क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या गुणवंत मुला - मुलींचा सन्मानपत्र , संविधान उद्देशिका व पुष्पगुच्छ देऊन कौतुक सोहळा संपन्न झाला.
   यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती रतन मोरे, महेश चौधरी, डॉ. सुशिल बैसाणे, (कार्याध्यक्ष पांचपीर ट्रस्ट मोहाडी) ,ॲड नाना अहिरे (सचिव पांचपीर ट्रस्ट मोहाडी), श्रावण अहिरे, तुषार पाटील , सुशीलाताई सोनवणे, विलास गुजर, सुनील पाटील, भाऊराव बैसाणे, हुकूमचंद गुजर, संतोष बिऱ्हाडे, पिंटू धनगर, नाना चौधरी, सागर आखाडे, जगदीश खैरनार, आशाबाई खैरनार, योगिता खैरनार, दिपाली खैरनार, योगेश बैसाणे, राहुल बैसाणे, बाळू बैसाणे, किशोर पवार, मोनू अहिरे, माया अहिरे, प्रकाश बैसाणे, रहीम खाटीक, राजू सोनवणे, आबा माळी, अमृत भोई, सागर बैसाणे, हिम्मत पाटील, महेश चौधरी, पवन बैसाणे, अशोक धनगर, अरुण जैन, गोरख भोई, कैलास पवार, शालिक चित्ते , कैलास चित्ते , आनंदा हरी बैसाणे, मनोज चित्ते, युवराज माळी, हर्षवर्धन बसाणे, आदी सह गावातील ग्रामस्थ होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, January 19, 2025

अवैध दारू दुकान बंद करणेसंदर्भात आमदार अमोल खताळ यांना बानोबी शेखसह सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन


 सोमवारपासून सुरू होणार आमरण उपोषण, उत्पादन शुल्क विभाग आणी पालिका अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात कुरण रोड याठिकाणी अनाधिकृतपणे असलेले सागर वाईन नामक सरकारमान्य देशी दारू दुकान हे गेल्या काही वर्षापासून खोट्या कागदपत्राच्या आधारावर लायसन बनवून व्यवसाय सुरू असल्याचा आरोप सर्वतो कागदपत्राच्या पुराव्यांनिशी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे तथा याबाबतचे आवश्यक सर्व ते पुरावे देखील त्यांनी संबंधित प्रशासनाला व प्रसार माध्यमांना वारंवार दिलेले देखील आहेत,मात्र सदरील अवैध दारु दुकानावर अद्यापही कोणतीत कारवाई केली जात नसल्याने उद्या सोमवार दि.२० जानेवारी २०२५ रोजी पासून आमरण उपोषण देखील त्याच दारू दुकानाच्या समोर कुरण रोड या ठिकाणी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
या संदर्भात त्यांनी आज संगमनेरचे आमदार अमोल खताळ - पाटील यांची प्रत्येक्ष भेट घेऊन त्यांना उपोषणाचे निवेदन देत सदर प्रकरणी आवश्यक सर्व कागदपत्रांचा योग्य पाठपुरावा देखील केला आहे, 
सदर निवेदन स्विकारताना आमदार अमोल खताळ - पाटील यांनी देखील आपण दिलेल्या कागदोपत्राची सर्व ती चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांशी याची योग्य शहानिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासने दिले आहेत, तर पुढे बोलताना अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर शहर व तालुक्यात विविध अवैध व्यवसाय तसेच शासनाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, अश्यांची गय देखील केली जाणार नाही, योग्य वेळी योग्य ती कारवाई केली जाईल असा दिलासा देखील आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे.
सदरचे प्रकरण बघता,
सदरील देशी दारू दुकानाच्या कागदपत्राचा पाठपुरावा करत असताना माहिती अधिकाराच्या अर्जामध्ये नगरपालिकेने उत्तर देताना स्पष्ट शब्दात उल्लेख केलेला आहे की, सदरचे दुकान हे आमच्या कुठल्याही परवानग्या न घेता, आमचा कुठलाही कर न भरता, आमचे कुठलेही ना हरकत दाखले न घेता, आमच्या विभागांमध्ये कुठलीही नोंद न करता केलेला गैरप्रकार - कारस्थान असून या संबंधी आमच्याकडे कुठलाही पुरावा उपलब्ध नाही.
मग धडधडीत असे असताना संगमनेर नगरपालिका व पालिकेचे संबंधित अधिकारी, कर्मचारी सदर दुकान धारक मालकाला का पाठीशी घालत आहेत ?, इतर ठिकाणी अतिक्रमण काढली जातात मात्र या देशी दारू दुकानाचे अतिक्रमण का हटवले जात नाही ? हा देखील मोठा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेसमोर उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे या दुकानाचा सर्व लेखाजोखा हा अहिल्यानगर दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाकडे असून तिथे देखील पाठपुरावा केलेला आहे, मग संगमनेर शहरात विराजमान झालेले दारुबंदी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सहस्रबुद्धे तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे विभागीय दारुबंदी उत्पादन शुल्क अधिकारी सोनोणे हे या दुकानदारास कारवाई करण्याऐवजी का पाठीशी घालत आहेत ? हा देखील मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेस पडलेला आहे. त्यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये अशी देखील चर्चा आहे की, या दुकानाचे अनाधिकृत बांधकाम आणि अनाधिकृत देशी दारू दुकानाला लायसन देणारे या सर्वांचे लागेबांधे असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
असो उद्या सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ सकाळी दहा वाजल्यापासून सदरचे उपोषण हे सध्या अस्तित्वात असलेल्या अवैध दारू दुकानासमोर सुरू होणार असून याबाबत संबंधित प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार अमोल खताळ यांना निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा ह्यूमन इनोवेशन ऑर्गनायझेशन सर्वांसाठी मानवाधिकार अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा बानोबी शेख, सामाजिक कार्यकर्ते जमीर उर्फ बब्बू पाकीजा, आकील पठाण, हाजी अब्दुल कादीर शेख, मुजम्मिल उर्फ गुड्डू भाई शेख आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Saturday, January 18, 2025

विद्यानिकेतन म्हणजे जणू रवींद्रनाथ टागोरांचे शांतीनिकेतन - साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये


विद्यानिकेतन म्हणजे जणू रवींद्रनाथ टागोरांचे शांतीनिकेतन - साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 शिक्षणतपस्वी,देशभक्त, समाजसेवक,साहित्यिक असलेले स्व.ॲड्.रावसाहेब शिंदे यांच्या महादेव मळ्यातील विद्यानिकेतन प्री प्रायमरी स्कूल म्हणजे जणू ज्ञानतपस्वी रवींद्रनाथ टागोरांचे संस्कार आणि शिक्षण देणारे शांतीनिकेतनच होय,असे मत साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील महादेव मळ्यातील ॲड्. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचालित विद्यानिकेतन प्री प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थी विविध क्रीडास्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्रतिष्ठानचे कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. प्राचार्या चित्रा सूरडकर यांनी स्वागत केले तर समन्वयक जया फरगडे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. 
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सांगितले की, बालपण हे ओल्या मातीसारखे असते, बालपणातच संस्कार,ज्ञान, क्रीडा, देशभक्ती आणि समाजनीतीचे बाळकडू त्याला मिळाले पाहिजेत, यादृष्टीने विद्यानिकेतन शाळेतील उपक्रम आणि परिसरसमृद्धी यांचा प्रभावी वापर केला जातो, हे कौतुकास्पद आहे, श्रीमती शशिकलाताई शिंदे, डॉ. राजीव शिंदे, डॉ. प्रेरणा शिंदे, चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, प्राचार्या चित्रा सूरडकर आणि सर्व शिक्षक यांचे नियोजन उपयुक्त आहे, त्यामुळेच ही शाळा जणू शांतीनिकेतन सारखी ज्ञानसंस्कारी शाळा असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले.
प्राचार्य शेळके म्हणाले, बालपण हे संवेदनशील आणि काहीसे निराधार असते, त्यासाठी शाळेतील शिक्षक फार महत्वाचे असतात. असे सांगून त्यांनी प्राचार्य डॉ. गागरे व डॉ. उपाध्ये यांनी कोणत्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले, ते प्रसंग सांगून आता मुलांना खूप सोयी सवलती आहेत, त्यांचा फायदा त्यांना होत आहे, त्याविषयी कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी चंद्रावर जाऊ चला ही कविता सादर करून क्रीडा उपक्रमाचे कौतुक केले.
टीचर प्रिती राठी, सोनाली बनभेरू, प्रियंका पगारे यांनी विविध वर्ग ग्रुपचे बक्षीस वितरण सूचना मांडली. टीचर निकिता गरुड, मनिषा आव्हाड, कल्याणी जोशी, साक्षी गायकवाड, प्रिया दळवी, शुभांगी दुशिंग, अश्लेषा दुशिंग, साक्षी दुशिंग, कोमल बत्तीसे, यांनी उपक्रमांचे नियोजन केले. हर्षदा भांड यांनी छायाचित्रण केले. सूत्रसंचालन जया फरगडे यांनी केले तर प्राचार्या चित्रा सूरडकर यांनी आभार मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
=================================
-----------------------------------------------

विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांची डेंगळे कृषी फार्मला क्षेत्रभेट


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता 
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेती- व्यवस्थापन व उत्पादन या विषयाच्या अध्ययन- अध्यापनाच्या दृष्टीने डेंगळे कृषी फार्म हाऊस,खंडाळा येथे नुकतीच क्षेत्रभेट दिली. क्षेत्रभेटी दरम्यान इ.पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांचा समावेश होता.
         विद्यार्थ्यांना शालेय ज्ञान, मैदानी खेळ, व्यवहारीक ज्ञान या दैनंदिन घटकांबरोबरच आधुनिक कृषी विषयक ज्ञान होणे तितकेच महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्राशी निगडित तत्सम उद्योग-व्यवसाय तसेच आले,हळद,ऊस, शेवगा, गहू,हरभरा,मका अशी विविध पिके,अवजारे, पाळीव प्राणी पालन व्यवसाय व पिकांवर केलेल्या वैज्ञानिक संशोधनांची माहिती व्हावी,या हेतूने क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.दरम्यान विद्यार्थ्यांनी तालुक्यातील खंडाळा येथील जागृत देवस्थान श्री गणपती मंदिर येथे भेट देऊन वनभोजन केले. तसेच डेंगळे फार्म हाऊसचे सर्वेसर्वा सुजित पाटील डेंगळे यांना कृषी विषयक प्रश्न विचारात सेंद्रिय व आधुनिक शेती विषयक महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी विद्यार्थ्यांसमवेत सहशिक्षिका योगिता गवारे, साक्षी भनगे,ज्योती खंडागळे,कोमल पारखे, राजश्री व्हटकर, सोनाली म्हसे,ज्योती गाढे,कावेरी लोखंडे,शंकर बाहुले,मयूर जाधव उपस्थित होते. 
         प्रसंगी क्षेत्रभेटीस विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई.शेळके,व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


मानव सुरक्षा सेवा संघाचा वर्धापन दिन आणी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न


बशीरभाई भुरे यांची सलग पाचव्यांदा मानव सुरक्षा सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संगमनेर येथील व्यापारी असोसिएशनचे च्या प्रशस्त हॉल मध्ये मानव सुरक्षा सेवा संघाचा वर्धापन दिन आणी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे, प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे, पोलिस मित्र दक्षता समीती प्रदेशाध्यक्ष अजीत गाढे, पत्रकार सुरक्षा न्याय समीती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत कराळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संघटनेच्या वतीने बशीरभाई भुरे व चंद्रकांत कराळे, यांना समाज भुषण पुरस्कार, तर राजेश सातपुते यांना आदर्श उद्योजक तसेच भास्कर शिंदे यांना आदर्श अकॅडमी तर सुभान शेख यांना उत्कृष्ट हाड वैद्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा देखील गुणगौरव करुन त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष अमोल राखपसरे म्हणाले की, मानव सुरक्षा सेवा संघ या संघटनेमध्ये देशभरातील जवळपास तीनशे पन्नास हुन अधीक विधी क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत, यामध्ये विधीज्ञ (वकील) तर सेवानिवृत्त मा.न्यायधिश महोदयांचे देखील महत्वाचे योगदान आहेत यासोबतच पोलिस आणी महसूल तथा इतर अशा सर्वच प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी,कर्मचारी यांचे मोठे मोलाचे योगदान आहे.
करीता मानव सुरक्षा सेवा संघ ही संघटना केवळ राज्य पातळीवर नव्हेतर राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असुन या संघटनेच्या माध्यमातून सामाजातील रांजले - गांजले, अन्यायग्रस्तांना उचित न्याय मिळवून देण्याचे कार्य संघटनेमार्फत केली जात असल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,
मानव सुरक्षा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष बशीरभाई भुरे यांचे कार्य सामाजासाठी खुपच पोषक ठरलेले असुन राज्यभरात कोणत्याही ठिकाणाहून अन्यायग्रस्तांच्या साधा कॉल जरी आला तरी त्यास योग्य मार्गदर्शन करत त्याच्या समस्या सोडविण्याचा ते सातत्याने प्रयत्न करुन त्या सोडविण्यासाठी वेळ प्रसंगी क्षणाचा विलंब न करता प्रत्यक्ष त्या अन्यायग्रस्तांच्या गावी त्या स्पॉटवर पोहोचून कितीही जटील समस्या असल्यातरी त्या सोडविण्यासाठी कसोसिने प्रयत्न करत अशा अनेकांना उचित न्याय मिळवून देण्याकामी श्री.भुरे यांनी सातत्याने मोठे योगदान दिले असल्याने त्यांची सलग पाचव्यांदा प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करताना मोठा आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार संजय नवले पत्रकार अमोल वैद्य जेष्ठ साहित्यिक व्यगचित्रकार अरविंद गाडेकर आठवले गट तालुका अध्यक्ष आशिष शेळके संगमनेर शहर अध्यक्ष कैलास कासार समाजभूषण परशराम पवार सर माजी सरपंच मधुकर मुंतोडे राष्ट्रीय सचिव भारत म्हसे राष्ट्रीय सदस्य भास्कर चकोर जेष्ठ सदस्य नरसाय्या पगडाल आदी मान्यवर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, January 17, 2025

पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातेमा शेख जयंती निमित्त मोफत सर्वरोग तपासणी व निदान आरोग्य शिबीर संपन्न


समाजात मोठ्या प्रमाणात मोफत आरोग्य शिबीरांची गरज - डॉ.अशपाक पटेल

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
देशात रुग्णांची व आजारांची संख्या मोठी आहे. त्या प्रमाणात आरोग्य सेवांची कमतरता आहे. लोकांचा राहणीमान खानपान मध्ये अनियमित्तामुळे आजारांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे.महागडया औषधोपचारांमुळे मध्यमवर्गीयांना ते अवाक्याचे बाहेर जात आहे. त्यामुळे आज समाजात मोफत आरोग्य शिबिरांची मोठी गरज निर्माण झाली आहे. असे प्रतिपादन पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे डॉ.अशपाक पटेल यांनी केले. 
किंग्जगेटरोड येथील पटेल स्पेशालिटी क्लिनिक व अलकरम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातेमा शेख यांच्या जयंतीनिमित्त मोफत सर्वरोग निदान, रक्तातील साखर व एच बी ए वन सी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.अशपाक पटेल, डॉ.जहीर मुजावर, शेरअली शेख, तौफिक तांबोळी, समीर सय्यद, वसीम शेख आदी उपस्थित होते. या शिबिराचा मोठ्या प्रमाणात गरजूंनी लाभ घेतला. याप्रसंगी डॉ. अशपाक पटेल यांनी प्रत्येक रुग्णांना त्यांचे आजारा संदर्भात चांगल्या प्रमाणे मार्गदर्शन केले. 
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ.जहीर मुजावर म्हणाले की, आपल्याकडे रोज काही ना काही दिवस साजरे केले जातात. अशावेळी समाजाच्या गरजा ओळखून त्या दिवसांना ते गरजूंना गरज असलेले उपक्रम राबविले पाहिजेत. 
प्रस्ताविक करताना अलकरम सोसायटी चे तौफिक तांबोली म्हणाले की अलकरम हॉस्पिटलच्या माध्यमातून वर्षभर नियमित ५० टक्के दरामध्ये रुग्णांना रक्त तपासण्या करून देतो. व कमीत कमी खर्चात लोकांना रुग्णसेवा ही पूर्वीत असतो. भविष्यात पण असेच अनेक उपक्रम राबविण्याचे आमचे माणस आहेत असे सांगितले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेरअली शेख यांनी केले. तर आभार समीर सैय्यद यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयेशा सय्यद, शिफा शेख, सादिया शेख व अलकरम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Thursday, January 16, 2025

बेलापूर महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे या होत्या. यावेळी प्रथम सत्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल दराडे यांनी "स्त्रियांचे शारीरिक मानसिक स्वास्थ्य याबाबत बोलताना  त्या म्हणाल्या की, स्त्रियांचे मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी आहार , व्यायाम व दिनचर्याला महत्त्व दिल्यास कुठल्याही समस्या शक्यतो उद्भवत नाही. यानंतर प्रा. डॉ. मनोज तेलोरे यांनी द्वितीय सत्रात "स्त्रियांची प्रेरणास्थाने"या विषयावर व्याख्यान झाले, त्यांनी त्यात महात्मा फुले , सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती रानडे ,रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, डॉ . बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पद्मश्री रहीबाई पोपेरे अशा आदर्श स्त्री पुरुषांची प्रेरणास्थाने विशद केली.
तर तृतीय सत्रात अकबर शेख, ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक यांनी" स्त्रियांचे स्वसंरक्षण आणि प्रशिक्षण" यावर कराटेचे प्रात्यक्षिके घेतली त्यात विशेषता लाठीकाठी , तलवारबाजी, आत्मसंरक्षण, तायक्वांदो, बॉक्सिंग , स्वसंरक्षणार्थ मार्शल आर्ट यांचा समावेश होता. 
यावेळी कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना प्रा.रूपाली उंडे यांनी मांडली प्रा. चंद्रकांत कोतकर यांनी अनुमोदन दिले प्रमुख पाहुण्यांचा परिचय व निर्भय कन्या कार्यशाळेचे प्रास्ताविक विकास अधिकारी डॉ. संजय नवाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर गटकळ आणि डॉ. बाबासाहेब पवार यांनी केले तर आभार अमृता गायकवाड यांनी मांडले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमास प्रा. प्रकाश देशपांडे डॉ.विनायक काळे प्रा. विलास गायकवाड, डॉ. अशोक माने, प्रा. सतीश पावसे, डॉ. बाळासाहेब बाचकर डॉ. विठ्ठल सदाफुले, प्रा.सुनील विधाते, डॉ. विठ्ठल लंगोटे प्रा.स्वाती कोळेकर प्रा.ओंकार मुळे, प्रा. सुनिता पठारे प्रा.गोरखनाथ साळवे त्याचबरोबर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदेश शाहीर, आनिता चिंचकर, कृष्णा महाडिक, संदीप चौधरी, नानासाहेब तुवर, अनिल पवार,रामेश्वर पवार, अण्णा ओहोळ आदींनी परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


राज्यभरातील होमगार्ड बांधवांचे कार्य कौतुकास्पद ; होमगार्ड सैनिकांप्रती सकारात्मक भूमिका घेणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 - अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
राज्यभरातील होमगार्ड बांधवांचे कार्य कौतुकास्पद असून लवकरच होमगार्ड सैनिक यांच्या हिताचे निर्णय घेऊन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिर्डी या ठिकाणी भाजपा चे राज्यस्तरीय अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपाचे राज्यभरातील आमदार व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
होमगार्ड सैनिकांना ३६५ दिवस काम मिळावे तसेच मानधन भत्ता वेळेत मिळावे, ड्रेस कोड मध्ये सुधारणा करण्यात यावी, पुनर्नियुक्ती पद्धत रद्द करण्यात यावी, जिल्हा समादेशक पद सैनिकामधूनच भरण्यात यावे,निवृत्तीनंतर सैनिकांना किमान १० हजार रुपये 
पेन्शन स्वरूपात मिळावी , अशा अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय राज्य नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री श्री मुरलीधर (अण्णा ) मोहोळ यांना सुपूर्त करण्यात आले. प्रसंगी श्रीरामपूर येथील पत्रकार राजेंद्र देसाई यांनी १८० दिवसांचा आदेश त्वरित पारित करावा तसेच पदोन्नतीबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी करत, राहाता तालुका समादेशक संदीप शिंदे यांनी मानधन वेळेवर मिळावे.२०१६ पासुनची फरकाची रक्कम त्वरीत वितरीत करावी, अशी विनंती केली. तर अनंत गोडसे यांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करून होमगार्ड बंधू - भगीनींच्या हिताचे निर्णय घ्यावे यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी केली.
 प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भालेराव,प्रसाद तुरकणे आदी.उपस्थित होते. यावेळी भाजपा चे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या विशेष प्रयत्नातून शिर्डीत भाजपाचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बंडू शिंदे तसेच सर्व सहकारी कार्यकर्ते प्रयत्नशील होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई 
(वडाळा महादेव) 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, January 15, 2025

साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते मानवतेचा प्रकाश काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न


साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते मानवतेचा प्रकाश काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न 

- कळवा ठाणे - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बौध्द साहित्य प्रसार संस्था केंद्रीय कार्यकारणी संचलित महाराष्ट्र समितीव्दारा आयोजित मानवतेचा प्रकाश या काव्य संग्रहाचे कळवा येथील नालंदा बुध्दविहारात मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी त्यांनी "मानवतेचा प्रकाश हा काव्य संग्रह हा आशावादी व मानवाच्या हितासाठी असून समाजाला प्रकाशमान करील. हा काव्यसंग्रह प्रकाशीत करताना मला जो आनंद झाला आहे तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही ." असे असे प्रतिपादन केले.
     यावेळी प्रमुख पाहुणे राजरत्न अडसुळ यांनी , "नवोदीत कविंना मिळालेला एक प्लॅटफॉर्म प्रा. शुक्राचार्य गायकवाड सरांनी बौध्द साहित्य प्रसार संस्थेच्या माध्यमातून निर्माण केल्याने त्याची एक प्रचिती म्हणजेच मानवतेचा प्रकाश हा काव्यसंग्रह होय". असे आपले मत यावेळी व्यक्त केले. या पुस्तकावर बोलण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून अॅड. धम्मकिरण चन्ने व भीमराव रायभोळे यांनी आपले मोलाचे विचार मांडून पुस्तकावर प्रकाश टाकला. मानवतेचा प्रकाश या काव्यसंग्रहाची प्रकाशक म्हणून प्रकाशकीय भुमीका मांडताना भटू जगदेव यांनी, "पैसे अभावी जे पुस्तक रूपाने साहित्य काढू शकत नाहीत त्यांच्यासाठी अनित्य प्रकाशन मार्फत वाजवी दरात ना नफा न तोटा, सबबवर पुस्तक छापण्याचे ठरविले आहे " असे यावेळी सांगितले तर संपादकीय भुमीका नवनाथ आनंदा रणखांबे यांनी मांडताना, " लिहित्या हाताला प्रेरणा, प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी साहित्यिक नवी पिढी घडवण्याचे आणि मराठी साहित्य विश्व समृद्ध करण्यासाठी मानवतेचा प्रकाश या पुस्तकाची निर्मिती आम्ही केली आहे. जास्तीत जास्त नवोदित आणि ज्येष्ठांच्या साहित्याला विनामूल्य "मानवतेचा प्रकाश" या काव्यसंग्रह ग्रंथाच्या रूपाने संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे " असे मत व्यक्त केले. या प्रसंगी मान्यवरांचा सन्मानपत्र, शाल , पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
      ४५ मान्यवर कवींनी तसेच समाजातील सर्व स्तरावरील मान्यवरांसहित बौध्द साहित्य प्रसार संस्था पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नालंदा बुध्द विहार खच्चुन भरला होता. या सोहळ्याचे सूत्रसंचलन आशा नवनाथ रणखांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाम बैसाणे यांनी मानले . 
      दुसऱ्या सत्रात संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात ४७ मान्यवर कवींनी सहभाग घेतला घेतला. 
या प्रसंगी मारुती कांबळे , शाम बैसाणे, वृषालीताई करलाद, मनिषा मेश्राम, अतुल शेलार, शैलेश कर्डक, शाहिर बाळासाहेब जोंधळे, चंद्रकांत शिंदे, कामीनी धनगर, विवेक मोरे, डॉ. सुरेंद्र शिंदे, के. पुरुषोत्तम, ऍड. श्रीकृष्ण टोबरे, विजय ढोकळे , ऍड. नेताजी कांबळे, कांतीलाल भडांगे, वसंत हिरे, सुनिल मोरे, रूपाली शिंगे, सुभाष आढाव, वृशाली माने, प्रा. अरूण अहिरराव, सुरेखा गायकवाड, अकबर इसमाईल म्हमदुल, सदा भांबुळकर, धनंजय सरोदे, साहेबराव कांबळे, बबनदादा सरवदे, गजानन गावंडे, मास्टर राजरत्न राजगुरू, नवनाथ रणखांबे, भटू जगदेव, ऍड. धम्मकिरण चन्ने, व रविकिरण मस्के व प्रा. शुक्राचार्य गायकवाड इत्यादी कवींनी संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयानुरूप आंबेडकरी मूल्ये जपणाऱ्या कविता, गझल सादर केल्या. सर्व कवींना सन्मानपत्र, ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले. कविसंमेलनाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविकिरण मस्के यांनी केले तर आभार मनिषा मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौध्द साहित्य प्रसार संस्था व बौध्द विकास मंडळांनी अथक परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, January 10, 2025

चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला


चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. नगर न्यायालयातील विशेष दिवाणी दावा १२ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या तडजोडीप्रमाणे ताहेर सिराजोद्दीन पटेल यांनी फारूक हबीब शेख आणि अल्ताफ ताजोद्दिन इनामदार यांना रक्कम ८० लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. या रकमेपोटी धनादेश वटला नसताना चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी पटेल यांनी चेकचा गैरवापर होवू नये, यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
ताहीर पटेल यांनी फारूक हबीब शेख आणि अल्ताफ ताजोद्दिन इनामदार यांना समजूत करारनामा लिहून दिलेला होता. समजूती करारनाम्याप्रमाणे शेख आणि इनामदार यांना प्रतिवादी करिता रक्कम २० लाख मिळाले होते. उर्वरित राहिलेली ६० लाख रक्कम हे ताहीर पटेल यांनी धनादेश प्रत्येकी २० लाख चे न्यायालयात दाखल केलेल्या प्रोसेस प्रमाणे दिली होती. परंतु ताहेर पटेल यांनी शेख आणि इनामदार यांच्यासोबत परत ३ जुलै २०२४ रोजी पुरवणी समजूत करारनामा करून ५ लाख रुपये दिले. उर्वरित राहिलेले ५५ लाख १३ ऑगस्ट पर्यंत देण्याचे मान्य व कबूल केले होते. त्याबाबत धनादेश दिलेले होते. सदरचे धनादेश प्रतिवादी यांनी वटवण्यासाठी टाकला असता, तो न वटता परत आला व ठरल्याप्रमाणे रक्कम अदा झाली नव्हती.
म्हणून ताहेर सिराजोद्दीन पटेल यांनी सदर चेक न वाटल्यामुळे स्वतःवर चेक बाउन्स व फसवणुक सारखी केस होऊ नये, म्हणून नगर येथील १२ वे सहदिवानी न्यायाधीश यांच्या न्यायालयात विशेष दिवाणी दावा दाखल केला. सदर दाव्यामध्ये वादी म्हणजे ताहेर पटेल यांनी त्यांनी दिलेल्या चेकचा गैरवापर होऊ नये, म्हणून अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून प्रतिवादी शेख आणि इनामदार यांच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन निशाणी पाच वर केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. शेख व इनामदार यांच्या वतीने ॲड. हाजी रफिक बेग, ॲड. रियाज बेग व ॲड. अयाज बेग यांनी काम पाहिले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार जी.एन.शेख अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रब्बीचे एक तर उन्हाळ्यासाठी तीन आवर्तन द्या आमदार हेमंत ओगले




कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली मागणी

शहरासाठी लागणारे अतिरिक्त आवर्तनाकडेही मंत्री महोदयांचे वेधले लक्ष

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 रब्बी साठी एक आवर्तन आणि उन्हाळी हंगामाचे तीन आवर्तनाची मागणी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. 
     भंडारदरा प्रकल्प (प्रवरा कालवे) रब्बी व उन्हाळी हंगाम सन २०२४ - २५ च्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठकीचे आयोजन इरिगेशन बंगला, लोणी या ठिकाणी करण्यात आले होते. त्याप्रसंगी आमदार हेमंत ओगले यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे आवर्तनाबाबत निवेदन देऊन मागणी केली आहे.
      सध्या भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून मुबलक प्रमाणात पाणीसाठा देखील आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेने केंद्रशासन पुरस्कृत सुधारित पाणीपुरवठा योजना अमृत २.० चे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील दोन तलावांपैकी मातीच्या साठवण तलावाचे विस्तारीकरणाचे काम चालू झालेले आहे त्यामुळे एका साठवण तलावाच्या आधारे शहराची दैनंदिन पाणीपुरवठ्याची गरज भागविणे आवश्यक असल्याने शेतीच्या आवर्तना व्यतिरिक्त खास बाब म्हणून आवर्तन सोडताना प्रवाह बंद कालावधी हा पंधरा दिवसापेक्षा जास्त नसावा जेणेकरून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणे सोयीचे होईल अशी मागणी आमदार ओगले यांनी केली आहे. 
       आवर्तन सुरू असतानाच गाव तळे व प्रवरा नदीवरील केटी बंधारे भरून मिळावे ज्यामुळे शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. 
          यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचा विविध सेवाभावी संघटनांकडून सत्कार !


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण (सर) यांची श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नजीरभाई शेख मित्रमंडळ, दोस्ती फाऊंडेशन,फातेमा वेलविशर्स समूह आणी मानवता संदेश फाउंडेशन
यांच्या अशा विविध सेवाभावी संस्था, संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार सलिमखान पठाण (सर) हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व असुन ते पत्रकारीतेचे गाढे अभ्यासकही आहेत, विविध वर्तमानपत्रातून माहे रमजानूल मुबारक महिन्यात प्रसिद्ध होणारी त्यांची रमजानूल मुबारक ही लेखमालेच्या माध्यमातून ते राज्यभर सर्वांना सुपरिचित आहेत. तसेच विविध प्रसार माध्यमातून विविध विषयांकित ते सातत्याने सामाजाभिमुख लेख बातम्यांच्या माध्यमातून मोठी जनसेवाही करत आहेत, शिक्षकी पेशा असल्याने सर्वभौम असा त्यांचा गाढा अभ्यास आहेच शिवाय पत्रकारितेत देखील त्यांचे मोठे महत्वाचे स्थान असल्याने त्यांची मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.यामुळे अनेक नवोदित पत्रकारांना मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहेत


करीता विविध सामाजिक संस्था,संघटनेंच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तथा त्यांच्या भावी उज्वल कार्यास हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या.
या प्रसंगी सलिमखान पठाण (सर) यांचा सत्कार करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नजीरभाई शेख,दोस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख (सर) मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष जाकीर सय्यद,अभियंता एस.के. खान, बुऱ्हाण भाई जमादार,केंद्रसमन्वयक फारूक पटेल,
स्वस्तधान्य दुकान असोसिएशनचे सचिव रज्जाक पठाण,नसीर सय्यद सर,फिरोज पठाण सर, अन्वर शेख, समीर शेख, साजिद शेख,फिरोज पठाण साबणवाले,चांदभाई पठाण, सैंदाणे आदी फातेमा वेलविशर्स समूह,मिल्लत नगर मित्र मंडळ व मानवता संदेश फाउंडेशन सदस्य उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, January 9, 2025

सोशल मीडिया व इंटरनेट वापरताना मर्यादा ओळखा - पो. नि. देशमुख


 काचोळे विद्यालयात सायबर क्राईम विषयी पो.नि.देशमुख यांचे मार्गदर्शन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 रयत शिक्षण संस्थेचे येथील डी.डी.कचोळे माध्यमिक विद्यालयात, रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत सायबर क्राईम याविषयी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम विषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे व ५७ महाराष्ट्र बटालियन श्रीरामपूर सेक्टरचे मेजर उपस्थित होते.
         विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन देशमुख म्हणाले की,इंटरनेट वापरून केलेले गुन्हे हे सर्व सायबर क्राईम या संकल्पनेत येतात. दुसर्‍याच्या बँक अकाउंट मधून इंटरनेटचा वापर करून पैसे काढणे, इतरांच्या भावना दुखावणारे संदेश पाठवणे, प्रक्षोभक माहिती शेअर करणे, दुसऱ्याच्या माहितीचा व फोटोचा गैरवापर करणे, इतरांना धमकवणे अशा प्रकारचे सर्व गुन्हे सायबर क्राईम आहे. आपण अशा परिस्थिती ताबडतोब पोलिसांना संपर्क करणे. आपली माहिती इतरांना शेअर न करणे, अनोळखी लिंकला प्रतिसाद न देणे, सोशल मीडियावर आलेली माहिती पडताळून पाहणे, इंटरनेट व सोशल मीडिया वापराबाबत मर्यादा ओळखणे यासारखी सतर्कता आपण बाळगणे आवश्यक आहे. इंटरनेट वापराबाबत आपण साक्षर होणे ही काळाची गरज आहे.आजच्या काळात होणारे सायबर गुन्हे हे गुन्हेगारीचे नवे रुप आहे, याबाबत इंटरनेट वापरणाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे असेही ते म्हणाले.
        याप्रसंगी नितीन देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला त्याचबरोबर देशाचे सुजान नागरिक घडवण्यासाठी विद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक नानासाहेब मुठे यांनी केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

वाचन संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य दिवाळी अंकांनी केले - माजी राज्यपाल राम नाईक


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
संपूर्ण जग डिजिटल तंत्रज्ञानाच्या विळख्यात गुरफटलेले असताना वाचन संस्कृती लयास जाती की काय अशी भीती असताना ती टिकवण्याची जबाबदारी ही दिवाळी अंकांनी यशस्वीपणे पार पडली आहे. असे प्रतिपादन माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने पत्रकार दिन व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला होता.त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रमुखअतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, डॉ. सुकृत खांडेकर, तुळशीराम भोईटे, अनिल रोकडे, उद्योजक सागर जोशी होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी केले. 
याप्रसंगी बोलताना राम नाईक म्हणाले ग्रामीण भागातून उत्कृष्ट असा वर्ल्ड सामना चा दिवाळी अंक बघून मनस्वी खूप आनंद झाला,अशा दिवाळी अंकांमधून वाचनाची गोडी निर्माण होऊन तणाव मुक्त जीवन जगण्याचा मार्ग यातून सापडतो. वर्ल्ड सामना दिवाळी अंकाला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन संपादिका सौ.स्नेहलता प्रकाश कुलथे यांचा संस्थेने केलेला हा सन्मान योग्यच आहे.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले बाळशास्त्री जांभेकरांना अपेक्षित अशी पत्रकारिता खरंच पत्रकार करीत आहेत का ? असा प्रश्न आजच्या पत्रकारांकडे बघून पडतो. बाळशास्त्री जांभेकरांनी सत्याचा शोध व समाज वास्तवाचे प्रतिबिंब आपल्या दर्पण या वृत्तपत्रातून मांडले आहे समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी आवाज उठवला. आजचे पत्रकार हे रामा सारखे आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिलेले नसून वाल्या कोळया सारखे झाले आहेत. हे योग्य आहे का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर तुळशीराम भोईटे डॉ. पारकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा विनोदी दिवाळी अंकाचा राज्यस्तरीय पुरस्कार माजी राज्यपाल व केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांच्या शुभहस्ते स्वीकारताना वर्ल्ड सामनाच्या संपादिका सौ .स्नेहलता प्रकाश कुलथे समावेत ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, दैनिक पुढारी न्युज चैनल चे तुळशीराम बोठे, एकनाथ बिरवटकर, सौ. संगीता सुरेश नागरे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -9561174111
----------------------------------------------
=================================




राजकारणाबरोबरच समाजकारणातून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करा - आ. विठ्ठलराव लंघे पाटील


एकता पत्रकार संघाच्यावतीने नेवासा फाटा येथे पत्रकार दिन व पुरस्कार वितरण समारंभ थाटात संपन्न

- नेवासा - प्रतिनिधी -/ वार्ता -
 पत्रकारितेला आता काळानुरुप प्रिंट मीडिया बरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मोठे आव्हान असून हल्लीच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात समाजातील घडामोडींची क्षणार्धात बित्तंबात्तमी देत सामाजिक जागृता निर्माण करण्याचे काम पत्रकार करत असून पुर्वीच्या काळात खेडे गावात सकाळी वृत्तपत्र घरी येऊ पर्यंत जिल्ह्यातील घडामोडी सर्वसामान्य जनतेला समजत नव्हत्या आता माञ पत्रकारितेत मोठे बदल होवून जलदगतीने सामाजिक घडामोडींचे आकलन पत्रकारितेच्या माध्यमातून होत असते त्यामुळे पत्रकारांनी या सर्व स्पर्धेच्या युगात वास्तवतावादी पञकारिता करुन राजकारण आणि समाजकारणात लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करावा असे आवाहन नेवासा तालुक्याचे शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी सोमवार (दि.६) रोजी झालेल्या नेवासा फाटा येथील ञिमुर्ती शैक्षणिक संकुलात आयोजित नेवासा तालुका एकता पञकार संघाच्या पञकार दिन व पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलतांना केले.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नेवासा फाटा येथील श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महाराज,श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, नेवासा पोलीस ठाण्याचे निरिक्षक धनंजय जाधव, ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील, मुकिंदपूरचे माजी सरपंच दादा निपुंगे, नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, समर्पन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे ज्येष्ठ नेते रामराव पाटील भदगले, कृषी शास्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे, गणेशराव लंघे, भाजपाचे नेते अंकुशराव काळे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष रावसाहेब घुमरे, एकता पञकार संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
      
         नेवासा तालुका एकता पञकार संघाच्यावतीने आयोजित पञकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेञात उत्तुंग भरारी घेत शिक्षणाची जिल्ह्यासह परजिल्ह्यात मोठी दालने उभी करुन ज्ञानार्जन करणाऱ्या ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांना शिक्षण महर्षी पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
 तर पञकारिता क्षेञात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भेंडा येथील पत्रकार कारभारी गरड, घोडेगांव येथील पत्रकार दिलीप शिंदे तर बालाजी देडगांव येथील पत्रकार बन्सी एडके यांना दर्पण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
    
      यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील बोलतांना पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत जनतेने मला निवडून दिल्यानंतर आता अनेकांच्या मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे आपण केवळ निवडणुकी पुरतेच राजकारण करुन स्व. वकिलराव अण्णा लंघे यांच्या जुन्या पिढीचे संस्कार जपत सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करणार असल्याची ग्वाही यावेळी बोलतांना त्यांनी दिली. तालुक्यातील सर्वच पञकार आमचे मिञ असून पञकारांनीही मला सदैव नेहमीच साथ दिलेली असून आता विकास कामे करण्यासाठी पञकारांनी मार्गदर्शकाची भूमिका बजाविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी पञकारांना केले.
         यावेळी बोलतांना श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनिलगिरी महाराज यांनी आमदार विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी धक्क्यावर धक्के घेत विधानसभा निवडणूकीत विजयी मिळविलेला आहे,
 ते पहीले क्लिनर होवून मग ड्रायव्हर झाल्यामुळे त्यांना कामाचा मोठा अनुभव असून त्याचा फायदा विकास कामाबाबत समाज घटकाला नक्कीच होणार असल्याचे गौरोद्गार यावेळी बोलतांना महंत सुनिलगिरी महाराज यांनी काढले.
     
       याप्रसंगी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी म्हणाले की, हल्लीच्या युगात खुन (हत्या) यापेक्षा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक झपाट्याने वाढत असल्याने मोठा चिंतेचा विषय ठरत असल्याचे सांगत वास्तवात याचे स्पष्टिकरण आणि अनेक कारणे विषद करुन प्रबोधन केले. तर पोलीस निरिक्षक धनंजय जाधव, ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाचे संस्थापक साहेबराव घाडगेपाटील यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
        
याप्रसंगी पञकार राजेंद्र वाघमारे, संदिप गाडेकर, चंद्रकांत दरंदले, अशोक पेहरकर, विनायक दरंदले, इकबाल शेख, युनुस पठाण, मकरंद देशपांडे, नामदेव शिंदे, गणेश बेल्हेकर, अभिषेक गाडेकर, सौरभ मुनोत, सचिन कुरुंद, सुधाकर होंडे, बाळासाहेब पंडीत, राहूल कोळसे, विकास बोर्डे, विलास धनवटे, सोमनाथ कचरे, देविदास कचरे, मोहन शेगर, अशोक भुसारी, राहूल चिंधे, संतोष सोनवणे, विठ्ठल उदावंत यांच्यासह तालुक्यातील पञकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, सामाजिक कार्यकर्ते महेश कांडके, शहर कॉंगेसचे अध्यक्ष अंजूम पटेल यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेञातील मान्यायवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन सुधीर चव्हाण यांनी केले तर आभार दादासाहेब निकम यांनी मानले. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदिप गाडेकर, राजेंद्र वाघमारे, अशोकराव पेहरकर, चंद्रकात दरंदले, सतिष उदावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार संदिप गाडेकर - नेवासा 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

देशात विचारी,सदाचारी पिढी घडविण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक - भाषामंडळ संचालक - प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे


देशात विचारी,सदाचारी पिढी घडविण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक - भाषामंडळ संचालक - प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे

किसनवीर महाविद्यालयात वाचन कौशल्य व तंत्र विकास कार्यशाळेचे प्रभावी आयोजन 

वाई (जि.सातारा) प्रतिनिधी:
वाचन हेच जीवन आहे. शरीराचे पोषण करण्यासाठी जशी अन्नाची गरज असते, तसे मनाचे ,मेंदूचे पोषण करण्यासाठी बहुविध स्वरूपाच्या वाचनाची गरज आहे. वाचनाने माणूस घडतो. जीवन उदात्त व उन्नत होण्यासाठी स्वहितकारी व समाजहितकारी वाचन आवश्यक असते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आईनस्टाईन यारख्या जगातील ज्ञानी व्यक्ती वाचनातून विविध प्रकारचे ज्ञान मिळवून समाजाला योग्य मार्ग देणाऱ्या व्यक्ती झाल्या. आंबेडकर यांनी ग्रंथावर जेवढे प्रेम केले तेवढे कोणी केल्याचे ऐकिवात नाही. ज्ञान मिळविण्यासाठी स्वतःचे राजगृह हे घर त्यांनी ग्रंथालय बनविले. वाचनातून प्रेरणा घेऊन त्यांनी अस्पृश्यतेचा संमुळ नायनाट केला. देशाला एक करणारे संविधान लिहिले, महात्मा गांधीजी ,रवींद्रनाथ,टागोर ,जवाहरलाल नेहरू इत्यादी विचारी माणसे जगातले ग्रंथ वाचत होती. आज समाजात ज्या विकृती निर्माण झाल्या आहेत, ते रिकामे डोके असल्याचे लक्षण आहे. चांगले संस्कार देणारी पुस्तके शोधून वाचली पाहिजेत. स्वर्ग प्राप्त करण्याच्या भ्रामक कल्पनेत न राहता बुद्धांनी सागीतल्याप्रमाणे बहुजन हिताय,बहुजन सुखाय असे आचरण पृथ्वीवर आवश्यक आहे. म्हणूनच देशात विचारी व सदाचारी पिढ्या घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे संचालक प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे यांनी केले. ते येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग, ग्रंथालय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' अभियानांतर्गत ‘ वाचन कौशल्य : तंत्र व विकास ’ या कार्यशाळेतील दुसऱ्या व्याख्यानात ते वाचनसंस्कृती जोपासण्याची कारणे आणि उपाय या विषयाव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, श्री. भीमराव पटकुरे, बाळासाहेब कोकरे, ज्येष्ठ प्राध्यापक (डॉ.) सुनील सावंत, प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, प्रा. (डॉ.) विनोद वीर,ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. धनंजय निंबाळकर, डॉ. संग्राम थोरात यांची उपस्थिती होती.
                डॉ. वाघमारे म्हणाले, ‘ तंत्रज्ञानाने प्रगती होते हे जरी मान्य केले तरी कोणती प्रगती होते ? माणसाने पंचशील पालन केले नाही तर तंत्रज्ञानाचा दुरुपयोग सुरु होतो. समाजात समता,बंधुभाव ,व प्रेम निर्माण करण्यासाठी काम करायचे की द्वेष निर्माण करण्यासाठी ? हे कळण्यासाठी विवेकी . विचारी होणे आवश्यक आहे. वाचनाने बुद्धीचा विकास केला तरी ती बुद्धीचा सदुपयोग करण्याचे संस्कार आवश्यक आहेत. त्यामुळे ग्रंथ जरी वाचले तरी त्यात काय चांगले ,काय वाईट याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. सोशल मिडीयावर केले जाणारे वाचन सखोल नाही. त्यासाठी ग्रंथ विकत घेऊन वाचनाची सवय लावली पाहिजे. घरात सोने ,नाणे या संपत्तीला प्रतिष्ठा देण्याची प्रथा आता दूर करून घराघरात ग्रंथालय कसे होईल यासाठी काम करायला हवे. प्रत्येक लेखक आपल्या ग्रंथातून काहीतरी चांगला संदेश देत असतो. त्याचा शोध घेऊन प्रत्येकाने तो विचार आचरणात आणला पाहिजे. दलित साहित्याच्या वाचनाने आत्मभान जागृत होते. संतांनी, समाजसुधारकांनी समानतेच्या दिलेल्या मंत्राचा अंगीकार करुन जीवन जगायला हवे. त्यांच्या रस्त्यावरुन चालताना आपली सद्सदविवेक बुध्दी जागृत ठेवण्यासाठी वाचनाची नितांत गरज आहे, कारण वाचन हे जीवन आहे. त्यांनी आपल्या भाषणातून वाचनसंस्कृतीचे महत्त्व, ती वृद्धिंगत करण्याचे उपाय, उद्देश, वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे उदाहरणांसह विशद केली .
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, वाचनाने माणूस स्वयंप्रकाशित होतो. ग्रंथांमध्ये जीवनानुभव असतात त्याचा शोध घेता आला पाहिजे. ज्ञान आणि प्रेम यांचा संयोग व्यक्तीच्या अंगी असला पाहिजे. माणसाचे विचार चांगले असतील तर ती व्यक्ती माणूस म्हणून मोठी ठरते. आपली वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी समाजज्ञान आणि समाजभान असणे आवश्यक आहे. वाचनाचा संस्कार माणसाला प्रगल्भ बनवतो. निरंतर वाचनाने शब्दभांडार वाढते. समाजात बोलताना व वागताना अंगी नम्रता येते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. 
डॉ. संग्राम थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवाजी कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल कवडे यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमास डॉ. मंजुषा इंगवले, डॉ. बाळकृष्ण मागाडे, डॉ. अंबादास सकट, डॉ. संदीप वाटेगावकर, दीपाली चव्हाण,संदीप पातुगडे, तानाजी हाके, सोमिनाथ सानप, नीलम भोसले, रेश्मा मुलाणी, दीक्षा मोरे, मेघा शिर्के, सुलभा घोरपडे, जितेंद्र चव्हाण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

वॉर्ड क्र.२ नवीन घरकुल मधील त्रस्त नागरीकांची माथी शेवटी भडकणार ?


अन् त्रस्त नागरीकांचा मोर्चा कधीही
नगर पालिकेवर येवून धडकणार !!

नागरीकांच्या घरात शिरत असलेल्या गटारीच्या घाण पाण्याचा बंदोबस्त करा

अन्यथा नगर पालिकेवर त्रस्त नागरीकांचा धडक मोर्चा - रियाजखान पठाण यांचा इशारा 

शौकतभाई शेख / श्रीरामपूर
येथील वॉर्ड क्र.२ नवीन घरकुल याठिकाणी कमालीची अस्वच्छता निर्माण झाली असून यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नगर पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करुनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने परिसरातील त्रस्त नागरीकांचा मोर्चा नगर पालिकेवर धडकणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिला आहे.

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण आणी परिसरातील त्रस्त नागरीकांनी श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकारी यांना दिलेला निवेदनात म्हटले आहे की,वॉर्ड क्र.२ मधील नवीन घरकुल याठिकाणी दोन्ही घरकुल इमारतींच्यामधून जी ड्रेनेजची गटार गेलेली आहे. ती गटार खुप खराब झालेली आहे. त्या गटारीमध्ये प्रचंड प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून त्यात उंदीर आणी घुशीचे मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे सदरील ड्रेनेज गटारीत माती जावून गटारीची लेव्हलच राहिलेली नाही. यामुळे नेहमी गटार तुंबते आणी गटारीचे व ड्रेनेजचे घाण पाणी नवीन घरकुलमधील नागरीकांच्या बाथरुमद्वारे थेट घरात शिरत आहे.अशी ही अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झालेली असल्याने सदरील ठिकाणी रहिवासी नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे,
या परिसरात प्रचंड प्रमाणात डास,मच्छर आणी रेंगणारे किटक घरात रेंगताना आढळून येत असल्याने यामुळे येथील रहिवाशांच्या लहान लहान बालकांसह थोर मोठ्यांना गंभीर स्वरूपाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना वारंवार फोन करुनही म्हणावी तशी दखल घेतली जात नाही,न.पा. कर्मचारी कधी काळी येतातही मात्र थातूर - मातूर साफसफाई करुन जातात, परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे, या संदर्भात तात्कालिन मुख्याधिकारी गणेश शिंदे, सोमनाथ जाधव यांच्याकडे देखील अनेक तक्रारी केलेल्या होत्या व आहे,तसेच न.पा.चे मुकादम असलम शेख,आरोग्य विभागाचे धारवर,आरणे न.पा. बांधकाम अभियंता गवळी, यांना देखील कळविले होते. त्यांनी सांगितले की यावेळी संभाळून घ्या. पुढच्यावेळी ठिक करु,मात्र ही आश्वासने केवळ फोलच ठरली आहे. याबरोबरच सदरील ठिकाणच्या रहिवाशांच्या घरात खुपच दुर्गधी पसरली, आहे. करीता विद्यमान मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जातीने लक्ष घालून सदरील ठिकाणच्या गटारीचे कामे लवकरात लवकर हाती घ्यावे आणी याठिकाणच्या जवळपास तीनशे ते चारशे रहिवासी नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी या निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली असून. 
या निवेदनात पुढे असेही म्हटले आहे की, सदरील कामे ही लवकरात लवकर न झाल्यास परिसरातील त्रस्त नागरीकांच्या सहनशिलतेचा अंत होवून त्यांची माथी भडकतील आणी पुढे याच गटारीचे घाण पाणी घेऊन ते आपल्या नगर पालिकेवर धडक मोर्चाद्वारे धडकतील यापासून निर्माण झालेल्या बऱ्या व वाईट परिणामाची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित नगर पालिका प्रशासनावरच राहील याची वेळीच नोंद घेण्यात यावी असा इशाराही शेवटी सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण आणी संबंधित त्रस्त नागरीकांद्वारे नगर पालिका प्रशासनास देण्यात आला आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561274111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------

श्रीरामपूर - येथील वॉर्ड क्र.२ मधील नवीन घरकूल याठिकाणी गटार साफ होत नाही, मोठ्या प्रमाणात गटारी तुंबलेल्या आहेत, गटारीचे घाण पाणी नागरीकांच्या घरात शिरत असल्याने याठिकाणच्या रहिवासी खुपच त्रस्त झालेले आहे, त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही घरकुल इमारतींच्या मध्ये तात्काळ नवीन ड्रेनेज गटार बांधण्यात यावी, यामुळे नागरीकांच्या समस्यांचे निवारण होवून सुविधा उपलब्ध होईल अशा अशयाचे निवेदन श्रीरामपूर नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले, याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रियाजखान पठाण, सुनिल भाऊ, उस्मान भाई काकर,फिरोजभाई शहा व परिसरातील त्रस्त नागरीक उपस्थित होते.
-----------------------------------------------
=================================