राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, September 30, 2024

आनंद होई भाविक जना - येता माळेचा महिना


*आनंद होई भाविक जना - येता माळेचा महिना*


दरवर्षी कॅथोलिक भाविक ऑक्टोबर महिन्यामध्ये मारिया मातेची विशेष प्रार्थना करून पवित्र माळेची भक्ती करतात म्हणून या महिन्याला "पवित्र माळेचा महिना" असे संबोधले जाते. याबद्दल अधिक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने केलेला हा लेखन प्रपंच...

मानवी आयुष्य स्वर्गीय पिता तारणाने प्रकाशमय करणार हे निश्चित होते. त्यासाठी परमेश्वर त्याचा एकुलता एक पुत्र मानवी रूपाने या भूतलावावर पाठविणार होता. ही योजना पवित्र आत्म्याद्वारे पूर्ण होणार होती परंतु ; गरज होती ती माध्यमाची. एका पवित्र कुमारीकेची. निष्कलंक, पाप विरहित, धार्मिक आणि देवाच्या सानिध्यात रमणाऱ्या स्त्रीची.
 पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती राहून विश्वाच्या तारकाला जन्म देणारी अशी सर्व गुण संपन्न कुमारीका पवित्र मारिया हिची या कामी निवड करण्यात आली म्हणून तारण कार्यात ती सतत सहभगी असते असा भाविक विश्र्वास धरतात. तीच्या ठायी पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा सहवास असतो. तीच्या ठायी पवित्र आत्मा असल्यामुळेच ती सामान्य असूनही असामान्य ठरली यामुळेच ती सन्मानास पात्र आहे.
दावीद कुळातील संत अन्ना व जोकीम या अत्यंत धार्मिक दांपत्याच्या पोटी पवित्र मारियेचा जन्म झाला. खरंतर अन्ना व जोकीम यांच्या वृद्धपकाळात देवाने दिलेले कन्यारत्न म्हणजे पवित्र मरिया होय. 
देवाच्या योजने करवी ती प्रभुची माता व प्रभूने योहानाच्या खांद्यावर दिलेल्या जबाबदारीमुळे ती संपूर्ण विश्वाची माता झाली.
आज जगभर पवित्र मरियेची मध्यस्थी लाभावी म्हणून कॅथोलिक ख्रिस्ती भाविक मनोभावे तिच्याकडे प्रार्थना करतात. भाविकांना तिची मध्यस्थी लाभतेच याचे उत्तम उदाहरण म्हणजे काना गावचे लग्न होय. वधु पित्याची निंदा नालस्ती होऊ नये म्हणून द्राक्षरस संपलेला आहे, ही बाब लक्ष्यात येताच तिने त्याच लग्नात उपस्थित असलेल्या आपल्या पुत्राकडे (प्रभू ख्रिस्ताकडे) मध्यस्थी केली आणि ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस केला, वधू पित्याची होणारी निंदा टळली. तारण कार्यातील तिची सहभागीता, दैवी योजनेच्या पूर्णत्वासाठी तिची झालेली निवड, सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडची वाटचाल, पवित्रात्म्यसह तिचा एकूण प्रवास तिला सन्मानास पात्र ठरवतो. 
तिच्या सन्मानार्थ साजरा होणारा सोहळा म्हणजे माळेचा महिना होय.
ऑक्टोबर महिना जवळ येताच चाहूल लागते ती माऊलीच्या आगमनाची. ऐरवी पवित्र मारियेच्या भेटीसाठी चेन्नई, बांद्रा किंवा हरेगांव या व अशा अनेक भक्तिस्थळी भाविक धाव घेत असतात. तिची पवित्र मध्यस्थी मिळवून कृपाशीर्वादास पात्र ठरतात. प्रसंगी शेकडो किलोमीटरचा प्रवास, अलोट गर्दीचा सामना, वेळेचे व पैशाचे नियोजन या सर्व दिव्यातून जाऊन भाविक तिच्या मातृप्रेमाच्या अनुभूतीसाठी जात असतात परंतू ; हीच माता धन्यकुमारी पवित्र मारिया जेव्हा स्वतः भाविकाच्या दारी येते तेव्हा भाविकांना आभाळ ठेंगणे झाल्याशिवाय राहत नाही. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या तारखेला मुख्य चर्च पासून निघालेली पवित्र मारियेची प्रतिमा धर्मग्रामातील वेगवेगळे विभाग, लहान ख्रिस्ती समूह व कुटुंबात माळेची उपासना करण्यासाठी नेली जाते.
यावेळी लहान ख्रिस्ती समूहासह ती आपल्या कुटुंबात अवर्णनीय आनंद घेऊन येते असा विश्वास भाविक धरतात.
 घराची स्वच्छता, सडा-रांगोळी, दारावरचे तोरण, तिला स्थानापन्न करावयाच्या जागेची सजावट, आलेल्या धर्मगुरू, धर्मभगिनी, प्रवचनकार व भाविकांचा यथोचित सन्मान या सर्व बाबींची पूर्तता करून माऊली भक्त तिच्या स्वागताची तयारी करतात.
दरम्यान ०१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर अर्थात संपूर्ण महिनाभर चालणारा हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. 
लुककृत शुभवर्तमानाच्या पहिल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे "सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील" हे शब्द वदलेल्या पवित्र मरियेची वैशिष्ट्यपूर्ण उपासना करण्याचा हा काळ होय.
आपल्या कुटुंबातील तिची अनमोल उपस्थिती व हर्षभरे होणारे तीचे भावपूर्ण स्वागत या अद्वितीय सोहळ्याचा आनंद भाविकांना नवचेतना देणारा असतो. माऊली भक्तांच्या श्रद्धेत वाढ करणारा असतो. प्रत्येक धर्मग्राम स्तरावर या संपूर्ण महिन्याचे नियोजन केले जाते. यावेळी धर्मगुरू, धर्मभगिनी व माऊली भक्तांच्या उपस्थितीत विविध विषयांवर प्रापंचिकांना प्रवचन करण्याची संधी दिली जाते. प्रापंचिक लोक विविध धार्मिक विषयांवरती अभ्यासपूर्ण प्रवचने सादर करतात.
पवित्र मारियेवरती निस्सीम श्रद्धा ठेवून भाविक तिची प्रेमळ मध्यस्थी मिळवीत असतात. कारण ती कृपादाने पावलेली धन्यकुमारी असून तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताची माता आहे. जर पवित्र शास्त्र सांगते की, "तू तुझ्या आई वडिलांचा मान राख" तर तारणाऱ्याच्या मातेचा मान राखणे व तिला सन्मान देणे अगत्याचे ठरते असे कॅथोलिक भाविक मानतात.
भाविकांच्या मनातील पवित्र मरियेच्या आगमनाचा आनंद वर्णन करताना मला अलिशिबा व मारियाच्या भेटीचा उल्लेख करावासा वाटतो. त्या दिवसात मारिया डोंगराळ प्रदेशातील यहुदा प्रांतातील एका गावात घाईघाईने गेली. यावेळी या दोघींची भेट झाली. भेट झाली त्यावेळी त्या दोघीही ईश्वर कृपेने मातृत्वाकडे वाटचाल करीत होत्या, गरोदर होत्या.
माऊली भक्तांच्या हृदयात भक्तीचा हा दीप तेवत ठेवण्या कामी व देव मातेच्या आगमनाच्या आनंदाची अनुभूती मिळविणे कामी अलिशिबाची भेट दिशादर्शक ठरते.
आपली मावस बहीण असलेल्या आलिशिबेकडे जेव्हा पवित्र मारिया जाते तेव्हा अलिशिबा भावुक होऊन म्हणते, "माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून ?" तिचे घरी येणे ही जर तिच्यासाठी मानाची गोष्ट आहे तर आपल्यासाठी सुद्धा ही आनंदाची व मानाचीच गोष्ट आहे यात शंका नाही. तिची सुवर्ण पावले ही चमत्काराची द्योतक आहे. एकमेकींना अभिवादन केल्यानंतर अलिशिबा म्हणते, "तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडतात माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली आहे. ( लुक- १:४४)
कारण मारियेची ही भेट प्रभूसह होती. इतकेच काय तिच्या उदरातील बाळाने मारलेली उडी किंवा हालचाल साधारण हालचाल नव्हती तर प्रभू भेटीच्या आनंदाने मारलेली उडी होती. 
उडी मारणारे बालक सुद्धा साधारण नव्हते. देवाच्या पवित्र मंदिरात धूप जाळणाऱ्या, विश्वासू राहून परमेश्वराकडे आपत्य प्राप्तीसाठी रडणाऱ्या, जखऱ्या व अलिशिबेचा पुत्र तो योहान होता.
तीन महिन्यांनी मोठा असणारा, तो ख्रिस्ताचा मावस भाऊ ख्रिस्ताचा मार्ग नीट करून, त्याला बाप्तिस्मा देणारा संदेष्टा योहान होता.
प्रभूच्या मातेने व पोटातील लहानग्या प्रभूच्या येण्याने जो आनंद अलिशिबा व योहानाला झाला होता त्याचं आनंदाचा अनुभव प्रत्येकाला यावा म्हणून भाविक पवित्र मारियाकडे विशेष कृपा मागतात. 
संकट समयी आपल्या लेकरांसाठी सदैव धावून येणारी, सैरभर झालेल्या लेकरांसाठी प्रेमळ मध्यस्थी करून कृपा पुरविणारी, कुमारी असूनही पवित्र आत्म्याद्वारे देऊ केलेले मातृत्व कुरकुर न करता आनंदाने स्वीकारणारी, उदरातील बाळासह आपल्या नियोजित पती समवेत बेथलेमचा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास कष्टाने करणारी, बाळ येशूचे उत्तम संगोपन करून प्रेमळ आई ठरलेली, क्रुसावरील मरणापर्यंत बरोबर राहून आपल्या पुत्राचे वेदनादायी मरण उघड्या डोळ्यांनी पाहणारी, धैर्याने त्या प्रसंगाला सामोरे जाणारी, शिष्यांसमवेत पुनरूत्थित येशूला पाहण्याचे भाग्य लाभलेली, अंतिमतः येशूच्या तारण कार्यात सहभागी असणारी धन्यकुमारी पवित्र मारिया होय. 
  प्रेमळ, संयमी, धाडसी, संवेदनशील, कष्टाळू, विश्वासू, धार्मिक अशा पवित्र मरीयेला भाविक आपल्या घरीचं नव्हे तर आपल्या अंत:करणात निमंत्रित करतात.  
पवित्र मारियेची भक्ती करण्यासाठी ख्रिस्त महासभेने ठरवून दिलेला हा पवित्र माळेचा महिना सर्व माऊली भक्तांना आनंदाचा,मरीयेच्या पवित्र मध्यस्थीचा व विशेष ईश्वरी कृपेचा जावो हीच सदिच्छा.

"या पुढती जन सकल पिढ्यांतील म्हणतील मजला धन्य अती, कारण केली अद्भुत कृत्ये प्रभुरायाने मजसाठी !!"

=================================
-----------------------------------------------
*लेखन:*
रवि त्रिभुवन,श्रीरामपूर +९१९६२३२८०९७८
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


विचार,परिश्रम आणि ध्यास ही कर्मवीर अण्णांची त्रिसूत्री जीवनात यशस्वी बनवते - अरुण चंद्रे


- कोपरगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या विचारातून रयत शिक्षण संस्था उभी राहिली,यासाठी कर्मवीर आण्णांनी खूप मोठा त्याग करुन रयतेसाठी अफाट कष्ट घेतले. कर्मवीरांचा आदर्श घेत विद्यार्थ्यांनी वटवृक्षाची फांदी होऊन आपल्या नवीन विचारांची नवनिर्मिती केली पाहिजे.शिक्षणाचा मूळ गाभा समजून घेतल्यास तसेच शारीरिक व मानसिक क्षमता दृढ केल्यास कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होता येते असे विचार प्रमुख पाहुणे संदीप कोळी पोलीस निरीक्षक कोपरगांव यांनी न्यू इंग्लिश स्कुल धामोरीच्या कर्मवीर जयंती सभे दरम्यान प्रतिपादित केले. 
                न्यू इंग्लिश स्कुल धामोरी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी जयंती सभा ३० सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी चे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी हे होते तर प्रमुख अतिथीपदी संदीप कोळी पोलीस निरीक्षक कोपरगांव, प्रमुख वक्तेपदी अरुण चंद्रे सर जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा हे उपस्थित होते.
याप्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील, वहिनी, विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी उर्फ आण्णा,प्रमुख अतिथी संदीप कोळी, प्रमुख वक्ते अरुण चंद्रे सर जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या समवेत इतर शिक्षण प्रेमी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.          

कार्यक्रमाची सुरवात स्वागतगीत व रयतगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी बागल यांनी केले.
      
या कार्यक्रमा प्रसंगी रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले तद्नंतर अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप व प्रेरणा मिळावी म्हणून मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना थोर देणगीदारा द्वारे ठेवण्यात आलेल्या रकमेच्या माध्यमातून बक्षीस वितरण करण्यात आले. 
            
वहिनीच्या दोन अश्रूनी रयत शिक्षण संस्थेची निर्मिती कर्मवीर आण्णा च्या हातून झाली. संस्थेचा डोलारा उभा करताना अपार कष्ट आण्णांनी घेतेले याची प्रचिती संस्थेचा विस्तार करताना एकदा त्यांच्या पायातून चौऱ्यांशी काटे निघाले होते यातून येते, विचार परिश्रम आणि ध्यास ही कर्मवीर अण्णांची त्रिसूत्री विद्यार्थ्यांनी जीवनात अंगीकारावी ही त्रिसूत्री नक्कीच आयुष्यात यशस्वी बनवते असे प्रतिपादन प्रमुख वक्ते पदावरून बोलताना अरुण चंद्रे सर यांनी केले तर या महाराष्ट्रात समाज सुधारकांनी कुठलाच स्वार्थ मनात न ठेवता मनापासून सेवा केली. म्हणूनच आज शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारापर्यंत आली असे प्रतिपादन चंद्रशेखर कुलकर्णी उर्फ आण्णा यांनी अध्यक्षीय मनोगतातून केले.
  
यानंतर सांस्कृतिक विभागामार्फत महिला सक्षमीकरण वर पथनाट्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी ग्रामस्थ, स्कुल कमिटी, व्यवस्थापन समिती, व्यवस्थापन व विकास समिती, माता पालक संघ, पालक शिक्षक संघ सदस्य, पत्रकार,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना सुरुची भोजन देण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या सर्व सेवकांनी परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दत्तात्रय घुले - धामोरी 
=================================
-----------------------------------------------

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९२९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

डॉ.परवेज अशरफी यांची अहमदनगर शहर मधून एमआयएम तर्फे उमेदवारीची पक्षाकडे मागणी


- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे. सर्व इच्छुक आप आपल्या पक्षाकडे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याच अनुषंगाने एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी खा. इम्तियाज जलील यांनी इच्छुक उमेदवार यांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून अर्ज भरण्यासाठी औरंगाबाद येथे इच्छुक उमेदवारांची गर्दी होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातून ही इच्छुक उमेदवारांनी आपले नामांकन पक्षाकडे सादर केले. त्यात अहमदनगर शहरातून एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज पक्षाकडे दाखल केला आहे. तसेच नेवासा आणि राहुरी विधानसभा येथून ही पक्षाकडे अर्ज दाखल करण्यात आले आहे. नुकतेच पैगंबर साहेब यांच्याविरोधात अपशब्द वापरणारे आणि भाजपच्या नितेश राणे यांच्यावर कारवाई ची मागणी साठी औरंगाबाद येथून मुंबई रॅली यशस्वी झाल्याने अहमदनगरच्या वतीने इम्तियाज जलील यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी डॉ परवेज अशरफी, ताहर शेख, ऍड सलीम सय्यद, अमीर खान, इम्रान शेख, सफवान कुरेशी, बिलाल शेख, इस्माईल शेख आदी उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यावर डॉ परवेज अशरफी यांनी पत्रकारांशी बोलतांना संगितले की, अहमदनगर जिल्ह्यातून सर्वच १२ विधानसभेतील इच्छुक पक्षाकडे दावेदारी अर्ज दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने महाविकस आघाडीला भरभरून मतदान केले. परंतु मविआ ने लोकसभेत एकही उमेदवार मुस्लिम समाजाचा दिलेला नाही.आणि औरंगाबाद मधून इम्तियाज जलील यांना पराभव करण्यासाठी दोन्ही गटबंधनने पूर्ण शक्ती लावली. तसेच विधान परिषदेतही मुस्लिम समाजाला माविआ ने निराशा केले. एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. याचाच अर्थ माविआला मुस्लिम अल्संख्यांक समाजाचे मत पाहिजे परंतु मुस्लिम समाजाचा नेता नको. महायुती बद्दल बोलतांना डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले की हे तर महाविकास आघाडी पेक्षा एक पाऊल पुढे आहे. यांना मुस्लिम अल्पसंख्यांक समाजच नको मुख्यमंत्री ज्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपशब्द वापरले त्यांचे संरक्षण करतात. तर गृहमंत्री त्यांची सुरक्षेत वाढ करून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की जो मुस्लिम समजविरोधत बोलेल त्यांना सरकार पूर्ण सुरक्षा देईल. यांचे आमदार मुस्लिम समजला घुसून मारण्याची धमकी देतात आणि गृहमंत्री त्यांची पाठ राखण करतात. यावरून स्पष्ट दिसते की, ना महाविकास आघाडी ना महायुती यांना मुस्लिम समाजाची गरज आहे. जर मुस्लिम समाज आपल्या सोबत इतर समाज घेऊन इतर समाजाचे लोकांना एकत्र घेऊन येणारे विधान सभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असेल तर चांगलेच आहे. प्रत्येक समाजाचा नेतृत्व विधानसभेत असणे गरजेचे असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
सध्या अहमदनगर मध्ये सामान्य नागरिकांत चर्चा आहे की अहमदनगरचा भावी आमदार सामान्य जनतेला पाहिजे. वर्षानुवर्ष जी घराणेशाही चालली आहे त्याला कुठे तरी थांबवणे गरजेचे आहे. अहमदनगर शहराला असा आमदार पाहिजे जो प्रत्येक समाजाला एकत्र घेऊन चालेल. जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल घडवणारा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजवणार लोक प्रतिनिधी नको.
यामुळे पक्षाकडे मी उमेदवारी मागितली आहे. मला आशा आहे की पक्ष अहमदनगर मधून उमेदवारी देताना माझा विचार करेल असेही शेवटी त्यांनी सांगितले.

गुरुवारपासून रेणुकादेवी आश्रमात ४७ वा शारदीय नवरात्र महोत्सव


विविध धार्मिक,सांस्कृतिक
कार्यक्रमाचे भव्य आयोजन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुकादेवी आश्रमात संस्थापक मौनयोगी रेवणनाथ महाराज यांच्या प्रेरणेने सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आश्रमाच्या मुख्यविश्वस्त श्रीमती नलिनीदेवी जोशी यांनी दिली आहे.यंदा महोत्सवाचे ४७ वे वर्ष आहे.

            गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी पहाटे राजराजेश्वरी रेणुकादेवीची अभिषेक महापूजा होणार असून सकाळी दहा वाजता विधीवत घटस्थापना करून नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे तसेच दुर्गा सप्तशती पाठाची सुरुवात व महाआरती होणार आहे.
सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता ललितापंचमीनिमित्त ललिता सहस्त्रनामावली स्तोत्रपठण तसेच कुंकुमार्चन देवीअष्टक पठण होणार आहे.
बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी षष्ठीनिमित्त पहाटेच्या महाआरतीला आई जगदंबेचा भळंदगोंधळ व जोगवा आणि मंत्र जागर होणार आहे,
गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सप्तमीनिमित्त आदिशक्तीचे जाई जुई शेवंती महापूजा केली जाणार असून भाविकांना खिचडी प्रसाद दिला जाणार आहे.
       शुक्रवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमी उपवास आणि पहाटेच्या आरतीस भाविकांना खिचडी महाप्रसाद दिला जाणार आहे, याच दिवशी दुपारी महानवमी असल्याने नवचंडी होमहवन होणार आहे, सायंकाळी सहा वाजता पूर्णाहूती होऊन कुमारिका पूजन व महाआरती होणार आहे.
         शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी नवरात्र उत्थापन होणार आहे तसेच कुलधर्म कुलाचार व महानैवेद्य आरती होईल, दुपारी दोन वाजेपासून सिमोल्लंघन व शमीपूजन होणार आहे, सायंकाळी आठ वाजता शस्त्रपूजन , शमी अर्पण आपटापान अर्पण व मंगलऔक्षण होऊन नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.
नवरात्र काळात दररोज पहाटे ५.३० वाजता निमंत्रित जोडी व लवकर येणाऱ्या जोडीसह महाआरती तर सायंकाळी सहा वाजता उपस्थित जोडीच्या शुभ हस्ते महाआरती होणार आहे. दरम्यान दुपारी चार ते सहा स्थानिक व अन्य भजनी मंडळाचे भजन तर रात्री नवरात्र उपासना होणार आहे. तरी भाविकांनी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुका देवी भक्त मंडळ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


Sunday, September 29, 2024

स्क्रीन पासून दूर राहा व जास्तीत जास्त वाचन करा- सौ.पोखरकर मॅडम


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वडाळा महादेव येथे संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्त विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. 
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अजीव सभासद सौ. पोखरकर मॅडम , स्थानिक स्कूल कमिटी सदस्य उद्धवराव पा. पवार तसेच शेती विभाग प्रमुख प्रा.एकनाथ औटी सर उपस्थित होते. कर्मवीर जयंती निमित्त विद्यालयात निबंध स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा ,चमचा लिंबू, स्लो सायकल संगीत खुर्ची, खो-खो ,कबड्डी अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांना ट्रॉफी , पेन व पेन्सिल बक्षीस स्वरूपात उपस्थित मान्यवर व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एन.डी.माळी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सौ.पोखरकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्याची व जास्तीत जास्त वाचन करण्याची गरज व महत्त्व पटवून दिले. भविष्यातील संधी ओळखून विद्यार्थ्यांना ते कौशल्य प्राप्त करण्यासाठी संस्था नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार,स्वेजल रसाळ,संतोष नेहूल, उषा नाईक, प्रज्ञा कसार, अविनाश लाटे , जयश्री जगताप ,जिजाबाई थोरात ,जमदाडे सर ,सुनिता बोरावके ,प्रशांत बांडे , अशोक पवार , संदीप जाधव, भास्कर शिंगटे तसेच बीएड छात्र-अध्यापक यांनी परिश्रम घेतले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शितल निंभोरे व सौ.दिपाली बच्छाव यांनी केले तर श्री. भास्कर सदगीर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

महाराष्ट्रातील शेतकरी व कर्जदार यांच्यावतीने आझाद मैदानावर उपोषण व जन आंदोलन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/वार्ता -
खातेदारांवर होणारा अन्याय किती सहन करायचा, बँक, फायनान्स, एनबीसी/पतसंस्था यांनी आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आंदोलनात सहभागी होऊन अन्यायविरुद्ध मुल संविधानिक अधिकार बचावाकरिता मुंबई येथे लढा उभारल्याचे व सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी प्रहार जनशक्तीच्या शीतल भाऊसाहेब गोरे यांनी सांगितले.
     
      बँक,फायनान्स कंपन्या/एनबीसी/पतसंस्था यांचेकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे तथा चुकीच्या कारभारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी,कर्जदार यांच्यावतीने नुकतेच आझाद मैदान मुंबई येथे तीन दिवस उपोषण व जन आंदोलन करण्यात आले. याबाबत संबंधित दोषींवर शासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकरी, कर्जदार मोठ्या संख्येने उपोषणास बसले होते.
या उपोषण आंदोलनाचे विविध संघटनानी नेतृत्व केले होते.
कर्ज घेणे हा काही गुन्हा नाही, प्रत्येक माणसाची आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्याला कर्ज घ्यावे लागते. काही कारणामुळे कर्ज रक्कम भरणे शक्य होत नाही अशांना बँका, पतसंस्था खातेदारांना आत्महत्या करायला लावणारी परिस्थिती निर्माण करतात. त्यासाठी मुख्यमंत्री यांनी याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.मोतीलाल होम फायनान्स उर्फ एस्पायर होम फायनान्स लिमिटेड, यांचे बाबत माहिती दिली. तसेच श्रीरामपूर येथील एका महिला पतसंस्थाकडून मनमानी कारभार होत असून त्याचा त्रास अनेक सभासदांना झाला आहे. सभासदांना वार्षिक सभेला निमंत्रण न देणे,सोने तारण कर्जदारांना माहिती न देता परस्पर लिलावाने विल्हेवाट लावणे,संचालक मंडळाची निवडणूक न घेता थेट मंडळ, चेअरमन नियुक्त करणे,ह्या नियमबाह्य बाबी आहेत.
दि.३० सप्टे.रोजी वार्षिक सर्व साधारण सभा असल्याने यावेळी अनेक सभासद आपल्या विविध समस्या मांडणार असून ही सभा गाजणार आहे.या संदर्भात अनेकांनी तक्रारी आ.बच्चू कडू यांना निवेदनाद्वारे देण्यात आलेल्या आहेत.सदर पतसंस्थेच्या मनमानी कारभार विरोधात महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार श्रीरामपूर,सहाय्यक निबंधक, उद्योजक अशोक कानडे यंच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित करण्यात आले होते.अद्याप सहाय्यक निबंधक श्रीरामपूर यांचेकडून निर्णय, कारवाई न झाल्याने श्रीमती शीतल गोरे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पा.यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले.व सहकार मंत्री यांनी सहकार आयुक्त यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले असे गोरे यांनी सांगितले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️❤️🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Saturday, September 28, 2024

शिक्षकांच्या हुंकार आंदोलनास पाठिंबा म्हणून शिक्षक समन्वय संघ श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने शाळा बंद आंदोलन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
मुंबई येथील आझाद मैदानावर गेली ४८ दिवसांपासून अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान मिळावे याकरिता शिक्षक समन्वय संघाकडून शिक्षकांच्या न्याय व रास्त मागणीसाठी हुंकार आंदोलन पुकारण्यात आले असून शुक्रवार दि.२७/०९/२०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांनी सहभाग नोंदवित जाहीर पाठिंबा दिला असून आज श्रीरामपूर तालुका जि.अहमदनगर येथील समस्त अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी यांची भेट घेऊन त्यांना शाळा बंदबाबत लेखी निवेदन दिले.
          यावेळी श्री.पाचपिंड सर,लबडे सर,इनामदार सर, आरिफ सर, इब्राहीम बागवान सर,साबीर शाह सर,आजिज शेख सर, अल्ताफ काकर सर, रूपटक्के सर,भांगरे सर, बडाख सर, त्रिभुवन सर आदि उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
इब्राहिम बागवान (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Friday, September 27, 2024

"येक नंबर' चित्रपटाचा मुंबईत ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंसह अभिनेता, निर्माता आमिर खानसह चित्रपटसृष्टीतील विशेष मान्यवर उपस्थित होते"


- मुबंई - प्रतिनिधी -/ वार्ता -
"'येक नंबर' हा मराठी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित या चित्रपटामध्ये अभिनेता धैर्य घोलप आणि सायली पाटील हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत. दरम्यान 'येक नंबर' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी हे नामांकित व्यक्ती उपस्थित होते."


"राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'येक नंबर'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित करण्यासारखा आहे. 'येक नंबर'चं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास दिसत आहे. प्रताप त्याचे ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नाची उकल येत्या 10 ऑक्टोबरला होणार आहे."

"ट्रेलर पाहून प्रेक्षकांना सध्या या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का? तर याचे उत्तरही प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. दरम्यान, 'येक नंबर'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची झलकही दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटातून मलायकानं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. यापूर्वी चित्रपटातील 'जाहीर झालं जगाला' या प्रेमगीतानं प्रेक्षकांना भुरळ घातली होती. सध्या हे गाणं प्रचंड गाजत आहे. 'येक नंबर'म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे, हे नक्की ! एकंदरच या सगळ्यावरूनच चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज येतोय."

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




अल हिरा स्कूल ॲन्ड मदरसा ने आयोजित पैगंबर मुहम्मद स्व सल्लमांच्या जीवन चरित्रपर ( सिरत - ए- नबी स्व. ) आधारीत कार्यक्रम के श्रीरामपूर के विजेताओं का सन्मान और सत्कार "

" अल हिरा स्कूल ॲन्ड मदरसा ने आयोजित पैगंबर मुहम्मद स्व सल्लमांच्या जीवन चरित्रपर ( सिरत - ए- नबी स्व. ) आधारीत कार्यक्रम के श्रीरामपूर के विजेताओं का सन्मान और सत्कार "
     अहमदनगर ज़िले के ता.कर्जत शहर में ता.22-09-2024 इतवार ( Sunday ) *अल-हीरा स्कूल & मदरसा ने* पैगम्बर हज़रत मुहम्मद (स.)के जीवन पर *(सिरत-ए-रसूल सल्लल्लाहु) के आधार* पर एक *जिल्हा लेवेल पर बड़ा कॉम्पटीशन रखा गया था।* 
 वही कॉम्पटीशन (Competition) में श्रीरामपुर शहर के मशहूर मकतब-मदरसा ( *मकतब-ए-आयशा-MAKTAB-E-AYESHA* 
और *MAKTAB-E- DARUSSLAAM* व
 *MADINA MASJID MARKAZ* shrirampur) के सभी Candidate, *55 तलबा और तालिबात* ने हिस्सा लिया था जिसमे
*मकतब-ए-आयशा फातिमा हाउसिंग सोसायटी की तालिबा* 
*01 ) अल्फिया जाफर काकर* और 
*02) खदीजा ज़ाकिर काकर* और इसी तरह से 
*दारुस्लाम मदरसा गोंधवानी* की 
*03) सादिया रफ़ीक़ बेग* 
        इन्होंने इनामात( अवार्ड )हासिल किए इन बच्चियों को और उनके घर वालो का हौसला ( हिम्मत) बढाने के लिये श्रीरामपूर शहर के खतिब ए इमाम मौलाना अब्दुल कददुस सहाब , फैजान ए जमिल फौंडेशन के इक्बाल काकर सर, बैतुशशिफा एज्युकेशनल व सोशल फौंडेशन व
विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सभी कार्यकर्ते अध्यक्ष डॉ सलीम सिकंदर शेख बैतुशशिफा, खजिनदार बॅंक मॅनेजर अकबरभाई शेख, संघटक इम्तियाज पठाण, सदस्य सनमून बुक्स के तन्वीर भाई शेख , ऐ वन मसाला के खालिद भाई मोमीन..और हाजी अमीन मनसुरी, वसिम कुरैशी..और सभी बच्चों के वालीद और मदरसा ( मकतब ) ए आयेशा के मुख्य टिचर - उस्ताद हाफीज अमान जहागीरदार - पटेल और उनके भाई हाफीज जहागीरदार _ पटेल सहाब मौजुद थे...

=================================
-----------------------------------------------

लेखक :- ✍️✅🇮🇳...डॉ सलीम सिकंदर शेख 
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================





Thursday, September 26, 2024

मुखियाजी के ग्रेजुएट बहु लेखक : राम राघव - बैंगलोर


चहुँओर मंगलमय वातावरण था, कुछ महिलाएं तो मंगलगान में व्यस्त थी वहीँ कुछ बैना - पिहानी बांटकर घर वापस लौटी थी और बैठकर नवेली बहु के गुण - संस्कार का बखान कर रही थी। हो भी क्यूँ ना आखिर आज गाँव के मुखियाजी के पोत - पुतोहू के ससुराल आगमन पश्चात रसोई स्पर्श का प्रथम दिवस जो था। वस्तुतः आज के भोजन का जायका भी तो नयकी दुल्हिन के अनुसार ही होगा, जिसमें वो अपनी पाक कला की दक्षता और विवाह पूर्व अर्जित खान - पान की समझ को भी ससुरालवालों के सामने प्रदर्शित कर अपने नैहर को गर्व भी महसूस करवा पायेगी।
मुखियाजी का परिवार चार पुत्र एवं पुत्र - वधुओं समेत कुल 27 लोगों से भरा-पूरा परिवार था। घर की सम्पन्नता और संयुक्त परिवार के आयाम की चर्चा आस - पास के 20 - 25 गाँवों में लोगों की जुबान से निकल ही पड़ती थी। सभी स्वजन मुखियाजी को शुभकामनाएँ दे रहे थे, कि अरे आप जैसा सौभाग्य भगवान सबको दें, पोता का बियाह तो देखिये लिए अगर प्रभु की मरजी रही तो स्वर्गारोहण से पाहिले पड़पोता को गोद में जरुरे खिलायेगा।
काफी गुना भाग और काट- छांट के बाद पोते की शादी तय हुई। वधु के चुनाव में यह ध्यान रखा गया कि कनियाँ सुन्दर हो न हो लेकिन पढ़ी लिखी और शहर के आहार व्यव्हार से परिचित जरूर होनी चाहिए। चूंकि लड़का स्नातक था और नौकरी के सिलसिले में अगर शहर जाना भी पड़ा तो अच्छी जीवनसंगिनी बन सके। अंततः एक कन्या का चुनाव हुआ और गाँव में कहलवाया गया कि मुखियाजी गाँव में पहली बार सुन्दरता से ऊपर शिक्षा को रखकर बहु ला रहे हैं।
शाम हुई तो बहु घूंघट काढ़कर एक कॉपी पर ससुराल के सभी सदस्यों का नाम लिखकर कौन कितनी चपाती खाएँगे, पूछना शुरू की। मुखिया जी का फरमान जारी हुआ कि सबलोग जल्दी - जल्दी अपनी खुराकी बता दो, जिससे कि कनियाँ को राशन आँकने में परेशानी का सामना न करना पड़े। कुछ तो दबी जुबान में यह भी कह रहे थे, ये कौन सी बला है, ऐसा भी कहीं हुआ है क्या ?, लेकिन सब बहु के इस गुण की चर्चा करने से बचते नजर आये। “अरे भाई पढ़ी - लिखी की बात ही कुछ और होती है”।
सभी सदस्यों की खुराकी का आंकलन तो हो गया, तदनुसार प्रति व्यक्ति के हिसाब से आटा, सब्जी, मसाले, इत्यादि का वजन तैयार हुआ और सम्बंधित नौकरानियों को नाप जोखकर सामान दे दिया गया। एक नौकरानी को आटा गूंथने का, दूसरी को सब्जी काटने, तीसरी को दूध गर्म करने और पायस सामग्री तैयार करने की तथा चौथी को चूल्हे के पास पर्याप्त जलावन, पानी और बर्तन इकठ्ठा करने को तो किसी को सिलबट्टे पर मसाला पीसने को कहा गया।
रसोई बनना प्रारंभ हुआ। कुछ समय पश्चात पकते व्यंजनों की सुगंध प्रांगण में फैलने लगी। सभी लोग संध्याकाल की नित्य - क्रिया से निवृत्त होकर दालान पर बैठकर गप्प हांकने के साथ ही अपनी बढ़ी हुई पेट पर हाथ फेरकर भूखा होने का सन्देश प्रेषित करने लगे। वहीँ घर की महिलाएं पकवान के इंतजार में बहु का गुण - गान किये जा रही थी और खुश भी हो रही थी कि आज किसी और की हाथ का भोजन ग्रहण करने का आनंद मिलेगा। “ग्रामीण परम्परा के अनुसार भोजन का भोग सर्वप्रथम बच्चे और पुरुषों के बाद बुजुर्ग महिलाएं और अंत में ननद भौजाईके खाने की रही है”।
समयानुसार नाना प्रकार का व्यंजन तैयार होने के सन्देश के साथ आमंत्रण भी दालान पर बैठे घर के तथा आमंत्रित पुरुषों को भिजवाया गया। दालान पर ही सभी पुरुष अपने - अपने लोटा में पानी में लेकर पालथी मारकर बैठ गए। केले के पत्ते पर पानी छिड़का गया और नाना प्रकार के व्यंजन परोसे गए। सभी ने भगवान को सुमिरते हुए भोजन आरम्भ किया। बुढिया सासु माँ और मुखियाजी घूम - घूमकर स्वाद का अंदाज पूछते और इतराते। “कहिये कैसा भोजन बना है, नमक - उमक सब ठीक तो है ना”!
भोजन स्वादिष्ट बने होने से सब छककर खाते रहे और साथ ही पौत्र - वधु को पुत्रवती, धनवती, सौभाग्यवती आदि होने का आशीर्वाद बरसाते जा रहे थे। “मजा आ गया, क्या भोजन बना है”! जैसी बातों से भोजन के स्वाद को और बढ़ाये जा रहे थे। पहली पंघत उठने के बाद बहु रसोई घर में जाकर खर्च और बचे हुए व्यंजनों का हिसाब किताब करने लगी। पता चला कि साधारणतया कुछ व्यक्ति स्वभावगत अपने अनुमानित या यूँ कहें कि स्वाद के वशीभूत होकर कुछ ज्यादा ही खा गए जिसके कारण भोजन अनुपातिक रूप से कम बचा हुआ था जिसमें बुजुर्ग महिलाओं और ननद भौजाई को खाना था। अपनी बारी आने तक भोजन समाप्त ना हो जाये ये सोचकर नई स्नातक बहु ने एक थाली में खुद के लिए सारा व्यंजन परोसकर रसोईघर में ही राखी कुर्सी पर बैठकर प्रारंभ कर दी। हा - हा ये क्या! बहु ने खाना शुरू कर दिया। कानों-कान खबर सासु माँ और ननद तक पहुँची, जिनको अपने घर की इज्जत को हमेशा पड़ोसियों से सर्वोपरि बताना रहता है, जग - हंसाई ना हो इसलिए भागे - भागे रसोईघर में बहु को देखने पहुँचे अरे ! कनियाँ ये क्या कर रही हो ? क्या हुआ अक्ल तो ठीक है ना! माँ ने कुछ सिखाया था कि नहीं। थोड़ी देर सब्र नहीं कर सकती थी? आदि-आदि कहकर ताना देने लगी। बहुत पूछने पर बहु ने बताया भूख तो उतनी नहीं लगी लेकिन सभी लोग जिस हिसाब से खाना खाए हैं वह पहले बताई गयी मात्रा से काफी ज्यादा है, इस प्रकार से तो हमारे खाने तक तो कुछ बचेगा ही नहीं, यही सोचकर मैंने अपना खाना खा लिया। बाकी लोग जाने कि आगे क्या करना है? इसमें आपलोग मुझे कोपभाजन का शिकार क्यूँ बना रहे हैं यह समझ से परे है। ऐसा बहु ने सासु माँ को बताया। इस बात की जग - हंसाई ना हो जाये, पतोहू को डांट रही थी कि थोड़ा पूछ तो लेती। दूसरी ओर इस बात की खबर पड़ोस में फैलने का भी डर था कि लोग क्या बोलेंगे?, इतने दिनों की बनी - बनायी इज्जत का क्या होगा ?
लघु परिवार की लड़की का संयुक्त परिवार की बहु बनने का सफर काफी अनमना सा रहा। वहीँ सम्भ्रांत परिवार के बहु का यह गुण यशस्वी परिवार की कीर्ति को धूमिल करने वाली और स्वार्थपरक कहकर ग्रामीण महिलाएं कंसार - घर की एक चौपाई सी बना डाली।
मुखियाजी के शहरी स्नातक पोत - पुतोहू के गुण - दोष का बखान जो भी हो परन्तु खाने की मात्रा के आंकलन के तरीके एवं संस्कृति से परे स्वयं के खाने का गुण ने तो सभी महिलाओं के होंठ पट - पटाने का एक स्वर्णिम अवसर जरूर दे गया।

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर 
महाराष्ट्र - M 09561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*लेखक विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
चंद्रकांत सी.पुजारी (गुजरात)
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आश्रमशाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - आ. कानडे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
आदिवासी समाजाच्या विकासासाठी राजूर प्रमाणे श्रीरामपूर येथे आदिवासी एकात्मिक विकास उपप्रकल्प कार्यालय तसेच आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.

श्रीरामपूर-पुणतांबे रस्त्यावरील गोंधवणी येथील डावखर मंगल कार्यालयात एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या आदिवासी एल्गार महासभेच्या अध्यक्षपदावरून आ. कानडे बोलत होते. श्रीरामपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, सरपंच अशोक भोसले, सागर मुठे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, दीपक निंबाळकर, सुदाम पटारे, युनूस पटेल, दीपक कदम, चांगदेव देवराय, बापूसाहेब लबडे, सुनील शिंदे, इमरान शेख, शिवाजी अभंग, सुनील शिंदे, आशिष शिंदे, प्रतीक कांबळे, कल्पेश माने, एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे संस्थापक शिवाजीराव गांगुर्डे, संघटनेचे पदाधिकारी ज्ञानेश्वर लगड, मल्हारी पवार, दत्ता माळी, विष्णू वाघ, रंगनाथ आहेर, सुदाम मोरे, सुभाष पवार, भीम आर्मीचे दीपक भालेराव, योगेश पवार, भारत पवार, मच्छिंद्र जाधव, ताराबाई पवार, अंजली पवार, सरपंच नंदा अहिरे यावेळी व्यासपीठावर होते.

प्रारंभी दीप प्रज्वलन व विविध महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच जय जय महाराष्ट्र माझा या गीताने एल्गार महासभेस सुरुवात झाली. यावेळी विधानसभा अधिवेशनामध्ये पारधी विकास आराखड्याप्रमाणे भिल्ल विकास आराखडा मंजूर करावा, या विषयावर आवाज उठवून त्यास मान्यता देण्याची मागणी केल्याबद्दल आ. कानडे यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. गोदावरी नदीत बुडणाऱ्या तिघांना आपल्या साडीच्या साह्याने वाचविणाऱ्या कोपरगांव येथील ताराबाई पवार यांचा यावेळी आ. कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आ. कानडे म्हणाले, आपण शोषित समाजाच्या चळवळीतून आलेला कार्यकर्ता असून या समाजाचे दुःख जाणून आहे, त्यामुळे आपण कायमच आदिवासी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत, यापुढेही ते काम सुरूच राहील, शासकीय जागेत अतिक्रमण करून राहणाऱ्या आदिवासींचे अतिक्रमणे नियमानुकूल करावीत, असा निर्णय शासनाने घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. या प्रश्नासाठी आपली लढाई सुरू आहे. अशी अतिक्रमणे उठविण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर दांडा काढावा, मी तुमच्या पाठीशी राहील. जातीचे दाखले, रेशन कार्ड असे आदिवासींचे प्रश्न आहेत. त्याचे ऑनलाईन अर्ज भरून द्यावेत, कोणी दाखल्यापासून वंचित राहणार नाही, याबाबत काळजी घेऊ.
गोरगरिबांच्या नावाने मते मागणाऱ्यांनी गोरगरिबांसाठी झालेले निर्णय अमलात आणले पाहिजेत. परंतु तसे होत नाही. सरकारने आदिवासींसाठी जे प्रकल्प केले तेथे सर्व निधी दिला जातो. राजुर येथे आदिवासी प्रकल्प असून त्यांना ८५ टक्के निधी मिळतो तर इतरत्र आदिवासींची संख्या जास्त असताना त्यांना मात्र १५ टक्के निधी मिळतो. सर्व आदिवासींना सामान निधीचे वाटप व्हावे, असा आग्रह आपण शासनाकडे धरला, पारधी विकास आराखड्याप्रमाणे आदिवासी विकास आराखडा मंजूर करावा, यासाठी आपण विधानमंडळात प्रश्न उपस्थित करून आवाज उठविला, पुढील काळात यासाठी लढा उभारावा लागेल असे ते म्हणाले.
आदिवासींसाठी असलेल्या राजुर येथील प्रकल्प जिल्ह्यातील इतर आदिवासींच्या दृष्टीने गैरसोईचा आहे. या कार्यालयात जाण्या-येण्यास पैसा व वेळ खर्च होतो. त्यामुळे श्रीरामपूर येथे उपप्रकल्प कार्यालय सुरू करावे अशी आपली मागणी आहे. तसेच राजुर प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यातील काही आश्रम शाळा बंद असून त्यांचे लेखाशीर्ष मात्र बंद झालेले नाही. त्यामुळे त्यापैकी श्रीरामपूर व देवळाली प्रवरा येथे आश्रम शाळा सुरू कराव्यात, यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आ. कानडे यांचा नेहमी प्रयत्न असतो. आदिवासी विकास आराखड्याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणारे आ. कानडे पहिले आमदार आहेत. हा प्रश्न उपस्थित केल्याने राज्यातील आदिवासी एकवटले असून सर्व आदिवासी आ. कानडे यांच्या पाठीशी उभे आहेत. आगामी निवडणुकीत आ. कानडे यांना विजयी करण्यासाठी आदिवासी निश्चितच प्रयत्न करतील, असे संघटनेचे संस्थापक शिवाजीराव गांगुर्डे यावेळी म्हणाले.
राज्यात अनेक आदिवासी समाजाचे नेते असून यापैकी कोणीही आदिवासींच्या प्रश्नाबाबत अधिवेशनात बोलले नाहीत. मात्र आ. कानडे यांनी भिल्ल विकास आराखड्यावर अधिवेशनात चर्चा घडवून आणली. त्यांना आदिवासीच्या प्रश्नाची जाण असून आदिवासी वस्तीतील मूलभूत गरजा भागवायचे असतील तर आ. कानडे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन ज्ञानेश्वर लगड यांनी यावेळी केले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्हारी पवार, दत्ता माळी, सुदाम मोरे, दीपक भालेराव यांनी आपल्या भाषणातून आ. कानडे यांनी आदिवासींसाठी केलेल्या कामाचा आढावा घेत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
रंगनाथ आहेर व हर्षदा आहेर यांनी सूत्रसंचालन केले. अरुण पाटील नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती. मंगल कार्यालय गर्दीने भरले होते. त्यामुळे बाहेरही अनेक आदिवासी बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.

=================================
-----------------------------------------------
श्रीरामपूर - आदिवासी एल्गार महासभा बोलताना आमदार लहू कानडे. समावेत एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे संस्थापक शिवाजीराव गांगुर्डे. समवेत आदिवासी जनसमुदाय दिसत आहे. (छाया - अमोल कदम, श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================




शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शेळके तर उपाध्यक्ष पत्रकार संदीप आसने व उमाप


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील माळवाडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उद्धव शेळके तर उपाध्यक्षपदी पत्रकार संदीप सुभाष आसने व ललिता उमाप यांची सर्वानुमते पालक मेळाव्यात निवड करण्यात आली आहे.
        माळवाडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी काल दि. (२६) रोजी सुरेश आसने यांच्या अध्यक्षतेखाली व माजी अध्यक्ष जालिंदर आसने व मुख्याध्यापक देविदास मुंतोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या पदाधिकारी निवडीत कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सत्ताधारी व विरोधक यांनी एकत्र येत शाळा व्यवस्थापन समितीची निवड शांततेत पार पडली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उद्धव सुरेश शेळके यांची तर उपाध्यक्षपदी पत्रकार संदिप सुभाष आसने व ललिता सचिन उमाप यांची तर सदस्य पदी सुदाम बापूसाहेब आसने, रामनाथ सोमनाथ आसने, सचिन बाबासाहेब आसने, दिपक रमेश आसने, किरण भास्कर शिंदे, नितीन खाजेकर, गोरख शंकर गुढेकर, प्रवीण मच्छिंद्र साळवे, मनिषा प्रवीण आसने, तेजस्विनी शिवाजी आसने, सुमन दादासाहेब आसने, सुरभी अमोल दांगट, आरती गणेश आसने, सविता गणेश मोरे, सचिवपदी मुख्याध्यापक देविदास मुंतोडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर माजी अध्यक्ष जालिंदर आसने यांचा सत्कार करण्यात आला, तसेच नविनर्वाचीत पदाधिकाऱ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच श्याम आसने, सदस्य नानासाहेब आसने, सदाशिव आसने, संजय खताळ, सुनिल आसने, अंकुश आसने, रविंद्र आसने, बाळासाहेब आसने, दिनेश आसने, महेंद्र आसने, भाऊसाहेब नेमाने, सोमनाथ मोरे, प्रदीप आसने, अनिल आसने, गणेश आसने, अमोल आसने, गौरव आसने, साहेबराव भोंडगे, बबन आसने, मंगेश साळवे, अमोल दांगट, संदीप बोरुडे, दत्तात्रय आसने, हरी गाढे, अनिल मोरे, शशी आसने, पिंटू अनुसे, राणी गाढे, मनीषा आसने, सौ. मोरे, शाळेच्या शिक्षिका रंजनाताई बोर्डे मॅडम, सुनिता तोडमल मॅडम, संगीता साळवे मॅडम, मारिया साळवे मॅडम, स्वाती बोबडे मॅडम, बहिरु धोंगडे सर, श्रीकृष्ण शेळके सर, सुनील पाचपिंड सर यासह आदी माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================





एमपीएससी,युपीएससी स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र तयार करणे बाबत खा. राजाभाऊ वाजे यांना निवेदन


एमपीएससी,युपीएससी स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र तयार करणे बाबत खा. राजाभाऊ वाजे यांना निवेदन

- नाशिक - प्रतिनिधी -/ वार्ता -
मध्य विधानसभा परिक्षेत्रात एमपीएससी,युपीएससी स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र तयार करणे बाबत, नाशिककर मुख्यत्वे मध्य विधानसभा परिक्षेत्र नागरीकांच्यावतीने खासदार राजाभाऊ वाजे यांना निवेदन देण्यात आले. 
         सदरील निवेदनाद्वारे विनंतीवजा मागणी करण्यात आली आहे की,आमच्या मध्य विधानसभा क्षेत्रात जुने नाशिक, नागजी, व वडालागांव हे घनदाट लोकवस्ती असलेले क्षेत्र आहे व मुख्यत्वे याच परिसरात मध्य विधानसभा क्षेत्रातील दाट लोकवस्ती असल्याने कष्टकरी, मध्यमवर्गीय लोकांची संख्या लक्षणीय आहे, येथील नागरीकांना दैनंदिन जिवनात लागणाऱ्या गरजेंबरोबरच आर्थिक व शैक्षणिक सुविधांसाठीही खुप तडजोड व मेहनत घ्यावी लागते आहे.
केवळ फक्त शिक्षणाविषयी बोलायचे झाल्यास याबाबत येथील नागरीकांकडे पुरेश्या साधनसामुग्री व पर्याय उपलब्ध नाहीत. करीता ज्या प्रमाणे आपण सिन्नर येथे लोकनेते शंकररावजी वाजे वाचनालय तयार करुन तेथील शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या विद्यार्थ्यांना सदरील बाबी मार्ग उपलब्ध करुन दिला आहे. त्याच धर्तीवर आम्हालाही स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्र एमपीएससी, युपीएससी स्टडी सेंटर करुन द्यावे अशी विनंती ही शेवटी या निवेदनात करण्यात आलेली आहे.
         या निवेदनात पुढे म्हटले आहे की, युपीएससी, एमपीएससी स्टडी सेंटर अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्यावर आम्हाला विश्वास आहे की, लवकरच आम्ही आमच्या विभागातून देशासाठी व राज्यासाठी आपल्या सेवा प्रदान करण्यासाठी सक्षम व देशात आपल्या शहराचा नावलौकिक करणारे उत्कृष्ट अधिकारी देऊ करीता आमच्या या निवेदनाला स्विकरुन आम्हाला लवकरात लवकर अख्ख्या महाराष्ट्राला हेवा वाटेल असे वाचनालय,स्टडी सेंटर तयार करुन द्यावे. अशी मागणीही शेवटी करण्यात आली आहे.
याप्रसंगी माजिद पठाण समवेत अल्ताफ शेख, कलविंदर गरेवाल,गौसिया बाजी शेख, शकिल चाचा शेख, अरशीया शेख, वसिम पठाण आदि उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार माजिद खान, नाशिक 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


पर्यटन जागतिक शांतता आणि सहचर्याचे साधन


पर्यटन हे जगातील महत्त्वाचे आर्थिक क्षेत्र आहे. जागतिक स्तरावर प्रत्येक दहा व्यक्तींमागे एकाचा रोजगार हा पर्यटनावर अवलंबून आहे. जागतिक स्तरावर मानवाच्या आर्थिक उन्नतीसाठी पर्यटन महत्त्वाचे ठरू शकते. वर्ल्ड ट्रॅव्हल ॲण्ड टूरीझम डेव्हलपमेंट इन्डेक्स अहवालात पर्यटनाशी संबंधित विविध पैलूंवर विचार करण्यात आला आहे. मात्र बहुतांशी ही बाजू आर्थिक आहे, त्यापलीकडे जावून वैश्विक समाजाला एकत्र आणण्याच्या पर्यटनाच्या महत्त्वाच्या भूमिकेचाही विचार करणे गरजेचे आहे.
मात्र त्यासोबतच जागतिक शांतता आणि परस्पर संबंध दृढ करण्यासाठी पर्यटन महत्त्वाचे साधन आहे. पर्यटनाच्या माध्यमातून परस्पर सामंजस्य निर्माण होते, सकारात्मक संवाद होतो आणि हीच बाब शांतता प्रस्थापित करण्यास कारणीभूत ठरते. लोकांनी लोकांसाठी चालविलेला हा व्यवसाय रुढी - परंपरांना आव्हान देत नवे संबंध प्रस्थापित करण्यास कारणीभूत ठरत आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने हीच बाब जगासमोर मांडण्याचा प्रयत्न होणार आहे. यावर्षी जागतिक पर्यटन दिन ‘पर्यटन आणि शांतता’ या संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात येणार आहे.
शाश्वत पर्यटनामुळे रोजगाराची निर्मिती होते आणि ते सामाजिक स्थैर्यासाठी उपयुक्त ठरते. संस्कृती आणि नैसर्गिक संपदेच्या रक्षणात पर्यटनाची महत्त्वाची भूमिका आहे. शांततापूर्ण सहअस्तित्वासाठी ही बाब उपयुक्त ठरते. परदेशी पर्यटन भारतातील धार्मिक स्थळांना भेटी देतात, विविध सण - उत्सवात सहभागी होतात, विविध प्रकारच्या स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेतात. तात्पर्य, ते काही काळासाठी आपल्यात मिसळून जातात, भारतीय समाजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. हीच बाब भारतीय पर्यटक परदेशात गेला की अनुभवयाला मिळते. देश आणि राज्यांच्या सीमांच्या पलीकडे एक नवे नाते यामुळे निर्माण होत असते.
पर्यटन नवकल्पना आणि नावीन्यतेला समोर आणत असते, त्यातून नव्या व्यवसायांची निर्मिती होते. कोकणात ‘ट्री हाऊस’ सारखी संकल्पना वापरून पर्यटनाला चालना देण्याचे प्रयत्न पहायला मिळतात. जिल्ह्यात कृषी पर्यटनातही नवे प्रयोग होत आहेत. काही ठिकाणी तेथील स्थानिक खाद्य, सांस्कृतिक परंपरांच्या आधारे पर्यटनाला चालना देण्यात येते. नव्या सृजनाच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. त्यातून आर्थिक स्थैर्य, शाश्वत विकास आणि परिणामत: शांततेसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास चालना मिळते. युवकांमध्ये असलेल्या सर्जनशिलतेचा आणि ऊर्जेचा उपयोग करून पर्यटन क्षेत्रात असे अनुकूल बदल घडवून आणता येतील.
सांस्कृतिक स्तरावरील शांततेचा विचार करता पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यातील सुसंवाद महत्त्वाचा असतो. दोन्ही बाजूने एक समान पातळीवर विचार झाल्यास एकमेकांना समजून घेता येते आणि त्यातून चांगले संबंध दृढ होतात. एखाद्या ठिकाणी पर्यटकांना वारंवार जावेसे वाटणे हा तेथील पर्यटन व्यावसायिकांच्या उत्तम संवाद कौशल्य आणि सामंजस्यपूर्ण भूमिकेचे एकप्रकारे यश असते. शिवाय भिन्न संस्कृतीच्या व्यक्ती समोर आल्यावर एकत्वाची भावनाच त्यांच्यात परिणामकारक संवाद घडवून आणू शकते.
अतिथ्यशिलता हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भारतात येणारा पर्यटक एखाद्या कुटुंबात वावरल्यासारखा पर्यटनाचा आनंद घेत असतो. मात्र, इथे येणाऱ्या पर्यटकाला त्याचा प्रत्येक क्षण आनंदात घालवता येईल, समस्यांचा सामना करावा लागणार नाही, त्याची फसवणूक होणार नाही, त्याला प्रत्येक क्षणी सुरक्षित असल्याचा अनुभव येईल असे वातावरण देणे ही आपली जबाबदारी आहे. पर्यटन व्यवसायाचा विस्तार आणि त्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख प्रस्थापित करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
देशाची सीमा ओलांडून जाणारा पर्यटक एकप्रकारे त्या देशाचा सांस्कृतिक दूत किंवा शांतता दूत म्हणून दुसऱ्या देशात जात असतो. पर्यटनाच्या माध्यमातून अशा भिन्न संस्कृतीचे आदान प्रदान होत असते. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची संधी असते. पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांनी एकत्र येऊन या संधीचे सोने कसे करता येईल आणि परस्पर सहकार्यातून पर्यटन व्यवसाय हा विविध सीमा, संस्कृती,भाषा यांना जोडणारा दूवा कसा होईल याचा विचार पर्यटन दिनाच्या निमित्ताने केल्यास हा व्यवसाय वाढण्यासोबत पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक शांततेचे उद्दिष्टाकडे सकारात्मक वाटचाल करण्यास मदतच होईल.

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेची स्थापना २७ सप्टेंबर १९७० रोजी झाली. स्थापनेचा दहावा वर्धापन दिन साजरा करतांना १९८० मध्ये स्पेन येथे पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष साजरे करण्यात आले. जागतिक पर्यटन दिनानिमित्त आतापर्यंत पर्यटन आणि हरित गुंतवणूक, पर्यटन आणि समावेशक विचार, पर्यटन आणि रोजगार, पर्यटन आणि सामाजिक विकास अशा विविध ४४ संकल्पनांबाबत जागतिक पातळीवर चर्चा घडवून आणली गेली.
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

*डॉ.किरण मोघे*✍️✅🇮🇳...
जि.मा.का.अहमदनगर

*प्रसिद्धी*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११


Tuesday, September 24, 2024

विद्यानिकेतनमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील स्व. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, स्टेट बोर्डमध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३७ वी. जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य विनोद रोहमारे यांच्या हस्ते डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रसंगी त्यांनी 'कर्मवीरांचे जीवन व त्यांचे शैक्षणिक कार्य, याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांमधून चि.सार्थक भाटिया (इ.दहावी) व सहशिक्षिका सुप्रिया बाबरस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
यावेळी कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, व्हा.चेअरमन डॉ. प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे, राजश्री तासकर, सुनंदा थोरात तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या.
*वृत्त विशेष सहयोग*
शंकर बाहुले (सर) श्रीरामपूर 
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११

राज्यस्तरीय ABACUS परिक्षेत कु.अवनी सलालकर प्रथम


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
निशा ABACUS या संस्थेने सोलापूर येथे राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन केले होते,
अवनी सलालकर हिने चौथ्या टप्प्यातील पहिल्या पेपरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर दुसरा पेपरमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तिच्या यशाबद्दल एस. के.सोमैया प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर शाळेच्या संचालिका तथा रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या मिनाताई जगधने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनालीताई पैठणे वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार श्रीमती अनिता चेडे श्री.भालदंड सर आदिंनी अभिनंदन केले 
     सौ.संचिता नरोटे यांनी मार्गदर्शन केले. 
अवनी सलालकर हिच्या यशाबद्दल महंत बापू कुलकर्णी,नवनाथ अकोलकर, शिवराज तिटमे, ज्ञानेश्वर पटारे, चंद्रकांत कराळे माधवराव तिटमे, श्रीकांत किर्तीशाही आदिंनी अभिनंदन केले.

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

वडाळागांव मध्ये ईद- ए- मिलाद निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


- नाशिक - प्रतिनिधी -/ वार्ता -
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या शरीराचे रोगनिदान तपासणी करीत नसल्यामुळे अनेक वाईट प्रसंग अनेक मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो, दुर्दैवाने जीव ही गमवावा लागतो, आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. याबाबत जागृती व्हावी याउद्देशाने के.बी .एच. विद्यालय, वडाळा येथे फैज़ल रज़ा शेख व करिअर काउंसलर व मोटिवेशनल स्पीकर असिफ शेख यांच्या प्रयत्नातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मेंदू, मनके विकार, अस्थिरोग, हृदयरोग, मधुमेह छातीच्या विकारांबाबत निदान व उपचार करण्यात आले. रक्तदाब, मधुमेह, ईसीजी ह्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. सादर शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ. शीतलकुमार हिरन, डॉ. अनुज नेहते, डॉ.अतुल सिंघल, डॉ.दीपक आहेर यांनी परिसरातील शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करून पुढील उपचार संबंधी योग्य सल्ला दिला. कॅरिअर काउंसलर आसिफ शेख यांनी मार्गदर्शन करताना आरोग्य हिच संपदा असून आरोग्याची चांगली काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. 
          यावेळी के. बी. एच. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय म्हसकर, पो.नि. सुनील अंकोलीकर, सहा. पो. उ. नि. संतोष फुंदे, सामाजिक कार्यकर्ते रशीद लाला मदारी, डॉ.असलम पठाण, डॉ. तारिक कुरैशी, इम्रान शेख, पवार सर, निसार हाजी, मुश्ताक हाजी, हाजी उमर रज़वी, मुश्ताक लालू, रफियोद्दीन शेख, फरीद शेख, मोहसीन शाह, पत्रकार इसहाक कुरैशी, पत्रकार तबरेज शेख, इश्तियाक शेख आदी उपस्थित होते. सदर आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेवटी फैज़ल रज़ा शेख यांनी आभार मानले.

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार माजिद खान - नाशिक 

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

युनिव्हर्सल ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मोफत दंत तपासणी व उपचार शिबिर संपन्न


महागाईच्या काळात मोफत शिबिरांची अत्यंत आवश्यकता - महबूब शेख

- अहमदनगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना आज प्रत्येक बाबी हे महागड्या होत आहे. त्याचप्रमाणे आजारांचे उपचार ही दिवसां दिवस महाग होत आहे. त्यासाठी मध्यमवर्गीयांसाठी मोफत शिबिरांची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन यूनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टचे व्हाईस चेअरमन महबूब शेख यांनी केले.
गणेश उत्सवानिमित्त युनिवर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या डेंटल केअर अँड इन्पांट सेंटरच्या वतीने संजय नगर येथील स्नेहालय बालभवन येथे मोफत दंत तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे व्हाईस चेअरमन मेहबूब शेख, डॉ सावंत पालवे, डॉ सायली शिंदे, मास्टर मुश्ताक, दीपा शिंदे, अंबादास पोटे, ऋतिक लोखंडे, दिपाली, अंजली, चंद्रकला व रेखाताई आदी उपस्थित होते. 
      शिबिरात मोठ्या प्रमाणात मूलं व लोकांनी दातांची तपासणी करून मार्गदर्शन घेतले. पुढे बोलताना महबूब शेख म्हणाले की, सध्याच्या काळात सण उत्सव साजरे करण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना सर्वांनी ते साजरे करताना आपली जबाबदारी समजून सर्व रोगांसाठी शिबिर आयोजित केले पाहिजे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा शिंदे यांनी केले तर आभार मास्टर मुस्ताक यांनी मांनले.

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीदखान, अहमदनगर 

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११

संजय बनसोडे यांचीप्राचार्य पदी नियुक्ती


श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी संत फ्रान्सिस एज्युकेशन संस्था औरंगाबाद संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने सेंट मेरी विद्यालय वाहेगांव (ता.गंगापूर) येथे प्राचार्य पदावर तालुक्यातील हरिगांव (ता.श्रीरामपूर ) येथील संजय बाबुराव बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्या बद्दल हरेगाव व प्रगती नगरसह,अरुण बनसोडे, नीरज बनसोडे, किशोर मकासरे व मित्र मंडळ आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात कर्मवीर जयंती उत्साहात साजरी


- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला प्राचार्य अंगद काकडे, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, उपप्राचार्य अलका आहेर, प्र. पर्यवेक्षक संजय ठाकरे व प्र. पर्यवेक्षक सुभाष भुसाळ यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तनुजा भालेराव हिने कर्मवीरांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्रवरानगर संकुल ते लोहगाव कमानीपर्यंत कर्मवीरांच्या देखाव्यांसह मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कन्या विभागाच्या वतीने कलशधारी विद्यार्थिनी व लेझीम पथक, विद्यार्थी वसतिगृहातील झांज पथक, गुरुकुल आश्रमातील विद्यार्थ्यांचे वारकरी पथक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या टिपरी पथकाने संकुल ते तांबेनगर व नेहरूनगर येथे आपल्या विविध कलांचे केलेले प्रात्यक्षिक मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. यावेळी परिसरातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे ठिकठिकाणी औक्षण करून अभिवादन केले. मिरवणूक मार्गावर महिलांनी सड्यासह रांगोळ्या काढल्या होत्या. ही मिरवणूक यशस्वी संपन्न होण्यासाठी संकुलातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर  ९१९५६११७४१११

श्री छत्रपती शिवाजी विद्यालय माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात तृतीय विद्यालयास मिळणार एकलाख रुपयांचे पारितोषिक


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय,मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये तालुक्यात तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले असून विद्यालयास एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी गठित करण्यात आलेल्या शासकीय समितीमार्फत सर्व सहभागी शाळांचे मूल्यमापन करण्यात आले. यात श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाने तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावला. विद्यालयात पायाभूत सुविधा, गुणवत्तेबरोबर भौतिक सुविधा, शासकीय समित्या, शासकीय शिष्यवृत्ती योजना, साक्षरता अभियान, स्वच्छता, डिजिटल वर्ग खोल्या , परसबाग ,खेळाचे मैदान या व अशा विविध विभागांचे काटेकोरपणे मूल्यमापन करण्यात आले.
        रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य प्रकाश पा. निकम, उत्तर विभागाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे, उत्तर विभागीय अधिकारी बाबासाहेब बोडखे,सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे व बाबासाहेब नाईकवाडी, उत्तर विभाग गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळुंजकर, आ. लहू कानडे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संजीवन दिवे, विस्तार अधिकारी मंगल गायकवाड, केंद्रप्रमुख संजीवनी अंबिलवादे, प्राचार्य प्रवीण बडधे, प्राचार्य सुहास निंबाळकर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुधीर पा. कसार ,राजेंद्र पा.पवार, उद्धवराव पा.पवार तसेच वडाळा महादेव गावातील ग्रामस्थ यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव माळी तसेच ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार ,शितल निंभोरे , स्वेजल रसाळ, उषा नाईक, भास्कर सदगीर , संतोष नेहुल,अविनाश लाटे प्रज्ञा कसार ,दिपाली बच्छाव , जिजाबाई थोरात, जयश्री जगताप ,सुनिता बोरावके, प्रशांत बांडे, अशोक पवार , संदीप जाधव,भास्कर शिंगटे इ. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
 पत्रकार राजेंद्र देसाई वडाळा महादेव
*संकलन*💐🇮🇳✅...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११

राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ जास्तीत जास्त धनगर समाजातील प्रवर्गाने घ्यावा; माजी आ. भानुदास मुरकुटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - प्रतिनिधी 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीकरिता प्रवर्गातील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थीसाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घ्यावा, असे आवाहन लोकसेवा विकास आघाडीचे समन्वयक गणेश छल्लारे यांनी केले आहे.
या योजनेचा फॉर्म भरण्याचा शुभारंभ अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते श्रीरामपूर येथील अशोक कारखाना कार्यालय येथे संपन्न झाला. या ठिकाणी सदर योजनेचा ऑनलाईन फॉर्म २६ सप्टेंबर पर्यंत मोफत भरून दिले जाणार आहे.
राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढ्या १ मेंढानर अशा मेंढीगटाचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५ टक्के अनुदानावर वाटप, मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी ५० टक्के अनुदान, पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणारं आहे. याबाबत अधिक माहितीसाठी मेनरोड श्रीरामपूर कारखाना कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शुभारंभ प्रसंगी अशोक कारखान्याचे संचालक यशवंत बनकर, बबनराव आसने, बाळासाहेब आसने आदींसह योजनेचे लाभार्थी बाबासाहेब शिंदे, भाऊसाहेब सोलट, योगेश शिंदे आदी लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११

अशोक आयडियल स्कूल च्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मोठे यश


अशोक आयडियल स्कूल च्या विद्यार्थ्यांचे आंतर शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये मोठे यश

लोकनेते मा आ भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले अशोक स.सा. कारखाना संचलित अशोक आयडियल स्कूल,प्रगतीनगर च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारत नुकत्याच पार पडलेल्या आंतरशालेय तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चौदा वर्षे मुलांच्या वयोगटातील अंतिम सामन्यात विजय मिळविला. या संघाची पुढील स्पर्धेसाठी जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली आहे. या प्रकारात तालुकास्तरीय अंतिम सामन्यात सलग तिसऱ्यांदा विजेता ठरण्याचा बहुमान अशोक आयडियल स्कूल ला मिळाला आहे, अशी माहिती अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत चौदा वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने देखील तिसरा क्रमांक पटकावला.त्याचप्रमाणे चौदा वर्षे वयोगटातील क्रिकेट संघाने लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात दुसरा क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला.अलीकडेच झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कु अवंतिका गोंडे आणि कु सेजल काळे विजयी होत त्यांची जिल्हा पातळीवर निवड करण्यात आली.क्रीडा क्षेत्रामध्ये अशोक आयडियल स्कूल चे विद्यार्थी माननीय भानुदास मुरकुटे यांच्याकडून खेळाची तसेच व्यायामाची प्रेरणा घेऊन विविध खेळांमध्ये व स्पर्धांमध्ये यशस्वी होत आहेत.
अशोक आयडियल स्कूलचे प्राचार्य रईस शेख क्रीडा शिक्षक राजू दुधाने व विजयी खेळाडूंचे श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार तसेच अशोक उद्योग समूहाचे प्रमुख लोकनेते भानुदास मुरकुटे, अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका तसेच अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ मंजुश्रीताई मुरकुटे,मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिध्दार्थ मुरकुटे, अशोक स.सा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हिम्मतराव धुमाळ,ऍग्रो इंडस्ट्रीज एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सोपानराव राऊत,उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक,सचिव विरेश गलांडे आणी संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११

अशोक कामगार पतसंस्थेची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील अशोक सहकारी साखर कामगार पतसंस्थेची सन २०२३-२४ या वर्षाची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली संस्थेचे निवृत्तीभाऊ बनकर पाटील सांस्कृतिक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात संस्थेच्या कामकाजाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके उपस्थित सभासदांसमोर मांडण्यात आली.
अध्यक्षपदावरुन बोलतांना माजी आ.मुरकुटे म्हणाले की, संस्थेचे संचालक मंडळ सदस्य व सभासद यांचा संस्थेबद्दलचा विश्वास व सहकार्य यामुळे आज अशोक कामगार पतसंस्थेचा नावलौकिक वाढलेला असून ही अभिमानास्पद बाब आहे. कामगारांना स्वावलंबी बनण्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी आर्थिक अडचणीच्या काळात अशोक कामगार पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज रुपाने आर्थिक सहाय्य केले जाते. कामगारांनी आपल्या अपत्यांचे विवाह कार्यात कोणताही अनाठायी खर्च न करता साध्या पद्धतीने विवाह करुन बचत केलेली रक्कम मुलीच्या वा मुलाचे नावावर बँकेत ठेवी स्वरुपात गुंतवणूक करावी जेणेकरुन भविष्यात त्याचा फायदा कुटुंबाला होईल. त्याचबरेबर कामगारांनी आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण दिले पाहिजे, त्यासाठी अशोक शैक्षणिक संकुलामार्फत सर्व सुविधांयुक्त शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. कामगारांनी आपल्या उत्पन्नातील काही भाग बँकेत व संस्थेत गुंतवणूक करुन आयुष्यात स्थैर्य व यश मिळविण्यासाठी आर्थिक बचत करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
प्रास्तविकात संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब दोंड म्हणाले की, अहवाल सालात सभासदांना रु.१ कोटी ४३ लाख कर्ज वाटप केलेले असून संस्थेस रु.३४ लाख ७९ हजार नफा झाला आहे. त्यानुसार सभासदांना ९ टक्के डिव्हीडंड व कर्मचारी बोनसची होणारी रक्कम दीपावलीपूर्वी सभासदांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. यावेळी विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेस व्यासपीठावर कारखान्याचे व्हा.चेअरमन हिम्मतराव धुमाळ, संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यलक्षी संचालक अशोक पारखे, गिताराम खरात, सामाजिक कार्यकर्ते गणेश छल्लारे, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, व्हा.चेअरमन संतोष जाधव, संचालक लव शिंदे, डॉ.मंगेश उंडे, अण्णासाहेब वाकडे, हरिभाऊ गायके, दत्तात्रय झुराळे, संदीप डोळस, भाऊसाहेब आसने, प्रदीप शिंदे, ज्ञानेश्वर मुठे, विकास दांगट, सौ.लिलाबाई बागडे, सौ.नंदा ढुस, सचिव दिपक बडजाते आदी उपस्थित होते.
सभेस कारखाना अधिकारी कृष्णकांत सोनटक्के, सुनिल चोळके, विजयकुमार धुमाळ, रमेश आढाव, ज्ञानेश्वर सांगळे, सुनिल बार्से आदींसह संस्थेचे सभासद व हितचिंतक उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेचे अध्यक्षीय सूचना हरिभाऊ गायके यांनी मांडली, त्यास अशोक पारखे यांनी अनुमोदन दिले. डॉ.मंगेश उंडे यांनी श्रद्धांजली ठरावाचे वाचन केले. विषयपत्रिकेचे वाचन संचालक दत्तात्रय झुराळे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार लव शिंदे यांनी मानले.

*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११

कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने आयोजित केलेले सेवाभावी उपक्रम कौतुकास्पद- माजी तहसिलदार गुलाबराव पादीर


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानने आयोजित केलेले सेवाभावी पुरस्कार आणि इतर उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत माजी तहसिलदार गुलाबराव पादीर यांनी व्यक्त केले.
शहरालगत शिरसगाव येथील बोरावकेनगर मधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे स्व. नामदेवराव विश्वनाथ सुकळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सामाजिक सेवा पुरस्कार रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्रा. शिवाजीराव बारगळ यांना स्व. नामदेवराव विश्वनाथ सुकळे स्मृतीप्रीत्यर्थ सामाजिक सेवा पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचे डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयास महाराष्ट्र शासनाचा तीन लाखाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा पुरस्कारनिमित्त मुख्याध्यापक सुनील साळवे, गुरुकुल प्रमुख कांतिलाल शिंदे यांचा सन्मान, भोकरच्या सर्वसामान्य शेतकरी परिवारातील व बोरावके महाविद्यालयाच्या कु.अश्विनी पोपटराव काळे या विद्यार्थिनीची अलिबाग येथे एमबीबीएस वैद्यकीय परीक्षेसाठी निवड झाली, तिने नीट परीक्षेत६४७ गुण मिळविले या सर्वांना प्रतिष्ठानतर्फे सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, बुके, पुस्तके , भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक गौरविण्यात आले. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव पादीर बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. यावेळी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे,सौ.अरुणा बारगळ, सौ मिराताई पादीर, कस्तुरबाई सुकळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठान संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून मान्यवरांचे सत्कार केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला. मानपत्राचे वाचन कवयित्री संगीता फासाटे, कटारे यांनी केले. यावेळी डॉ. राजीव शिंदे, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, डॉ. वसंतराव जमधडे, मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी मनोगत व्यक्त केले गुलाबराव पादीर यांनी श्रीरामपूर शहराची पार्श्वभूमी सांगून विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठान, ज्येष्ठ आनंद मेळावा, साहित्य प्रबोधन मंच, विचार जागर मंच आणि मान्यवर सेवाभावी संस्था व्यक्ती हे शहराचे भूषण आहेत. सुकळे हे कुणाची देणगी न घेता आपल्या अल्पस्वल्प पेन्शनमधील रक्कम वापरून असे सेवाभावी उपक्रम राबवितात हे विशेष उल्लेखनीय आहेत. प्राचार्य टी. ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. अण्णासाहेब शिंदे,अड, रावसाहेब शिंदे आदिंचे शैक्षणिक योगदान सांगून सुकळे यांनी सेवानिवृत्ती नंतरही कर्मवीरांनी सांगितलेला सेवाभाव जपला आहे. प्रा.बारगळ , मुख्याध्यापक सुनील साळवे, कु. अश्विनी काळे यांचा उचित, प्रेरणादायी सत्मान झाला असल्याचे सांगितले.प्राचार्य डॉ. बाळासाहेब बावके, प्रा. रमेश चौधरी, डॉ. प्रकाश मेहकरकर, मुख्याध्यापक भागवत मुठे, लिंगायत समाज अध्यक्ष निकडे, सुरेश गड्डेगुरुजी, राजेंद्र बारगळ, योगेश माकोणे, आनंदकुमार आरोटे, लहानू रहाणे, सदाशिव गोसावी, गणेश सुकळे, सार्थक सुकळे, सौ. सुरेखा बुरकुले संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, सौ.मोहिनी काळे, प्रा.कु. हर्षला बारगळ, आशालता कल्याणकर, श्री बोरकर, बाळासाहेब बुरकुले, सतिश गवळी, पुंडलिक खैरनार, आबा साळुंखे, देवराम शिंदे, लक्ष्मण भंडारी, प्रसन्न धुमाळ, विष्णू भगत, रावसाहेब भिंगारदिवे, पोपटराव काळे, बाबासाहेब चेडे आदी उपस्थित होते. अनेक व्यक्ती, संस्था, संघटनेतर्फे प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ.अरुणा बारगळ यांचे सत्कार झाले. प्रा. बारगळ यांनी माझा झालेला हा सत्कार लाखमोलाचा असून आता अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. शिवाजी काळे, संगीता फासाटे यांनी करून आभार मानले. 


*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
 ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव

*संकलन*💐✍️✅
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४११२

आ.बच्चू कडू यांच्याशी प्रहार संघटनेच्या वतीने तालुक्यातील विविध समस्यावर चर्चा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील न्यायालयात मुठेवाडगांव येथील शेती व पाणी प्रश्नी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षातर्फे १८ एप्रिल २०१७ रोजी झालेल्या आसूड आंदोलनावेळी पाटबंधारे कार्यालयात अधिकाऱ्यांना काळे फासल्याच्या प्रकरणात शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील व आ. बच्चू कडू यांच्यासह १९ जणाविरुद्ध दावा दाखल करण्यात आला होता, त्यासाठी श्रीरामपूर न्यायालयात आ.बच्चू कडू आले असता त्यांची प्रहार संघटनेच्या वतीने जामखेड तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, शीतल गोरे,रामपूर सरपंच नितीन शिंदे यांच्या वतीने आ.बच्चू कडू यांचा सत्कार करण्यात आला,
यावेळी एका महिला पतसंस्थेकडून अनेक खातेदार,सभासद यांना योग्य माहिती न देणे,अशा अनेक तक्रारीचे निवेदन, अनेक कर्जदार, सभासद यांनी प्रहार जनशक्तीच्या वतीने आ.बच्चू कडू यांना देण्यात येवून आपल्या समस्या त्यांचे समोर मांडण्यात आल्या.
त्याचप्रमाणे संबंधित महिला पतसंस्थेची पदाधिकारी असलेल्या एका महिलेने, खातेदार असलेल्या एका महिलेस अनेकवेळा फार त्रास दिला व चक्क आत्महत्यास करण्यास प्रवृत्त करीत असल्याबाबत त्रस्त खातेदार महिलेने अनेक वेळा पोलिसांना निवेदने दिली. परंतु पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तथा संबंधित पतसंस्थेच्या महिला पदाधिकारी यांचेवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे आ.कडू यांच्या निदर्शनास आणून दिले,यावर आ.कडू यांनी तातडीने दखल घेऊन शहर पोलीस स्टेशनला योग्य ती कारवाई करणेबाबत सूचना दिल्या.
यावेळी चंदन मुथा,भारती वाणी,उषा साळुंके,नितीन शिंदे,तन्वीर शेख,अमोल गहिरे,अनिल गांगुर्डे,शिवा गहिरे,साईनाथ त्रिभुवन आदी उपस्थित होते.


*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 

*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११

Sunday, September 22, 2024

वडाळा महादेव मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी


स्वसंरक्षण ही काळाची गरज - ज्येष्ठ विचारवंत सुधीर कसार 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढली होती, जुनी ग्रामपंचायत चौकात येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सुधीर पाटील कसार यांनी शालेय विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करत स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिके सादर केले तसेच आपले रक्षण आपणच करावयाचे आहे असेही श्री. कसार पाटील यांनी यावेळी सांगितले, वयाच्या ८० व्या वर्षी लाठीकाठी फिरवून तसेच तलवारबाजी व इतर साहित्याच्या साधनाने आपण संरक्षण कसे करू शकतो याची प्रचिती श्री. कसार यांनी विद्यार्थ्यांना करून दाखवीली,
 याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. सुधीर पा कसार यांच्या समवेत श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी चि. आदर्श ढाकले याने देखील प्रात्यक्षिक सादर करताना सुधीर कसार यांची मदत केली त्याबद्दल दोघांचेही वडाळा महादेव ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले व छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. माळी सर यांनी याप्रसंगी सर्वांचेच आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
=================================
-----------------------------------------------




अहमदनगर चे आफताब शेख यांची डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर नियुक्ती


विश्‍वस्त एस.एम. देशमुख व अहमदनगर शाखेच्या वतीने सत्कार

- अहमदनगर - प्रतिनिधी - वार्ता -
 मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारणीत अहमदनगरचे आफताब मन्सूर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांनी पिंपरी चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात शेख यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांचा सत्कार केला.
आफताब शेख यांची राज्य कार्यकारणीत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मराठी पत्रकार परिषद जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकारांच्या अधिस्विकृती समिती नाशिक विभागाचे सदस्य विजयसिंह होलम यांनी सत्कार केला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष सुर्यकांत नेटके, लहू दळवी आदी उपस्थित होते.
डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची डिजिटल मीडिया परिषद या नावाने स्वतंत्र शाखा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. डिजिटल मीडियाची स्वतंत्र कार्यकारिणी करण्याचा निर्णयही परिषदेने घेतला आहे. त्यानुसार काही पदांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्य अध्यक्ष म्हणून बीडचे जिल्ह्यातील पत्रकार अनिल वाघमारे यांची तर कार्याध्यक्ष म्हणून सातारा येथील पत्रकार संतोष उर्फ सनी शिंदे यांची व उपाध्यक्षपदी शेगांव येथील पत्रकार अनिल उंबरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून अहमदनगर येथील न्यूज टू डे २४ चे संपादक आफताब मन्सूर शेख, माथेरानमधील महाराष्ट्र न्यूज २४ तासचे संपादक मल्हार संतोष पवार, बीड येथील वास्तव अपडेटचे संपादक जितेंद्र शिरसाट, डिबीसी न्यूज चंदगडचे संपादक अनिल नयनसुख धुपदाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ११ जणांची ही कार्यकारिणी असेल. उर्वरित सदस्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल, असे एस.एम. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
डिजिटल मीडिया परिषद ही पूर्णपणे मराठी पत्रकार परिषदेच्या अखत्यारित असेल. ही कार्यकारिणी मराठी पत्रकार परिषदेला उत्तरदायी असेल असेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे एस.एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सूर शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार जी.एम.शेख अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर  +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================




श्रीरामपुरात काचोळे विद्यालयाने काढली कर्मवीर अण्णांची अभूतपूर्व मिरवणुक


मिरवणुकीतील सांस्कृतिक विविधतेने 
घडले आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्त डी डी काचोळे माध्य. विद्यालयाच्यावतीने काढण्यात आलेली कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक अभूतपूर्व ठरली. मिरवणूकीचे उदघाटन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजींग कौन्सील सदस्या मीनाताई जगधने, जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम पाटील यांच्या शुभ हस्ते झाले. जवळपास चार किमी लांबीच्या मिरवणुकीने शहरात विक्रम केला आहे. 
       मिरवणुकीमध्ये जवळपास १४३० पेक्षा अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, पालक व नागरिक होते . सवाद्य मिरवणुकीमध्ये भव्य रथ, बँड पथक, झांज पथक, लेझिम पथक, दांडिया नृत्य ,पथनाट्य आदी मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरांमधील चौका चौकात संबंधित नृत्य व विविध पथकांचे सादरीकरण आकर्षक रित्या करण्यात आले. 
   राष्ट्रीय एकात्मतेचे प्रदर्शन दर्शविणारे राजस्थान, कोळी, शेतकरी, पंजाबी,आदिवासी, दक्षिणात्य संस्कृती, वारकरी आदी नृत्यांचा अविष्कार सादर करण्यात आला.  
शहरात ठिकठिकाणी महिलांनी अण्णांच्या पुतळ्याचं औक्षण केले. श्रीरामपूर येथील नागरिकांनी कर्मवीर जयंतीच्या मिरवणुकीचे विशेष कौतुक केले. तसेच माझी पर्यवेक्षक शशिकांत दहिफळे, कामगार हॉस्पिटल वैद्य अधिकारी डॉ. रवींद्र जगधने , प्राचार्य पी व्ही बडधे, प्राचार्य डॉ. एस.ए. निंबाळकर, प्राचार्य डॉ.एम.एस.पोंधे, मुख्याध्यापक सुनिल साळवे, मुखाध्यापिका सोनाली पैठणे, शिवसेना शहर प्रमुख सचिन बडधे, गणेश थोरात, सुनिल डहाळे, आदींनी मिरवणूकीत व कॉलेज रोडवरील कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. यावेळी डी डी काचोळे विद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेला संस्कृतिक कार्यक्रमासह लेझिम व झांज पथकाचे सादरीकरण लक्षनीय ठरले.
मिरवणुकीमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव, संस्कृती व संस्कृतिक वारसा, महापुरुषांचा आदर्श , महाराष्ट्राची लोकधारा, पर्यावरण रक्षण, विविध राज्यांची संस्कृती, दर्शवणारी मिरवणूक होती. तसेच एस.के.सोमैय्या प्राथ.विद्यामंदिर विद्यालयाची कर्मवीर अण्णांची सवाद्य मिरवणूक, रा.ब.ना.बोरावके कॉलेज, सी.डी. जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, स्वामी सहजानंद भारती शिक्षणशास्त्र महाविद्यालय व डी डी काचोळे विद्यालय आदिंच्या मिरवणुकीचा समारोप कर्मवीर चौकातील कर्मवीर पुतळ्या जवळ समारोप झाला. यावेळी श्रीरामपूर रयत संकुलाच्या वतीने व मान्यवरांच्या वतीने कर्मवीर अण्णांना अभिवादन करण्यात आले.
       कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डी डी काचोळे माध्य. विद्यालय स्टाफ, एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थी वस्तीगृह, व पालक आदींनी विशेष परिश्रम घेतले. श्रीरामपूर पोलीस स्टेशनाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ट्राफिक पोलीस आदींनी मिरवणुकीचा चोख बंदोबस्त ठेवला.
     कर्मवीर जयंतीचे औचित्य साधून विद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजन दिले. मिरवणूक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================