राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, March 3, 2025

रमजान मुबारक 2025,रोजा नंबर :-:03 मंगळवार -04-03-2025

विषय :- नमाज --तारविहच्या एका -एका शब्द- वेळेचं सत्तर पटीने पुण्यांची ऑफर चा फायदा उचला.
कालचं आपण अल्लाहच्या अलौकिक अधभूत उत्साह मय वातावरणात ज्या क्षनाची वर्षेभर आतुरतेने वाट बघत असतो अश्या रामजानुल मुबारक रोज्याची आरंभी आपण सर्व जगातील सर्वासाठी प्राणी जगासाठी निरोगी सुखरूप आरोग्य लाभों व जगात सुख शांती लाभों याची अल्लाह कडे दुवा प्रार्थना करून संध्याकाळी लागलीच फक्त्त रमझान मधील अधिक विशेष पुण्य प्राप्तीच पर्व समजल्या जाणाऱ्या " तारविह "नमाज च्या तय्यारीला लागलो, दैनंदिनच्या ज्या पांच अनिवार्य( कॉम्पल्सरी ) वेळेच्या नमाज आहेत.
इस्लाम जे पांच महत्वाचं तत्व (फंडामेंतल प्रिन्सिपल) आहेत त्यामध्ये दुसरे महत्वाचं तत्व हें नमाज हें आपल्या हिंदी उर्दूत म्हणतात परुंतु पवित्र कुरआन मध्ये त्यालाच 'सलात " म्हणतात आपण त्याला प्रार्थना म्हणू या, प्रत्येक धर्मात उपासनेची भक्ती करण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत, तशीच इस्लाम मध्ये नमाझ= नमाज, म्हणतात . आपण इंग्रजीत मेडिटेशन म्हणूया, परुंतु हें मेडिटेशन मेंदू पासून सर्व शरीराची हालचाल करायची आहेत, संपूर्ण मन एकाग्रता करून फक्त्त अल्लाह ( परमेश्वरा ) ची वंदना -बंदगी -मेडिटेशन सह व्यायाम करायचं आहेत, दिवसातून पांच वेळा..नमाजच्या वेळी आपल्या संपूर्ण शारीराची ठराविक पद्धतीने हालचाल करायची आहेत. नमाज नंतर " दुवा " प्रार्थना फक्त्त आपण स्वतः व अल्लाह यांचं नातं.. बस..
दैनंदिन म्हणजे रोज :- (1) फजर (भोर पहाटे )=( सूर्योदया अगोदर 20 मिनटं पर्यंत ) 5-30-ते 6-00 वाजेपर्यंत,(2) दुपारी जोहर 12-30-ते 3=00 वाजेपर्यंत, (3) असर ( गोरज मुहूर्त, संध्याकाळी ) 4-ते 6-0 ते -30 पर्यंत सूर्यास्ता पर्यंत, (4) मगरीब - अर्थात सूर्यास्ता नंतर लागेच (5) रात्री 8 = पासून ते रात्री उशिरा पर्यंत. 
त्यानंतर ही अनेक ऐच्छिक( नफील )नमाजी आहेत.. काही बंधू त्या जरूर अदा करतात.असो.
प्रेषित मुहम्मद स्व. यांना अल्लाह ( परमेश्वरा ) नें आपल्या प्रेषितांच्या स्वर्ग ( जन्नत ) भेटीच्या दरम्यान "सलात " नमाज" अल्लाह नें बंदगी भक्ती साठीच भेट दिलेली आहेत. परुंतु या दिवस भराच्या अशा वेळी ठेवलेल्या आहेत की, या वेळी जगातील बहुतेक लोकं किंवा जग हें आळसलेल्या अवस्थेत किंवा काहीतरी मानसिक - शारीरिक थकवा तरी जाणवलेलं असतं किंवा सध्या च्या काळातील बाजारात फिरण्याच्या वेळा असतात, यालाच आपण निगेटिव्ह एनर्जी ची वेळा म्हणूच या, अल्लाह नें मानवानांना या वेळी स्पुर्ती - उत्साह यावं -ताजगी यावी व मनाला - शरीराला शांती भेटेल व स्पुर्ती चैतन्य वाटेल म्हणून कदाचित अल्लाहनें आपल्या वंदना साठीच या वेळेची अखनी केलेली असावी . असो.
त्या व्यतिरिक्त रमजान महिन्यातील स्पेसिअल खास तारविह नमाज, रात्री ईशा नमाज ला जोडूनच तास टिड तासाची 20 वीस रकात, संपूर्ण 30 दिवसात एक ते दोन वेळा पवित्र कुराअ ण म्हटलं जातं, तसं पहिले तर प्रत्येक नमाज मध्ये पवित्र कुरआ न पाठन करणं अनिवार्यच असतं परुंतु तारविह नमाज मध्ये रोज दीड ते दोन अध्याय ( para) च पाठन होतं. 
पवित्र कुरआन हें प्रेषित ( पैगंबर ) मुहम्मद स्व. यांना अल्लाह नें हजरत जिब्राईल ( जिब्रोल्टर ) अलै.या आपल्या विशेष दुता मार्फत 23वर्षात आपल्या दैनंदिन काळानुरूप व गरजा नुसार समस्त जगाला एक मार्गदर्शक पवित्र ग्रंथ पाठवला, त्यामध्ये( 6666)सहा हजार सहासे साहशस्त आयती ( स्लोक, ओव्या ) 114 सुरह आहेत, 30 अध्याय ( पारा ) आहेत. त्यामध्ये मानवाच्या प्रत्येक गरजेनुसार गरजेसाठी मार्गदर्शक केलेलं आहेत. दीव्य कुरआन हें कायम वर्तमान व भविष्यात सुध्या वेळोवेळी मार्गदर्शक करेल, आधुनिक तांत्रिक युगात व भविष्यात घडणाऱ्या घटनांचे सुद्धा काळानुसार नूरूर्पण व मार्गदर्शन करेल. कविनी, साहित्यकानी अभ्यास केलेत की ते कोणत्याही अलंकारात यमक मध्ये फिट बसत, हजारो वेळी वाचलं की कायम काहीतरी नावं नवीनच शिकायला भेटते.
1456 वर्षात असंख्य वैद्यज्ञानिकानी प्रयोग संशोधन करून बघितलं परुंतु काळाच्या कसोट्यात पवित्र कुरआन कायम सिद्ध झाले आहेत. असो 
हेच पवित्र कुरआ ण तील प्रत्येक आयतीच -स्लोक- शब्द न शब्द मोठमोठ्यांनी अलंकारिक पद्धतीने म्हटलं जातं त्यावेळी कानाला मानलं एक प्रकारचे सुखद वाटतेय.म्हणूनच काहीतरी वेगळं एकण्याचं आनंद भेटतोय. तेच मनाला स्पर्शसून जातात.
म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " इतर वेळेपेक्षा रमजान मधील प्रत्येक गोष्टीच पुण्य इतर वेळे पेक्षा सत्तार पटीने जास्त भेटतात "
म्हणूनच या रमजानुल मुबारक क्षनांचा शब्द न शब्दाचा सबाब ( पुण्य ) तुम्हाला जरूर भेटेल.
सध्याच्या भाषेत ऑफर आहेत की एकाला सत्तर ची तर जरूर या पवित्र ऑफर ( संधी ) चा फायदा उचला.
( मित्रांनो लेख आवडल्यास माहिती साठी आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा ).


================≠================
-----------------------------------------------
लेखक :- डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना 
मिल्लत नगर, श्रीरामपूर 
जिल्हा :- अहमदनगर 
  मोबाईल :- 9271640014..
🌷🌷🌷🌷🌷👌👍🙏.
-----------------------------------------------
=================================

शेख नाजेमाबेगम नवाब यांना"असबाक शैक्षणिक पुरस्कार" प्रदान


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या शिक्षक शिक्षिका यांना असबाक पब्लिकेशन पुणे, समर फाउंडेशन मालेगाव, मावीया एज्युकेशन ट्रस्ट अहमदाबादच्या वतीने दिला जाणारा "असबाक शैक्षणिक पुरस्कार" सोनई जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शिक्षिका शेख नाजेमाबेगम नवाब यांना समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य बद्दल जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात हा पुरस्कार समर फाउंडेशनचे अध्यक्ष अश्फाक उमर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी नगरपालिका श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,माजी सभापती पंचायत समिती वंदनाताई मुरकुटे, अहमदनगर उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीमखान पठाण, उपाध्यक्ष इमाम सय्यद, सचिव आबीद दुलेखान सदस्य बदर सर, सहेली ग्रुपच्या नर्गीस इनामदार आदी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना शेख नाजेमा म्हणाल्या की कामाचे कौतुक झाल्यावर अजून जोमाने काम करायला बळ मिळते.काम करतानाही असेच समाजामधून सहकार्य मिळाल्यास भविष्यात पण विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमात शिक्षकांवर सध्या वाढलेल्या अनेक कामाचे ताणतणावात पण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांनी आपल्या भाषणातून गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहमदबदर शेख यांनी केले.प्रास्ताविक अहमदनगर जिल्हा उद्धव साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले. तर आभार आबिद खान यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
 *वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

परीक्षेचा पेपर फुटला का? एक-एक प्रश्न 10 लाखांना विकला गेल्याचा दावा, विषय राज ठाकरेंच्या कोर्टात

- मनोज श्रीवास्तव - प्रतिनिधी -/ वार्ता -
मुंबई महानगरपालिकेच्या गट ए च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येतोय. "महानगरपालिकेच्या गट ए च्या ज्या परीक्षा होत्या, त्यात साधारणपणे 1200 लोकं बसली होती. जो पेपर 25 तारखेला होणार होता. तो पेपर आधीच 19 तारखेला फुटला. आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक एक प्रश्न दहा दहा लाखाला विकला गेला. शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झाला. घोटाळेबाज असे इंजिनियर तुम्ही पालिकेला देणार आहात का?" असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

"एकदा हे पैसे देऊन इंजिनियर झाले, की नंतर हे पैसे खाण्याचेच काम करतील. यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे" असं संदीप देशपांडे म्हणाले. "राज ठाकरे यांना आम्ही पूर्ण प्रकाराची कल्पना दिलेली आहे. लवकरच राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घेऊन त्या विषयावरती बोलणार आहेत" अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

'...तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू'

"या घटनेत परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि चौकशी झाली पाहिजे, आणि जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटून रितसर तक्रार देणार आहेत" असं संदीप देशपांडे म्हणाले. "देवेंद्र फडणीस यांच्याकडे आम्ही कारवाईसाठी जाऊ. त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू" असं संदीप देशपांडे म्हणाले.

'न्याय मिळवण्यासाठी राज ठाकरेंकडे आलोय'

"माझ्याकडे हे प्रकरण आलं, तेव्हा तक्रार केली. त्यादिवशी एक मोठा गट आम्हाला येऊन भेटला. त्यांची अपेक्षा होती की हा विषय राज ठाकरे यांच्याकडे पोहोचावा. हा विषय त्यांच्याकडे गेला तर त्यांना न्याय मिळेल. काही लोकांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून राज ठाकरे यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत. संदीप देशपांडे आणि मी
BMC Exam : BMC परीक्षेचा पेपर फुटला का? एक-एक प्रश्न 10 लाखांना विकला गेल्याचा दावा, विषय राज ठाकरेंच्या कोर्टात

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Sunday, March 2, 2025

रमजान मुबारक 2025रोजा नंबर 02, सोमवार 03-03-2025

रोजा :-नीतिमत्ता व संयमाची परीक्षा घेणारं पर्व...
प्रेषित मुहम्मद स्व. यांचे मित्र ( सहाबा ) अब्दुल्लाह बिन उमर रजि. सांगतात की, आम्हाला प्रेषितानी सांगितलं की, तुम्ही चंद्रदर्शन( चंद्रकोर )बघूनच दुसऱ्या दिवशी रोजा ( उपवास ) ठेवा, ( सहीह बुखारी 1906).
चंद्रकोर बघून सत्य सत्यता पडताळून अतिशय मनोभावे 
दुसऱ्या दिवशी लगेच इस्लामच जे तिसरं अंत्यन्त महत्वाचे स्तम्भ" रोजा ", मराठी बोली भाषेत' उपवास "म्हटलं जाते, खरं तर प्रत्येक धर्मात उपवास ठेवण्याची प्रथा आहेत, फक्त्त पद्धती वेगवेगळ्या आहेत, हिंदूत प्रत्येक महिन्यात येणारे " एकादशी, द्वादशी, चतुर्थी, शिवरात्र यामध्ये हिंदू बंधू- बघीनी उपवास ठेवतात, जैन धर्मात" पर्युषन पर्व " म्हणून फारच कडक उपवास असतात तसेच ख्रिस्थन मध्ये ही चाळीस दिवसाचे उपवास असतात परुंतु उपवास ठेवणे व त्याचीच सांगता करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. जगात एक ही धर्म असा बाकी नाहीं की उपवास नाहींत.असो.
 आपण ज्याला रमजान म्हणतोय रमजानतील '' रम्ज " या शब्दाचा सरळ अर्थ हा " जळणं "होतो. 
या रमजान पर्वात रोज सकाळी भोर पहाटे 5:00 वाजता उठून थोडं अन्न ग्रहण ( सेहरी ) करून दिवस भर अन्न पाण्या शिवाय निरंकार राहून संध्याकाळी 6:41 मिनिटापर्यंत( इफ्तार )उपाशी राहनं म्हणजेच रोजा ठेवणं. 
फक्त्त उपाशीच राहणं नव्व्हे, आपल्या सर्व वाईट सवयी,भावना, विचार, आचार, विकृती, शिवी शाप, शपथ, हो आपल्या व्यसनांना आवर घालणे सुद्धा, या सर्व गोष्टीना आवर घालणे व आपल्या मनातील सर्व वाईट गोष्टीच्या विचारांना जाळून टाकणं, आपल्या मनातील राग, मत्सर, अतिशय क्रोध, लोभ जाळून टाकणे. चोरी करणं, दुसऱ्याला त्रास होईल असे कृत करणं, शिव्या शाप देणे, कोणी लज्जीत होईल अशी कृत्य करणं, 
सिगारेट, दारू, अफू, चरस, गांजा ची व्यसणं रोजा च्या माद्यमातून सोडवणं, आपल्या प्रत्येक वाईट सवयी विकृती, तसेच मनातील सर्व भावना जळमट या रामजानुल मुबारक च्या पवित्र राजा च्या सुवर्ण संधीचा फायदा उचलून चांगल्या सवयी मध्ये संगोपन, संवर्धन करणं याला च रोजा ठेवणं, तरच रोजा ठेवण्याला अर्थ. तसेच रोजा ठेवून दगाबाजी,चोरी करणं, खोटे बोलणं, हें अल्लाह ( परमेश्वर )ला मान्य च नाहीं. 
"फक्त्त उपाशी राहणं अल्लाहला पसंत च नाहीं " पवित्र कुरआन (सुरह नं. 02 अल - बकराह ).
अशा रोजदारांसाठी प्रेषित मुहम्मद स्व. चे मित्र सहाबा अबू हुरेरा रजि. सांगतात, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नीं सांगितलं की, " जो रोजे ठेवून खोटे बोलेल, दगाबाजी करतात,अशा रोजा ठेवणाऱ्यांची आम्हाला अजिबात गरज नाहीं ( सहीह बुखारी 2903).
रोजा ठेवण्यासाठी आपली मनापासून मानसिक तय्यारी करणं की आज आत्ता पासून सर्व वाईट आचार -विचार -प्रवृत्ती मी सोडणारच आहेत. रमजान च्या रोजने फक्त्त धार्मिक कर्मकांड च पूर्ण न होता आपल्या मध्ये आधात्मिक सुदधीकारणच होऊन एक प्रकारे सर्व समावेश नैतिक मानवी मूल्यवर्धन वृद्धिंगत होतं असतं, नैतिक शिक्षण वाढ होते व संयम सद्गुण विकास होतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या अंतर आत्म्यास हृदयापासून शांती मिळते. आणि हेच रोजाच फलीत म्हणावं.
( मित्रांनो लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा )

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=--=-=-

लेखक :- डॉ. सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा दवाखाना ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर 
Mobile no. 9271640015
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=--=-=-

उपेक्षितांचा अधारवड हरपला अ.भा. लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व्ही.जी.रेड्डी यांचे निधन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अखिल भारतीय लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.व्ही.जी.रेड्डी यांचे आपल्यातून अवेळी निघून जाण्याने सामाजात कधी न भरुन येणारी मोठी पोकळीक निर्माण झाली आहे.
व्ही जी.रेड्डी साहेब हे उपेक्षितांचे आधारवड होते, ते केवळ मातंग समाजाचेच नव्हे तर प्रत्येक सामाजातील रांजले - गांजले, अन्याय पिडीत अशा पुर्णतः उपेक्षित आणी दुर्लक्षितांचे ज्वलंत समस्या,प्रश्न सोडविण्याठी त्यांचा सातत्याने पुढाकार होता,त्यांच्या निर्पेक्ष व परोपकारी मार्गदर्शनामुळे सामाजातील अनेक उपेक्षित, दुर्लक्षित आणी अन्यायग्रस्तांना उचित न्याय मिळाला यामध्ये अ.भा. लहुजी सेने चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण तथा सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांना योग्य पद्धतीने तथा निर्पेक्षवृत्तीने परिश्रम करण्याची त्यांनी मोठी शिदोरीच दिलेली असल्याचे समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या श्रद्धांजलीपर शोक संदेशात म्हटले आहे.
व्ही जी.रेड्डी यांचा अंत्यविधी उद्या सोमवार दि. ३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथील टाकळी येथील हिंदू स्मशानभूमीत होणार असल्याचे अ.भा. लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचीव हानिफभाई पठाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, March 1, 2025

छत्रपती शिवाजी महाराज आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे शहरात ताबडतोब बसविण्यात यावे - डॉ.वंदनाताई मुरकुटे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी




- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे श्रीरामपूर शहरात लवकरात लवकर आणून बसविण्यात यावे , या जागेचे भूमिपूजन होऊनही आद्यपर्यंत पुतळे बसविण्यात आलेले नाही. यासंदर्भात श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सविस्तर चर्चा करत निवेदनाद्वारे सदरील मागणी केली आहे.
   डॉ. वंदना मुरकुटे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, “सदरील दोन्ही महापुरुषांचे पुतळे नाशीक येथे तयार असून नगरपालिका दरमहा भाडे रक्कम भरत असते. 
  या प्रश्नात प्राधान्य क्रमाने उपमुख्यमंत्री महोदय यांनी लक्ष घालून जिल्हाधिकारी यांना आदेश द्यावेत असेही डॉ. मुरकुटे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शिक्षणातून सर्वांगीण विकास साध्य होतो- प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन आहे. महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात. चांगले व्यक्तिमत्व आकाराला येऊन आपला विकास करून घेता येतो. असे विचार श्रीरामपूर येथील स्वामी सहजानंद भारतीय शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे यांनी व्यक्त केले.
         तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी व पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे ह्या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रा. अशोक थोरात, प्रा. डॉक्टर बाबासाहेब पवार, जालिंदर भांड, बापू पुजारी, आशा ओहोळ, मयूर राशिनकर, सुनील कोळसे, गोरख राशिनकर, ओम साई कॉम्प्युटरचे संचालक प्रा. दयानंद शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
      पुढे ते असे म्हणाले की, शिक्षक, पालक आणि समाज या तीनही धुवांच्या सहयोगातून विद्यार्थ्यांची जडणघडण होते. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी कायम महाविद्यालयाच्या संपर्कात राहून सामाजिक विकासात हातभार लावावा. आजी विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा करून देऊन देश विकासास हातभार लावावा. 
  यावेळी दयानंद शेंडगे, बापू पुजारी, सुनील कोळसे, अक्षय पठारे, सुशील राका, प्रा. अमृता गायकवाड या माझी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या संविधान गौरव महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या हरिहर या नियतकालिकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
   सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ओंकार मुळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी मानले. 
सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी व पालक यांचा सत्कार करण्यात आला.या दोन्ही मेळाव्यासाठी सर्व प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================