राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, October 10, 2024

राज्यातील २९ महानगरपालिका व ३८७ नगरपरिषद,नगरपंचायतील कंत्राटी कामगारांच्या वेतना चौकशीचे कामगार आयुक्तांचे आदेश


भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे आंदोलन स्थगित कांबळे

- पुणे - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्यातील एकूण २९ महानगरपालिका अ,ब,क,ड वर्ग मधील सर्व कंत्राटी कामगारांना दि. १ जानेवारी २०२१ ते आस्थागायत किमान वेतन कायद्यानुसार पगार न देता अत्यंत तुटपुंजा पगार देऊन त्यांचा ईपीएफ व ईएसआयसी न भरता कामगार कायद्याचे उल्लंघन करून लाखो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्या बाबतची तक्रार भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी राज्याचे कामगार आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे करून चौकशीची मागणी केली होती
तथा सदरील बाबी चौकशी न केल्यास यासंदर्भात दि. १४ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, मात्र श्री.कांबळे यांच्या पत्राची दखल घेऊन कामगार आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिल्याने सदरील आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी पत्रकारांना दिली.
      यावेळी बोलताना श्री. कांबळे म्हणाले की, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, यामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केले जाते यासंदर्भात आपण वारंवार पत्रव्यवहार तसेच आंदोलनेही केले परंतु याबाबत कुठलीही दखल घेत नसल्याने आपण १४ ऑक्टोबर २०२४ रोजी आंदोलन, उपोषणाचा मार्ग अवलंबवाणार होतो, परंतु याबाबत आयुक्तांनी योग्य दखल घेतल्याने आंदोलन ताप्तुरते स्थगित केले असल्याचे ते म्हणाले.
     आयुक्तांनी राज्यातील कोकण विभाग, मुंबई,पुणे, नागपूर येथील अप्पर कामगार आयुक्त तसेच नाशिक, औरंगाबाद, अमरावती येथील कामगार उपायुक्त यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
        अप्पर कामगार आयुक्त व कामगार उपायुक्त यांनी याबाबत दुर्लक्ष केल्यास आपण आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहोत असे भ्रष्टाचार विरोधी 

जन आक्रोश संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

उद्योगविश्वातला ध्रुवतारा निखळला उद्योगपती रतन टाटा यांचं निधन



- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 रतन टाटा यांनी आपलं आयुष्य गोर गरीब मुलांना शिक्षण, सामान्य नागरिकांना मोठ मोठ्या दवाखान्यांमध्ये निधी देऊन आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे व गोरगरिबांचे लग्न लावुन देणे या सारख्या सामान्य मानसाच्या गरजा भागवल्या, भारतीय उद्दोजकाला महत्त्व पुर्ण चालना दिली.

देशातील प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. अखेर त्यांनी बुधवारी (ता.९) रात्री उशिरा टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला.

दोन दिवसांपूर्वीच रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. त्यांच्या अनेक शारीरिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. डॉ. शाहरुख हे एक नामांकित डॉक्टर म्हणून ओळखले जातात.

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सुनी टाटा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले होते. शिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर परदेशात शिक्षण घेतले. त्यांची एकूण ३,८०० कोटी रुपये त्यांची संपत्ती आहे.

काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रकृती विषयीची माहिती दिली होती.त्यात त्यांनी वयोमान लक्षात घेता माझ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, काळजी करण्यासारखं काहीही नाही, असं टाटा यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

देशाच्या कानाकोपऱ्यातून रतन टाटांच्या प्रकृती स्वास्थासाठी व ते लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केल्या जात होत्या. सोशल मीडियातून त्यांच्यासाठी 'गेट वेल सून' यांसारख्या मेसेजद्वारे पोस्ट केले जात होते. टाटा कंपनीच्या माध्यमातून लाखो कुटुंबांचं त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडलं होत. अनोखी देशभक्ती व देशहिताचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या निधनानं भारताचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या दुःख द निधनाबद्दल श्रीरामपूर येथील आजी माजी सैनिक संघर्ष समिती च्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

गावच्या प्रवेशद्वारा समोरून गावापर्यंत टाकण्यात आलेले डिव्हाडर काढून घेण्यात यावे - माजी सरपंच गणेश चेचरे


- प्रवरानगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील गावाच्या प्रवेशद्वारापासून तर गावापर्यंत जे डिव्हायडर टाकले आहे ते सर्वसामान्यांना मनस्ताप ठरत आहे.
तरी सदर डिव्हायडर ग्रामपंचायत काढून घ्यावे अशी मागणी माजी सरपंच गणेश चेचरे यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायत डिव्हायडर टाकून रस्ता बनविला परंतु त्या रस्त्याच्या एका बाजूला वाहतूक बंदच आहे . त्या बाजूने बेकायदेशीर काही माणसे वाहन उभी करतात तर काही बांधकाम साहित्य आणून टाकतात.
 त्यामुळे एका बाजूचा हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. 
त्यामुळे एका बाजूने सुरू असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे ह्या रस्त्यावरून गावांमध्ये शाळा व गावाचा एकमेव प्रमुख रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते शेतकरी वर्ग दूध उत्पादक शेतकरी कामगार वर्ग सकाळी या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते रस्त्याने जात येत असल्यामुळे गावचा प्रमुख रस्त्यावरच डिव्हायडर मुळे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे. तरी सदर डिव्हायडर ग्रामपंचायतने काढून रस्त्याला मोकळा श्वास निर्माण व्हावा आशा मागणी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे ग्रामपंचायत सदस्य बळीराम चेचरे सोसायटी सदस्य किरण चेचरे माजी सरपंच गणेश चेचरे. गणपत चेचरे. यांनी केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार कोंडीराम उंडे - लोहगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
*युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील हे लोहगांव येथील एका कार्यक्रमा निमित्त आले असता त्यांच्या कानावर सदर डिव्हायडरचा विषय घातला असता त्यांनी सदर डिव्हायडर काढण्याच्या सूचना केलेले आहे.*
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
*डिव्हायडर मुळे अपघात होण्यास ची शक्यता नाकारता येत नाही. डिव्हायडर मुळे रस्ता झाला अरुंद वाहतुकीची कोंडी सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप,डिव्हायडर झाल्यापासून एका बाजूचे रस्ता पूर्णपणे वाहतुकीस बंद आहे.*
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Wednesday, October 9, 2024

भूमी फाउंडेशनच्या कन्याची सारथी स्कॉलरशिपसाठी निवड


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
पुणे (वाघोली) येथील भूमी फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या मुख्य संकल्पनेतून असंख्य सेवाभावी मान्यवरांच्या सक्रिय सहकार्य आणि लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास या ब्रीद वाक्याद्वारे शैक्षणिक क्षेत्र , सामाजिक क्षेत्र ,ग्रामीण भाग विकास,विधवा निराधार महिलांसाठी व त्यांच्या मुलींसाठी राज्यस्तरीय अविरत स्वरूपाचे कार्य करीत आहेत.त्याचबरोबर संस्थेचे पुणे वाघोली येथे असंख्य गरजू , होतकरू, गरीब शेतकऱ्यांच्या मुलींसाठी मोफत निवासी वसतीगृह चालविले जात आहे.यामध्ये प्रामुख्याने राहणे, खाणे, शिक्षण आणि इतर शैक्षणिक सुविधा उत्तम प्रकारे पुरविल्या जात आहे. संस्थेच्या सावित्रीबाई मुलींचे निवासी वसतिगृह वाघोली पुणे येथील दोन्ही दोन्ही हाताने अपंग असलेली परंतु जिद्दी, मेहनती शेतकरी कुटुंबातील जयश्री संजय गायकवाड या मुलीची सारथी स्कॉलरशिप साठी नुकतीच निवड झाली आहे. सदर झालेली निवड पाहता कौतुकास्पद असल्याचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार आणि सर्व पदाधिकारी यांनी सांगितले आहे.त्याच बरोबर जयश्री ही मुलगी स्वतःची कामे सर्व स्वतःच करते.हे इतर मुलींसाठी खूप आदर्शदायी आहे.असेही पवार यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी यांनी सदर कन्येचे अभिनंदन केले आहे. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समत न्यूज सर्व्हिसेस,
श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

स्व.डॉ.बाबासाहेब कल्याणकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे भूषणावह- डॉ.दिनानाथ खपके


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
स्व. डॉ.वा.ग.तथा बाबासाहेब कल्याणकर यांच्या नावाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे हा माझ्या जीवनातील एक प्रेरणापूर्ण, भूषणावह असा सन्मान असल्याचे मत प्रख्यात एम.डी.(पॅथॉलॉजी) डॉ. दिनानाथ पाटीलबा खपके यांनी व्यक्त केले.
येथील मेनरोड वरील आगाशे सभागृहात विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. वा.ग. तथा बाबासाहेब कल्याणकर यांच्या ११५ व्या जयंती निमित्ताने व्याख्यानमालेचे चौथे वर्ष आणि स्व.डॉ. वा.ग. तथा बाबासाहेब कल्याणकर स्मृती राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार २०२४ प्रदान सोहळा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्याप्रसंगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. दिनानाथ खपके बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश मेहकरकर, डॉ. राजीव शिंदे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ.बाबुराव उपाध्ये  उपस्थित होते.
        
 प्रारंभी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक,सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार केले. प्रतिष्ठान उपाध्यक्ष व समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. तसेच स्व. डॉ. वा.ग.तथा बाबासाहेब कल्याणकर एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून व्याख्यान दिले. 

     चंद्रपूर जिल्ह्यातील उसगावसारख्या खेड्यातून १९३९ साली श्रीरामपूर येथे येऊन वैद्यकीय क्षेत्रात  त्यांनी जी लोकप्रियता मिळविली, ती वंदनीय आहे. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान हे गेल्या ०४ वर्षापासून त्यांच्या नावाने व्याख्यानमाला चालवत आहेत. डॉ. बाबासाहेब कल्याणकर हे विश्वानाथ सुकळे यांचे मोठे बंधू  तर सुखदेव सुकळेसरांचे ते चुलते होते.डॉ. कल्याणकर यांचे अनंत ऋ्ण मानून सुकळेसर असे उपक्रम राबवितात ही उच्चतम संस्कृती असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले.
यावेळी डॉ. राजीव शिंदे यांनी डॉ.खपके यांच्या वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला. 

         प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश मेहकरकर यांनी डॉ.खपके यांचे पॅथॉलॉजी सेवेतील गुणवत्तेचे कौतुक केले. डॉ. दिनानाथ खपके यांनी आपले जीवनानुभव सांगत  प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी खपके परिवार आणि अनेक स्नेहीजन उपस्थित राहून त्यांनी सन्मान केल्याबद्दल डॉ. खपके यांनी आभार मानले.

       प्राचार्य शेळके यांनी यानिमित्ताने एका देवमाणसाचा सन्मान झाला, डॉ. खपके यांचे वडील शिक्षण क्षेत्रातील एक भूषणावह व्यक्तिमत्त्व आहे, तोच सेवेचा संस्कार डॉ. खपके यांना मिळाला हे गौरवास्पद आहे. यावेळी डॉ. दिनानाथ खपके,डॉ.सौ. वैशाली खपके यांना मानपत्र, शाल, बुके, पुस्तके देऊन सन्मानीत करण्यात आले. मानपत्राचे वाचन डॉ. शिवाजी काळे यांनी केले. यावेळी पाटीलबा खपके सह परिवारातील सर्व उपस्थित होते. 

       प्राचार्य शंकरराव अनारसे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, माजी तहसिलदार गुलाबराव पादीर, डॉ. दिलीप पडघन, डॉ. सौ. सिंधू पडघन, प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ. अरुणा बारगळ, प्रा.कु. हर्षला बारगळ,डॉ. भास्कर निफाडे, दत्तात्रय रायपल्ली, ह.भ.प. प्रा.सखाराम कर्डिले, माजी मुख्याध्यापक भागचंद औताडे, भागवतराव मुठे, दत्तात्रय चव्हाण, डॉ.रवींद्र कुटे, प्रा.लड्डू शेख, सौ. मोहिनी काळे, कुंडलिक फापाळे, पी.एस. वाणी, साहेबराव सुकळे, सुरेश बुरकुले, संजय कल्याणकर, संजय बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले, सुयोग बुरकुले, डॉ. अजित घोगरे, रावसाहेब भिंगारदिवे, अड, संदीप खपके, लक्ष्मण भंडारी, कैलास चिंधे, विशाल निकडे, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, सुरेश गड्डेगुरुजी, शशिकांत गायकवाड, राजू साळवे, डॉ. संजय अबक, डॉ. अजित फुलवर, संतोष खपके, जयराम खपके, अर्जुन खपके, दिलीप होन, मेजर रवींद्र खपके, भाऊसाहेब खपके, सुधाकर रोकडे, जयकुंवर रोकडे, डॉ. संतोष झडे, डॉ. जावेद शेख, शैलेश खरात, संजय जगताप, दादासाहेब महाडिक, डॉ. भिटे, डॉ. विनोद येणगे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शिवाजी काळे यांनी केले तर प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


मराठी साहित्यातील चमकता तारा डॉ. तारा भवाळकर


(आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या जीवन कार्यावर टाकलेला प्रकाश)

दिल्ली येथे संपन्न होणारे आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोक साहित्याच्या अभ्यासक ज्येष्ठ लेखिका समीक्षक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याची बातमी कानावर आली. साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदाची निवड ही सार्थ ठरावी अशी. लोकसाहित्यावर विपुल प्रमाणात संशोधन आणि लेखन करणाऱ्या ताराबाईंचा जन्म मूळचा विद्यानगरी पुण्यातला. वडिलांच्या नोकरीतील सततच्या बदल्यामुळे शिक्षणातील त्यांचे बदल कायमच होत राहिले. १९६७ सालच्या एम. ए. च्या त्या जुन्या विद्यार्थिनी. 'मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण' (प्रारंभ ते १९२०) हा त्यांच्या पीएच.डी.चा विषय त्याकाळी या प्रबंधाला पुणे विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठीचे पारितोषिकही मिळाले. ज्ञानदानाच्या क्षेत्रात निस्पृह, निस्वार्थी भावनेने त्यांनी शिक्षकी पेशा निवडला. बारा वर्षे माध्यमिक शाळेत शिक्षिका तर पुढे २९ वर्ष त्यांनी सांगली येथील श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून उत्कृष्ट ज्ञानदानाची काम केले. पुणे, मुंबई, कोल्हापूर या विद्यापीठातील त्यांची व्याख्याने लक्ष स्रीवादी दृष्टिकोनातून मूल्यसंदर्भांनीयुक्त असे त्यांचे 'मायवाटेचा मागवा' हे पुस्तक नवसंशोधकांना प्रेरक ठेवणारे आहे. स्त्री जीवनाविषयीची आस्था, लोकसंस्कृती, लोकसाहित्याच्या संशोधनाची आणि लेखनाची आवड, लोककलेचे सखोल व्यापक दर्शन त्यांनी आपले लेखन प्रपंचातून घडविले. लोकसंस्कृती, लोकसाहित्य आणि नाटक हा त्यांचा लेखनाचा आवडता. प्रांत डॉ. रा. चि. ढेरे, दुर्गा भागवत, धर्मानंद कोसंबी, वि.का. राजवाडे, डॉ. श्रीधर केतकर या लोकसाहित्याच्या अभ्यासकांचा त्यांच्या विचार व लेखनावर प्रचंड प्रभाव आहे. लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा हा त्यांचा लेखनाचा आवडता. पुरुषांच्या तुलनेत ओथंबलेली स्त्री त्यापेक्षा त्या साहित्यातून विद्रोह करणारी स्त्री भेटते, या विद्रोही स्त्रीचे दर्शन त्यांच्या ओव्यांमधून आणि कथागीतातून वाचकांना होते. 
लोकसाहित्याच्या अभ्यासाबरोबर ऐतिहासिक नाट्य लेखनावर तेवढेच प्रेम. त्यांच्या नाट्य लेखनाची जडणघडण होताना पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, यक्षगान, त्यांच्यावरची नाटके, कथकली या नाटकांच्या माध्यमातून त्यांचा दक्षिण भारतातही प्रवास झाला. नाट्य क्षेत्रात लेखनाबरोबर अभिनय, नाट्य, दिग्दर्शन त्या कामातही त्यांनी आपल्या कलेचा ठसा उठविला. लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा हा त्यांचा सैद्धांतिक अभ्यासाचा पुरावा. स्वर्गीय ओम लाड यांच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आकाशवाणीवर त्यांची व्याख्याने खूपच गाजली. मराठी साहित्याचा आधार म्हणजे मराठी विश्वकोश, मराठी वांग्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत त्यांची योगदान महत्वाचे आहे. १९९१ साली अमेरिकेतील अरिझोना स्टेट विद्यापीठात आयोजित भारतीय समाज संस्कृती आणि स्त्री याविषयावरील चर्चासत्रातील त्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण होता. त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांच्या उत्कृष्ट लेखन व साहित्य लेखन कार्याची पावती आहे. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, 'मराठी नाटक नव्या वाटा, नवी वळणे' या पुस्तकाविषयी मिळालेला वांग्मय समीक्षक पुरस्कार, कै. मालतीबाई दांडेकर जीवन गौरव पुरस्कार ही त्यांच्या यशोकीर्तीमध्ये भर घालतात. 
त्यांचा जन्म १ एप्रिल १९३९ सालचा. त्यांनी लोकसंस्कृती, लोकसाहित्य नाट्य लेखननाट्य, संशोधन, संत साहित्य एकांकिका, ललित लेखन, लोककला याविषयी तसेच श्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन केले आहे. लोकसहित्य व लोककला विषयक अनेक परिसंवाद, चर्चा, संमेलनामधून त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सकदृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचं वस्तू पाठच आहे. विद्यार्थी तसेच अनेक नाट्य एकांकिका स्पर्धासाठी त्यांनी लेखन केले आहे. याशिवाय दिग्दर्शन आणि अभिनयही केला आहे. शिक्षण संपताच स्वतःची ए.डी.ए. ही नाटक संस्था सुरू केली
 या संस्थेच्या माध्यमातून असंख्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना नाटके बसून दिली. एकांकिकासाठी तयारी करून दिली. विष्णुदास भावे आणि 'मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण' (प्रारंभ ते १९२०) च्या प्रबंध लेखनासाठी सांगली, केरळ, गोवा, कारवार, कर्नाटक, कोकणात जाऊन माहिती संकलित केली. नमन, दशावतार मंडळे यासाठी माहिती गोळा केली. माध्यमिक शिक्षक ते प्राध्यापक असा त्यांचा नोकरीचा प्रवास विलोभनीय आहे. सेवानिवृत्तीनंतर पुणे विद्यापीठाच्या ललित कला अकॅडमीच्या आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकॅडमीच्या अतिथी प्राध्यापक म्हणून त्यांचा अनुभव मोलाचा होता. वाईच्या विश्वकोशातील लोकसाहित्याच्या अतिथी संपादक म्हणून त्यांनी उत्तम काम पाहिले. मराठी कोश, मराठी ग्रंथकोश, मराठी विश्वकोश यासाठी त्यांनी अनमोल योगदान दिले. टाटा इन्स्टिट्यूटने स्त्रियांच्या मराठी ओव्या या विषयावर त्यांची व्याख्यान ठेवले होते. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरील 'संत कवयित्रींची मुक्ती संकल्पना आणि आधुनिक स्त्री मुक्ती यांचा अनुबंध' या विषयावर त्यांचे व्याख्यान खूपच गाजले. त्यांचा लेखन प्रपंच खूपच मोठा आहे. आकलन आणि आस्वाद (साहित्यिक), तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक), निरघट सुरघट (लेखसंग्रह), प्रियतमा, स्त्रीप्रतिमा, बोरी बाभळी (प्रस्तावना) मधुशाळा (मराठी भाषांतर), मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह), मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणे, मराठी नाट्य परंपरा : शोध आणि आस्वाद, महामाया माझे जातीच्या, मातीची रूपे (ललित), माय वाटेवर वाटेचा मागवा, मिथक आणि नाटक, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा, लोकजागर रंगभूमी, लोकपरंपरा आणि स्त्रीप्रतिभा, लोकपरंपरेतील सीता, लोकसंचित, लोकसाहित्य वाङ्मय प्रवाह, लोकसाहित्याच्या अभ्यासाची दिशा, लोकांजन, लोकसंस्कृती शोधयात्रा, स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, स्नेहरंग आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्व विषयांवर विविध प्रकार व दलित साहित्य प्रकारांमध्ये केलेल्या लेखन कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानही मिळालेले आहेत. मिरज, आवास (अलिबाग, इस्लामपूर, बेळगाव, जळगाव या ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषविलेले आहे. महाराष्ट्र सेवा संघाचा सु.ल.गद्रे साहित्य पुरस्कार, लोकसंचित महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार, पुणे येथील पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि २०२५ चे दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्या यशात मोलाची भर घालत आहे. 

=================================
-----------------------------------------------


*डॉ. शरद दुधाट* 
जिल्हाध्यक्ष, मराठी विषय शिक्षक महासंघ, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर,+919561174111
-----------------------------------------------
=================================

वडाळा महादेव येथे कॅनाल मध्ये घसरून ट्रॅक्टर पलटी - भोकर येथील तरुणाचा मृत्यू


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील मनोज बाळासाहेब गवळी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर सकाळी दहा वाजेच्या सुमारास येथील शिवारातील कॅनॉल च्या कडेच्या रोडवरून मयत संदीप दत्तात्रय आहेर वय २२  वर्ष राहणार भोकर  या इसमाने ट्रॅक्टर क्रमांक एम एच २२ ए एम १४९३ स्वतः ताब्यात घेऊन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत असताना सदर  चालकाच्या ताब्यामधून नियंत्रण सुटल्याने  ट्रॅक्टर घसरून कॅनॉलच्या पाण्यात पलटी झाले  यावेळी ट्रॅक्टर पलटी होऊन सर्व चाकी वरती असल्याने तसेच चालक खाली पाण्यामध्ये पडल्याने दुखापत होऊन सदर चालकास मोठी इजा निर्माण झाली घटनेची माहिती स्थानिक नागरिक यांनी ट्रॅक्टर मालक यांना देताच मदत कार्य सुरू करून जखमी चालक यांना तात्काळ कामगार हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले परंतु उपचारापूर्वी सदर चालक संदीप दत्तात्रय आहेर व वय २२ वर्षे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्राकडून घोषित करण्यात आले यानंतर घटनेची माहिती नातेवाईक यांच्याकडून भोकर येथील दत्तात्रय आहेर मयत तरुणाची वडील यांना कळविण्यात आली यावरून श्री आहेर यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे खबर देऊन घटनेची माहिती देऊन मयत संदीप यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा असून घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असून माझा मुलगा नुकताच मनोज गवळी यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामावर रुजू झाला होता यावेळी किरण आहेर अरुण आहेर किरण तुळशीराम आहेर यांच्यासमोर हाकिकत कथन केली ट्रॅक्टरचा ताबा सुटल्याने सदरचा अपघात झाले असल्याचे स्थानिक नागरिक यांच्यातून बोलले जाते पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================