राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, August 19, 2023

श्रीरामपूर शहरात पुन्हा घाणीचे साम्राज्य रोगराईची साथ फैलण्याची शक्यता ?


नगर पालिका प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत अन्यथा आंदोलन - जाफरभाई शहा

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -:
स्वच्छ आणी सुंदर शहर म्हणून एकेकाळी ओळखले जाणारे श्रीरामपूर शहर आज घाणीच्या साम्राज्यात दिसून येत आहे, शहराच्या अवती-भवती ठिकठिकाणी कचऱ्यांंचे ढिगारे निर्माण होताना दृष्टीपथास येत आहेत,याचे प्रमुख कारण म्हणजे शहरातील घाण -कचरा उचलणारे वाहन काही ठिकाणी तब्बल आठ आठ दिवस येत नसल्याने मोठी दुर्गंधी निर्माण होत आहे त्यावर सदरील कचरा हा वाऱ्याद्वारे नागरीकांच्या घरात आणी दुकानात शिरत आहे, यामुळे भविष्यात भयंकर रोगराईची साथ फैलण्याची शक्यता ही नाकारता येवू शकत नसल्याने श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने यावर तातडीने योग्य पावले उचलत सदरील घंडागाडी ठेकेदारास दररोज कचरा उचलण्यास सांगावे अन्यथा या विरूद्ध नगर पालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलन करावे लागेल असे सामाजिक कार्यकर्ते जाफरभाई शाह यांनी नगर पालिका मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 
या निवेदनात त्यांनी पुढे त्यांनी असेही नमूद केले आहे की,सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, पावसामुळे शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा ओला होऊन सडला जात आहे, यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असून रोगराईची साथ फैलण्याची दाट शक्यता आहे,तसे सध्या थंडी,ताप,सर्दी खोकला आदि अशा आजारामुळे बालकांसह वयोवृद्ध झुंज देत आहे करीता पुढे डेंग्यू,मलिरिया येण्याची वाट न बघता नगर पालिका प्रशासनाने वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे असेही त्यांनी या निवेदनात शेवटी नमूद केले आहे.


Friday, August 18, 2023

कोळगांव थडी येथील मुस्लिम धार्मिक ग्रंथ विटांबना प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी - पाथर्डीतील मुस्लिम समाजाचे पोलिसांना निवेदन


वजीर शेख - पाथर्डी

कोपरगाव तालुक्यातील कोळगांव थडी येथे गत काही दिवसांपूर्वी इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ असलेल्या "कुरान शरीफ"ची विटंबना व अनादर केल्याप्रकरणी मुस्लिम धर्मियांच्या प्रचंड प्रमाणात भावना दुखावल्या गेल्या आहेत, सदरील घटनेचा पाथर्डी तालुका मुस्लिम बांधवांच्या वतीने तिव्र शब्दात निषेध करण्यात येवून संबंधित दोषी आरोपींना त्वरित शोधून काढत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन पाथर्डी पोलिसांना देण्यात आले. 
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की,कोपरगांव तालुक्यातील कोळगांव थडी येथील मुस्लिम धर्मियांचे पवित्र ग्रंथ विटांबना प्रकरणी संबंधित गुन्हेगार असलेल्या समाजकंटकावर तातडीने कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी शांततेच्या मार्गाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पाथर्डी तालुका पोलीस उपनिरीक्षक श्री.कायंदे साहेब व ठाणे अंमलदार श्री. भिंगारदिवे साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात येवून सदरील गंभीर प्रकरणी कारवाई ची मागणी करण्यात आली. यावेळी पाथर्डी तालुका काँग्रेस अध्यक्ष अली,नासीर शाहनवाज़ शेख,भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष शन्नोभाई पठाण
सामाजिक कार्यकर्ते मुन्ना शेख,अहमदनगर जिल्हा युवा काँग्रेस सरचिटणीस जुनेद पठाण,
समीर पापली शेख,नगरसेवक
चांद मणियार, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष इरफान शेख,मौलाना आमीन,नवाब पठाण,आमिर शेख,जावेद पिंजारी,जावेद बागवान,जुबेर आतार, उबेद आतार अमजद आतार,शाहिद बागवान,
इरफान सय्यद,मौलाना जावेद आदिंसह अनेक समाज बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, August 14, 2023

पत्रकार निसार सय्यद यांच्या घरावर हल्ला करून पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करा; महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने प्रशासनाला निवेदन...


श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता

राहुरी येथील ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक भडकत्या ज्वालाचे संपादक व ग्रामपंचायत सदस्य सय्यद निसार मकबूल यांच्या राहुरी स्टेशन येथील राहत्या घरावर दि. १२/०८/२०२३ रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा अज्ञात गुंडाच्या टोळीने तोंडाला रुमाल बांधत, दुचाक्यावरुन येऊन तोंडावर पेट्रोल बॉम्ब फेकून घरासह त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला,तसेच घराबाहेर उभ्या असलेल्या चारचाकी अल्टो कार व दुचाक्यांवर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्या.
सुदैवाने निसार सय्यद यांच्या घराचे दार लोखंडी असल्यामुळे या गुंडांना घरात प्रवेश मिळवता आला नाही व पेट्रोल बॉम्ब ने पेट घेतला परंतु घराच्या आत आग न लागल्याने ते व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या हल्ल्यातून बचावले हा हल्ला एका प्रकारे आतंकी हल्लाच होता, निसार सय्यद यांच्या नात्यातील एका मुलाने एका अल्पवयीन मुलीचे फोटो वायरल केल्यामुळे त्याला आदल्या दिवशीच पोलिसांनी अटक करून त्याच्यावर कारवाई केली.या रोशात्मक भूमिकेतून गुंडांच्या टोळीने निसार सय्यद यांच्या घरावर हल्ला केला असावा असा अंदाज काही जणांकडून वर्तविला जात आहे.
या हल्लेखोरांनी कायदा हातात घेऊन दहशत निर्माण करत पत्रकार निसार सय्यद व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून सदरील गुंड पुन्हा अशा प्रकारे निसार सय्यद किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा घात करतील,तत्पूर्वी पोलीस प्रशासनाने या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर भा द वि कलम ३०७,४३५,४३६ व पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करून निसार सय्यद व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना संरक्षण द्यावे या आशयाचे निवेदन महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय (प्रांत) अधिकारी,अप्पर पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयात जाऊन दिनांक १४/०८/२०२३ रोजी देण्यात आले.
यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकतअली यांच्या समवेत पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर महंमद, इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, पत्रकार संघाचे जिल्हा सचिव सलाउद्दीन शेख, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष एजाज सय्यद, श्रीरामपूर शहराध्यक्ष रियाज पठाण, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अकीलभाई शेख, बेलापूर शाखा उपाध्यक्ष मोहम्मद असलम सय्यद,पत्रकार सलीम पठाण,मुरलीधर किंगर, राजेंद्र सूर्यवंशी,रोहिदास थोरात, मोहसीन शेख,कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
------------------------------------------------------------------------
=====================================

राज ठाकरेंचा खोचक टोला शरद पवार-अजित पवार भेटीत काय दडलंय म्हणाले,कोण कुणाचा

मुबंई - प्रतिनिधि  वार्ता

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षात शरद पवार आणि अजित पवार  असे दोन गट तयार झाले आहेत. एक गट भाजपसोबत तर दुसरा महाविकास आघाडीसोबत आहे. मात्र पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट सध्या चर्चेत आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली. त्यानंतर सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये संभ्रम असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता राज ठाकरेंनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाच उलटा प्रश्न केला

यावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया देत म्हणाले की, “सरकार काय, पत्रकारितेतही कन्फ्युजनच आहे. कोण कुणाचा आहे हेच कळत नाही हल्ली. उलटा फिरला की लेबल कळते मग लागलेले. कोणत्या पक्षाचा आहे ते. त्यामुळे सगळीकडेच कन्फ्युजन आहे. बघू.. दूर होईल लवकरात लवकर”, असे राज ठाकरे म्हणाले.
तुम्हाला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर घडलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार जिथे भेटले ती जागाही कमाल आहे. याचाही विचार करायला हवा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

तुम्हाला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर घडलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला आठवत नाही का? शरद पवार आणि अजित पवार जिथे भेटले ती जागाही कमाल आहे. याचाही विचार करायला हवा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
माझे ऐकत नाही तुम्ही. मी मागेच सांगितलेय की राष्ट्रवादीची ती पहिली टीम आहे, उर्वरित टीमही तिकडे जाणार आहे. हे सर्व आतूनच चालू आहे. हे काही आजचे नाहीय, २०१४ पासून हे लोक एकत्र आलेले आहेत.
तुम्हाला पहाटेचा शपथविधी आठवत नाही का, त्यांनतर झालेल्या गोष्टी. शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा 'चोरडिया' या नावाच्या ठिकाणी मिळावी हे पण कमाल आहे, असा खोचक टोला राज ठाकरेंनी अजित-शरद पवार गुप्त भेटीवर लगावला.

=================================
------------------------------------------------
: - उप, संपादक - प्रविण पाटील - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------=================================



Sunday, August 13, 2023

राष्ट्रव्यापी संघटनेची स्थापना श्रीरामपूर येथे नव स्वराज्य सेना राष्ट्रीय अध्यक्षपदी ॲड.विजयराव खाजेकर

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता

येथील संगमनेर रोडवरील व्ही.आय.पी.रेस्ट हाऊसच्या सभागृहात नव स्वराज्य सेना या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात येवून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसह त्याना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवनिवृत्त पोलीस उपअधिक्षक अर्जुन भांड हे प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते नव स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेच्या फलकाचे रिबीन कापून अनावरण करण्यात आले. श्री.भांड यांनी यावेळी संघटनेच्या पुढील कार्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या व आनंद व्यक्त केला.
सदर प्रसंगी ॲड. विजयराव खाजेकर यांना सर्व कार्यकर्त्यांनी नव स्वराज्य सेना या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मोठ्या जल्लोषात घोषीत केले व त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. विजयराव खाजेकर म्हणाले की, ही संघटना केवळ राज्यभरातच कामे करणारी नसुन राष्ट्रव्यापी सामाजिक संघटना असल्याने संपूर्ण देशभर या संघटनेचे कार्य असणार आहे.तसेच सदरील संघटना सर्व जाती-धर्मातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबध्द राहील व ही संघटना तळागाळातील उपेक्षित आणि दुर्लक्षित जनतेसाठी,गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, दलीत, शोषीत, पिडीत आदि लोकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करील असे बोलताना त्यांनी संघटनेचे धैय्य धोरणे स्पष्ट केले.
सदर सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विजयराव खाजेकर यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या जबाबदाऱ्या सोपवत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ॲड. आण्णासाहेब मोहन, डी.एल. भोंगळे सर, विलासराव खाजेकर, कवी आनंदा साळवे, रमाताई भालेराव, अमरप्रितसिंग सेठी आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सुयोग्य सुत्रसंचलन आण्णासाहेब मोहन व भाऊसाहेब खरात यांनी केले.
यावेळी सर्वश्री संजय बाहुळ, भाऊसाहेब खरात, मुस्ताकभाई शेख, इब्राहीमभाई शेख, जस्पालसिंग सहानी,भोंगळे सर, आनंदा साळवे, रंगनाथ पितळे, हमीदभाई चौधरी, रमाताई भालेराव, मो. रमजानभाई पटेल,परविन शहा, राजुभाई जहागीरदार, संदीप दोडकर, उषाताई पवार, सविताताई रणदिवे, तय्यब पठाण, राजुभाई शेख, मास्टर सरवरअली सय्यद, डॉ.अशोक शेळके, प्रभाकर ब्राम्हणे, अमोल दिवे, बाळासाहेब उबाळे, नवनाथ गडकर, ॲड. दिपक उबाळे, नवनाथ उबाळे, विठ्ठल विघावे, अमरप्रितसिंग सेठी, गुलाब दिवे आदी मान्यवर तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी संजयभाऊ वाहळ यांनी सर्वांचे आभार मानले.

मुंबई – गोवा महामार्गाची अवस्था चंद्रावर पडलेल्या खड्यांसारखी

महाड - प्रतिनिधि - वार्ता 

गणेशोत्सव जवळ आला आहे. कोकणचा मुंबईतील चाकरमानी या उत्सवासाठी कोकणात जायला निघणार आहे. मात्र, मुंबई – गोवा महामार्ग रस्त्यांची अवस्था चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांसारखी आहे.

यामुळे कोकणाचा प्रवास सुखकर होणे अशक्य असल्याचे म्हणत शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. रस्त्याच्या कामाबाबत उदासीन असलेल्या राज्य सरकारला कोकणी माणूस चांगलाच इंगा दाखवेल, अशी टीकाही त्यांनी केली.

कोकणामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. गणेश उत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात दाखल होतात. मात्र, गणेशोत्सव जवळ आला तरीदेखील मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था कायम आहे.
रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने प्रवास करताना चाकरमान्यांना कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ट्विट करून अदित्य यांनी शिंदे गट आणि राज्य सरकारवर ही टीका केली आहे.

पालकमंत्री पदासाठी आपापसात भांडणाऱ्या आणि अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या आमदारांना स्वतःच्या मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रश्न सोडवता येत नाही ? पाठीशी असलेली महाशक्ती ही मदतीला येत नाही? अशांना कोकणी माणूस इंगा दाखवणारच. असे त्यांनी म्हटले आहे.

=================================------------------------------------------------
: - अमोल पालिकर - लेख - शब्द...✍️✅️🇮🇳...रचना संकलन वार्ता...
------------------------------------------------
=================================



विटांबना प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी मुस्लिम धर्मियांचे पवित्र ग्रंथ समस्त सोनई मुस्लिम समाजाचे पोलिसांना निवेदन


समीर - शेख - सोनई 


मुस्लीम धर्मियांचे पवित्र धार्मिक ग्रंथाची कोपरगांव तालुक्यातील कोळगाव थडी येथील काही अज्ञात समाजकंटकांनी प्रार्थनास्थळात (मशीद) घुसून
धार्मिक ग्रंथ चोरले आणी त्यास  फाडून रस्त्याच्या कडेला फेकुन देत दोन समाज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे समस्त मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा राक्षसी वृत्तीचा व कृतीचा समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने निषेध जाहिर निषेध करण्यात येवून संबंधित दोषी अज्ञास समाजकंटक आरोपींना त्वरित शोधून त्यांवर कठोर कारवाई करावी अशा अशयाचे निवेदन समस्त मुस्लिम समाज सोनई यांच्या वतीने सोनई पोलिसांना देण्यात आले.
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, सदरील अज्ञात समाजकंटकांचा त्वरीत शोध घेण्यात यावा तथा सदरचा तपास हा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत करण्यात यावा आणी सदरील आरोपी समाजकंटकांना त्वरित शोधून काढत त्यांच्यावर कडक आणी कठोर कारवाई करावी, तसेच सदरील प्रकरणी समाजकंटक आरोपींना येत्या सात दिवसाच्याआत शोध घेवून गजाआड करावे,अन्यथा समस्त मुस्लीम समाज रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करील. तथा यापासून निर्माण होणाऱ्या बऱ्या व वाईट परिणामास शासनच जबाबदार राहील तरी याची नोंद घेवून आपण आमच्या तीव्र भावना शासन दरबारी आणी वरिष्ठांपर्यंत पोहचवून निवेदनातील मागण्या पूर्ण कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे.
सदरील निवेदन हे सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणी राजेंद्र थोरात यांना देण्यात आले. यावेळीआझाद सामजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नजीरभाई सय्यद,ॲड.जमीर शेख, फिरोजभाई पठाण,शकीलभाई बागवान,कलीमभाई पठाण, फारुकभाई पठाण, मौलाना अय्युब,मौलाना,सलीम,हाफिज समीर,हाफिज निषात,हाफिज वसीम,खालीलभाई इनामदार, ॲड.इरफान सय्यद,आयाज शेख (लाला), इरफानभाई शेख, शाहरुख शेख,आरिफ शेख,असद कुरेशी, तय्यब सय्यद,अयुब पठाण, दादाभाई सय्यद,अमजद पठाण, अबुबकर सय्यद तथा सोनई परिसरातील समस्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.